वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
देशभरात अत्यावश्यक सेवांसाठी असलेला ११२ हा एकमेव नंबर नव्या वर्षात कार्यान्वित झालाय.
पोलीस, अॅम्ब्युलन्स, अग्निशमन दल या सगळ्या सेवांसाठी ११२ हा एकमेव इमरजन्सी नंबर असेल. पोलिसांसाठी १००, अग्निशमन दलासाठी १००, ऍम्ब्युलन्ससाठी १०२ आणि आपत्कालीन संकटासाठी १०८ हे क्रमांक होते. मात्र आता एवढे नंबर लक्षात ठेवण्याची गरज नाही. केवळ ११२ हा नंबर डायल केल्यास या सगळ्या अत्यावश्यक सेवा उपलब्ध होणार आहेत.
ट्रायने हा प्रस्ताव टेलिकॉम मंत्रालयापुढे ठेवला होता. अमेरिकेतील ९११ आणि इंग्लंडमधील ९९९ या इमरजन्सी नंबरच्या धर्तीवर भारतातही ११२ हा एकच इमरजन्सी नंबर असणार आहे.
तुमचं सिमकार्ड किंवा लँडलाईन नंबर काही काळासाठी बंद असेल किंवा आऊटगोईंग बंद असेल, तरीही हे ११२ या क्रमांकावर तुम्ही कॉल करु शकाल. त्याचप्रमाणे एसएमएसद्वारेही ही सुविधा उपलब्ध असेल. लोकेशन ट्रेस करुन तुमच्या गरजेनुसार संबंधित विभागाकडून मदत केली जाईल. त्याचप्रमाणे पॅनिक बटणवर ११२ नंबर सेव्ह करता येईल.
लोकमान्य टिळक लहानपणी म्हणाले होते.
"मी शेंगा खाल्ल्या नाहीत... मी टरफलं उचलणार नाही"
आता बाकीच्या व्यक्ती काय म्हणाल्या असत्या बघा:
महात्मा गांधी:
"मी शेंगा खाल्ल्या आणि मीच टरफलं उचलणार आणि दुसर्याने शेंगा खाल्ल्या तर ती पण टरफलं मीच उचलणार"
बाळासाहेब ठाकरे:
"यांच्या बापाचा माल आहे काय? शेंगा फ़क्त मराठी माणसालाच खायला मिळाल्या पाहिजेत आणि खाताना टरफलं सांडली तर त्याला सरकार जबाबदार असेल"
जय महाराष्ट्र!
शरद पवार:
"महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य असल्याने कुणी कुणाला शेंगा खाण्यापासून रोकू शकत नाही...
यात शेतकरयांचं भलं आहे आणि उरलेल्या टरफलांपासून alcohol बनवता येईल का याबद्दल विचार करण्यासाठी सरकार लवकरच समिति नेमेल"
नरेंद्र मोदी:
"मित्रोंssss....
शेंग खाने का वर्णन तो हमारे वेदों में भी किया हुआ है....
चाहे हिन्दू हो या मुस्लिम या सीख़ हो या ईसाई हो सबने शेंग खानी चाहिए...
और सबने अपने आसपास का टरफल उठा के भारत को स्वच्छ रखना चाहिए"
सोनिया गांधी:
"अमने चार साल पहले एक सपना देका ता की देश के हर एक नौजवान को शेंग खाने का मौका मिलना चाइये...
और कांगरेस ने ये सपना पूरा किया.
और "
दिग्विजय जी ये तरफल कौन सा फल होता है??"
दान्यवाद...
मनमोहन सिंह:
"..........
...........
...........
...........
...........
............
.....!!!"
देवेन्द्र फडणवीस:
"हे बघा....
महाराष्ट्रात शेंगा खायच्या की नाही याचा निर्णय आम्ही आदरणीय मोदीजींना विचारून उदया जाहिर करू आणि टरफलांबाबत नाथाभौ काय ते लवकरच सांगतील"
नितिन गडकरी :
"विदर्भाच्या लोकांवर वेळोवेळी अन्याय झाला आहे त्यामुळे आता आम्हाला खाण्यासाठी आमच्या वेगळ्या शेंगा पाहिजेत आणि टरफलांपासून आम्ही ऊर्जा निर्मिति करता येईल का याचा विचार करू "
किरीट सोमय्या:
"या चेंगा काण्याच्या कामात प्रछंड ब्रष्टाचार जाला आहे असा माजा पश्त आरोप आहे आणि प्रमाणा पेक्चा जास्त तरफलं जमा केल्याबद्दल बुजबलांना अटक ज़ालीच पायजे"
छगन भुजबळ:
"या शेंगा आमच्या वडिलोपार्जित असुन माझ्याकडे सर्व शेंगा आणि टरफलांचा हिशोब आहे आणि शेंगा खायचा निर्णय सर्वांचा असताना मला एकट्यालाच लक्ष्य केले जात आहे तरीही मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे"
अण्णा हजारे:
"हे पहा असं आहे की ....
या शेंगांच्या कामात खुपच अनियमितता आढळून येत आहे ,एका शेंगेत एकच दाणा दुसऱ्या शेंगेत तीन तर तिसरीत दोन....
आणि टरफलं पण अतिशय निकृष्ट दर्जाची आहेत....
तर असं आहे आणि याची चौकशी तर झालीच पाहिजे नाहीतर मी उपोषणाला बसणार"
उद्धव ठाकरे:
"आदरणीय बाळासाहेबांच्या विचारांचे पालन आम्ही करू आणि सर्व शिवसैनिकांना शेंगा खाणे बंधनकारक करू आणि टरफलां बाबत संजय राउत "सामना" मध्ये लिहितील"
राज ठाकरे:
"या सर्व परप्रांतियांनी इथे येऊन शेंगांचे भाव वाढवून ठेवलेत आता काय करायचं आपल्या मराठी मुलांनी, सरकारला मराठी मुलांसाठी शेंगा राखीव ठेवल्याच पाहिजेत नाहीतर राज्यभर खळ्ss खट्याक होईल....
आणि टरफलं फेका त्या अबु आजमी च्या बंगल्या बाहेर...
जय महाराष्ट्र"
अबु आजमी:
"देखिये इस्लाम में किधर भी नहीं लिखा है की मुस्लिमो ने शेंग खाना जरुरी है.....
और ये टरफल क्या होता है
मुझे नहीं पता"
अजित पवार:
"ज्या शेतात या शेंगा आढळून आल्या, ते शेत माझ्या मालकीचं असल्याचा खोटा नाटा आरोप उगाचच होतोय...
आरोप सिदध झाल्यास शेंगा खायच् सोडून देईल"
तटकरे:
"जसं दादा म्हणतिल,
तसं"
राहुल गांधी:
"देखो भैया...
आज देश का गरीब क्या चाहता है ...
वो खाली शेंग ही तो खाना चाहता है ...
और ये सरकार क्या कर रही है ...
हमारे सामने टरफल फेक रही है ....
हमे इसके खिलाफ आवाज उठाना चाहिए....
बोलो हाँ - आवाज उठाना चाहिए ..."
रामदास आठवले:
"मी नक्की खाणार शेंगाsss...
"मी नक्की खाणार शेंगाsss...
कॉँग्रेस-राष्ट्रवादीला देणार ठेंगा...
और किसीने टरफलं नहीं उचल्या...
और किसीने टरफलं नहीं उचल्या...
तो विनाकारण करुंगा मैं दंगा ."
साध्वी प्राची:
"हर हिंदु ने चार चार गोनी शेंग खानी ही चाहिए और जिसको नहीं खानी वो पाकिस्तान चला जाये"
अरविंद केजरीवाल:
"सुनो भई....
ये शेंग खाने का सवाल नहीं है ...
ये आम आदमी के हक़ का सवाल है ..
और कोई अगर आपको दिल्ली में शेंग खाने के लिए मना करे तो हमारे helpline पर फोन करो...
और इस काम में अण्णाजी भी हमारे साथ है"
निखिल वागळे:
"भाई जगताप तुम्ही शांत रहा....
मी शेंगा खायच्या की नाही याबाबत प्रेक्षकांची मतं मागवणार आहे आणि टरफलांचा विषय आपण ब्रेक नंतर घेऊ...
पाहत रहा point blank"
प्रसन्न जोशी:
"एकूणच काय...
तर शेंग खाण्यापासून सुरु झालेला हा विषय गंभीर वळणावर येऊन पोचलाय, बघुया सरकार काय करतय ...
तुर्तास येथेच थांबूया,
तुम्ही बघत राहा
ABP माझा..!"
सकाळी लवकर उठायचे......
रोज किमान अर्धा तास तरी व्यायाम व योगासने करायची...
रोज आंघोळ करायची........
रोज किमान दोन किलोमीटर तरी चालायचे.....
आहारावर व खाण्यावर नियंत्रण ठेवायचे, तेलकट, तुपकट & गोड पदार्थ(?) कमीच करायचे.....
खर्च कमी व सेव्हीँग जास्त करायचे.......
स्वदेशी वस्तुच जास्त वापरणार..........
रोज एखादे चांगले काम करायचे............
रोज रात्री फेसबुक व Whattsup वर कमी व निद्रेमध्ये जास्त रहायचे........
जिमला नियमितपणे जायचे.......
रोज सकाळी पेलाभर गरमलिंबुपाणी प्यायचे.....
चांगले पुस्तक आणि कविता वाचतच झोपायचे....
लिफ्टचा वापर कमी करत जिन्यानेच वर जायचे....
रोज पाच ईँग्रजी शब्द पाठ करायचे.....
रोज किमान 15 मिनिटे तरी वर्तमानपत्र वाचायचे.....
गाडी चालवताना मोबाईल वापरायचाच नाही.....
रोज सकाळी ऑफीसला जाताना एकाला तरी लिफ्ट द्यायची..
रोज घरातले एक तरी काम करायचे.....
आठवड्यातुन एकदा तरी घर आवरायला आईला मदत करायची......
नातेवाईकांना महीन्यातुन एकदा तरी कॉल करायचा.....
रोज आंघोळ झाल्यावर (?) एक जपमाळ करायची आणि एक आवडते स्तोत्र वाचायचे.".....
हे असे अनेक संकल्प आपल्या सभोवतालची हिंदु माणस ख्रिस्तींच्या "न्यु ईयर"ला करतात. (सर्वधर्मसमभाव )
पण या संकल्पाशी वर्षभर कितीजण प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहतात देवच जाणे.
-- विवेक जोशी
केवळ महिलाच भागीदार असणारा “जगातील “एकमेव गृहउद्योग
आज ४६ वर्षे झाली ’नटसम्राट’ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला.
२३ डिसेंबर १९७० रोजी धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, मा.वि. वा. शिरवाडकर लिखित व मा.पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ’नटसम्राट’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला. या नाटकातील नटसम्राट गणपतराव ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक वर्षे रंगवली. ही भूमिका करण्याची संधी मिळणे ही मराठी नाट्याभिनेत्यांची उत्कट इच्छा असते. ही भूमिका करणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे असे समजले जाते. श्रीराम लागूंनंतर मा.सतीश दुभाषी, मा.उपेंद्र दाते, मा.यशवंत दत्त, मा.चंद्रकांत गोखले, मा.दत्ता भट, मा.मधुसूदन कोल्हटकर, मा.राजा गोसावी, मा.गिरीश देशपांडे मा.नाना पाटेकर यांनी नटसम्राट मधील अप्पासाहेब बेलवलकर रंगवले आहेत.
नटसम्राट हे नाटक मुळात विल्यम शेक्सपियरच्या एकाहून अधिक अजरामर कलाकृतींवर बेतले आहे. मूळ नाट्यांशांचे ते भाषांतर किंवा रूपांतर नाही. असे असले त्या कथानकांना वि.वा.शिरवाडकरांनी आपल्या प्रतिभेने विस्तारले आणि मराठीत एक एकमेवाद्वितीय नाटक अवरतरले. या नाटकाला रंगभूमीवर येऊन दशके लोटली, पण नाटकाचे नावीन्य अजून ओसरलेले नाही.
या नाटकाच्या प्रयोगात अप्पासाहेब बेलवलकारांची भूमिका करणाऱ्या नटाला मानसिक थकवा येतो. असे असून २७ ऑगस्ट २०१३ या दिवशी सकाळी पावणेसहा वाजता सुरू झालेले आणि एकापाठोपाठ सलग चाललेले ’नटसम्राटचे’ एकाच नटसंचातले एकूण आठ प्रयोग २८ ऑगस्टच्या दुपारी दीड वाजता संपले. हे प्रयोग पुण्याच्या बालगंधर्व मंदिरात एकूण ३१ तास ४५ मिनिटे चालले होते. हा बहुधा जागतिक विक्रम असावा. ’तीर्थराज’, ’रंगमैत्री’ आणि दादा कोंडके फाउंडेशन यांनी हे प्रयोग रंगमंचावर सादर केले होते. गिरीश देशपांडे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते व अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिकाही केली होती. मराठी रंगभूमीवर आपल्या कथा आशयाने अजरामर ठरलेले नटसम्राट हे नाटक आता मराठी चित्रपटाच्या रूपातही आपल्यासमोर आला आहे. नाना पाटेकर निर्मित आणि अभिनीत ‘नटसम्राट’ हा चित्रपट. हा चित्रपट १ जानेवारी २०१६ ला प्रदर्शित झाला आहे. आपल्या अभिनयाने अनभिषक्त सम्राटाची पदवी मिळवलेला अभिनेता नाना पाटेकर या सिनेमात प्रसिद्ध आप्पासाहेब बेलवलकर यांच्या भूमिकेत दिसले आहेत. या नाटकातील एका वाक्याने अवघ्या मराठी जनमानसावर आपला ठसा उमटवला आहे. ते वाक्य म्हणजे 'कुणी घर देता का घर...’
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
नवा भारत घडवण्यासाठी देश सज्ज मात्र विरोधी पक्ष अजूनही जुन्या मानसिकतेत .काळानुसार बदला नाहीतर मोडून पडाल हा संदेश गेला आहे .
८ नोव्हेंबर २०१६ ही तारीख स्वतंत्र भारताच्या आर्थिकइतिहासात कशी नोंदवली जाईल हे आत्ताच सांगणे कठीण आहे . मात्र यादिवशी त्यावेळी चलन - वलनात असणाऱ्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांची कायदेशीरमान्यता काढूनघेण्यात आली या गोष्टीची चर्चा नक्कीच होईल . सरकारी पक्षाचे समर्थक त्याचे वर्णन " धाडसी "असॆ करत असताना विरोधक त्याची हेटाळणी "आक्रस्ताळ " असं करणार .
पण एक गोष्ट मात्र नक्की की ८ नोव्हेंबर २०१६ नंतरप्रत्येक नागरिकाला आपल्या स्वतःच्या खर्चाबद्दल विचारकरायची वेळ आली आहे . असा विचार एखादा खर्चकरावा का , केला तर आत्ताच केला पाहिजे का , आत्ताचकेला तरइतका करावा का या पैलूंबाबत तर करावालागत आहेच ; पण त्याचबरोबर तो कशा पध्दतीने करावाअसा खर्चाच्या माध्यमाच्या अंगानेही करावा लागत आहे .
कोणत्याही खरेदीचा मोबदला रोख रकमेत द्यायचा ,चेकने द्यायचा , ग्राहकांच्या बँक खात्यातून पुरवठादाराच्याबँक खात्यात पैसे पाठवायला सांगायचे , क्रेडिट कार्ड -डेबिट कार्डच्या माध्यमातून द्यायचा की " paytm "सारख्यातुलनेने नवीन अशा पद्धतीचा वापर करायचा हेहीठरवावे लागेलच . या सर्व पद्धतीपैकी रोखिने पैसे देणे हाअपवाद वगळल्यानंतर जे काही मार्ग उरतात ते सर्वचम्हणजे रोकड - विरहीत ( आपल्या नेहमीच्या वापरातीलमराठीतसांगायचे तर " कॅशलेस " ) पद्धत . या मार्गानेज्या अर्थव्यवस्थेत बहुतांश व्यवहार होतात ती रोकड -विरहीत अर्थव्यवस्था ( म्हणजेच " कॅशलेस एकॉनमी ) .अशा अर्थव्यवस्थेत आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचेरुपांतर करण्याचामानस तेंव्हापासून सतत व्यक्त केलाजात आहे . जगातील अनेक देशात , विशेषतः युरोपीयदेशांत , असॆ व्यवहार , अशा अर्थव्यवस्था असण्याचेदाखले वारंवार दिले जातात . त्यातच ८ नोव्हेंबर २०१६च्या नोटा - बदलीचा मोदीसरकारच्या निर्णयांची सांगडकाळा पैसा , भ्रष्टाचार , दहशतवाद यांच्याशी घातलीगेल्याने तर कॅशलेस अर्थव्यवस्था याबाबत कशी आणिकिती उपयोगी पडेल , पडू शकेल असाही पदर त्याचर्चेला साहजिकच आहे .
या निर्णयाला पार्श्वभूमी म्हणून अर्थक्रान्ती चळवळ आहे .मोठ्या नोटा रद्द करणे ही जशी या चळवळीची मुख्यमागणी आहे , तशीच बहुतांश व्यवहार बँक - माध्यमातूनव्हावे आणि असॆ बँक व्यवहार हाच कर - आकारणीचापायाव्हावा अशी सत्शील मागणी ही सालस - निरलसमंडळी गेली दिड - दोन दशके सातत्याने करीत आलीआहेत . रोखिच्या व्यवहारात न उरनारा मागोवा बँकव्यवहारात मात्र नक्कीच राहातो आणि सध्याच्या तांत्रिक -संगणकीययुगात तो प्रदीर्घ काळ टिकतो . त्यातूनचकोणत्याही व्यवहारांची केंव्हाही शहानिशा , पडताळणीशक्य होत असल्याने गैरमार्गाने जाऊ इच्छित असलेल्यांनाकाही प्रमाणात तरी नक्कीच पायबन्द बसेल अशी भूमिकायाबाबत मांडलीजाते . यांतून भ्रष्टाचार जरी अगदी शून्यपातळीवर आला नाही तरी काटेकोर अंमलबजावणीमुळेतो नगण्य पातळीवर नक्की येऊ शकतो .
मुळातच कोणताही घोटाळा किंवा भ्रष्टाचार हा " Neither prescibed , nor prohibited " अशा स्वरूपातअसण्याची शक्यता असते . कायदा किंवा नियम मात्रprescribed , prohibited असाच असावा लागतो .असतो .कारण सरतेशेवटी भ्रष्टाचार हा मनात असतो ,व्यवस्थेत नाही . भ्रष्ट मन व्यवस्था वाकवण्याचे मार्गशोधत राहाते . त्याबाबतच्या संधी , शक्यता , प्रेरणा कमी- कमी करत राहाणाऱ्या प्रयत्नांची सातत्य हे याबाबतनेहमीच एकआव्हान असते . हे अगदीच अशक्यच नसलेतरी फारसे सोपे नसते .
कारण ही प्रक्रिया जशी संविधानिक आहे , जशीकायदेशीर आहे ; तशीच आणि तितकीच मानसिकहीआहे . ही मानसिकता अर्थव्यवस्थेत नियम बनवनार्यासरकार व प्रशासकीय आधिकार्यान्ची जशी हवी तशीआणि तितकीचअर्थव्यवस्था पेलनार्या तुमच्या - माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांचीही हवी . याबाबतचाआपल्या देशातला आजपर्यंतचा अनुभव संमिश्र आहे .त्याचा संबंध फारसा गरीबी सारख्या आर्थिक गोष्टीशी ,किंवा निरक्षरतासारख्यासामाजिक घटकांशी नसूनआपल्या सर्वांच्या मानसिकतेशी जास्त आहे . रोकड -विरहीत अर्थव्यवस्थेत पायाभूत असणाऱ्या बँकांचे ATMद्वारा पैसे मिळण्याचे साधन सुरु झाले तेंव्हा अगदी शहरीभागातील उच्चशिक्षित , सुशिक्षितमाणसांनी , निदानसुरुवातीच्या काळात तरी , दिलेला प्रतिसाद कुठे आणिकधी उत्साह - वर्धक होता ?
अगदी आजही आपण सगळेच ज्या आणि जितक्यामोठ्या प्रमाणावर बॅंकांच्या ATMs चा उपयोग करतो ,तितक्याच प्रमाणावर त्याच बँकांच्या Cheque Depositing Machines चा फायदा घेतो का ?आपल्या देशांत मोबाईलमिळू लागले तेंव्हा त्यांच्यावापराचे प्रमाण कुठे सुरुवातीस सुखावह होते ? रेलवेचीतिकिटे संगणकीय प्रणालीतून मिळू लागल्यावर ही पद्धतलोकप्रिय होण्यास किती वेळ लागला ? आजमितिलामात्र IRCTC ही सर्वात जास्त वापरलीजाणारी वेब - site झाली आहे . आपल्या देशाच्या भांडवल - बाजारातDepositories चा कारभार सुरू झाल्यानंतर त्यालासरकार , नियंत्रक , बाजार - मध्यस्थ यांच्या वर्षानुवर्षेकेलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड मिळालीतेंव्हाच कुठेआजची सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली . ही आणिअशी उदाहरणे हे स्पष्ट करतात की अशा गोष्टी यशस्वीजरूर होतात ; पण त्या " पी हळद , हो गोरी " स्वरूपाच्यानसतात . त्या जनमानसात मुरायलारूजायला वेळ द्यावालागतो . हे सर्वच सन्बन्धीतान्च्या संयम व चिकाटी पुढेअसणारे मोठे आव्हान असते . रोकड - विरहीतअर्थव्यवस्था तर संपूर्ण देशाचा आवाका समाविष्ट करणारहे लक्षात घेतले तर या आव्हानाच्या स्वरूप ,आकार यांचाअंदाज येऊ शकेल .
अगदी e - commerce पद्धतीने व्यवहार करणाऱ्याकंपन्यांना आपल्या देशांत जम बसवायला किती वेळलागला ? आज मात्र अशा कंपन्यांचे servers बंद पडावेअशी परिस्थिति Bumper Salesच्या काळात जन्मालायेते .त्यातूनच भलत्याच ग्राहकाला त्याने मागणीनोंदवलयापेक्षा भलतीच वस्तू मिळाली अशा तक्रारी सुरूहोतात . त्या अपवादात्मक ही असतील . पण त्या आहेत ,असतात , असू शकतात याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. ३१ डिसेंबरफार दूर नाही . तेंव्हा अशा गोष्टी होतील .पण तात्कालिक आणि सार्वकालिक यांत गल्लत करूनचालत नाही . अशी गडबड होऊ न देणे हे अशा व्यवस्थापुढचे मोठे आणि महत्वाचे आव्हान असते .
आणि अगदी आजही अशा कंपन्याबरोबर व्यवहारकरणाऱ्या भारतीय ग्राहकांची वयानुरुप वर्गवारी केली तरएक आणखीन नवीन पैलू समोर येतो . जेंव्हा आपणसहजपणे आपल्या घरातील ४ - ५ वर्षाचे लहान मूलघरातील मोठ्यामाणसांपेक्षा जास्त लवकर आणि जास्तचांगल्या पद्धतीने एलेक्ट्रॉनिक उत्पादने वापरतात असॆम्हणतो तो एरवी कौतुकाचा उदगार रोकड - विरहीतअर्थव्यवस्थेकडे जाण्याचा वेग काय असेल याचानिर्णायक घटक ( आणि अशाअर्थाने आव्हान ) ठरूशकतो .
रोकड - विरहीत अर्थव्यवस्था ( कॅशलेस एकॉनमी ) ही प्रामुख्याने क्रेडिट - डेबिट कार्ड या माध्यमांवर आधारीतअसते . आपल्या देशांत सिनेमाचे १०० - १२५ रूपयाचेतिकीट तरुण पिढी जितक्या सहजतेने आणि सातत्यानेक्रेडिट -डेबिट कार्डने काढते , त्या तत्परतेने अशा छोटया रकमेच्या व्यवहारात चाळिशीच्या पुढच्या वयाचे नागरिक आपल्या देशांत कार्डचा वापर आजमितिला तरी करत नाहीत . पण अशा रकमेचे व्यवहारच तर आपल्या दैनंदिन जीवनात सर्वात जास्त असतात . असा वापर न होण्यात जशी आपली मानसिकता कारणीभूत असते , तशीच अनेक व्यापारी कार्ड पेमेन्त स्वीकारत नाहीत हेही कारण आहेच . कार्ड कंपन्यांची असहकाराची भूमिका , पैसे मिळण्यात होणारी दिरंगाई , नेटवर्क- कनेक्टविटी अशा तांत्रिक बाबी अशीअनेक कारणे असतात . आणि त्या अर्थाने , मर्यादीत काहोईना , पण या प्रक्रियेसमोरची आव्हाने असतात .
याच प्रश्नाचा अजून एक पैलू इथे आवर्जून लक्षात घ्यावालागतो . आजमितिला आपल्या देशांत क्रेडीट कार्डवापरण्यात तरूण पिढी जास्त पुढे आहे . याबाबतनेहमीच येणारा अनुभव असा आहे की मध्यम - वयीनआणि प्रौढ कार्डधारक आपले संपूर्ण बिल , आणि तेहीदेय तारखेच्या आत भरते . याउलट तरुणाईचा कलMinimum Payable Amount भरण्याचा आणि तेहीअनेकदा देय तारखेच्या नंतर भरण्यात असतो . याचीवसूली , थकबाकी , बुडीतरकम हा प्रकार भारतीयबँकांना परवडणारे नाही . आजमितिला कंपन्यांना दिलेलीकर्ज , जी बुडित - खाती ठरली ( NPAs) ही जशीभारतीय बँकांची डोकेदुखी आहे ; तशी ( अगदी त्याप्रमाणात नसली तरी ) अशी उधारी ही आहे .रोकड -विरहीत म्हणजे उधार नाही , फूकट तर नाहीच नाही.अशा अर्थाने रोकड - विरहीत अर्थव्यवस्थाप्रक्रियेसमोरचे हे आव्हान असते .
रोकड - विरहीत अर्थव्यवस्था असा विचार करत असतानाएक गोष्ट समजून घेणे अतिशय आवश्यक आहे . तीम्हणजे अशी अर्थकारण - पद्धती ही पद्धती आहे ;कारणही नाही , आणि परिणामही नाही . तसे नसणे हेकोणत्याहीआर्थिक आजाराचे एकमेव कारण नसते .आणि तो कोणत्याही आर्थिक आजारावरचा एकमेवरामबाण उपाय नसतो . सार्वकालिक तर नाहीच नाही .याबाबत आपल्या देशांत सध्या जे एक भारलेले वातावरण( charged अशा अर्थाने) आहे ते पाहाता तर हे लक्षातठेवणे फार जरूरीचे आहे . ज्या युरोपियन राष्ट्रांचीउदाहरणे याबाबत दिली जात आहेत , त्यातल्या अनेकदेशांची अर्थव्यवस्था आजमितिला फारशा चांगल्यास्थितीत नाहीत . पण म्हणून रोकड -विरहीत अशीव्यवहार - पद्धती टाकाऊ ठरत नाही . ठरत नसते . कारणरोकड - विरहीत पद्धत अर्थव्यवस्थेची स्थिति ठरवतनसते हा विचार खोलवर पसरण्यास लागणारा वेळ हे यापद्धती पुढचे एक आव्हान ठरू शकते .
कारण रोकड - विरहीत व्यवहार - पद्धती व्यवहार - खर्चकमी करते , ती पद्धत पारदर्शक असते म्हणूनस्वीकारायची असते , हे सर्वानीच समजून घेणे हे यापद्धती पुढचे मोठे आव्हान असते .
सरतेशेवटी , ही पद्धत अंमलात आणण्याचा मोदीसरकारचा निर्णय हा निश्चितच स्वागतार्ह्य च आहे .त्याबाबतच राजकारण - समाजकारण आणि अर्थकारणहे तिन्ही पैलू फार महत्वाचे आहेत हे नक्कीच ! ! ! !
(४ डिसेंबर २०१६ रोजी दैनिक पुढारी च्या बहार पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख . हा लेख आदित्य फीचर्स , पुणे यांच्या माध्यमातून प्रसिद्ध झाला .)
-- चंद्रशेखर टिळक
२९ नोव्हेंबर २०१६ .
9820292376
Email: tilakc@nsdl.co.in
कोडमंत्र. एक अफलातून मराठी नाटक . हे नाटक पाहून बाहेर पडत असताना भारावून गेलेला नाही असा नाट्य - रसिक नसेल . भले प्रतापराव निंबाळकर ( अजय पूरकर ) ही या नाटकातील व्यक्तिरेखा जे वागते असे चित्रणजे या नाटकात आहे , ते वागणे चूक की बरोबर याविषयी मत - मतांतरे जरूर असतील ; पण हे नाटक अफलातून याविषयी मात्र पूर्णपणे मतैक्य . आणि फक्त मतैक्यच . मुक्ता बरवे आणि अजय पूरकर या दोघांच्याही नाट्य- क्षेत्रातील कारकीर्दीला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवणारी अशी या दोघांची या नाटकातली कामगिरी आहे . या नाटकातील इतर कलाकारांचीही , अगदी चाळीसच्या चाळीस NCC cadet सह , ( आमच्या डोम्बिवलिचे आहेतते ) सगळ्यांचीच कामगिरी इतकी उत्तम आहे की त्याशिवाय हे नाटक इतके उठावदार , इतके परिणामकारक होणारच नाही .
आपण सगळेच इतके आपल्या स्वतःच्या सवयीन्चे गुलाम असतो की एखादी सवय एकदा लागली की लागली . लोक त्याबाबत आपल्याला कितीही बोलली ( चांगलेही आणि वाईटही ) तरी आपण तसेच वागत राहातो . अगदीआपल्या स्वतःच्याही नकळत .
आता हेच पाहा ना ! अलिकडच्या काळात मला एक सवय लागली आहे . . ती म्हणजे कोणतेही नाटक , कोणताही सिनेमा पाहाताना , माझ्याही नकळत माझे मन त्या कथा - वस्तूची , त्यातल्या संवादाची सांगड गुंतवणूकक्षेत्राशी घालू लागते . इतकेच नाही तर ते मी असे फ़ेसबुक वर लिहीत जातो . त्याचीही आता सवयच लागली आहे . सवय कसली , अगदी व्यसनच म्हणा ना ! ! ! " सवयीतूराणा न भयं न लज्जा " अशातली गत . . . . मीअसे लिहिलेले वाचण्याची सवय तुम्हांलाही लागली असेल आणि तो " जुलमाचा राम - राम " नसेल अशी आशा आहे .
हे आता इथे आठवायच कारण म्हणजे या नाटकाच्या प्रौढ नायकाला आपली कमांड सर्वोच्च पातळीवर असण्याची इतकी सवय झालेली असते की ते स्थान टिकवण्यासाठी तो काहीही करायला तयार असतो . अगदी त्याच्यावरिष्ठनी तसे करण्यास औपचारिक , आणि अनौपचारिक रित्याही , मनाई केलेली असूनसुद्धा . या स्थितीचे वर्णन या नाटकाच्या जाहिरातीत फार छान , समर्पक शब्दांत येते . . . . " कर्तव्य आणि कर्त्यव्याचा अतिरेक यांतलीसीमारेषा पातळ . . . "
दोन - तीन वेळा हे नाटक पाहूनही ही ओळ काही माझा पिच्छा सोडता सोडत नाहीये . माझाही याबाबतीत अतिरेक होत आहे की काय अशी माझी मलाच शंका यावी इतका पिच्छा .
पण दरवेळी मला असे वाटते की आपणां सगळ्यांचे स्वतःच्या गुंतवणुकीबाबत असे झाले पाहिजे . अगदी पूर्णपणे नाही तरी फार मोठ्या प्रमाणात तरी .
पण ते नाही होत ना तसे ! ! ! झाले तरी ते फारच थोड्या जणांचे होते आणि झाले तरी फार थोड्या प्रमाणात होते . हीच तर खरी शोकांतिका आहे . अशावेळी " कोडमंत्र " हे नाटक ज्या मूळ पुस्तकावर आधारीत आहे , त्यापुस्तकाचे नाव " A Few Good Men " असॆ आहे याचे नवल वाटेनासे होते . काही ( काहीच हो ) माणसे गुंतवणूक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असतात आणि ती " चांगलीही " असतात बरं का ! ! अगदी " पैशांच्या मागेलागला " अशी हेटाळणी जरी त्यांच्यामागे केली गेली तरी .
जणू काही इथेही ते काम फक्त " A Few Good Men " यांचेच .आपण सगळे गुंतवणुकीच्या बाबतीत अनिच्छ आणि अनिच्चेचा अतिरेक , अद्न्यान आणि अद्द्न्याचा अतिरेक , आळस आणि आळसाचा अतिरेक , अभाव आणिअभावाचा अतिरेक यांच्या सीमारेषा पातळ करण्याच्या फिकिरीत असतो . खरं म्हणजे , याच नाटकातील वाक्य वापरत सांगायचे तर याबाबतीत आपली मनोभूमिका " १ टक्का जरी चान्स असला तरी त्यासाठी आपण टक्के प्रयत्नकरायला हवे . " अशी आणि अशीच असायला हवी . फक्त त्यासाठी गुंतवणूक करत राहण्याची सवय अंगी बाणवून घेतलिच पाहिजे . आणि तीही भक्तिने ; सक्तीने नव्हे . पुन्हा याच नाटकातील वाक्य आधाराला घेत सांगायचेझाले तर " मंत्र श्रद्धेने म्हणायचे असतात ; सक्तीने नव्हे . " मंत्र म्हणण्यासाठी आधी त्याची माहीती , मग त्यांचा अभ्यास आणि मग त्यांचा सराव असावा लागतो . तेंव्हाच ते मंत्र पावतात . गुंतवणूकीचेही अगदी तसेच असते. अगदी अविचल श्रद्धेची दोन्ही क्षेत्रे आहेत ही . . . . . .
हे असे जमवण सुरवातीला कदाचित कठीण वाटेलही . पण ते जमवण असलेच तर कठीण आहे ; अशक्य नाही . वेगळ्या शब्दांत सांगायचे तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे . नियमितपणे गुंतवणूक करत राहणे हीआपली स्वतची गरज आहे हे आपण मनमोकळं होत मान्य करावे लागते . एकदा ते मान्य केले की या नाटकात सांगितले आहे तसे " जरूरत की चीज़ें ढूँढ़ने मे वक्त नही लगता " याचा ( प्रसन्न ) अनुभव येऊ लागतो . हे असॆवागणे हळूहळू अंगवळण पडले की तो आचारधर्म ही बनू शकतो . बनतोही काळाच्या ओघात . आणि असे होत असतानाच परत एकदा " कोडमंत्र " नाटकातले वाक्य आधाराला घेत बोलायचं असेल तर " गरज ही धर्मापेक्षा मोठीअसते " हे मनोमन उमजू लागते . ( हे नाटक पहिल्यांदा पाहात असताना हे वाक्य जेंव्हा मी ऐकले तेंव्हा निष्कारणच मला दूरचित्रवाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या एका चहाच्या ब्रॅंड ची जाहिरात आठवली होती . असो . )
नियमितपणे गुंतवणूक करत राहण्याची सवय स्वतःला लावून घेत असताना एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्रात , त्यातही विशेषतः शेअर - बाजारात गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा आणि कोणत्या गोष्टींवर नाहीयाची माहिती करून घेत राहण्याची ही सवय करून घेत राहावी लागते . कारण बळीचे बकरे शोधण्यात हे क्षेत्र एकदम तरबेज असते . " जाळे कुठे टाकायचे हे कोळ्याला नेमके माहीत असते " हे या नाटकातील वाक्य त्यापरिस्थितिचे एकदम चपखल वर्णन आहे .
हे महत्वाचे अनेक कारणांनी आहे . असते . पहिले म्हणजे हा पैशांचा मामला आहे . त्याबाबत आपली सहनशक्ती सर्वार्थाने मर्यादीत असते .
दूसरे म्हणजे चांगल्या सवयी लागायला नेहमीच जास्त वेळ लागतो . वाईट सवयी मात्र लगेचच लागतात . निदान लागू शकतात .कोणत्याही गोष्टीवर ताबडतोब आणि तीही टोकाची प्रतिक्रिया देण्याची शेअर - बाजाराला उपजतसवय असते . ती तेवढी आपण विनासायास अन्गिकारतो . मग त्यातूनच " सफरचंद कापायला सूरी ऐवजी कुर्हाड " वापरली जाऊ शकते .
तिसरे म्हणजे गुंतवणूक क्षेत्रातील संधी या नेहमीच माहितीच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात . अशी माहीती विश्वासार्ह्य असणे अत्यावश्यक असते . या बाजारातच असॆ नव्हे तर इतरही अनेक ठिकाणी चूक आणि बरोबर ,सत्य आणि असत्य अशा सगळ्याच बातम्या फिरत असतात . त्यातही खरी बातमी पसरायला जास्त वेळ लागतो . खोटी बातमी मात्र वाऱ्यांच्या वेगाने फिरते . या नाटकात याबाबत छान वर्णन आहे . त्यानुसार " सत्य पायातचप्पल घालून घराबाहेर पडे पर्यंत असत्य अनवाणी अख्ख गाव फिरून आलेले असते . " त्यामुळे त्याची शहानिशा करावी लागते .
याबाबत अजूनही एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते आणि ती म्हणजे या नाटकात जरी " पुरावे नसतात ही सत्याची लाचारी असते " असॆ जरी म्हणले असले तरी गुंतवणूक क्षेत्रात मात्र सत्याला पुरावे असतात . खरं म्हणजे , फक्तसत्यालाच पुरावे असतात . ते सहजासहजी उपलब्ध असतीलच , असतातच असॆ नाही . पण ते असतात . प्रसार - माध्यमे आणि जग - दुनिया यांनी उठवलेल्या उलट - सुलट चर्चेच्या गदारोळत ते नीट दिसत नाहीत , ऐकूयेत नाहीत काहीवेळा ! ! ! पण ते असतात . ते पाहाणयाची सवय मात्र लावून घ्यावी लागते . ते फारसे सोपे नसते . आपल्या मनाच्या ठाम समजूती , आपले भाबडे विश्वास , आपणच आपलीच घातलेली , करून घेतलेलीसमजूत अशा अनेक गोष्टी त्याच्या आड येत असतात . सत्य आणि भाव - बंध , सत्य आणि नातेबन्ध याची बहुपदरी वीण ओलांडून पुढे जाणे का सोपे असणार आहे ? पण तसे जाणयाला काही पर्याय नाही . ( " आयुर्विम्यालापर्याय नाही " हे वाक्य निश्कारनच मनात डोकावून गेले ना ! ) पण गुंतवणूक क्षेत्रातली " शर्यत जिंकणे आणि हरणे " त्यावर अवलंबून असते . त्यासाठी नियमित गुंतवणूक हे आपल्या सगळ्यांचे नित्य - कर्तव्य बनलेच पाहिजे. " कोड - मंत्र " नाटकातील संवाद घेत सांगायचे झाले तर गुंतवणूक नियमितपणे करत राहण्याच्या " कर्तव्यात सबब दिली नाही आणि स्वीकारलीही नाही " असं झाले पाहिजे . यातूनच सत्य स्वीकारण्यास लागणारी " ताकद ,हिम्मत आणि किंमत " मिळते . आणि ती मिळाली की " सत्याला धरून चालन्याची ताकद असणारा आत्महत्या करत नाही " म्हणजे काय ते प्रत्यक्षात अंमलात आणता येते .
त्यासाठी आपल्या स्वभावानुसार , ऐपतीप्रमाणे आपलीच आपणच एक आचार - विचार संहीता बनवायची गरज , आवश्यकता असते . कारण ती व्यक्तिसापेक्श असते . एखादे औषध खोकल्यावर चालते हे जरी बरोबर असलेतरी त्या औषधांची त्या संबंधित माणसाला अलेर्जी तर नाही ना याचा विचार ते औषध त्या माणसाला देण्या - घेण्याआधी करावाच लागतो . तसेच ते औषध , त्या माणसाला , त्यावेळी देता येणार असले तरी ते किती प्रमाणातद्यायचे हे परिस्थितींनुसार बदलू शकते . औषधांच्या प्रमाणाबाबत जरी काही ठोकताळे असले तरी ते काही प्रमाणात सापेक्ष असतात . त्याबाबत आपण ठरवलेली संहीता म्हणजे कोडमंत्र . ती काही कोणत्या पुस्तकात लिखितस्वरूपात दिलेली नसते . ती अनुभवातून सिद्ध होत राहते . " Internally official Disciplinary Measure " म्हणजे कोडमंत्र असंच तर या नाटकात सांगितले आहे . यंत्र ( हत्यार ) , तंत्र ( जबाबदारी ) आणि मंत्र (चुकिला क्षमा नाही ) यातूनच हा आणि असा " कोडमंत्र " घडत जातो . घडत राहतो . त्याचा अतिरेक झाला तर " कोर्टमार्शल " होते असॆ नाटक आहे .
कोणत्याही " कोडमंत्र " च्या अभावातून आपले आर्थिक आयुष्य प्राणांस मुकते .
कोडमंत्र हे मराठी नाटक मूळ गुजराथी नाटकावरून बेतले आहे हे अशावेळी फार सांकेतिक वाटू लागते .
तसेच हे नाटक आणि गुंतवणूक क्षेत्र यांची सांगड घालताना अगदी पहिला विचार जो माझ्या मनात आला ( इथे मात्र तो मी या लेखाच्या शेवटी मांडत आहे . ) तो मात्र अगदी बालिश होता . या नाटकात ४० NCC cadetsआणि दहा कलाकार मिळून एकूण ५० कलाकार आहेत . आपल्या NIFTY या निर्देशान्कातही ५० कंपन्यांच्य शेअर्सच्या बाजार - भावांचा समावेश असतो ; तर या चाळीस आणि दहा यांच्या वजाबाकी इतके म्हणजे ३० कंपन्यांच्याशेअर्सचा आपल्याच Sensex मधे समावेश असतो . हा गन्मतीचा भाग सोडून देत आपली गुंतवणूक कोडमंत्र या नाटकांसारखीच प्रचंड यशस्वी होवो हीच सदिच्छा . शुभेच्छा .
असा साक्षेपी , सापेक्ष कोडमंत्र उघड्या डोळ्यांनी , सदसदविवेकबुद्धी जाग्रुत ठेवत नियमितपणे गुंतवणूक करण्यातून आपल्याच आयुष्याची कामगिरीही वेगळ्याच पातळीवर जाईल . . . . या नाटकातल्या कलाकारांच्याअभिनयासारखी . याविषयी अगदी मतैक्य . आणि मतैक्यच .
कोडमंत्र . कोडमंत्र गुंतवणूकीचा .
चंद्रशेखर टिळक
C - 402 . राज पार्क
मढवि बंगल्या जवळ .
राजाजी पथ .
डोम्बिवलि ( पूर्व ) ४२१२०१
मोबाईल - ९८२०२९२३७६ .
E-Mail - tilakc@nsdl.co.in
९ डिसेंबर २०१६
दि. 8 नोव्हेंबर 2016 रोजी भारत सरकारने अचानक रु. 1000 व रु. 500 च्या नोटा चलनामधून बाद करत असल्याची घोषणा केली आणि देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. अशी परिस्थिती या पूर्वी देशात कधीच निर्माण झाली नव्हती. या मूळे सर्वसामान्य लोकांची पंचाईत तर झालीच पण बँकांवर प्रचंड ताण पडला आणि काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी, पैसे भरण्यासाठी व पैसे काढण्यासाठी लोकांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागू लागल्या. एटीएम मशीन्स बंद असल्यामूळे बँकांवरचा ताण आणखीच वाढला. रोख पैशांचा तुटवडा, बँकांना होणारा मर्यादीत कॅशचा पुरवठा, सतत बदलणारी रिझर्व्ह बँकेचे नियम आणि धोरणे या मूळे गोंधळात अधीकच भर पडली. पण या कठीण काळात अनेक बँकांनी उत्कृष्ट काम केले. या मधील एक बँक आहे पुण्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाची दत्तवाडी ब्रॅन्च!
या बँकेतही लोकांची अभूतपूर्व गर्दी होत होत होती. स्टाफला रोज 12- 12 तास काम तर करावे लागत होतेच पण जेवायला सुद्धा फुरसत मिळायची नाही. अर्था तास लंच पिरीयड असताना 10 ते 15 मिनीटांमध्ये घाईघाईने लंच उरकून यावे लागे व ते सुद्धा आळिपाळीने लंचला जाऊन. रोजच नवीन संकटे, नवीन समस्या, नवीन अडथळे असायचे. लोकांचे वेडेवाकडे प्रश्न, त्यांचा रोष, त्यांची नाराजी, संताप, कुचकट बोलणे याला तोंड द्यावे लागायचे. पण बँकेच्या सगळ्याच स्टा॑फने ही परिस्थिती खंबीरपणे आणि उत्कृष्टपणे हाताळली. मी अनेक वेळा बँकेचे मॅनेजर निळकंठ जमादार यांना हात जोडून व विनम्रपणे लोकांना सहकार्य करण्याची विनंती करताना पाहीले. बँकेच्या ऑ॑फीसबॉयपासून मॅनेजरपर्यंत सर्वजणच लोकांच्या मदतीला तत्पर असायचे. बँकेच्या टोकन सिस्टीमचा अत्यंत प्रभावीपणे वापर करण्यात आला. टोकन घेतल्यावर किती वेळाने नंबर येईल हे सांगण्यासाठी विशेष स्टाफची नियुक्ती करण्यात आली होती. बर्याँच वेळाने नंबर येणार असेल तर लोक घरी जाऊन किंवा इतर कामे करून बँकेत परत येत असत. त्यामूळे बँकेतल्या गर्दीवर नियंत्रण रहात असे. मी पुण्यातल्या इतर बँकांमध्ये अशा प्रकारची सिस्टीम बघीतली नाही. जेष्ठ नागरीकांची पण खास काळजी घेण्यात येत होती. त्या मूळे नोटबंदीच्या या कठीण काळातही या बँकेचे कामकाज सुरळितपणे पार पाडले. लोकांनीही उत्तम प्रतीसाद दिला आणि सहकार्य केले. कोणताही गैरप्रकार झाला नाही. यासाठी बँकेचे निळकंठ जमादार, संगीता पटवर्धन, महादेवी स्वामी, सुजाता जमादार, मंजुशा नथी, ज्योती नातू, निवृत्ती चहाणे, सुनील सुखात्मे, स्वाती मोने, दिलिप देवकाते, सपना रहाटे, विजय, अनिल दानवे, पुर्वा जोशी या सर्व कर्मचार्यांदचे योगदान आहे.
आपण अनेक वेळा बँकेच्या कर्मचार्यांोना नावे ठेवत असतो किंवा तक्रारी करत असतो. पण त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल मात्र घेत नसतो. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दत्तवाडी शाखेतील वरील कर्मचार्यां नी जे उत्तम काम केले याची दखल घेऊन त्यांचे नक्कीच अभीनंदन व कौतुक करणे आवश्यक आहे. माझी खात्री आहे की हे कर्मचारी यापूढेही याच सेवाभावाने काम करतील.
-- उल्हास हरी जोशी, मोः-9226846631
राज्यभरात गेल्या तीन महिन्यांत मराठा मोर्चाचे वादळ उठले होते. या मराठा मोर्चाचा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसला होईल, असे सरधोपटपणे म्हटले जात होते. प्रत्यक्षात तसे घडलेले नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाणी पाजू, असं विधान बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत केलं. पण झालं उलटचं.
राष्ट्रवादी काँग्रेसनं बारामतीत दणदणीत विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा येथे पराभव झाला असता तरं ती "नॅशनल न्यूज' ठरली असती. अजित पवार यांनी बारामतीचा गड राखला, अशी नेहमीचीच बातमी त्यामुळं "फ्लॅश' झाली.
नगरपालिकांचा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडल्यानंतर आणि गेल्या अडीच वर्षांची स्थिती पाहिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससाठी भविष्यात एकचं चांगली बातमी येऊ शकते. ती बातमी हीच की *"बारामतीचा गड अजित पवारांनी राखला."* बारामतीच्या पुढे आणि मागे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती आता हतबल होऊ लागली आहे. बारामती शेजारच्या सासवड, जेजुरी, इंदापूर, दौंड या ठिकाणी पक्षाला यश मिळालेले नाही. ज्या पुणे जिल्ह्यातून विधानसभेच्या 21 जागा निवडून दिल्या जातात. त्या बालेकिल्ल्यातच पक्षाची अशी स्थिती असेल तर इतरत्र बोलायलाच नको.
अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे अशा हाताच्या बोटांवरील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपापले बालेकिल्ले राखले. इतरत्र भाजपने किंवा शिवसेनेने बाजी मारली. काँग्रेसला जोमाने प्रयत्न न करता चांगल्या जागा मिळाल्या.
राज्यभरात गेल्या तीन महिन्यांत मराठा मोर्चाचे वादळ उठले होते. या मराठा मोर्चाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होईल, असे सरधोपटपणे म्हटले जात होते. प्रत्यक्षात तसे घडलेले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्त्वाची अडचण झालेली आहे ती म्हणजे त्यांच्याकडे दुसऱ्या फळीत "स्ट्रटेजिस्ट' नाहीत. आर. आर. पाटील असताना त्यांनी जेम्स लेनच्या मुद्यावरून 2004 मध्ये रान पेटवले होते. (आता हा मुद्दा चांगला की वाईट, यावर वाद होऊ शकतात. पण पक्षाची स्ट्रटेजी म्हणून जेम्स लेनचा मुद्दा राज्यात गाजला.) त्याचे चांगले यश मिळून हा पक्ष विधानसभेत राज्यात नंबर एकवर गेला. आता मराठा मोर्चाच्या निमित्ताने भाजपविरोधात रान उठविण्यासाठी या पक्षाकडे फिल्डवरचा नेताच राहिला नाही. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरपालिका किंवा महापालिका निवडणुकीत उतरुन आक्रमक पद्धतीने प्रचार करणे अपेक्षित नाही. आर. आर. पाटील असते तर त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यभर फिरून त्यावर भाजपला अडचणीत आणले असते. तसा गर्दी खेचणारा नेता सध्या राष्ट्रवादीकडे नाही.
राष्ट्रवादीकडे सध्या असलेले नेते हे इलेक्शन मॅनेजमेंट मधील तज्ज्ञ आहेत. कोणत्या गल्लीत कोणत्या समाजाची किती मते आहेत आणि कोणाच्या भावकीचा जोर कुठे आहे, याची माहिती त्यांना तोंडपाठ असेलही. मात्र या सूक्ष्म नियोजनासोबतच व्यापक अर्थाने पक्षाच्या मुद्यांची मांडणी करणारा, कार्यकर्त्यांना चेतविणारा नेता दुसऱ्या फळीतील नेता नाही. या नेत्यांकडे ही क्षमता नाही की जाणीवपूर्वक ते स्वतःला "एक्स्पोझ' करत नाहीत, हा देखील मुद्दा आहे. कारण भाजप सरकारच्या विरोधात ओरडले की आपला " काटा" केला जाईल, अशी धास्ती या नेत्यांच्या मनात असावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळीक साधण्याची ही देखील गरज असावी. नोटांच्या मुद्यावरून ममता बॅनर्जी आक्रमक होतात. पण राष्ट्रवादीचे नेते सावधपणे बोलतात.
सध्याचे सत्ताधारीही राज्यात काहीही घडले तरी त्याचे सारे खापर अजून कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या डोक्यावर फोडून मोकळे होतात. काँग्रेस थोडेफार तरी प्रत्युत्तर देते. भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांचे झेंगाट मागे लागल्याने राष्ट्रवादीला असे प्रत्युत्तर देणेही अवघड होऊन बसते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जे दुसऱ्या फळीतील नेते आहेत, त्यातील अनेक नेते भाजपशी आतून संधान साधून आहेत. म्हणजे पक्षाचे जहाज बुडणार असल्याचे लक्षात आल्यानंतर ही मंडळी भाजपमध्ये केव्हाही उडी मारू शकतात. लोकसभेत पक्षाच्या सहा खासदारांपैकी चार खासदार हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या वावड्या अधूनमधून उठत असतात. उदयनराजे हे पक्षाला जुमानतच नव्हते. विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते यांच्या आणि भाजपच्या नेत्यांच्या बैठका झाल्याचे सत्तेच्या वर्तुळात चर्चा आहे.
कोल्हापुरचे खासदार महाडिक हे केव्हाही पक्षातून उडी मारू शकतात. कारण त्यांचे बंधू भाजपचे आमदार आहेत. अंदमान-निकोबारच्या खासदाराने केव्हाच भाजपशी जवळीक वाढवली आहे. जयंत पाटलांना भाजपची खुली ऑफर असल्याचे सांगण्यात येते. ही सारी मंडळी योग्य संधीची वाट पाहत असल्याचे बोलले जाते. आधीच पक्षाचा पाया पश्चिम महाराष्ट्रावर आधारीत. त्यात ही अशी स्थिती. विदर्भात पक्षाला फार काही स्थान नाही. मराठवाड्यात परिस्थिती अनुकूल आहे; पण तिचा लाभ घेता येत नाही. उत्तर महाराष्ट्रात नेतृत्त्व नाही. कोकणातील नेत्यांत वाद संपत नाहीत. साठहून आमदार देणाऱ्या मुंबई-ठाणे पट्ट्यातील मतदार राष्ट्रवादीला साथ देत नाही. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस आगामी काळात बारामतीपुरतीच मर्यादित राहणार का, अशी शंका जी येते त्याला ही सारी कारणे आहेत. राष्ट्रवादीला पाणी पाजण्यात भाजपा ब-यापैकी यशस्वी झाली आहे, ही मात्र खरे.✍?
Copyright © 2025 | Marathisrushti