(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कर्दळीवन परिक्रमा : एक प्रत्येकाने घेण्यासारखा अनुभव

    प्रत्यक्ष परिक्रमा एकूण २४ कि.मि.ची आहे..या २४ कि.मि. प्रवासात केवळ आपले पाय हेच वाहन असते..इथे चालण्याला अत्यंत खडतर असा हा प्रवास आपल्या शारिरीक व मानसीक कणखरतेची परिक्षा घेणारा आहे..

      December 3, 2015


  • आहारातील एकरुपतेचा अनुभव

    सुमारे वर्षभरापुर्वीची गोष्ट आहे. मी आणि माझी पत्नी बाबांच्या मित्राकडे शिबीराला जात होतो. माझी तब्येत बिघडली होती. जुलाब होत होते. सकाळपासून पाच सहा झाले होते. तरीही शिबिराला गेलो होतो. सर्व औषधे हाताशी होती पण गुण येत नव्हता. रात्रीचे जेवण आले तेव्हा मनात विचार आला हे खाल्ले तर त्रास होईल पण सर्वांबरोबर आहोत तर न खाणे योग्य नाही म्हणून जेवलो.

    रात्री खूप त्रास झाला. उलट्या झाल्या जुलाब तर किती झाले हे आठवतही नाही. चार वाजे पर्यंत झोप नाही. विकनेस खूप आला होता. डीहायड्रेशनची भिती वाटायला लागली होती. सकाळी साडेसातला काकांना म्हटले मी घरी जातो मला डीहायड्रेशन होण्याची शक्यता वाटतेय. त्यांनी थांबायला सांगितले. आमचेकडील सर्व औषधे हाताशी होतीच तरी अँलोपाथीच्या गोळ्या मागवल्या. पण कोणतेही औषध घेतले नाही. साडेआठला नाष्टा आला. उपीट होते. अगदी थोडे घेतले. आणि प्रत्येक घास खाताना नव्हे तर प्रत्येक घास चावताना एकच विचार करत होतो की या खाण्याचा प्रत्येक कण अन् कण मला एनर्जी देणार आहे. माझा सगळा आजार पुर्ण बरा होणार आहे.

    आणि चमत्कार अनुभवला.

    कोणतेही औषध न घेता साडेनऊ नंतर जुलाब थांबले होते. साडेदहाला मी इतका फ्रेश होतो की कुणी म्हटले असते तर पुण्याहून कोल्हापूरला बाईकवर जाऊन परत येण्याची तयारी होती. (प्रत्यक्षात जायचा योग आला नाही)

    हे कां घडले?

    माझ्या मते कारण एकच पाँझीटीव्ह विचार. जे उपीट खाताना मी करत होतो. कारण उपीट हे काही जुलाब थांबायचे औषध नाही, नक्कीच!

    हा अनुभव आल्यावर रोजच्या जेवताना, काही खाताना आपण काय विचार करतो? हे निरीक्षण केले. बहूतेक वेळा टीव्ही समोर बसून जेवतो. खाण्यावर लक्ष नसते तर सिरियलस् मध्ये चालू असलेले निगेटीव्ह विचार खाण्यातून कॅरी करत असतो. काय परीणाम होणार?

    बस्स ठरवले जेवताना टीव्ही, मोबाईल बंद! पुर्ण लक्ष जेवणाकडे!!

    भूषण जोशी

    आरोग्यदुत या WhatsApp ग्रुपच्या सौजन्याने..

      March 12, 2017


  • उभ्या उभ्या’ खाणे

    टेबल- खुर्चीच्या वापरापेक्षा जमिनीवर आसन टाकून त्यावर मांडी घालून बसणे ही जेवणाची आदर्श स्थिती आहे. येता जाता उभ्याउभ्याने जेवण्यासाठी आपण काही घोड्यासारखे प्राणी नाही हे कायम लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

      December 31, 2017


  • कल्याणवृष्टिस्तव – १२

    संपत्कराणि सकलॆन्द्रियनन्दनानि
    साम्राज्यदाननिरतानि सरॊरुहाक्षि ।
    त्वद्वन्दनानि दुरिताहरणॊद्यतानि
    मामॆव मातरनिशं कलयन्तु नान्यम् ॥ १२ ॥

    मान्ये- हे सगळ्यांना मान्य अर्थात वंदनीय असणाऱ्या आई जगदंबे! सर्वसामान्य मानवच नव्हे तर ईश्वर महेश्वर देखील जिच्या योग्यतेचा सन्मान करतात अशी.

    सरोरूहाक्षि- हे कमलनयने. सर म्हणजे तलाव. त्यात उरुह म्हणजे जन्माला येऊन वर येणारे. अर्थात कमळ. तसे जिचे अक्ष म्हणजे डोळे आहेत अशी.

    येथे केवळ आकाराच नव्हे तर गुणांचाही विचार आहे. ते कमळ जसे भुंग्यांना आकर्षित करते तशी जिची कृपादृष्टी साधकांना आकर्षित करते, अशी.

    त्वद्वंदनानि- तुला केलेली वंदने अर्थात नमस्कार, प्रार्थना.
    कशासाठी करायची ही प्रार्थना? तरीही प्रार्थना अलौकिक फलदायी आहे.
    ही प्रार्थना काय काय देते? याचे वर्णन करताना पूज्यपाद आचार्य श्री म्हणतात,

    सम्पत्कराणि- सकल संपत्तीला उपलब्ध करून देणारी. जिच्या कृपेने बाह्य जगतातील धनसंपत्ती आणि अंतर्मनातील शम,दम इत्यादी षट् संपत्ती, साधकांना प्राप्त होते अशी.

    सकलेन्द्रिय नन्दनानि- सकल इंद्रियांना आनंद देणारी. बाह्य जगतातील पंचकर्मेद्रिये, पंचज्ञानेंद्रिय आणि अंतर्गत इंद्रिय मन अशा अकराही इंद्रियांना आनंद देणारी.

    शब्द, स्पर्श इ. पाचही पद्धतीने प्राप्त होणारे सर्व आनंद प्रदान करणारी. त्या आनंदाला साधनीभूत होणारी साधने प्रदान करणारी.

    साम्राज्यदान विभवानि- आपल्या भक्तांना साम्राज्य दान देण्याचे वैभव असणारी.

    दुरिताहरणोद्यतानि- दुरित अर्थात पाप, वाईट ,अमंगल. त्याचे हरण करण्यास म्हणजे नष्ट करण्यास उद्यत म्हणजे कायम सिद्ध असणारी.

    अशी ही आईची वंदना,

    मामेव- माझ्यावरच, मलाच.

    मातरनिशं - हे माते अनिश अर्थात सतत.

    कलयन्तु- प्राप्त होत राहो.

    अर्थात अशा सर्व अद्वितीय गुणांनी युक्त असणारी ही वंदना सतत करण्याची शक्ती मला प्राप्त होवो.

    नान्यम् - मला अन्य काहीही नको.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      April 23, 2020


  • कोलेस्टेरॉल

    चरबी वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे आणि त्यातून उद्भवू शकणारा हृदयविकार- हा संबंध सर्वानाच माहिती असतो. परंतु कोलेस्टेरॉल वाढणे केवळ आहाराशीच संबंधित नाही. कोलेस्टेरॉल शरीरात नेमके काय करते, चांगले आणि वाईट कोलेस्टेरॉलचे कोडे काय आहे आणि वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मानसिक स्वास्थ्य, संतुलित आहार व व्यायाम ही त्रीसूत्रीच कशी उपयोगी ठरते. आपल्या शरीरामधील जैवरासायनिक प्रक्रियांमधूनच कोलेस्टेरॉलची निर्मिती होते. रक्तामधील साखरेपासून बहुतांशी कोलेस्टेरॉल बनते. कोलेस्टेरॉलपासून अत्यंत महत्त्वाच्या संप्रेरकांची निर्मिती होत असते. म्हणूनच या गटामधील ‘हॉर्मोन्स’ना ‘स्टेरॉइड्स’ म्हणून संबोधले जाते. या स्टेरॉइड हॉर्मोन्समध्ेय टेस्टॉस्टेरोन, प्रोगेस्टेटोन, अल्डोस्टेरॉन, इस्ट्राडीऑल आणि कॉर्टिसॉल या हॉर्मोन्सचा समावेश होतो. शरीराच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या हॉर्मोन्सची निर्मिती कोलेस्टेरॉलपासून होत असल्यामुळे हा पदार्थ म्हणजे काही घातक, विषारी अथवा टाकाऊ नाही.

    कोलेस्टेरॉलचे ढोबळ मानाने दोन प्रकार आहेत. हलके कोलेस्टेरॉल म्हणजे ‘एल.डी.एल.’ या कोलेस्टेरॉलचे रक्तातील प्रमाण वाढल्यास रक्त वाहिन्यांवर पुटे चढल्यामुळे त्या अरुंद होऊन उच्च रक्त दाब आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच याला ‘बॅड कोलेस्टेरॉल’ म्हणतात. जड कोलेस्टेरॉल म्हणजे एच.डी.एल. हे हलक्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून रक्त वाहिन्यांवर थर बसवण्याच्या प्रक्रियेमध्ये खीळ घालते. म्हणून त्याला ‘गुड कोलेस्टेरॉल’ म्हटले जाते. वाईट कोलेस्टेरॉलचे वाढलेले प्रमाण कमी केले तर हृदयविकारापासून प्रतिबंध होतो. म्हणूनच ‘स्टॅटिन’ प्रकारात मोडणारी औषधे खूप लोकप्रिय आहेत. आहारातील स्निघ्ध पदार्थाचे प्रमाण २५ टक्क्य़ांपेक्षा जास्त नसेल तर शरीरातील कोलेस्टेरॉलच्या प्रमाणावर विपरीत परिणाम होत नाही. सोयाबीन तेल वापरावे की शेंगदाणा तेल, खोबरेल तेल वापरावे की ऑलिव्ह तेल या संभ्रमाचा खरे तर रक्तामधील कोलेस्टेरॉलच्या प्रमाणाशी फारसा संबंध नाही. चरबीयुक्त मांसाहार टाळणे व तळलेल्या पदार्थाचे प्रमाण कमी करणे हे निश्चितपणे आरोग्यदायी असले तरीही आहार व कोलेस्टेरॉल यांचा संबंध मर्यादित आहे.

    रक्तामधील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढण्यात आहारापेक्षा आपल्या शरीरामधील जैवरासायनिक प्रक्रियांचा वाटा मोठा आहे. डॉ. हेगडे यांच्या मते अगदी गवत खाऊन राहिले तरी दहा टक्क्य़ांपेक्षा कोलेस्टेरॉल कमी होणार नाही. कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी संतुलित आहार, व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैली या सगळ्याची आवश्यकता आहे. आहारामध्ये मोठे बदल करून किंवा औषधांनी कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून जर हृदयविकाराच्या धोक्यावर फार मोठे दूरगामी फायदे दिसत नसतील तर काय करावे, या प्रश्नाचे उत्तर आपल्या मनामध्ये मिळते. मानसिक शांतता आणि कोलेस्टेरॉल यांचा जवळचा संबंध आहे. कॉर्टीसॉल हे हॉर्मोन कोलेस्टेरॉलपासून बनते. कॉर्टीसॉल आणि मानसिक ताण यांचा जवळचा संबंध असतो. तणावाखाली असलेल्या मेंदूकडून पिटय़ुटरी ग्रंथींना संदेश जातो आणि नंतर अॅडरेनल ग्रंथींना कॉर्टीसॉल तयार करण्याचा संदेश मिळतो. मात्र अधिक कॉर्टीसॉलमुळे मानसिक ताण वाढतो की वाढलेल्या तणावामुळे कॉर्टीसॉलची निर्मिती होते, हे कोडे ‘आधी कोंबडी की आधी अंडे’ याप्रमाणेच आहे! परंतु उत्तम मानसिक स्वास्थ्य, संतुलित आहार व व्यायाम या त्रीसूत्रीमध्येच कोलेस्टेरॉल संतुलनाची गुरुकिल्ली आहे, हे मात्र निश्चित!

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      December 28, 2016


  • १० मे १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाची स्मृती जागवा

    १० मे १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाची स्मृती जागवा

    १० मे २०१६ ला भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य-युद्धाला १५९ वर्षें पूर्ण होतील. तें युद्ध १० मे १८५७ ला सुरूं झालें होतें. जरी इंग्रजांनी त्याची ‘गदर’ म्हणून संभावना केली असली तरी, तें स्वातंत्र्ययुद्धच होतें, हें स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९०७ मधील त्यांच्या ग्रंथाद्वारें दाखवून दिलेलें आहे.

    हें स्वातंत्र्ययुद्ध असफल झालें असें म्हटलें जातें. बहादुरशहा जफर याला दूर ब्रह्मदेशात कैदेत ठेवलें गेलें, झाशीची राणी लक्ष्मीबाई हिला वीरमृत्यू आला, तात्या टोपे यांना फाशी देण्यात आले, नानासाहेब पेशवे परागंदा झाले, कित्येक लहानमोठ्या वीरांचा मृत्यू झाला, किंवा त्यांना झाडांवर लटकवून फाशी दिलें गेलें. काळ्या पाण्याची शिक्षा १८५७ नंतरच सुरूं झाली. आणि, १८५७ नंतर, ब्रिटिश सत्तेचे पाय भारतात आणखी घट्ट रोवले गेले. या सर्वांचा अर्थ , ‘हें युद्ध असफलच झालें’, असा काढला गेला तर नवल नव्हे.

    पण, हें युद्ध असफल झालें नाहीं !! ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार या युद्धानंतर संपुष्टात आला ; ही महत्वाची घटना नाहीं काय ? त्यानंतर या कंपनीचा सर्व व्यापार संपलाच ! , आणि ती एक केवळ एक पोकळ shell बनून अस्तित्वात राहिली.

    या युद्धानंतर जरी UK च्या सरकारनें भारताचा कारभार हातात घेतला , तरी, आपण हें ध्यानात घ्यायला हवें की, it was the beginning of the end of the British Rule in India. कारण, १८५७ च्या युद्धापासून स्फूर्ती घेऊन, त्यानंतर ब्रिटिशांशी विविध पातळ्यांवर संघर्ष सुरूं झाला, आणि परिणामस्वरूप, १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळालें. हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या भारतासारख्या पुरातन देशाच्या दृष्टीनें , (१८५७ ते १९४७ ही) ९० वर्षें म्हणजे कांहींच नाहीं !

    रामदास स्वामींनी म्हटलें आहे – ‘वन्हि तो चेतवावा रे’. तो वन्हि १८५७ नें नक्कीच चेतवला, आणि त्याचे दूरगामी परिणामही झाले !

    मात्र, २१ व्या शतकात जन्म झालेल्या युवा पिढीला १८५७ चें महत्व काय आहे, तें कितपत ठाऊक आहे ? ; कांहीं कल्पना नाहीं. तें महत्व तिला कळायला मात्र नक्कीच हवें.

    दर वर्षी, भारत सरकार, राज्य सरकारें व consencious राजकीय पक्षांनी, तसेंच जनजागृती करणार्‍या सोशल-ऑरगायझेशन्सनी, १० मे हा दिवस, ‘१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा स्मृतिदिवस ’ म्हणून साजरा करायला हवा, असें मला सुचवावेसें वाटतें. (मात्र या दिवशीं, सुट्टी नको. आधीच भारतात खूप सुट्ट्या आहेत ! ). १० मे या दिवशी, या दिवसाची महती वर्णणारे, त्याची long-term implications सांगणारे कार्यक्रम व्हावेत, अशी अपेक्षा करणें चूक आहे काय ?

    पाहूं या, कोणी जागें होतें कां, तें.

    -- सुभाष स. नाईक . सांताक्रूझ मुंबई.

    M- 9869002126. eMail : vistainfin@yahoo.co.in

      May 10, 2017


  • नैवेद्याची परंपरा

    श्रावण सुरु होतोय,पाठोपाठ गणपती,नवरात्र,दिवाळी अशी सणांची रांगच लागते. या सगळ्यात महत्वाचा असतो तो ‘नैवेद्य’.. फक्त देवाला दाखवायला लागतो म्हणून असतो का हा ‘नैवेद्य?’.. नाही,खरतरं या ‘नैवेद्य’ करण्यामागे अनेक गोष्टींची योजना आपल्या परंपरेत आहे.

      August 1, 2017


  • फेब्रुवारी २७ , मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने !

    कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या दिवशी प्रतिवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

      February 26, 2014


  • “जीमॅक”च्या जागतिक स्पर्धेत औरंगाबादचा प्रीतेश सिकची तृतीय

    पदवीधर व्यवस्थापन प्रवेश परिषदेतर्फे (जीएमएसी) ‘आयडियाज टू इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये औरंगाबादमधिल प्रीतेश सिकची तृतीय आला आहे.

      January 22, 2011


  • श्री गणपतिस्तोत्रम् – भाग ४

    विरञ्चिविष्णुवन्दितं विरूपलोचनस्तुतं!
    गिरीशदर्शनेच्छया प्रकटितं पराम्बया !!
    निरंतरं सुरासुरै: सपुत्रवामलोचनै:!
    महामखेष्टकर्मसु स्मृतं भजामि तुन्दिलम् !!४!!

    गाणपत्य संप्रदायाने आग्रहाने प्रतिपादित केलेल्या, भगवान गणेशांच्या सर्वपूज्य, सर्वादिपूज्य, परब्रह्म स्वरूपाला जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज नेमक्या शब्दात व्यक्त करीत आहेत.
    आपल्या डोक्यातील श्री गणेशांच्या शिवपुत्र, पार्वतीनंदन या भूमिकेला फाटा देणारा हा श्लोक. मग काय आहे श्रीगणेशांचे नेमके स्वरूप?
    विरञ्चिविष्णुवन्दित- विरंची अर्थात भगवान ब्रह्मदेव. विष्णु,भगवान श्रीहरी. यांनी वंदन केलेले ते विरञ्चिविष्णुवन्दित.
    विरूपलोचनस्तुत- भगवान शंकरांना त्रिनेत्रधारी म्हणतात. हा तिसरा डोळा हे त्यांचे विशेष रूप आहे. त्यामुळे त्यांना विरूपलोचन असे म्हणतात. ते भगवान शंकर ज्यांची स्तुती करतात ते श्री गणेश
    विरूपलोचनस्तुत होत.
    गिरीशदर्शनेच्छया प्रकटितं पराम्बया - भगवान श्रीगणेशांकडे पाहण्याची दृष्टीच आमूलाग्र बदलून टाकणारी ही ओळ. भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, गिरीश अर्थात भगवान शंकर. त्यांना दर्शनाची इच्छा झाल्यामुळे देवी पार्वतीने ज्यांना प्रगट केले आहे असे आहेत श्री गणेश.ते शिवपुत्र नाहीत. केवळ पार्वतीनंदन नाहीत. त्या दोघांनाही वंदनीय आहेत‌. त्यांना दर्शनाची इच्छा होते त्यावेळी प्रार्थना करून ते ज्यांना प्रगट करतात ते मोरया आहेत, "गिरीशदर्शनेच्छया प्रकटितं पराम्बया ". निरंतर अर्थात सातत्यपूर्णरीत्या, नेहमी.
    सुरासुर अर्थात देव आणि दैत्य देखील.
    सपुत्रवामलोचनै:- सपुत्र अर्थात मुलाबाळांसह, वामलोचना अर्थात स्त्री.पत्नी.
    महामखेष्टकर्मसु- मख म्हणजे यज्ञ. महामख अर्थात सर्व महत्वाची कार्ये.सर्व कार्ये यज्ञस्वरूप असावीत हा भाव. इष्टकर्म अर्थात अपेक्षित गोष्टींच्या प्राप्तीसाठी केलेले कर्म.
    सगळ्यांचा एकत्रित अर्थ करता, देव आणि दैत्य देखील आपल्या अपेक्षित कामाला पूर्ण करण्यासाठी यज्ञ करताना, आरंभी विघ्न विनाशासाठी ज्यांचे स्मरण करतात असे.
    तुंदिल- धष्टपुष्ट, गुबगुबीत. अशी देहयष्टी असणाऱ्या त्या भगवान गणेशांचे मी स्मरण करतो.

      January 10, 2020