(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • आज लक्ष्मीपूजन

    दिवाळीतील आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते, असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते.

    या दिवशी सर्व अभ्यंगस्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.

    प्राचीन काळी या रात्री कुबेर पूजन करण्याची रीत होती. कुबेर हा शिवाचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून पूजणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तीमध्ये कुबेर त्याची पत्नी इरितीसह दाखवला आहे. यावरून असे दिसते की, प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिष्ठित केले गेले.अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचेही म्हटले जाते. तिला ज्येष्ठा, षष्टी वा सटवी, निऋती या नावांनीही ओळखतात.. निवृत्ती ही सिंधू-संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे, असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशतीमध्ये आहेत. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आíथक व्यवहारातील सचोटी व नीती’ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्त्वाची मूल्य मनात रुजतात, म्हणून या पूजेची विशेषता आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • रासायनिक शेतीचा परिणाम

    जर्मन रसायनशास्त्रज्ञ जस्टस लेबिग यांनी नत्र, स्फुरद आणि पालाश (NPK) या त्रिसूत्रीचा शोध लावला.

    सन 1905 मध्ये फ्रिट्‌झ हेबर या शास्त्रज्ञाने हवेतील नायट्रोजनपासून अमोनिया वायू तयार केला.

    1915 मध्ये कार्ल बॉश या शास्त्रज्ञाने कृत्रिम अमोनिया तयार केला. त्याच अमोनियाने पहिल्या महायुद्धात कैसरच्या लढाईमध्ये सुमारे आठ लाख लोकांचा बळी घेतला. युद्ध संपल्यावर मग पिकाची वाढ करण्यासाठी तो शेतकऱ्यांना पुरवायला सुरवात झाली. नंतर पुन्हा आय. जी. फ्राबेन या कंपनीने दुसऱ्या महायुद्धात लोकांना मारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अमोनियाची निर्मिती केली.

    महायुद्धाच्या शेवटी या वायूची निर्मिती करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांचा हा अमोनिया, तसेच युद्धभूमीवर डास, माश्‍या, चिलटे मारण्यासाठी तयार केलेली डी.डी.टी. शेतीकडेच वळविण्यात आली. रासायनिक खतांनी रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या पिकांवर नवनवीन किडींचा प्रादुर्भाव वाढू लागला. या किडींच्या नियंत्रणासाठी क्‍लोरडेन, डेल्ड्रीन, एन्ड्रीन, पॅराथिऑन, मॅलेथिऑन यांसारख्या कीडनाशकांची निर्मिती झाली.

    खते, कीडनाशके, बियाणे, अवजारे, तणनाशके ही आधुनिक शेतीची तंत्रे होती. ही तंत्रे शेतकऱ्याने स्वीकारण्यासाठी अधिक उत्पादनाचे आमिष दाखविण्यात आले. सुरवातीला या तंत्राचे परिणामही तसेच होते. त्यामुळे शेतकरी ते स्वीकारू लागले. त्यासाठी शेतकरी बॅंका व या तंत्रांचे उत्पादक यांच्याकडून कर्जही स्वीकारू लागले.

    अनुदान, कर्जामध्ये गुंतली शेती

    आधुनिक तंत्रे, अनुदान, कर्ज यांनी अमेरिकन शेतकरी, सरकार यांच्यावर जणू ताबा मिळविला. त्यानंतर कंपन्यांची दृष्टी अधिक फायद्यासाठी तिसऱ्या जगाकडे वळली. जागतिक बॅंक व अमेरिकी सरकारने ही तंत्रे स्वीकारण्यासाठी भारतावर दडपण आणले. त्यासाठी प्रचंड पैसा पुरविण्यात आला. त्याच सुमारास भारतात दुष्काळाने थैमान घातल्याने भारत सरकारने जनतेचे पोट भरण्यासाठी या सर्वांचा स्वीकार केला.

    1) अनुदान, कर्ज या आकर्षक वेष्टनांतून आलेल्या कीडनाशकांचा भारतातील वापर झपाट्याने वाढू लागला. 1966 पासून 1978 पर्यंतच्या अवघ्या 12 वर्षांत रासायनिक खतांचा वापर एक दशलक्ष टनांपासून 50 दशलक्ष टनांपर्यंत वाढला.
    2) हेक्‍टरी खतांचे प्रमाण 3.5 किलोपासून 50 किलोपर्यंत वाढले. नंतर 1950 पासून 2001-02 मध्ये हे प्रमाण 170 पटींनी वाढले.
    3) रासायनिक कीडनाशकांच्या वापराचे प्रमाण 1971 ते 1994-95 पर्यंत 100 टक्‍क्‍यांनी वाढले. या वाढत्या खर्चाबरोबर दुर्दैवाने शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनामध्ये तेवढी वाढ झाली नाही. अतिप्रमाणात वापरलेली रासायनिक खते, कीडनाशकांनी नापीक झालेली जमी न आणि शेतकऱ्यांचा अशिक्षितपणा ही मुख्य कारणे यामागे आहेत.
    4) 1977 मध्ये कर्नाटकमधील मालनाड येथे घडलेली घटना "हंडी सिंड्रोम' या नावाने प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात भातासाठी मोठ्या प्रमाणात कीडनाशके वापरली जात. पिकावर फवारलेली कीडनाशके पाण्याबरोबर खालच्या शेतांमध्ये जात होती. या शेतांमधील खेकडे खाल्ल्याने सुमारे 200 मजुरांना पॅरालिसीस दिसून आला. खेकड्यांच्या शरीरात भातासाठी वापरलेल्या कीडनाशकांचे अंश सापडले. असे खेकडे या मजुरांनी खाल्ल्यामुळे त्यांच्यावर हा परिणाम झाला होता.
    5) जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमाप्रमाणे माणसाच्या शरीरात जास्तीत जास्त 1.25 पीपीएम एवढ्या प्रमाणात डी.डी.टी.चे अंश सापडले, तर फारसा त्रास होत नाही. पण दिल्लीमध्ये केलेल्या चाचणीत या शहरातील नागरिकांच्या चरबीमध्ये सुमारे 20 पीपीएम एवढे डी.डी.टी.चे अंश सापडल्याचा अहवाल "डाऊन टू अर्थ' या मासिकात प्रसिद्ध झाला.
    6) पंजाबमध्ये हरितक्रांतीचा उच्चांक साधला गेला. आज पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातून गंगानगर येथील कर्करोगावर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी कर्करोगाने आजारी रुग्ण रोज एक रेल्वेगाडी भरून जातात. दुर्दैवी गाडीचे नाव "कॅन्सर एक्‍स्प्रेस' असे लोकांनी ठेवले आहे.

    त्यामुळे आज आपणा सर्वाना गरज आहे जैविक शेती व जैविक खतांची....

  • सर्वात मोठ्ठे कन्फुजन….

    किती आहे भुजबळांची मालमत्ता?

    - नाशिक भुजबळ फार्म - 5 कोटी
    - राम बंगला, नाशिक - दीड कोटी (समीर भुजबळ)
    - गणेश बंगला, नाशिक - 1 कोटी
    - 3 एकर जमीन, नाशिक - 25 कोटी
    - भुजबळ पॅलेस - 60 कोटी
    - ठाण्यात पारसिक बंगला - पाच कोटी
    - सुखदा बंगला - 6 कोटी
    - येवला ऑफिस आणि बंगला - 10 कोटी (पंकज)
    - मनमाड येथील जमीन - 10 कोटी
    - दिंडोरीतील द्राक्ष मळा - पाच कोटी (पंकज)
    - माणेक महल, चर्चगेट - पाच कोटी (पंकज)
    - माहिममधील फ्लॅट - पाच कोटी
    - नवी मुंबईतील घर आणि दुकान - पाच कोटी
    - 30 एकर जमीन - 600 कोटी
    - पेंटिंग आणि परदेशी आर्ट पीस - 100 कोटी
    - जुहूच्या वसुंधरा सोसायटीत दोन फ्लॅट - 40 कोटी
    - 60 किलो सोने - 18 कोटी
    - हिरे - 10 कोटी
    - वाहने - रेंज रोव्हर 2 कोटी, बीएमडब्ल्यू 7 सीरिज सव्वा कोटी, लॅण्ड क्रूझर 50 लाख, मर्सीडीज टू 1 कोटी
    - आर्मस्ट्रॉंग एनर्जी - 200 कोटी
    - नाशिकचा पॉवर प्लॅंट - 25 कोटी
    - नाशिक शिलापूर येथे जमीन - 30 कोटी
    - गिरणा शुगर मिल - 30 कोटी
    - आर्मस्ट्रॉंगच्या इन्फ्रास्ट्रक्‍चरच्या नावाने 250 एकर जमीन - 100 कोटी
    - भुजबळ वाईन्स - 155 कोटी
    - नाशिकची कन्सल्टिंग कंपनी - 10 कोटी
    - मुंबईतील दादर येथे इन्फ्रा कंपनी - 35 कोटी
    - देविशा इन्फ्रा, नवी मुंबई - 600 कोटी
    - "बलु सर्कल'च्या नावाने गुंतवणूक - 600 कोटी
    - भावेश बिल्डर - 50 कोटी
    - परवेश कन्स्ट्रक्‍शन - सांताक्रूझ निवासस्थान, वांद्रे येथे हाफिज महल, लोणावळा येथे बंगला व हेलीपॅड आणि नाशिक येथे निवासी इमारत - 330 कोटी
    - आर्मस्ट्रॉंग प्युअर वॉटर - 35 कोटी
    - नाशिक एमआयडीसीत जय इलेक्‍ट्रॉनिक्‍स प्रा. लि. - 25 कोटी
    - माझगाव येथे राबरेक्‍स इंडस्ट्री - 25 कोटी
    - पनवेल येथे सुवी रबर प्रा. लि. साठी शेड - 2 कोटी
    - बाभूळगाव- येवला येथे 105 एकर जमीन - 25 कोटी
    - वांद्रे येथील फ्लॅट - 5 कोटी
    - भुजबळ वाईन्सच्या नावाने उज्जैन येथे 350 एकर जमीन - 60 कोटी

    हि सर्व दादरला रस्त्यावर भाजी विकून मिळवलेली संपत्ती आहे, असेही त्यांनी जाहीर करावे.

    भुजबळ "निर्दोष" (!!) सूटण्या आधी आख्या महाराष्ट्राला हे कळु दे...

    -- मकरंद

  • बार बार देखो . . . .

    कतरिना कैफ चा सिनेमा पाहात असताना गुंतवणूक क्षेत्राचा विचार करणे ही अरसिकपनाची कमाल मर्यादा असेल . पण ते पाप करायचेच झाले तर कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्राचा अलीकडेच प्रदर्शित झालेला " बार बार देखो " हा सिनेमा अनेक संदर्भात गुंतवणूक क्षेत्राची आठवण करून देत राहतो .

    सगळ्यात पहिले म्हणजे काही काही गुंतवणूकीच्या संधी या पक्क्या चिरतरूण असतात . अगदी या सिनेमा मधल्या कतरिना सारख्या . तुमच्या आणि त्यांच्या तरुणाईत त्या स्वतः बेभान होत छान नाचतात आणि सॉलिड सुंदर दिसतातच .शिवाय तुम्ही त्या संधीचे नायक असूनही आणि तुम्ही तुमच्या कळत - नकळत Time Machine मधे बसलात तर त्याही तशाच बसल्या आहेत असं वाटत राहाते . आणि तुम्ही कालानुरुप म्हातारे वाटत असताना त्या कतरिना रूपीचिरतरूण गुंतवणूकीच्या संधी मात्र परिपक्व आणि जास्त - जास्त आकर्षक होत जातात . वाढत्या वयानुसार त्यांचा अवखळपणा कदाचित कमी होत असेलही , पण सार्वकालिक निर्भरता मात्र वाढत राहते . अगदी तुमच्या आयुष्याला पुरूनउरेल अशी . एशियन पेंटस , केस्ट्रोल , एचडीफसी , एचडीएफ सी बँक , हिंदुस्तान लिवर , आयटीसी , कोलगेट , लार्सन टूब्रो , स्टेट बँक , रेलीस , हवेलस , टीसीएस , अशा शेअर्स सारखी .

    दूसरे म्हणजे , तुम्ही अगदी कतरिनाच्या सहवासात असलातरी या सिनेमामधल्या सारिका सारख्या स्वतःच्या जुन्या वैभवाच्या खुणा जपलेल्या काही गोष्टी , संधी , व्यक्ति , बाबी तुमच्या आयुष्यात असतात . त्या एकाचवेळेस तुमच्यावरमाया ही करत असतात आणि दिल्यावेळी काय करावे हे सांगत असतात . त्याला " डोळस मायेचा अनुभव " असे म्हणतात . असा अनुभव मग आई असूनही या सिनेमातल्या सारखा तुम्हांला सांगता होतो कि " हनीमूनला गेला आहेस तरबायकोबरोबर मजा कर ; आईला फोन करण्यात वेळ घालवू नकोस " . एकंदरीतच काय तर Things on hand , Deeds at hand always need attention , if not full concentration हे प्रेमात , मधुचंद्रात , वैवाहिकआयुष्यात , व्यावसायिक जीवनात , आणि गुंतवणूकीतही कार्यरत असताना ( आता इथे कामात किंवा काम - मग्न असताना कस म्हणू ! ) महत्वाचे असते .

    तिसरे म्हणजे गुंतवणूक काय आणि वैवाहिक आयुष्य काय , ही क्षेत्रे निव्वळ Calculations , Solutions , Formulations यावरच चालत नसतात . Meaningful Attention ही गोष्टही या दोन्ही ठिकाणी अत्यावश्यक असते .

    चौथे म्हणजे आयुष्याचे जरी गणित असले आणि गणिताला जरी आयुष्य असले तरी आयुष्य म्हणजे गणित नसते . आयुष्याचे गणित केवळ सुसह्यच नव्हे तर सुखद ही करण्यासाठी हे ग्रुहितक सदैव ध्यानात ठेवावेच लागते . असं ग्रुहितकअस्तिवात नसेलही , पण आचरणात आणावेच लागते . अर्थशास्त्रीय सिध्दांत मांडताना नाही का असली ग्रुहितके असतात . Law of Diminishing Margiinal Utility चे ग्रुहितक काय तर म्हणे सगळेच आंबे एकसारख्याच चवीचे ,रंगाचे , आकाराचे , वासाचे . . . . तुम्हांला एकापाठोपाठ एक मिळाले . . . . एखाद्याची थट्टा करायची म्हणजे किती . . . ? या न्यायाने उद्या ग्रुहितक म्हणून सांगाल कि दीपीका , कतरिना , अनुश्का , प्रियांका एकाचवेळेस प्रेयसी म्हणूनमिळाल्या तर . . . मग लक्षात येते कि हे प्रत्यक्षात होणार नसते म्हणूनच त्याला ग्रुहितक म्हणायचे असते .

    म्हणून तो सिध्दांत ही Law of Diminishing Marginal Utility असतो ; Law of Equi - Marginal Utility नाही .

    पाचवा मुद्दा म्हणजे या सिनेमात असणारा एक संवाद . त्यात या सिनेमाच्या नायकाला त्याचा वरिष्ठ स्वतः ही गणिताचा प्राध्यापक असूनही सांगतो की कोणत्याही क्षेत्रातील समीकरणात BALANCE हा असलाच पाहिजे . वैयक्तिकआयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य यांत तर हे संतुलन असलेच पाहिजे . गुंतवणूक क्षेत्र त्याला अपवाद कसे असेल ?

    सहावे म्हणजे या सिनेमातील एका द्रुश्यात तो गुरुजी - भटजी - पुरोहित सिनेमाच्या नायकाला एक छान उदाहरण देतो . त्या पुरोहिताच्या हातात चेनवाले घड्याळ असते . ते तो दोन हातात त्या चेनची दोन टोंक असे धरतो आणि सांगतोकी यातले एक टोक हा भूतकाळ आहे . कितीही ईच्छा असली तरी आपल्याला तो जरासुध्धा आता बदलण्याची संधी , शक्यता नसते . या चेनचे दुसरे टोक म्हणजे भविष्य - काळ . पण तो प्रत्यक्षात कसा आहे हे या क्षणाला आपल्यापैकीकोणालाच माहीत नसते . अशावेळी आता हातात असलेले वर्तमानाचे घड्याळ योग्य रित्या उपयोगात आणले पाहिजे . अगदी कितीही नकारार्थी छटा असल्या तरीही " वापरले पाहिजे " हाच शब्द - प्रयोग अगदी समर्पक आहे.

    अशावेळी विंदा करंदीकर यांची

    " इतिहासाचे अवजड ओझे

    डोक्यावर घेऊन ना नाचा

    करा पदस्थल त्याचे आणिक

    त्यावर चढूनी भविष्य वाचा "

    या काव्य - पंक्ति आठवायला लागतात . अगदी त्याचा अर्थ या सन्वादापेक्शा वेगळा असूनही . .

    सातवीं गोष्ट म्हणजे असे केले नाही तर या सिनेमात एकदा नायिका नायकाला " अपने कल भी तो बेमतलब हो सकते हैं " असं म्हणते . योग्य वेळी योग्य गुंतवणूक केली नाही तर आपलेही भविष्य असेच बे - मतलबी झाल्या - शिवायराहील काय ?

    आठवी बाब म्हणजे , या सिनेमात पहिल्यापासून शेवट पर्यंत अनेकदा नायिका नायकाला विचारत राहाते की तुझं माझ्यावर प्रेम आहे ना आणि ते का आहे . अर्थातच तो दरवेळी अगदीच साहजिकच प्रेम आहे असे उत्तर देतो . पण असं प्रेम असण्याचे कारण मात्र हा सिनेमा जस - जसा पुढे जात राहतो , तस - तसे बदलत जाते . " तू माझी मैत्रिण आहेस " , " तू माझी बायको आहेस " , " तू आपल्या दोन मुलांची आई आहेस " असॆ टप्पे हे उत्तर घेत राहते .

    आणि मग एका टप्प्यावर तो तीला उत्तर देतो की माझे तुझ्यावर प्रेम आहे कारण " तुम मेरा बीता हुआ कल हो , तुम मेरा आनेवाला कल हो ; और तुम मेरा यह , अब , इस वक़्त का पल हो "

    हे उत्तर तो नायक त्या नायिकेला या सिनेमात अनेकदा देतो . पण हे उत्तर तो तिला अगदी पहिल्यांदा देतो तेंव्हा ती त्याला मिस्किलपने विचारते की हे उत्तर द्यायला तुला इतका वेळ लागला ?

    आपण आणि आपली गुंतवणूक यांत असंच होतं असतं ना . .

    नववा मुद्दा म्हणजे या सिनेमात " ड्राइवर " कोण आणि " पेसेंजर् " कोण असा एक संवाद दोन - तीनदा नायक - नायिकेमधे आहे . आपणही तो प्रश्न आपल्या एकंदरीतच आयुष्याला , आणि आपल्यातल्या गुंतवणूकदाराला सतत विचारत राहिले पाहिजे . कारण प्रवाहात पोहणे , प्रवाहाबरोबर पोहणे आणि प्रवाहपतित होणे या निश्चितच वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि साहजिकच त्यांचा परिणाम ही वेगवेगळा असतोच असतो .

    अशावेळी या सिनेमाच्या नायक आणि नायिकान्ची नावं अनुक्रमे " जय " आणि " दिया " आहेत हेही कीती सूचक वाटू लागते ना !

    अजून एक गोष्ट हा सिनेमा पाहात असताना सतत जाणवत राहाते की काळाच्या ओघात माणूस बदलतो . सुधारतो . बिघडतो . पण बदलतो . त्यात सहवासाचाही भाग असेल ! काजोलच्या सहवासात आल्यानंतर अजय देवगनचा , दीपीका पदुकोनच्या सहवासात आल्यावर रणवीरसिंगचा , रनबिर कपूरच्या सहवासाच्या काळात कतरिना कैफ चा अभिनय सुधारला . राजनीति मधे कतरीना बाहुली वाटते ; तीच कतरिना " बार बार देखो " हा सिनेमा तारून नेते . त्या न्यायानेगुंतवणूक क्षेत्राच्या सहवासात आपण बदलणार ना , काळाच्या ओघात आपली गुंतवणूक " केली आहे झालं " ते " तारणहार " असा मुद्दा आहे . अगदी प्रश्न नसला तरी !

    आता हा सिनेमा त्याच्या नावाप्रमाणे " बार बार देखो " असा आहे की नाही हे ठरवणे आणि या लेखात म्हणाल्या प्रमाणे आपल्या गुंतवणूकीचा असा " बार बार देखो " हा विचार करायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्ण .

    तुम्ही या प्रश्नाचे उत्तर तुमचे तुम्हांलाच देई पर्यंत कतरिना पडद्यावर दिसत असूनही गुंतवणूकीचा विचार करण्याचे जे अरसिकतेचे पाप माझ्याकडून घडले आहे त्याचे पाप - क्शालन कसे करावे ते बघतो .

    " अरसिकेशू कवित्व निवेदनम , सिरसि मा लिख लिख " असॆ कोणी कधी म्हणायला नको ! !

    -- चंद्रशेखर टिळक
    C - 402 . राज पार्क
    मढवि बंगल्या जवळ, राजाजी पथ .
    डोम्बिवलि ( पूर्व ) ४२१२०१ .
    मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
    एमेल . . . tilakc@nsdl.co.in

    १६ सप्टेंबर २०१६

  • चीनने केलेल्या २०१५ मधील निर्यातीची आकडेवारी.

    सारांश सांगायचा तर या क्षणाला भारत-चीन व्यापार बंद केला तर त्याचा सर्वात मोठा फटका भारताला बसेल.

  • आज बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा

    कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस ‘दिवाळी पाडवा’ म्हणूनही ओळखतात, या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि ‘इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ असे म्हणतात. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते. शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला ‘शुभा’ असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. या दिवशी विक्रम संवत सुरू होतो.

    पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वहय़ांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. नवीन वहय़ा सुरू करण्यापूर्वी वहय़ांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो.

    नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    *९४२२३०१७३३

  • बासरी …

    बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात.

    पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात.

    त्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी 'मी' येतो. याच 'मी'पणाच्या अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही, असा समज आहे.

    कृष्णाचं आवडतं वाद्य बासरी. एकदा कृष्णाच्या सगळ्या सख्या, गोपी बासरीवर चिडल्या आणि म्हणाल्या,आम्ही त्या कृष्णाची एवढी स्तुती करतो, त्याच्या आजूबाजूला वावरतो,पण तो आम्हाला साधा भावही देत नाही. तू तर एवढी साधी; ना रूप ना काही.पण तो तुला सतत ओठांशी धरून असतो.

    तू अशी काय जादू केली आहेस त्याच्यावर? बासरी हसली आणि म्हणाली, 'तुम्ही माझ्यासारख्या व्हा,मग कृष्ण तुम्हालाही जवळ घेईल.'

    अर्थ न कळून गोपींनी बासरीकडे पाहिलं. बासरी पुढे म्हणाली, 'मी अगदी सरळ आहे; ना एखादी गाठ, ना एखादं वळण. मी पोकळ आहे. त्या पोकळीतून माझ्यातला अहंकार गळून पडलाय. माझ्या अंगावरच्या सहा छिंद्रातून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे रिपू मी काढून टाकले आहेत.

    मला स्वत:चा आवाजही नाही. माझ्या सख्यानं फुंकर मारली तरच मी बोलते. तो जशी फुंकर मारतो तशी मी बोलते.'

    गोपी निरुत्तर झाल्या.

    अहंकार रहित शरीर ही श्रीहरीची बासरी होय.

  • घालीन लोटांगण

    ज्योत्स्ना प्रकाशनाच्या विकास परांजपे ह्यांच्या फेसबुक वॉल वरुन

    घालीन लोटांगण ही नामदेवांची एक सुंदर रचना आहे. त्याला 'त्वमेव माता...' ही संस्कृत रचना (बहुधा शंकराचार्यांची) कोणी चिकटवली व का हे कोडे मला सुटले नाही. मी आजपर्यंत अनेकांना विचारले. उत्तर मिळत नाही. कोण सांगू शकेल काय ?

    या माझ्या प्रश्नावर माझा मित्र रवी अभ्यंकर याने संदर्भासह विस्तृत माहिती पुरवली ती पुढे देत आहे.

    रविला भेटलो की ‘लोटांगण’ नाही घातले तरी ‘प्रेमे आलिंगीन’ नक्की !!!

    -- रवी उवाच

    विकास,

    'घालीन लोटांगण' हे कॉकटेल काव्य आहे, ह्यातली पाच कडवी कुठल्या तरी भक्ताने इथून तिथून जमवून त्यांचं मिश्रण केलं आहे.

    (१) पहिलं कडवं 'घालीन लोटांगण' हे तू लिहिल्याप्रमाणे नामदेवांचं आहे. त्याला बिचाऱ्याला कल्पना नसेल पुढे त्याच्या काव्याला किती ठिगळं लागणार आहेत त्याची.

    (२) दुसरं कडवं 'त्वमेव माता च पिता त्वमेव' हे गणपती किंवा कुठल्या देवाला उद्देशून नसून तो गुरुस्तोत्राचा भाग आहे. शंकराचार्यांनी श्रीगुरुस्तोत्रं लिहिलं, ज्यात आपल्याला माहिती असलेला 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्रविष्णु' श्लोक समाविष्ट आहे.

    (३) तिसरं कडवं 'कायेन वाचा' हे श्रीमद्भागवतपुराणातलं आहे. एकूण अठरा पुराणांपैकी हे एक, व्यासांनी लिहिलेलं. कायेन वाचा हा श्लोक स्कंध ११, अध्याय २ ह्यामध्ये ३६ वा श्लोक आहे.

    (४) चौथं कडवं 'अच्युतम केशवं' हे 'अच्युताष्टकम्' ह्या शंकराचार्यांच्या काव्यातून घेतलं आहे. मजा म्हणजे काव्याचं नाव जरी 'अच्युताष्टकम्' आहे तरी त्यात नऊ श्लोक आहेत.

    (५) पाचवं आणि शेवटचं कडवं 'हरे राम हरे राम' सर्वात सोपं. ते 'कलिसन्तरण' ह्या उपनिषदातलं आहे. ह्या उपनिषदाची सुरुवात 'ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यंकरवावहै । तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।' आपल्या सर्वांनाच माहिती आहे.

    तर अशी ही प्रार्थना जी आपण गणपतीसमोर म्हणतो, त्यातलं एकही कडवं गणपतीला उद्देशून नाही.

    -- रवी अभ्यंकर

    ज्योत्स्ना प्रकाशनाच्या विकास परांजपे ह्यांच्या फेसबुक वॉल वरुन

  • नाही म्हणजे नाही !

    पिंक . अलीकडेच प्रदर्शित झालेला हिन्दी सिनेमा . दाहक वास्तवावर आधारित तितकाच वास्तव सिनेमा . आपण व्यक्ति म्हणून , समाज म्हणून जर असन्वेदनशील झालो तर एक संवेदनशील विषय किती ज्वलंत बनू शकतो , नव्हेबनलाच आहे , याचा आरसा म्हणजे हा सिनेमा . करमणूक म्हणून जायचे असेल तर या सिनेमाला जाण्याचा विचार सुद्धा मनात आणू नये असा हा सिनेमा . पण आपल्या आयुष्यात एक व्यक्ति म्हणून , एक समाजाचा घटक म्हणून , एकवडील म्हणून , एक मित्र म्हणून , एक मैत्रीण म्हणून , एक समाज - धुरीण म्हणून , एक सहकारी म्हणून कसे वागतो आणि कसे वागले पाहिजे याबाबत एकदम झनझनित अंजन घालणारा असाच हा सिनेमा आहे . एकदम अस्वस्थ करणारा .

    त्यासाठी या सिनेमाच्या निर्मितीशी संबंधीत सर्वांचे मनापासून अभिनंदन केले पाहिजे . पण निव्वळ अभिनंदन करून आपल्या सगळ्यांच्याच नेहमीच्या सवयीने सोडून देण्यासारखी ही गोष्ट नाहीच .

    हा सिनेमा पाहिल्यापासून माझ्या मनात एकच विचार सतत येत आहे कि सभ्यतेच्या साऱ्या गोष्टी आज अशा पध्दतीने परत एकदा तपासून घेण्याची आज वेळ आली आहे . जर आपल्या लेकी- सुनान्बाबत आपण इतके नादान पणे वागणारअसू , तर आपल्यात आणि " लड़के है , जवानी में तो ऐसा एखाद बर्ताव हो जाता है " असं म्हणणारया आपल्या देशातील एका राजकीय नेत्यांत आणि तशा मनोव्रुत्तीच्या इतरांत काय फरक राहिला ?

    असा फरक राहिला पाहीजे आणि तो प्रकर्षाने सतत जाणवत राहिला पाहीजे असं अगदी मनापासून वाटणार्या सर्वानी हा सिनेमा पाहिलाच पाहिजे . आणि त्याचबरोबर या सिनेमातील तीन तरूण मुलिन्वर जो प्रसंग येतो , तसा प्रसंगकोणावरही येणार नाही याचीही व्यवस्था आपण सगळेच मिळून कार्यरत ठेवणे आवश्यक आहे . ( नुसती सुरू करणे नाही ; सुरू ठेवणे अत्यावश्यक . )

    अर्थात असा विचार , असा व्यवहार केवळ या सिनेमातील घटने बाबत नाही तर आपल्या आयुष्याच्या अनेक पैलूंबाबत करण्याची वेळ आली आहे . आपला देश आर्थिक महासत्ता बनेल किंवा बनणार नाही . पण आर्थिक महासत्ता होणे हाकाही सर्व व्यथा दूर करणारा सार्वकालिक रामबाण उपाय नाही . एकीकडे सांस्कृतिक सम्रुध्धीच्या परंपरेच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे एक देश म्हणून Human Development Index मधे जागतिक क्रमवारीत खालच्या पातळीवरअसायचे हे एक देश म्हणून शरमेचीच बाब आहे . अर्थात त्यासाठी फक्त सरकारला दोषी मानने सर्वथैव गैर आहे .

    मग याबाबतीत कसे वागावे लागेल याचे आदर्श उदाहरण म्हणजे " PINK " सिनेमातील अमिताभ बच्चन यांनी रंगवलेली दीपक सेहगल ही व्यक्तिरेखा . आपल्या अवती - भवती घडणाऱ्या घटनांची नोंद कशी घेतली पाहिजे , संबंधितव्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्यात गैरवाजवी ढवळाढवळ न करता त्यांना कसे सहाय्यकारी झाले पाहिजे , तटस्थता आणि समरसता यात संतुलन कसे राखले पाहीजे , त्याचवेळी असॆ सामाजिक आयुष्य आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यातीलजबाबदार्या यांचा तोल कसा सांभाळत राहीले पाहीजे , कायद्यासमोर दोषी व्यक्तींना उघडे पाडत असतानाच एकंदरीतच प्रचलित पध्दतीत कसे - काय - का बदल झाले पाहिजेत याचे दिशा - दिग्दर्शन करणे ( मग ते या सिनेमा प्रमाणेतिरकस , खोचक , कुचकट पणे ही का असेना ) याचे काळानुसार , प्रसन्गानुरूप , स्थितिसापेक्ष असॆ हे उत्कृष्ट उदाहरण आहे .

    या अर्थाने या सिनेमाच्या शेवटी तीन मुलिन्चा वकील म्हणून खटल्यातील Closing Remarks म्हणून अमिताभ बच्चन यांच्या तोंडी जो संवाद आहे तो फार महत्वाचा आहे . तो संवाद असा " No Means No . No हा केवळ एक शब्दनाहि . नाहीच . ते ऐक संपूर्ण वाक्य आहे . त्याला आणखी वेगळ्या व्याख्येची , माहितीची , स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही . "

    तसे या आशयाचे मुद्दे कायद्याचा अभ्यास करतांना शिकवले जातात . विशेषतः Criminal LAW शिकताना . वाढत्या वैयक्तिक वयात , आयुष्यात त्याचे नानाविध पैलू लक्षात येत राहतात .

    अगदी गुंतवणूक क्षेत्राबाबत ही .

    तसेही या सिनेमाचे नाव " पिंक " आणि गुंतवणूक क्षेत्राविषयी जास्त विस्ताराने देणाऱ्या आर्थिक नियतकालिकांना म्हणतात " पिंक पेपर्स " .

    असो .

    आणि मग तसा विचार करत असताना गुंतवणूक आणि हा सिनेमा यांची सांगड घालणारे काही मुद्दे मनात उमटू , उमलू लागले .

    यातला पहिला पैलू म्हणजे NO MEANS NO हे वाक्य . आपल्या गुंतवणूकीचे तंत्र आणि मंत्र मनात घोटवत असताना आपण मोहाला , लोभाला , पुर्वग्रहाना हे म्हणतो का ? कोणतीही परिस्थिती असली तरी आपल्या गुंतवणूकीच्यासातत्याला तात्पुरतीही सोडचिठ्ठी देण्यास पुरेशा क्रुतिशील ठामपणे NO MEANS NO म्हणायला शिकणार् ना ?

    यालाही काही वेगळे स्पष्टीकरण देण्याची थोडीही आवश्यकता नाही .

    याचा असाच ऐक पैलू म्हणजे गुंतवणूक ही सदासर्वकाळ सर्वान्चीच गरज असते . महिला आणि अल्पवयीन यान्च्याबाबत तर असतेच असते . हल्लीच्या काळात महिला त्यांच्या स्वतःच्या गुंतवणुकीबाबत ही खबरदारी , जबाबदारी , काळजीस्वतःच घेउ शकतात . जिथे ही परिस्थिती नसेल तिथे ही भूमिका घरातील इतरांनी निष्ठापूर्वक , नेकिने पार पाडली पाहिजे . घरातील अल्पवयीन व्यकिन्बाबत तर ही गोष्ट घडलीच पाहिजे . जिथे हे होत नसेल तिथे हे त्यांच्या परिचितानीस्वयन्स्फुर्तिने केले पाहिजे . निदान त्याची आवश्यकता आणि प्रक्रिया लक्षात आणून तरी दिली पाहिजे . कारण त्याबाबतची माहिती सर्वाना च असतेच असॆ नाही . आणि अगदी असली तरी काहीवेळा परिस्थितीच्या रेटयात ते सुचतेच असॆनाही . जसे या सिनेमात तीन मुलिन्बाबत अमिताभ बच्चन एक वकील म्हणून करतो . हा संदर्भ केवळ ध्वन्यार्थाने नाही तर सर्वार्थाने लक्षात घेतले कि या सिनेमातील एक संवाद ( जी कायदेशीर तरतूद आहे ) आहे कि " Non - Bailable Warrant असले तरी महिला आणि बालकांना bail मिळतो , मिळू शकतो ." मात्र ही प्रक्रिया योग्य तर्हेने आणि वेळीच सुरू करावी लागते . कारण यातूनच त्यांची निर्भरता निर्माण होत असते . हे आर्थिक , भावनिक , सामाजिक आशाअनेक छ्टांनी खरे आहे .

    पिंक हा सिनेमा आणि गुंतवणूक क्षेत्र यांची सांगड घालताना मला जाणवलेला तिसरा पैलूं म्हणजे या दोन्ही गोष्टींचा एक समान संदेश हा आहे कि जर आपण बरोबर असू , निर्दोष असू तर आजूबाजूच्यानी , ज्यांचा तुमच्या परिस्थितीशीएरवी काहीही संबध नाही , केलेल्या टिप्पणीकडे फार लक्ष देण्याची जरासुध्धा आवश्यकता नाहि . त्यामुळे विचलित होण्याची तर बिलकूल गरज नाही . उलट त्यामुळे स्वतःच्या मनाशी स्वतःच्या मताची , तत्वान्ची , आचरणची तपासणी ,उजळणी करून घ्यावी . या सिनेमात ऐक प्रसंग आहे ज्यात अमिताभ बच्चन तापसी पन्नू च्या overcoat चे hood तिच्या डोक्यावरून काढतो . ते दोघं मॉर्निंग वॉक ला गेलेले असतात . ती नेहमीच्या प्रमाणे चालत असते . तिला पाहून "अरे ही तर ती कोर्ट केस वाली " असॆ एक जण म्हणतो . ते ऐकून सिनेमातील मिनल अरोरा ( तापसी पन्नों ) पटकन हुड डोक्यावर घेतें . अमिताभ बच्चन तें पटकन तिच्या डोक्यावरुन काढतात . हे अनेक अर्थांनी महत्वाचे आहे . निर्दोषव्यक्तीचा स्वाभिमान - आत्म सन्मान म्हणून तर ते महत्वाचे आहेच , पण तितकेच ते कार्यपद्धतीचे निर्देशक आहे . सातत्याने केलेली गुंतवणूक विपरीत परिस्थितीत तुमच्यावर छत्र धरते आणि त्यामुळे सामाजिक टीका - टिप्पणी पासूनस्वतःला लपवण्याची वेळ येत नाही .

    या सिनेमात न्यायाधीश महाराजांचे नाव " सत्यजित दत्त " आहे हेही यासंदर्भात काहीवेळा अतिशय सूचक वाटायला लागते .

    पिंक हा सिनेमा पाहताना जाणवलेली अजून एक गोष्ट म्हणजे या सिनेमात अन्द्रिया या भूमिकेतून तिने केलेले एक वक्तव्य . ती कोर्टात सांगते कि " पुर्वान्चल ( North - East ) मधील मुलींबद्दल निष्कारण वेगळ्या आणि वाईट नजरेनेपाहिले जाते . " गेल्या काही काळात दिल्लीत त्यांच्या बाबत ज्या घटना घडत आहेत त्या हीच गोष्ट सिध्द करत आहेत . काही वर्षांपूर्वी आलेल्या शाहरुखखानच्या " चक दे इंडिया " मधे हॉटेल मधे घडणाऱ्या प्रसंगातही याची झलक होतीचकी ! अशा मुळे त्या निरागस व्यक्तींच्या मनात आपण काय प्रतिमा निर्माण करत असतो ! गेली सहा वर्षे ऑफीस टूर मुळे माझे अनेकदा पुर्वान्चल मधे जाणे होत असते . तेन्व्हाही हे मला प्रकर्षाने जाणवत असते . त्या सात राज्यांच्यावाढत्या विकासाचा भार प्रामुख्याने तिथल्या महिला वाहात असतात हे प्रत्येकाने सतत स्मरणात ठेवणे आवश्यक आहे . मोजक्याच उठवळ , उच्रुन्खल , नादान , हलकट माणसांमुळे संपूर्ण सज्जन सरळमार्गी समाजाला वेठीस धरण कधीचयोग्य नाहि . हा केवळ त्या भूभागातील मुलींना भेडसावत असलेला प्रश्न नाही . हा आपल्या संपूर्ण देशाच्या चारित्र्याचा प्रश्न आहे . विदेशी पर्यटकांना येणारा काहीवेळा अनुभव हा याच मालिकेतील कडी आहे . याला पायबन्द जसाकायद्याने बसेल , तसाच आणि तितकाच आपल्या सगळ्यांच्याच सततच्या सतर्कतेतून बसेल . अशीच संवेदनशीलता काश्मिर बाबतही हवी हे ओघानेच आले .

    हा प्रश्न जसा सामाजिक आहे आणि असतो ; तसाच आणि तितकाच आर्थिक , राजकीय ही असतो हे लक्षात घेतले कि त्याची आपल्या गुंतवणूकीच्या धोरणाबाबतीत असणारी समर्पकता वेगळी सांगण्याची आवश्यकता उरत नाही .

    अशा अनेक अर्थांनी , अनेक क्षेत्रात , अनेकदा . . . .

    No MEANS No .

    -- चंद्रशेखर टिळक
    C - 402 . राज पार्क
    मढवि बंगल्या जवळ, राजाजी पथ .
    डोम्बिवलि ( पूर्व ) ४२१२०१ .
    मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
    E-Mail . . . tilakc@nsdl.co.in

    २३ सप्टेंबर २०१६

    ( गुंतवणूक तुमची माझी ; भाग तेरावा )

  • तुम्हाला श्रीमंत व्हायचे की पैसेवाला ?

    मला नेहमी असं वाटायचं की जाम पैसा आला म्हणजे मनुष्य श्रीमंत होतो...

    नंतर नंतर माझ्या लक्षात आलं पैसा आला की तो "पैसेवाला" नक्की होतो पण "श्रीमंत" होतोच असं नाहीये...

    श्रीमंत या शब्दाची व्याख्या खुप मोठी आहे. वेदांमध्ये जी "श्री" नावाची देवता आहे ती लक्ष्मीपेक्षा थोडी निराळी आहे...

    श्री या संज्ञेत पैसा,यश, सौंदर्य, श्रेष्ठत्व, अधिकार, प्रतिष्ठा, उद्योगशीलता, सुस्वभावीपणा वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्यात अनुस्युत आहेत...

    फक्त पैसा नव्हे. हे लक्षात आल्यावर मी आसपासच्या काही मंडळींचं निरिक्षण केलं आणि माझ्या लक्षात आलं की खरोखरंच यार पैसेवाला आणि श्रीमंत या दोन अत्यंत निरनिराळ्या कन्सेप्ट्स आहेत...

    गंमत म्हणजे प्रत्येक श्रीमंत हा पैसेवाला होताच पण प्रत्येक पैसेवाला हा श्रीमंत नव्हता...

    अनेक पैसेवाले असे आहेत की ज्यांना पैशाची "फिकीर नाही"...

    अलोट आणि मुबलक पैसा आल्यावर त्या पैशाला शिस्तीचं वळण न लावल्यामुळे तो पैसा घरात लाथेलोटेसारखा असला तरी त्याला नियोजन नाही...

    बेफिकीरी, व्यसनाधिनता, उधळपट्टी, वागणूकीत अहंकार, बेशिस्त अनेक पैसेवाल्यांकडे पदोपदी दिसली मला...

    सगळीकडे झगमगाट होता पण त्या झगमगाटामागे दिखावा आणि माज होता...

    "मी किती महागाची स्कॉच पितो बघ" हे सांगण्यामागे ब्रॅन्डच्या कौतुकापेक्षा, पैशाच्या लेबलला जास्त व्हॅल्यु होती...

    ही खरेदी आणि बेफिकीरी घरातल्या इंटॆरिअरपासुन लहानशा खरेदीपर्यंत जिथेतिथे दिसते...

    सुसंस्कृतपणा खुप कमी पैशेवाल्यांकडे आहे. मुलं काय शिकतायत? यापेक्षा सगळ्यात भारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये घातलंय याचंच वारेमाप कौतुक...

    वाचनसंस्कृती, अभ्यासूपणा, विचारशीलता, सुसंस्कृतपणा याचा जिथेतिथे अभाव दिसत होता...

    पण याउलट माझ्या परिचयातील कित्येक श्रीमंत मंडळी ही खुपच निराळी आहेत.

    कुणाकडे स्वच्छतेची प्रचंड आवड तर कुणाकडे नेटकं आणि सुबक इंटेरिअर (अजिबात झकपक नाही), कुणाला पुस्तकांचं कलेक्शन करुन त्याची सुबक लायब्ररी करण्याचा छंद तर कुणाला Antic मूर्त्या आणि चित्रं जमवायचा छंद...

    कुणाला समाजसेवेची आवड तर कुणाला शेतीची हौस. आणि गंमत म्हणजे सर्व श्रीमंत हे अतिशय Down to earth आणि सुसंस्कृत विचारांचे आहेत...

    प्रत्येकाने संपत्तीचं उत्तम, Long Term नियोजन केलेलं आहे. रितसर कागदपत्रे, त्यांच्या फायली तयार आहेत. सरकारी करांचा भरणा व्यवस्थित केलेला असतो. कुठेही कसलाही Show Off नाही आणि बडेजाव तर त्याहून नाही...

    स्वत: केलेल्या समाजसेवेचं कौतुक तर अजिबात नाही.

    कोट्याधीशाकडच्या पार्ट्यांसोबत गरीबाकडच्या सत्यनारायणालाही आवर्जुन जातात.. कुठेही कसलाही भेदभाव नाही, Attitude तर औषधालाही नाही...

    उत्तम मोजकं आणि छान खाणं, भरपूर व्यायाम, सौंदर्याची निगा, मोजके पण सिलेक्टेड दागिने, अदबशीर बोलणं, वागणं... म्हणजे वेदातल्या "श्री" या संकल्पनेला अनुरुप असं परिपूर्ण श्रीमंत व्यक्तिमत्व ते हेच हो...

    आणि मग माझ्या लक्षात आलं की एकतर भरपूर मेहनत करुन, कष्ट करुन, उद्योग करुन किंवा मग लांड्यालबाड्या करुन, वाडवडीलार्जित जमिनी विकून "पैसेवाला" होता येणं कुणालाही सहज शक्य आहे पण "श्रीमंत" होणं हे एक कष्टसाध्य पण छान व सुंदर "मिशन" आहे...

    पैसेवाल्यांना श्रीमंत होणं अशक्य आहे असं मी अजिबात म्हणणार नाही.

    तो एक प्रवास आहे, विचारपुर्वक करण्याचा... तो करायलाच हवा. तुमचं पैसेवालं असणं हे सगळ्यांच्या दृष्टीने जितकं हास्यास्पद आहे तितकंच श्रीमंत होणं कौतुकास्पद आहे हे लक्षात घ्या...

    तुम्ही खूप श्रीमंत व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना...!!!

    जय हो...!!!

    हा लेख मी लिहीलेला नसून माझ्या वाचनात आला व आवडला म्हणुन पोस्ट करत आहे.