वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हा जरा वेगळा विषय आहे. नुकताच मी बालक पालक हा चित्रपट बघितला खूप छान वाटलं , जुन्या आठवणी जाग्या झाल्या, त्यावेळी इतके सगळे बिनधास्त नव्हते. पण एक जगण्यात मजा होती. त्यात एक सीन आहे मुले चोरून निळे चित्रपट बघतात ते ,
June 25, 2021
५०० व १००० च्या नोटा नुकत्याच रद्द झाल्या आणि मराठी भाषेला, विमुद्रीकरण--चलनबंदी-- नोटबंदी -- मुद्राबंदी इ. अनेक शब्द आणि " वैचारिक वाद" लाभले. अनेक वृत्तपत्रे आजसुद्धा फक्त याच विषयावरच्या " हेडलाईन्स" छापतायत. पण काही वर्षांपूर्वी भारतीय चलनातील
५० रुपयाची एक नोट चलनातून अत्यंत गुपचूपपणे काढून घेतली गेली. त्याचीच ही "नोटकथा" !
१९७५ मध्ये श्री.एम.नरसिंहम यांच्या सहीने चलनात आलेल्या ५० रुपयांच्या नोटेच्या मागील बाजूच्या चित्रात लोकसभेवरील भारतीय राष्ट्रध्वज गायब होता. नुसताच ध्वजदंड ( काठी) छापलेला होती. ही चूक फार गंभीर होती. त्यानंतरच्या आय.जी. पटेल व के. आर. पुरी यांच्या कार्यकालातही हा ध्वजदंड तसाच रिकामा राहिला. त्यानंतर गव्हर्नर पदी मनमोहनसिंग आल्यावर या नोटेवर पुन्हा ध्वज फडकला.
नंतर ५० रुपयांच्या या ध्वजविरहित नोटा अत्यंत गुपचूपपणे व्यवहारातून काढून घेण्यात आल्या. ना कसला गाजावाजा, ना कुठे परिसंवाद, हेडलाईन्स ! ही चूक झाल्यामुळे आणि ती निस्तरताना करदात्यांच्या किती कोटी रुपयांचा चुराडा झाला , हे कुणाला कळलेच नाही.
एखादी गोष्ट जर दोषपूर्ण असेल तर त्या गोष्टीला किंमत राहत नाही.जितकी चूक मोठी तितकी ती वस्तू निरुपयोगी ! पण टपाल तिकिटे आणि चलनी नोटांच्याबाबतीत हे अगदी उलटे आहे. जितकी चूक गंभीर तितकी त्याची किंमत अफाट वाढते. विविध साईट्सवर ५० रुपयांच्या या बाद नोटा, संग्राहकांसाठी आज खूप मोठ्या किंमतीला विकल्या जात आहेत.
५०० व १००० च्या नोटा जवळ ठेवायलाही बंदी आहे आणि या ५० रुपयांच्या नोटेची मात्र केवढी मिजास ? असते एकेकाचे भाग्य !
-- मकरंद करंदीकर
June 4, 2017
गंधर्व संगीत
श्री वरदविनायक सिध्दगणेशा
हे मंगलमुर्ती हे श्रीगणराया
घेऊनी सोबत सप्तसुरांना
यावे तुम्ही हो श्रीगणराया ।
शब्द माझीया हृदयी वसती
अर्थ शब्दांना तुम्हीच द्यावा
द्यावे सूर तुम्ही मम शब्दांना
संगीतही द्यावे त्यांना गाया ।
नाही सूर अन् नाही संगीत
काय अर्थ मग मम शब्दांना
करितो विनती हात जोडूनी
सूरसंगीत तुम्ही द्या गणराया ।
देता संगीत तुम्ही मम शब्दांना
सूर मिळेल गंधर्वांचा त्यांना
यास्तव विनती हे गौरीनंदना
झडकरी या हो श्रीगणराया ।
सुरेश काळे
मो.9860307752
सातारा.
१४ जुलै. २०१८
July 26, 2018
शुद्ध मराठीचा आग्रह हा दुराग्रह होऊ नये, कारण त्यामुळे कदाचित सामान्य माणूस भाषेपासून दूर पळण्याचा धोका आहे. आजची तरुण पिढी अशुद्ध मराठी लिहिते असा नेहमीच आरोप केला जातो. पण असे का याचा विचार कोणी केलाय का?
