(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री गणेश भुजंगस्तोत्रम् – ८

    हे मोरया आपणच या संपूर्ण ब्रम्हांडाचे मूल बीजतत्व आहात. हे ईशसूनु अर्थात शिवसुता आपणास वंदन असो.आपण मला प्रसीद अर्थात प्रसन्न व्हावे.

  • फॅण्टासी आणि रोमॅण्टीक बाजी…

    दमदार कथानक आणि संवाद असलेल्या प्रोमोजने एखाद्या चित्रपटाचं मार्केटींग करुन प्रेक्षकांना स्वत:च्या चित्रपटाकडे खेचुन आणायचे आणि “तगडी स्टारकास्ट” च्या बळावर सिनेमात काहीतरी वेगळेपण आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केल्यावर प्रेक्षकांना एनकॅश करायचे हे ट्रेंड आता जुने झालेत. श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, इला भाटे यांची मुख्य भूमिका असलेला बाजी हा चित्रपट मसालेदार आणि स्टारडम झालाय.हे वेगळ्या शब्दात सांगायचे तर कथेत अनोखेपणा नाही; पण फॅण्टासी क्रियेट करुन जुना व सध्याच्या काळाला सांगड घालण्यात काही फरकाने यशस्वी ठरलाय. संवादशैलीलात्या भागातला बाज आहे व मनाला भिडतील असे नाही! रोमॅन्टीक सेन्स बरा असला तरी प्रेमाचा फण्डा अचुकपणे हाताळण्यात आलेला आहे.

    बाजीची कथा घडते कोकणातल्या श्रीरंगपूरच्या छोट्याशा गावामध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर बारा-चौदा वर्षा नंतरच्या काळातील ही कथा! चिविलदास (श्रेयस तळपदे), हा सामान्य घरातील मुलगा स्वाभावाने बर्‍यापैकी बालीश जो आपल्या आईसोबत (इला भाटे) रहातोय, उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांचं किराणा मालाचं दुकान आहे. त्याच गावात गौरी (अमृता खानविलकर) नावाची मुलगी आहे जी चिदुची बालमैत्रीणं पण आहे; तिच्या स्वपनातला राजकुमार आहे "बाजी"! बाजी हे पात्र म्हणजे श्रीरंगपूरच्या गावकर्‍यांचा रक्षणकर्ता. कोणत्याही आपत्कालिन स्थितीत बाजी हा गावकर्‍यांच्या मदतीला धावून यायचा. हे सर्व चित्रपटाच्या सुरुवातीला कॉमिकच्या चित्रातून निवेदनात्मक पध्दतीने कथन करुन उत्तमरित्या सादरीकरण तर कुठे कलाकारांच्या अभिनयातून आल्यामुळे सुरुवातीचे प्रसंग खिळवून ठेवणारे आहेत. गौरीच्या स्वप्नातला राजकुमार सुध्दा बाजीच आहे कारण लहान असताना आपल्या गावातल्या जत्रेतील “जाइंट व्हील” वरचा तोल सुटल्यावर अडकल्यामुळे ती पडणार तितक्यात बाजी घोड्यावर येऊन तिला वाचवतो आणि म्हणूनच तिचं इतिहासातल्या बाजी वर प्रेम जडलयं. पण सध्याच्या स्थितीत तिचा मित्र चिदु तिच्यावर मनापासून प्रेम करतोय. चिदूचं व्यक्तीमत्त्वा आणि त्याचं स्थान हे आपल्यासाठी केवळ एका उत्तम मित्राप्रमाणे
    आहे. कारण त्याच्या गुणांचा दुरपर्यंतही बाजीशी संबंध नाही. त्यामुळे कथेला “रोमॅण्टीक टच” देखील मिळतो. चिदुच्या भोळेपणाचा गैरफायदा अनेकांनी आत्तापर्यंत घेतला असला तरी तो एक थट्टेचा भाग असतो. याच सुमारास मार्तंड (जितेंद्र जोशी)ची एंट्री होते. सुरुवातीला साधा, सरळ असलेल्या मार्तंडची खलकीवृत्ती कशी जागृत होते आणि चित्रपटाच्या अखेरपर्यंत त्याचा खलनायकी चेहर्‍याची खुनशी रुपं कशी उळघडत जातात हे सुरेखरित्या पडद्यावर साकारण्यात आले आहे. खलनायक बनलेला मार्तंड पुढे चिदुची हत्या करुन समुद्रात ढकलून देतो. पण ज्यासाठी चिदुची हत्या होते आणि जे बाबी मार्तंडच्या विक्षिप्त पणाला ठरतात ती म्हणजे पुरातन खजिना. आणि या दुर्मिळ खजिन्याच्या रक्षणासाठी बाजी त्या गावात वावरत होता. चिदुच्या हत्ये आधी ज्यावेळी त्याला कळते की आपण बाजीचे वंशज आहोत त्या वेळी गौरी ही गोष्ट तो अनेक मार्गाने पटवून देतो.

    shreyas actionपण गौरी चिदुवर प्रेम करत नसल्यामुळे, पुढे ट्विस्ट म्हणून वेगळा प्रसंग साकारण्याचा प्रयत्न दिग्दर्शका कडून केला गेलाय ज्यामुळे चित्रपट शैलिदार बनतो. कारण चिदु नंतर नव्याने नायकाची एंट्री होणार हे कोणत्याही चित्रपटाचा ठरलेला पॅटर्न असतोच. पुढे नायकाची अर्थात श्रेयस तळपदेची नव्याने एंट्री होते आकाश या व्यक्तीरेखेच्या माध्यमातून. आकाश हा हिरे चोर आहे. मुंबईहून हिरे चोरल्यावर थेट समुद्राच्या मार्गाने पोलिसांच्या तावडीतनं निसटत असतानाच त्याची नवका वादळाच्या तडाख्यात उलटते आणि आकाश थेट श्रीरंगपूरच्या समुद्र किनार्‍यावर येऊन आढळतो. चिदुच्या साथीदाराला जेव्हा आकाश बेशुध्द अवस्थेत सापडत़ो त्यावेळी आकाशला चिदुच्या घरी दाखल करण्यात येते. पण आकाश हा खरा चिदु नसून आकाश आहे, हे ज्यावेळी त्याच्या आईलला कळते तेव्हा तिची आई म्हणून झालेली व्याकुळ अवस्था पण त्याचवेळी आकाश श्रीरंगपूर मध्ये असणं ही किती महत्त्वाचं आहे हे ज्यावेळी आकाशला समजतं तेव्हा त्याच्या रुपाने झालेला बाजीचा प्रवेश गावकर्‍यांच्या दृष्टीनेही एकार्थी सुखद अनुभव असतो. इथे मार्तंड व त्याच्या माणसाने अख्खा गाव वेठीस धरलेला असतानाच त्याचा साम्राज्याला सुरुंग लागायला सुरुवात झालेली असते तर दुसरी गौरीच्या स्वप्नातला सुपरहिरो परतल्यामुळे “रोमॅन्स फ्लेव्हर” अनुभवायला मिळतो. पण गुन्हेगार असलेला आकाश ज्यावेळी हे सत्य गौरीला सांगणार तितक्यात मार्तंडच्या गुंडांकडून त्याचावर हल्ला होतो पण या प्रसंगाला ही आकाशने केलेली फाईट यामध्ये नाविन्य नसलं तरी त्यापुढे येणारे ट्विस्ट आणि पोलिस इन्सपेक्टर आकाशचा करत असलेला पाठलाग यातून “बाजी स्टाईल”ने सरकलेला चित्रपटाचा शेवट नक्कीच आपल्याला खिळवून ठेवेल.

    बाजी चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वच कलाकारांचा कसदार अभिनय, सुयोग्य दिग्दर्शन आणि प्रसंग व काळानुसार केलेला वस्तुंचा वापर, वेशभुषा, चित्रपटाच्या तांत्रिक बाजू आणि बाजीची कथा सांगण्यासाठी आकर्षकरित्या केलेलं अॅनिमेशन त्याला जोड म्हणजे सचिन खेडेकरांच कथामय निवेदन. महत्त्वाचं म्हणजे मार्तंडच्या व्यक्तीरेखेला जितेंद्र जोशीचे न्याय दिलायं असंच म्हटलं पाहिजे. पुरस्कारांच्या वेळीही मार्तंडची दखल घ्यावी लागेल. सिनेमाची गाणी सुध्दा कथेच्या प्रसंगाला शोभणारी आहेत.

    या चित्रपटाची खटकणारी बाजू म्हणजे लांबलेलं कथानक; सुरुवातीला खुप इंटरेस्टीग वाटणारी कथा नंतर रटाळवाणे वाटत रहातं. “साऊथ टच” असलेल्या फाईट सीन्स याआधी ही अनेक मराठी सिनेमांमधून पहायला मिळाल्या आहेत. त्याच धाटणीवर आधारीत इथेही काही प्रमाणात बघायला मिळतात. दुसरं म्हणजे शेवटच्या 'सीन' ला आकाश हा मार्तंड पळवून नेत असलेला खजिना सोडवण्यासाठी घोड्यावरुन येताना दाखवण्यात आलाय; पण मुळात प्रश्न असा मनात येतो की घोडा आला कुठून? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाजी चा पोषाख इतक्या वर्षानंतर ही सहीसलामत कसा? न त्याला वाळवी न कुठे छेद? कारण बाजीचा पोषाख हा ज्य ठिकाणी ठेवण्यात आलेला असतो त्यावरुन असा शंका येणं सहाजिक आहे!

    फॅण्टासी, रोमान्स आणि मसालेदार कथा व अभिनयात वरचढ आणि या सर्वांचं कॉम्बीनेशन म्हणजे बाजी हा सिनेमा. जर अश्या चित्रपटांना आपण पसंत करत असाल तसंच श्रेयस तळपदे व अमृता खानविलकर यांच्या पडद्यावरील केमिस्ट्रीला पहाण्यासाठी तरी बाजी एकदा पहायला काहीच हरकत नाही.

  • जागतिक दहशतवादविरोधी दिन

    जागतिक दहशतवादाचा सगळ्यात मोठा हादरा भारताला बसलेला आहे, यामुळे भारतीय युवकांची भूमिका दहशतवादाला समूळ नष्ट करण्याची असली पाहिजे. आमच्या देशात येऊन घातपाती कृत्य करणाऱ्या अतिरेकींना धडा शिकविण्यास सज्ज असले पाहिजे.

  • इ-बुक रीडर

    हाताच्या पंजाच्या आकाराच्या एखाद्या साधनावर पुस्तक वाचता आले तर किती छान होईल. नेमकी हीच कल्पना इ-बुक रीडरच्या माध्यमातून प्रत्यक्षात आली आहे. इ-बुक रीडरलाच इ-बुक डिव्हाइस किंवा इ-रीडर असेही म्हटले जाते.

  • चाय पे चर्चा – आवळ्याचे तेल – देशी/ विदेशी

    ऐन जवानीच्या दिवसांत 'मम्मी ने तुम्हें चाय पे बुलाया है' हे गाणे कैकदा ऐकले होते. पण अस्मादिकांचे दुर्भाग्य, कुठल्या हि सुंदर पोरीच्या आईने आम्हाला चाय पे बोलविले नाही. एका सरकारी बाबूची पत 'पोरींच्या आईच्या दरबारी किती आहे, हे हि कळले. गुपचूप माँ साहेबानी पसंत केलेल्या मुलीच्या गळ्यात वधूमाला घातली.

    चहा म्हंटले कि चर्चा तर होणारच. चहा पिता पिता आपण एका दुसर्याचे पितळ उघडे करतोच. चहा पिता पिता पीठ के पीछे दुसर्याची निंदा कण्याचा आनंद काही औरच असतो. पंत प्रधान मोदी साहेबांनी तर चाय पे चर्चा करत लोकांची मते आपली खिश्यात घातली. आपले उद्दिष्ट साधण्यासाठी लोक चाय पे चर्चा करतात.

    नुकताच अशोक नगर, मध्य प्रदेशला एक नातलगाला भेटायला गेलो होतो. एक तरुण वयाचा ओळखीचा युवक सकाळी-सकाळी घरी आला. नमस्ते आणि हात मिळवणी झाली. आपको कोई एतराज ना हो तो "भाई साब सुबह का चाय व नाश्ता हमारे घर हो जाय". त्याने आग्रहाचे निमंत्रण दिले. आमची स्वारी त्याच्या घरी जाऊन पोहचले.

    दिवाणखाना मोठा व प्रशस्त होता. सोफ्यावर बसल्यावर समोर भिंती वर लक्ष गेल. भारत मातेचे मोठे चित्र आणि चित्राच्या चारी बाजूला, भगतसिंग, नेताजी, गुरुजी आणि डॉक्टर साहेबांचे चित्र होते. मनात विचार आला, आयला, देशभक्त, राष्ट्रवादी स्वदेशी परिवार दिसतो. माझे लक्ष्य चित्रांकडे आहे, हे पाहून तो म्हणाला, हमारे पिताजी संघ कि शाखा में जाते थे. मै भी बचपन में जाता था.

    थोड्यावेळात बिन कांद्याचे पोहे समोर आले, (कांदे नसले तरी लाल सुर्ख अनारदाणे पोह्यांवर पसरविले होते). सोबत गायीच्या तुपात परतलेला, खोबर, बदाम घातलेला कणकीचा शिरा. घरगुती चर्चा सुरु झाली अर्थात मी कुठे आणि काय काम करतो. तो इंजिनिअर होता, इत्यादी. गप्पांसोबत पोहे आणि शिरा पोटात रिचविला, नंतर गरमागरम आले कडक चहा आला. आता खरी चाय पे चर्चेला सुरवात झाली.

    अस्मादिकांचे डोक्याचे सर्व केसं पांढरे झालेले आहे. (वय हि ५५ वर्षांचे आहें). आजकाल महिन्यातून एकदा नाव्हया कडे जाऊन केसं बारीक कापून घेतो. कधी सौ.ने टोका-टाकी केली तरच डोक्याला तेल लावतो. त्या तरुणाने डोक्यावरच्या हळू हळू मैदान सोडणाऱ्या पांढर्याशुभ्र केसांकडे पाहत विचारले, भाई साब आप कौनसा तेल लगाते हो? आता काय उत्तर देणार. अश्यावेळी मेजबानला रुचेल असे उत्तर देणे योग्य. स्वदेशी आणि देशभक्त परिवार पाहता, उत्तर दिले आजकाल पतंजलीचे आवळ्याचे तेल डोक्स्यावर लावतो. उत्तर ऐकताच त्याच्या अंगात काही तरी संचारले, आवाज चढवून म्हणाला, रामदेव! तो मर्कट उड्या मारून आणि विक्षिप्त हावभाव करून कचरा लोकांना विकतो. माहित आहे त्याच्या विरुद्ध कित्येक मुकदमें सुरु आहेत. शिकलेले आहात ना तुम्ही, मग असले प्रोडक्ट का वापरतात? त्याचे बोलणे ऐकून मी अक्षरश: हादरलोच. पुन्हा समोर भिंती वर भारत मातेच्या फोटू कडे लक्ष गेले आणि या वेळी एका कोपर्यात टेबलावर सजवून ठेवलेल्या एमवे प्रोडक्ट्स कडे हि. मनात म्हणालो आई माफ करा, पिढी बदलली आहे आणि स्वदेशीची परिभाषा हि....

    आता चहावर इतक्या प्रेमाने का बोलविले आहे हे कळले. त्याने एक एक करून एमवे प्रोडक्ट्सची ओळख करून द्यायला सुरुवात केली. एमवेचे प्रोडक्ट्स उत्तम दर्जाचे, वनस्पती आणि natural पदार्थांपासून बनविलेले असतात. कंपनी सरळ ग्राहकांना वस्तू विकते. stockist, थोक व्यापारी, दुकानदार इत्यादि लोकांना दिले जाणारे कमिशन टप्प्या टप्यावर एमवेच्या सदस्यांना दिले जाते. (त्यात किती तरी if आणि buts होते, हे वेगळे) एमवे विज्ञापन वर खर्च करीत नाही (हे वेगळे,एमवे द्वारा विकल्या जाणार्या सर्व अमेरिकन कंपन्याचे विज्ञापन टीवी वर येतात) . लाखो कमविण्याचे स्वप्न हि रंगविले.

    थोडक्यात त्याच्या म्हणण्याचा सारांश - पैसा कमविण्याचा विचार नसला तरी किमान उत्तम दर्ज्याचे एमवे प्रोडक्ट्स वापरले पाहिजे. हे सर्व ऐकताना माझ्या मनात विचार आला एक तर अमेरिकन कंपनी, ती हि विभिन्न अमेरिकन प्रोडक्ट्सची मार्केटिंग करते. (त्या कंपन्याचा लाभांश, एमवेचा लाभांश, सदस्यांना कमिशन (३०-४० टक्के). १० रुपयाची वस्तू १०० शंभर रुपयांना निश्चित विकावी लागत असेल.

    हा विचार मनात सुरुअसताना तो म्हणाला भाई साब, लगेच आपण सदस्य बना हे मी म्हणत नाही, किमान शेम्पू, शेविंग क्रीम, साबण इत्यादी आपण वापरू शकतात. आपल्याला रुचले तरच आपण सदस्य बनू शकतात. एमवे आंवला तेलाची बाटली हातात घेत म्हणाला, हे शुद्ध आवळ्याचे तेल वापरून बघा, केस गळणे बंद होईल. याची किंमत हि पतंजलीच्या तेला एवढीच आहे अर्थात २००ml, ८० रुपये. मनात शंका आली एवढे कमिशन हे देतात, मग तेलात आवळा असेल का? मी विचारले तुमच्या या तेलात आहे तरी काय? त्याने बाटलीवर लिहिलेली बारीक अक्षरे वाचायला सुरुवात केली, वेजिटेबल ऑइल (तीळ, खोबर्याचे, ओलिव ऑइल असते तर त्यांची नावे निश्चित दिली असती, बहुतेक सर्वात स्वस्त मिळणारे .... तेल असावे), मिनिरल तेल आणि आवळा बियांची सुगंध... तो वाचता- वाचता थबकला. त्याच्या चेहरा काळवंडला, बहुतेक त्याने पहिल्यांदाच प्रोडक्टची माहिती वाचली असेल. माझ्या चेहऱ्यावर हळूच एक राक्षसी हास्य झळकले, मी म्हणालो, कोई बात नहीं, आखिर इतना कमीशन देने के बाद वो आंवला ऑइल के नाम पर कचरा हि परोस सकते हैं. घरी परत येताना, एक नुकत्याच उघडलेल्या पतंजलिच्या दुकानात तो मला घेऊन गेला. उद्देश्य पतंजली प्रोडक्ट्सचा दर्जा तपासणे, ते हि निकृष्ट निघाले असते तर त्याचे मानसिक समाधान झाले असते. दुकानात येऊन त्याने आंवला ऑइलच्या बाटली वर लिहिलेले वाचले. (त्यात ओलिव ऑइल, तिळाचे तेल आणि आवळ्याचे तेलाचे मिश्रण होते). निश्चितच पतंजलीच्या आवळ्याच्या तेलाचा दर्जा कित्येक पट जास्त होता. मासा गळाला लागण्या एवजी इथे नावच उलटली होती. त्याला चर्चेचा योग्य परिणाम साधता आला नाही. चहा आणि पोह्यांचे 'विज्ञापन' फुकट गेले.

    मनात एकच विचार आला, आपल्या देश्यात सुशिक्षित उच्च वर्ग, बिना विचार करता निकृष्ट दर्जाच्या विदेशी वस्तू विकत घेतो किंवा कितीतरी पट जास्त किंमत मोजतो. गाजराच्या अमिषाला बळी पडून साध प्रोडक्ट्स वर लिहिलेले हि लोक वाचत नाही. आता तर अशोकनगर सारख्या मागासलेल्या भागातले लोक हि विदेशी वस्तू वापरण्यात स्वत:ला धन्य मानू लागले आहे. दीड रुपयात मिळणाऱ्या रासायनिक द्रव्यांपासून बनलेल्या शेम्पू साठी ७ रुपये हि आनंदाने मोजतात. (हे वेगळे देशी हर्बल शेम्पू २ रुपयातच मिळते, ज्याने किमान नुकसान तरी होणार नाही).असो .

  • जागतिक पेंग्विन दिन

    टार्क्टिका खंडात आढळणारा आणि उडता न येणारा एक पक्षी. स्फेनिसिडी कुलातील पक्ष्यांना ‘पेंग्विन’ म्हटले जाते. या कुलात त्याच्या १७ जाती असून मुख्यत: अंटार्क्टिका, अर्जेंटिना, चिली, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ठिकाणी तो आढळतो. सागराचे उबदार पाणी त्यांना मानवत नसल्यामुळे ते उत्तर गोलार्धात पोहून जात नाहीत. एंपरर पेंग्विन हा आकाराने सर्वांत मोठा असून त्याचे शास्त्रीय नाव ॲप्टेनोडायटिस फॉर्स्टेरी आहे. त्याची उंची सु. १२० सेंमी. व वजन सु. ४५ किग्रॅ. असते. लिटल पेंग्विनाचे शास्त्रीय नाव युडिप्टुला मायनर आहे. त्याची उंची सु. ३० सेंमी. व वजन सु. १•५ किग्रॅ. असते. अन्य जातींच्या पेंग्विनांची उंची ४५–९० सेंमी. व वजन २•३–६•८ किग्रॅ. असते. पेंग्विनाची एक जाती गालॅपागस पेंग्विन ही विषुववृत्तावर आढळते.

  • न्याय झाला, पण..!

    मानवी क्रौर्याची परिसमा ओलांडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील तिन्ही दोषींना आज न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोपर्डी घटनेतील घृणास्पद विकृती आणि विक्षिप्तपणा बघितला तर या प्रकरणात फाशीशिवाय दुसरी शिक्षा योग्य नव्हती. अत्यंत निर्घृणपणे पीडित तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. कोपर्डी अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. कोपर्डीतील पिढीतला न्याय मिळावा यासाठी लाखो करोडो जनसंख्येचे महामोर्चे निघाले. दोषींना फासावर लटकविण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात आली. जणआक्रोशाचा प्रचंड दबाव असल्याने सरकारलाही हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा लागला. विशेष सरकारी वकील ऍड. उज्वल निकम यांची वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी सबळ पुरवा नसल्याने दोषींना फासावर लटकविण्याची न्यायालयीन लढाई तशी सोपी नव्हती. परंतु, ऍड. उज्वल निकम यांनी परिस्थतीतीजन्य पुराव्याच्या आधारावर मजबूतपणे युक्तिवाद केला. परिणामी तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा अहमदनगर न्यायालयाने सुनावली आहे. यामुळे कोपर्डीच्या पीडितेला न्याय मिळाला असं म्हणता येईल. परंतु, निकाल झाला असला तरी हा न्याय अजून अपूर्ण आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशावर दोषी अजूनही उच्च न्यायालयात अपील करू शकतात. त्यानंतरही शिक्षा प्रलंबित ठेवण्यासाठी अनेक उपाय दोषींकडे आहेत. त्यामुळे, कोपर्डी घटनेतील आरोपी ज्या दिवशी फासावर लटकविल्या जातील तेंव्हाच पीडितेला पूर्णतः न्याय मिळेल.
    'मनुष्यप्राणी' असा शब्द उच्चारून माणूस देखील एक प्राणीच असल्याचे नेहमी उद्युक्त केल्या जाते. मात्र मनुष्य हा प्राणी विचारशील, समाजशील असल्याने त्याच्याकडून माणूसपण जपले जाण्याची अपेक्षा केल्या गेली आहे. नैतिकता सभ्यता सद्सदविवेकबुद्धी असे सद्गुण जपत माणूस रानटी अवस्थेतून आजच्या संगणकयुगापर्यंत वाटचाल करत असल्याचे म्हटले जाते, शिवाय माणसाने आज वैचारिक सुसंस्कृतपणाचा एक नवा टप्पा गाठल्याच्या गप्पाही मारल्या जातात. परंतु माणसाचा मूळ रानटी स्वभाव आजही कायम असून त्याच्या स्वभावातील रानटीपणा विकृत होत असल्याचे अवतीभवती सातत्याने घडणाऱ्या घटनांवरून जाणवत राहते. कोपर्डीच्या घटनेत जो अमानुषपणा या नराधमांनी केला तो प्राण्यातील रानटीपणालाही लाजवणारा होता. एखाद्या बलात्काराच्या घटनेचे वर्णन करू नये. पण या प्रकारातील विक्षिप्तपणा अत्यंत घृणास्पद होता. नराधमाने मुलीचे हात-पाय तोडले. ओठांचा चावून चोथा केला होता. केस उपटले होते. तिला प्रचंड वेदना देऊन एका निष्पाप अल्पवयीन मुलीची नृशंस हत्या केली. नरभक्षक प्राण्याला जसं गोळ्या घालून ठार मारल्या जातं तसेच या माणसातील जनावरांना तात्कळ गोळ्या घालून यमसदनी पाठविल्या जावं, अशा उद्विग्न प्रतिक्रिया त्यावेळी उमटल्या होत्या. परंतु आपल्या न्यायव्यवस्थेचं तत्व जनावरणांनाही मारण्याची परवनगी देत नसल्याने दोषींच्या विरोधात ट्रायल सुरु झाली. आणि आज अखेर या प्रकरणात न्याय आला. न्यायलायाच्या निकालाने समाजमन निश्चितच सुखावले आहे. कोपर्डी पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक केल्या जातेय. दोषींना फासावर लटकविण्याचा निर्णय देऊन न्यायालयाने फक्त पीडितेला न्याय दिला नाही तर या घटनेनंतर आक्रोश करणाऱ्या संपूर्ण महराष्ट्रातील जनतेच्या दुःखावर मलमपट्टी केली आहे. मात्र जखम अजून पूर्ण बरी झालेली नाही. दोषींना फासावर लटकविण्यासाठी अजून संघर्ष करावा लागणार आहे. शिवाय यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठीच्या उपयांवरही मंथन करावे लागणार आहे.
    कोपर्डीसारख्या अमानवीय बलत्कारच्या घटनेत 'न्याय झाला' एवढाच शब्द वापरून हा विषय संपणार नाही तर अनेक गंभीर मुद्दे यासोबत जुडलेले आहेत. शिक्षेची सुनावणी आणि अंलबजावणीत लागणाऱ्या मोठ्या कालावधीमुळे शिक्षेविषयी जनमानसातील धाक आणि विश्वासर्हतेचा प्रश्न जसा समोर येतो तसाच महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्नही अजेंड्यावर घ्यावा लागेल. कोपर्डीत एका निष्पाप मुलीचा बळी गेल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात जणक्षोभ उसळला होता. कोपर्डीच्या पीडितेला न्याय देण्याची मागणी ज्यावेळी करण्यात येत होती. त्याच्या मागे अशी घटना पुन्हा घडू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केल्या जात होती . आज कोपर्डीच्या प्रकरणात न्याय झाला, न्यायालयाने त्यांचे काम चोख बजावले. थोड्या उशिराने का होईना दोषी फासावर लटकविल्या जातील, आणि पीडितेला पूर्ण न्याय मिळेल. मात्र लोकांची अपेक्षा अजून पूर्ण झालेली नाही. कोपर्डी सारख्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आता पुढाकार घ्यावा लागणार आहे. कोपर्डी घटनेच्या निकालाने अशा विकृत प्रवृत्तीवर जरब बसेल, असं ठामपणे म्हणता येणार नाही. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशात कायदे बदलले जागरूकता झाली. तरी कोपर्डीची घटना घडली. यानंतरही बलात्काराचे गुन्हे घडतच आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कायद्यासोबत मानसिकता ही बदलावी लागणार आहे. समाजातील पुरुषसत्ताक व्यवस्था आणि स्त्री विषयीचा भोगवादी दृष्टिकोन हेचं अशा विकृतींना जन्म देते. बलात्काराच्या विकृत विचारांचा जन्म मेंदूतून होतो, त्यामुळे उपचारही मेंदूवरच करावे लागतील.
    विकृत आणि मुजोर मानसिकेतला भयभीत करून अशा कृत्यांपासून परावृत्त करण्यासाठी कोठारातील कोठार शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. मात्र न्यायप्रक्रियेतील विलंब या उद्देशाला काही प्रमाणत हरताळ फसतो.सत्र न्यायालयाने दोषीला फाशीची शिक्षा दिल्यापासून उच्च ते सर्वोच्च न्यायालय आणि नंतर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज या प्रवासात दोषीला सवलती तर मिळतात शिवाय शिक्षा अंलबजावणीत उशीर होतो. अर्थात, प्रोसिजर आवश्यक आहेच परंतु या प्रक्रयेलाही काही कालमर्यादा असावी. सत्र न्यायालयाच्या निकालावर उच्च न्यायालयात अपील, नंतर सर्वोच्च न्यायालयाने फाशी सारखी शिक्षा कायम ठेवल्यानंतर तरी अंलबजावणीत विलंब होऊ नये. दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणातच फाशीची शिक्षा सुनावण्यात येते. संपूर्ण गुन्हेगारी मानसिकतेवर जरब बसावा यासाठी हा निर्णय घेतला जातो. त्यामुळे किमान हा हेतू सफल होण्यासाठी तरी अशा खटल्यांमध्ये कालमर्यादा ठरवनियात यावी. आज कोपर्डी घटनेतील निकाल लागला आहे. दोषींना फाशीची शिक्षा देऊन न्यायालयाने मुजोर प्रवृत्तीला जरब बसविण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले, यात शंका नाही. परंतु कोपर्डीच्या दोषींना फासावर लटकावयला १२ वर्ष लागणार असतील तर कायदाचा धाक कसा निर्माण होईल. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशभारतील कायदे बदलण्यात आले होते, या धर्तीवर फाशीच्या शिक्षेअमलबजावणी संदर्भात कालमर्यदा निर्धारित करून त्यानुसार कोपर्डीतील आरोपीना फासावर लटकविल्या गेले तर कोपर्डीच्या पीडितेला खरा न्याय मिळेल..!!

    - ऍड. हरिदास उंबरकर,
    बुलडाणा
    मो. 9763469184

  • वैश्विक ओझोन दिन

    आज दिनांक १६ सप्टेंबर. आजच्या दिवसाला आजकालच्या दिवसांमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. आज जगभरात ओझोन दिन साजरा केला जातो. आज आपल्याला वेगळं सांगायला नको की , सध्या ओझोन वायूची किती आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ओझोनची पातळी झपाट्याने कमी होत असल्याचं लक्षात आलं आणि आपल्याला खाड्कन झोपेतून जाग आली. जोरदार प्रयत्न करण्यात आले ,पण हवी तशी प्रगती करता आली नाही आणि परिस्थिती आणखीनच गंभीर झाली.

  • डिसेंबर ०६ : फ्रेडी फ्लिन्टॉफ

    इअन बोथमशी तुलना झालेला, दुखापतींनी त्रस्त असलेला आणि शर्ट भिर्कावून व्यक्त केलेल्या आनंदासाठी प्रसिद्ध असलेला अँड्र्यू फ्लिन्टॉफ

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग अकरा

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार

    जगण्यासाठी औषध काम करत नाही.

    भाग दोन

    जीवनावश्यक काय आहे ?
    अ.व.नि.
    अवनि म्हणजे पृथ्वी. तिचे रक्षण तर झालेच पाहिजे. पण शब्दाची फोड केली तर अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभुत गरजा आहेत. असे आम्हाला शाळेत इयत्ता चौथी अ मधे शिकवले होते. आताच्या काळाचा विचार करता, चौथी गरज वाॅटसपची झाली.....
    ....... तुला स्वर्गात जायचे आहे की नरकात असा प्रश्न विचारल्यावर जिथे फोरजीची रेंज येते आणि मोबाईल आणि चार्जर नेता येतो तिथे कुठेही चालेल, अशी उत्तरे देणारी मोबाईल अनिवार्य झालेली आजची पिढी.....

    पाचवी गरज औषधांची निर्माण झाली.
    असे वाटू लागले आहे, की औषधांशिवाय मी जगूच शकणार नाही. एकवेळ जेवण आणि आंघोळ राहिली तरी चालेल पण औषधे विसरून चालणार नाही, असे वाटण्या इतपत कायमस्वरूपी औषधाबद्दलचे प्रेम निर्माण झाले आहे.

    "उगाच रिस्क कशाला घेताय"
    " हेल्थ महत्त्वाची की पैसा"
    अशा गोंडस टायटल असलेली टिपीकल वाक्य डाॅक्टरनीच सुनावल्यावर, औषध ही जीवनावश्यक गरज बनली. परदेशवारीची ऑफर फार्मा कंपन्या, डाॅक्टरना देतात. एखाद्या कंपनीची औषधे जर वर्षभर वापरली तर सिंगापूर मलेशिया ट्रीप जर होत असेल तर या मोहात कोण पडणार नाही ? अर्थात सर्व डाॅक्टर ही ऑफर स्विकारतात असं नाही. पण हा सरळ सरळ बिझनेस आहे. दुर्दैव आहे की यात सर्वसामान्य जनतेचे आरोग्य पणाला लावले जातेय.

    फूड अॅण्ड हेल्थ सप्लीमेंटच्या नावाने महागड्या टूथपेस्ट पासून ते अगदी औषधे विकणाऱ्या कंपन्या, आपले टाय बांधलेले सोकाॅल्ड सोकावलेले एजंट दारोदारी फिरवत आहेत. दुर्दैवाने यात काही डाॅक्टरदेखील एजंट म्हणून सामील आहेत. आरोग्य जनजागृती च्या नावाने, जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. "आजकाल म्हणे अन्नाचा दर्जा खूप घसरल्यामुळे आमची ही पावडर तुम्हाला दिवसभराची सर्व एनर्जी देईल." इथपर्यंत असत्याचा प्रचार केला जातोय. फ्रि मेडीकल हेल्थ चेक अप कॅम्पच्या जनसेवेतून काही मशीनद्वारे मोफत कॅल्शियम, हिमोग्लोबिन तपासणीचे नाटक पार पाडले जाते. हवे तसे रिपोर्ट आणले की आमच्या कंपनीचे अमुक औषध आता आपल्याला विकत घ्यायला हवे, असेही या "फ्री" चेक कॅम्पमधे सांगितले जाते.
    उल्लु बननेवाले है, इसलिए "बनानेवाले" पैदा होते है।

    औषधे ही रोग घालवण्यापुरती, तात्पुरतीच घ्यायची असतात, नंतर रोग विसरून जायचा असतो, लक्षात ठेवायचा नसतो, हे लक्षातच येत नाही आणि औषधं कायमची पाठी लागतात.

    "माझ्या चुकीच्या जीवनशैलीमुळे मला त्रास होताहेत" हे मान्य न करता, हे जीवनचक्र असेच चालणार, आणि आम्ही आयुष्यभर औषधे घेत बसणार आहोत." अशी विचारसरणी असलेल्या व्यक्तींनी, हा लेख फारसा मनाला लावून घेऊ नये. विसरून जावे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    20.04.2017