वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
वय झाले की हलका आहार घ्यावा असे म्हणतात. पण असा आहार म्हणजे नेमके काय खावे, असा प्रश्न अनेकांना पडतो. हलक्या आणि तरीही पोटाची भूक भागवणाऱ्या काही पदार्थाविषयी जाणून घेऊ या. न्याहरी हे दिवसातले पहिले अन्न. न्याहरीला रोज काय वेगळे करावे, त्यातही घरातल्या ज्येष्ठ नागरिकांना सोसेल आणि तेवढय़ापुरते पोटही भरेल, असा आहार कुठला, हे प्रश्न जवळपास प्रत्येक घरात कधी ना कधी पडतातच. फार वेगळे काही न करताही वृद्धांना चालेल अशी हलकी न्याहरी करता येते.
पोळी आणि तिळाची चटणी.
पोळी किंवा ब्रेडवर मध आणि चिमूटभर दालचिनीची पूड घालून खाता येईल. *ज्यांना अंडे चालते अशांसाठी ब्रेड आणि उकडलेले अंडे. *ब्रेडला नेहमीचे लोणी लावण्यापेक्षा थोडेसे ‘पीनट बटर’ (शेंगदाण्याचे लोणी) किंवा ‘अल्मंड बटर’ (बदामाचे लोणी) लावून खाता येईल. यातले पीनट बटर आता सहजतेने मिळू लागले आहे. बदामाचे लोणी घरी करता येते. बदाम भिजवून त्याची साले काढावीत आणि थोडेसे पाणी घालून ते गंधासारखे बारीक वाटावेत. ४-५ दिवस टिकणारे हे बदामाचे लोणी ब्रेडवर लावता येईल. साध्या लोण्यात किंवा बाजारात मिळणाऱ्या ‘टेबल बटर’मधून अधिक कोलेस्टेरॉल शरीरात जाण्याची भीती शेंगदाणा व बदामाच्या लोण्यात कमी असते.
*सकाळच्या न्याहरीला सूपसारखा उत्तम आणि ताजेतवाने करणारा पदार्थ नाही. गाजर, मटार, टोमॅटो, कोबी अशा रोज घरात असलेल्या भाज्या वापरून पटकन आपल्या आवडीच्या चवीची सूप बनवता येतील.
*जेवणाच्या आधी अकरा वाजताच्या सुमारास अनेक वृद्धांना काही तरी तोंडात टाकावेसे वाटते. अशा मधल्या वेळेसाठी फळे किंवा सुकामेवा उत्तम. फळांच्या रसांपेक्षा फळे खाल्ली तर त्यातून तंतुमय पदार्थदेखील मिळतात. दातांनी चावण्यास काही समस्या नसेल तर थोडा सुकामेवा जरूर खावा. *दुपारच्या जेवणात वरण किंवा आमटी, भात, भाजी, पोळी, चटणी, कोशिंबीर हे सगळे पदार्थ असायला हवेत. पण पोटाला जड होऊ नये म्हणून जेवण प्रमाणातच केलेले बरे. जेवणात पुदिन्याची चटणी वगैरे पदार्थ चव तर आणतातच, पण पोटाला पाचकही ठरतात. * दुपारच्या चहाच्या वेळी लाह्य़ा हे उत्तम अन्न. ज्वारीच्या, साळीच्या किंवा मक्याच्या लाह्य़ा, खाकरा, चुरमुरे हे पदार्थ हलके ठरतील. चावण्यास अडचण नसलेल्यांनी खारे दाणे, फुटाणे खाण्यासही हरकत नसावी. जी मंडळी चहा पीत नसतील त्यांनी त्याऐवजी एखादे फळ खावे किंवा ताक प्यावे.
*रात्रीच्या वेळी भाजी आणि भाकरी हे जेवण चांगले. भाजी-भाकरी पोटाला हलकी आहेच, शिवाय त्यातूनही तंतुमय पदार्थ मिळतात. दोन्ही वेळच्या जेवणात ताक घेतले तर पोटाला शांत वाटते. *अनेक वृद्धांना डाळी किंवा उसळी अधिक प्रथिने असल्यामुळे पचत नाहीत. अशांसाठी हे पदार्थ करताना त्यात लसूण, आले, जिरे, मिरे आणि दालचिनी पावडर घातली तर पचनासाठी फायदा होऊ शकतो.
*ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशांनी पोळी किंवा भाकरी करताना त्यात एका पोळी-भाकरीला १ चमचा एरंडेल तेल घालून पाहावे. भाकरीत सहसा तेल घातले जात नाही, परंतु त्यातही एरंडेल तेल घालून चालते.
*अपचनाचा, आमवात यांचा त्रास टाळण्यासाठी सुंठ आणि साखर यांचे एकास चार या प्रमाणात मिश्रण करून ठेवावे. येता-जाता या मिश्रणाची एक-एक चिमूट तोंडात टाकावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- लोकसत्ता
January 18, 2017
March 24, 2017
नाही म्हणण्याची ताकद आम्ही हरवून बसलो आहोत का हा प्रश्न माझ्या मनात हल्ली वारंवार येतो . त्याला करणे अनेक आहेत अर्थात ती ताकद आम्ही आधीच हरवून बसलो आहोत फक्त आता त्याची जाणीव प्रकर्षाने होत आहे.
December 5, 2021
मंगळ म्हणजे जातीवंत लढवय्या ! अन्यायाचा प्राणपणाने प्रतिकार..! न पटणारी गोष्ट कोणत्याही परिस्थितीत करणार नाहीत. एखादा गुंड मंगळाच्या प्रभावाखाली असू शकतो तसाच एखादा निष्णात सर्जनही..! मंगळाचे हे गुणधर्म आपल्या सर्वांच्याच कुंडलीत असतात पण ज्यांना मंगळ आहे असे म्हटले जाते त्या व्यक्तीत या क्वालिटी उठावदारपणे असतात एवढंच !
January 17, 2015
“नकारात्मक विचारांची माणसं मला आवडतात” हे वाक्य वाचून जर तुम्हाला मी विचित्र/विक्षिप्त वाटलो तर थोडं थांबा…… आता असा विचार करा, नकारात्मक विचारांचा सुद्धा कित्ती सकारात्मक पद्धतीने विचार केलाय या अवलीयाने…..
September 10, 2018
अभिमान बाळगा ‘मराठी’ असल्याचा
November 30, 2016
वेदकालीन शिल्पकार समाज शोधण्यासाठी वैदिक वाङमयाव्यतिरिक्त अन्य मार्ग नाही. सिंधू संस्कृतीचा कालखंडही साधारण वैदिक काळाच्या जवळपासचाच गृहित धरल्या जातो. त्यामुळे उत्खननातील पुरावेही शिल्पकारांची माहिती पुरवितात परंतु उत्खननातून उपलब्ध झालेली माहिती वैदिक समाजजिवनाचीच आहे, याबाबत निर्णायक मत अजूनपर्यंत तरी कोणी देऊ शकलेले नाही. काही समान तथ्यांचा केवळ आधार घेतला जातो. प्रस्तुत लेखकाने प्रचलीत धारणांचाच आधार घेऊन वेदकालीन विश्वकर्मा समाजाची स्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
February 4, 2026
आजकाल मी हिरवे निशाण पाहूनच पाण्यासोबत वापरणारे सर्व पदार्थ घेतो. हे छोटे-छोटे उपाय करून आपण किती तरी कोटी पाणी रोज जास्त प्रदूषित होण्यापासून वाचवू शकतो. या शिवाय रोग-राई पासून हि स्वत:ला वाचवू शकतो. याचाच अर्थ एक तीर दोन निशाणे.
March 19, 2018
जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे त्रेपन्न
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग अकरा
घराबाहेर गेल्यावर स्नान, भोजन, जलपान आधी वाहनाला द्यावे. म्हणजे पूर्वीच्या काळी प्रवास रथातून असे, त्यांची व्यवस्था आधी पहावी. केवळ सारथीच नव्हे तर घोडे आदि प्राण्यांचे पोटापाण्याचे आधी पहावे. कारण परतीच्या प्रवासामधे हे वाहन, वा चालक पुनः ताजेतवाने व्हायला हवेत, नाहीतर त्याचा त्रास आपल्यालाच भोगावा लागतो.
अनोळखी ठिकाणी गेल्यावर माहिती नसलेल्या जलाशयात पोहायला अथवा आंघोळीला पण जाऊ नये. मगरीसारखे प्राणी आधी चाहुल लागू न देता हल्ला करतात. बाहुबली करतो, म्हणून बाहुंचे बळ दाखवून, नदीत पोहू नये. उंचसखल वाकड्यातिकड्या पर्वतावर चढू नये, या कड्यावरून त्या कड्यावर माकडासारख्या उड्या मारू नयेत. घसरून पडण्यामुळे, जीवाला धोका संभवू शकतो. पिक्चरमधे दाखवतात, ते सर्व खोटे असते, ब्लु व्हेलसारखे मोबाईल गेम तर प्रत्यक्षात मानसिकताच बदलवून टाकतात, याची जाणीव मुलांना वारंवार करून द्यावी.
पेटलेल्या अग्निसमोरुन जाऊ नये, अग्निकडे पाठ करून कधी बसू नये, अग्निच्या आणि अग्निच्या जवळ बसलेल्या माणसाच्या मधूनही कधी जाऊ नये. अग्निशी विनाकारण खेळ खेळू नये. आज मंकी जंपिंग, रिव्हर राफ्टींग, व्हॅली क्राॅसिंग सारखे साहसी प्रकार केले जातात, तेव्हा सावधगिरी बाळगली पाहिजे.
हे साहस करणे देखील एकवेळ परवडेल, पण प्रत्यक्षात कोणतेही साहस न करता, साहस केल्याचा आभास निर्माण करीत स्वतःचा स्वतः फोटो काढणे हे जास्ती खतरनाक असते. आजच्या मराठी भाषेत याला "सेल्फी" म्हणतात. नाकाला हात बोट न लावता, नाकावरची माशी कशी उडवायची याचे प्रात्यक्षिक किंवा नसलेल्या भुवया ताण ताण ताणून त्याची धनुकली करायची, आणि ओठ जेवढे होतील तेवढे डुकराच्या तोंडासारखे करायचे, आणि हे सगळं करताना, एका हाताने अधांतरी राहात, दुसऱ्या हाताच्या तीन बोटानी मोबाईल सांभाळत, करंगळी मागे उचलून एका बोटाने फोटो काढायचा. महाडेंजरस. ग्रंथकार ग्रंथ लिहित होते, त्यावेळी जर हा सेल्फी प्रकार पाहिला असता तर त्याच्यावर तीन चार श्लोक तरी रचले असते.
हे सर्व आपला जीव सुरक्षित रहावा यासाठी सांगितलेले आहे.
याचा अर्थ असा नव्हे की, साहस करूच नये, गिर्यारोहण करूच नये, नदीमधे पोहूच नये. हे सर्व करताना आधी आपल्या सर्व क्षमतांचा विचार करावा. आपल्या सोबत ( नंतर ओरड मारायला तरी ) कुणीतरी असावे. एवढेच. बाकी व्हा बाहुबली !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
११.०९.२०१७
September 11, 2017
२६ व्या ओव्हर मध्ये कपिल देव यांनी आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर कपिल देव यांनी गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरु केली. पुढचे अर्धशतक त्यांनी फक्त १३ ओव्हर मध्ये पूर्ण केले. त्यानंतरच्या ५० धावा फक्त १० ओवरमध्ये पूर्ण केल्या.
June 18, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti