वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
एका ऋचा ( श्लोक ) मध्ये कितीतरी गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. ह्यांचा सखोल आभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल कि त्या काळातील ऋषी मुनि प्रत्येक विषयाचा किती साकल्याने विचार करीत होतें.
March 7, 2012
नेपाळ एकमेव हिंदू राष्ट्र आहे आणि विशेषकरून आयएसआय आणि चीन या राष्ट्रावर नजर ठेवून आहेत. नेपाळमध्ये सध्याचे सरकार धर्मनिरपेक्ष पद्धतीने काम करीत आहे. ख्रिश्चन व मुस्लिम समाज आपला धर्म व संस्कृतीचा नेपाळमध्ये प्रसार करण्याचा प्रयत्न करीत आहे. काठमांडू ही नेपाळची राजधानी व तिथे आयएसआय सक्रिय आहे.
May 2, 2014
जागतिक टेलरिंग दिवस हा शिवणयंत्राचे संशोधक अमेरिकन इंजिनिअर सर विल्यम इलिआस होव यांच्या स्मृती प्रीत्यर्थ २८ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
February 28, 2025
CRIC कथा‘ हा क्रिकेटला वाहिलेला मराठीतील एकमेव दिवाळी अंक मुद्रित तसेच डिजिटल स्वरूपात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रकाशित झाला आहे. मी लिहिलेला “तेथे कर माझे जुळती” हा लेख मुद्रित व डिजिटल अंकात, तर मी रचलेले “क्रिकेट शब्दकोडे”, मुद्रित अंकात समाविष्ट आहे.
November 21, 2022
भारतात बनलेला पहिला संगीतप्रधान बोलपट मुंबईच्या मॅजेस्टिक सिनेमामध्ये १४ मार्च १९३१ रोजी प्रदर्शित झाला.
इम्पिरियल मूव्हीटोन निर्मित, आर्देशीर इराणी दिग्दर्शित या हिंदी चित्रपटाचं नाव होतं ‘आलम आरा’! चित्रपटांमध्ये ध्वनीचे महत्त्व समजून इतर बोलपट प्रदर्शित होण्यापूर्वी इराणी यांनी आलम आरा प्रदर्शित केला. हा चित्रपट तेव्हा इतका लोकप्रिय झाला की, प्रेक्षकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी अक्षरश: पोलिसांची मदत घेण्यात आली होती.
‘आलम आरा’मध्ये पृथ्वीराज कपूर, मास्टर विठ्ठल, जुवैदा, जिल्लो आणि सुशीला यांनी भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाची कथा जोसेफ डेव्हिड यांनी लिहिली होती. या पहिल्या बोलपटाची लांबी १२४ मिनिटे इतकी होती. या चित्रपटात संगीताला उत्तम स्थान मिळाले होते. ‘आलम आरा’मध्ये एकूण सात गाणी होती. त्यापैकीच ‘दे दे खुदा के नाम पे’ हे भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले गाणे मानले जाते. हे गाणे वजीर मोहम्मद खान यांनी गायले होते. ‘बदला दिलवाएगा या रब…, ‘रूठा है आसमान…’, ‘तेरी कातिल निगाहों ने मारा…’, ‘दे दिल को आराम…’, ‘भर भर के जाम पिला जा…’, आणि ‘दरस बिना मारे है…’ ही चित्रपटातील इतर गाणी आहेत.
राजकुमार आणि बंजारनच्या प्रेमकथेवर आधारित असलेला हा चित्रपट एका पारसी नाटकावर आधारित होता. ‘आलम आरा’ पाहण्यासाठी पहिल्या दिवशी, पहिल्या शोच्या तिकीटासाठी चित्रपटगृहांबाहेर मोठी गर्दी जमली होती. लोकांना आवरण्यासाठी तेव्हा पोलिसांना बोलवावे लागले होते. त्यावेळी जे तिकीट चार आण्यात मिळत होते, त्याला लोकांनी ब्लॅकमध्ये पाच रुपयांत खरेदी केल्याचेही म्हटले जाते.
March 17, 2017
जपान देशाने अनेक तंत्र आणि सक्सेस मंत्र साऱ्या जगाला दिले आहेत हे आपण जाणतोच. ते साऱ्या जगाला पटले आणि कौतुकास पात्र ठरले ते ह्या जपानी नागरिकांच्या उत्तरोत्तर प्रगतीने आणि सातत्याने! ह्या लेखात आपण पाहुया अशाच एका संकल्पने बद्दल. काईझेन हे एक जगप्रसिद्ध असलेले व्यवस्थापन तंत्र आहे.
June 12, 2021
अचानक आलेला पैसा माणसाला एक तर वर काढतो किंवा होत्याचं नव्हतं करुन टाकतो. पैसे मिळणाऱ्याकडे जर विवेकबुद्धी असेल तर तो आर्थिक नियोजन करुन पैसे कारणी लावतो. अन्यथा काही दिवसांतच तो कफल्लक होऊन जातो.
May 7, 2023
नायटे निरनिराळ्या प्रकारचे असतात. नेहमी दिसणारा प्रकार म्हणजे अंगावर, जांघेत, कमरेवर दगडफूलासारखा दिसणारा व पसरणारा नायटा. यात त्वचा काळवंडते आणि खूप खाज सुटते. हा आजार बुरशीमुळे होतो. याची मुख्य करणे अस्वच्छता, दमटपणा, पाण्याची टंचाई, एकमेकांचे कपडे वापरणे इ. अनेक घरांमध्ये आंघोळीसाठी आडोसा पुरेसा नसतो. यामुळे कंबरेच्या कपड्याखाली नीट स्वच्छता राहत नाही. याठिकाणी खरुज, नायटा वाढतात. कडा असलेल्या गोलाकार स्वरुपात त्वचेवर उठणारा नायटा हा एक प्रकारच्या बुरशी, आळब्यासारख्या सुक्ष्म शेवाळामुळे होणारा रोग आहे. चामडीच्या कोणत्याही भागावर गोलाकार चट्टे उठतात. पण विशेषतः काखा, जांघा, बोटांच्या मधील भाग इ. नेहमी ओलसर राहणाऱ्या जागांमध्ये याचे प्रमाण जास्त असते. आपल्याकडे डोक्यामध्ये होणाऱ्या नायटाचे प्रमाण त्यामानाने कमीच आहे. कंबर व जननेन्द्रियाजवळील भागाला सुद्धा नायटा होतो. हे चट्टे गोलाकार असल्यामुळे त्यांना रिंग वर्म म्हणतात. त्यांना कमालीची खाज सुटते. जर हा चट्टा केसात झाला तर केस जावून तेवढया ठिकाणी टक्कल पडते आणि नखांवर झाला ते नखे वर उचलली जाऊन खरखरीत व वाकडी होता.
नायटाची लक्षणे
•हा आजार कंबर, पोट, मांड्या, जांघा इ. भागात जास्त करून होतात.
•खूप खाज सुटते व नायटाची वाढ वेगाने होते.
•पण कातडीवर बधीरता मात्र नसते.
नायटावर उपाय
•नखे कापावीत.
•नायटा झालेला भाग साबण व स्वच्छ पाण्याने रोज धुतला तर हा रोग बरा होतो.
•हेक्झाक्लेरोफिन असलेल्या साबणाचा जास्त उपयोग होतो.
•घामाने भिजलेले सगळे कपडे नेहमी बदलावेत व स्वच्छ धुवून कोरडे असतांना वापरावे.
•नायटा झालेली जागा नेहमी स्वच्छ ठेवून ती सुर्यप्रकाशात राहील असा प्रयत्न करावा. १ भाग सल्फर व १० भाग तेल यांचे मिश्रण करून नायटा झालेल्या जागी लावावे.
•बाजारात मिळणारी नायटा, गजकर्ण विरोधी मलमे आणि औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.
•डोक्यात खवडे झाले असल्यास बाजारात मिळणारी मलमे आणि औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावीत.
•डोक्यातील नायटा पाण्याचा शेक देऊन तेथील केस उपटून वरील औषधांचा उपयोग करावा.
वनस्पती औषधी - कडूनिंब तेल अथवा करंज तेल चोळून लावावे
नायटा कसा टाळावा?
नायटा व त्यासारखे चामडीचे बुरशीजन्य इतर विकार सांसर्गिक असल्यामुळे एकाकडून दुसऱ्याला चटकन होतात, ते टाळण्यासाठी पुढील गोष्टी कराव्यात.
•नायटा झालेल्या रुग्णाला वेगळे झोपवावे.
•एकच फणी व एकमेकांचे कपडे ( स्वच्छ धुऊन वाळविल्याशिवाय) वापरू नयेत.
•नायटा झालेल्या रुग्णांवर डॉक्टरांच्या सल्ल्याने लवकरात लवकर उपचार करावेत.
•बाह्य उपचारांबरोबरच पोट सुद्धा साफ असणे गरजेचे आहे. त्वचा नेहमी कोरडी राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
January 18, 2017
इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी संन्यासयोग नावाचा पांचवा अध्याय.
June 5, 2022
ही १८६० सुमारातील गोष्ट आहे. त्या वेळी, पेट्रोलियम खनिज तेलाचा शोध’ नुकताच लागला, होता. पण, माणसाला त्याचा फारसा उपयोग नव्हता. तेव्हा युरोपमध्ये लोक प्रकाश मिळविण्यासाठी दिव्यामध्ये व्हेल माशाचे तेल वापरीत. ते खूप खर्चिक असे. त्याच वेळी खनिजतेलातून केरोसिन म्हणजे घासलेट तेलाचे उत्पादन सुरू झाले. अगदी दुसऱ्या वर्षापासून त्याची जगात इतरत्र निर्यात सुरू झाली.
February 16, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti