(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • शिकाल तर टिकाल!

    आज येऊ घातलेली मंदी, नोकऱ्यावर येणाऱ्या गदा या सगळ्याचा विचार केला तर ही परिस्थिती अजून बिकट होण्याची शक्यता आहे. येत्या काही वर्षात मुलांनी उच्चशिक्षणाची वाट न धरता लवकरात लवकर नोकरी कशी करता येईल असा विचार करायला सुरुवात केली तर याचे परिणाम खोलवर जाणवतील हे नक्की!

  • छंदपती

    योग्य लक्ष न दिल्यास सर्व दुय्यम समजली जाणारी कामे कशी महत्वाची बनतात त्याचा हिशेब या लेखात देण्याचा प्रयत्न केला आहे .

  • गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – १०

    ऍक्वेरिअम म्हणजे एक प्रचंड मोठे तळं होते. तळ्याच्या मध्यभागी एक गोलाकार ऐसपैस, रुंद मनोरा बांधला होता! किनाऱ्यावरून मनोऱ्यापर्यंत जायला चांगला 20 मिनिटाचा बोटीचा प्रवास करावा लागला. मनोऱ्याचा पहिला मजला पाण्याच्या वर आणि नंतरचे 9 मजले पाण्याखाली होते. त्याचा खाली काँक्रिटचे कॉलम. तसे तळं 300 फूट खोल होत, कॉलम बुडाशी असलेल्या एका टेकडी वर बांधला होता.

  • प्रमाण परीक्षा

    मला अजूनही आठवतंय, माझ्या आठवणीनुसार त्याकाळी अकरावी ssc ची परीक्षा होती आणि 12 वी इंटरची परीक्षा. त्यावेळच्या 12 वी च्या इंटर च्या परीक्षेच इतक वजन होत की आताच्या double graduate ला सुद्धा इतक महत्व नाही. पुढचे शिक्षण घेण्यासाठी इंटर ची परीक्षा हीच एकमेव प्रमाण परीक्षा होती . इंटर ची परीक्षा पास झाला म्हणजे तो विद्यार्थी पुढचे शिक्षण घेण्यास पूर्णपणे सक्षम झाला असे समजण्यात येई . काय तो इंटर च्या परीक्षेचा दरारा. 75 % मार्क म्हणजे डिस्टीनशन आणि हेच सर्वात जास्त मार्क्स 75 % मार्क मिळवणारा मुलगा खूप हुशार समजला जायचा.

    आणि आज पहिलं तर प्रत्येक पायरीवर वेगवेगळी प्रमाण परीक्षा !

    आमच्या ssc , बारावी , पदवीधर या परीक्षांना काही महत्वच उरलेल नाही .अगदी कचरा परीक्षा झाल्या आहेत. , मार्क मात्र पहा 98%, 97% इतक असूनही पुढच्या शिक्षणासाठी वेगळी प्रमाण परीक्षा द्यायलच हवी , बरं पुढच्या प्रमाण परीक्षा सुध्दा याच अभ्यास क्रमावर घेतल्या जातात मग हे मार्क फक्त social मीडिया वरती दाखवण्यासाठी असतात का असा प्रश्न पडतो ! , त्या मारकांची किंमत शून्य ठरते !

    ssc आणि बारावीच्या परीक्षांची लायकीच नसेल तर घेतात कशाला ? सरकारी धंदा तेजीत आणि मुलं बसतात मार्क मोजीत असा सगळा महाराष्ट्रातल्या शिक्षणाचा बॅन्ड बाजा वाजलेला आहे. आमच्या राज्यकर्त्यांना सुद्धा याची लाज वाटत नाही .

    याची कारणं पुढील लेखात ,

    प्रतिक्रिया अपेक्षित .

    -- गणेश वेलणकर

  • लढा सीमेचा – लढा अस्मितेचा !! (भाग ८)

    सीमाभागातील मराठी माणूस महाराष्ट्रात जाण्यासाठी लोकशाही मार्गाने लढत होता. कर्नाटकी पोलिसांच्या लठ्या-काठ्या झेलत होता. छातीची ढाल करून अंगावर वार घेत होता. कर्नाटकी अत्याचारांना समर्थपणे तोंड देत होता. मराठा तुटेल, मोडेल पण वाकणार नाही याची पुन्हा, पुन्हा प्रचिती येत होती.

  • गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – ४

    “मला तर वाटलं भूत काका मुलांना छळायला फक्त गणिताचेच प्रॉब्लेम विचारतात! ही काय नवीन गेम टाकताहेत?” चिंट्या वैतागून म्हणाला… मुलांना यंदा प्रश्नच समजत नव्हतं. पुन्हा पुन्हा वाचत होते… अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होते… काय अर्थ असेल याचा? रासायनिक प्रक्रियेचे क्लिष्ट समीकरण आहे असं वाटतंय, पण त्याचे करायचे काय? काय करायचं आहे आपल्याला? …

  • शिवजातस्य संभाजी महाराज : पूर्वार्ध

    छ. शिवाजी महाराजांनी अहोरात्र झटून राज्य साधनेची लगबग करून, सह्याद्रीच्या कुशीत एक स्वाभिमानी स्वराज्य उभे केले. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर त्या स्वराज्याची जबाबदारी छ. संभाजी महाराजांनी तितक्याच ताकदीने उचलली आणि स्वराज्याचे रक्षण करताना अखेर स्वतः च्या प्राणांची आहुती दिली. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर छ. संभाजी महाराजांच्या व्यक्तित्वाचा धावता आढावा घेण्याचा एक प्रयत्न….

  • लढा सीमेचा – लढा अस्मितेचा !! (भाग ६)

    याच काळात एका थोर क्रांतिकारकांनं सत्याग्रह करून सीमावासीयाना प्रेरणा दिली. ते होते क्रांतिसिंह नानासाहेब पाटील! कारवारात नानासाहेब व कारवारचे काशीनाथ नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाच आंदोलन झालं. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देऊन सीमावासीयांत नवचैतन्य निर्माण केलं.

  • बेभान झुंडींचे बळी

    प्राण्यापासून माणसापर्यंतचा प्रवास हा नैसर्गिक होता. परंतु माणूस आज माणसापासून पुन्हा प्राण्यांकडे, नुसता प्राणी नव्हे तर हिंसक पशु होण्याच्या उलट्या संक्रमणाकडे वाटचाल करू लागल्याचे दिसत असून ही बाब निश्चितच संपूर्ण मानवी समाजासाठी चिंताजनक आहे. एका साध्या अफवेतुन, गैरसमजुतीतून अशा नृसंश घटना घडत असतील तर, हे आपल्या सुशिक्षितपणावरील एक प्रश्नचिन्ह आहे. शिवाय, अशा घटनांवर राजकारण करणे, हेदेखील बेजबाबदारपणाचे लक्षण म्हटले पाहिजे.

  • मार्ले आणि मी

    Marley & Me मुव्ही पाहिलाय? २००८ साली रिलीज झालेला हा मुव्ही पाहिला नसाल तर जरूर पहा. ज्यांच्या घरी कुत्रा आहे किंवा ज्यांना तो घरी असावा असे वाटते अशा सर्वांनी तर हा चित्रपट नक्की पहिला पाहिजे.