वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हृदयविकारास कारणीभूत होणार्या रक्तवाहिन्या चरबीच्या अंतर्लेपाने जाड होण्याची प्रक्रिया कोणत्याही एकाच कारणाने होत नसते. संशोधनांती अशा अनेक गोष्टी आढळून आल्या आहेत की ज्यामुळे हा विकार वाढीस लागतो त्यांना रिस्क फॅक्टर्स म्हणतात. त्यापैकी बरीच कारणे टाळता येण्यासारखी असतात. ती दूर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
January 25, 2010

अनादी काळापासून भारतीय संस्कृती ही श्री दत्त अवतारांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. त्यांच्या आत्मज्ञानाचा, ब्रह्मज्ञानाचा संजीवन प्रवाह विश्वाच्या स्पंदनातून, चराचरातुन अखंड अविरतपणे धर्मरक्षणासाठी कार्य करीत आहे. श्री. दत्तात्रेयांचा पहिला अवतार सत्ययुगात महान तपस्वी श्री. अत्रीऋषी आणि महापतिव्रता साध्वी श्री. अनसुया यांच्या तपोबलामुळे झाला. व तो अखंड, शाश्वत. चिरंतन अवतार असल्याने त्याच परंपरेत त्यांचा अवतार मानले जाणारे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे श्री. दत्तात्रेयांच्या तीन प्रमुख अवतारा पैकी श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती आणि श्री. स्वामी समर्थ महाराज एक आहेत. परंतु त्यांचे सर्वच चरित्र अद्भुत, अगम्य व दैवी आहे.
पहीला दत्त अवतार हा प्राचीन असुन सत्ययुगामध्ये (त्रेतायुग) आहे. अशा या अनादीकालापासुन असलेल्या योगिराज दत्तात्रेयांनी कलियुगात प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ शके १२४२ (इ.स.१३२०) निर्वाण शके १२७२ (इ.स.१३५०) व दुसरा अवतार श्रीगुरू नृसिंहसरस्वती शके १३०० (इ.स.१३७८) व त्यांची अवतार समाप्ती शके १३८० (इ.स. १९४५६) आहे. श्री गुरुचरित्रात श्री गाणगापुर येथून निघून त्यांनी गुरुप्रतिपदा (माघ प्रतिपदा) शुक्रवारी शके १३८० रोजी निजानंदगमन केले. त्याचा उल्लेख गुरुचरित्र अध्याय ५१ व ओवी क्र. ४८ मध्ये “आम्हा सांगितले मुनी। आपण जातो कर्दळीवनी । सदा वसो गाणगाभुवनी। ऐसे सांगा म्हणितले।” म्हणजेच नृसिंह सरस्वतीनी देहत्याग न करता ते कर्दळीवनी अदृश्य झाले. नंतर संचार करीत उत्तरपंथी झाले व श्री. नृसिंहसरस्वतीनी काही काळ समाधिस्त रहावे म्हणून ते एका प्रशस्त, निर्वात व योगी जनांचे तपोधाम म्हणून घनदाट अरण्यात गेले. तेथे जवळजवळ ३०० वर्षे समाधिस्त अवस्थेत दिर्घकाळ राहील्याने त्यांच्या शरीरात अर्तंबाह्य पालट घडून आल्यने शरीरावर प्रचंड वारुळ तयार झाले व एकदा एक लाकुडतोड्या त्या ठिकाणी आला असता कुऱ्हाडीचा घाव वारूळात बसून समाधिष्ठीत राहीलेल्या नृसिंहसरस्वतीच्या मांडीपर्यंत पोहचला व त्यांची समाधि उतरल्याने तेच दत्त अवतार श्री. स्वामी समर्थ असे अद्भूत चैत्र शुध्द द्वितीय शके १८३७ च्या सुमारास मंगळवेढ्यास प्रथम प्रकट झाले. त्यांचे अद्भुत प्रकटीकरणाचा इतिहास स्वामी भक्तांना ज्ञात आहे.
श्री स्वामी समर्थ असतांना ब्रह्मनिष्ठ श्री. वामनबुवा (बांबोटीकर) यांनी “श्री समर्थ गुरुलिलामृत" ग्रंथ लिहीला त्याचे आधारे श्री स्वामी समर्थ मंगळवेढे या गावी शके १७६० मध्ये अचानक प्रकट झाले तेथे १२ वर्षे साधना केल्यावर ते अक्कलकोट क्षेत्री येवून खंडोबाचे देवळातील कट्ट्यावर आसनस्थ झाले. त्यांचे अजानबाहु, धिप्पाड, उंच व तेजपुंज शरीर व डोक्यातील प्रखर तेज पाहून गावकरी आश्चर्यचकीत झाले. गावकऱ्यांनी त्यांना सन्मानाने गावात आणले आणि त्यांना कोठून आले विचारले असता ते म्हणाले, “आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण, नाव नृसिंहभान कर्दळीवनातून आलो. मूळ वटवृक्ष दत्तनगर हे धाम, साक्षात अंबा आमचे गुद धूत होती". या श्री स्वामी समर्थाच्या उद्गारावरून ते श्री. भगवान नृसिंहसरस्वतीचा अवतार होते याची जाणीव स्वामीभक्तांना झाली. तेव्हा अक्कलकोट क्षेत्राचे मूळचे नाव प्रज्ञापुरी होते. कालांतराने श्री. स्वामी समर्थ च्या वास्तवामुळे ते तीर्थक्षेत्र झाले. व तेथेच स्वामीचे वास्तव्य वटवृक्ष स्वामी महाराज मठ, बाळप्पा मठ, जोशीबुवा मठ, राजेराय मठ व संस्थानिक मालोजीराव यांचा वाडा या सर्व ठिकाणी संचार व अद्भुत लीला करीत लोकांच्या आत्मोद्वाराचे अनमोल कार्य केले. त्यांच्या भक्तांच्या कथा व लिला स्वामीभक्तांना ठाऊक असल्याने येथे द्विरुक्ती करीत नाही.
स्वामी अवतारकालाचे अलौकिकत्त्व - श्री स्वामी समर्थ यांचा अवतार व कार्य अलौकिक व दैवी असल्याने त्यांच्या वयाच्या व ठिकाणाच्या आगमनाबद्दल त्यांच्या मुखातून प्रकट झालेली दैवीवाणी व ते असताना नगरचे सुप्रसिध्द पिंगळा ज्योतिषी श्री. नाना रेखी यांनी बनविलेली कुंडली पत्रिका व साक्षात त्या खरेपणाबद्दल श्री स्वामीचे उद्गार “क्या देखता है। नौबत बजाऔ ।" हे एकताच नाना दर्ग्यातील नौबतीजवळ जावून ती वाजवू लागले व साक्षात दक्षिणा म्हणून समर्थानी नानांच्या उजव्या हातावर दक्षिणा म्हणून समर्थांनी हातावर आत्मलिंगाचा प्रसाद दिला. नानांच्या हातावर निळ्या रंगाचे लहानसे विष्णुपद उमटले ते त्यांच्या हातावर शेवटपर्यंत होते.
श्री नानारेखी यांनी बनविलेल्या कुंडलीचा पत्रिकेच्या अर्थावरून श्री स्वामी अवतार शके १०७१ चैत्र शुध्द द्वितीया, वार गुरुवार, रास अश्विनी नक्षत्र, दुसरे चरण, प्रतियोग, प्रातःकाली दोन घटिका दिवस, नाडी आघ-गण-देव, यजुर्वेद, काश्यप गोत्र (टोपण नाव नृसिंहभान जन्म नाव-चैतन्यस्वामी मेष राशी (स्वामी मंगळ) हस्तिनापुराजवळील १२ कोसावर छेलेखेडा ग्रामी वडाच्या झाडाखाली धरणी दुभंगून अष्टवर्षीय स्वरुपात म्हणजे बटु रुपात स्वामी प्रकट झाले. (सदर पत्रीका व कुंडली अहमदनगरच्या स्वामी मठात आहे.) स्वामीचा जन्मवेळी लखलखीत अशी शेंदरी कांती जणू गजाननच मूर्तीरूपाने स्वरूपात प्रकट झाले असे चित्तवेधक वर्णन ग्रंथात आहे. या माहिती वरून असे दिसते की, श्री नृसिंह सरस्वती निर्वाण शके १३८० व श्री. स्वामी समर्थांनी घेतलेली समाधी शके १८०० मध्ये यावरून स्वामीचे आयूष्य ७२९ वर्षाचे ठरते. हे सर्व अघटीत, अलौकीक व दैवी आहे. हे मान्य करावे लागेल त्यांच्या जवळजवळ ८०० वर्षांचा कालखंडाचा शोध व सस्तुनिष्ठ आढावा घेण्याचे कार्य अनेक स्वामी चरित्राकारांनी प्रदान केले आहेत. त्या प्रसंगी लेखकापैकी श्रीपाद शास्त्री किंजवडेकर यांचे स्वामी चरित्र कार्य खंड तसेच श्री स्वामी चरित्रांचे सविस्तर तीन खंडात चरित्र लेखन करणाऱ्या स्वामी अभ्यासक विदुषी प्रा. नम्रता भट, आशीर्वादाने करीत आहेत व श्री समर्थ गुरुलिलामृत या ग्रंथातही एक इंग्रज बॅरिस्टर व त्यांचेबरोबर आलेले पारशी गृहस्थ यांनी अक्कलकोट येथे मोदी वाड्यात भेट घेतल्याच प्रसंगी, त्यांनी श्री स्वामींना विचारले की, आपण कोठून आलात? तेव्हा स्वामींनी त्यांना सविस्तर कालखंड उलगडून दाखवितांना सांगितले की ते कर्दळीवन, कलकत्ता, बंगाल, गंगातटाक हरिद्वार, केदारेश्वर, गोदावरी, हैद्राबाद व मंगळवेढ्याची प्रकट हकीकत सांगितली आहे. त्या वरून त्याचे अवतारकार्य दैवी आहे.
श्री स्वामी महाराजांचे अलौकिक रुप व लीला - श्री स्वामी महाराजांची कांती दिव्य व शरीराचा वर्ण तेज:पुंज व ते आजान बाहू होते. त्यांच्या शरीरावर इतके तेज प्रखर असे की त्यांच्याकडे एकसारखी दृष्टी लावून कोणी पाहू शकत नसत. त्यांची काया सुंदर होती. गंडस्थळ शोभिवंत, नासिका सरळ, भिवया उत्तम, नेत्रकमळ दिव्य व कपाळ भव्य होते. कमरेस मेखलेची शोभा असे. ते कौपीन नेसत. त्यांच्या मांड्या केळीच्या खांबासारख्या दिसत. डोक्यात कधी वुलनाची गोल टोपी असे. हाताचे तळवे व त्यांचे चरण कमलासारखे कोमल होते. कान मोठे व ऊर विशाल होते. पोट लंबोदरासारखे. त्यांची अवस्था बालपिशाच्य अवधूत योग्यासारखी असे. त्यांचे चालणे तेज असे. त्यांच्या बरोबर चालणाऱ्याला धावावे लागे. त्यांचे लांब पायाचे आसन जमिनीशी समांतर असे. त्यांच्या चलन वलनाला स्थळ काळाचे बंधन नसे. देहक्रीडा विक्षीप्त होत्या. कधी सामान्य माणसासारखे बोलत. तर कधी लहान मुलासारखे निरागस, तर कधी रागीट मुद्रा धारण करीत. हातात अंगठी व विश्वरुप गोटी होती. ती हातात घेवून क्रीडा करीत. कधी लंगोटी फेकून देत तर मुखी खेटर लाव, जुते मारेंगे म्हणत कधी आरती पालथी करीत पुराणे प्रवचने बंद करीत. रागात कधी कुणी दर्शन घेणाऱ्याला छाटी, जोडे फेकून मारीत पण भक्तांना मात्र तो कृपाप्रसाद असे. त्यांच्या सामान्याच्या, अहंकारी दांभिक योगीयांचा पाणउतारा करण्याच्या तहा विचीत्र असत. सर्व जण त्यांना वचकून असत ते ईश्वर चिंतनात सदा मग्न असत ते शांतीब्रह्म, दया करूणा क्षमेचे सागर होते. ते नेहमीच अंर्तयामी निजानंदी, नित्य- जागृत व स्वतःच्या मायेत रमत. त्यांना भक्ताकडून निर्मळ प्रेम व, श्रध्दा हवी असे. त्यांना नामाचे महत्व अपार असे कारण ते स्वत: ईश्वर चिंतनात राहून स्वत: देखील “जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो” असा जप करीत.
