(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवत् गीता

    भगवतगीता या, सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या महान ग्रंथावर अनेक विद्वानांनी भाष्य केले आहे. गीतेच्या १८ अध्यायात वेदोपनिशदांचे तत्वज्ञान सामावलेले आहे. सांख्ययोग म्हणजे गीतेचे सार, गीतेचा अर्क समजला जातो.

      January 14, 2012


  • पाटोदा ….. एक आगळेवेगळे आदर्श गाव

    औरंगाबाद पासून फक्त ७ कि मी अंतरावर पाटोदा गाव आहे. गावाची लोकसंख्या पुरुष १६५४ स्त्री १६९६ एकूण ३३५० आहे.

    केंद्रशासना मार्फत ग्रामविकास अभ्यासाकरिता देशातील ११ गावांत पाटोदा ग्रामपंचायतची निवड .

    गावाचे आगळेवेगळे उपक्रम

    १) गावात एकच पिठाची गिरणी आहे. जे ग्रामपंचायतचा कर १००% भरतात त्यांना वर्षभर दळण मोफत दळून मिळते.

    २) गावात चार प्रकारचे पाणी उपलब्ध आहे.
    i) पिण्याचे R/o पाणी
    ii) वापरायचे पाणी
    iii) साधे पाणी
    iv) गरम पाणी
    पिण्याचे आर ओ पाणी प्रत्येक दिवशी २० ली मोफत.
    ATM द्वारे चोवीस तास ८० रुपयांत १२००० ली पाणी मिळते.
    वापरायचे व साधे पाणी २ वेगवेगळ्या नळाद्वारे २४ तास पाणी उपलब्ध.
    गरम पाणी सकाळी ५ते ९ वाजेपर्यंत मोफत उपलब्ध आहे. हे पाणी सौर उर्जेवर तापविले जाते.

    ३) ओला व सुका कचऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या बकेटद्वारे कचरा ट्रॅक्टरच्या साहाय्याने गोळा केला जातो. त्या पासून कंपोस्ट खत तयार केले जाते.

    ४) गावातील अथवा बाहेरील नागरिक मंदिराला देणगी न देता ग्रा.पं. ला देणगी देतात. ग्रा पं मासिक जमा खर्च दरमहा नोटीस बोर्डवर प्रसिध्द करते.

    ५) गावात ४२ CCTV बसविण्यात आलेले आहेत.

    ६) गावात १२ ठिकाणी थंड पाण्याचे कुलर बसविण्यात आलेले आहेत.

    ७) नागरिकांना शुध्द पाणी पिण्यासाठी जलशुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वयीत आहे.

    ८) सर्व शासकिय कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी आहे.

    ९ ) संपर्कासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात मोबाईल ग्रुप कार्ड आहे.

    १०) लोकसंखेच्या दुप्पट गावात फळझाडे आहेत.

    ११ ) एकही नागरिक मळ्यात अथवा वस्तीवर राहत नाही.

    १२) हात धुण्यासाठी गावात ठिकठिकाणी वॉश बेसिन बसविलेले आहेत.

    १३) ठिकठिकाणी वयोवृद्धांना बसण्यासाठी खुर्च्या व बाके आहेत.

    १४) गावाचे एकाच ठिकाणी सर्व सांडपाणी जमा केलेले आहेत, ते पाणी शेतीला वापरतात.

    १५) गावात १ली ते ८वी पर्यंत जि प ची शाळा असून शाळा डिजिटल व गुणवत्ता पूर्ण आहेत.

    १६) गावात सात दिवसाचा सप्ताह होत नसून प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी किर्तन व सर्व गावकऱ्यांना देणगीदार मोफत जेवण देतो.

    १७) गावात ग्रा पं द्वारे सामुदायिक विवाह पार पडतो.

    १८) गावात प्रत्येक नागरिकाचा वाढदिवस साजरा केला जातो.

    १९ ) सगळ्या संस्थांच्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूका पार पडतात पण गावात कोणताच राजकिय पक्ष नाही.

    २०) प्रशासकिय सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन पुरस्कार दिला जातो.

    २१) घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक खातेदारास पर्यावरण पिशवी दिली जाते.

    २२) गावात सगळीकडे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत.

    २३) गाव तंटामुक्त , निर्मलग्राम राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत.

