(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री शिव नामावल्यष्टकम् – ३

    भगवान शंकरांच्या या दिव्य नामावलीला पुढे सुरू ठेवताना जगद्गुरु आचार्यश्री म्हणतात, हे नीलकण्ठ – समुद्रमंथनाच्या वेळी निघालेले हलाहल नामक महाभयानक विष, समस्त ब्रह्मांडाच्या कल्याणासाठी प्राशन केल्यामुळे ज्यांचा गळा काळानिळा पडलेला आहे असे.

  • दौरे बंद करा अन् पाककडे बघा…

    या देशातून त्या देशात… त्या देशातून पुन्हा आणखी कोणत्या देशात… पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दौरासत्र काही संपायला तयार नाही. एकीकडे देशापुढे महागाई आणि पाकच्या …..

  • भारताचा जगविख्यात फलंदाज सुनील गावस्कर

    भारताचा जगविख्यात फलंदाज (सलामीवीर) सुनील मनोहर गावस्कर यांनी तीस वर्षांपूर्वी पाकिस्तान विरुद्ध खेळतांना आजच्या दिवशी म्हणजेच "०७ मार्च १९८७"रोजी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर आपल्या कसोटी क्रिकेट करकिर्दीतील १०००० (दहा हजार) धावा पूर्ण केल्या.

    अशी अजोड कामगिरी करणारा सुनील गावस्कर हा क्रिकेट विश्वातील पहिला महान फलंदाज ठरला.

    पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यात सुनील छप्पन धावांवर खेळत असतांना 'एजाज फकी' च्या गोलंदाजीवर स्लीप मधे बॉल ढकलुन एक धाव काढली आणि समोर(नॉनस्ट्राइकरएंड वर) उभ्या असलेल्या किरण मोरेनी धावत जाउन सुनीलचं अभिनंदन केलं. एक क्षण सुनीलला समजलच नाही की आपलं शतक झालं नाही तरी हा इतका खुश का झाला आहे. पण किरणनी जेव्हा सांगितलं की तुम्ही दहा हजार धावा पूर्ण केल्या आहेत तेव्हा मात्र सुनील आपला आनंद लपवु शकला नाही. संपूर्ण भारतात आनंदाचं उधाण आलं. कारण साऱ्या भारतीयांचं स्वप्न सुनीलनी प्रत्यक्षात उतरवलं होतं. अनेक ठिकाणी पेढे/मिठाई वाटुन लोकांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली, जणु काही स्वत:च्याच घरात काही खास घडलं होतं. याला कारण सुनील गावस्कर - तो होताच मुळी सर्वांचा लाडका.

    सुनीलच्या या दैदीप्यमान कामगिरीमुळे भारताचा क्रिकेट जगतात दबदबा निर्माण झाला. भारतीय क्रिकेट आणि खेळाडु याबद्दल क्रिकेट खेळणाऱ्या देशातील रसिक आदराने पाहु लागले कारण सुनीलनी आपल्या थक्क करणाऱ्या कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट एका वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवलं होतं.

    अशा या महान फलंदाजाचं आपण सारे मिळून कौतुक करुया!!!

  • मार्क झुकेरबर्ग’ चे यशाचे १० मंत्र

    अनेक लोकांना वाटते की, फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गला एका रात्रीत यश मिळाले. मात्र, त्या लोकांचा हा गैरसमज आहे. कारण मार्क झुकेरबर्गने फेसबुक उभी करण्यासाठी खूप कष्ट उपसलेले आहेत. त्याचे फंडे वापरून तुम्हीही यश मिळवू शकता.

  • भारत-पाक संबंध एक शुन्याचा पाढा

    काश्मीर प्रश्न भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी चर्चेद्वारे सोडवावा, यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही’, असे सांगत संयुक्त राष्ट्र संघाने (यूएन) पाकिस्तानला झटका दिला. भारताचे दोन्ही प्रमुख शेजारी पाकिस्तान आणि चीन हे नेहमीच भारताच्या सीमा भागात गोळीबार व घुसखोरी करत असतात.

  • अमेरिकेतील कंट्री म्युझिक – भाग ४

    आपल्याकडे संगीत म्हटलं की गीतकार, संगीतकार आणि गायक अशी त्रिमूर्ती असावी लागते. हिंदीमधे गीतकार शैलेंद्र किंवा हसरत जयपुरी, संगीतकार

    शंकर जयकिशन आणि गायक मुकेश किंवा गीतकार शकील बदायुनी, संगीतकार नौशाद आणि गायक महमद रफी किंवा गीतकार राजा मेहेंदी अली

    खां, संगीतकार मदन मोहन आणि गायिका लता मंगेशकर असे त्रिवेणी संगम असले की डोळे मिटावेत आणि शब्द आणि स्वरगंगेत बुडून जावं. क्वचित्‌

    कधी सी.रामचंद्र, हेमंतकुमार किंवा सचिन दा आपल्याच आवाजात गायले तर तेवढ्यापुरतं संगीतकार आणि गायक एक होणार. अर्थात मराठीमधे गोष्ट

    थोडी वेगळी आहे. ग.दी.मांनी लिहावं आणि बाबुजींनी (सुधीर फडके) चाल देऊन गावं हा अलिखित नियम !

    पण कंट्री म्युझिकमधे सहसा गीतकार आणि गायक एकच असतो. त्यात बहुतेक सगळे (निदान पुरुष कलाकार) गिटार वाजवणारे. त्यामुळे पठ्ठ्या

    स्वत:च गाणे लिहिणार, त्याला चाल लावणार आणि गिटार वाजवत स्वत:च गाणार. काही वेळां त्यांच्या जोड्या किंवा ग्रूप्स असतात. त्यामुळे दोघांनी

    मिळून गाणी लिहायची, त्याला संगीत द्यायचं आणि गायचं असं चालतं. तीन चार जणांचा ग्रूप असला तर सहसा एक दोन जण गाणं लिहितात, एखादा

    मुख्य गायक आणि बाकी साथ देणारे, आणि बहुतेक जण एखादं वेगवेगळं वाद्य वाजवणारे.

    कंट्री म्युझिक आणि मराठी संगीताची तुलना करायची झाली तर काही साधर्म्य जाणवतं. कवितेचा ढंग, गाण्याची शैली, त्यातला आशय, त्याचे

    चित्रांकन (Video) वगैरे सगळ्याचा विचार केला तर आपले वसंत बापट, शाहीर साबळे आणि दादा कोंडके यांच्या गाण्याचं आणि शैलीचं अजब

    मिश्रण डोळ्यांसमोर तरळून जातं.

    कंट्री म्युझिकमधे काही काही विषय ठळकपणे पुन: पुन्हा येतांना दिसतात. यातला महत्वाचा विषय म्हणजे “माझा गाव”. यात आपल्या कुठल्यातरी

    कोपर्‍यातल्या छोट्याश्या गावाचं मोठं कौतुक केलेलं असतं. गदिमांच्या “खेड्यामधले घर कौलारू”ची आठवण यावी असं! मग आपल्या गावातली छोटी

    शाळा, गावाबाहेरचा ओढा, गावाच्या वेशीवरची पाण्याची टाकी, गावातलं जुनं छोटं चर्च, झोपाळू रस्ते, पिढ्यान पिढ्यांचे शेजारी, कोपर्‍यावरचं तुटपुंज्या

    वस्तू मिळणारं छोटसं किराणा दुकान, यांच्या आठवणी काढलेल्या असतात. त्यात आपण काऊबॉय किंवा काऊगर्ल आहोत हे मोठ्या अहमहमिकेने

    सांगण्याची धडपड असते. “आम्ही आपले गावंढळ आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे” हे “गर्वसे कहो हम हिंदू है” या चालीवरचं पालूपद!

    अमेरिकेत गावाकडच्या लोकांना ‘रेड नेक’ म्हणतात. (उन्हा तान्हात काम करणार्‍या लोकांच्या माना, उन्हात रापून तांबड्या लाल होतात. त्यामुळे शहरी

    लोकांनी शेतकरी – गावंढळ लोकांना ठेवलेलं हे शेलकी विशेषण) त्यामुळे आपल्या ‘रेड नेक’ पणाचं कौतुक कंट्री म्युझिकमधे होणं हे ओघाने आलंच.

    -- डॉ. संजीव चौबळ

  • श्री गणेश भुजंगस्तोत्रम् – भाग २

    अशा स्वरूपानेयुक्त असणाऱ्या, विविध अवतारांचा स्वरूपात शिवपुत्र असणाऱ्या भगवान श्री गणेशांची मी स्तवन करतो.

  • ऑक्टोबर ०६ – टोनी ग्रेग

    नाव अन्थनी असूनही ‘टोनी’ या नावाने जगद्विख्यात झालेल्या ‘टोनी ग्रेग’चा जन्म या तारखेला १९४६ मध्ये झाला. सध्या तो उत्साही आणि रंजक समालोचक म्हणून मैदाने गाजवितो आहे.

  • खगोलशास्त्रावर आधारित गैरसमजुती कोणत्या?

    खगोलशास्त्राबद्दल जनसामान्यांत अनेक समज-अपसमज प्रचलित असतात. मध्यंतरी अशी बातमी पसरली होती की मंगळ ग्रह पृथ्वीच्या खूपच जवळ येणार असून तो पौर्णिमेच्या चंद्राइतका मोठा दिसेल. ही बातमी खोटी होती. सर्व ग्रह हे सूर्याभोवती फिरताना ठरावीक कालाने परस्परांजवळ येतात. पण जवळ आल्यावरही थोडा तेजस्वी दिसण्यापलीकडे मंगळ नुसत्या डोळ्यांना मोठा दिसत नाही. कारण तो फारच दूर आहे.

  • गौरीचे आगमन

    भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला महाराष्ट्रात व देशातही गणपतीची स्थापना होते. प्रत्येक घरात प्रथेप्रमाणे गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते दहा दिवसांनंतर विसर्जन होते. चतुर्थीनंतर गणेशाची माता पार्वती-म्हणजेच गौरी चे त्यापाठोपाठ आगमन होत आहे.

    पश्चिम महाराष्ट्रात गौरी-गणपती, तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हणतात. महालक्ष्मीचा हा सण तीन दिवस असतो व तो घरोघर साजरा केला जातो. खडय़ाची, कलशाची, मुखवटय़ाची अशा विविध रुपात तिची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात प्रतिष्ठापना पेलेली ज्येष्ठा व भाद्रपद महिन्यात तिच्या शेजारी बसविण्यात येणारी कनिष्ठा अशा दोघींची जोडीने पूजा होईल. पहिल्या दिवशी आगमन, दुस-या दिवशी गौरी भोजन व तिसर्याज दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला या गौरी -महालक्ष्मीचे विसर्जन करण्यात येते. या निमित्ताने गौरी रेखाटन कलाही विकसित झाली आहे. मातीच्या सुगडावर पिवडी व चुना यांचा वापर करून गौरीचे मुख रेखाटले जाते तर त्या सभोवती शंख, चक्र, पद्म, गदा, हस्त, गाय वासरु, तुळशी वृंदावन, स्वस्तिक, गौरीची पावले अशी प्रतिक चिन्हेही रेखाटली जातात. गुरवारी गौरीचे आगमन होईल. शुक्रवारी गौरीच्या जेवणाचा थाट असेल तर शनिवारी गणपतीसोबत गौरीला निरोप दिला जाईल.

    कुटुंबाला एकत्र आणणाऱ्या या गौरीच्या आगमनाची उत्सुकता लहानथोर सर्वानाच असते. मग काय गौरीचं आवाहन, तिची पूजा ते तिच्यासाठी केली जाणारी सजावट, तिचं नटणं, थटणं, पंचपक्वानांचा केला जाणारा बेत आणि गौरीसाठी जागविलेल्या रात्री असं खूप काही गौरी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. गौरीपूजनाला पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी पूजन असून सवाष्ण जेवायला घालतात. हा इथला मुख्य समारंभ असतो. त्यानंतर आरती करून पुरणपोळीचा बेत असतो.काही ठिकाणी गौरीच्या नैवेद्याला घावन घाटले करण्याची पद्धत आहे. आणि तिसऱ्या दिवशी पानावर दहीभात व कानवल्याचा नवेद्य देऊन गौरींचं विसर्जन केलं जातं.