स्वामी कार्य व उद्देश - श्री. स्वामी महाराज असतांना त्यांच्या दर्शनास अनेक राजे, शास्त्रीपंडीत, कीर्तनकार, प्रवचनकार, योगी व क्रांतीकारक देशभक्त येत असत. त्यांच्या मनातील भाव ओळखुन ते वर्तन करीत व उपदेश देत त्यांच्या निःसीम सेवेत श्री बाळप्पा, चोळप्पा, सुंदराबाई, मालोजीराजे हे असत. त्यांच्या प्रभावात आलेले अनेक शिष्य पुढे लोकोत्तर संत झाले व त्यांनी स्वामीमठ बांधून अनमोल कार्य केले त्या मध्ये श्री. तात महाराज, श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, श्री. शिवराम बावडेकर, श्री रामानंद बीडकर, ब्रह्मनिष्ठ श्री वामन बुवा, आळंदीचे श्री. नृसिंह सरस्वती, श्री. गोपाळ रामचंद्र केळकर, क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके इ. सत्पुरुषांचा समावेश आहे. त्यांची कठोर परीक्षा घेवून नंतरच त्यांचेवर कृपा केली.
त्यांच्या कार्याचा उद्देशच मुळी सामान्यांना दु:खापासून दिलासा व उन्मत्त व अहंकारी, दांभिकाना वठणीवर आणण्याचा असे हे ईश्वरी अवतार असल्याने त्यांना अनेक सिध्दी प्राप्त होत्या पण लोककल्याणासाठी त्यांनी वापर केला. त्यांनी लोकांना अंधश्रध्दा दूर करुन त्यांना खऱ्या भक्ती मार्गाला लावले. त्यांना सोवळे- ओवळ्यास कर्मकांड, कोंबडे-बकऱ्याचे बळी देण्यास प्रखर विरोध असे. उदाहरणादाखल एक कथा सांगतो. अक्कलकोट शहरात सारसबागेत एक खोलगट दगड होता. अक्कलकोट निवासी त्या दगडाला गानदेवी म्हणत. ती गानदेवी नवसाला पावते असे समजून लोक कोंबड्या बकऱ्याचा बळी देत. स्वामीनी त्या दगडाचा शौचकूप म्हणून उपयोग करण्यास सुरुवात केली व लोकांना तो दगड गानदेवी नसून घाणदेवी आहे हे पटवून दिले. बुवाबाजी, भोंदुगिरी, जादुटोणा, मंत्रतंत्र करणाऱ्या भोंदु साधूंना ते सळो की पळो करुन सोडत. एके दिवशी स्वामीचा सेवेकरी चोळप्पा याच्या घरात घुबड शिरले ते अपशकून मानून चोळप्पाने घरी जाणे बंद केले. स्वामींना कळल्यावर स्वामी चोळप्पाच्या घरी जावून राहीले व घुबडाला हातात घेवून सोडून दिले.
अशा रितीने स्वामीचे सर्वच चरित्र अदभुत व दैवी आहे. लोकांच्या आत्मोउद्दारासाठी त्यांचा अवतार होता.
त्यांनी शके १८०० चैत्र वैद्य १३ ला अवतार समाप्त केला तरी त्यांच्या केवळ श्रध्देने "श्री स्वामी समर्थ " या सिध्द नाम जपाने लोकांना आजही अनेकांना प्रत्यक्ष दर्शन देवुन “हम गया नही जिंदा है ।” ही दिव्यत्वाची प्रचीती येते. त्यांच्या पुण्यतीथी निमीत्त साक्षात त्रिवार वंदन.
-- श्री. उमेश जाधव.
मो: ९६६४८८८७१३
सौजन्य: गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक १ ला.
July 25, 2022
संकल्प एक बीज आहे त्याला फळीभूत व्हायला वेळ हा लागतो. सतत दृढतेचे पाणी देत राहिले तर ह्या विचारांची किमया काय आहे ते स्वतःच अनुभव कराल.
December 20, 2021
तैवानने नुकतेच सुरक्षेच्या मुद्द्यावरून चिनी कंपनी हुवावे आणि झेडटीईच्या नेटवर्क, मोबाईल व अन्य उत्पादनांवर बंदी घातली. अमेरिका, ब्रिटन, जपान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने हुवावे व झेडटीईविरोधात याआधीच अशी पावले उचलली आहेत. १७० देशांत काम करणार्या हुवावेला हा एक मोठा झटका आहे. ट्रम्प प्रशासनाने ‘हुवावे’चा ‘एंट्री लिस्ट’ मध्ये समावेश केला आहे. ‘एंट्री लिस्ट’ ही अशा कंपन्यांची यादी आहे, ज्यांना सरकारी परवानगीशिवाय अमेरिकन कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान विकत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही.
May 27, 2019
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर पुरुष प्रतिनिधी आपल्या स्मरणात आहेत परंतु या १५ महिला सदस्यांच्या महत्वपूर्ण योगदानाचा आपल्याला सहजपणे विसर पडला आहे. भारतीय ‘संविधानाच्या’ निर्मितीत हातभार लावणाऱ्या अश्या १५ स्त्रियांची अगदी थोडक्यात ही ओळख.
April 26, 2021
सांधे दुखणे, सांध्यांची हलचाल योग्य प्रकारे न होणे, चालताना, वाकताना, उठताना-बसताना त्रास होणे, जिना चढणे-उतरणे त्रासदायक होणे ही सर्व लक्षणे उतारवयी उत्पन्न होणारी लक्षणे आहेत मात्र बदलती जीवनशैलीमुळे आज तरुणांमध्ये सुद्धा सांधे दुखण्याचे प्रमाण वाढत आहे.
संधिवाताचे अनेक प्रकार असून त्यांची वेगवेगळी कारणे असतात. संधिवाताच्या प्रकाराचे निदान करताना खालिल मुद्दे विचारात घ्यावे लागतात.
1. सांध्यांची झीज झाल्याने संधीवात निर्माण झाला आहे का,
2.सांध्यांमध्ये जंतुसंसर्ग झाल्याने संधीवात निर्माण झाला आहे का,
3.सांध्याला दुखापत झाल्याने सांधा दुखतो का,
4. हाडांच्या फ्रॅक्चरमुळे सांधा दुखतो का,
5. रक्तामध्ये युरिक एसिड चे प्रमाण वाढल्यामुळे Goutची स्थिती निर्माण झाल्याने सांधे दुखतात का,
7. आमवात आहे की संधिवात आहे,
7. मधुमेह, स्थुलता यासारख्या विकारांमुळे संधिवात झाला आहे का, अशा अनेक गोष्टींचा विचार करुन संधिवाताच्या प्रकाराचे निदान करुन योग्य उपचार योजावे लागतात.
चिकित्सक सल्ला जरूर घ्यावा ...
हल्ली तरुण वयातच महिलांना संधिवाताचा त्रास होऊ लागला आहे. अनियमित खाण्याच्या सवयी, बैठी जीवनशैली हीदेखील हा आजार होण्यामागची कारणे आहेत. या आजाराला कसा प्रतिबंध घालता येईल त्याची माहिती घेऊया...
वातावरणातील प्रदूषण, धूम्रपान, आरोग्यदायी आहाराचा अभाव यामुळे संधिवात जडण्याची शक्यता असते. पण, अॅण्टीऑक्सिडंट तसेच हिरव्या पालेभाज्यांच्या सेवनाने संधिवात टाळता येतो. जेवणात योग्य प्रमाणात प्रोटीन (शरीराच्या वजनाच्या प्रतिकिलो मागे एक ग्रॅम याप्रमाणे) गरजेचे आहे. त्याशिवाय व्हिटॅमीन डी व कॅल्शिअमचीही गरज आहे.
काय टाळावे?
गुडघ्याला संधिवात असेल तर जॉगिंग व दोरीच्या उड्या यासारखे व्यायाम टाळावेत. सायकल व पोहोण्याचा व्यायाम गुडघ्यांसाठी चांगला आहे. संधिवाताचा त्रास असलेल्यांनी गरजेनुसार व शरीराला झेपेल असाच व्यायाम करावा. स्नायू बळकट करण्यासाठी व्यायामाचा चांगला उपयोग होतो. यामुळे गुडघ्याच्या सांध्यांना स्थरिता येते आणि योग्य चपला वापरल्या तर त्याचा फायदा होतो.
व्यायामाचा फायदा संपूर्ण शरीरासाठी असतो. अनेक लोक व्यायाम म्हणून चालतात. पण, शरीराच्या वरच्या भागाकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. एकाच प्रकारच्या सांध्यांचा अतिवापर केल्याने त्यावर लवकर ताण येतो. म्हणून शरीराच्या सर्व भागांना सारखाच व्यायाम मिळणे गरजेचे आहे. सर्वसामान्यपणे दुर्लक्षित राहणारा व्यायामाचा महत्त्वाचा प्रकार म्हणजे स्ट्रेचिंग. स्ट्रेचिंग नियमीतपणे केल्यास सांध्यांमध्ये संतुलन राहते. जखमी होण्याचा धोका टाळायचा असेल तर व्यायाम सुरू करण्यापूर्वी वॉर्मअप करणे गरजेचे आहे; पण ते करताना सांध्याला दुखापत होणार नाही याची काळजी घ्या.
सवयी बदला
संधिवात झालेल्या महिलांना जीवनशैलीत सुधारणा केल्यास फायदा होतो. जमिनीवर बसणे, जिने चढणे, भारतीय पद्धतीच्या शौचालयाचा वापर यांचा गुडघ्याचा संधिवात असलेल्यांना त्रास होतो. त्यापेक्षा कमोडचा वापर करावा. औषधांमुळे कार्ट्रिजेसची झालेली हानी भरून निघत नसली तरी दुखणे, सूज येणे कमी होते. वेदना कमी होतात. तसेच सांध्यांची कार्यक्षमता सुधारून त्यांचे रक्षणही करता येते.
आमवात संधिवात....
सांध्यांना विचंवाने दंश करावा अशा वेदना. हातापायाची हालचाल होत नाही. साध्यांना सूज, चालता येत नाही, उठता बसता येत नाही, थोडा ताप असतो, कष्ट सहन होत नाहीत, अशा वेळी रोज सकाळी रात्री अर्धा तोळा ते एक तोळा एरंड तेल ज्वारीच्या पिठात घालावे व त्याची भाकरी करून दिवसातून दोन्ही वेळा खावी. एरंड तेल एरंडाच्या पानास लावून दुखाच्या सांध्यांना ही पाने बांधावी, हातपायाची हालचाल नियमित व्हावी. जितके फिरता येईल तितके फिरावे. संधिवात अगर आमवात दोन्हीहि बरे होण्यास फार मोठी मदत होते.
कंबरेचा व पाठीचा शूल :
कंबर वाकता येत नाही. पाठही दूखत असते, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते कमी होत नाही. चालताना चमका मारतात. अशा वेली एरंडमुळ व सुंठ यांचा काढा करावा. या काढ्यामध्ये दोन ते तीन गुंजा जवखार घालून तो रोज घेत जावा शूल थांबतो.
-- सुषमा मोहिते
आरोग्यदूत
October 25, 2016
खनिजापासून लोखंड बनविण्याच्या प्रक्रियेचा विकास होण्याआधी माणसाला लोखंड माहीत होते. पृथ्वीवर सापडणाऱ्या अशनीमध्ये एक काळ्या रंगाचा धातू मिळत असे. त्या काळात इजिप्तच्या लोकांनी त्याला काळे तांबे असे नाव दिले होते. हा धातू म्हणजे लोखंड आणि ६ ते ८ टक्के निकेल यांचे संमिश्र असे.
April 28, 2023
जागतिक दहशतवादाचा सगळ्यात मोठा हादरा भारताला बसलेला आहे, यामुळे भारतीय युवकांची भूमिका दहशतवादाला समूळ नष्ट करण्याची असली पाहिजे. आमच्या देशात येऊन घातपाती कृत्य करणाऱ्या अतिरेकींना धडा शिकविण्यास सज्ज असले पाहिजे.
July 27, 2023
चायनीज अन्न (?)पदार्थ : विषारी चीनी ड्रैगनची भारतीय मनाला पडलेली भयानक भुरळ ...
हा लेख लिहायचा खरं तर काही वर्षांपासून माझ्या मनांत होतं ...पण व्यवस्थित माहिती संकलित झाल्याशिवाय लिहणे अशक्य होते ...
चायनीज पदार्थांच्या विषारी गुणधर्माची ओळख झाली ती एका किडनी फेल झालेल्या रुग्णाचा अभ्यास करताना ... डायलिसीस साठी दवाखान्याच्या चकरा मारणारा हा रुग्ण वयाने तरुण, शरीराने दणकट असलेल्या हा रुग्ण आमच्या दूरच्या नात्यातलाच आहे ... त्याची केस अभ्यासताना लक्षात आले की त्याला चायनीज पदार्थ भरपूर खायची भयानक सवय होती .... म्हणजे त्याच्या या आहाराच्या सवयीचा नक्कीच काहीतरी परिणाम त्याच्या किडनीवर झालेला होता ...
पण हि एक केस पर्याप्त पुरावा नव्हती ...म्हणून किडनी निकामी झालेल्या प्रत्येक रुग्णाला मी हा प्रश्न विचारायला सुरवात केली ... आणि आश्चर्य म्हणजे तरुण वयात किडनी निकामी झालेल्या रुग्णांपैकी ७० ते ८० टक्के रुग्ण सातत्याने चायनीज आहार खात होते ....
चायनीज आहारात असे आहे तरी काय ज्याचा इतका विषारी परिणाम आपल्यावर होतो ???
प्रातिनिधिक उदाहरण म्हणून आपण सोयासॉस आणि अजिनोमोटो बद्दल माहिती पाहू ...
१. सोया सॉस :
कोणताही दीर्घकाळ कुजवलेला पदार्थ खाल्ला कि म्हणजे मानवी शरीरातील ओज आणि तेज कमी होते ... पचनसंस्था बिघडून लवकर म्हातारपण येते ...
सोया सॉस मध्ये प्रमाणापेक्षा मिठाचे प्रमाण खूप जास्त असते जे तुमच्या यकृताला हानी पोचवते ....
त्यापेक्षा मोठा कहर म्हणजे भारतात जो सोया सॉस मिळतो तो वर्षभर कुजेपर्यंत कुणाला दमधीर नसतो...... म्हणून वेगवेगळी रसायने वापरून आणि कृत्रिम पद्धतीने हा सॉस बनवतात ... जो आधीच्या विषारी सोया सॉस चे विषारी गुणधर्म आणि अनेक पटीने वाढवतो ....
चीनमध्ये सोयाबीन आणि गहू वर्षभर कुजवून सोया सॉस तयार करतात ... आपण हि प्रक्रिया बघू शकता ....
http://www.youtube.com/watch?v=queVlA4xLgI
२. अजिनोमोटो :
अजिनोमोटो भाज्या मऊ करणारा एक पदार्थ आहे ....थोडाफार मिठासारखा म्हणू शकतो .....
हल्लीच्या संशोधनानुसार कर्करोगास हमखास कारणीभूत ठरणारा हा पदार्थ आहे ...
अन्नाची चव आणि रंग कृत्रिमरित्या वाढवणारा हा पदार्थ असून याने भाज्यांचा रंग खुलतो आणि त्या आकर्षक वाढतात ...
हा एक असा विचित्र पदार्थ आहे कि एका व्यक्तीच्या भाजीत एक चिमुट अजिनोमोटो पुरत असेल तर दहा व्यक्तींच्या भाजीतसुद्धा एक चिमुटच पुरेशी होते ... यावरून त्याच्या हानिकारक गुणधर्मांची कल्पना आपणास येईल ....
असेच ढीगभर पदार्थ वापरून चायनीज अन्न (?) तयार केले जाते जे आपल्या आरोग्यास हानिकारक आहे ...
अर्धकच्या भाज्या आणि मांस याचे प्रमाण चायनीज आहारात भरपूर असते ... आपल्याकडे मिळणारे चायनीज पदार्थ म्हणजे मेघालय आणि मणिपूर इथल्या लोकांनी चित्रविचित्र बदल केलेले एक व्यंजन आहे ...
त्याचे एक उदाहरण म्हणजे मंचाव सूप आपल्याकडे घेतात तो चायनीज पदार्थच नाहीये ....आणि भात आणि भाज्या तळण्याची पद्धत मूळ चीनी नसून तीपण या मेघालय वाल्यांची देणगी आहे .... जी अत्यंत चुकीची आहार पद्धत आहे
-- डॉ सचिन जाधव
सुखायु हेल्थकेअर,
कैनडा कॉर्नर
नासिक
संपर्क क्रमांक : 0922512839
How It's Made Soy SauceDiscovery / Science Channel's "How It's Made" Soy Sauce episodewww.youtube.com
October 21, 2016
गोरं करणाऱ्या क्रीम आणि गोरं करणाऱ्या साबणांचा खप फार मोठ्या प्रमाणात होतो. त्वचेला रंग कशामुळे येतो? आपल्या त्वचेमधील मेलेनॉसाइट पेंशींमधून स्त्रवणाऱ्या मेलॅनिन या रंगद्रव्यामुळे त्वचेला रंग प्राप्त होतो. खरं तर याच मेलॅनिनमुळे आपल्या त्वचेला अतिनील किरणांपासून सुरक्षा मिळते म्हणूनच शास्त्रीयदृष्ट्या सावळी त्वचा असणं ही एक निसर्गाने आपल्याला दिलेली भेट आहे.
November 18, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti