वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
खूपच रागा रागाने घराबाहेर पडलो... घरी परत जायचेच नाही, या इराद्यानेच!
आज मला एवढा राग आला होता की रागाच्या भरात पप्पांचे बूट घातले...
घर सोडले ते मोठा माणुस बनून येईन... आणि तेंव्हाच वडिलांना तोंड दाखवेन... जर मला एक मोटर सायकल घेऊन नाही देऊ शकत, तर कशाला मला इंजीनियर बनवण्याचे स्वप्न बघतात???
आणि आज मी रागातच पप्पांचे पाकिट पण चोरून आणले होते, ज्याला पप्पांनी कधीही कोणालाही हात लावू दिला नाही.
मला माहित होते यात नक्कीच पैसे कोणाला देतात याची हिशोब डायरी असणार, मला पण कळू दे किती माल लपून ठेवलाय ते ! त्यामुळेच आईला सांगून कोणालाही हात लावू दिला जात नव्हता?
खुप मोठे विचार चक्र डोक्यात चालू होते, चालताना मला बूटातुन काहीतरी टोचत असल्याचे जाणवले... बूट काढून पाहिले तर टाचेतुन थोड़े रक्त आले होते, बूटातुन एक खिळा टोचत होता, त्रास तर झाला! पण राग; राग त्रासापेक्षा जास्त होता...
रागातच पुढे चाललो...
पुढे गेल्यावर दुसऱ्या बूटातुन ओले ओले जाणवले... रस्त्यावर पाणी सांडलेले होते. उडी मारताना पाणी बूटात आले, बूट पायातुन काढून पाहिले तर बूट खालून फाटलेला होता....
तरीही रागातच लंगडत लंगड़त बस स्टँडवर आलो.
पण दुर्दैव... तासभर एकही एस.टी.नव्हती...
मग वेळ होता म्हणून पप्पांचे पाकिट तरी चेक करून पाहू... पाकिट उघडले त्यात एक चिठ्ठी मिळाली.
त्याच्यावर लिहिले होते लॅपटॉप साठी ४० हजार रूपये अमुक व्यक्ती कडून उधार घेतले...
अरे; तो लॅपटॉप तर माझ्यासाठीच पप्पांनी घेतला आहे आणि तो माझ्याकडेच आहे.
दुसरी एक मुडपलेली चिठ्ठी मिळाली--
ऑफिस मध्ये काम करताना तुमची आवड काय? आहे ते लिहा असे सांगितले होते...
त्यावर पप्पानी चांगले बूट वापरायला आवडते...
असे लिहले होते.
अरे चांगले बूट??
परंतु त्यांचे बूट तर फाटलेत...
आई मागच्या चार महिन्यांपासून पप्पांना सांगते नविन बूट घ्या...
पण पप्पा प्रत्येक वेळी सांगतात अजुन सहा महिने तरी चालतील हे बूट...
मग घेऊ, आत्ताच काही गरज नाही...
मी...
मी आत्ता समजलो किती चालतील ते अजून.
एक तीसरी चिठ्ठी मिळाली.
जुनी गाड़ी दया आणि नवीन गाड़ी घेउन जा...
आणि ते वाचताच मेंदूला अक्षरश: डोक्यात मुंग्याच आल्या...
पप्पांची गाड़ी...
आणि मग मी घराच्या दिशेने धावतच सुटलो...
आत्ता पायात खिळा पण टोचत नव्हता...
मी घरी धापा टाकतच पोहचलो तर पप्पा घरी नव्हते आणि त्यांची गाड़ी ही नव्हती...
मी समजलो पप्पा कुठे आहेत!
पप्पा तिथेच होते...
मी धावत जावून जोरात मिठीच मारली आणि पप्पांचा खांदा ओला झाला...
नको पप्पा नको..
मला नाही पाहिजे मोटर सायकल...
बास पप्पा अगोदर तुम्हाला नविन बूट घ्या...
आणि हो पप्पा,
आता मला मोठा माणुस व्हायचच आहे...
तो पण तुमच्यासारखाच....
पप्पा फक्त तुमच्या सारखाच...
पुर्ण शोरुममध्ये शांतता पसरली...
सगळं शांत वातावरण...
मित्रांनो; आई-वडिलांना ओळखा.
आयुष्यात कुठेही कमी पडणार नाही... खऱ्या अर्थाने जगा... हेच तर खरं जिवन आहे... आपण सर्व सजिव आहोत याचे भान असू द्या...
माणूस बनून जगा आणि मानवता हा एकच धर्म पाळा...
Forwarded Post
-- Aniket
यावर्षी दिवाळीतील लक्ष्मीपूजन दिनांक ३० आॅक्टोबर २०१६ (रविवार) सायंकाळी ६ वाजून ४ मिनीटांपासून रात्रौ ८ वाजून ३६ मिनीटे या कालावधीत मूहुर्तानुसार आहे (एकूण कालावधी २ तास ३२ मिनिटे) हा आहे. यातही शुभ व अमृत चौघडी असल्याने संपूर्ण काळ शुभ आहे.
या पूजनाचे धार्मिक, आध्यात्मिक व व्यावहारिक मुल्य शब्दातीत आहे. इथे लक्ष्मी ही केवळ पैसा, धनप्राप्ती किंवा श्रीमंती याच अर्थाने अपेक्षित नसुन ती "श्री" या संकल्पनेवर आधारित आहे. श्री म्हणजे धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ति, सत्ता, आरोग्य, समृद्धि, यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य या सर्वगुणसंपन्न अर्थाने येणे किंवा तिचे आगमन होणे अपेक्षित आहे.
या काळात शुचिर्भूतपणे श्रीमहालक्ष्मीच्या तसबिरीची किंवा मुर्तीची उत्तम चौरंगावर सुशोभित मांडणी करुन पूजन करावे. सोबत धन, सुवर्ण, बॅन्केची पासबुके, सर्टिफिकेट, नाणी यांचीही पूजा करावी. पूजा पंचोपचार केली तरी चालेल (म्हणजे स्नान, धुप, दीप, गंध आणि नैवेद्य)....मनातील भाव हा कृतज्ञतेचा, श्रध्देचा असावा. बरेचदा श्रीलक्ष्मीपुजन करताना अनवधानाने श्रीविष्णूंचे स्मरण-प्रार्थना करणे राहुन जाते (श्रीमहालक्ष्मी तत्वाचं वैशिष्ठ्य म्हणजे जिथे विष्णूंचे स्मरण-प्रार्थना होते त्या ठिकाणी तिचा निवास रहातो. कारण ती विष्णुंशिवाय रहात नाही. त्यामुळे तिची पुजा अर्चना करण्याआधी विष्णूदेवांचे स्मरण करणे क्रमप्राप्त आहे हे विसरु नका...नुसते मानसिक स्मरण केले किंवा
॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥ हा मंत्रजप ११ वेळा करा तरी चालेल)
घरांतील वातावरण सुगंधित व प्रसन्न असावे....पुजनाचे उपचार हे तुम्ही तुमच्या इच्छेने व मनापासुन करावेत. पण लक्ष्मीपुजनासाठी काही प्रभावी मंत्र पुढीलप्रमाणे आहेत. त्यांचा जप प्रत्येक मंत्राचा किमान १०८ वेळा तरी पुजनप्रसंगी करावा. काही मंत्र तंत्रोक्त आहेत तर काही पुराणॊक्त किंवा स्तोत्रातील आहेत. मंत्रजप हा शक्यतो पुजन झाल्यानंतर करावा. खाली दिलेल्या सर्वच मंत्रांचा जप करणं जमेल असं नाही पण निदान त्यातील दोन मंत्रांचा जप तरी प्रत्येकी १०८ वेळा करावा....जप झाल्यानंतर प्रार्थना करावी. आधीच्या पॅरेग्राफमधे जे गुण लिहिले आहेत त्यांची (धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ति, सत्ता, आरोग्य, समृद्धि, यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य) प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना करावी. नैवेद्य दाखवुन प्रसाद घरातील मंडळींना वाटावा....ज्यांना जमत असेल, येत असेल त्यांनी मंत्रजपानंतर श्रीसुक्त किंवा महालक्ष्मी अष्टक यांचेही पाठ करावेत ही विनंती.@ सचिन मधुकर परांजपे
(महत्वाचे:- जर तुम्ही श्रीलक्ष्मीपुजन करणार असाल तर त्यादिवशी मांसाहार, मद्यपान किंवा कोणतेही अनैतिक, अश्लाघ्य आणि अशुभ कृत्य करु नये. त्या दिवशी वादविवाद करु नये. दिवसभरात जमेल तेव्हा अन्नदान करावे. सुवासिनीची ओटी भरावी. कुलदेवतेचे स्मरणचिंतन करावे. लक्ष्मीपुजनाचे वेळी घरच्या ओटीवर/अंगणात दिवे प्रज्जवलित असावेत)
श्रीलक्ष्मीदेवीचे काही प्रभावी मंत्र:- (यापैकी सर्व मंत्रांचा/किमान दोन मंत्रांचा तरी जप प्रत्येकी १०८ वेळा करावा. उच्चार करणे अजिबात शक्य नसेल तर निदान प्रार्थना तरी करावी. काही मंत्र उच्चाराला सोपे असे देत आहे तर काही जरा कठीण आहेत)@सचिन मधुकर परांजपे
१) ॐ श्रीं नम: (यात श्री या शब्दावर अनुस्वार आहे त्यामुळे श्रीम असा उच्चार करावा)
२) ॐ श्री महालक्ष्मी देव्यै नम:
३) ॐ महालक्ष्मैच विद्महे, विष्णुपत्नैच धीमही, तन्नो लक्ष्मी प्रचोदयात
४) ॐ ह्रीम पद्मे स्वाहा
५) ॐ श्रीम ह्रीम श्रींम कमले कमलालये, प्रसीद प्रसीद, श्रीम ह्रीम श्रीम ॐ महालक्ष्मै नम:
६) ॐ या देवी सर्वभुतेषु लक्ष्मीरुपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम:
७) ॐ आदी लक्ष्मी नमस्तेsस्तु, परब्रह्म स्वरुपिणी, यशो देही, धनं देही, सर्व कामांश्च देही मे
....तर मित्रांनो अत्यंत श्रध्देने आणि वर दिलेल्या शुभपर्वकालात अवश्य श्री महालक्ष्मीपुजन करा. मंत्रजप करा, प्रार्थना करा आणि एक श्रीमंत-समृध्द-ऐश्वर्यसंपन्न व आरोग्यसंपन्न मन:शांतीयुक्त जीवनाचा आनंद तुम्हाला प्राप्त होवो हीच सदिच्छा. पोस्ट पब्लिक पोस्ट आहे त्यामुळे कॉपी-पेस्ट न करता सबंध पोस्ट शेअर करा. आपल्या सर्व बंधुभगिनींना, आप्तेष्टांना मार्गदर्शन होवुन सर्वत्र समृध्दीचे, समधानाचे वातावरण पसरावे हीच श्रीलक्ष्मीनारायणांच्या चरणी प्रार्थना....
-सचिन मधुकर परांजपे (पालघर)
बुलडाणा जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांची निवडणूक २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पार पडली. या नगरपालिकांपैकी भाजपचे ५, काँग्रेसचे २, भारिप-बमसंचे १ आणि एका ठिकाणी विकास आघाडीचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. पालिका निवडणुकीत जिल्ह्यातील दिग्गज आणि प्रस्थापितांना मतदारांनी झटके दिले आहेत.
बुलडाणा पालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. येथे आता भारिप-बमसंच्या नजमुन्नीसा बेगम अध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत.पालिकेतील एकूण सदस्य संख्या २८ असून यात भाजप- ५, शिवसेना- १०, कॉंग्रेस- ७ व एक पुरस्कृत, राष्ट्रवादी- ३, भारिप-बमसंचे २ सदस्य निवडून आले आहेत. बुलडाण्यात आमदार हर्षवर्धन सपकाळ हे असताना काँग्रेसला केवळ ७ जागा मिळाल्या. तर नगराध्यक्षपद भारिप-बमसंकडे गेले आहे.
जिल्ह्यातील अति प्रतिष्ठेच्या खामगाव येथील नगराध्यक्षपदी भाजपच्या अनिता वैभव डवरे विजयी झाल्या आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भारिप- काँग्रेस आघाडीच्या शांताबाई सोनाेने यांचा पराभव केला. काँग्रेसच्या ताब्यातील ही पालिका भाजपने बळकावली आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. त्यांनी भारिप-बमसंसोबत आघाडी करून निवडणूक लढवली. मात्र नगराध्यक्षपद भाजपला मिळाले. त्यामुळे येथे भाजपचे नेते कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांची प्रतिष्ठा राखल्या गेली.
राजकीयदृष्टया सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या मेहकर पालिकेत नगराध्यक्षपदी काँग्रेसचे कासम पिरु गवळी निवडून आले आहेत. जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते तथा बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, तसेच आमदार संजय रायमुलकर हे दोघेही मेहकरात असताना शिवसेनेचे भास्करराव गारोळे हे पराभूत झाले आहेत. पालिकेत २४ पैकी १४ जागा शिवसेनेने जिंकल्या असल्या तरी महत्त्वाचे नगराध्यक्षपद काँग्रेसकडे गेल्याने दोन्ही दिग्गजांचे प्रयत्न फोल ठरले.
त्याचप्रमाणे भाजपचे नेते आणि आमदार चैनसुख संचेती यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मलकापूर आणि नांदुरा या दोन्ही पालिकांमध्ये भाजप उमेदवारांचा पराभव झाला आहे. मलकापुरात काँग्रेसचे अॅड. हरीष रावळ हे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. विशेष म्हणजे, आमदार संचेती यांनीही आघाडी स्थापन करून पालिकेतील काँग्रेसची सत्ता उलटून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र नगर विकास आघाडीचे केवळ ८ उमेदवार निवडून आले. त्याचप्रमाणे नांदुरा नगराध्यक्षपदी आकोट विकास आघाडीच्या रजनी अनिल जवरे विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या द्राैपदाबाई तांदळे यांचा पराभव केला. येथे २३ पैकी भाजपचे केवळ ५ उमेदवार विजयी झाले.
तसेच जिल्ह्यात चिखलीची निवडणूक चांगलीच गाजली. येथे काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांना यश मिळवता आले नाही. भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रिया कुणाल बोंद्रे ह्या निवडून आल्या आहेत. तर एकूण २६ सदस्य संख्या असलेल्या चिखली नगर पालिकेत कॉंग्रेसला केवळ ९ जागा मिळाल्या. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, सिंदखेडराजा मतदारसंघात सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे वर्चस्व असून देऊळगावराजा नगर पालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. तर येथील आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे शिवसेनेचे आहेत. देऊळगावाजा नगर पालिकेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वर्चस्वासाठी सुरू असलेल्या लढाईत भाजपच्या सुनिता रामदास शिंदे यांनी बाजी मारली आहे. पालिकेत १८ पैकी भाजपने ४ जागा मिळवत प्रथमच यश मिळवले आहे.
आमदार संजय कुटे मतदारसंघात सुरक्षित
जळगाव जामोद मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या प्रयत्नांनी जळगाव पालिकेत भाजपच्या सीमा कैलास डाेबे विजयी झाल्या आहेत. तसेच शेगावातही नगराध्यक्षपदी भाजपच्या शकुंतला पांडुरंग बुच ह्या विजयी झाल्या आहेत. काँग्रेसच्या मीनाक्षीताई रामविजय बुरुंगले यांचा पराभव करत ही पालिका काँग्रेसच्या ताब्यातून भाजपकडे आली आहे.
-- जनार्दन गव्हाळे, औरंगाबाद
gavhalej@gmail.com
अभिमान बाळगा ‘मराठी’ असल्याचा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोणकोण झाले त्यांची यादी बघा….
खरं तर मंत्रपुष्पांजली हे एक राष्ट्रगीत आहे, विश्वप्रार्थना आहे. त्यात एकात्म राष्ट्रजीवनाची आकांक्षा आहे. आबालवृद्धांच्या हृदयांतील ज्योत जागविणारे स्फुर्तीगान आहे. द्रष्ट्या ऋषीजनांनी जाणतेपणाने प्रस्थापित केलेला प्रघात आहे. त्या विश्वगीताचा अर्थबोध सामान्यजनांपर्यंत पोहोचावा, नव्हे जाणत्यांनी प्रयत्नपूर्वक सामान्यांपर्यंत पोहोचवावा म्हणून या लेखाचे प्रयोजन. मंत्र पुष्पांजलीमध्ये एकूण चार कडवी आहेत ती खालीलप्रमाणे-
या मंत्रांचा अर्थ समजणे आवश्यक आहे. अर्थ समजला की अनुभूतीचा आनंद नक्कीच होईल. प्रत्येक श्लोकाचा अर्थ येणेप्रमाणेः
श्लोक - १ यज्ञेन यज्ञं अयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथामानि आसन्
तेह नांक महिमानः सचन्तयत्र पूर्वे साध्याःसंति देव:
श्लोकाचा अर्थ - देवांनी यज्ञाच्याद्वारे यज्ञरुप प्रजापतीचे पूजन केले. यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधी होते. जिथे पूर्वी देवता निवास (स्वर्गलोकी) करीत असत ते स्थान यज्ञाचरणाने प्राप्त करून साधक महानता (गौरव) प्राप्त करते झाले.
श्लोक २ ओम राजाधिराजाय प्रसह्यसाहिने। मनोवयं वैश्रवणाय कुर्महे। स मे कामान् कामाकामाय मह्यं। कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय/ महाराजाय नमः
श्लोकाचा अर्थ - आम्हाला सर्वकाही (प्रसह्य) अनुकुल घडवून आणणाऱ्या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आम्ही वंदन करतो. तो कामेश्वरकुबेर कामनार्थी अशा मला (माझ्या सर्व कामनांची )पूर्ति प्रदान करो.
श्लोक ३ (प्रथमार्थ) ओम स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं।
श्लोकाचा अर्थ - आमचे सर्व कल्याणकारी राज्य असावे. आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य वस्तुंनी परिपूर्ण असावे. येथे लोकराज्य असावे. आमचे राज्य आसक्तिरहित, लोभरहित असावे अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची अधिसत्ता असावी.
श्लोक ३ (द्वितियार्थ)
समन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात्। पृथीव्यै समुद्रपर्यंताया एकराळ इति।
श्लोकाचा अर्थ - आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असो. समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे एकसंघ दीर्घायु राज्य असो. आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजे परार्ध वर्ष पर्यंत सुरक्षित राहो.
श्लोक ४ तदप्येषः श्लोकोभिगीतो। मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे। आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति।।
श्लोकाचा अर्थ - या कारणास्तव अशा राज्याच्या आणि राज्याच्या किर्तीस्तवनासाठी हा श्लोक म्हटला आहे. अविक्षिताचा पुत्र मरुताच्या राज्यसभेचे सर्व सभासद असलेल्या मरुतगणांनी परिवेष्टित केलेले हे राज्य आम्हाला लाभो हीच कामना.
संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची, आकांक्षेची व सामर्थ्याची जाणीव प्रत्येकाला करून देणारीही विश्वप्रार्थना.
लहानपणापासून वरील श्लोक आपण सर्व आरती नंतर चेवाने बोलत आलोय, त्याचा अर्थ वरील प्रमाणे आहे.
प्रतापगडाचे युद्ध हे गनिमी काव्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे
महागाईचा दर आणि चलनाचे मूल्य या दोन गोष्टींचे परिणाम नेहमीच सामाजिक आणि आर्थिक असतात . त्यांची कारणे मात्र अनेकदा राजकीय असतात . त्यामुळे त्याबाबतची उपाययोजना ही बहुतेकदा राजकीयच असावी लागते . या मालिकेतील अस्खलित उदाहरण म्हणजे ८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्री पासून ५०० आणि १००० रुपयांच्या सध्या अस्तित्वात असलेल्या चलनी नोटा रद्द करण्याचा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला निर्णय .
हा निर्णय अनेक अर्थांनी ऐतिहासिक आहे हे निर्विवाद . मात्र एकीकडे सध्या अस्तित्वात असलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या चलनी नोटा ८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्री पासून बंद करत असतानाच दुसरीकडे ५०० आणि २००० रुपयांच्या नवीन नोटा १० नोव्हेंबर २०१६ पासून सुरु करण्याचा निर्णय तसा गन्मतीचा वाटतो . हे उच्च मूल्यांच्या नोटा बंद करणे असे न होता अस्तित्वात असलेल्या नोटा बदलणे असा होतो . राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत काळ्या पैशाला आळा घालायचा असेल तर दर दहा वर्षांनी चलनी नोटा बदलल्या पाहिजेत असा विचार अनेक दशकान्पूर्वी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला होता . उच्च मूल्यांच्या नोटा रद्द कराव्यात असा मुद्दा अर्थक्रान्ती गेली अनेक वर्षे मांडत आहे . विद्यमान सरकारचा प्रस्तुत निर्णय या दोन गोष्टीचा संगम वाटतो .
अर्थातच या स्वरूपाच्या निर्णयांचा ( ज्याला अर्थशास्त्रीय परिभाषेत Demonetisation असे म्हणतात ) राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला फायदे असतातच . आणि यापैकी कोणताही निर्णय घेण्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ति लागते . आणि ती हिम्मत मोदी सरकारने दाखवली . त्यासाठी या निर्णयाशी संबंधित सर्वच निश्चितच अभिनन्दनास पात्र आहेत .
अशा पध्दतीने एखाद्या मूल्याच्या चलनी नोटा रद्द करण्याचा हा प्रसंग स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासात पहिल्यांदा घडत नाहीये . एकदा रद्द केलेल्या मूल्याच्या चलनी नोटा पुन्हा चलनात आणण्याचाही प्रकार याआधी घडला आहे . पण त्याबाबत माहिती पंतप्रधानानी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणातून देण्याचा प्रकार मात्र अनोखा आहे . प्रामुख्याने आर्थिक असणाऱ्या या निर्णयांची सांगड एकीकडे राष्ट्रप्रेम आणि दुसरीकडे दहशतवाद याच्याशी घालणे आणि या राष्ट्र - कार्यात तुमच्या - माझ्यासारखे सर्वसामान्य भारतीय नागरिक असा हातभार लावू शकतात असा भावनिक स्पर्श त्या रुक्ष आर्थिक आणि कर्तव्य - कठोर संरक्षणत्मक निर्णयाला देणे हे तर अफलातूनच . " सबका साथ , सबका विकास " चे अजूनही एक वेगळे स्वरूप म्हणा ना !
आज हा निर्णय का घ्यावा लागला याचे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थखाते आणि आपल्या देशाची मध्यवर्ती बँक " भारतीय रिझर्व बँक " ( RBI ) यांनी दिले आहे . त्यानुसार २०११ ते २०१६ या पाच वर्षांच्या काळात आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था ३० टक्के विस्तारली ; मात्र याच काळात चलनी नोटांच्या प्रमाणात मात्र ४० टक्के वाढ झाली . त्यापैकी ५०० रुपयांच्या नोटांच्या संख्येत ७६ टक्के तर १००० रुपयांच्या नोटांमधे १०९ टक्के वाढ झाली . आजमितिला सर्वसामान्य नागरिकांकडे असणाऱ्या चलनी नोटांच्या रकमेचे प्रमाण सुमारे १६ , ९८ , ५४० कोटी रुपये आहे आणि त्यापैकी अंदाजे ८८ टक्के भाग ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांमधे आहे . साधारणतः पाव भाग ( सुमारे २५ टक्के ) अर्थकारण काळया स्वरूपाचे असते असे मानले तरी अंदाज येऊ शकतो . तसेच नवीन नोटा निर्माण करण्याच्या सरकारी प्रक्रियेत , रिझर्व बँकेच्या नोटा - निर्मितीत कोणतीही संरक्षणात्मक गडबड झाली नसली तरी दहशतवादाला पाठबळ पुरवण्यात सहभागी असलेले बनावट नोटा आणि इतर गैरमार्ग अवलंबत असतील तर त्याला आळा घालणे हाही उद्देश या निर्णयामधे आहेच .
हा लेख तुम्ही वाचेपर्यन्त ९ नोव्हेंबर ला देशातील सगळ्या बँका आणि ९ व १० नोव्हेंबर २०१६ ला सर्वच बंद होती हा इतिहास झाला असेल . ५०० आणि २००० रुपयांच्या नवीन नोटा तुमच्या हातात असतील . ८ नोव्हेंबर पर्यंत आपल्या जवळ असणाऱ्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी रांगा लावून झाल्या असतील . पैसे भरायला कमाल मर्यादा नसली तरी काढायला चेक मागे जास्तीत जास्त १०००० रुपये आणि आठवड्यात खात्यातून जास्तीत जास्त २०००० रुपयेच काढता येतील हे ऐकून झाल असेल . २४ नोव्हेंबर २०१६ पर्यंत हे बंधन असेल . नंतर हे प्रमाण वाढत जाईल . आपल्या जवळच्या या जुन्या नोटा ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत जमा करता येतील आणि ते करताना ओळख - पत्र द्यावे लागेल हेही तोंडपाठ झाले असेल . पण अशा ओळखपत्र प्रत सही करून देताना सरकार ने सांगितले नसले तरी त्यावर तुम्ही तुमच्या खात्यात पैसे भरण्यासाठी ते सही करून देत आहात असा त्यावर तुमच्या तपशीलवार उल्लेख करायला बिलकूल विसरू नका . त्यामुळे त्या ओळखपत्र दुरुपयोग टाळण्यासाठी मदत होईल .
हा झाला या निर्णयाचा एक भाग . तितकाच तो काळाच्या ओघात ज्या पध्दतीने अंमलात आणला गेला तेही आवर्जून लक्षात घेण्याजोगी बाब आहे . या निर्णयाने काळा पैसा उजेडात येईल आणि नव्याने काळा पैसा निर्माण होण्यास काही प्रमाणात तरी पायबन्द बसेल असे सांगण्यात येत आहे . एक तत्व म्हणून ते बरोबरच आहे . पण गेल्या ६० - ७० वर्षांत काळया पैशाबाबत ज्या काही उपाय - योजना आपल्या देशात राबवल्या गेल्या , त्यांचा अनुभव फारसा सुखद नाही . अगदी याआधीच्या demonetisation निर्णयानीही अपेक्षित प्रमाणात परिणाम दिलेले नाहीत . याचे महत्वाचे कारण म्हणजे काळा पैसा एका रात्रीत जन्माला येत नाही . तसेच तो अनेकविध क्षेत्रात अनेकविध कारणांनी निर्माण होतो , होत राहतो . शिक्षण , जमीन - जुमला , ग्रुहनिर्माण , सोने आणि गुंतवणूक , राजकारण अशी अनेक क्षेत्रे त्याची कारण ही आहेत आणि परिणामही .
हे लक्षात घेत याबाबतचे सुटे धागे , सुटी टोके विद्यमान सरकारने कशी बांधत नेली हे बघणे नक्कीच उदबोधक ठरेल . त्याद्रुश्तिने या सरकारच्या गेल्या तीन अर्थसन्कल्पान्चा नीट विचार व्हावा . ( याचा उहापोह मी माझ्या भाषणात गेल्या तीन वर्षांत वारंवार केला आहे . ) . काळा पैसा हा भाजपा च्या लोकसभा निवडणुका जाहिरनाम्यात एक मुद्दा होता . देशाबाहेरचे काळे धन हा मोठा मुद्दा . आधी जन - धन योजनेतून अनेकांना बेंकिंग जाळ्यात आणले गेले . या खात्यांची सांगड आधारशी घालून ओळख परेड झाली . आयकर विवरण पत्रात ( Income Tax Returns ) आधार कार्ड नम्बर , प्रॉपर्टी , वाहने असे तपशील सुरु केले गेले . क्रेडिट व डेबिट कार्डचा वाढता वापर आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्वच आर्थिक माहितीचा यथायोग्य सक्रिय वापर अशी ही श्रुन्खला आहे . त्याचबरोबर काळा पैसा जाहीर करण्याबाबत वेळोवेळी केली गेलेली आवाहने ही विसरून चालणार नाही . तसेच २६ मे २०१४ रोजी सत्तारुढ झाल्यावर विविध देशांशी असणारे राजनैतिक संबंध वाढवण्यात देण्यात आलेला भरा आता देशाबाहेर असणारी माहिती आणि पैसा हुडकण्याचा मार्ग सोपा करेल .
५०० आणि १००० रुपयांच्या आधी अस्तित्वात असलेल्या नोटा रद्द करण्याचा निर्णय ज्या पध्दतीने घेतला गेला , जाहीर केला गेला आणि अंमलात आणला गेला हे पाहिले तर एक मजेदार विचार सहजच मनात आला की दरवर्षी जर उत्तर प्रदेश , गुजराथ सारख्या महत्वाच्या राज्यांच्या विधान - सभांच्या निवडणुका होत राहिल्या तर किती क्रांतिकारी , धाडसी , महत्वाकांक्षी आर्थिक निर्णय किती सातत्याने घेतले जातील ! . गन्मतीचा भाग सोडून देऊ . कारण तसे पाहिले तर आपल्या देशात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका होतंच असतात .
पण या निर्णयाबाबतची स्थिति लक्षात घेता आर्थिक क्षेत्रात येणाऱ्या काळात , निदान नजीकच्या भविष्यात काय आणि कसे महत्वपूर्ण बदल होतील हे बघणे उपयोगाचे ठरेल . असा विचार करत असताना मला वाटणारे काही मुद्दे खालीलप्रमाणे :
१ . सेवा आणि वस्तू कर ( GST ) ची अंमलबजावणी १ जानेवारी २०१८ पासून सुरु होईल .
२ . सरकारी आर्थिक वर्ष सध्याच्या एप्रिल ते मार्च ऐवजी जानेवारी ते डिसेंबर असे होईल .
३ . वरील दोन्ही गोष्टी किंवा प्रामुख्याने दुसरी गोष्ट झाली तर नंतरच्या काळात वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प दरवर्षी ऑक्टोबर अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या पन्धरवद्यात सादर होईल .
४ . बँकामधील वाढते व्यवहार प्रमाण वाढत राहिले तर बँक खात्यातील व्यवहार हा कर - आकारणीचा , निदान काही प्रमाणात तरी , पाया बनेल .
माननीय पंतप्रधानाना एक नम्र विनंती . . . आम्ही सर्वसामान्य नागरिक आमच एकमेव घरकुल घेताना मेटाकुटीला येतो . त्यासाठी द्यावे लागणार काळे धन द्यायच म्हणजे आमच पांढर् धन काळे म्हणून देतो . त्यामुळे तुमच्या आवाहनाला प्रतिसाद देत आमच्या कष्टातून , आधीच कर कापून , हाती आलेल्या पैशातून , घरखर्चासाथि बाजूस ठेवलेला पैसा ३१ डिसेम्बर २०१६ पर्यंत बँकेत जमा करण्यासाठी रांगेत उभे असताना यातली काही गुन्हेगार धेन्डे तुरुंगात गेलेली आणि त्यांची मालमत्ता जप्त झालेली पाहायला मिळाली तर नक्कीच आमचाही हुरुप वाढेल .
जोर का धक्का जोर से हैं भाई . .
-- चंद्रशेखर टिळक
१० नोव्हेंबर २०१६ .
C - 402 . राज पार्क
मढवि बंगल्या जवळ .
राजाजी पथ .
डोम्बिवलि ( पूर्व ) .
पिन . . . ४२१२०१ .
मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
EMail : tilakc@nsdl.co.in
द.अफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर अर्थिक मंदिची लाट आली होती.
प्रत्येक व्यवसायीकाचा धंदा जेम तेम चालत होता.
आशाच एका लाँजिंग with बोर्डिंग असलेल्या हाँटेल मध्ये बाहेर देशाचा एक व्यापारी आला....
त्याने हाँटेल मँनेजरकडे १००डाँलरची नोट दिली व सांगितले की मला मुक्कामाला एक छान खोली पाहिजे....
हाँटेल मँनेजरने वेटरला सांगितले की साहेबाना रुम दाखवून आण पसंत पडली तर साहीत्य घेवून जा....
परदेशी पाहूणा रुम बघायला गेला.....
मधल्या वेळेत मँनेजरने १०० डाँलरची नोट घेतली व बेकरी वाल्याचे पैशे चूकते केले....
बेकरीवाल्याचा धंदा जेमतेमच चालत होता .
तो खूश झाला. त्याने त्या १००डाँलर्सची नोट घेतली व किराणा दुकणदाराची उधारी चूकती केली.....
किराणा दुकाणदाराला आनंद झाला.
फार दिवसापासून कामवाल्या बाईचे पैशे देता न आल्यामुळे ती कामावर येत नव्हती....
तो लगेच तिच्याकडे गेला .१०० डाँलर्सची नोट कामवाल्या बाईला दिली व सांगितले की आजपासून रोज कामावर येत जा...
बिचारीचा आनंद गगनात मावेना.फार दिवसापासून तिला काम नव्हते .जवळ पैशे नव्हते...
ती उधार उसनवार करुन कसा तरी संसाराचा गाडा चालवत होती....
१०० डाँलर्स मिळाल्यामुळे तिला आनंद झाला....
ती तात्काळ ते पैसे घेवून हाँटेल मालकाकडे गेली....
जो खूपच चांगला ,दयाळू व मदतगार होता. तिला पैशांची गरज होती तेव्हा त्याने तिला १००डाँलर्स उसनवार दिले होते...
त्या बाईने हाँटेल मालकाचे पैशे परत केले. व आभार मानून निघून गेली.....
तितक्यात त्या परदेशी पाहूण्याला खोली पसंद न पडल्यामुळे तो मँनेजरकडे आला व १००डाँलर्सची नोट घेवून निघून गेला....
अर्ध्या एक तासा साठी १०० डाँलर्स बाजारात चलन रुपाने फिरले.
प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिक पार पाडली...
त्यामुळे हाँटेल मालक ,बेकरीवाला,किराणा दुकाणदार,कामवाली बाई प्रत्येकाचे देणे घेणे फिटले व पुन्हा ते व्यवसाय करु लागले...
आपल्याजवळ जी संपत्ती असते त्या संपत्तीचे आपण मालक नसून विश्वस्त असतो....
प्रत्येकजणांनी कथेतील माणसा प्रमाणे वर्तणूक केली तर विजय मल्यासारखी परिस्थिती निर्माण होणार नाही. .....
नेहमी पैसा फिरता ठेवा.
त्यावर अनेक जणाचे संसार चालतात. जीवन जगण्यासाठी त्याचा वापर करा,
फक्त त्याच्यासाठी जगू नका.....
1972 चा दुष्काळ आठवतोय,
माणशी अर्धा लिटर रॉकेल, ते ही डिझेल मिश्रित, त्याचासाठी सुद्धा सकाळ पासून रांगा, घरात जेवढी माणसे तेवढे सगळे वेगवेगळ्या दुकानापुढे उभे रहायचो !
पण सुदैवाने तेव्हा टीव्ही नव्हता,
त्यामुळे देशात शांतता होती !
रेशन दुकानदाराकडून महिन्याचे सामान घेतले तरच रेशनची दोनशे ग्रॅम साखर, लाल गहू, मिलो, हे मिळणार अशी अवस्था होती.
पण सुदैवाने तेव्हा टीव्ही नव्हता,
त्यामुळे देशात शांतता होती !
गॅससाठी नवीन नंबर लावायचा तर दोन तीन वर्षे वेटिंग असायचे, गॅस कनेक्शन साठी सुद्धा पाच पाच तास लाईन मध्ये उभे असायचो आपण,
पण सुदैवाने तेव्हा टीव्ही नव्हता,
त्यामुळे देशात शांतता होती.
एवढंच काय, शासकीय दूध योजनेतील दुधाची बाटली घेऊन सकाळीच रांगेत उभे रहायचो, मग तिथली भांडणं, शिवाय त्यासाठीचे कार्ड काढायला ऑफिसमध्ये रांग लावायचो,
पण सुदैवाने तेव्हा टीव्ही नव्हता,
त्यामुळे देशात शांतता होती.
सार्वजनिक नळावर रांग, सरकारी दवाखान्यात रांग, कास्ट सर्टिफिकेटसाठी रांग, std बूथ बाहेर रांग, कॉलेजला ऍडमिशन फॉर्म मिळवण्यासाठी रांग.... ही रांगेच्या आठवणींची रांग कितीही लांबू शकेल,
पण हे सर्व होतं तेव्हा ही टीव्ही चॅनेल्स नव्हती,
त्यामुळे देशात खरंच शांतता होती !
आजही, दूरदर्शन सोडून इतर चॅनेल्स एक दिवस बंद ठेवा,
तुम्हाला लक्षात येईल,
देशात खरंच शांतता आहे !
-- संजीव सुळे
Copyright © 2025 | Marathisrushti