वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
…. आज हे आठवायचे कारण म्हणजे त्यांच्या पत्नी,श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांनी साकारलेली “कावेरी “पाहिली टीव्ही वर “नटसम्राट “मध्ये ! आजही भरून पावलो.
July 28, 2022
गणेशजींना जसे मोदक आवडतात, तसे भगवान भोलेनाथना दूध आणि बेल आवडते. नागोबाला लाह्या, देवीला पुरणपोळी हे वैशिष्ट्याचे नैवेद्य.
भोलेनाथ जरी भोळे असले तरी उग्रसंतापी आहेत. जरा मनाविरूद्ध झालं की तांडवच सुरू. म्हणजे लगेचच पित्त वाढण्याचा प्रकार. मन बिघडले तरी तळपायाची आग लगेच मस्तकात जाणार ! थोडक्यात आजच्या भाषेत "यांचा ना क्षणात रक्तदाब वाढतो" आता बरे आहेत, तर पुढच्या क्षणाला काय होईल याचा नेम नाही, असे शंकर प्रत्येक घरात, प्रत्येक पार्वतीच्या वाट्याला आलेले असतात. (काही घरातील शंकर पार्वती अपवाद सोडून) अशा शंकररावांसाठी बेल हे ऊत्तम औषध आहे. मन बिघडल्यामुळे होणाऱ्या पित्ताचा दाह कमी होण्यासाठी बेलाची पाने हे छान औषध आहे.
भोलेनाथांची पिंडी बेलाच्या पानांनी याच कारणासाठी झाकून ठेवतात. रेडीएशनमुळे होणारे उपद्रव कमी होण्यासाठी देखील बेल काम करेल.
कारण एक अभ्यास असा सांगतो, की जिथे शंकरांची जागृत ज्योतीर्लिंगे आहेत, तिथे खाली अणुसाठे असण्याची शक्यता आहे. ते झाकण्यासाठी पिंडाकार डोम !!! जगामधे जिथे जिथे अणुभट्ट्या आहेत, तिथे तिथे पिंडीच्या आकारासारखे छत असते. (/ डोम असतात.)
हे त्याच्यातील साम्य.
महत्वाचे आहे ते म्हणजे पित्ताचा दाह कमी करणे.
आजचे संशोधन हेच सांगतेय की बेलपत्राचा वापर रक्तदाब कमी करण्यासाठी केला जातोय.
यासाठी बेलाची चार पाने एक कप थंड पाण्यामधे सात आठ तास भिजवून ( आयुर्वेदीय परीभाषेत हिम करून ) ते पाणी पिण्यासाठी वापरावे. असे तीन महिने केल्याने रक्तदाब नियंत्रणात रहातो. असा अनुभव आहे.
तसेच पित्तशमनाचे काम दुधाचा अभिषेक पण करतो. नागोबालादेखील दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. प्रत्यक्षात नागोबा दूध पित नाही, हे काय पूर्वजांना माहीत नव्हते ? नागोबाच्या लाह्या या उत्तम शोषक गुणाच्या आहेत. न पचलेले अतिरिक्त पाणी, आमसदृश्य विष शोषून घ्यायला लाह्याएवढे दुसरे चांगले औषध नाही.
प्रतिकपूजेमधे हे सर्व गृहीत धरलेले आहे.
देवाला वाहिलेली सर्वप्रकारची पाने फुले या पण औषधीच आहेत. या पानाफुलांनी, देवाला केलेल्या दुधाचा किंवा पाण्याच्या अभिषेकाने, हे पाणी किंवा दूध न रहाता, तीर्थ बनते. यातही या पानाफुलांचा औषधी अर्क उतरलेला असतो. म्हणजे हा तीर्थ प्रसाद औषधच झाले ना ?
आणि हा तीर्थ प्रसाद दररोज घ्यायचा. मग वेगवेगळ्या औषधांची गरज भासेल ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
10.09.2016
September 10, 2016
१९८६ : पहिल्या सामन्यात ५३ धावांवर सर्वबादची नामुष्की ओढवलेल्या (पहा : २८ ऑक्टोबर, अनपेक्षित हार) वेस्ट इंडीज संघाने दुसर्या सामन्यात पाकिस्तानचा एक डाव राखून दणदणीत पराभव केला.
१९८५ : अतुलनीय रिचर्ड हॅडलीचा एक सनसनाटी दिवस. ब्रिस्बेनमध्ये पहिल्या कसोटीत पहिल्या डावात ५२ धावांमध्ये ९ तर एकूण १२३ धावांमध्ये १५ फलंदाजांना तंबूची वाट दाखवीत हॅडलीने ऑस्ट्रेलियाची वाट लावली.
October 29, 2010
भगवान शंकर आणि देवी पार्वती युगुलस्वरूपाचे वर्णन करताना भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज पुढे म्हणतात..
September 25, 2020
बऱ्याच वर्षांपासून काही मंडळी पैश्याच्या हव्यासापोटी रक्कम दुप्पट, तिप्पट होण्याच्या फसव्या जाहिरातीच्या आमिषांना बळी पडून कुठेही आपली कष्टार्जित पुंजी भविष्यातील सुरक्षितेचा विचार न करता गुंतवणूक करतांना आढळतात. तरी मित्रांनो पैशाची गुंतवणूक करतांना जरा जपून !
March 31, 2016
गहू खायचा नाहीतर तांदुळ !
एखाद्या गोष्टीची इतकी सवय होते, की नंतर सोडताना खूप त्रास होतो.
गहू बंद केला तर
कल्पना सुद्धा करवत नाही.
मग डब्यात काय देणार ?
यांना काय सांगायला जातेय,
आम्हाला वेळच नाही,
आता एवढ्या वर्षात काही झालं नाही, आता काय होणारे ?
नुसतं हॅवाॅक आहे झालं !!
सुशिक्षित, विचार करणाऱ्या सुगृहिणीकडून अश्या काॅमेंटस ऐकाल्या की, त्यांना सांगावेसे वाटते, एक महिनाभर गंमत म्हणून, व्रत म्हणून, अक्कल गहाण टाकून, पूर्वग्रहदूषित ठेवून, गहू बंद करून पहावा. गहू बंद केला तर, अनेक नवीन पर्याय सुचु लागतील. याचा वापर केल्याने सजण आणि सर्वजण खुश होतील.
गव्हाऐवजी कोकणात तीन चार पर्याय उरतात. तांदुळ, नाचणी, उडीद आणि मका
कोकणाशिवाय अन्य प्रदेशात ज्वारी, बाजरी, मका ही धान्ये पण पोटभरतीची आहेत. किंवा धान्ये एकत्र करून पण वापरता येतील. भाजून ठेवली तर आणखीन चांगले. थालीपीठ आणि लोणी, एकत्र केलेल्या पीठाची धिरडी, उत्तप्पा, दशम्या, पराठे, घावन, वडे, एवढे उत्तम प्रतीचे पर्याय असताना त्या चपातीत जीव का गुंततो ते कळत नाही. ( चपाती एकेकाळी मलापण खूप आवडत होती. पण एकदा (प्र)देशप्रेमाचे भरते आले आणि आवडतीची, नावडती झाली ! )
मुंबैत तर चपाती पण नाही. नुसता वीतभर लांबीचा फुलका. पीठाचा गोळा चार पाच वेळा इकडून तिकडून फिरवला, एका बाजूने भाजल्या सारखा होईपर्यंत परतून लगेच तवा बाजुला करून गॅसवर शेकलं की लगेच डब्यात.
कोळश्याच्या शेगडीवर भाजलेला फुलका मात्र मस्त दिसतो. कमी वेळात कोणताही अन्नपदार्थ तयार करू नये, त्याच्यावर पूर्ण अग्निसंस्कार झाला पाहिजे. हे लक्षात ठेवावे.
पोळी करण्याचं कसब वेगळंच असतं. कणीक थोडीशी लाटून घेऊन, तेल पीठ लावून त्रिकोणी घडी करून पुनः तिचा आकार गोल करणं ही कला आहे. नाहीतर ऑस्ट्रेलिया, जपान भाजले जातात. थोडा वेळ जास्ती जातो, म्हणून सेकंदावर धावणाऱ्या मुंबईत पोळी नाही. पोळीला चपाती हा शब्द कुठुन आला माहीत नाही.
पोळी म्हटली की, पुरणाची पोळी, गुळाची पोळी, बेसनाची खमंग पोळी आठवते. प्रदेशानुसार यांची नावे बदलत जातात. काहीजण यालाच मांडे पण म्हणतात. बेसन तव्यावर ऑम्लेटसारखे फ्राय केलेतर त्याला पोळा असेही म्हणतात.
ज्यांना उपाय करायचा असेल त्यांनी जरूर असा बदल करून पहावा, नाहीतर आहेच मग. बटाट्याची भाजी आणि चपाती....
सांगायचे काय तर एवढे प्रकार उपलब्ध आहेत.
नाहीतर मराठमोळ्या सदाबहार भाकऱ्या. आफळेबुवांच्या भाषेत, तानाजी भाकरी म्हणजे दीड फूट लांब रूंद. फक्त हातावर वाढवत नेलेली ही भली मोठ्ठी भाकरी न तुटता, गरगरून फुगत, तव्यावरून ताटात येईपर्यंत तश्शीच रहाते, हे वैशिष्ट्य.
बाजरीच्या तीळ लावून खमंग खरपूस भाजलेल्या भाकरीवर लोण्याचा गोळा. आणि बरोबर वांग्याची भाजी आणि लसणाचे तिखट.
आठवणींच्या प्रदेशात जायचं नाही असं ठरवलं तरी मन सारखं जात रहातं. जायला काही हरकत नाही, पण येताना येववत नाही. इतकंच.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
30.10.2016
October 30, 2016
‘गृहिणी गृहमुच्यते’ अशी घराची व्याख्या केली जाते. ज्या ठिकाणी सर्व व्यक्तींना सांभाळायला, वाढवायला समर्थ अशी स्त्री आहे तिथंच घरपण असतं. कालच महिला दिन झाला .पोषणम शिक्षण आणि रक्षण अशा सर्वच जबाबदाऱ्या प्रत्येक गृहिणीला पार पाडाव्या लागतात. त्यातील आरोग्य रक्षणाची जबाबदारी पार पाडणं तर चालू काळात फारच कठीण होत चालले आहे. आजीबाईचा बटवा ही शोभेची वस्तू नाही. या बटव्यातील चिजांची नीट माहिती करून न घेता बटव्याचा योग्य उपयोग करता येणार नाही. म्हणूनच प्रत्येक गृहिणीनं वरचेवर आढळणाऱ्या रोगांसंबंधी तक्रारींसंबंधी थोडीशी माहिती मिळविली पाहिजे. ‘ताप येणे’ ही अवस्था ! बहुसंख्य गृहिणी ‘अंग गरम वाटतं, ताप पाहिला नाही’ असं सांगतात. प्रत्येक घरात एक थर्मामीटर असणे आवश्यक आहे. कुणाचाही ताप, तो दर चार तासांनी मोजून तापाची नोंद करावी. केवळ तापाचा चढ उतार लक्षात घेऊन ताप टायफॉईडचा आहे, मलेरिआचा आहे किंवा अन्य कोणत्या प्रकारचा आहे हे डॉक्टर बरेचदा ओळ्खू शकतात.
त्रिभुवन कीर्ती हे त्याच्या नावाप्रमाणेच तापावरील एक अत्यंत उपयोगी औषध म्हणून कीर्ती मिळवून आहे. लहान मुलांना त्रिभुवन कीर्तीची पूड देण्यापेक्षा मधात उगाळूनमात्रा द्यावी. इतरांना २ ते ३ गोळ्या दिवसातून ३ वेळा पाण्यातून द्याव्या. विशेषतः सर्दी अंगदुखी किंवा फ्ल्यू ची लक्षणे असतील तर तुळशीच्या रसातून औषध द्यावं. चंद्रकला हेही तापावरील एक गुणकारी औषध. विशेषतः ताप १०३-१०४ फॅ. असा तीव्र असेल किंवा तापाबरोबर अंगाची लाही लाही होणं, डोळ्यांची आग होणं, चेहेरा लालबुंद होणं अशा तक्रारी असतील तर १ ते २ गोळ्या दिवसातून ४ वेळा द्याव्या. गुळवेल सत्त्व या वनस्पतीचं पर्यायी नाव अमृता आहे. खूप दिवस येणाऱ्या तापामध्ये, बरेचदा नेमके कारणही कळत नाही. शरीरात उष्णता कडकी वाढली असं म्हटलं जातं. अशा वेळी गुळवेल सत्त्व खूप दिवस पोटात द्यावे. किंवा गुळवेलीचा काढा द्यावा. ‘संशमनी वटी’ नावाच्या गोळ्याही मिळतात.
याहीपेक्षा तापावरील घरगुती उपचार म्हणजे विडा ! कडुनिंब, तुअळस व बेल यांची प्रत्येकी ७, ७ पाने घालून विडा तयार करावा व तो रोग्यास चावून चावून खाण्यास सांगावा. चव कडू लागते पण म्हणून त्यात साखर घालू नये. याच काढाही करून देतात. महिनेन महिने नवनवीन अँटिबॉयॉटिक्स-कॉर्टिझोन्स तपासण्या या आधुनिक पद्धतीनं बेजार झालेल्यांना तर हा प्रयोग करण्यास काहीच हरकत नाही.
विशेषतः मलेरियावर तर नुसत्या, कडूनिंबाचा विडा ३ दिवस थंडी वाजून ताप आला असता खाण्यास द्यावा. तापाचा प्रकार कोणताही असला तरी रोग्यास तांदुळाची पातळ पेज, तूप,मीठ, मेतकूट असा हलका आहार जरूर द्यावा. रोग्याला थर्मामीटर, शेकण्याची पिशवी, सहाण, लहान खलबत्ता, कात्री, कापूस, बँडेज, चिकटपट्टी व गृहिणीने आपल्याला ज्याची चांगली माहिती आहे अशी १५ ते २० औषधे. या बटव्यात असली पाहिजेत. सर्वांनी हे समजूनं घेतले पाहिजे की आपण जे वापरणार व ज्या तक्रारीसाठी वापरणार त्या दोन्ही गोष्टींची माहिती स्वतः करून घेतली पाहिजे. यादृष्टीनं गृहिणीनं पुढील पुस्तके संग्रही ठेवावीत.
आयुर्वेदीय औषधी गुणधर्मशास्त्र : वैद्य. पं. गंगाधरशास्त्री गुणे.
नित्योपयोगी निवडक औषधे : श्री. म. गो. मोडक.
गृहवैद्य : लेखक डॉ. र. कृ. गर्दे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
February 2, 2017
रावसाहेबांच्या संघटन कौशल्याचा फुगा टचकन फुटला. जिल्हाधिकाऱ्याच्या नावावर रावसाहेब उड्या मारत होता. आयजीच्या जीववार बायजी मजा करत होता. बेडूक उड्या मारुन मारुन किती मारणार. बेडकाला बैल झाल्याचे स्वप्न कोणे एके काळी पडले होते.
September 15, 2013
मानवी शरीर हे अनेक संस्थांनी बनलेले आहे. या विविध शरीर संस्थांचे नियंत्रण दोन संस्था करत असतात. एक म्हणजे मज्जासंस्था (मेंदू, मज्जारज्जू इ.) आणि दुसरी म्हणजे अंतस्त्रावी ग्रंथी संस्था म्हणजेच एंडोक्राईन सिस्टीम या ग्रंथीमधील स्त्रावांचे स्त्रवण सरळ रक्तामध्ये होत असल्याने या ग्रंथींना अंतस्त्रावी ग्रंधी म्हटले जाते.
अशा अंत:स्त्रावी ग्रंथीच्या स्त्रावामधील जे रासायनिक पदार्थ रक्तामध्ये संपूर्ण शरीरात फिरत असताना शरीरातील दुसऱ्या अवयवावर परिणाम करून अनेक गोष्टींचे नियंत्रण करीत असतात अशा पदार्थांना हार्मोन्स असे म्हटले जाते.
शरीरातील विविध पेशींची व संस्थांची वाढ, पुनरुपत्ती चयापचय क्रिया, यांना मार्गदर्शन आणि त्यांचे नियंत्रण करून त्यांच्या परिस्पर क्रियात संतुलन ठेवण्याचे काम हार्मोन्स करत असतात. शरीरातील विविध द्रवस्वरूप पदार्थांच्या घटकांच्या नियमनाचे कामही हार्मोन्स करत असतात.
थोडक्यात अंतस्त्रावी ग्रंथीमध्ये तयार होणारे रक्तातील जे पदार्थ शरीरातील विशेषत: हळूहळू चालणाऱ्या अथवा टप्प्याने चालणाऱ्या क्रिया नियंत्रण करत असतात त्यांना हार्मोन्स म्हणतात.
हार्मोन्सची वैशिष्ट्ये
हार्मोन्स हे व्हिटॅमिन्स प्रमाणेच अत्यंत सूक्ष्म प्रमाणात भरपूर काय करीत असतात. हार्मोन्स जेथे तयार होतात, त्या ग्रंधी व्यतिरिक्त ते साठून रहात नाहीत. ते रक्तात वहन होताना त्यांचे कार्य झाल्यावर त्यांचा त्वरित नाश होतो. काही हार्मोन्स (उदा. ऍड्रीनॅलिन), अतिजलद कार्य करतात. तर काही हार्मोन्स (उदा. थायरीक्झिन) तुलनेने हळूहळू कार्य करतात. एक अंतस्त्रावी ग्रंथी अनेक प्रकारचे हार्मोन्स देखील तयार करत असते. शरीरातीलर काही क्रियांवर एकावेळी दोन हार्मोन्सचा देखील परिणाम होत असतो. हार्मोन्सचे कार्य हे इतर हार्मोन्सवर अवलंबून असते. तसेच हार्मोन्स ज्या पेशींवर अथवा संस्थेवर कार्य करीत असतात त्यांच्या क्रियेवर पुन्हा नियंत्रितही होत असतात.
हार्मोन्सचे कार्य हे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या व्हिटॅमिन्सशी देखील संबंधित असते. उदा. इ. व्हीटॅमिन्सचा प्रजनन संस्थेतील अवयवांच्या स्त्रावावर परिणाम होत असतो. त्याविषयी सर्वांना माहिती असणे आवश्यक आणि अनिवार्य आहे.
हार्मोन्समध्ये बिघाड कसे उत्पन्न होतात?
हार्मोन्स ज्या ग्रंथी मधून तयार होतात त्या ग्रंथीने हा स्त्राव कमी करणे अथवा प्रमाणापेक्षा अधिक करणे यामुळे हार्मोन्सच्या प्रमाणात असंतुलन उत्पन्न होते. अंतस्त्रावी ग्रंथीत बिघाड होणे, किंवा काही वेळा इतर हार्मोन्सचे कार्य बिघडणे किंवा संबंधित इतर दुसऱ्या अंतस्त्रावी ग्रंथीच्या बिघाडाच्या दुष्परिणामी हे घडत असते.
*अंतस्त्रावी ग्रंथीलाच विकार होणे उदा. सूज येणे, कॅन्सरचा प्रादुर्भाव इ.
*हार्मोन्स तयार करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक घटकांची कमतरता उदा. आयोडीन कमी पडल्यामुळे होणारा गॉयटर.
*अंत:स्त्रावी ग्रंथी नियंत्रित करणाऱ्या दुसऱ्या ग्रंथीमध्ये दोन उत्पन्न होणे. उदा. पिच्युटरी या ग्रंथीचे कार्य वाढल्याने त्याच्या परिणामी हायपर थायरॉईडीझम होतो.
*अंतस्त्रावी ग्रंथीला प्रमाणापेक्षा जास्त काम पडल्यामुळे उदा. अति गोड पदार्थ खाल्ल्याने साखरेचे नियंत्रण करणाऱ्या स्वादुपिंडावर ताण येऊन डायबेटीस म्हणजेच मधुमेह होतो.
*कोणत्याही कारणाने उदा. मानसिक तणाव, चिंता काळजी, अति शारीरिक ताण. इ. मुळे मज्जासंस्थेत बिघाड झाल्याने हार्मोन्सचे कार्य बिघडते.
*जन्मत: दोष असणेमुळेही काही वेळा अंत:स्त्रावी ग्रंथीत बिघाड उत्पन्न होत असतो. उदा. अनुवंशीकतेने होणारा डायबेटीस अथवा हायपोथायरॉईडीझमचे काही प्रकार.
हार्मोन्स कोणती कार्य करतात?
शरीरातील अनेक क्रियांशी हार्मोन्सचा संबंध असतो. मुख्यत: विचार केल्यास शरीराची योग्य वाढ करणे, हाडांची वाढ करणे, उंची वाढण्याची प्रक्रिया, शरीरातील विविध चयापचय क्रिया नियंत्रित करणे, स्त्री पुरुषातील जननेंद्रियांची वाढ, लैंगिक अवयवांची योग्य वाढ करणे, स्त्री बीज उत्पत्ती क्रिया, शुक्रजंतूची उत्पत्ती वयात येताना होणाऱ्या बदलांचे नियंत्रण, स्तनांची वाढ, स्त्रीयांमध्ये मासिक पाळींची नियमितता, गर्भधारणा, गर्भाची वाढ, स्तनामधील दुधाची निर्मिती, या गोष्टींचे नियंत्रण, रक्तदाबाचे नियंत्रण करणे, शरीरातील जादा चरबीचे नियमन करणे, हृदयक्रिया श्वासोच्छवासाचे नियंत्रण, किडनीचे कार्य, यांचेही नियंत्रण हार्मोन्स करता.
थायरॉईड ग्रंथीच्या हार्मोन्समुळे ऊर्जानिर्मिती, कोलेस्टोरेलचे नियंत्रण, किडनीचे लघवी उत्पन्न करण्याचे कार्य वाढवणे, स्नायूंची कार्यक्षमता, उत्साह, चपळपणा, शरीरराची वाढ ही कार्ये होत असतात.
स्वादुपिंडामधील इन्श्युलीन हार्मोनमुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण होत असते. पॅराथायराईड हार्मोन मुख्यत: कॅल्शियमचे नियंत्रण करतो. भुकेची निर्मिती, पचनक्रिया, आतड्यांची हालचाल मलमूत्रांचे उत्सर्जन, हृदयाची गती, रक्तभिसरण, प्रोस्टेट ग्रंथी वाढ अशा अनेक क्रिया सुरळीत होण्यासाठी अथवा नियंत्रणासाठी हार्मोन्सचे संतुलीन कार्याची आवश्यकता असते.
संजीव वेलणकर पुणे
9422301733
संदर्भ.इंटरनेट
December 22, 2016
विकल्प माणसाच्या डोक्यात बिघाड निर्माण करतात.
November 6, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti