वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
माणसाच्या ५० टक्के आजाराला त्याचे पोट कारणीभूत असते. पोट नीट असलं की स्वास्थ्य आलबेल राहू शकते. त्यासाठी एक साधी भाजी महत्त्वपूर्ण कार्य करते ती म्हणजे शेंगेसारखी दिसणारी भेंडी ही भाजी होय. भेंडीच्या आत चविष्ट बिया असतात पण जाडसर, पारदर्शक द्रव असतो. काहींना ती आवडत नाही. पण तुमच्या पोटाचे विकार विशेषतः बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीच्या त्रासांवर भेंडी अक्सर इलाज असल्याचे आढळले आहे. या भाजीचा नियमित खुराक पचनेंद्रियांच्या कार्यासाठी लाभदायक ठरतो.
इलिनोईस युनिव्हर्सिटीतील एक संशोधक डॉ. सिल्विया झूक यांच्या नोंदणीनुसार भेंडीची भाजी ही विविध अन्नद्रव्यांचे पॉवर हाऊस आहे. त्यातील अर्धा हिस्सा गम आणि पेक्टिनच्या धाग्याच्या रुपात असतो. त्यातील विद्राव्य तंतूमय अन्नामुळे रक्तातला कोलेस्टरॉल कमी होतो, तसेच हृदयविकार मंदावतात. जो अतिद्राव्य तंतूमय चोथा असतो तो पचनेंद्रियाचा मार्ग मोकळा ठेवण्यास हातभार लावतो. भेंडी सतत खाल्ल्याने आतड्याच्या कर्करोगापासून आपली सुटका होते. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठीसुद्धा या भाजीचा हातभार लागतो.
या भाजीत बी-६ हे जीवनसत्त्व तसेच शरीराला उपयुक्त असे फॉलिक आम्लदेखील मुबलक असते. शिजविलेल्या अर्धा कप भाजीत खालीलप्रमाणे अन्नसाठा असतो ः कॅलरीज – २५ तंतूमय अन्न – २ ग्रॅम प्रथिने – १.५ ग्रॅम कार्बोहायड्रेटस् – ५.८ ग्रॅम जीवनसत्त्व अ – ४६९ युनिट जीवनसत्त्व क – १३ मिलीग्रॅम फॉलिक आम्ल – ३६.५ मिलीग्रॅम लोह – ०.४ मिलीग्रॅम पोटॅशियम – २५६ मिलीग्रॅम मॅग्नेशियम – ४६ मिलीग्रॅम भेंडीतील पातळ, चिकट द्रव्यामुळे आतड्यातील साखरेचे शोषण कमी होते व रक्तात वाढणार्या साखरेचे प्रमाण रोखले जाते. भेंडीतली जीव रसायने कोलेस्टरॉलच्या नव्हे तर यकृतरसातील विषारी पदार्थाशी परमाणूशी संयोग पावतात व शरीराबाहेर टाकण्यास सहाय्य करतात. भेंडीतील तंतूमय भाग बद्धकोष्ठता रोखतो. हे तंतू मऊ असल्यामुळे अन्य कठीण वनस्पतीज तंतूप्रमाणे ते आतड्याच्या आतल्या मऊ मांसल थरांना ओरखडे पाडीत नाहीत. त्याच्या घसरट गुणधर्मामुळे न पचलेल्या अन्नाचा घन भाग मोठ्या आतड्यातून सहज निसटत गुदद्वारामार्गे शरीराबाहेर पडतो.
शरीराच्या स्वास्थ्याला पोषक ठरणार्या जीवाणूच्या वाढीस ही भाजी हातभार लावते. अशक्तपणा, थकवा व मानसिक तणाव घालविण्यासाठी ही भाजी उपयोगी पडते. फुफ्फुसाला होणारे संसर्ग, गळ्याचे विकार, खाज यासाठी सुद्धा उपाय म्हणून भेंडीची भाजी लागू पडते. या सर्व प्राप्तीसाठी भेंडीची भाजी अर्धवट उकळवून खाल्लेली बरी असा सल्ला दिला जातो....
|| भेंडी खा निरोगी रहा ||
विशेष चव तसेच चिकट आणि बुळबीळत गुणधर्मामुळे भेंडीची भाजी पाहिली की, अनेकजण नाक मुरडतात. पण, भेडी या फळभाजीत अनेक पोषण तत्वे असून, नियमित भेंजीचे सेवन केल्यास कॅन्सर सारख्या रोगापासून आपला बचाव होतो.
भेंडी ही फळभाजी आरोग्यासाठी खुप लाभदायी आहे. भेंडीमध्ये अनेक प्रकराचे पोषक तत्व आणि प्रोटीन्स असतात. शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त बनवण्यासाठी आवश्यक असलेले वसा, रेशा, कार्बोहाइड्रेट, कैल्शियम, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम यासारखे जीवनसत्वे भेंडीमध्ये आहेत.
भेंडी कॅन्सर सारख्या रोगापासून आपला बचाव करते. आपल्या शरीरातील विषारी सत्वे नष्ट करण्याचे काम भेंडी करते.
भेंडीत असलेले यूगेनॉलमुळे डायबिटीज या आजारापासून बचाव होतो. तर, यातील फाइबर रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते.
ज्या व्यक्तींना आपले वजन कमी करायचे आहे. त्यांनी नियमीत भेंडीचा आहार घ्यावा. भेंडीत असलेल्या फायबरमुळे आपल्या शरीरातील कॅलरी वाढत नाही आणि आपले वजन कमी होण्यास मदत होते.
भेंडी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यात व्हिटामीन सी हे जीवनस्तव असते. हे आपली इम्यूनीटी सिस्टमला ताकद वाढवून खोकला आणि थंडी पासून बचाव करते. तर, यातील व्हिटामीन ए हे जीवसत्व डोळ्यांना निरोगी ठेवते.
मधुमेहींसाठी औषध
दोन भेंड्या घ्या. त्यांची दोन्ही बाजूंचे शेवटचे तुकडे कापून टाका. मध्ये एक उभा छेद घ्या. एका ग्लासमध्ये पाणी घ्या व त्यात ह्या दोन्ही भेंड्या टाकून रात्रभर ग्लास झाकून ठेवा. सकाळी उठल्यावर भेंड्या काढून टाका व ग्लासमधील पाणी पिऊन टाका. हे पंधरा दिवस करुण पहा तुमच्या साखरेच्या प्रमाणात किती लक्षणीय घट होते ते पहा !.
भेंडीचे १० फायदे
हिरव्या भाज्यांमध्ये आपले एक वेगळे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगरसुध्दा म्हटले जाते. भेंडी ही अनेकांच्या आवडीच्या भाज्यांमधील एक आहे, तर काही लोकांना भेंडी बिलकुल आवडत नाही. परंतु भेंडी खाल्याने कोणते फायदे आणि नुकसान होतात हे तुम्हाला माहीत आहे का? जर माहीत नसतील तर नक्की वाचा हे 10 फायदे,
१. कँसर
भेंडी आपल्या आहारा नियमित घेतल्याने तुम्ही कँसरला दुर ठेवु शकता. कोलन कँसरला दुर ठेवण्यासाठी भेंडी खास फायदेशीर आहे. ही आतड्यांतील विषारी तत्त्व बाहेर काढण्यासाठी मदत करते, ज्यामुळे आतडे स्वस्थ राहतात आणि चांगल्या प्रकारे काम करता.
२. हृदय
भेंडी हृदयाला सुध्दा चांगले ठेवते. यामध्ये असलेले पैक्टिन, कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात, यासोबतच यामध्ये असणारा घुलनशील फायबर, रक्त आणि कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करतो. ज्यामुळे हृदय रोगाचा धोका कमी होतो.
३. डायबिटीज
यामध्ये असणारे यूगेनॉल, डायबिटीजसाठी खुप फायदेशीर ठरते. हे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढण्यापासुन थांबवते, ज्यामुळे डायबिटीजचा धोका कमी होतो.
४. अनीमिया
भेंडी अनिमियासाठी खुप फायदेशीर असते. यामध्ये असलेले आयरन हीमोग्लोबिन निर्माण करण्यात सहायक असतात. हे रक्त स्त्राव थांबवण्याचे काम करते.
५. पचनतंत्र
भेंडी ही भरपुर फायबर असलेली भाजी आहे. यामध्ये असलेले फायबर पचनतंत्रासाठी फायदेशीर आहे. यामुळे गॅस, बध्दकोष्ट आणि पोट दुखी यासारख्या समस्या होत नाही.
६. हाडांना मजबुत बनवते
भेंडीमध्ये असणारे सर्व पदार्थ हाडांसाठी उपयोगी असतात. यामध्ये मिळणारे व्हीटॅमिन के हाडांना मजबुत बनवण्याचे कार्य करते.
७. इम्यून सिस्टम
भेंडीमध्ये व्हिटॅमिन-सी सोबतच अँटीऑक्सीडेंसही मोठ्या प्रमाणात असते. यामुळे हे इम्यून सिस्टमला मजबुत बनवुन शरीरातील आजारांपासुन लढण्यास मदत करते. भेंडीला रोजच्या जेवनात घेतल्याने अनेक आजार जसे की, खोकला, सर्दी यांसारख्या समस्या होत नाही.
८. डोळ्यांचा प्रकाश
भेंडीमध्ये व्हिट्रमिन-ए, बीटा केरोटीन आणि अँटी-ऑक्सीडेंट्स असतात. नेत्रहिनतेसाठी जे कण हानीकारक असतात त्यांना नष्ट करण्याचे काम भेंडी करते. भेंडी मोती बिंदुपासून दुर ठेवते.
९. गर्भावस्था
गर्भावस्थेमध्ये भेंडीचे सेवन फायदेशीर असते. भेंडीमध्ये फोटेल नावाचे एक पोषक तत्त्व असते, जे भ्रूणाच्या मेंदुचा विकास करण्यात महत्त्व पुर्ण भुमिका बजावते. या व्यतिरीक्त भेंडीत अनेक प्रकारचे पोषक तत्त्व असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
१०. वजन कमी करण्यात
भेंडी आपले वजन कमी करण्यासोबत त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करते. भेंडीचा उपयोग केसांना सुंदर, दाट आणि चमकदार करण्यासाठी केला जातो. यामधील पदार्थांना लिंबु सोबत मिसळुन शांपु प्रमाणे वापरता येऊ शकते.
संकलक : प्रमोद तांबे
February 8, 2017
पुण्यातील एक नामवंत उद्योगपती चंदू चव्हाण यांचा व्यापारी अनुभवावर आधारीत हा लेख, भावनांच्या डोहात डुंबणाऱ्या देशप्रेमी लोकांना विचार करायला लावणारा हा लेख.. फेसबुकवरुन आला तसा शेअर केलाय. वाचा आणि प्रतिक्रिया लिहा.
खुळचट राष्ट्रवादी penny wise pound foolish आहेत.ती त्यांच्या अभिमान cum फुकाचा गर्व या समर्थ रामदासांनी सांगितलेल्या मूर्खपनाच्या लक्षणाला साजेसं वर्तन आहे.
असो या लेखाचा उद्देश आपण जो देश म्हणूंन आर्थिक/सामाजिक/राजकीय मुर्खपणा करतो आणि त्यामुळे आपल्या देशाच्या वस्तुंच्या किमती जास्त आहेत त्याबद्दल आहे.
चांगल्या वस्तू स्वस्त बनवण्यासाठी गरज आहे इकॉनॉमी मध्ये efficiency of capital असण्याची. कशाने येते हि efficiency of capital?
मी चीन मध्ये 45 दिवस राहिलो, शेतकऱ्यांच्या घरी राहिलो, 10000 पेक्षा जास्त किलोमीटर passenger train ने प्रवास केला. युनिव्हर्सिटी च्या प्राध्यापकांना भेटलो, शेकडो लोकांना भेटलो.एवढच जाणून घ्यायचं होतं की 1950 साली भारतापेक्षा मागासलेला असलेल्या देशाने एव्हडी सामाजिक आणि आर्थिक प्रगती कशी केली?
काही कारणं सांगतो जी महत्वाची आहेत. मूलभूत प्रश्न सोडवल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.
1) कंमुनिस्ट क्रांतीने स्त्रियांना मुक्त केलं, जबरदस्तीने का होईना शर्ट पॅन्ट घालायला लावली, केस कापायला लावले आणि कामाला लावलं.चीन च्या आणि भारताच्या GDP मधला फरक समजून घ्यायचा असेल तर फक्त पडद्यात आणि बुरख्यात असलेल्या स्त्रियांचं उत्पन्न (जर त्यांनी काम केलं असतं तर) gdp मध्ये जमा करा आणि 65 वर्षाचं compounding करा. चीन शी स्पर्धा करायची असेल तर पाहिलं काम स्त्रीमुक्ती चं करा.
एका बाजूला कोट्यवधी बालमजूर शाळेत जात नाहीत आणि दुसऱ्या बाजूला कोट्यवधी स्त्रिया चूल आणि मूल यात अडकवून ठेवण्याविषयी तुम्ही काही करत नसाल तर तुमची देशभक्ती नपुंसक आहे. तुम्हाला त्याची लाज वाटली पाहिजे
कारण देश म्हणजे देशातील माणसे असतात
2) कंमुनिस्टांनी धर्म संपवला, आता बौद्ध मंदिरात फक्त पर्यटक जातात.
धर्मांच्या मठात आणि ट्रस्ट मध्ये राष्ट्रीय बचत चीन मध्ये अडकली नाही ती productive use मध्ये येऊन capitalism चा विकास चिनी कंमुनिस्ट पार्टी च्या नियंत्रणाखाली झाला.
भारतात प्रचंड पैसा धर्मामुळे unproductive कामासाठी मंदिर/मशीद/चर्च मध्ये ब्लॉक झाला आहे
आज भारतात जवळपास 30 टक्के deposit हे तिरुपती/शिर्डी/मशीद/चर्च सारख्या धार्मिक ट्रस्ट/सोसायटी/क्लबचे आहेत,
त्यांना बँका 10 टक्के व्याज देतात त्यामुळे उद्योगांवर कर्जावरील व्याजाचे दर 13-14 टक्के आहेत. चीन मध्ये हेच व्याजाचे दर उद्योगांसाठी 6 टक्के आहेत,
म्हणजे आपण तिरुपती आणि त्यासारख्या मंदिरांना संपत्ती ब्लॉक करायची. त्या संपत्तीला 10 टक्के व्याज द्यायचं आणि आपल्या उद्योजकांना सांगायचं वस्तू स्वस्त द्या.
कसं शक्य आहे?
बाकी 50 टक्के deposits गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेट्स चे आहेत, गरीब/मध्यमवर्गीय जनतेचे deposits फक्त 20 टक्के आहेत.
रिटेल loans जी लोकांनी घेतली आहेत ती जवळपास 30 टक्के आहेत त्याला व्याजाचे दर अजून जास्त आहेत, ढोबळमानाने असं म्हणता येईल की 50 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज सामान्य जनता भरते
हि व्याजरूपी लूट कोणाच्या बोडक्यावर टाकली जाते-साईबाबा/तिरुपती/मंदिर/मशी
हाऊसिंग/education/शेती या साठी लोन एक टक्क्याने देता येतील. आणि उद्योगांसाठी 5-6 टक्क्याने. मग इथले उद्योजक वस्तू स्वस्त बनवू शकतील.
धर्म नष्ट करा ती सर्वात मोठी देशभक्ती होईल.
चिनी वस्तू आपोआप महाग आणि भारतीय वस्तू स्वस्त होतील. धार्मिक मूर्खपणामुळे efficiency of capital कमी होते
3) चीन मध्ये जमिनीची मालकी राष्ट्राची असल्यामुळे सगळ्या जमिनीवर शेती होते, सगळ्या तळ्यात मत्स्य शेती होते, त्यामुळे अन्न धान्य/ फळं/मास मच्छी हि खूप स्वस्त आहे. त्यामुळे लोकांचं जीवनमान चांगलं आहे.
भारतातल्या 40 टक्के शेतीयोग्य जमिनीवर शेतीच होत नाही. जमिनीच्या मालकांना शेतीत इंटरेस्ट नाही आणि मजुरांकडे शेती नाही.
तळ्यात मत्स्यशेती तर नगण्य होते, त्यामुळे अन्नधान्याच्या किमती खूप जास्त आहेत. या व अनेक धार्मिक कारणांमुळे भारत in general कुपोषित आहे. Business हे देखील युद्ध असतं, कोट्यावधींना कुपोषित/वंचित ठेवून तुम्ही ते जिंकू शकत नाही. इतिहासात तसं केल्याने आपण खूप वेळा हरलो आहोत.
हे बदला धर्माना जमिनीत गाडा .ती खरी देशभक्ती, चिनी वस्तूंवरील बंदी तुम्ही करू पन शकत नाही आणि ते करणं मुर्खपणा आहे
चीन ची भांडवलशाही यामुळे ही अमेरिकेपेक्षा efficient आहे. आज अमेरिकेपेक्षा पेक्षा चीन ची अर्थव्यवस्था PPP बेसिस वर मोठी आहे. हि जादू त्यांनी कॅपिटलीसम आणि कंम्युनिसम चं त्यांच्या देशाला योग्य मिश्रण ठेवून आणि धर्म संपवून केलेलं आहे. चीन ला शिव्या घालणारे आणि वस्तूंवर बहिष्कार टाका म्हणणारे माझ्या मते अभ्यास नं केलेले आहेत. त्यांना आग सोमेश्वरी असताना बंब रामेश्वरी पाठवणारे मूर्खच म्हणायला लागेल. हे मूर्ख आम्ही मुतून एक गवताची आग कशी विझवली यात यात खुश आहेत.
असो शेवटी मुखशुद्दी साठी
"गोरा सोजीर मज समक्षच माझ्या भार्येशी कुकर्म करीत असतांना, मी सुद्धा त्याच्यावर धरलेली आपल्या हातातली छत्री मधुनमधून किंचित् कलती करून त्यास उन्ह लागेल असें करून त्या दुष्ट सोजीरावर सूड उगवत होतो."
चिल्लर चिनी चीजवस्तुंवर चिंधीचोर राष्ट्रवाद्यांनी घातलेल्या "कडक" बहिष्काराच्या निमित्ताने, अनेक वर्षांपूर्वी वाचलेलं (बहुधा चिं.वि.जोशी?) हे वाक्य आज सहज आठवलं.
October 25, 2016
डिस्कव्हरी चॅनल’वर मागे एकदा एक फिल्म पाहिली होती. एक वाघीण एका हरणाच्या पाडसाचा जीवावर उदार होऊन सांभाळ करते असं त्या एक तासाच्या फिल्ममधे दाखवलं बोतं काळजाला भिडणारंच होतं ते त्या वाघीणीचं वागणं.
May 13, 2017
क्षितिज पटवर्धन लिखित आणि दिग्दर्शित " दोन स्पेशल " हे नाटक सध्या मराठी रंगभूमीवर गाजत आहे . कमीतकमी ५ - ६ वेळा तरी पाहावे असेच हे नाटक आहेत . परत - परत जाऊन पाहावे अशी नाटकं मराठी रंगभूमीवर अभावानेच आजकाल येतात . त्यामुळे तर या नाटकाचे विशेष महत्व आहे . गिरीजा ओक - गोडबोले आणि जितेंद्र जोशी यांचा अप्रतिम अभिनय , ह . मो . मराठे यांची तशी जुनी पण प्रभावी कथा , क्षितिज पटवर्धन यांचे तुफान लेखन असा हा संगम आहे . हे नाटक पाहायला मी एक मराठी नाट्यवेडा म्हणूनच गेलो होतो . परत परत ही नक्कीच जाईन. पण आज Brexit चा विचार करत असताना मला राहून राहून हे नाटक आठवत आहे . कारण या दोन गोष्टीत कमालीचे साम्य आहे .
" दोन स्पेशल " हे नाटक नवीन असले तरी ते ज्या कथेवर आधारित आहे ती ह . मो . मराठे यांची कथा तशी जुनीच आहे . अगदी तसेच इंग्लेंडने जरी युरोपियन यूनियन मधून बाहेर पडण्याचा निर्णय ( म्हणजेच Brexit ) घेणे हा निर्णय जरी नवा म्हणजे २३ जून २०१६ च्या सार्वमतातून ठरला असला तरी इंग्लेंडने युरोपियन यूनियन मधून बाहेर पडण्याच्या चर्चेची कथा तशी जुनीच आहे .
Brexit ही राजकीय - आर्थिक घटना आणि " दोन स्पेशल " हे मराठी नाटक या दोन घटकातले दूसरे साम्य म्हणजे हा निर्णय पुरूषी राजवटीत झाला असला तरी त्याला महिला वर्चस्वाची भक्कम पार्श्वभूमी आहे . नाटकाची आणि कथेची नायिका जशी वेळेवर भेटत नाही , न सांगता निघून जाते अशा नायकाच्या भावावस्थेतून जसे हे नाटक घडते ; अगदी तसेच ब्रिटन ने युरोपियन यूनियन मधे सहभागी होण्यास सुरुवातीच्या काळात मार्गारेट थँचर यांच्या पंतप्रधान पदांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत विरोध झाला होता . त्यातूनच ब्रिटन युरोपियन यूनियन मधे सहभागी झाला तरी त्यांचे पौंड - sterling हे चलन स्वतंत्र राहील अशी तडजोड झाली . स्वाभिमानी जर्मनी आणि त्यांच्या पोलादी पंतप्रधान अन्जेला मार्केल यांना हे मनोमन मान्य असणे कठीणच होते . त्यामुळेच तर सार्वमतानुसार विभक्त होण्याचा निर्णय अंमलात आणण्याचे इंग्लेंडने ठरवले तरी त्यासाठी त्यांना दोन वर्षांची मुदत आहे . पण तेवढा वेळ इंग्लेंडने घेऊ नये अशीच जर्मनीची भूमिका आहे . असे सार्वमत घेण्याची घोषणा इंग्लेंडचे आता भूतपूर्व पंतप्रधान डेविड कमेरोन या पुरूष पंतप्रधानांचा . सार्वमत घेतलेही गेले त्यांच्याच कारकिर्दीत . पण त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मात्र आली आहे ब्रिटनच्या नवीन " महिला " पंतप्रधान थेरेसा मे यांच्यावर .
Brexit ही जागतिक अर्थकारण - राजकारणातील महत्वाची घटना आणि " दोन स्पेशल " हे मराठी नाटक यांच्यातील तिसरे साम्य म्हणजे आपल्या आजबाजूच्या माणसांचा न आलेला अंदाज . नाटकाच्या नायिकेला आपल्या बहिणीच्या मनोवृत्तीचा , सिनेमात जाण्याच्या झपाटलेलपणाचा नेमका अंदाज येत नाही . त्यामुळे स्वतःच्या वडिलांना अंधारात ठेवत ती बहिणीच्या घर सोडून पळून जाण्याच्या निर्णयाला साथ देते . पण नाटकाच्या नायिकेचा हा अंदाज चुकतो आणि बहिणीच्या आयुष्याची वाताहत होते . Brexit बाबत सार्वमत घेण्याची घोषणा आधी करतांना आणि नंतर ती अंमलात आणताना डेविड कमेरोन यांचाही अंदाज असाच चुकला . सार्वमत सरकारच्या विरुद्ध जाईल असं त्यांनाच काय , कदाचित ( कदाचित इतका मराठीत दुसरा धोकादायक शब्द कदाचित मराठीत नसावा ) Brexit च्या समर्थकांनाही वाटले नसावे .
या दोन गोश्तितील चौथे साम्य म्हणजे निर्णय घेतला कोणी आणि भोगावे लागले कोणाला ? तसेच घटनेनंतर मालकी कोणाकडे गेली ? घर सोडून पळून जाण्याचा निर्णय कथा आणि नाटकाच्या नायिकेच्या बहिणीचा . भोगावे लागले नायिकेला आणि मालकी गेली नायिकेच्या नवऱ्याकडे आणि नोकरी देणाऱ्याकडे . यात बिचाऱ्या नाटकाच्या नायकाचे काय ? Brexit मधेही झाले आहे तसेच . सार्वमताचा निर्णय डेविड कमेरोन यांचा . सार्वमत जिंकले नायजेल फराज ने . तो निर्णय अंमलात आणण्याआधीच या दोघांनीही राजिनामे दिले आहेत . त्यामुळे आता जबाबदारी नवीन पंतप्रधान थेरेसा मे यांची . भोगायचे सर्वसामान्य जनतेनी . इंग्लेंड मधल्याही आणि युरोप मधल्याही .
या दोन गोष्टीतले पाचवे साम्य याच नाटकातील एका संवादात सांगितले आहे . " सवयी आणि परिस्थिती या दोन वेगळ्या गोष्टी असतात . " Brexit च्या निर्णय जेंव्हा खरंच अंमलात येईल तेंव्हा इंग्लेंड आणि इतर यूरोपीय जनतेला यांचा नक्कीच अनुभव येईल . कारण थोडी - थोडकी नव्हे तर तब्बल ४३ वर्षे इंग्लेंड युरोपियन यूनियन चा सभासद आहे . चलनाचे विलिनीकरण झाले नसले तरी व्यक्ति - माल - वस्तू यांची अनिर्बंध देवाण - घेवाण विनासायास सुरू होती . इंग्लीश विद्यापीठात प्रवेश ते नोकरी अशा अनेक बाबतीतील आजपर्यंतच्या सवयी आता परिस्थिती नुसार सगळ्यांनाच बदलाव्या लागतील .
Brexit आणि " दोन स्पेशल " यातले सहावे साम्यही असंच याच नाटकातील अजून एका वाक्याने सांगता येईल . नाटकात तिच्या ऑफीसचे एक काम करून घेण्यासाठी नायकाच्या ऑफीस मधे येते . तिथे अचानक अनेक वर्षानंतर नायक - नायिका एकमेकांच्या आमनेसामने येतात . तत्वनिश्थ नायक असले काम करणार नाही याचा नायिकेला पूर्ण अंदाज येतो . पण परिस्थिती मुळे तिचाही नाईलाज असतो . तेंव्हा ती नायकाला सांगते की " तुलाही compromise करायला लागू नाही आणि मलाही manage करायला लागू नाही असं काहीतरी व्हायला हवे . " जागतिक अर्थकारण आणि राजकारण प्रत्यक्षात ज्याप्रमाणे घडते आणि ज्या तर्हेने सर्वसामान्यांना सांगितले जाते , त्याचं यापेक्षा जास्त समर्पक शब्दांत वर्णन करता येईल ? आहे फक्त इतकेच नाटकात तशी घटना घडते . प्रत्यक्ष आयुष्यात नाही ना होत तसं ! !
या दोन गोष्टीतले सातवे साम्यही याच नाटकातील अजून एका वेगळ्या विधानाने मांडता येईल . या नाटकाची नायिका एकमेकांना स्वतःचा भूतकाळ आणि वर्तमान स्पष्ट करतांना नायकाला सांगते " ज्याला भूतकाळात सोडून आले , त्याच्या हाती आपला भविष्यकाळ ठरवण्याचे आधिकार द्यायला लागावे असा कोणाचाही वर्तमानकाळ असू नाही " . Brexit लाही हे तंतोतंत लागू पडत नाही का ?
" दोन स्पेशल " हे मराठी नाटक आणि Brexit ही जागतिक राजकारण व अर्थकारण यातली एक महत्वाची घटना यात असणारे आठवे साम्य म्हणजे या नाटकात वर्तमानपत्र ऑफीस चे नेपथ्य उभे करतांना मधोमध एक बांबूचा आधार दाखवला आहे . लोकशाहीचा चौथा स्तंभ वगैरे काहीही म्हणले , त्याचा इतिहास कितीही गौरवास्पद असला तरी आजची या क्षेत्राची सर्वांगीण नाजूक परिस्थिती या बान्बूतून समोर येत राहाते . ब्रिटन चा इतिहास कितीही गौरवास्पद असला तरी आजचे त्यांचे स्थान जागतिक अर्थकारण व राजकारणात असेच तकलादू आहे का हा प्रश्न ही आहेच ना !
सरतेशेवटी , या वर्षी डॉ . गिरीश ओक त्यांच्या " ती फूलराणी " या नाटकातील भूमिकेसाठी , तर गिरीजा ओक - गोडबोले " दोन स्पेशल " या नाटकातील भूमिकेसाठी निश्चितच अनेक पुरस्कारांसाठी अधिकारिक आहेत . त्या पिता - पुत्रीची कामगिरी च तशीच आहे . Brexit बाबत असं म्हणता येईल का ?
चंद्रशेखर टिळक
C - 402 . राज पार्क
मढवी बंगल्याजवळ, राजाजी पथ
डोंबिवली ( पूर्व ) ४२१२०१
मोबाईल - ९८२०२९२३७६ .
इ-मेल - tilakc@nsdl.co.in
July 27, 2016
‘गतवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये संरक्षणक्षेत्रासाठीची तरतूद ४.८ टक्क्यांनी वाढली होती. गेल्या १० वर्षांतील ही सर्वांत कमी वाढ होती. पाकिस्तानसारखा देश जीडीपीच्या ३.५ ते ४ टक्के पैसे संरक्षण क्षेत्रावर खर्च करतो. चीनचे संरक्षण बजेट हे आपल्या संरक्षण बजेटच्या कमीत कमी तिप्पट आहे. भारताची सध्याची तरतूद जीडीपीच्या दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे.
January 28, 2017
आई जगदंबेच्या अद्वितीय घराचे वर्णन करताना आचार्य श्रींची प्रतिभा या श्लोकात उत्तुंग झेप घेत आहे.
February 18, 2020
विश्वास बसणे अवघड आहे पण तो वेगवान गोलंदाजी करायचा. वेगवान गोलंदाजी करीत असताना त्याने घेतलेले बळी एका सामन्यामागे दहा भरतात ! १८५० मध्ये लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात जॉन विज्डेनने प्रतिस्पर्धी संघातील दाहीच्या दाही फलंदाजांचे एकाच डावात त्रिफळे उडविलेले होते ! प्रथमश्रेणी सामन्यात एका डावात दहा बळी घेणारे गोलंदाज त्यानंतरही झाले पण विज्डेनच्या या अचाट पराक्रमाची बरोबरी कुणीही करू शकलेले नाही.
September 5, 2010
शाकाहारी प्राण्यांचा जबडा आगदी आ वासून उघडत नाही. (अपवाद पाणघोडा ) थोडासाच उघडतो, पण यांचा खालील जबडा वर खाली तर होतोच, पण आजुबाजुला पण हलतो. रवंथ करायचे असते ना. तुकडे करून गिळायचे असतील तर जबडा मोठ्ठा उघडावा लागतो, पण छोटे छोटे घास करीत चावून बारीक करायचे असल्याने खालचा जबडा आणि वरचा जबडा विशिष्ट पद्धतीने एकमेकांवर घासावा लागतो, तेव्हाच अन्न भरडले जाते, बारीक होते. पण मांसाहारी प्राण्यांचा खालचा जबडा फक्त वर आणि खालीच हलतो.
त्यामुळे मांसाहारीना भक्ष्य परत आत ढकलण्यासाठी मानेची हालचाल करावी लागते. मानेला हिसका देऊन, मान थोडीशी मागे नेऊन, तोंड पुढे आणावे लागते, तेव्हाच ते भक्ष्य आत ढकलले जाते. मगर कशी खाते आठवून पहा. पकडलेल्या हरणाला, दातांनी आवळून मारल्यावर, त्याला पुनः वर उडवून खायची सवय असते. जबडा मोठा असला तरी भक्ष्याला गिळताना, त्यांच्यावरील दातांची पकड थोडी सैल करून, काही क्षणांसाठी त्याला सोडावे लागते, म्हणून एकदा भक्ष्याला धरल्यावर मरेपर्यंत काही काळ भक्ष्यावरील आपली दातांची पकड सैल होऊ देत नाही.
पण घोडा गाढवाला चारा खाताना मान हलवावी लागत नाही, की चारा उडवून खावा लागत नाही.
शाकाहारी प्राण्यांच्या दाढा खूप मजबूत असतात. पसरट असतात. हत्तीसारख्या प्राण्यांच्या दाढा, एका मोठ्या वीटेएवढ्या आकारात असतात. दोन्ही जबड्यात वर खाली समान संख्येत असतात.
शाकाहारी प्राणी जेवताना समुहाने आणि शांतपणे जेवतात. त्यांची वृत्ती स्थिर असते. गाय बैल म्हैशी चरताना एकत्रच चरत असतात. आपले अन्न फक्त आपल्यालाच मिळावे, असे यांना वाटत नाही. दुसऱ्यांना मिळू नये, अशी भावना अजिबात नसते. शांतपणे एकमेकांवर डूक न धरता खातात.
नजर शांत असते. खुनशी नसते. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून आपण बघू शकतो. निरागस दिसतात. जेवत असताना सुद्धा नजर बदलत नाहीत. चोरून, घाबरून खाल्ल्यासारखे करत नाहीत. भरभर खातील पण वचावचा खाणार नाहीत.
सर्व शाकाहारी प्राणी मस्त आंघोळ करतात. पाण्याचा द्वेष, तिटकारा करीत नाहीत. अंगावर पाणी घातले तरी पळून जात नाहीत. कुत्र्यांना आंघोळ घालताना काय नाकीनऊ येतात, ते ज्यांचे त्यांनाच ठावूक.
हत्तींचे स्नान आठवून पहा. कसे पाण्यात मस्त डुंबतात आणि म्हैशी, पाणघोडे चिखलात कसे लोळतात. मुळात पाण्याची, आंघोळीची आवड असणे महत्वाचे, जी शाकाहारी प्राण्यांच्या रक्तात जन्मापूर्वी पासूनच असते.
यांच्या अंगाला घाण वास येत नाही. थोड्या कमी जास्त प्रमाणात घाम येतो, सूर्याच्या उष्णतेने बाष्पीभवन पण होते.
शाकाहारी प्राणी अंग स्वच्छ करायला सारखे चाटत बसत नाहीत. की यांना अंगाचे तापमान संतुलीत ठेवण्यासाठी जीभ बाहेर काढून, सारखी सारखी शीतकारी, शीतली करावी लागत नाही. बघीतलंय कधी बैलाला, कुत्र्यांसारखं फासण्या मारताना. ( फासण्या मारणे म्हणजे तोंड उघडे ठेवून जोरजोरात श्वासोच्छ्वास करणे )
आवाजामधे पण किती सौम्यता असते ना, भसाडा आवाज मुळीच नसतो. गाईच्या हंबरण्यात देखील हम्माऽऽऽ, मां असते. माया असते, वात्सल्य ऐकू येते. एक प्रकारचा गोडवा असतो. आवाज ऐकून भीती तर नक्कीच वाटत नाही.
एकदा खाल्लेतरी पचन पूर्ण झाल्यावर साधारणपणे आठ ते सोळा तासात परत भूक लागते. पुनः खावे लागते. भूक लवकर लागली तरी, अन्न पचायला मात्र वेळ जास्ती लागतो. खाल्लेल्या अन्नामधे विशेष अहितकर काहीच नसल्याने अन्न पोटात पुढे पुढे ढकलून त्याज्य भाग बाहेर काढायला बारा सोळा तास लागले तरी विशेष नुकसान होत नाही. यांची आतडी लांबीला जास्ती असतात. पाचक स्राव कमी अधिक प्रमाणात टप्प्यानुसार पाझरत जातात.
ईश्वराने यांना खायला भरभर शिकवले, पण पचवायला मात्र पुरेपुर वेळ दिला.
भगवान के घर देर है पर अंधेर नही !!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
28.09.2016
September 28, 2016
1985 सालची गोष्ट. तेव्हा मी फक्त रंग किरण चिकित्सा व चुंबक चिकित्सा करत होतो. टेल्कोतले एक गृहस्थ त्यांच्या मित्रासाठी चुंबक चिकित्सेची माहिती घेण्यासाठी आले. माझ्याकडून माहिती घेऊन गेले. साधारणपणे अर्ध्यातासात त्यांचा मुलगा आला व म्हणाला- आईला त्रास होतोय तुम्हाला बोलावले आहे. मला जरा संशय आला. कारण हा माणूस मित्रासाठी माहीती घ्यायला आला व आता मला बायकोसाठी घरी बोलावतो आहे. म्हणून मी काहीही न घेता त्यांचेकडे गेलो. त्यांचे पत्नीला खूप धाप लागली होती. त्या बेडवर बसून पाय सरळ ठेऊन काटकोनात वाकून तोंडाने जोरजोरात श्वास घेत होत्या. पेशंट तर समोर होता. आणि माझेकडे काहीच नाही. तातडीने उपचार करणे तर आवश्यक होते. मी त्या वेळी तळहातात असणार्या चुंबकीय शक्तीचा वापर करण्याचे तंत्र वापरले. ह्या पध्दती प्रमाणे आपला उजवा हात(दक्षिण धृव) गळ्याचे खळग्यावर आणि डावा हात (उत्तर धृव) दोन्ही बरगड्या जिथे मिळतात तिथे ठेवायचा असतो. पण पेशंट हे ऐकण्याच्या व करण्याच्या मनस्थितीत नव्हता व त्रास तर होत होता. लेडी पेशंट असल्याने मी माझे हात वापरू शकत नव्हतो. मी त्यांचे यजमानांना त्यांचे (यजमानांचे) हात बाईंना वरील प्रमाणे ठेवण्यास सांगितले व मी सांगेपर्यंत हात काढायचे नाहीत असेही सांगितले. मी घड्याळ लावून निरीक्षण करत बसलो.
पहिल्या पांच मिनीटांत काहीच फरक पडला नाही. दहाव्या मिनीटाला त्या वाकलेल्या बाई सरळ होऊन आचके देत तोंडाने श्वास घेत होत्या. पंधराव्या मिनीटाला त्या तोंड बंद करून शांतपणे नेहमी सारखा सामान्य श्वास घेऊ लागल्या. मी नवर्याला हात बाजूला करण्यास सांगितले. त्यांचा त्रास पूर्णपणे थांबला होता.
दमेकरी पेशंटना श्वासाचा त्रास होतो तेव्हां ह्या प्रयोगाने फायदा होतो. पंप लागत नाही.
-- अरविंद जोशी B.Sc.
July 11, 2017
लोह हे नाव आपण १०० टक्के शुद्ध मूलद्रव्याला दिले तर लोखंड आणि पोलाद ही त्याची दोन महत्त्वाची संमिश्रे आहेत. लोह हा धातू आणि कार्बन हा अधातू यांच्या मिश्रणातून लोखंड आणि पोलाद तयार होतात. कार्बनव्यतिरिक्त या संमिश्रांमध्ये सिलिकॉन आणि मँगेनीजही असते.
April 30, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti