वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
दरवर्षी होणार्या साहित्य संमेलनामधील एक लोकप्रिय घटक म्हणजे विविध परिसंवाद. या परिसंवादांमध्ये वक्ते बोलतात.. श्रोते ऐकतात. पण श्रोत्यांना आपली मतं मांडण्याची संधीच कुठे उपलब्ध नसते. आपल्याला असं नाही का वाटत…. आपल्यालाही इथं संधी मिळावी? अनेकांना वाटतंही. पण सांगणार कोणाला?
प्रत्यक्ष संमेलनाच्या व्यासपीठावर नाही तर नाही.. पण निदान आपल्या मराठीसृष्टीद्वारे हजारो वाचकांपर्यंत ही मतं मांडण्याची सोय आता उपलब्ध आहे. आपली ही मतं आम्ही थेट पोहोचवणार आहोत संमेलनाच्या आयोजकांपर्यंत.. आणि पर्यायाने या परिसंवादांच्या वक्त्यांपर्यंतही…
November 18, 2010
कधी बदलत्या ऋतुचक्रामुळे तर कधी धूर,धूळ आणि प्रदूषणामुळे सर्दी खोकल्याचा त्रास वारंवार होतो, अशावेळी बाजारात मिळणारी कफ सिरप्स घेतल्याने शरीरावर घातक परिणामांची शक्यता तर असते आणि त्याने दिवसभर झोपही येते मग अशावेळी तुमच्या स्वयंपाकघरातील काही घटकच कोणताही दुष्परिणाम न करता तुमचा सर्दी खोकला दूर करु शकले तर ?
लसूण:
लसणात एन्टीऑक्सिडन्ट गुणधर्म असून सर्दी खोकल्यावर ते अत्यंत प्रभावशाली आहे. लसुणामधील ‘आलाय्झीन ‘ हा घटक जंतूंचा नाश करतो .
टीप १ -जर तुमचा कान दुखत असेल तर तुम्हाला घश्यात इन्फेक्शन असण्याची शक्यता आहे,ज्यामुळे तुम्हाला कालांतराने सर्दी खोकला होऊ शकतो . अशावेळी काही लसणाच्या पाकळ्या घ्या, त्या ठेचून कापडात बांधा व कानात वरच्यावर ठेवा . त्या कानात खाली जाणार नाहीत याची काळजी घ्या.
टीप २ -लसणाच्या ४-५ पाकळ्या ठेचून त्या तुपात परतून खा. हा सर्दी खोकल्यावरील एक सोपा उपाय आहे. याव्यतिरिक्त ४ लसणाच्या पाकळ्या , २ टोमॅटो व एका लिंबाचा रस काढून तो घेतल्यास इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते. असेच तुम्ही लसूण व टोमॅटोचे एकत्र सूप बनवून त्यात थोडेसे मीठ टाकून पिऊ शकता .
हळद :
स्वयंपाकघरातील अत्यंत गुणकारी आणि बहुगुणी हळद सर्दी – खोकल्यापासून चटकन आराम देते.
टीप १ -घशाच्या खवखवीवर हळद अत्यंत उपयुक्त आहे. मुळातच हळद जंतुनाशक असल्याने ती संसर्ग वाढू देत नाही. ग्लासभर गरम दुधात चिमुटभर हळद व साखर किंवा मध घालून दुध प्या . हे दुध सर्दी – खोकला दूर करते त्याचबरोबर तुम्हाला दिवसभर उर्जा देते.
टीप २ -हळदीचा चहासुद्धा सर्दी – खोकल्याला प्रतिबंध करतो. या चहासाठी चार कप पाण्यात एक छोटा चमचा हळद टाकून उकळा. १० मिनिटांनंतर तो गळून घ्या व त्यात थोडेसे मध व लिंबू पिळून प्या . यामध्ये उकळताना तुम्ही तुळशीच्या पानांचादेखील वापर करू शकता.
टीप ३-चमचाभर हळद व मध एकत्र करून त्याचे चाटण तुम्ही दिवसातून तीनदा घेतल्यास, तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
आयुर्वेदिक काढा:
हळदीच्या चहाप्रमाणेच गवती चहा , आलं , लवंग , काळामिरी व दालचिनी यांचा एकत्र काढा सर्दी खोकला बरं करतो तसेच शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवतो.
टीप १ -चार वेलची , काळामिरीचे दाणे, लवंगा , ताजं आलं व दालचिनीचा छोटा तुकडा पातेल्याभर पाण्यात टाकून मंद आचेवर १० -१५ मिनिटे उकळा . उकळताना पातेल्यावर झाकण ठेवा . त्यानंतर मिश्रण गाळून ते गरम गरम प्या. गोडव्यासाठी त्यात थोडेसे मध घाला.
टीप २ -१५-२० तुळशीची पाने दीड कप पाण्यात उकळा . दहा मिनिटांनी हे मिश्रण गाळून त्यात चमचाभर लिंबाचा रस मिक्स करा . यातील व्हिटामिन सी व तुळस तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवते .
टीप ३-कडूलिंब व मधाचा वापर करून तुम्ही घरच्या घरी गुळण्या करू शकता. ग्लासभर पाण्यात २-३ कडलिंबाची पाने टाकून उकळा हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात चमचाभर मध घालून त्या पाण्याने गुळण्या करा.
कंठसुधारक वडी
आज काल घशातील खवखव , सर्दी यासाठी अनेक गोळ्या बाजारात उपलब्ध आहेत मात्र आयुर्वेदाचा उगम असलेल्या भारतात पूर्वीपासून अनेक प्रकारच्या कंठसुधारक वड्या ह्या घरीच बनवल्या जात असत. ज्यामुळे सर्दी , खोकला सारख्या आजारांवर घरच्या घरीच सहज विजय मिळवता येत असे
कशी कराल कंठसुधारक वडी ?
आलं बारीक कापून त्याचा रस काढून घ्या त्यात काळामिरीच्या दाण्यांची भाजून केलेली पावडर , थोडे मध व चिमुटभर हळद टाका . हे मिश्रण एकत्र करून त्याचा लहान गोळ्या तयार करा. ह्या गोळ्या १०-१५ मिनिटे चघळा , असे दिवसातून तीनवेळेस केल्यास तुम्हाला सर्दी खोकल्यापासून आराम मिळेल .
कफजन्य खोकला
कफजन्य खोकल्यापासून वेळेत आराम मिळवणे फार गरजेचे आहे . कफजन्य खोकला हा साध्या संसर्गापासून अगदी ब्राँकायटिस , न्यूमोनिया व क्षयरोगासारख्या आजाराचे एक प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे जर तुमचा खोकला आठवडाभरापेक्षा अधिक काळ टिकला तर डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे.
टीप १-चार पाच मिरीचे दाणे , थोडे जिरे व गुळ पाण्यात एकत्र करून हे मिश्रण उकळा . हे मिश्रण एकजीव झाल्यावर गॅस बंद करा व थोडे थंड करून प्या . यामुळे तुमचा खोकला कमी होण्यास मदत होईल .
टीप २-सुपारीची पाने कुटून रस काढून घ्या. या २ चमचे रसात एक चमचा मध घालून रोज दोनदा जेवणानंतर अर्ध्या तासाने घ्या . यामुळे कफाच्या खोकल्यापासून आराम मिळण्यास मदत होइल
April 6, 2017
पहा ना... काय आहे हल्ली सर्वंचजण "मी खुपच बिझी आहे.... वेळच मिळत नाही..." अशी अनेक अपेक्षाभंग वाक्ये आपल्याला ऐकायला मिळतात... म्हणजे अवघड कामे विज्ञानाने तंत्रज्ञान्याच्या मदतीने सहजसुलभ ऊपलब्ध करुनसुध्दा जो-तो प्रचंड प्रमाणात व्यस्त असतो... असो...
पण या विज्ञानाचा कशा प्रमाणात गैरफायदा घ्यायचा.... हे काही अतीहुशार महाशयांना माहीती असतच... किंबहुना यांचा जन्मच यासाठीच झालेला असतो. अशा महाशयांच्या मुखातुनच पुढील वाक्यरचना आपण ऐकत असतोच....,
"अरे मी म्हणजेच अॉफीसच... ,
माझ्या शिवाय अॉफीसमधील एक काम पुर्णंपणे संपत नाही...,
आमचे साहेब न... पुर्णंपणे माझ्यावरच अवलंबून असतात...
अरे एक दिवस सुट्टी घेतली ना...साहेब जाम चिडचिड करतात...
मी म्हणजे सरांचा ऊजवा हातच.......
मी म्हणेल तस सर ऐकतात..........
हल्ली कामाचा व्याप.. म्हणजे मलाच ताप...........
हाफ डे घ्यायचा म्हणल तरी अॉफीसच दोन दिवसांच काम रखडत.........."
अशी किंवा अनेक स्वताःचा मोठेपणा सांगण्याच्या नादात ही मंडळी ईतरांना खिणवत असतात... असो....
पण खरच अस असत का हो....? म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी खरच काम अडु शकतात का हो....? [याला थोड्याफार प्रमाणात सरकारी अधिकारी अपवाद आहेच म्हणा].. पण मी पाहीलय की 99 टक्के अॉफीसमध्ये एक प्रणाली (System) कार्यरत असती.. आणि हीच प्रणाली प्रत्येक अधिकाऱ्यांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या कुवतीनुसार त्याच्याकडून काम करुन घेत असती...तरीपण काहीजण जर आपल्याच कामात खोटेपणाने समरसुन जातात आणि "वेळच नसतो हो..." हीच वाक्यरचना सतत बडबडत असतात..
घ्या सांभाळुन.... आपलीच माणस असतात...
असतात अशीही मंडळी सभोवताली.......
-- विवेक जोशी
March 12, 2016
लेखक पत्रकार, आकाशवाणी रत्नागिरी केंद्रात ते मराठी निवेदक, मुंबई दूरदर्शन कार्यक्रम विभागात ३४ वर्षे सेवा केल्यानंतर साहाय्यक संचालक (कार्यक्रम) भारतीय कार्यक्रम प्रसारण सेवा (आय.बी.पी.एस.) केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालय, या पदावरून निवृत्त असून सध्या प्रसारण माध्यम तज्ञ/सल्लागार आहेत.
July 5, 2022
भारताचं दक्षिणेकडील अखेरचं टोक म्हणजे कन्याकुमारी. इथेच अरबी व हिंदी महासागर एकत्र येतात. स्वामी विवेकानंद या समुद्राच्या किनाऱ्यावरील एका खडकावर ७२ तास ध्यानस्थ बसले होते. जीवनाचं अंतिम रहस्य त्यांना या जागेवर उलगडलं. स्वामीजींमुळे कन्याकुमारी हे स्थान प्रसिद्धी पावलं. अशा या कन्याकुमारी स्थानकाशी भारताचं अति-पूर्वेकडील शेवटचं स्थानक दिब्रुगड हे विवेक एक्सप्रेस नावाच्या लांब पल्ल्याच्या एकमेव गाडीनं आज जोडलं गेलं आहे. स्वामी विवेकानंदांच्या स्मरणार्थ 'विवेक एक्सप्रेस' हे नाव या गाडीला दिलं गेलं. ४२८६ कि.मी. लांबीचा प्रवास ही गाडी साडे ब्याऐंशी तासांत म्हणजे ३ दिवसांपेक्षा जास्त वेळात पूर्ण करते. या गाडीला ५२ थांबे आहेत व वाटेत लागणाऱ्या स्टेशनांची एकूण संख्या आहे ६५७. तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल व आसाम, अशा प्रांतांतून जाणारी विवेक एक्सप्रेस आठवड्यातून एकदा निघते. जगातील सर्वांत लांब पल्ल्यांच्या गाड्यांत हिचा आठवा क्रमांक लागतो.
भूतान, अरुणाचल प्रदेश, मणिपूर या भागांतील रहिवाशांना भारताच्या दक्षिणेतील महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी विवेक एक्सप्रेस ही गाडी हा उत्तम पर्याय आहे. दक्षिणेकडील सैनिकांना दिब्रुगडला पोहचून तेथून थेट चीनच्या सरहद्दीपर्यंत जाण्यास, तसेच नागालँड, मणिपूरमध्ये कामावर रूजू होण्यास ही गाडी म्हणजे जीवनरेषा आहे.
केरळातील नारळाचा एक मोठा व्यापारी गेली २८ वर्षे गाड्या बदलत त्रास करून घेत दिब्रुगडला पोहचत असे. आज त्याच्या गावातून तो थेट दिब्रुगडपर्यंत जातो व धंदा सांभाळतो. भूतान देशातील थिंपू येथे केरळमधील एक बाई शाळेत शिक्षिकेची नोकरी करतात. सुटी लागल्यावर केरळला परतण्यासाठी ही गाडी त्यांना वरदानच आहे.
दिब्रुगडचं धुकं, ढग, थंडावा, हिरवीगार शेतं व थेट केरळ-तामिळनाडूचा समुद्रकिनारा, नारळी पोफळीच्या बागा, अशी निसर्गाची विविध रूपं या मार्गावरील प्रवासात आनंद देतात. या गाडीचा प्रत्येक डबा म्हणजे भारताच्या निरनिराळ्या प्रांतातील प्रवाशांचं संमेलनच असतं. विविध भाषा, जेवणाच्या वेगवेगळ्या पद्धती, चहापानाचे अनेक प्रकार, हे सर्व अनुभवण्याची एक अनोखी संधी घेण्यासाठी या गाडीनं एकदा तरी जरूर प्रवास करावा. एवढ्या लांबच्या प्रवासात मुख्य अडचण अशी येते, की ही गाडी बहुधा उशिरानंच पोहोचते. इतका दूरचा प्रवास म्हटल्यावर ही गैरसोय अपरिहार्य आहे. काही वेळा कन्याकुमारी ते दिब्रुगड प्रवासात उंदीरसुद्धा सोबत करतात, पण विवेक एक्सप्रेस ही अखंड भारताची गौरवशाली गाडी आहे हे मात्र खरे. आणखी तीन गाड्या विवेक एक्सप्रेस या नावाने धावतात. त्या पुढीलप्रमाणे
१. मुंबई-जम्मू तावी विवेक एक्सप्रेस
२. द्वारका थुटुकडी विवेक एक्सप्रेस (तामिळनाडू
३. संत्रागची मंगलोर विवेक एक्सप्रेस (कर्नाटक)
विवेक एक्सप्रेसप्रमाणेच जगातील काही लांब पल्ल्याच्या गाड्या अशा आहेत.
१. रशिया - मॉस्को ते व्हॉलडेव्हॉस्क
Trans-Saibarian Rail ९२५९ कि.मी. प्रवास-अवधी १७६ तास
२. मॉस्को ते बीजिंग (रशिया-चीन) ८९६४ कि.मी. प्रवास-अवधी १४४ तास
३. गुंगझाओ ते ल्हासा (चीन). ४९८० कि.मी. प्रवास-अवधी ९४ तास
४. टोरंटो ते व्हॅकव्हुअर (कॅनडा). ४४६६ कि.मी. प्रवास-अवधी ८६ तास
५. सिडने-पर्थ (ऑस्ट्रेलिया). ४३६२ कि.मी. प्रवास-अवधी ६५ तास
६. मॉस्को ते बीजिंग-मंगोलिया-उलनबटोरमार्गे. ७८२६ कि.मी. प्रवास-अवधी १३१ तास
७. बीजिंग-शांघाय ते ल्हासापर्यंत जाणाऱ्या गाड्या.
-डॉ. अविनाश वैद्य
June 28, 2022
भाग १ – गंगेची स्तुती व माहात्म्य अनेक कवी, विचारवंत, लेखक यांच्या कलाकृतीचा केंद्रबिंदू राहिलेले आहेत. या सर्व रचनांमध्ये जगन्नाथ पंडिताने रचलेले गंगालहरी हे आधुनिक संस्कृत काव्यांमधील मुकुटमणीच म्हटले पाहिजे. गंगेच्या स्तवनपर हे काव्य अत्यंत रसाळ, पदलालित्यपूर्ण व भावपूर्ण आहे.
December 10, 2019
दादासाहेब रेगे हे व्यक्तिमत्त्व काय होतं, आणि त्यांच्या बालमोहनने आपल्या बाळांना काय दिलं, हे प्रत्येकजण सांगू लागला असता, तर एक सप्ताहच आयोजित करावा लागला असता. आपण एका मराठी शाळेत शिकलो, याचा सार्थ अभिमान, उपस्थित प्रत्येक कीर्तिवंताच्या बोलण्यातून डोकावत होता.
June 17, 2022
ती सर्वप्रथम माझ्या आयुष्यात आली तेव्हा मला काही म्हणता काहीही कळत नव्हतं. खरं तर ती कसली माझ्या आयुष्यात येतेय, तिच्याच कृपेने मला या पृथ्वीवर जन्म घेता आला! तिच्याजवळ मला विलक्षण सुरक्षित वाटायचं. आज असंख्य महासंहारक अण्वस्त्रं जवळ बाळगूनही या पृथ्वीवरील अनेक देशांना असुरक्षिततेची भावना रात्रंदिवस ग्रासून टाकते. पण ती कोणत्याही अस्त्राच्या मदतीविना केवळ एका पदराचा उपयोग करून या जगातली सर्वात प्रभावी सुरक्षा मला कशी काय प्रदान करायची याचं मला आजही प्रचंड आश्चर्य वाटतं. मी जसा वयाने मोठा होऊ लागलो तसं माझ्या लक्षात येऊ लागलं की ती एकाच वेळी असंख्य कामं न थकता आणि अगदी वेळेत पार पाडते आणि तरीही ‘कंटाळा’ या शब्दाचं स्पेलिंगही तिला माहीत नाही! लहान असताना स्वत:ची आंघोळ स्वत:च्या हाताने धड करू न शकणारा मी, घरातली व घराबाहेरची सर्व कामं तिला विद्युत्वेगाने आणि सतत हसतमुख राहून करताना बघून आश्चर्यचकित व्हायचो आणि स्वत:लाच विचारायचो, हिला हे सगळं न थकता करायला कुठून ऊर्जा व प्रोत्साहन मिळत असेल? आपल्या बाबांवर ही सगळी कामं करायची जर कधी वेळ आली तर इतक्या इफिशिएंटली ते करू शकतील?
अनेक वर्षांनंतर विविध कंपन्यांमधे मॅनेजर असताना व इतर मॅनेजर्सच्या कामाचं बारकाईने निरीक्षण करत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की एका ठरावीक वेळात अनेक कामं सारख्याच तत्परतेने व कार्यक्षमतेने करणं माझ्यासकट एकालाही जमत नव्हतं. एकदा आमच्या कंपनीत ‘टाइम मॅनेजमेंट’ या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम करायचं ठरत होतं, तेव्हा त्यासाठी तिलाच आमंत्रण द्यावं असं मला तीव्रतेने वाटून गेलं! काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका मोठ्या संस्थेने एका परिसंवादाच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मला आमंत्रित केले. परिसंवादाचा विषय होता ‘स्त्री-पुरुष समता’. तरुण-तरुणी एकमेकांवर शब्दास्त्र सोडण्यासाठी अगदी तयारीत होते. बहुसंख्य तरुणांचं म्हणणं होतं की समता हे एक फॅड आहे व त्याची काहीही गरज नाही. निसर्गानेच स्त्री व पुरुषाला असं तयार केलं आहे की ते एका पातळीवर कधीच येऊ शकणार नाहीत. तरुणींनी अर्थातच त्यांच्या या म्हणण्याला कडाडून विरोध केला. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांची बरोबरी करण्यासाठी त्या अत्यंत आग्रही होत्या व त्यांचं म्हणणं अगदी तावातावाने मांडत होत्या.
तारस्वरात चाललेल्या त्या वादविवादातील मतमतांतरे ऐकताना अंतर्मुख झालो असतानाच माझ्या डोळ्यांसमोर ‘ती’ तरळली आणि असं वाटलं, आज या परिसंवादात ती सहभागी झाली असती तर काय म्हणाली असती? ती म्हणाली असती - ‘श्रोतेहो, स्त्री-पुरुष समता हा आजच्या परिसंवादाचा विषय अत्यंत चुकीचा आहे असं तुम्हा सर्वांना नाही वाटत? ज्या स्त्रीला स्वत:च्या सामर्थ्याची सार्थ जाणीव असेल तिला पुरुषांशी बरोबरी करण्याची गरजच काय? खरं तर समतेच्या गप्पा मारणं म्हणजे स्वत:च्या स्त्रीत्वाचा घोर अपमान आहे. प्रत्येक क्षेत्र स्त्रियांनी स्वकर्तृत्वाने व्यापून टाकलं असलं तरी आजही पुरुषप्रधान संस्कृतीचे ढोल पिटण्याचा अडाणीपणा करणारे असंख्य पुरुष अस्तित्वात असताना त्यांची बरोबरी करण्यासाठी का धडपड करायची? यानंतर या जगातल्या प्रत्येक स्त्रीने ‘स्त्री-पुरुष समता’ हा विचार डोक्यातून कायमचा हद्दपार केला पाहिजे.’
पुरुषांशी बरोबरी करण्यासाठी धडपडणाऱ्या स्त्रियांना खडे बोल सुनावणारी ‘ती’ प्रत्येक घरात वावरत असते, जिला सगळं जग ‘आई’ या नावाने ओळखतं!
-- श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
June 10, 2016
काळा घोडा’ चौकातून आपण एम.जी. रोडने (महात्मा गांधी रोड) सीएसटी स्टेशनच्या दिशेने निघालो, की पाच मिनिटात फ्लोरा फाऊंटन किंवा हुतात्मा चौकात पोहोचतो..हुतात्मा चौकात चर्चगेटच्या स्टेशनच्या दिशेने समोरच ‘सीटीओ’ची म्हणजे आपल्या ‘तार ऑफीस’ची इमारत आहे
April 25, 2016
खरा प्रश्न आहे तो, सचिन व सुनील यांच्या स्टेटमेंटस् च्या योग्यायोग्यतेचा. परंतु, पत्रकार ( किंवा, भूतपूर्व पत्रकार) आशुतोष यानें विनाकरण त्याला वेगळाच रंग देऊन आक्रस्ताळेपणा केला. तसा तो आक्रस्ताळाच आहे. पत्रकार म्हणून तो एका टी.व्ही. चॅनेलशी संबंधित होता, आणि मुलाखती घेत असे, तेव्हांही त्याची पत्रकारिता आक्रस्ताळीच होती . नंतर आम आदमी पार्टीचा स्पोक्समन म्हणून तो मुलाखती देत असे, तेव्हांही तो आक्रस्ताळाच होता. त्यामुळे कालच्या चर्चेत तो एक सहभागी पाहुणा म्हणून आक्रस्ताळेपणानें बोलला तर त्याचें नवल वाटायला नको.
February 23, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti