(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वाहिन्यांचे लोकशाहीकरण आवश्यक

    प्रसारमाध्यमे हा भारतीय व्यवस्थेचा चौथा आधारस्तंभ मानला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रसारमाध्यमांनी प्रत्येक वेळी महत्त्वाची भूमिका बजावली. त्या काळात प्रसारमाध्यमांच्या प्रत्येक शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व होते. त्यांनी लोकांमध्ये स्वातंत्र्याबद्दल जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

      May 15, 2024


  • मोरया माझा – ११ : श्री गणेश खरेच शिवपुत्र आहेत का?

    दचकलात ना प्रश्न वाचून? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे का? तर त्याचे उत्तर, होय हा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर, नाही हेच आहे. श्री गणेश शिवपुत्र नाहीत. भगवान श्री गणेशांनी शंकर-पार्वतीच्या घरी अनेक अवतार घेतले असल्याने तसा उल्लेख आपल्याला सापडेल पण ते पूर्णवास्तव नाही.

      September 12, 2019


  • शिक्षणाचे मानसशास्त्र : परीक्षार्थी शिक्षण – जमेची बाजू

    चीनच्या सुई घराण्याच्या राजवटीने सातव्या शतकात जगातली पहिली सरकारी राजपत्रित (गॅझेटेड) अधिकारी पासून कारकुना पर्यंतच्या भरतीसाठी सार्वजनिक परीक्षा आयोजित केली (आजची IAS, MPSC, UPSC परीक्षा). पाश्चिमात्य देशात एकोणिसाव्या शतकात इंग्लंडमधे शालांत परीक्षा पद्धत राबवली गेली आणि ओघाने भारतातही आली. इतिहास मनोरंजक तर आहेच पण आजही अशाच पद्धतीने राष्ट्र / राज्य प्रशासकीय यंत्रणेची निवड प्रक्रिया अशीच आहे.

      January 10, 2021


  • आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी -भाग ६

    शाकाहारी की मांसाहारी या द्वैतामधे आपण अजूनही आहोत. आपल्याला नीट निर्णय घेता येत नाहीत की योग्य काय आणि अयोग्य काय ?

    मांसाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर माणूस शाकाहारी आहे हे सत्य पटते. पण लगेच आयुर्वेदात सांगितलेले मांसाहारी औषध पण आठवते. आपण सोयीस्कर अर्थ काढणारी जमात आहोत. बुद्धीचा अति वापर करतो, म्हणून गडबड उडते.

    न मांसभक्षणे दोषः
    न मद्येच न मैथुने
    प्रवृत्तिरेषा भूतानां
    निवृत्तिस्तु महाफला
    असं स्मृतीग्रंथकार म्हणतात.

    म्हणजे मांसभक्षणात दोष नाही. मद्यपानात दोष नाही. मैथुनातही दोष नाही. या गोष्टी करण्यामधे लोकांचा नैसर्गिक कल असतो. स्वभावतःच ओढ असते. ही प्रवृत्ती आहे. आणि त्यातून निवृत्ती मिळवता येणे हे महाफल आहे. हे जास्त महत्वाचे.

    न मांसभक्षणे दोषः एवढाच (सोयीस्कर अर्थाचा) भाग सांगितला गेला तर अर्थाचा अनर्थ कसा होतो, एवढेच सांगायचे होते.

    अर्धवट श्लोक वाचून सोयीस्कर अर्थ काढले की चुकीच्या गोष्टींची भलावण करता येते, असा सध्याचा प्रघातच आहे. योग्य आणि अयोग्य याचा सारासार विचार करणे आणि निर्णय घेणे याला विवेकबुद्धी म्हणतात.

    मांसाहार करणारे लोक आपली सोय बघतात. शाकाहार करणारे आम्ही कसे योग्य ते सांगत बसतात. त्याचे पुरावे पण सादर करतात.

    गरज आहे वर्तमानात रहाण्याची. इतिहास यासाठी अभ्यासायचा, की त्यावेळी ज्या चुका झाल्या, अज्ञानामुळे केल्या गेल्या, त्या उज्वल भविष्याचा विचार करता, वर्तमानात होऊ नयेत.

    प्राचीन भारतात मांसाहार सर्रास चालत असे, सर्व वर्णाचे लोक मांस भक्षण करीत होते, यज्ञासाठी पण प्राण्यांची हत्या होत होती, स्मृतीग्रंथातही मांसाहाराची भलावण दिसते, आयुर्वेदातही मांसाचे वर्णन आढळते.........
    या सर्वात नाकारण्यासारखे काही नाही.
    त्या काळात ते संमत होते. काळ बदललाय. आपणही नको का बदलायला ?
    ज्या चुका पूर्वजांनी केल्या त्याच चुका आपणही परतपरत करायच्या का ?
    नरबळींची प्रथा गेल्या शतकापर्यत भारतात सुरू होती. पण आज ? ती नाही. (अगदीच विकृत मनोवृत्तीतून नाकारता येत नाही.)
    नरमांसभक्षक टोळ्या पूर्वी होत्या. आता नाहीत.
    सतीची प्रथा, बालविवाह, जंगली प्राण्यांची शिकार, पुत्रप्राप्तीसाठी नियोग पद्धत, बहुपत्नीत्व इ.इ. गोष्टी संस्कारीत समाजाने अधिकृतपणे कायद्याने बंद केले आहे. आणि हे मोठे बदल जेमतेम साठ सत्तर वर्षातील आहेत.

    वाल्या कोळ्याचा, वाल्मिकी ऋषी होऊन समाजमान्यता पावतो.
    सार्वभौम राजा सम्राट अशोक आयुष्याच्या एका टप्प्यावर शाकाहारी बनला. जैन धर्माचे चौवीसावे तीर्थंकर महावीर जैन यांनी मांसभक्षण करू नये, अशी आज्ञाच काढली.
    ज्यांच्या जन्मापासून मांसाहार सुरू असतो, अश्या अन्य धर्मातील लोक देखील आता मांसाहाराचा त्याग करू लागली आहेत. एवढेच नव्हे तर अमेरीका स्थित नासा या स्पेस रिसर्च सेंटरचा नियमच आहे, अवकाशात जावू इच्छीणाऱ्या अंतराळरवीरांनी शाकाहारी बनले पाहिजे !

    भारतातील आताचा सर्वे असं सांगतोय की भारतात शाकाहारी लोकांची संख्या वाढली आहे. आपण चुकीच्या गोष्टींचा त्याग करतोय, बदल होतोय, ही चांगली गोष्ट आहे.

    नवरात्रीच्या निमित्ताने, सण व्रतांच्या निमित्ताने चांगले आरोग्य मिळवण्यासाठी चाललेले ही प्रामाणिक प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील, सर्व समाज पुनः सत्वगुणी बनेल अशी आशा आहे.

    बदल हा होतच रहातो. चांगल्यासाठी स्थित्यंतर घडणे, हे कालानुरूप होतच आले आहे. होतच रहाणार.

    प्रश्न आहे, आपण त्यात सामिल होणार की नाही याचा !!!

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    6.10.2016

      October 6, 2016


  • बेस्ट दिन

    दरवर्षी मुंबईत ७ ऑगस्ट हा दिवस बेस्ट-दिन म्हणून साजरा केला जातो. उपनगरी रेल्वेच्या बरोबरीने मुंबईकर प्रवाशांची जीवनवाहिनी बनलेली 'बेस्ट' सेवा मुंबई महानगर पालिकेने ताब्यात घेतल्याला आज ७४ वर्षे पूर्ण झाली. मुंबईत वीज व ट्राम सेवा चालवण्याचा परवाना बॉम्बे इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रामवेज या खाजगी कंपनीकडे होता. पण देशाला स्वतंत्र्य मिळायच्या आठवडाभर आधीच ७ ऑगस्ट १९४७ रोजी ही कंपनी मुंबई महापालिकेने ताब्यात घेतली म्हणून 'बेस्ट दिन' म्हणून साजरा केला जातो.

    मुंबईत बेस्टने शहराच्या विकासात अत्यंत महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम ते वातानुकूलीत बस असा मोठा प्रवास बेस्टने केलेला आहे. तर आता शहरात मोनो आणि मेट्रो ट्रेनही सुरु झाल्या आहेत. गेल्या दिडशे वर्षांमध्ये मुंबईने ही गतीमान प्रगती केली आहे.

    खरंतर मुंबईमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्रामची कल्पना एका अमेरिकन कंपनीने १८६५ साली मांडली होती. त्या कंपनीला त्याचा परवानाही मिळाला होता. मात्र ती योजना प्रत्यक्षात आली नाही. बॉम्बे ट्रामवे कंपनी, महापालिका, 'स्टर्न्स अँड किटरेज' कंपनी यांच्यामध्ये करार करण्यात आल्यानंतर १९७३ साली बॉम्बे ट्रामवे कंपनीची स्थापना करण्यात आली. मुंबई प्रांतासाठी बॉम्बे ट्रामवेज अॅ क्ट १८७४ संमत करुन त्यानुसार बॉम्बे ट्रामवे कंपनीला ट्राम चालवण्याचे हक्क देण्यात आले. ९ मे १९७४ रोजी घोड्यांद्वारे ओढली जाणारी पहिली ट्राम मुंबईमध्ये धावली. कुलाबा ते पायधुणी आणि बोरीबंदर ते पायधुणी अशा मार्गांवर धावलेल्या ट्रामसाठी केवळ तीन आणे भाडे ठरवण्यात आले मात्र कोणतेही छापिल तिकीट तेव्हा देण्यात आले नाही. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर तिकीट कमी करुन ते दोन आणे करण्यात आले होते. नंतर काही महिन्यानंतर तिकिटे छापण्यात आली. स्टर्न्स अँड किटरेज कंपनीने ट्रामसाठी ९०० घोडे पाळल्याचे सांगण्यात येते.

    इंग्लंडच्या 'ब्रिटीश इलेक्ट्रीक ट्रॅक्शन कंपनी'ने १९०४ साली विजेच्या वितरणाच्या परवान्यासाठी विनंती केली. त्यासाठी 'ब्रश इलेक्ट्रीकल इंजिनियरिंग कंपनी'ने एजंट म्हणून काम पाहिले. 'बॉम्बे ट्रामवे कंपनी', 'मुंबई महानगरपालिका', 'ब्रश कंपनी' यांच्यामध्ये ३१ जुलै १९०५ रोजी करार होऊन हा परवाना देण्यात आला. १९०५मध्ये बेस्ट म्हणजेच 'बॉम्बे इलेक्ट्रीक सप्लाय अँड ट्रामवे कंपनी'ची स्थापना करण्यात आली. १९०७ साली घोड्य़ांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम बंद करुन मुंबईमध्ये पहिली इलेक्ट्रीक ट्राम धावली तर १९२६ साली डबलडेकर ट्रामही शहरात आली. त्यानंतर या कंपनीने शहरामध्ये बससेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. १५ जुलै १९२६ साली शहरात पहिली बस अपगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या रस्त्यावर धावली. १९४७ साली कंपनीते नाव 'बॉम्बे इलेक्ट्रीक सप्लाय अॅंड ट्रान्सपोर्ट' (BEST) असे करण्यात आले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      August 7, 2021


  • दि. १ एप्रिल १९५५ – गीतरामायणातील पहिले गीत प्रसारित

    दि. १ एप्रिल १९५५ ला रामनवमीच्या मुहूर्तावर गीतरामायणातील पहिले गीत सादर झाले.

      April 15, 2017


  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग तेहेतीस

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकोणचाळीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा

    निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग तेहेतीस

    बाबा सांगतात...

    आपले नुकसान करणाऱ्या शत्रुवरही प्रायः उपकारच करावा.

    यातील "प्रायः" हा शब्द महत्त्वाचा ! या शब्दाला विशेष महत्त्व आहे. हा शब्द नसता तर अनर्थ झाला असता. आजच्या भाषेत गांधीगिरी करावी.

    महंमद घोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यातील झालेल्या युद्धांचा विचार करता, पहिल्या अनेक युद्धात महंमद हरला. त्याने माफी मागितली आणि पृथ्वीराजने ती माफी दिली. त्याला जिवंत सोडले. शेवटच्या युद्धात मात्र घौरी विजयी झाला आणि त्याने कोणत्याही प्रकारे दयामाया न दाखवता पृथ्वीराज चौहानला ठार केले. शत्रूवर कधीही दया दाखवू नये, हे सूत्र खरंतर घौरीने आम्हाला शिकवले.

    आणि नंतर शिवरायांनी प्रत्यक्षात अंमलात आणले. प्रचंड ताकदीच्या, धूर्त, कपटी अफजलला कपटानेच ठार मारले. शत्रूवर कधीही दया दाखवू नये, भरवसा ठेवू नये, कधी गाफील राहू नये, आपले आणि आपल्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी प्रसंगी 'डिप्लोमसी' करावी लागली तरी चालेल. पण शत्रूवर कधीही उपकार करू नयेत. मिडीयाला सांगताना मात्र हेच सांगावे, की कट्यारीचा पहिला वार त्याने केला म्हणून स्वसंरक्षणार्थ मला वाघनखे वापरावी लागली. नाहीतर आम्ही अहिंसेचेच पुजारी आहोत. आम्हाला हिंसा करणे कधीही आवडत नाही. किंबहुना ती आमच्या रक्तातच नाही. म्हणूनच तर स्वतंत्र भारताच्या इतिहासात कोणत्याही युद्धाची सुरवात भारताने केलेली नाही. पण कधीतरी सर्जिकल स्ट्राईक करून आम्ही देखील शिवरायांचे वंशज आहोत, हे दाखवलेच पाहिजे. शिवरायांना युद्धनीतीचे आदर्श मानणाऱ्या लढाऊ इस्राईल सारख्या छोट्याश्या देशाकडून, शत्रूशी कसे वागावे, हे आपल्या देशातील राजकीय मंडळीनी शिकण्यासारखे आहे. अशा शिवरायांकडून ""प्रायः" शब्दाचा अर्थ आम्हाला समजला.

    संपत्ती आणि विपत्तीमधे एकच चित्तवृत्ती ठेवावी.

    संपत्तीचा अभिमान जरूर असावा, पण माज असू नये. विपत्ति आली तरी बुद्धी स्थिर रहावी. तिचा तोल ढळू देऊ नये. म्हणजे कितीही श्रीमंत असली तरी अंतिम क्षणी आपल्यासाठी मांजरपाटाचाच तुकडा येणार आहे हे विसरू नये.

    एखाद्याच्या चांगल्या गुणाविषयी इर्षा करावी.
    थोडेसे विपरीत वाटणाऱ्या या वाक्यातील मुळ अर्थ लक्षात घेऊया. इर्षा हा वाईट गुण सुद्धा चांगला बनवण्यासाठी दृष्टीकोन बदलला पाहिजे. इथे इर्षा हा शब्द "स्पर्धा" या अर्थाने वापरलेला आहे. स्पर्धा चांगल्या गुणांची करावी. आपल्यात एखादा चांगला गुण कमी असेल, तर दुसऱ्याकडून तो आत्मसात करावा. शिकून घ्यावा.
    शिकण्याची तयारी असेल तर शत्रूकडूनही शिकता येते. फक्त शिकण्याची आपली तयारी हवी.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.

      August 29, 2017


  • सौभाग्यलेणं – बाजूबंद

    पूर्वी दंडात घालण्याच्या दागिन्यात अंगद व केयूर हे दोन दागिने प्रमुख असत. हे अलंकार रत्नजडित सुवर्णाचे असत. यांतल्या काहींचा आकार वेलींसारखा व काहींचा मकरासारखा असून वरची बाजू टोकदार असे. काहीच्या दोन्ही तोंडास सिंहाचे मस्तकही घडविलेले असत .

      March 6, 2024


  • १९८३ चा वर्ल्ड कप (Kapil Dev)

    आज भारतीय संघ टॉप ला आहे. हा झाला वर्तमान काळ परंतु नेहमी चर्चा होत असते ती १९८३ च्या वर्ल्ड कपची . परत आपल्या संघाकडे वर्ल्ड कप येण्याची चिन्हे दिसत आहेत . १९८३ च्या वर्ल्ड कपचा कप्तान होता कपिल देव.

      August 14, 2021


  • नवार्ण मंत्राचा गुढार्थ

    माता भगवती जगत जननी आहे, दुर्गा आहे. मातेच्या साधनेत नवार्ण मंत्राला महामंत्राचे स्थान आहे. नवार्ण मंत्रामध्ये नवग्रहांना नियंत्रित करण्याची शक्ती आहे. हा महामंत्र इतर साऱ्या मंत्रापेक्षा व स्तोत्रापेक्षा श्रेष्ठ आहे.

      September 19, 2017