June 24, 2017
श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. पावसाने समुद्राला उधाण आलेले असते त्या प्रीत्यर्थ समुद्राला नारळ अर्पण करतात हा प्रमुख विधी आहे. या दिवशी नारळाचे पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य अर्पण करतात. या सणाचे महत्त्व विशेष करून समुद्रकाठच्या भागात जास्त आढळते. नारळी पौर्णिमेनंतर कोळी मंडळी समुद्रात मच्छीमारीस जातात. त्याप्रित्यर्थ समुद्राचे पूजन करतात.
-श्री करंदीकर गुरुजी
August 30, 2023
समाजात कश्या कश्याचे लोण आणि फॅशन येईल हे काही सांगता येत नाही. समलिंगी संबंधात काही भारतीय पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करीत आहेत. आपण कोणाबरोबर काय करतो, कुठे आणि काय बोलतो याचे जरासुद्धा भान नसते. परकीय देशांत समलिंगी संबंधाला मान्यता आणि कायदा केला असला तरी ही भारतीय संस्कृती नाही आणि भारतात कुठल्याही धर्माची मान्यताही नाही. मानव, पशु, पक्षी, आणि किटकांची वंशवृद्धी सातत्याने आणि निकोप वाढीसाठी भिन्नलिंगी स्त्री-पुरुषांची परमेश्वराने निर्मिती केली. याचाच अर्थ त्यालासुद्धा समलिंगी संबंध अभिप्रेत नाहीत.
March 18, 2012
भारताचं अतिपूर्वेचं राज्य अरुणाचल प्रदेश. त्याच्या सीमेपर्यंत रेल्वेनं जायचं म्हणजे ६० ते ६५ तासांच्या प्रवासाची मानसिक तयारी असावी लागते. हे अतिपूर्वेकडील सर्वांत मोठं राज्य. त्यातच हा चिनी सरहद्दीवरील संवेदनशील प्रदेश. दुर्दैवानं, या ठिकाणी अजूनही रेल्वेचा मागमूसही नाही, घनदाट जंगलांनी संपन्न असलेल्या या अरुणाचल प्रदेशमधील लाकडापासून रेल्वेच्या रुळांमधील स्लीपर्स बनविले जातात. किंबहुना, संपूर्ण भारताच्या रेल्वेलाईनची मदार एक वेळ त्यावर अवलंबून होती; सिमेंटचे स्लीपर्स हे आता आलेले आहेत. अशा या आसाममधील सर्वांत शेवटचं स्टेशन दिब्रुगड. इथून अरुणाचलमध्ये बस, मोटार वा नदीमधून मोटरबोटीने शिरावं लागतं. त्याकरता 'इनर लाईन परमिट' घ्यावं लागतं.
अरुणाचल प्रदेशाची संपूर्ण माहिती गोळा करत आम्ही आठ जणांनी रेल्वेनं दिब्रुगडपर्यंत जाण्याचं ठरविलं. हा प्रवास आरामात करायचा व जलद गाड्या पकडायच्या असंही ठरलं. मुंबई ते दिल्ली व दिल्ली ते दिब्रुगड अशा दोन राजधानी एक्सप्रेसनी प्रवासनियोजन केलं. मुंबई-दिल्ली १७ तास, ६ तास दिल्ली स्टेशनवर थांबणं, असं करत दिल्ली ते दिब्रुगड ४० तास, असा हा एकूण प्रवास काळ ६३ तासांचा होता.
भारतात राजधानी एक्सप्रेसचं युग साधारण ३५ ते ४० वर्षांपूर्वी सुरू झालं. प्रथम मुंबई-दिल्ली व कलकत्ता-दिल्ली या दोन गाड्या सुरू झाल्या आणि हळूहळू प्रत्येक राज्याच्या राजधानीतून एक वा दोन गाड्या दिल्लीपर्यंत धावण्यास सुरुवात झाली. या गाड्या सुरू झाल्या तेव्हा त्याबाबत अनेक उलट-सुलट मतं पेपरमध्ये येत होती, पण आता राजधानी एक्सप्रेस गाड्या ह्या भारतीय रेल्वेवरील सर्वांत मानाच्या व कायम मागणी असलेल्या गाड्या आहेत. नवी दिल्ली स्टेशनमध्ये लालचुटूक व पिवळसर रंगाच्या डब्यांच्या गाड्यांची सतत ये-जा चालू असते. संपूर्ण वातानुकूलित (ए.सी.) गाडीला जनरेटर्स. चहा-नाश्ता, लज्जतदार जेवण यांचा समावेश तिकिटातच असल्यामुळे प्रत्येक प्रवासी हा आनंद मनसोक्त लुटत असतो. मुंबई-दिल्ली राजधानी ५०० ते ६०० कि.मी. अंतर न थांबता धावत असते. या मार्गावर आता जर्मनीत बांधलेले डबे आहेत. त्यांत काही सोयी जास्त आहेत, पण भारतात बांधलेले डबेच लोकांच्या जास्त पसंतीस येतात.
या गाडीचा पहिल्या वर्गाचा प्रवास म्हणजे जेवणा-खाण्याची चंगळच असते. घडीची टेबलं मांडून खाण्याच्या पदार्थांचा मारा रेल्वे कर्मचारी तत्परतेने व प्रेमाने करत असतात. झोपण्याचे बर्थ अगदी आलिशान आहेत. धांदलीत विमानाने प्रवास करण्यापेक्षा हा प्रवास सुखद अनुभवाचा आहे.
राजधानी एक्सप्रेसने दिल्ली ते दिब्रुगड प्रवास ४० तासांचा, दोन रात्रींचा!
दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, आसाम, अशी राज्ये ओलांडत जाताना प्रत्येक राज्याची विविधता पाहता येते. या गाडीतील प्रवासीसुद्धा वेगवेगळ्या ढंगांचे! त्यांच्या निरनिराळ्या भाषा प्रवासभर कानांवर पडत असतात. लखनौ, मुगलसराई, बरौनी, न्यु जलपईगुरी, गौहत्ती, अशा भव्य स्टेशनांवर तिला थांबे आहेत. गौहत्ती येण्याअगोदर विशाल ब्रह्मपुत्रेवरील १।। कि.मी. लांबीचा अतिभव्य -कम-मोटाररोड ब्रिज पाहून आपण अवाकच होतो. ब्रिजवरून जाताना गाडीच्या कानांत घुमणाऱ्या कर्कश आवाजाची लय, खोलवर दिसणारं नदीचं संथ पात्र, हे सर्व व्हिडिओमध्ये घेण्याकरता आम्ही दोघे मित्र एकमेकांना घट्ट पकडून दारात उभं राहून शूटिंग केलं होतं. तो एक अविस्मरणीयच अनुभव होता.
गौहत्ती ते दिब्रुगड हा संपूर्ण रात्रभराचा प्रवास. यावेळी गाडी अतिशय कमी वेगात जाते. हा संपूर्ण प्रदेश अशांत आहे आणि त्यात एकेरी मार्ग (सिंगल लाईन)! हा प्रवास करून पहाटे ५ वाजता न्युतीनसुखिया स्टेशनवरील एका छोट्या स्टॉलवरच्या गरम वाफाळलेल्या चहाची लज्जत औरच होती. रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंनी हिरवीगार भातशेती, मध्यात माशांच्या पैदाशीकरता तयार केलेली छोटी तळी, बांबूंवर उभारलेल्या छोट्या झोपड्या, मधून जाणाऱ्या लालचुटुक मातकट पाऊलवाटा, क्षितिजाला भिडलेल्या हिरव्यागार डोंगररांगा, मध्येच भुरभुरणारा पाऊस, काही रस्त्यांच्या कडेनं झालेला चिखलाचा रबाडा. निसर्गाचं असं वेगळं, अविस्मरणीय दृश्य पाहत ३९०० कि.मी.चा प्रवास दिब्रुगडमध्ये पुरा झाला. हा प्रवास पूर्ण केला, की भारताच्या दुसऱ्या टोकाला पावलं लागल्याचा आनंद ओसंडून वाहतो. केवढा पसरलेला भारत आणि त्याच्या कानाकोपऱ्यांत पोहचणारी भारतीय रेल्वे! ६५ तासांच्या प्रवासाचा शिणवटा अजिबात जाणवत नाही. पावलं समाधानानं विशाल ब्रह्मपुत्रेच्या काठाकडे वळतात.
-डॉ. अविनाश वैद्य
June 25, 2022
अहंकार हा शब्द केवळ शब्द म्हणून मनात ठेवला तर त्याची बाधा होत नाही.
October 15, 2021
७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना ही युनोची एक विशेष शाखा आहे. ७ एप्रिल १९४८ मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेमध्ये जगातील जवळ जवळ १९२ देशांचा सहभागी झाले. लोकांच्या आरोग्यविषयक जास्तीतजास्त समस्यांकडे लक्ष पुरवणे हे या संघटनेचे मूळ उद्दिष्ट आहे. संघटनेची आरोग्यविषयक कल्पना केवळ रोग व त्यावरिल उपाय यावरच मर्यादित न रहाता त्यामध्ये मानसिक, शारीरिक आरोग्याबरोबरच सामाजिक आरोग्याचाही विचार केला जातो. जगात सहा ठिकाणी यासंघटनेची कार्यालये आहेत. द्क्षिण अमेरिकेत ब्राझिल, युरोपमध्ये कोपेनहेगेन डेन्मार्क, दक्षिण पूर्व आशियात दिल्ली, अमेरिकेत वॉशिंटन, आशियात इजिप्त, आणि पश्चिमेला फिलिपिन्स अशा सहा ठिकाणी ही कार्यालये आहेत. नविन वैद्यकीय शोधांना मदत पुरविणे, रोग निवारण व रोगनियंत्रण यासाठी वैद्यकीय मदत पुरविणे, लोकांना आरोग्यविषयक सोयीसुविधांबाबत माहिती पुरवणे, लोकांमध्ये आरोग्य विषयक जागृती निर्माण करणे, इत्यादि कामे या संघटनेमार्फत केली जातात. सात एप्रिल हा संघटनेचा स्थापना दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी एक विषय निवडला जातो; त्यासंदर्भात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चर्चा, परिसंवाद, पथनाट्य, फिल्म्स, प्रसारमध्यमे आदिमार्फत त्याविषयाबाबत लोकांत जागृती निर्माण केली जाते. हे वर्ष हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने मधुमेह वर्ष म्हणून घोषित केलं आहे. येत्या काही वर्षात मधुमेहाचा धोका वाढत चालला आहे. वेळीच जनतेची जागरूकता झाली नाही तर २०३० पर्यंत हा आजार सर्वात मोठा आजार ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मधुमेह होऊच नये किंवा मधुमेह झाल्यावर काळजी कशी घ्यायची याविषयी प्रत्येकाने जनजागृती मोहीम राबवली पाहिजे. मधुमेहाविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढवणं गरजेचं आहे. आजार कुठे होतो, कसा होतो, याविषयी आपण काहीच सांगू शकत नाही. त्याला काही स्थळ आणि काळाच्या मर्यादा नाहीत. कित्येकांना तर आपल्याला हा आजार आहे याविषयीही अजिबात माहिती नसते. हा आजार असाच वाढत राहिला तर वैयक्तिक, सामाजिक आणि आर्थिक पातळीवर तो अतिशय खोलवर परिणाम घडवू शकतो. बैठं काम करण्याची जीवनशैली असलेली मंडळी साखर, मीठ आणि चरबीयुक्त पदार्थाचं सेवन करतात अशा लोकांना मधुमेहाचा धोका अधिक असतो. अतिरिक्त वजन आणि व्यायामाचा अभाव यामुळे ९० टक्के लोकांना टाइप २ चा मधुमेह होतो. खरं म्हणजे कोणत्याही प्रकारचा मधुमेह बरा होऊ शकतो. फक्त तो लवकर समजणं गरजेचं आहे. या आजाराचं निदान लवकर झालं नाही तर तो शरीराच्या कोणत्याही मुख्य अवयवाला धोका पोहोचवू शकतो. परिणामी हृदयविकार, स्ट्रोक्स, अंधत्व किंवा चेतासंस्थेला इजा पोहोचू शकते. म्हणूनच हा आजार होऊच नये म्हणून आपण स्वत: काही पावलं उचलणं आवश्यक आहे.
सकस आहार आणि शर्करायुक्त पेय कटाक्षाने टाळणं आवश्यक आहे. तसंच आपल्या अवयवांकडेही लक्ष दिलं पाहिजे. आपण किती खायला घेतो यापेक्षा आपण खातोय ते किती पौष्टिक आहे याकडे लक्ष द्यावं. थोडक्यात आपण सेवन करत असलेल्या पदार्थातून आपल्या शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा आहारातून मिळते की नाही, यावर लक्ष ठेवायला हवं. त्याचप्रमाणे दररोज ३० मिनिटं नियमित चालणं आणि आठवडयातून किमान पाच वेळा तरी वजन वाढणार नाही याकडे लक्ष देणं आवश्यक असतं.
रक्तात साखरेचे प्रमाण वाढले तर काय होते?
मधुमेहामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका अधिकच वाढतो. ५० टक्के मधुमेही रुग्णांच्या मृत्यूचे कारण हे हृदयविकार आणि पक्षाघात आहे. रक्तात वाढलेली साखर आणि कमी झालेला रक्तपुरवठा यामुळे चेतापेशींना इजा होते. त्यामुळे पायांची संवेदना कमी होते. जखमा झाल्यानंतर जंतुसंसर्ग वाढतच जातो आणि प्रसंगी पायदेखील कापावा लागतो. जगातील अंध लोकांपैकी १ टक्के अंधत्व हे मधुमेहाच्या दृष्टिपटलावरील परिणामामुळे होते. मूत्रपिंड निकामी होऊन डायलिसिस करायला लागण्याचेदेखील महत्त्वाचे कारण मधुमेह हे आहे. मधुमेहासाठी लागणाऱ्या उपचारांचा खर्चदेखील बराच जास्त आहे. २०११ मध्ये भारताचा ३८ अब्ज डॉलर्स एवढा खर्च केवळ मधुमेहामुळे झाला. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या अहवालानुसार भारतासारख्या विकसनशील देशामध्ये साधारण कुटुंबाचे जवळपास २५ टक्के उत्पन्न फक्त मधुमेहाच्या उपचारांसाठी खर्च होते. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी हे एक मोठे आव्हान आहे.
या मागची कारणे कोणती? मानवाने नेहमीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली आहे. मग ती आर्थिक, सामाजिक किंवा भौतिक असो. या धावपळीमध्ये काही अपरिहार्य बदल माणसाच्या जीवनशैलीमध्ये झाले. शारीरिक हालचालींचा अभाव, स्निग्ध आणि अतिगोड पदार्थाचे अतिरिक्त सेवन, वरचेवर वाढत चाललेला ताणतणाव, शारीरिक स्थूलता आणि वाढलेली आयुर्मर्यादा यांमुळे मधुमेहाच्या प्रमाणामध्ये अधिकच भर पडत आहे.
पहिल्या प्रकारच्या मधुमेहाची नेमकी कारणे निश्चित नसल्यामुळे त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आव्हानात्मक आहे. पण दुसऱ्या प्रकारचा मधुमेह हा प्रतिबंधात्मक उपायांनी नियंत्रित करता येऊ शकतो. वाढत्या वजनावर नियंत्रण, नियमित योग्य व्यायाम, योग्य वेळी योग्य पोषक आहार, आरोग्यदायी दिनचर्या व निव्र्यसनी जीवनशैली यांमुळे मधुमेहापासून स्वत:चा बचाव करता येतो.
मधुमेह हा आजार आणि त्यामुळे होणाऱ्या गुंतागुंतींची व्यापकता लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने या वर्षी जागतिक आरोग्य दिनाची मध्यवर्ती कल्पना/बोधवाक्य हे त्याच्याशी निगडित ठेवली आहे. ती म्हणजे ‘उत्कृष्ट राहा; मधुमेहावर मात करा!’ उत्कृष्ट राहा यामध्ये-मधुमेहाचा वाढता प्रभाव थांबवणे, सक्रिय राहणे, आरोग्यदायी खाणे, वैद्यकीय सल्ला पाळणे आणि जर शंका आली तर स्वत:ची तपासणी करून घेणे या सर्व बाबी समाविष्ट आहेत.
येणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या संकटावर मात करून अखंडपणे भव्यतेच्या दिशेने वाटचाल करणे हा मानवजातीचा गुणधर्म आहे. या झटपट बदलणाऱ्या काळामध्ये वातावरणात अचानक होणारे बदल, वाढती पाणीटंचाई यांसारख्या समस्यांबरोबरच आरोग्याकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे. असे केले तरच मानवाचा विकास शाश्वततेच्या दिशेने होईल.
मधुमेहाचं त्वरित निदान झाल्यास आणि नियमांचं काटेकोरपणे पालन केल्यास मधुमेहामुळे निर्माण होणा-या समस्यांना आपण ताब्यात ठेवू शकतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
April 7, 2017
१८९५ मध्ये पहिले रंगीत व्यंगचित्र द यलो कीड प्रकाशित झाले होते, त्याची आठवण आणि व्यंगचित्रकलेचा गौरव म्हणून ५ मे हा जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
May 22, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti