वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
ना ना, मला पंचवीस हजार रुपये द्या. शारदा या सुनेनं नाना या सासऱ्यांच्या जवळ सहजपणे मागणी केली. पंचवीस हजार? कशासाठी? नानांना बसलेला आश्चर्याचा प्रचंड धक्का त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटला. शारदा, सून म्हणून या घरात आल्यापासून गेले कित्येक महिने, एक तारखेला आपल्या पगाराचा पंचावन्न हजारांचा चेक नानांच्या हातावर ठेवत होती. तेव्हा नानांना किरकोळ धक्काही जाणवला नव्हता.
१. तणाव असंयमन
व्यायाम करताना, खोकला येताना, कफ असेल तेव्हा, शिंकताना, जोरात हसताना, एखादी जड वस्तू उचलताना किंवा शरिरावर ताण येणारी कोणतीही हलचाल करताना जेव्हा थोडी लघवी होते, त्याला मुत्राशयाचे तणाव असंयमन म्हणतात. मध्यम वयीन स्त्रीयांमध्येसुद्धा ही व्याधी दिसून येते. बाळंतपण झाल्यावर किंवा मेनॉपॉझ सुरू झाल्यावर स्त्रीयांना ही अडचण येऊ शकते.
२. घाई होणे, आणि ताबा न रहाणे
लघवीसाठी जाताना त्या जागी पोहोचे पर्यन्तसुद्धा काहीजण स्वत:वर ताबा ठेउ शकत नाहीत इतकी त्यांना घाई होते. सुदृढ-निरोगी व्यक्तींमधे सहसा ही अडचण दिसत नाही, परंतु मधुमेह झालेल्या व्यक्ती, स्ट्रोक, अल्झायमर, पार्किन्सन्स ह्या व्याधींसहीत जगणा-या व्यक्तींमधे लघवीवरील ताबा न रहाण्याची अडचण ब-याचदा दिसून येते. ही काहीवेळा ब्लॅडर कॅन्सरची पूर्वसूचनाही असू शकते.
३. अतिप्रवाह असंयमन
मुत्रप्रवाहावर असंयमन होते, जेव्हा थोडी लघवी न होता खूपच जास्त होते. पुरुषांचे प्रोस्टेट जेव्हा वाढते तेव्हा त्यांना अनेकदा ह्या व्याधीला सामोरे जावे लागते. मधूमेह किंवा मणक्याची काही व्याधी ह्यामुळे सुद्धा अतिप्रवाह असंयमनाची अडचण वाढू शकते.
४. सामान्य असंयमन
वृद्ध व्यक्तींमधे मुत्राशयावरील सामान्य असंयमनाची अडचण अनेकदा येते. ही अडचण अशांवर येते, ज्यांचे मुत्राशयावरील संयमन सर्वसामान्य आहे परंतु त्यांना लघवी लागल्यावर इतर काही कारणांमुळे उठायला त्रास होतो, चालायला त्रास होतो, अर्थ्रायटीस, गुडघे दुखी, अशक्तपणा ह्या व्याधींमुळे ही अडचण येऊ शकते. फक्त त्याचे गांभीर्य कितपत आहे आणि ते त्या वृद्ध व्यक्तीने कशा त-हेने घेतले आहे, आणि त्यांची जीवनशैली कशी आहे ह्यावरही ते अवलंबून असते.
५. मुत्राशयावरील नियंत्रणाचे प्रशिक्षण
आपल्या मुत्राशयाची काहे व्याधी सुरू झाली असेल लघवीवरील नियंत्रण जात असेल तर डॉक्टर आपल्याला ते नियंत्रण कसे ठेवायची ह्याचे प्रशिक्षण देतात. ह्यासाठी खरं तर अनेक मार्ग आहेत, परंतु आपल्या मुत्राशयाची व्याधी नेमकी काय आहे ह्यावर सुद्धा ते प्रशिक्षण अवलंबून असते. आणि प्रशिक्षण आत्मसात केल्यास आपण योग्य असे नियंत्रण मुत्राशयावर ठेऊ शकतो.
६. पेल्विक स्नायूंचा व्यायाम
पेल्विक स्नायूंच्या व्यायामाला केगल व्यायाम असेही म्हणतात. हा व्यायाम आपले मुत्राशयाजवळचे काही स्नायू बळकट करण्यासाठी उपयोगी ठरतो. हा स्नायू बळकट झाल्याने वृद्ध व्यक्तींना लघवीवर संयम राखणे सोपे जाते. तसे पहाता हे व्यायाम खूप सोपे आहेत. त्यामुळे आपला ताणही हलका होतो.
आज यूट्युबवर एक गाणे समोर आले आणी मन भूतकाळात गेले.’मैंने पायल है छनकायी’कॉलेजच्या दिवसांत हे गाणे टीव्हीवर लागायचे आणी मुली त्याला पाहून आपल्या राजकुमाराची स्वप्न रंगवायच्या.सोनेरी स्वप्न पहायचे दिवस होते ते.मन पाखरु होण्याचे दिवस..
१९९६ : वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी, आपल्या दुसर्याच प्रथमश्रेणी सामन्यात वसिम जाफरने सौराष्ट्राविरुद्ध राजकोटमध्ये नाबाद ३१४ धावा काढल्या.
१९७९ : मालिकेतील सहावा सामना जिंकून भारताने प्रथमच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकली.
त्रेतायुगात झालेल्या श्री गणेशा यांच्या मयुरेश्वर अवताराचे वाहन मोर वर्णिले आहे. पुन्हा कालचाच प्रश्न पडतो की मोरावर कसे बसता येईल. तर लक्षात घ्या की एक भगवान शंकराचा नंदी दुसरा देवी लक्ष्मीचा हत्ती आणि तिसरा यमराजाचा रेडा सोडला तर कोणत्याही देवतेच्या वाहनावर बसताच येत नाही.
आदरणीय महात्माजी, विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ जगतवंद्य विभूती आपणांस मानले जाते. विलक्षण निर्भयता, नम्रता, कमालीची साधी राहणी, दीन-दलितांविषयी अथांग करुणा आणि शोषितांबद्दल सहानुभूती या गुणांचा संगम आपल्या ठिकाणी होता. तत्वज्ञान ही जीवनाबरोबर विकसीत होणारी गोष्ट आहे, हे आपल्या बाबतीत खरे आहे. नैतिकता हेच संस्कृतीचे अधिष्ठान, संयम व त्याग हाच तिचा आत्मा. सुखोपयोगी साधने वाढविण्याची संस्कृती सध्या निर्माण होत आहे. श्रमप्रतिष्ठेची पीछेहाट होत आहे.
वैशाख शुद्ध पौर्णिमेला सूर्योदय समयाला भगवंतांनी त्याच मूर्तीतून पुष्टिपती अवतार धारण केला. भगवान श्री कृष्णांनी मांडलेली दोन पुष्टिपती गणेश यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा आणि पुणे जिल्ह्यातील सुपे येथे विद्यमान आहेत……

अतिउंचीवरील परिस्थिती ही सजीवांसाठी राहण्याच्या दृष्टीनं अत्यंत बिकट असते. अतिथंड तापमान, अत्यंत शुष्क हवा, प्राणवायूची कमतरता, खाद्याचा अभाव, अशा सर्व कारणांमुळे, अधिकाधिक उंचावर जावं तसं तिथे आढळणाऱ्या पशु-पक्ष्यांची संख्या रोडावत जाते.
भारताची जगभर मंदिरांचा देश अशी ओळख आहे. हजारो वर्षांपासून इथे मंदिरे उभारली गेली. काही नगरांमधे अक्षरश: शेकड्यात मंदिरे आहेत. भुवनेश्वर) (ओडिशा). कांचीपुरम (तमिळनाडू), पट्टदकल आणि हम्पी (कर्नाटक), मसरूर (हिमाचल प्रदेश), खजुराहो (मध्य प्रदेश), अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. आजही अशी बरीच गावे आणि त्यातील मंदिरे आपण बघू शकतो.
माणूस जे कर्म करतो त्याचे फळ देण्याची व्यवस्था निसर्गाने त्या कर्मातच करून ठेवलेली आहे. परिणामी विशिष्ट परिस्थितीत प्रामाणिकपणे काम करून सुद्धा जरी यश मिळाले नाही तरी हताश होण्याचे कारण नाही.
चांगले केलेले काम कधी वायाला जात नाही, आज जरी यश मिळाले नाही तरी ' क्रिया तशी प्रतिक्रिया ' या निसर्गनियमानुसार भविष्यात ते न मिळालेले यश माणसाला दामदुपटीने मिळते.
एखादा माणूस आपले सुयश हिरावून घेतो म्हणजेच आपल्याला अपयश मिळते. ज्याअर्थी अपयश मिळाले त्या अर्थी ते अपयश निसर्गनियमानुसार आधी केलेल्या चुकांचे फळ असू शकते.
यशाचे कर्तृत्व माणूस स्वत:कडे घेतो, त्याचप्रमाणे अपयशाचे भोगतृत्वसुद्धा त्याच्याचकडे जाणे क्रमप्राप्त आहे.
म्हणूनच माणसाने अपयशाचा कोळसा उगाळत बसण्यापेक्षा केलेल्या चुका दुरुस्त करून यशाच्या दिशेने प्रयत्न करणे, हेच त्याच्या हिताचे होय. प्रामाणिकपणे व कर्तव्यबुद्धीने काम करणे, हे सर्वार्थाने सर्वांच्याच हिताचे आहे.
' क्रिया तशी प्रतिक्रिया ' म्हणजे 'Low of Action and Reaction' या निसर्ग नियमाला अनुसरून ज्या राष्ट्रातील लोक कामात कसूर करतात त्या राष्ट्राचा उत्कर्ष घडवून आणणे ब्रम्हदेवाला सुद्धा शक्य नाही.
याउलट ज्या राष्ट्रांतील लोक कर्तव्यबुद्धीने, प्रामाणिकपणे काम करतात त्या राष्ट्राचा उत्कर्ष अटळ आहे.
- सद्गुरू श्री वामनराव पै
Copyright © 2025 | Marathisrushti