वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
विश्व शब्दाचा अर्थ आहे पसरलेले. या अनंत कोटी ब्रह्मांडाच्या पसाऱ्याचे स्वामी असल्यामुळे भगवंताला विश्वनाथ असे म्हणतात.
भारतीय ज्ञानाचा खजिना’ नावाचं प्रशांत पोळ ह्यांनी लिहिलेलं अतिशय महत्वपूर्ण पुस्तक वाचलं. सदर पुस्तकाचं प्रकाशन मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी केलंय आणि पुस्तकाला मा. मोहन भागवतांची प्रस्तावना आहे. सदर पुस्तकातून मुस्लिम आक्रमक भारतात येण्या आधीच्या संपूर्ण कालखंडात सर्व जगात आपला कसा दबदबा होता, आपण ज्ञानाच्या, संपत्तीच्या आणि समृद्धीच्या बाबतीत जगात कसे सर्वश्रेष्ठ होतो ह्यावर संशोधन करून प्रशांत पोळ ह्यांनी अभ्यासपूर्णपणे मांडलेलं आहे. पुस्तकातून उलगडलेली काही अद्भुत माहिती अशी
श्रीमद् आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारले, “तू कोण आहेस?” त्यावर त्यांनी दिलेले उत्तर म्हणजे हे अर्थगर्भ षटक होय. सहा श्लोकांचे हे काव्य अद्वैत वादाचा गाभाच म्हणावयास प्रत्यवाय नसावा. त्याला ‘निर्वाणषटकम्’ किंवा ‘आत्मषटकम्’ असेही म्हणतात. या स्तोत्रात आचार्यांनी सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव व स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रथम मी (म्हणजे आत्मा) काय नाही हे सांगून शेबटी थोडक्यात मी कोण आहे ते मांडले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ताम्हाणे राजापूर या ठिकाणी गुप्ताबाई देवीचे मंदीर वसलेलं आहे. गुप्तदेवी म्हणजे निर्गुण स्वरुपाची देवी असा आशय प्रतीत होतो,
काळा पैसा निर्माण करण्यात सामान्य माणसाचा प्रमुख सहभाग आहे.
आयुषोवेदः आयुर्वेदः
आयु विषयी ज्यात सर्व ज्ञान मिळते ते शास्त्र.
आयुर्वेद म्हणजे जीवन जगण्याचे शास्त्र.
याचाच अर्थ मृत्युविषयीचे संपूर्ण ज्ञान.
आपापल्या कर्मफलानुसार, त्याने नेमून दिलेले ( नियत) आयुष्य जगता यावे, या वेळेअगोदर मृत्यु येऊ नये, यासाठी कोणते नियम आहेत, ते जाणून घेण्यासाठी आयुर्वेद शिकावा.
जगण्यातले हे अडथळे दूर करण्यासाठी हे अडथळे ओळखता येणे महत्वाचे. यातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे रोग.
हे रोग होऊ नयेत यासाठी स्वस्थवृत्त आणि रोग झाल्यानंतर रोगापासून पूर्ण मुक्ती मिळवणे यासाठी व्याधीमोक्ष असे दोन प्रमुख अभ्यासाचे विषय आहेत. याची योग्य सांगड घालता आली पाहिजे.
या आरोग्यटीप लिहिण्याचे कारणच हे आहे, की सर्वांना हे स्वस्थवृत्त आणि व्याधीमोक्ष समजून द्यावे.
जगण्याचे छोटे छोटे नियम सांगणाऱ्या आरोग्यटीपा म्हणजे स्वस्थवृत्त.
आणि ज्याला त्याला झटपट उपाय हवा असतो. त्यांना जे घरगुती आरोग्य सल्ले दिले जातात, ते व्याधीमोक्ष. ( घरगुती सल्ले म्हणजे परिपूर्ण आयुर्वेद नव्हे हो, उगाच शब्दांचा छळ करू नका. )
नळाला पाणी खराब येते याचे कारण न शोधता, नळच बदलून बघूया असा सल्ला देणारे, आजचे अजब पाश्चात्य वैद्यकीय तंत्र.
हो आणखीन एक मोठ्ठा गैरसमज. आरोग्यटीपेमधे पाश्चात्य तंत्रज्ञानाला, त्यांच्या संशोधक वृत्तीला, काहीही किंमत नाही. असे पण नाही. जे योग्य आहे ते योग्यच ! पण जर आपले मूळ भारतीय आरोग्य शास्त्रच या पाश्चात्य विचाराने घराबाहेर काढले जात असेल आणि जाणीवपूर्वक बदनाम केले जात असेल तर
यात कोण चुक कोण बरोबर असा प्रश्नच नसतो. प्रत्येक जण आपल्या जागी योग्यच असतो. फक्त एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला की सर्वच विकृत आणि चुकीचे दिसू लागते.
आयुर्वेद हे थोतांड आहे. शास्त्रच नाही. फक्त पाळेमुळे. अंधश्रद्धा !
आयुर्वेद हा कुठलाही आजार बरा करू शकत नाही. इन्स्टंट तर नाहीच नाही. ह्यात फक्त दिनचर्या चांगली समजून सांगितली आहे. बाकी सगळं फेकू.
असा सूर येण्यामागे प्रचंड मोठे गैरसमज आहेत. एकतर पूर्वग्रह दूषित असणार किंवा आयुर्वेदात काय सांगितले आहे ह्याचा अभ्यास नसणार किंवा कुणीतरी चुकीच्या पद्धतीने आयुर्वेद समजून घेतला असणार किंवा गुरूविना ज्ञान घेण्याचा प्रयत्न झाला असणार किंवा आयुर्वेदाने यांव होते, त्यांव होते, दहा मिनीटात दमा जातो, पंथरा मिनीटात कॅन्सर गायब, असले काहीतरी 'टाॅल क्लेम' करणारे तथाकथित कुणाला तरी भेटले असणार ! स्वयंघोषीत वैद्यांची काही कमी नाही. जे पारंपारिक वैदू औषधे देतात, त्यांना शरीरशास्त्र माहिती नाही, जे योगतज्ज्ञ आहेत त्यांना औषधांची माहिती नाही. जे डाएटिशीयन आहेत, त्यांच्याकडे फक्त पुस्तकी ज्ञान.
जिच्याकडे अनुभवाचा बटवा आहे, तीला पाठवली वृध्दाश्रमात, ज्यांच्याकडे आयुर्वेदाची पदवी आहे, त्यांना अनुभव नाही.
उरलेल्या सगळ्यांकडे आहे फक्त अहंकार. मी सांगतोय तेवढंच बरोबर. बाकी सब झुठ.
आणि सगळ्यांना हवे आहे, जमाने के साथ चलनेवाला इन्स्टंट !
या सर्वांच्यात कडबोळ झालंय आयुर्वेदाचं !
कुणीही यावे, टिचकी मारून जावे,
काहीही सांगावे, काहीही बोलावे,
मनमानी लिहावे, वाॅटसप करावे,
अतिशहाणे करूनी सोडावे
सकल जन.
असं झालंय सगळं.
यामुळे गैरसमज वाढतात.
पूर्ण ग्रंथ वाचल्यावीण
उगाच ठेवी जो दूषण
तो दुरात्मा दूराभिमान
मत्सरे करी । असं समर्थांनी उगाच नाही सांगितलेलं.
आयुर्वेदाला बदनाम करण्यामधे हा झटपट दृष्टीकोन कारणीभूत आहे.
गरज आहे फक्त दृष्टीकोन बदलण्याची.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
12.02.2017
दिनदर्शिकेचा इतिहास इनिहा, मानवाने शेतकरी म्हणून जीवनास सुरूवात केली तेव्हापासून अस्तित्त्वात आला. त्यापूर्वी त्याला ऋतू आणि त्यांचा काळ आणि क्रम याबद्दल फारसे ज्ञान नव्हते. हिवाळ्यानंतर हवामानात ऊब येऊन झाडांना पाने-फुले येऊ लागतात हे देखील त्याला फार उशीरा कळले.
‘फेब्रुवारी’ मध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या ‘सृजनशील, प्रामाणिक, शांत व द्रष्टया’ मानल्या जातात. चालू ‘फेब्रुवारी’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय व मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.
अवघड मार्ग आणि अनवट वाटांवरुन द-याखो-यात भटकणारऱ्या गिर्यारोहकानी गिर्यारोहणाबरोरच आपली समाजसेवेची आवड जोपासत महाड तालुक्यातील दरडगस्त सह्याद्रीवाडीत इमारती विना शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या नव्या इमारतीचा आसरा दिला आहे.
राजवाडे, किल्ले, गढ्या, गोदामे, बंधारे ही प्राचीन बांधकामे होत. ही सर्व बांधकामे दगडी होती. खडकाळ भागांत खडक सुरुंगाने फोडून त्याचे तीस सें.मी. ते एक मीटर आकाराचे दगड काढण्यात येत. छिन्नी हातोड्याने दगड घडवून त्यांचे घनाकृती किंवा लंबघनाकृती आकार करून ते एकावर एक रचून भिंती बांधण्यात येत असत.
Copyright © 2025 | Marathisrushti