(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा वर्धापन दिन

    टिळक,आगरकर वगैरे प्रभृतींनी २४ ऑक्टोबर १८८४ रोजी विद्यार्थ्यांना एतद्देशीय पध्दतीने शिक्षण देता यावे म्हणून पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.

      October 24, 2021


  • माध्यमिक शालान्त परीक्षेची सुरुवात

    ब्रिटिशांकडून भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी शिक्षण पद्धती मात्र पूर्वीची ब्रिटिशांचीच होती. स्वतंत्र भारताचा कारभार क्षमतेने चालवायचा तर शिक्षण पद्धती भारतीयच हवी, हा विचार पुढे आला. भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी या कामी पुढाकार घेतला. त्यामुळेच प्रत्येक राज्यात माध्यमिक शिक्षण मंडळे स्थापन झाली. तसेच महाराष्ट्र राज्य शालान्त शिक्षण मंडळ अस्तित्वात आले. या मंडळाने ठरवलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे पहिली माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (एस. एस. सी.) १९४९मध्ये आजच्या दिवशी सुरू झाल्या.

      March 22, 2022


  • हौसेला मोल आणि पैश्याला किमंत नाही !

    कुठलाही सोहळा मग तो लग्न असो की आणि काही, साजरा करतांना सगळ्याच गोष्टींचे भान ठेवले पाहिजे. माझ्याकडे चिक्कार पैसा आहे म्हणजे मी तो कसाही खर्च करीन असे शक्यतो होऊ नये. शेवटी ज्याची त्याची विचारसरणी आहे. कोणावर कुठलीही गोष्ट लादू नयेत या विचारसरणीचा मी आहे. परंतू जी व्यक्ती कष्टाने पैसा कमावते, पैश्याची किंमत काय आहे ते जाणते, ती असा अमर्याद खर्च करणार नाही असे वाटते. पैसा कुठे, कधी, केव्हा व कोणावर खर्च करावा हा ज्याचा त्याचा व्यक्तीक प्रश्न आहे.

      May 4, 2011


  • हम दो – हमारे दो

    ११ जुलै हा गेली २३ वर्षें ‘विश्व लोकसंख्या दिन‘ म्हणून जगभर पाळला जात आहे. ११ जुलै १९८७ रोजी पृथ्वीवर पाच अब्जावे मूल जन्मले. तेव्हापासून हा दिवस ‘विश्व लोकसंख्या दिन‘ म्हणून मानला गेला आहे. १२ ऑक्टोबर १९९९ रोजी विश्व लोकसंख्या सहा अब्ज झाली. आणि २००१ च्या जनगणनेनुसार, आपला भारत देश एक अब्ज लोकसंख्येचा झाला. स्वातंत्र्यानंतर ५४ वर्षांच्या काळात भारताची लोकसंख्या तिप्पट झाली. भारतात मृत्युदर आहे- दर हजारी ९ व जन्मदर आहे- दर हजारी २४.

      August 5, 2010


  • आधुनिक युगाचा विश्वकर्मा : नितीन चंद्रकांत देसाई

    आधुनिक युगाचा विश्वकर्मा : नितीन चंद्रकांत देसाई

    काही पुस्तके देखणी दिसतात, पण त्यात आशयघनता नसते. काही पुस्तके आशयघन असतात पण त्यांच्यात देखणेपणा नसतो. मराठी साहित्याच्या प्रांतात तर ही स्थिती नेहमीच आढळते. परंतु, ही उणीव दूर करणारे एक नवे पुस्तक सकाळ प्रकाशनाने नुकतेच प्रसिद्ध केले आहे, ते म्हणजे ‘आधुनिक युगाचा विश्वकर्मा: नितीन चंद्रकांत देसाई’, लेखक मंदार जोशी.

      August 6, 2015


  • जुन्या मराठी पंगतीतील श्लोक आणि मजेदार गाणी !

    महाराष्ट्रामध्ये विविध कारणांसाठी एकत्र जेवणावळींची प्रथा तशी खूप जुनी ! घरातील शुभकार्य,देवाचा सार्वजनिक उत्सव यापासून ते अगदी मृत व्यक्तीचे तेरावे अशा कारणांसाठी जेवणावळी होत असत.बरेचदा या जेवणावळी जातीनिहाय, कुटुंबनिहायसुद्धा असायच्या . स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समाजातील जातीयता मोडण्यासाठी समाजातील सर्व जातींच्या लोकांबरोबर, पूर्वी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांच्या एकत्र जेवणावळीही केल्या.७०/ ८० वर्षांपूर्वी अशा जेवणावळीत भांड्यांचा आवाज, एकमेकांशी कुजबुज, यजमानांचा आवाज यापेक्षाही एक वेगळा आवाज हळूहळू घुमू लागला. जेवण सुरु असतांना देवाचे संस्कृत किंवा मराठी श्लोक म्हणणे सुरु झाले. एकावेळी ३०० / ४०० लोकांच्या पंगतीला ( माईकशिवाय ) स्पष्टपणे ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात असे श्लोक म्हणणे हे एक कसब होते. मग तर असे श्लोक म्हणण्याची जुगलबंदी सुरु होई. लग्नात मुलीकडच्या माणसांनी श्लोक म्हटल्यावर, मुलाकडे कुणीतरी आणखी चांगला / वेगळा श्लोक आणखी मोठ्याने म्हणत असे. नंतर या श्लोकात नर्म विनोदी प्रकारही आले.
    उदा. " गोविंद गोपाळ हे दोघे बंधू, जेवीत होते दहीभात लिंबू ।
    जेवता जेवता चमत्कार झाला, पानात उंदीर मुतून गेला ।।

    माझे काका कै. नरहरी भार्गव करंदीकर ( जन्म १९१७ ) हे एक पारंपारिक रचना अत्यंत खड्या आवाजात म्हणत असत. ४०० माणसांना त्यांचा प्रत्येक शब्द ऐकू जात असे. सर्व ज्येष्ठ मंडळींमध्ये त्यांचे " नरू " हे नाव फार प्रसिद्ध होते. लग्नात आमचा हा " नरू " जर मुलीच्या बाजूने म्हणणार असेल तर मुलीकडच्या मंडळींची कॉलर टाईट असायची. त्याकाळी सरकार दरबारी अर्ज करण्याची एक विशिष्ट भाषा असे. जेवणावळीतील अनेक पदार्थांची नवे गुंफून तयार केलेला हा अर्ज, तेव्हां लोकांना खूप आवडत असे. सुमारे ७० / ७५ वर्षांपूर्वीचा हा अर्ज, तत्कालीन अभिरुचीमध्ये मजेदार वाटत असे. माझ्या नरूकाकांना यासाठी चक्क " वन्स मोअर " ही मिळत असे.

    हा अर्ज मुद्दाम सर्वांसाठी देत आहे --
    मेहेरबान रावसाहेब श्रीखंडशास्त्री,केशरीभात, तालुके गुपचूप, जिल्हा जिलबी,यांचे हुजुरांस, अर्जदार शिरापुरी बिन करंज्या अनरसे, राहणार खाजा परगणा,तूप साजूक, यांचा विनयपूर्वक ऐसाजे. मौजे बासुंदी येथील बेसन लोकांनी दळ्याची चोरी केली. त्याची चौकशी मांडे साहेबांस करावयास सांगावी. तुमचे कोतवाल मेतकूटसाहेब यांस,चटणी सेशनी पाठवून, फेणीबाईस समन्स धाडून साक्षीकरीता वरचेवर येण्याचे करावे. मध्यंतरी तिळाची चटणी,ओल्या मिरच्यांचे तिखट,कोरड्या मिरच्या गडबड करू लागल्यास घिवर शिपायास चाबुकस्वाराचा पोशाख देऊन त्याचा बंदोबस्त करावयास सांगावे. त्याचे चवीस काही कमी झाल्यास मठठे साहेबांना साक्ष ठेवून,
    लाडूभट्टावर हल्ला करून उदरनिर्वाहाची केस पुरी करावी. मेहेरबानांस जाहीर व्हावे.

    सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
    -मकरंद करंदीकर.

      October 23, 2017


  • इको-फ्रेंडली गणपतीबाप्पा बनविण्याची पद्धत

    “जुने ते सोने” या उक्तीतून काही नवीन कल्पना !

      January 21, 2011


  • श्री आनंद लहरी – भाग १७

    भगवान श्री शंकरांचे केवळ बाह्यरंगच नव्हे तर अंतरंग देखील आपल्यासाठी तितकेच भयावह आहे हे सांगत असताना आचार्य श्री म्हणतात….

      February 22, 2020


  • धर्म आणि दहशतवाद…

    दहशतवादी हल्ल्यात अमुक अमुक देशात तमुक तमुक माणसे मरली गेली या अशा आशयाच्या बातम्या आता नित्याच्या झालेल्या आहेत. आपल्या मराठीत म्ह्णच आहे ना ‘रोज मरे त्याला कोण रडे’ तसेच काहीसे या दहशतवादी हल्ल्यांच्या बाबतीत झालेले आहे. फक्त आपल्या देशातीलच नव्हे तर जगभरातील लोकही आता या बाबतीत उदासिन झालेले असावेत. सध्याच्या युगातील माणसे मला वाटत आपला जीव तळहातावर घेऊनच जीवन जगत असतात. त्यांचा जीव त्यांच्या तळहातावरून बर्फाच्या गोळ्यासारखा कधीही गळून पडेल याची जणू त्यांना खात्रीच असते. असं तळहातावर जीव घेऊन जीवन जगणारेच आज खर्याग अर्थाने जीवन जगत असतात असं म्हटलं तर ती अतिशोक्ती ठरणार नाही. आज ना उद्या मरायचेच आहे मग आज मेलो तरी काय फरक पडणार आहे ? हा विचार अगदी सहज करण्याइतपत आजचा माणूस येऊन पोहचलेला आहे. आपण कोणासाठी तरी जगायला हवं अथवा आपल्या जगण्यावर कोणीतरी अवलंबून आहे आपल्या जगण्याची जगाला गरज आहे असं आत्मविश्वासाने मानणारा माणूस आता या भूतळावर जीवंत असण्याची शक्यता आता जवळ - जवळ धुसरच आहे.

    माणसाने कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे त्याच्या हातात नसते त्यामुळे तो ज्या धर्मात जन्माला आला तो धर्म स्वीकारण्याखेरीज त्याच्याकडे पर्याय नसतो. ज्यावेळी रामायण महाभारत घडले त्यावेळी आजच्या प्रचलित विशिष्ठ अशा कोणत्याही धर्माचा उल्लेख आढळत नाही. पण संस्कृतीचा उल्लेख आढळतो. त्यावेळी माणसातील भेद दोनच प्रकारे केला जायचा एक सत्याची बाजू घेणारा आणि दुसरा असत्याची बाजू घेणारा. सत्याची बाजू घेणारा तो धार्मिक आणि असत्याची बाजू घेणारा तो अधर्मी रामायणात राम धार्मिक तर रावण अधर्मी होता. महाभारतात पांडव धार्मिक तर कौरव अधर्मी होते. गीतेत म्हटल्या प्रमाणे शेवटी धर्माचाच विजय होतो. पण त्यावेळी श्रीकृष्णांना अपेक्षीत असणारा धर्म आज अस्तित्वात आहे का ? हा संशोधनाचा विषय आहे. आज धर्माची परिभाषा भयंकर बदलेली आहे. हिंदू संस्कृती ही जागतिक होती, संपूर्ण जगासाठी होती या संस्कृतीमुळेच निसर्ग सांतुलीत होता. कालांतराने अधर्मामुळे संस्कृतीत भेसळ वाढत गेली आणि संस्कृती बदलत तिला धर्माचे स्वरूप प्राप्त झाले. एखाद्या प्रदेशाचे भौगोलिक वातावरण त्या प्रदेशात राहणार्यात लोकांची भाषा आणि त्यांच्या भौगोलिक गरजा याला पुरक म्ह्णून तिथे राहणार्याा लोकांनी आपल्या संस्कृतीत काही बदल करत गेले आणि ते बदल वाढत गेल्यावर एका नवीन धर्माचा जन्म झाला.