    २४) धुणी धुण्यासाठी गावात सार्वजनिक धोबी घाट बांधलेले आहेत .

    २५ ) ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न २५ लाख रूपये आहेत .

    २६) औरंगाबादच्या सांडपाण्यावर १०२५ हेक्टर जमिन ओलिताखाली आहेत.

    २७) ग्रामपंचायत कार्यालयात व सभागृहात वातानूकुलित ( ए सी) यंत्रणा बसविण्यात आलेली आहे.

    असे हे आगळेवेगळे आदर्श गाव एकदा तरी निश्चित पहावे..

      July 16, 2017


  • जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस

    हा दिवस २००० साली प्रथम साजरा करण्यात आला. याची सुरूवात जर्मन ब्रेन ट्यूमर असोसिएशन डॉइश हिरंटुमरहिलफ यांनी केली होती. या संघटनेची स्थापना १९९८ साली झाली. यामध्ये १४ देशांमधील ५०० हून अधिक सदस्य आहेत. याच असोसिएशनने ८ जूनला ब्रेन ट्यूमर डे जाहीर केला. तेव्हापासून या आजाराविषयी जागरुकता आणण्यासाठी ८ जूनला हा दिवस साजरा केला जातो.

      June 8, 2021


  • भावनिक आरोग्य

    संगणक दोन भागांपासून बनविलेला असतो- हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ! मानवी शरीरातील बाहेरची कातडी, हाडे,स्नायू हे दृश्य भाग म्हणजे हार्डवेअर ! आणि मन, भावना, आत्मा हे अदृश्य भाग म्हणजे सॉफ्टवेअर ! मात्र हे दोन्ही घटक आतून एकच असतात. तसेच बाह्य विश्व आणि शरीरातील अदृश्य शक्ती एकमेकांना जोडलेले असतात. भावनिक आरोग्य सॉफ्टवेअरशी संबंधित आहे. आपल्या प्रत्येक कृतीमागे ते असते.

      June 24, 2021


  • ७ दिवसात ५ किलो वजन कमी करायचे आहे?

    होय आता ते अगदी शक्य आहे !
    सात दिवसासाठी काही नियम
    सतत उकळून आटविलेले गरम पाणीच प्यावे. शरीरातून विषारी घटक बाहेर पडण्यासाठी ८-१० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
    आहारामध्ये चवीनुसार आले, पुदिना, लसुन, काळे मिरे, धने, जिरे लिंबु यांचा भरपुर वापर करावा.
    या शिवाय त्रिफळा पावडर, चित्रक, नागरमोथा, मुलतानी माती, कुळीथ, वावडींग, अर्जुन, सारिवा, मंजिष्ठा यां पावडरचे मिश्रण करुन कोरडे पावडर अंगावर घासणे म्हणजे उद्वर्तन होय. या पावडरच्या मालीश ने वजन कमी होताना त्वचेवर होणारे दुष्परीणाम कमी होतात. नियमित मालिशने त्वचेवर सुरकुत्या पडत नाही, त्वचेचा टोन टिकुन राहतो, त्वचेचा रंग उजळ्तो. दररोज आंघोळीच्या वेळेस या पावडरची अंगावर ३० मिनिटापर्यंत मालिश करावी.

    रात्रीचा आहार सुर्यास्तापुर्वी घेण्याचा काटेकोर प्रयत्न करावा
    खालील आहार वेळापत्रकासोबत नियमित वेळेस कमी साखरेचा चहा, दुध, कॉफी घेऊ शकता.

    दिवस पहिला :- पाचक आहार जवळपास सर्वांना सोमवार ते रविवार पर्यंत एखाद्या तरी उपवासाची सवय असते. दिवसभर उपाशी राहणे, रात्री एकदा जेवण करणे अशी सर्वसाधारण आपली पध्दत असते. त्याच पध्दतीने आमच्या वेळापत्रकानुसार व आयुर्वेदानुसार पहिल्या दिवशी आपणास दिवसभर फक्त ताज्या दह्याचे ताक पिऊन राहायचे आहे, ताक पातळ असावे, चांगले घुसळून लोणी काढून घ्यावे. ताकामध्ये लसुन, आद्रक, पोदीना, काळेमिठ हे चरबीचे शोषण करणारे व अन्नाचे पाचन करणारी औषधी द्रव्ये योग्य मात्रेत घालावीत, याच पध्दतीने २ थेंब तेल, कडीपत्त्ता, कोथींबीर , हिरवी मिर्ची, लसुन यांची फोडणी दिऊन बनविलेला मठ्ठा देखील चालतो. सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत ८ ते १० ग्लास या प्रमाणात आपण ताक किंवा मठ्ठा घेऊ शकता. रात्री मात्र आपण विनातेल तुपाची एक किंवा अर्धी भाकरी - चपाती व हळद-बेसन, लसुन -आद्रक घालुन बनविलेली पातळ दह्याची कढी दोन वाटी या प्रमाणात घ्यावे. आहे ना गंमत उपाशी राहणे ही नाही व पोटभरुन खाणे ही नाही.

    दिवस दुसरा:- व्हिजीटेबल डायट दुसऱ्या दिवशी आपणास पालेभाज्यांचे रस किंवा सुप्स घ्यायचे आहे. पालक सुप, टोमॅटो सुप, गाजर रस, पत्तागोभी रस, बीट ज्युस, कद्दु किंवा काकडीचे रस सकाळ पासून संध्याकाळपर्यंत पोट भरुन घेऊ शकता. मात्र पालेभाज्या वाफवुनच त्यांचे सुप बनवावे किंवा रस काढावे. दुसरे महत्त्वाचे प्रत्येक रस किंवा सुप मध्ये पोदीना, आद्रक, लसुन, कडीपत्ता, कोथिंबीर, मेथीदाना, धने, जिरे, मोहरी आवश्यकते नुसार भरपुर प्रमाणात घ्यावी. रात्री भुक लागल्यास एक-दिड वाटी भात व आद्रक- लसुन घालुन बनविलेले पातळ मुगाचे किंवा तुरीचे वरण घेऊ शकता.

    दिवस तिसरा:- फ्रुट डायट ताजी गोड फळे किंवा फळांचा रस. सफरचंद, डाळींब, संत्रा, मोसंबी, टरबुज, पपई ही फळे आपण पोटभरुन खाऊ शकता. आयुर्वेदिक नियमाप्रमाणे फळावर काळेमिरे पावडर घेण्याचे विसरु नका. मध्यंतरी भुक लागल्याची संवेदना झाल्यास नारळ पाणी प्यावे, किंवा बिनासाखरेचे लिंबु पाणी व काळे मीठ प्यावे. यामुळे भुक कमी होते व शरीरात उर्जा टिकून राहते.

    सरासरी तिसरया दिवशी शरीरात हल्के पणा जाणवु लागतो, सुस्ती-आळस कमी होतो, उत्साह वाढतो. वजन दिड ते दोन किलो ने कमी झालेले जाणवायला लागते.

    दिवस चौथा:- प्रोटिन डायट. सकाळी --- मांसाहारी असाल तर पिवळा भाग काढून एक उकडलेले अंडे, किंवा १ वाटी वाफवलेले मोड आलेले मुग किंवा मटकी, सोयाबीन किंवा चने सोबत चवीनुसार आद्रक, लसुन, मेथीदाना , कडीपत्त्ता, कोथीबीर, धने, जीरे.

    दुपारी :- उकडलेले मुग किंवा मुग-तुरीचे पातळ वरण

    संध्याकाळी :- एक ते दोन वाटी मुगाचे घट्ट वरण

    दिवस पाचवा:- फळभाज्या कॉम्बी डायट सकाळी :- पोट भरुन कोशींबीर. आद्रक, लसुन, पोदिना, काळेमिरे पावडर घ्यायला विसरु नका.

    दुपारी :- सफरचंद, अननस, पपई, टरबुज, डाळींब, संत्रा यापैकी कोणतेही एक ताजे गोड फळ किंवा नारळ पाणी. किंवा अननस ज्युस. पण साखर नको.

    संध्याकाळी :- भरपुर पालेभाज्या-मुग डाळ - तांदुळ, लसुन , आद्रक घालुन बनविलेली एक वाटी खिचडी व सोबत दोन वाटी लसुन , आद्रक घालुन बनविलेली पातळ कढी .

    आज बघा आपले २ ते ३ किलो वजन सहज कमी झालेले दिसून येइल. कपडयांची फिटींग सैल झाली आहे हे लक्षात येईल.

