वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
इष्टाविशिष्टमतयोऽपि यया दयार्द्र-दृष्टया त्रिविष्टपपदं सुलभं लभन्ते।
दृष्टि: प्रहृष्टकमलोदरदीप्तिरिष्टां
पुष्टिं कृषीष्ट मम पुष्करविष्टराया:।।९।।
इष्टाविशिष्टमतयोऽपि- इष्ट म्हणजे आवश्यक असलेली. विशिष्ट अर्थात योग्य प्रकारची.
त्याला अ उपसर्ग लावला. अर्थात विशिष्ट प्रकारची नसलेली.
मती म्हणजे बुद्धी.
अपि म्हणजे सुद्धा.
एकत्रित अर्थ केला तर 'आवश्यक असणारी विशिष्ट प्रकारची बुद्धी नसली तरीसुद्धा.'
यया दयार्द्रदृष्टया- जिच्या दयापूर्ण दृष्टीने.
त्रिविष्टपपदं - स्वर्गातील स्थान.
सुलभं लभन्ते- सहजतेने प्राप्त होते.
अर्थात आई महालक्ष्मीच्या दयापूर्ण दृष्टीने ज्यांच्याजवळ स्वर्गात जाण्यासाठी आवश्यक बुद्धी नाही. तितकी ज्यांची पुण्य कर्मे नाहीत त्यांनादेखील सहजपणे स्वर्गाचे स्थान प्राप्त होते.
स्वर्गात जाण्यासाठी पुण्य करणे आवश्यक आहे. त्यासाठी विशिष्ट प्रकारची बुद्धी असावी लागते. शास्त्राचे,यज्ञयागाचे ज्ञान असावे लागते. मात्र आईची कृपा झाली तर असे ज्ञान नसणाऱ्यांना सुद्धा, याच जगात धनसंपत्तीच्या आधारे स्वर्गीय आयुष्य जगता येते. हा भाव.
कशी आहे ती दृष्टी? तर प्रहृष्टकमलोदरदीप्तिरिष्टां- प्रहृष्ट अर्थात पूर्णपणे फुललेल्या,
कमलोदर म्हणजे कमळाच्या आतील गाभ्याप्रमाणे.
दीप्तिरिष्टां- म्हणजे सौंदर्याने युक्त असलेली.
अर्थात कमळाच्या आत असणाऱ्या गाभ्याप्रमाणे परम कोमल, आकर्षक, रसपूर्ण अशी आईची दृष्टी आहे.
पुष्करविष्टरा- पुष्कर म्हणजे कमळ. तर विष्टर म्हणजे आसन. अर्थात कमळावर बसलेल्या, त्या आई महालक्ष्मीची दृष्टी,
पुष्टिं कृषीष्ट मम - मम म्हणजे माझे, पुष्टी म्हणजे कल्याण, कृषीष्ट म्हणजे करो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 18, 2020
केस विंचरताना जेव्हा कंगव्यात भरभरून केसांचा गुंता येतो किंवा जमिनीवर असंख्य वाटणारे केस पडलेले दिसतात, हे दृष्य नकोसं वाटतं. सुंदर, दाट, केशसंभाराने सौंदर्य आणि | व्यक्तिमत्त्व खुलून. मात्र गळणारे केस केवळ सौंदर्यावरच नव्हे तर मानसिक स्वास्थ्यावरही घाला घालणारे ठरू शकतात आणि त्याचे सामाजिक परिणामही दिसून येऊ शकतात.
April 13, 2023
असं म्हणतात की ऋग्वेदाच्या १० व्या मंडलातील या सुक्तात सृष्टीच्या उत्त्पत्तीच्या वेळचे जे वर्णन आले आहे ते बरेचसे Big Bang Theory (TV serial नव्हे!) या सिद्धांताशी मिळते जुळते आहे. तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ या भिन्न मार्गांनी जाणा-या विचारवंताच्या तर्कामधील हे साम्य विस्मयकारक आहे. तत्त्वज्ञाने तर्काने जे मांडावे तेच पुढे एखाद्या शास्त्रज्ञाने कसोटीने सिद्ध करावे हे विस्मयकारक असले तरी तथ्य आहे. काय असु शकेल याचं कारण?
May 9, 2021
ज्याप्रमाणे पूर्णाहुती शिवाय यज्ञाला सांगता प्राप्त होत नाही त्याचप्रमाणे फलश्रुती शिवाय स्तोत्राची सांगता होत नसते या भारतीय दंडकाचा विचार करून, आचार्यश्रींनी रचलेला हा फलश्रुतीचा श्लोक.
September 17, 2020
शरीर आणि शरीराच्या गरजा दोन्ही अल्पजीवी आहेत. राजाची देणगी आज आहे उद्या नाही. किंबहुना राज्यही आज आहे उद्या नाही. डोळ्यांना दिसणारे सुख कायम टिकणारे नाही कारण ते नश्वर प्रकृतीचा भाग आहे. जे कायम टिकणारे शाश्वत सुख आहे ते आहे आत्म्याचे सुख… कारण आत्मा शाश्वत आहे… ते सुख राजाच काय कोणीच देउ शकणार नाही. ते आपणच मिळवायचे असते. त्यामुळे शरीराचे मोह जोपासण्यापेक्षा आत्त्म्याचे स्वरूप जाणणे आवश्यक आहे.
May 16, 2021
भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी भगवान श्रीगणेशांची एकूण चार स्तोत्रे रचली आहेत. कृपारूपी जलाचे महासागर असणाऱ्या श्रीगणेशाचे मी वंदन करतो.
January 22, 2020
गणपती संदर्भात वेगवेगळे चित्रपट आले असतील परंतु अष्टविनायक गणपतींचा संदर्भ असलेला तोपर्यंत एकही चित्रपट नव्हता आणि आता असे म्हणावे लागेल आणि अजूनतरी या विषयासंदर्भात कोणी चित्रपट निर्माण केलेला नाही. हे ‘अष्टविनायक’ चित्रपटाचे वेगळेपण म्हणता येईल.
August 27, 2023
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे तेवीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
पंगतीत ढेकर देऊ नये
मधेच पंगतीतून उठून जाऊ नये
"सहनाववतु सहनौ भुनक्तु" या श्लोकाने सुरवात झालेली असताना या सर्वांमधून एकट्यानेच उठून कसे जायचे ?
असे मधेच उठून जायचे नसते.
एकतर आपणाला जेवण आवडलेले नाही, अशा प्रकारचा संदेश यजमानांना दिला जातो. नाहीतर आपले काहीतरी चुकले असावे असे यजमानांना वाटते.
खरंतर ढेकर हा वेग आहे. आयुर्वेदात सांगितलेले आहे, वेगान् न धारयेत. मग आई असं चुकीचं कसं सांगते ?
चुकीचं मुळीच नाही.
पंगतीमधे आपण जेव्हा मोठ्याने आवाज करत, विचित्र आवाजात ढेकर देतो, तेव्हा इतरांना ऐकायला थोडे अवघडल्यासारखे वाटते.
पंगतीमधे मधेच उठून जाणे हा यजमानांचा आणि अन्नपूर्णेचा अपमान समजला जातो. जर काही अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी जसे डाॅक्टरना आत्ययिक अवस्थेतील एखाद्या रुग्णाला तपासायला जायचे असते, किंवा एखाद्याला (एक करंगळी) लघुशंका किंवा (दोन नंबरी व्हिक्टरी) बृहतशंका असते तेव्हा, बाजूला बसलेल्याची परवानगी घेऊन उठावे असा अलिखित अघोषित नियम आहे. जो नियम आईला तिच्या आणि त्याच्या आई आणि बाबांनी सांगितलेला असतो.
पंगत हा प्रकार पूर्णपणे भारतीय. याच धर्तीवर पाश्चात्य देशात जे होते त्याला पार्टी म्हणतात.
पंगत म्हणजे डिसीप्लीन- शिस्त.
पार्टी म्हणजे धांगडधिंगा.
पंगत म्हणजे सहभोजन.
पार्टी म्हणजे स्वभोजन.
पंगत म्हणजे बैठक ठोकून जेवावे.
पार्टी म्हणजे उभ्याउभ्यानेच हादडावे.
पंगत म्हणजे शारिरीक मानसिक आणि आध्यात्मिक साजशृंगार
पार्टी म्हणजे सामाजिक दिखाऊपणाचा अधिभार.
पंगत म्हणजे हवं तेवढं जेवा.
पार्टी म्हणजे हवंतर जेवा.
पंगत म्हणजे उदबत्यांचा घमघमाट.
पार्टी म्हणजे बाटल्यांचा खणखणाट.
पंगत म्हणजे श्लोक म्हणायची घाई
पार्टी म्हणजे मोठ्या आवाजाची महागाई
पंगत म्हणजे एका रेषेत ताटे वाढलेली
पार्टी म्हणजे रांग लावून अन्न घेतलेली
पंगत म्हणजे ताटाला काढलेली रांगोळी
पार्टी म्हणजे रिकाम्या वाट्यांची रोषणाई
पंगत म्हणजे मिळते पावती तृप्तीची
पार्टी म्हणजे गोष्ट कोल्हा करकोच्याची
कोल्ह्याला बाटलीतून दिलेल्या खीरीची
पंगत म्हणजे हर हर महादेवा
पार्टी म्हणजे डान्सचा जलवा
पंगत म्हणजे जय जय रघुवीर समर्थ
पार्टी म्हणजे डीजे नाय तर सगळं व्यर्थ
पंगत म्हणजे निकोप स्पर्धा खाण्याची
पार्टी म्हणजे भीती उपाशी राहाण्याची
पंगत म्हणजे सत्व रजाची आरास
पार्टी म्हणजे रज तमाची नुसती रास
पंगतीमधे यजमानी पाहुण्यांना शोधतात.
तर पार्टीत पाहुणे यजमानांना हुडकतात.
पंगत म्हणजे काय काय सांगू !!!
पार्टी म्हणजे आणखी काय सांगू ???
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१२.०८.२०१७
August 12, 2017
अकंठेकलंकादनंगेभुजंगाद-
पाणौकपालादफालेऽनलाक्षात् |
अमौलौशशांकादवामेकलत्राद-
हंदेवमन्यं न मन्ये न मन्ये ‖ ३५ ‖
एखाद्या कवीच्या प्रतिभेला अचानक बहर येतो. एखादी सुंदरतम कल्पना साकार होते. ही कल्पना इतकी रम्य असते ती स्वतः कवीच तिच्या प्रेमात पडतो. पुन्हा तशीच रचना करण्याची स्वाभाविक ऊर्मी जागृत होते. या सिद्धांतानुसार तयार झालेला हा श्लोक.
आचार्यश्री म्हणतात,
अकंठेकलंकात्- ज्यांच्या गळ्याला कलंक म्हणजे डाग नाही,
अनंगेभुजंगात्- ज्यांच्या हातामध्ये दंडामध्ये सर्प बांधलेले नाहीत,
अपाणौकपालात् - ज्यांच्या हातामध्ये कपाल म्हणजे भगवान ब्रह्मदेवांच्या कापलेल्या मस्तकाच्या कवटीचा भाग नाही,
अफालेऽनलाक्षात् - ज्यांच्या मस्तकावरील नेत्रातून अग्नी उसळत नाही,
अमौलौशशांकात् - ज्यांच्या मौली वर अर्थात मस्तकावर चंद्र विलसत नाही,
अवामेकलत्रात्- ज्यांच्या डाव्या अंगावर पत्नी विराजमान नाही,
अहं देवमन्यं न मन्ये न मन्ये - अशा अन्य कोणालाही मी देव मानतच नाही.
मागील श्लोकातील गुणवैशिष्ट्यामध्ये भर घालत हलाहल विष प्राशन केल्यामुळे आलेले नीलकंठत्व आणि ब्रह्मदेवांच्या मस्तकाचे हाती धरलेले कपाल या भगवान शंकरांच्या दोन गुणवैशिष्ट्यांचे वर्णन त्याच शैलीत आचार्यश्री करतात.
हे नसेल तर तो देवच नाही यातून त्यांच्या अविभाज्य लक्षणांचे वर्णन केले. कारण यांच्याशिवाय भगवान शंकरांचे स्वरूप पूर्ण होत नाही. तसेच या गोष्टी भगवान शंकरां शिवाय अन्य कोणतीच देवता बाळगतही नाही.
त्यामुळेच या गोष्टींचे आणि याशिवाय मी देवाला मानत नाही या उच्चारातून आचार्य श्री स्वतःच्या एकनिष्ठेची घोषणा करीत आहेत.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
July 14, 2020
२०१२ हे वर्ष सरमिसळीचंच ठरलं. काही आनंदी क्षण आणि अनेक दु:खद क्षण यांनी भरलेलं हे २०१२ साल. २०१३ मधला १३ चा आकडा बर्याच जणांना बोचतोय. पाश्चिमात्य देशात १३ अशुभ मानतात. बघूया २०१३ काय घेउन येतोय…….
February 9, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti