(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

  • स्तुत्य आणि अनुकरणीय वाट !

    कोरोनामुळे जग बदलत आहे, अजूनही बदलणार आहे. जगण्याच्या विविध क्षेत्रांवरच नाही तर सामाजिक परंपरा आणि चालीरीतीवरही याचा परिणाम होत आहे, यापुढेही तो होणार आहे. मात्र, हा बदल महाराष्ट्रातील जनता लढाऊ वृत्तीने आणि सामाजिक जाण भान जपत स्वीकारत आहे, ही बाब कौतुकास्पद म्हणावी लागेल. आषाढी एकादशी आणि वारीच्या निमित्ताने त्याचा प्रत्यय आला. लाखो विठ्ठलभक्तांच्या उपस्थितीत जवळपास पंधरा दिवस साजरा होणारा पंढरीच्या वारीचा महोत्सव यंदा सरकारी नियम पाळून अगदी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.

  • वॉटर हीटर (सोलर)

    भारत हा उष्णकटिबंधातील देश असल्याने आपल्याकडे पावसाळ्याचे चार महिने सोडले तर बाकीचे दिवस सूर्यप्रकाश असतो. सहस्ररश्मी सूर्याची फुकट मिळणारी ऊर्जा वापरणे हा खरेतर इंधन टंचाईवरचा एक पर्याय आहे. पाणी तापवण्यासाठी आपण घरातील किमान २५ टक्के ऊर्जा खर्च करीत असतो ती वाचवता आली तर विजेचा किंवा गॅसचा वापर टाळल्याने प्रदूषण होणार नाही. सोलर वॉटर हीटर हा असाच एक पर्याय आहे. सोलर वॉटर हीटर तयार करताना जी कार्बनची निर्मिती झालेली असते ती या हीटरच्या वापराने ४-५ वर्षांत भरून निघते

  • डिसेंबर ११ : सुभाष गुप्ते

    मिहिर बोस यांनी ‘अ हिस्ट्री ऑफ इंडियन क्रिकेट’ या आपल्या पुस्तकात गुप्तेंबद्दल म्हटले आहे, “एका मुलीसोबत ड्रिंक घेण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीसोबत एका खोलीत असल्यामुळे ज्याची कारकीर्द संपुष्टात आली असा भारताचा पहिला ग्रेट स्पिनर.”

  • जादू

    आपल्या एकुलत्या एक लेकीचा पाचवा वाढदिवस त्याला अगदी जंगी साजरा करायचा होता. एका हॉल मध्ये सगळ्याचं कंत्राटच दिलं होतं. रंगीबेरंगी फुगे, कार्टूनची सजावट, एका कोपऱ्यात टॅटू काढणारा, एक जण वेगवेगळे मास्क वाटणारा वगैरे वगैरे जय्यत तयारी केली होती. हळूहळू पाहुणे येऊ लागले. भेटीगाठी-गप्पा सुरू झाल्या. थोड्यावेळाने बहुतांश निमंत्रित आले आणि त्याने तिथल्या व्यवस्थापन करणाऱ्याला कार्यक्रम सुरू करायला सांगितलं.

  • तफावत ?

    विकसित देश विकसित का आहेत आणि क्षमता असूनही भारत विकसित देशांच्या पंक्तीत का बसू शकत नाही, या प्रश्नाच्या मुळाशी जायचे झाल्यास उत्तरांची जंत्रीच समोर करता येईल. खूप कारणं आहेत, परंतु त्यातली बहुतेक कारणे निव्वळ तकलादू स्वरूपाची आहेत. वास्तविक एखाद्या देशाला विकसित म्हणून मिरविण्यासाठी त्या देशाजवळ जे काही असावे लागते ते आपल्या भारतात अगदी खच्चून भरलेले आहे किंवा होते असे काही बाबतीत म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

  • सुखाचा शोध

    सुखाच्या प्रत्येकाच्या विविध परिभाषा असतात,प्रत्येकजणाचे सुखाचे परिमाण सुद्धा वेगवेगळे असतात पण सुखाची व्याख्या खूप सोपी व छान आहे,जे समोर आहे ते जगता आल पाहिजे.

  • स्टेट बँक माझी सखी

    स्टेट बँकेत नोकरीला लागण्याआधी मी, सात वर्ष अनेक प्राईव्हेट नोकऱ्या केल्या. पण या काळातच आपण स्टेट बँकेतच नोकरीला लागायचे हे माझे ठरलेले होते. याला दोन कारणे होती एकतर माझा एस.के. नावाचा एक चुलत भाऊ स्टेट बँकेच्या मुंबई मुख्य शाखेत नोकरीला होता, मी अनेकवेळा त्याला भेटायला स्टेट बँकेत जायचो आणि ही स्टेट बँक मला तेंव्हापासूनच आवडली होती.

  • किचन क्लिनीक – कोकम

    कोकमाची झाडे आपल्याला कोकण गोवा प्रांतामध्ये पुष्कळ पाहायला मिळतात.असे म्हणणे अतिशयोक्ती ठरू नये कि कोकमा शिवाय कोकणी व गोयंकार माणसाचा स्वयंपाक पुर्ण होऊ शकत नाही.

    कोकमाची फळे हि सुकवून त्याची सोले स्वयंपाक व औषधात वापरतात.आमटी,काही भाज्या,तिवळ,नारळाचा रस घालून केलेली सोल कढी,आगळ,कोकम सरबत इ अनेक प्रकारे आपण कोकमाचा वापर करतो.

    ह्याचा सदाहरीत,पातळ नाजूक फांद्या असलेला वृक्ष असतो.ह्याची पाने आयताकार अथवा भालाकार असतात वरून गडद हिरवी व खालून फिकट रंगांची असतात.फळ गोलाकार १-१/२ इंच व्यासाचे असते.फळाच्या आत ५-८ मोठ्या बिया असतात.

    कोकम चवीला कच्चा असताना आंबट व पिकल्यावर आंबट गोड लागतो हा उष्ण असून कफवातनाशक अाहे.

    आता ह्याचे घरगुती उपचारात महत्त्व पाहूया:

    १)कोरड्या उल्ट्या,तोंड कडू होणे,तोंडास चव नसणे ह्यात ७-८ आमसुलाचा एका वाडग्यात पाणी घालून भिजत घालावी व कुचकरून ते पाणी गाळावे व त्यात १ चमचा खडीसाखर घालून थोडे थोडे प्यावे.

    २)अंगावर पित्त उठत असल्यास अंगाला कोकमाचे पाणी लावावे व पोटात देखील हे पाणी प्यावे.

    ३)कोकमाच्या बियांपासून काढलेले मेण हे पायांच्या भेगा भरून काढायला उपयोगी आहे.

    ४)करपट ढेकर येणे,भुक न लागणे,जेवण न पचणे,पाणी सुद्धा प्यावेसे न वाटणे ह्यात कोकमाचे पाणी काळीमिरी व मीठ घालून जेवणानंतर प्यावे त्याने पचन सुधारते.

    ५)ज्यांना मुळव्याध,अम्लपित्त,भगंदराचा त्रास आहे व त्यांना जेवणामध्ये चिंच वापरतां येत नाही त्यांनी कोकम वापरावा.

    ६)कोकमाच्या तेलाचा उपयोग जखमभरून काढायला केला जातो.

    कोकम खाण्याचा अतिरेक केल्यास संडासला घट्ट होऊ शकते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • सिंहगड ते रायगड – ट्रेक – भाग १

    काही वर्षांपूर्वी युथ होस्टेल पुणे शाखा सिंहगड ते रायगड अशी शिवदुर्ग दर्शन साहस सहल आयोजित करीत असे. पुण्यातून रोज ३० जणांची तुकडी निघायची ती सर्व भ्रमण पूर्ण करून दहा दिवसांनी परत येत असे. युथ होस्टेल आयोजित हा टेक त्या काळात खूप प्रसिद्ध होता. दहा दिवसाच्या या ट्रेकचे वर्णन तीन भागात देत आहे.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग अडुसष्ट

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे- क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 25-दीपं दर्शयामी-भाग दोन

    शुभं करोति कल्याणम
    आरोग्यम सुख संपदा ।
    शत्रुबुद्धी विनाशाय
    दीपज्योती नमोस्तुते ।।

    ही दिव्याची प्रार्थना तर आपली सर्वांचीच पाठ आहे. पाठ आहे, म्हणजे अर्थ माहिती असेलच असे नाही. कधी विचारही केला नसेल एवढा ! या पाठात एक बदल होत चाललाय, तो लक्षात आणून देतो, धनसंपदा नाही, सुखसंपदा ! आरोग्य तर मिळतेच पण सुख देखील मिळते. आपण भारतीय कधी धनाच्या मागे नव्हतो, पण सुखाच्या मागे कायम होतो. सुख मिळविण्यासाठी धन हवेच असे नाही, पण सुख हेच धन असे मानणारी आपली भारतीय संस्कृती !

    मी दिव्याला नमस्कार करतो कारण, हा शुभ आहे, पवित्र आहे, शुद्ध करणारा आहे, कल्याणकारक आहे. आरोग्यकारक आहे, सुखकारक आहे. आपल्याच मनातील, शत्रुप्रमाणे असणारे वाईट विचार नष्ट करणारा आहे.

    दिव्या दिव्या दीपत्कार
    कानी कुंडले मोतीहार
    दिव्याला पाहून नमस्कार
    दिवा लावला देवापाशी
    उजेड पडला तुळशीपाशी
    माझा नमस्कार सर्व देवांपाशी

    देहलीदीपक न्याय नावाचा एक न्याय सांगितलेला आहे. उंबरठ्यावर लावलेला एक दिवा आतील देवापर्यंत आणि बाहेरील तुळशीपर्यंत प्रकाश देत राहतो. आतून बाहेरून प्रकाश देणारा हा अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे. असं संत सोहिरोबानाथ देखील म्हणतात.

    घरातली पीडा बाहेर जावो,
    बाहेरची लक्ष्मी घरात येवो,
    घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभो.
    ही सर्वांचे शुभ करणारी कल्याणकारी प्रार्थना दिव्याला उद्देशून म्हटली जाते.

    दीपज्योती परब्रह्म
    दीपज्योति जनार्दनः
    दीपो हरतु मे पापं
    संध्यादीपं नमोस्तुते ।

    मनात निर्माण होणाऱ्या वाईट विचारांचे पाप नष्ट होण्यासाठी रोज सायंकाळी घरात दिवा लावावा. सायंकाल हा संधीकाल आहे. दिवस आणि रात्री मधला. पाप आणि पुण्ण्या मधला ! चांगलं आणि वाईट यामधला ! हा संधीकाल असतो सत्व आणि तमामधला ! सकारात्मकता आणि नकारात्मकता यामधला ! वनस्पतींचे श्वसन बदलण्याचा ! हे "चेंज ओव्हर" होत असताना सर्वच स्तरावर संतुलन राखणं महत्त्वाचे असते. आणि हेच काम दिवा करत असतो.

    भो दीप ब्रह्मरूपस्त्वं
    ज्योतिषांप्रभुरव्ययः
    आरोग्यम देही पुत्रांश्च
    सर्वान् कामांश्च देही मे

    प्रत्यक्षात सगुण रूपातील देव म्हणजे अग्नी. निसर्गात सूर्य नारायणाच्या रूपात तर शरीरात जाठराग्नीच्या रूपात असतो. जसं निसर्गाचं रक्षण करतो, तसंच हा अग्नी आरोग्याचे रक्षण करणारा आहे. केवळ रक्षण करणाराच नव्हे तर वंश वाढवणारा आहे. सर्व मनोकामना पूर्ण करणारा आहे. फक्त विश्वास ठेवून, श्रद्धेने करणाऱ्याला फळ मिळते.

    केवढा अर्थ भरलाय या प्रार्थनेमध्ये !

    कोणत्याही कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन करून केली जाते. का ? कशासाठी ? काय एवढं मोठ्ठं होणार तेलाचा दिवा लावून ?

    स्वतः जळत असताना, स्वतःच्या जळण्याचे दुःख न करता, मेणबत्तीसारखे जळताना, सारखं अश्रु गाळत न रडता, आपल्या जळण्यामुळे सारं जग प्रकाशमान होतंय या आनंदात, फक्त प्रकाश मागे ठेवायचा असतो.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    18.06.2017