    दिवस सहावा:- ग्रीन ब्लड डायट सकाळी :- एक कप बिनासाखरेचे गोड दुध, दुधामध्ये आद्रक-हळद-तुळस घालून उकळून प्यावे. सोबत २-३ मारी बिस्किट घेऊ शकता.
    दुपारी : - वाफवलेल्या पालेभाज्यांचा रस

    संध्याकाळी :- पालेभाज्यांचे सुप किंवा एक ज्वारीची पातळ भाकरी व एक वाटी मुगाचे किंवा तुरीचे पातळ वरण खावे.

    दिवस सातवा:- प्रोटिन व्हिजिटेबल डायट सकाळी :- सोललेल्या मुगाचे घट्ट वरण १-२ वाटी त्यास दोन थेंब तेलाची, मोहरी-आद्रक-लसुनाचीघालुन बनविलेली पातळ कढी .

    संध्याकाळी :- पालेभाज्यांचे सुप
    सात दिवस संपले आठव्या दिवशी सकाळी आपले वजन बघा.

    या पध्दतीने वजन कमी केल्यानंतर आपला चेहरा आकर्षक, शरीर साचेबध्द दिसेल. शरीरातील सुस्ती, मरगळ, आळस निघून जाईल. नियोजित पार्टी मध्ये आपणच आकर्षण राहाल. कोठेही उपाशी राहायचे नाही , तेल-भातासारखे पदार्थ बंद करायचे नाही, आयुर्वेदाचे आहाराबद्दल सर्व नियम पाळायचे मग निश्चितच तुमचे वजन कमी होईल. शरीराची प्रोटिन, क्यॉलशियम, लोहाची ही गरज भागते अन वजनही सहज कमी होते, दुष्परीणाम ही काही होत नाही.

    * संजीव वेलणकर पुणे.*
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. डॉ. पवन एस. लड्डा

      September 29, 2016


  • श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ३०

    यानंतर आचार्य श्री भगवान श्रीविष्णूच्या वक्षस्थळा वर विराजमान असणाऱ्या कौस्तुभ रत्नाचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,

      January 2, 2021


  • साउथ आफ्रिका – भाग ८

    साउथ आफ्रिका हा देश, तसे पहिले गेल्यास, आफ्रिका खंडातील युरोप!! हवा बरीचशी युरोपप्रमाणे थंडगार असते. अगदी, उन्हाळी दिवस(सध्या इथे उन्हाळा सुरु आहे!!) आले तरी देखील, मुंबईप्रमाणे, घामाने अंग उकडून गेले आहे, असा प्रकार फारसा किंवा अजिबात होत नाही.

      September 3, 2018


  • दमा

    दररोज श्वासावाटे लाखो अदृश्य कण आपल्या संपर्कात येत असतात. काही मंडळींना यांपैकी एक किंवा अनेक गोष्टींची अ‍ॅलर्जी निर्माण होऊन खोकला येतो, छाती भरते, बंद खोलीत गुदमरायला होतं. मोकळय़ा जागेत, आवारात जरा बरं वाटतं. या परिस्थितीला ‘दम्याचा अ‍ॅटॅक’ असं म्हणता येईल. निदान, उपचार, उपकरण, फॉलो अप आणि वातावरण बदल या सगळय़ांवर सातत्याने प्रयत्न केले तर दम्यावर पूर्ण ताबा मिळवणे सहज प्रयत्नसाध्य आहे!
    दमा हा शब्द ऐकताच अनेक रुग्ण जरा घाबरतातच. लहान मुलांचे आईवडील तर चिंतेतच पडतात. माझ्या वीसेक वर्षांच्या अनुभवात असे आढळून आले आहे की दमा हे निदान झाल्यावर त्याचा स्वीकार करण्यास रुग्ण नाखूश असतात. बरेचदा डॉक्टर्सही मग त्याला दमा न म्हणता ‘अ‍ॅलर्जीक आँगकायटीस’ या नावाचा ‘गोंडस पर्याय’ शोधतात. पण जर खरंच दमा असेल तर अचूक निदान शक्य आहे आणि त्यावर ताबा मिळवणे कष्टप्रद असले तरी प्रयत्न साध्य आहे. मात्र पूर्वअट अशी की निदान स्वीकारणे अपरिहार्य आहे. सर्वप्रथम हे समजून घेऊ की दमा म्हणजे नक्की काय?
    दररोज श्वासावाटे लाखो अदृश्य कण आपल्या संपर्कात येत असतात. या कणांमध्ये परागकण, विविध प्राणी वा सूक्ष्म कीटकांच्या अंगाचे कण, वायू प्रदूषणाचे कण असे अनंत प्रकार असतात. काही मंडळींना यांपैकी एक किंवा अनेक गोष्टींची अ‍ॅलर्जी निर्माण होते. या अ‍ॅलर्जीमुळे त्यांच्या श्वासनलिका एकाएकी अरुंद होतात आणि हवा आत तर येते पण बाहेर जायला अडथळा येतो. श्वास सुई सुई वाजतो. खोकला येतो. छाती भरते. उठून बसावंसं वाटतं. कपडे सैल करावेसे वाटतात. बंद खोलीत गुदमरायला होतं. मोकळय़ा जागेत, आवारात जरा बरं वाटतं. या परिस्थितीला ‘दम्याचा अ‍ॅटॅक’ असं म्हणता येईल.
    असे झाले तर यावर तात्पुरता उपाय म्हणजे श्वासनलिका उघडतील असे औषध घेणे. अस्थालीन, लेव्हीलीन सारखी औषधे (इनहेलर्स) हे काम चटकन करतात आणि स्वस्त असल्यामुळे या औषधांचा रुग्णांमध्ये खूपदा अतिवापर केला जातो. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्वासनलिकांना प्रत्येक आकुंचनानंतर एक विशिष्ट अ‍ॅलर्जीक सूज येते आणि कालमानाने ही सूज वाढतच जाते. ज्यांना हंगामी (Seasonal) दमा असतो त्यांना त्या काळात (उदाहरणार्थ काँग्रेस गवताला फुलोरा आल्यानंतर) ही सूज खूपच तीव्र होते आणि मग अ‍ॅटॅक्स वारंवार आणि जास्त जोराचे येतात. साहजिकच आहे की तात्पुरत्या औषधांनी (वर उल्लेख केलेल्या) ते बरेही होत नाहीत.

    थोडक्यात म्हणजे अ‍ॅलर्जीक सूज कमी करणे हा दम्यावर ताबा मिळवण्याचा खराखुरा उपचार आहे. स्टेरॉईडसच्या गोळय़ा किंवा इंजेक्शने हे काम उत्तम करतात. वाय सोलोन, डेक्सोना अशी औषधे वापरल्यास अ‍ॅटॅक चटकन आटोक्यात येतो. जीव वाचवण्यासाठी ही औषधे डॉक्टर्स ‘शॉर्ट कोर्स’ (काही दिवस उपचार) म्हणून रुग्णांना देतात. पण आपण जाणतो की पोटात जाणारी स्टेरॉईडची गोळी ही आयुष्यभर घेणे नक्कीच असुरक्षित किंवा धोकादायक आहे. पण मग असे औषध फक्त श्वासनलिकेत सोडले तर? दम्यावरील उपचारांमध्ये आज सर्वात महत्त्वाचे औषध म्हणजे श्वासावाटे जाणारे स्टेरॉईड. ज्याला इनहेल्ड स्टिरॉईड्स (Inhaled steroid) म्हणतात. मंडळी हे औषध शंभर टक्के सुरक्षित तर आहेच पण नियमित वापराने ते श्वासनलिकांची सूज कमी करते आणि अ‍ॅटॅक्स पूर्णपणे थांबवते. इनहेलर स्टेरॉईड आणि श्वासनलिका उघडून धरणारी अशी दुहेरी औषधे एकाच इनहेलर पंपामध्येही मिळतात आणि या औषधांचा योग्य आणि नियमित वापर ही दम्याच्या रुग्णाला नवसंजीवनीच आहे.

    या वेळी प्रश्न असतो, कुठल्या रुग्णाला किती डोस द्यायचा? हे कसे ठरवायचे यासाठी आज मेडिकल तंत्रज्ञानाचा एक छोटेखानी चमत्कार उपलब्ध आहे. त्याला म्हणतात स्मायरोमेही अर्थात फुप्फुस क्षमता चाचणी. डॉक्टराच्या क्लिनिकवर वीस मिनिटांत आणि काही वेळा जोराने फुंकर मारून आपली फुप्फुस क्षमता आणि दम्याचा पक्का पुरावा मिळतो, तीव्रतेचा पूर्ण अंदाज येतो आणि श्वासावाटे घेतले जाणारे औषध श्वासनलिका उघडते की नाही (reversibility) यांचाही पूर्ण पडताळा मिळतो. जसे उच्च रक्तदाब किंवा मधुमेह मोजून उपचार करतात तसेच आधुनिक तंत्रज्ञान सहजपणे दमा मोजून उपचार करू शकते. त्याचप्रमाणे कालांतराने परिस्थिती सुधारली किंवा बिघडली तर पुन: पुन्हा मोजून डॉक्टरांना डोस अ‍ॅडजस्टही करण्याची सोय उपलब्ध होते.

    या पलीकडे जाऊन श्वासावाटे घेण्याच्या औषधांचे कुठले उपकरण वापरावे याचे काही संकेत आहेत. सौम्य दमा असेल तर रोटाकॅप्स जरूर वापरता येतात. पण मध्यम ते तीव्र आजार, लहान मुले, म्हातारी माणसे यांना स्पेसर वाटे आणि एम.डी.आय. (पंप) असे औषधे देणे सोपे आणि योग्य आहे. खूपच छोटे बाळ असेल तर बेबी मास्क स्पेसर आणि एम.डी.आय. इनहेलरचा वापर करता येतो. आपण जर दमेकरी असाल किंवा आपल्या बाळाला दमा असेल तर पुढील काळजी घ्या.

    १) वातावरणातील बदल- घरामध्ये धूळ साठेल असे कारपेट्स ठेवू नका. घर सफाईच्या वेळी धूळ उडणार नाही अशा पद्धतीने साफसफाई करा.
    २) कुठलाही धूर निर्माण करताना विचार करा. उदबत्ती, कासव छाप यांमुळेही दमा बळावू शकतो.
    ३) कुठलीही फवारणी पेस्ट कंट्रोल, बेगॉन स्प्रे अगदी सुगंधी परफ्युम्स वापरतानाही विचार करा. शक्यतो दमेकरी माणसाने त्यावेळी तिथून दूर असले पाहिजे.
    ४) रंगकाम-फर्निचर काम सुरू असताना दमेकऱ्यास दूर ठेवा.
    ५) अनेकदा आपल्याला बेड माईट्सची अ‍ॅलर्जी असू शकते. याचा संपर्क टाळण्यास गाद्या व उशांना प्लास्टिक कव्हर घाला. आपल्या चादरी व पांघरुणे सुती कपडय़ांचीच वापरा.
    ६) घरामध्ये कुत्रा, मांजर असेल तर त्याची अ‍ॅलर्जी निर्माण होऊ शकते. डॉक्टरांशी बोला व निर्णय घ्या.
    ७) सर्वात महत्त्वाचे दम्याच्या आजाराचे निदान होत असेल तर त्याला सामोरे जा.
    ८) फुप्फुस क्षमता चाचणीने निदान पक्के करा.
    ९) डॉक्टरांनी दिलेलेऔषध नियमित वापरा.
    १०) उपकरण वापरण्याचे तंत्र समजून घ्या. डॉक्टरांना फॉलो अप देताना आपण औषध कसे वापरतो आहोत ते दाखवा.
    ११) कुठल्याही परिस्थितीत नियमित वापराचे औषध बंद करू नका. नेहमी परिस्थिती आणीबाणीची असल्यासारखे वागा.
    १२) अनेकदा दम्याबरोबर अ‍ॅलर्जीक सर्दीसुद्धा सोबत असते. त्यासाठी नाकातील स्टेरॉईड स्प्रे डॉक्टर देऊ शकतात. याचाही वापर नियमित करा.

    दमेकऱ्यांसाठी सूचना-
    *बदलत्या हवामानात, ढगाळ वातावरणात दमा बळावू शकतो. या काळात डॉक्टरांना भेटून डोस वाढवण्याची गरज लागू शकते.
    * धूम्रपान आणि दमा म्हणजे आगीत तेल ओतणे आहे हे नक्कीच टाळा.

    * अन्नपदार्थाची अ‍ॅलर्जी ही खूपच कमी वेळा दम्याशी संबंधित असते. आपल्याला जाणवल्यास हे डॉक्टरांशी बोला. विविध वातावरणात जर पुन:पुन्हा आणि तीव्र रिअ‍ॅक्शन आली तरच अन्नपदार्थाची अ‍ॅलर्जी आहे असे माना.

    * आहारामध्ये विनाकारण बंधने घालू नका. लिंबू नाही, ताक नाही, दही नाही, फळे नाहीत असा नन्नाचा पाढा या गोष्टींची खरीखुरी अ‍ॅलर्जी नसताना आपल्या मुलांवर लादू नका.

    *अन्नपदार्थाची अ‍ॅलर्जी लिस्ट- तशी मोठी आहे, पण ही अ‍ॅलर्जी दुर्मीळ असते. त्यामुळे मुद्दामच लिस्ट देत नाही. त्यातल्या त्यात विविध नट्स आणि समुद्री (sea food) खाद्यपदार्थ लक्षात ठेवायला हरकत नाही.

    * बाल दमा आपोआप नाहीसा होईलच हे सत्य नाही. रुग्णाचा अ‍ॅलर्जीकारक वस्तूंशी संपर्क आणि त्याला मिळणाऱ्या औषधांचा प्रभाव यातून आजार कितपत ताब्यात येतो, यानुसार त्याचे भवितव्य ठरते.

    * हंगामी दमा (seasonal asthma) हा ठरावीक कालावधीत (ऑगस्ट-सप्टेंबर) बळावू शकतो आणि उन्हाळय़ात रुग्ण एकदम नॉर्मल राहू शकतो.
    * सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य उपचार न मिळाल्याने दमा बळावतो, जुनाट होतो आणि हळूहळू श्वासनलिकांत कायमस्वरूपी बदल होऊ लागतात. मग हा आजार सा.ओ.पी.डी. या जास्त दुर्धर आजारात रुग्णांतरित होतो. ज्यामुळे आयुष्यमान कमी होण्याचा धोका वाढतो.
    * व्यायामाचा योग्य उपयोग जरूर करावा काही व्यक्तींना exercise induced asthma म्हणजे व्यायामाने बळावणारा दमा असतो. या माणसांनीसुद्धा व्यायाम सोडणे योग्य नाही. योग्य उपचारांनंतर व्यायाम पूर्ववत करता येतो. फ्लोरेन्स ग्रिफिथ जॅकजॉयनर हिने पाच ऑलिंपिक मेडल्स जिंकली ती दमेकरी होती. यावरून सत्य लक्षात येईल.

    * अ‍ॅस्थिरिन, ब्रुफेन यांसारख्या वेदनाशामक औषधांनी दमा बळावू शकतो. निदान, उपचार, उपकरण, फॉलो अप आणि वातावरण बदल या सगळय़ांवर सातत्याने प्रयत्न केले तर दम्यावर पूर्ण ताबा मिळवणे सहज प्रयत्नसाध्य आहे!

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    डॉ. नीतिन अभ्यंकर

      January 5, 2017


  • मी बँकेमुळे घडलो

    मी 80 च्या दशकामध्ये बँकेची परीक्षा दिली. 78 साली कला शाखेची पदवी उत्तीर्ण झालो आणि लगेचच दोन-तीन वर्षाच्या कालावधीमध्ये बँकेची परीक्षा द्यायचं ठरवलं. तेव्हा सर्वसामान्य व्यक्तीपुढे जे करिअरचे थोडेसे पर्याय उपलब्ध होते, त्यापैकी एकतर डॉक्टर किंवा इंजिनीयर किंवा एखादी सरकारी नोकरी! तशी माझी शिक्षणातील गती ही एव्हरेज असल्यामुळे मी आणि माझ्या काही मित्रांनी बँकेची परीक्षा देताना मुंबई केंद्र न निवडता लांबचं नाशिक केंद्र निवडलं.

      May 15, 2023


  • जगातील निरनिराळ्या कालगणना पध्दती

    जगातील निरनिराळ्या देशात आणि धर्मात, कालगणना करण्याच्या आपापल्या पध्दती आहेत. हजारो वर्षापासून त्या पध्दतींनी प्रत्येक दिवसाची तिथी ठरविली जाते. बव्हंशी, या कालगणनेची सुरूवात, एखाद्या धर्मसंस्थापकाच्या, एखाद्या महापुरूषाच्या, सत्तासम्राटाच्या किंवा युगपुरूषाच्या  जन्मतिथीशी निगडीत असते.  एखादी पवित्र घटना किंवा युध्दातला मोठा विजय स्मरणात रहावा म्हणूनही एखादी कालगणनपध्दती सुरू केली जाते.

      February 5, 2013