    आज जगभरात जो दहशतवाद पसरविला जातोय तो फक्त धर्माच्या नावावर. धर्म आणि दहशतवाद यांचा संबंध इतका जवळ्चा आहे की एखादया लहान मुलाला जरी विचारलं की दहशतवादाच्या मुळाशी काय आहे ? तर तो अगदी सहज म्ह्णेल धर्म ! दहशत म्ह्णजे काय भितीचे वातावरण तयार करून लोकांच्या मनात भय निर्माण करणे, त्यांना निर्भय होऊ न देणे गीतेत म्ह्टल्या प्रमाणे जोपर्यंत माणूस निर्भय होत नाही तोपर्यंत तो काहीही साध्य करू शकत नाही. निर्भय माणसाला जिंकणे अशक्य असते. त्यामुळे जगावर राज्य करण्याचे स्वप्न पाहणारे दहशत ही एखादया शस्त्राप्रमाणे वापरतात. जे कधी - कधी शस्त्रानेही साध्य होत नाही ते दहशतीने साध्य करता येते. मुंबईसारख्या शहरात अगदी किरकोळ शरीर असणारे तरुण फक्त हातात एक सुरा घेऊन रस्त्यावर फिरतात आणि शेकडो लोकांना त्यांच्या दहशतीच्या सावटाखाली जगायला भाग पाडतात. पण त्या शेकडो लोकांपैकी एक जरी निर्भय असेल तर तो या गुंडाना अगदी सहज पाणी पाजू शकतो पण दुदैवाने तसे क्वचित होते. मुंबईसारख्या शहरांवर दहशदवादी हल्ले होतात ते काही लोकांना फक्त ठार मारण्यासाठी होत नाहीत हे करणार्यांानाही माहित असते करोडो लोकांमधील पाच पन्नास लोक मेल्याने काहीही फरक पडत नाही. पण त्या पन्नास माणसांना मारून ते पन्नास करोड लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यात यशस्वी होतात. त्या दहशतीच्या जोरावर पुढे कित्येक वर्षे ते त्या लोकांवर राज्य करतात.

    आज दहशत निर्माण करण्यासाठी धर्माचाच आधार का घेतला जातो ? खरं तर दहशतवादाला कोणताही जात-धर्म अथवा रंग नसतो पण दहशतवादाची बंदूक चालविण्यासाठी एक खांदा लागतो तो खांदा म्ह्णजे हल्ली धर्म असतो. एका धर्माच्या दहशतीखाली दुसरा धर्म वावरत असतो. भारतापासून पाकिस्तान हा वेगळा देश निर्माण झाला फक्त धर्माच्या नावावर एक स्वतःला हिंदू तर दुसरा स्वतःला मुस्लिम राष्ट्र म्ह्णवून घेतो आणि उगाच एकमेकांच्या दहशतीच्या सावटाखाली विनाकारण दिवस ढकळत आहेत. काही मुस्लिम राष्ट्रे ख्रिश्चन राष्ट्रांच्या दहशतीखाली दिवस ढकळत आहेत. फक्त जैन आणि बौद्ध धर्माचे कोणाला भय वाटत नाही पण त्या धर्मातील लोकांना दहशतवादाचा सामना करावाच लागतो. या अहिंसावादी धर्मांमुळेच जगात हिंसक अधर्माचे प्राबल्य वाढले त्यांना आवर घालण्यासाठी धर्माच्या रक्षणासाठी हिंसा मान्य असणार्यार हिंदू धर्मामुळेच अहिंसा मानणारे हे धर्म टिकले नाहीतर ते ही नष्ट झाले असते आणि सार्याय जगावर अधर्माचे राज्य असते हे सत्य नाकारता येणार नाही. धर्माच्या रक्षणासाठी हिंसा मान्य असणार्या याच हिंदू धर्मात जन्माला आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूचे नव्हे तर न्यायाचे राज्य प्रस्थापित केले नाहीतर आज हिंदूस्तानात हिंदू शोधावा लागला असता. हिंदूनी आपला धर्म वाढविण्याची महत्वकांक्षा कधीच बाळगली नाही त्यामुळे सर्वाधिक अघात हिंदू धर्मावरच झाले आहेत हे सत्य नाकारता येणार नाही. त्यामुळे हिंदू धर्माची कोणालाच कधीच दहशत वाटली नाही. पण मुस्लिम राज्यकर्त्यांनी मुस्लिम धर्माची दहशत संपूर्ण जगात पसरविण्याचा प्रयत्न केला. त्यात ख्रिश्चन धर्मिय ही मागे नाहीत आजही भारतात गरीब हिंदूंना पैशाची लालच दाखवून त्यांना आपल्या धर्मात आणण्याचे प्रकार अधूनमधून उजेडात येत असतात. जगात अशी कितीतरी लोक आहेत ज्यांना आपला धर्म कोणता आहे हेच माहित नाही या अशा लोकांना आपल्या धर्माचे मांडलीक करून आपल्या धर्माची दहशत जगभरात पसरविण्याचा छुपा प्रयत्न केला जातो. फक्त धर्म कुरवाळत बसलेल्या लोकांची प्रगती खुंटते पण त्यांना जगातील सारी भौतिक सुखे मात्र मिळवायची असतात ती मिळविण्यासाठी ही लोक दहशतवादाचा मार्ग स्वीकारतात आणि त्यासाठी कधी - कधी ते आपल्याच धर्म बांधवांचा बळी घ्यायलाही कचरत नाहीत.

    आता तर दहशतवादी धर्माच्याही पलिकडे गेलेले आहेत आता त्यांना दहशतवाद हाच त्यांना त्यांचा धर्म वाटू लागलेला आहे पण हीच त्यांच्या विनाशाची घंटा आहे कारण आजपर्यंत धर्मच त्यांचा रक्षणकर्ता होता, कारण दहशतवाद्यांना माहित नाही की धर्म हाच या विश्वातील सर्वात मोठा दहशतवादी आहे. एक धर्म फक्त दुसर्यान धर्मातील लोकांवर दहशत ठेवण्यास तत्पर नसतो तर तो त्याच्याच धर्मातील लोकांवर दहशत ठेवत असतो. हिंदू धर्मातील लोकांच्या मनात देवाविषयी , पाप- पुण्या विषयी दहशत असते, आपल्या परंपरा जपण्याची त्या टिकवून ठेवण्याची दहशत असते. कित्येक धर्मात स्त्रियांनी कस वागावं याची दहशत असते. कित्येक धर्मांच्या प्रमुखांवर आपला धर्म जीवंत ठेवण्यासाठीची दहशत असते. प्रत्येक धर्म ज्या ईश्वराला मानतो त्या ईश्वराच्या दहशतीखाली त्या - त्या धर्मातील लोकांना ठेवण्याचा प्रत्येक धर्माचा प्रयत्न असतो. इंग्रजांनी आपल्या देशावर जवळ - जवळ दोनशे वर्षे राज्य केले पण त्यांनी आपल्या देशातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या नाहीत नाहीतर त्यांना आपल्या देशावर दोन दिवस राज्य करणेही शक्य झाले नसते. आजही भले-भले धर्मावर भाष्य करताना हजारदा विचार करतात. आजचे राजकारणीही धर्माच्या दहशतीखाली राहूनच राज्य करीत आहे हे सत्य आहे. धर्म आणि दहशतवाद हे हातात हात घालून चालता आहेत. जोपर्यत धर्म आहे तोपर्यंत दहशतवाद असणारच धर्माच्या दहशतीत राहण वेगळ आणि त्या दहशतीचा आपल्या स्वार्थासाठी वापर करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आज धर्माच्या दहशतीचा काही लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी वापर करीत आहेत पण त्यांना माहित नाही धर्माची दहशत इतकी भयंकर आहे की ती त्यांना कधी गिळंकृत करेल त्यांचे त्यांनाही कळणार नाही...

    लेखक – निलेश बामणे
    गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – 400 065.
    मो. 8652065375

      April 23, 2016


  • मलेरियाचा इतिहास – भाग २

    इ. स. पूर्व चौथ्या शतकापर्यंत रोमन साम्राज्यातही मलेरियाने घट्ट पाय रोवले होते. साथीच्या या तापाचा त्याकाळी रोमन फीवर या नावाने उल्लेख होत असे. राणी क्किओपात्राच्या महालात मच्छरदाण्यांचा वापर नेहमी केला जात असे असा उल्लेख आहे. काही इतिहास संशोधकांच्या मते रोमन साम्राज्याचा ऱ्हासाला मलेरिया रोग देखील कारणीभूत होता.

    इटली हा दलदलीचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध असल्याने तेथे मलेरियाचे माहेरघर होते. इटलीमध्ये मलेरियावरील संशोधन जगात प्रथम सुरू झाले. त्यावेळी घडलेल्या वितंडवादाचा परामर्श पुढील प्रकरणात घेतला आहे.

    चीनमध्ये ५००० वर्षांपूर्वी मलेरिया संबंधात इतके ज्ञान होते की त्या देशातील धाडसी प्रवासी जगातील विविध देशांच्या सफरीवर निघत त्यावेळी आपल्या बायकांचा निरोप घेताना ते त्यांना पुनर्विवाहाची मानसिक तयारी करण्यास सांगून ठेवीत, कारण प्रवासात बरेच वेळा हा रोग मृत्यूला कारणीभूत ठरत असे.

    सुमेरिया व इजिप्त मध्ये ३५०० वर्षांपूर्वी ताप व सोबत वाढलेली प्लीहा (Enlarged Spleen)अशा प्रकारचे अनेक रोगी असल्याचे ऐतिहासिक उल्लेख आलेले आहेत. इजिप्शियन ममींच्या उत्खदनात त्यांच्या शरीरात वाढलेल्या प्लीहा आढळलेल्या आहेत. युरोपियन व आफ्रिकन लोकांची रोगप्रतिबंधकारक शक्ती बहुतांशी एक सारखी होती परंतु Falciparum मलेरिया विरुद्ध युरोपियनांत मुळीच प्रतिक्षमता नव्हती. १७९० मध्ये हायटी बेटावरील गुलामांचे बंड मोडून काढण्यासाठी फ्रान्सने सैन्य पाठविले, त्यात मलेरियामुळे या सैन्याची वाताहात झाली होती. वेस्टइंडीज वरील ऍडमिरल व्हर्नानच्यानेतृत्वाखालील ब्रिटिश आरमारी मोहिमेचा मलेरियाने फज्जा उडवला. एकोणतीस हजार नौसैनिकातील अर्ध्याहून अधिक सैन्याला मलेरियाच्या डासांनी यमसदनास पाठविले.

    - डॉ. अविनाश वैद्य

      October 22, 2018