वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मुघल बादशहा शहाजहानच्या दरबारी असलेल्या एका शाही आचाऱ्याने पारशी आणि तुर्की मिष्ठानांच्या आधारावर काही स्थानिक हलवाईंच्या मदतीने गुलाबजामची निर्मिती केली होती.
October 10, 2021
शास्त्र सांगत आहे की अणूरेणूत सर्वत्र केवळ आणि केवळ परमात्माच भरलेला आहे. मात्र आपला अनुभव तसा नाही. आपल्याला परमात्म्याशिवाय अन्य सर्व जाणवत राहते.
November 30, 2020
बाह्यात्कारी बदल आपल्या दिसतात, तसेच पोटातही बीजांडग्रंथी, गर्भाशय यांची वाढ होते. त्यासाठी तिच्या शरीरात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन संप्रेरक बीजांडकोश करतात. त्यांच्यावर नियंत्रण असते जिट्युटरी या ग्रंथीमध्ये तयार होणाऱ्या एफ. एस. एच. आणि एल. एच. या संप्रेरकांचे हे सर्व स्राव एकमेकांची पातळी योग्य प्रमाणात कशी राहील हे पाहात असतात.
April 30, 2023
संवाद हा नात्यातला श्वास आहे. जर हा श्वास थांबला तर नातं ही थांबतं. नवजात शिशु जेव्हा जेव्हा जन्म घेतो त्या दिवसापासून आई त्याच्या सोबत संवाद साधू लागते. या संवादामुळे त्याला या जगातील नाती, वस्तु, पदार्थ…. यांचे ज्ञान होऊ लागते. नात्यांशिवाय मनुष्य म्हणजे पानगळती झालेलं जीर्ण झाड! ज्यावर पक्षीदेखील आपलं घरटं बांधत नाहीत. ही पानगळती टाळण्यासाठी संवाद साधा व नात्यांना टवटवीत ठेवा.
December 15, 2022
चपात्या करताना ओट्यावर कागदाचा अवश्य वापर करावा. कारण चिकट कणिक, तेल, तूप, सांडून ओटा मेणचट होतो. मग तो धुतल्याशिवाय स्वच्छ होत नाही.
July 31, 2024
गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोरे सातत्यपूर्णपणे अधिक तापत आहे (तिथे हिंसाचार/दगडफ़ेक सुरु करायला कुठलेही निमित्य चालते?) फुटीरतावादी नेत्यांनी या आगीस भडकावण्याचे चोख काम केले आहे. सदर वातावरण अस्थिरच राहत त्यावर आपली छाप कशी राहील हेच पाहिले जात आहे. भारता विरुध्द सतत गरळ ओकणारे अजून वेगळे काय करणार? अनेक सवलतींच्या नावाखाली या देशात पाय ताणून आरामात सुस्त, मस्तपैकी रहाता येत असल्याने यांची पिढय़ानपिढय़ा सुरु असलेली गुर्मी अधिकच बळकट होताना दिसत आहे.
April 30, 2015
श्री म्हणजे लक्ष्मी आणि श्रीफळ म्हणजे नारळ. नारळ या फळाला भारतीय संस्क़ृतीमध्ये अन्ययसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.
शुभ कार्याचा प्रारंभ करण्यापूर्वी नारळ फोडण्याचा कुळाचार प्रामुख्याने हिंदू धर्मात दिसून येतो. तांब्याच्या कलशावर आंब्याच्या पानांमधये नारळ ठेवून त्याची पूजा वास्तुशांतीचे वेळी केली जाते. सुवासिनींची ओटी नारळाने भरतात. मान्यवरांचा व कलावंतांचा सत्कार करताना नारळ दिला जातो. देवापु़ढे अक्षता देताना विड्याच्या पानावर नारळ ठेवतात. विशेष म्हणजे देवघरात ठेवलेले नारळ शुभकार्याचे प्रतीक आहे.
याशिवाय कोकणवासियांना नारळ अतिशय प्रिय असून सागराने आपल्यावर कृपा करावी म्हणून ते सोन्याचाही नारळ त्याला अर्पण करतात. नारळाचे पाणी औषधी असून ते सेवन केले असता बध्दकोष्ठ नाहीसा होतो. देवाला जो नैवेद्य दाखविला जातो त्यातही नारळाच्रा खोबर्याचे विविध प्रकार असतात. उदाहरणार्थ गणेशाला आवडणारे मोदक.
विविध प्रकारच्या भाज्यांमध्येही नारळ किसून घालतात ज्यामुळे भाज्या चवदार होतात. नारळाच्या करवंटीपासूनही अनेक वस्तू बनवतात.
January 5, 2016
राजच्या चित्रपटात प्रत्येक कलावंत किती वेगळा आणि खराखुरा,ताजा वाटतो. स्वतःचे कलारंग अस्सलपणे उधळताना जाणवतो. ही राजची छाप त्यांच्यातून उणीच करता येत नाही. तोच कलाकार इतर चित्रपटांमधून फिका,निस्तेज वाटतो. प्रत्येकाचं आतलं सर्वस्व काढून घेऊन त्याने कलाकारांचे शिल्प सजीव केले. त्याच्या परिसस्पर्शाची झळाळी लेऊन कितीतरी कलादेह इथे चिरंतन होऊन गेलेत.
April 2, 2022
केस मुलायम व्हावे यासाठी केसांची काळजी घेणे गरजेचे असते. वेळोवेळी केसांचा मसाज करावा लागतो. परंतु मसाज योग्य पद्धतीने न झाल्यास त्याचा फायदा होत नाही.
तेलाने मसाज करण्यासाठी लागणारे साहित्य
- खोबरेल तेल, कॉटन(कापूस), गरम पाणी, टॉवेल, शँम्पू इत्यादी.
प्रथम खोबरेल तेल थोडे कोमट करुन घ्यावे. केसाचे दोन भाग करुन कापसाच्या साहाय्याने सगळ्या केसांच्या मुळाशी तेल चांगल्या प्रकारे लावावे.
१५ मिनिटे गोलाकार मसाज करावा. एका कानापासून दुसर्याु कानापर्यंत क्रॉस मसाज करावा.
थोडे-थोडे केस घेऊन संपूर्ण केसांचा गरम तेलाने मसाज करावा.
मानेपासून कांद्यापर्यत खालच्या दिशेने मसाज करत यावा.
अधून-मधून डोक्याचे पॉईट दाबावे या क्रियेला पंचिंग असे म्हणतात.
१५ मिनिटे व्यवस्थीत मसाज झाल्यावर गरम पाण्यात टॉवेल भिजवून केसांना गुंडाळून थोडा वेळ वाफ घ्यावी या क्रियेला स्टीम असे म्हणतात
मसाज झाल्यानंतर केस शँम्पूने स्वच्छ धुवावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
January 8, 2017
दिवाळी म्हणजे आठवते ती लवकर उठवणारी आई.उठा उठा दिवाळी आली,मोती साबणाची वेळ झाली असे सांगणारे आजोबा..दिवाळी सणाचे स्वरूप काळानुसार आणि समाजातील बदलांनुसार खूप बदलले आहे. पारंपरिक दिवाळीचा उत्सव धार्मिक व सांस्कृतिक महत्त्वावर आधारित होता, तर आधुनिक दिवाळीमध्ये सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक बदलांचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो.
November 1, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti