वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भाग – २
अर्चनेचे प्रकार आपल्याला वैदिक काळापासून दिसून येतात. वैदिक ऋचांमध्ये वेगवेगळ्या देवतांना वंदन व त्यांची स्तुती केकेली आहे. उदाहरणार्थ,अनेकांना परिचित असलेला गायत्री मंत्र. ‘ॐ तत्सवितुर्वरेण्यम्’ हा गायत्री मंत्र, सूर्याची वंदना करणारा मंत्र आहे. इंद्र, मित्र-वरुण, नासत्य (अश्विनीकुमार) यांची अर्चना होत असे, हें आपण आधी पाहिलेंच आहे. तसेंच, उषा, सरस्वती नदी यांची स्तुती करणार्या वैदिक ऋचाही आहेत. नंतरच्या काळातही, पुराणिकांनी हें दैवी-कथांच्या कथन-गायनाचें कार्य शतकानुशतकें केलें आहे.
‘आरती’ हा शब्द संस्कृत असला तरी, आज आपल्यासमोर ज्या पद्यरूप आरत्या असतात, त्या ‘आरत्या’ हा काव्यप्रकार मध्ययुगीन आहे. वैदिक आर्ष-संस्कृत व नंतरच्या काळातील संस्कृतमध्ये अर्चनेचे अनेक प्रकार दिसले तरी, आरत्या दिसून येत नाहीत. (‘संस्कृत भाषेत आरत्या पुरातन काळीं अस्तित्वात होत्या, पण सगळ्याच्या सगळ्या नंतरच्या काळात लुप्त झाल्या’ , हें मानणें फार कठीण आहे. फारतर असें असेल की, ‘तत्कालीन संस्कृत आरत्या असल्याच तर, फारफार कमी असतील , व म्हणून सहसा सापडत नाहींत’. पण , त्याहीपेक्षा जास्त शक्यता अशी वाटते ही, ‘त्या काळी मंत्र-श्लोक-स्तोत्रें-प्रार्थान हेंच प्रकार वापरात असावेत’ ). आरतीच्या संदर्भात, पुरातनकालीन ‘प्राकृत‘ भाषांचेंही तसेंच आहे. मध्ययुगात, अगदी यादवकालीन मराठीतही आपल्याला आरत्या हा प्रकार दिसत नाहीं. मुकुंदराज-ज्ञानेश्वर यांचा काळ हा यादवकालीन काळ. ज्ञानेश्वरांनी भगवद्.गीतेवर ‘टीका’ लिहिली, पसायदान (प्रसाद-दान) लिहिलें, विराण्या लिहिल्या, भक्तिपंथाचा प्रचार-प्रसार केला ; पण त्यांनी लिहिलेली आरती दिसून येत नाहीं. ज्ञानेश्वकालीन इतर संतांनीही भरपूर रचना केल्या आहेत, ज्या भक्तिरसानें भरलेल्या आहेत, पण त्यांनी रचलेली अशी एखादी आरती दिसत नाहीं. (ज्या नामदेवांच्या नांवाच्या आरत्या आहेत, ते नामदेव ज्ञानेश्वरकालीन नव्हेत, तर पंधराव्या-सोळाव्या शतकातील आहेत. त्याबद्दल पुढे पाहूं या).
भक्ती ही गोष्ट जरी पुरातन काळापासून अस्तित्वात आहे, पण ज्याला ‘भक्तिपंथ’ म्हणतात, तो पंथ इ.स. च्या दुसर्या-सहस्त्रकाची-सुरुवातीची-दोनएक-शतकें-गेल्यानंतर अस्तित्वात आलेला आहे. तो दक्षिणेकडून उत्तरेकडे गेला, व त्याचा भारतभर प्रसार झाला. उत्तरेत वल्लभाचार्यांनी भक्तिपंथाचा प्रचार केला. हिंदीत, तुलसीदास, सूरदास, मीराबाई अशा संतांच्या भक्तिपर रचना खूप आहेत (उदा. तुलसींचें रामचरितमानस --- ज्यातील ‘रघुकुलरीति सदा चली आई । प्रान जाहिं पर वचन न जाहिं ।’, ही चौपाई प्रसिद्ध आहे ; सूरदासांचें ‘निरगुन कौन देस को बासी ? ’ वगैरे ; मीरेचें ’मेरो तो गिरधर गोपाल, दूसरो न कोय ।’ इत्यादी). पण, या संतांनी आरत्या मात्र लिहिलेल्या आढळून येत नाहींत. कबीर तर एक प्रकारें सूफीच होते. भारतात इराणमधून ‘सूफीझम’ मध्य युगात आला. ‘सूफीझम’मध्येही एक प्रकारची भक्ती व तीनुसार गायन-संगीत हें होतें. (त्या काळीं, व आजही अशा संतांच्या मज़ारपुढे भक्तिप्रद कव्वाल्या गायल्या जातात). मात्र कबीरांनी व अन्य सूफी संतांनी आरत्या लिहिल्याची माहिती नाहीं. कबीरांचें लेखन तर ‘रहस्यवाद’ म्हणून ओळखलें जातें, म्हणजे तें भक्तीपंथीय नाहीं. गुजरातीत, नरसी मेहता ‘वैष्णव जन तो तेणे कहिये जे पीर पराई जाणे रे ’ अशी भजनें लिहितात, पण तत्कालीन आरती उपलब्ध आहे काय ? पूर्वेतही चैतन्य महाप्रभू मधुराभक्ति आळवत होते, पण तत्कालीन आरत्या आहेत काय ? तसें पाहिलें तर, तुलसी, सूर, मीरा, नरसी, चैतन्य हे ज्ञानेश्वरादींच्या बर्याच नंतरच्या काळातले आहेत, पण मध्य युगात एकनाथांनी मराठीत सुरूं केलेला ‘आरती’ हा प्रकार हिंदीत त्या काळीं दिसत नाहीं, तो नंतर आला असणार.
भक्तिपंथाप्रमाणेंच, ‘दत्तपंथ’ ,जो खासकरून महाराष्ट्रात लोकप्रिय आहे , हा पंथही मध्ययुगीनच. दत्ताला ‘अवधूत’ असेंही म्हणतात, आणि अवधूत हा शब्द नाथपंथीयांमध्ये प्रसिद्ध आहे. ‘नाथपंथा’चा मुख्य काळ, इ.स. च्या पहिल्या-सहस्त्रकाच्या-अखेरीची-दोनएक-शतकें व दुसर्या-सहस्त्रकाची-सुरुवातीची-दोनचार-शतकें, असा आहे, म्हणजेच, नाथपंथही मुख्यत: मध्ययुगीनच. त्यामुळे, भक्तिपंथाबरोबरच, या पंथांशी संबंधित आरत्याही पश्चातकालीन ठरतात.
मराठीत आपल्याला पद्यरूपानें दिसणार्या आरत्या , मुख्यत्वें संत एकनाथ यांच्या काळापासूनच्या आहे, याचा उल्लेख आपण आधी केलेलाच आहे. एकनाथांआधी आपल्याला भक्तिरचना, ओवी, अभंग, पदें, वगैरे रूपांतच दिसतात. एकनाथांनी भावार्थ रामायण लिहिलें, अध्यात्मिक भारुडें लिहिली, तशा आरत्याही लिहिल्या. आरत्यांमध्ये, ‘एका जनार्दन‘ असा त्यांनी स्वत:च्या नांवाचा उल्लेख केलेला आहे. (जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरू ). त्या काळानंतर आपल्याला तुकाराम, रामदास वगैरे संतांनी, त्यांच्या शिष्यवर्गानें, त्या-त्या पंथीयांनी, तसेंच मुक्तेश्वरादि अन्य भक्तांनी, साहित्यिकांनी व भक्ति-रचना करणार्या इतरांनीं आरत्या लिहिलेल्या आहेत. आपण आधी उल्लेख केलेलाच आहे की, ‘नामदेव’ या नांवाच्या ज्या आरती-रचना आहेत, त्या ज्ञानेश्वरकालीन नामदेवांच्या नव्हेत. त्या आरत्यांची ची भाषा पाहिल्यास, ती ज्ञानेश्वकालीन नाहीं, हें सहज लक्षात येतें. ज्ञानेश्वरकालीन व एकनाथकालीन मराठीत फरक नसता, तर एकनाथांना ज्ञानेश्वरांची ‘भावार्थदीपिका’ (ज्ञानेश्वरी) हिची भाषा, स्वत:च्या काळात वापरात असलेल्या मराठीत बदलायची जरूर भासलीच नसती. इतिहासाचार्य राजवाडे यांना, ज्ञानेश्वरांच्या काळानंतरच्या दो-चार-दशकांतच उतरवलेली (कॉपी केलेली) प्रत मिळालेली आहे. तशीच अन्य एक प्रत अन्य एका सद्- गृहस्थांनाही मिळालेली आहे. त्यांतून, ज्ञानेश्वर व एकनाथ या दोन संतांच्या काळातील भाषेचा फरक कळून येतो.
ही चर्चा करण्यांचे कारण म्हणजे, आरत्यांशी संबंधित ‘नामा/ नामदेव’, ‘बाप रखुमादेवीवर’ वगैरे उल्लेख हे, पश्चात्-कालीन आहेत. नामा म्हणजे ‘विष्णुदास नामा’. ‘नरहरि’ या नांवानें ज्यानें आरती लिहिली, ती व्यक्ती नरहरी सोनार खचितच नव्हे. ‘गीतेची आरती’ म्हणून एक आरती आहे, जिच्यात शेवटी ‘बाप रखुमादेवीवर’ असे शब्द आहेत ; पण ही ज्ञानेश्वरांनी रचलेली नक्कीच वाटत नाहीं, तिची भाषा ज्ञानेश्वरकालीन वाटत नाहीं. तसेच, ज्ञानेश्वर, तत्कालीन प्रथेप्रमाणें ‘बापरखुमादेवीवरु’ असा उकारान्ती शब्द वापरतात. (त्यांचे अन्य असे शब्द आहेत : घनु, काऊ, पाऊ, पंढरीराऊ, वगैरे ) . पण हा, ‘गीतेच्या आरतीचा’ कर्ता ‘बापरखुमादेवीवर’ असा स्वत:चा अकारान्ती उल्लेख करतो. त्यावरूनही स्पष्ट दिसतें की, हा रचयिता म्हणजे ज्ञानेश्वर नव्हेतच. कदाचित असें असावें की, ज्ञानेश्वरांनी गीतेवर ‘टीका’ लिहिलेली असल्यामुळे, हा जो कोणी ‘गीतेची आरती’ रचणारा अनामिक भक्त होता, त्यानें भक्तिभावानें ज्ञानेश्वरांचें नांव तिच्यात गोवलें असावें. याव्यतिरिक्त, या अनामिक रचयित्याच्या मातेचें नांवही ‘रुख्मिणी’ असूं शकेल, व त्यामुळे त्यानें ज्ञानेश्वरांपासून स्फूर्ती घेऊन, स्वत:चें नांवही (टोपण नांव), ‘बापरखुमादेवीवर’ असें घेतलेलें असूं शकेल.
साधारणत: आरत्यांमध्ये रचयित्यांनी त्यांची नांवें गोवलेली असतात, हें वरच्या उदाहरणांवरून स्पष्ट आहे. (तशी मध्ययुगीन पद्धतच होती. उदा. सूरदास, मीरा यांच्या रचना पहा. गझल हें भक्तिकाव्य नव्हेच.पण गझलेतही, मक्त्यात --- म्हणजे अंतिम शेरमध्ये ---- आपल्याला गझलगोंनी स्वत:चें नांव गोवलेलें दिसतें ). आरत्यांच्या थोर रचयित्यांची कांहीं नांवें आपण आधी पाहिलीच आहेत, जसें एकनाथ, मुक्तेश्वर, तुकाराम, रामदास वगैरे. कांहीं अन्य नांवांची वर चर्चा केलेली आहे , जसें विष्णुदास नामा, नरहरि इत्यादी. कांहीं अन्य नांवें अशी : श्रीपति, मोरेश्वसुत-वासुदेव, माधवदास, चिंतामणि, रामी-रामदास (एक रामदासपंथीय साधुपुरुष), दामोदर, अनंत- गोपाळदास, कृष्ण (कृष्णाजी), मंगेशात्मज, गोसावीनंदन, इत्यादी. अनेकदा रचयित्यानें स्वत:चा उल्लेख, ‘दास’ , ‘माधव-दास’, ‘रमावल्लभ-दास’ (इत्यादी), एवढाच केलेला आहे. कांहीं आरत्यांमध्ये रचयित्यानें स्वत:चें नांव गोवलेलेंच नाहीं. कारण तो भक्त आहे, त्याला स्वत:चें नांव गोवायची आवश्यकता वाटली नाहीं. आधुनिककालीन संतांवरील आरत्यांच्या रचयित्यांनी साधारणपणें त्यांचें नांव गोवलेलें नसतेंच. याव्यतिरिक्त, अजूनही अनेक रचयिते असतील, असणारच.
वर उल्लेखलेले ‘गोसावीनंदन’ यांनी जशा मराठी आरत्या लिहिलेल्या आहेत, तशी त्यांनी लिहिलेली ‘सिंदुर लाल चढायो’ ही श्रीगणेशाची हिंदी आरतीही मिळते. त्याचप्रमाणें रामदास, एकनाथ यांच्या हिंदीतील (किंवा जिला ‘दखनी हिंदी’ म्हणत, त्या भाषेतील) रचना आहेत, नामदेवांच्या हिंदी रचना तर शिखांच्या ‘गुरु ग्रंथसाहिब’ या ग्रंथात समाविष्ट आहेत. पण या भक्तिप्रद रचना असल्या तरी, त्या आरत्या नव्हेत. (ग्रंथसाहिब भक्तिपरच आहे, त्यातील ‘शबद’ या भागाचें बरेंच ‘पठण’ होतें, पण त्या आरत्या नाहींत. गुरुबानी-पठणात ‘आरती’ हा शब्द येतो, पण तरी त्या पठणाला ‘आरती’ असें अभिधान देतां येईल का ?).
आरत्यांचे वर्ण्यविषय (आराध्यें-उपास्य) पण भिन्नभिन्न असतात. जसें, गणेश, शंकर, विठ्ठल, दत्त, विष्णू, व्यंकटेश, श्रीराम, मारुती, परशुराम, श्रीकृष्ण, खंडोबा, असे अनेक देव व देवावतार; दुर्गा, गौरी / मंगळागौरी , हरितालिका, महालक्ष्मी, एकवीरा, शांतादुर्गा, अशा अनेक देवी ; ज्ञानेश्वर, नामदेव, नृसिंह- सरस्वती, एकनाथ, तुकाराम, बहिरोबा, रामदास, असे पुरातन संत ; अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शेगांवचे गजानन महाराज, गोंदवल्याचे गोंदवलेकर महाराज, शिरडीचे साईबाबा, पावसचे स्वरूपानंद, असे अनेक आधुनिककालीन संत, या सर्वांवर आरत्या आहेत. त्याव्यतिरिक्त, नवनाथ, काळभैरव, दशावतार, वैनतेय (गरुड), चंद्र, शनिदेव, सूर्य, तुलसी, गंगा, सत्यनारायण, देवपंचायतन, पुरातन-संतांची-मांदियाळी, सद्.गुरू, अशा अनेकांच्या आरत्या मिळतात. विविध देवस्थानांतील विशिष्ट दैवतांच्या आरत्याही मिळतात, जसें शिखर शिंगणापुरचा शंभूमहादेव, मंगेशीचा मंगेश. त्यातच असेंही आहे की मूळ दैवत एकच, पण त्याला भिन्नभिन्न नांवें असतात, व त्या त्या नांवांनी तें दैवत भजलें जातें, आणि यामुळे त्या त्या भिन्नभिन्न नांवांनी त्याच्या आरत्याही होतात, जसें की दुर्गा, विष्णू इत्यादी. परत, असेंही आहे की, एकच दैवत, पण वेगवेगळ्या स्थानमहात्म्यामुळे तें वेगवेगळ्या नांवानें भजलें जातें, व त्यामुळे त्या त्या भिन्न स्थानांशी निगडित देव-नावांच्याही आरत्या केल्या जातात. ( जसें की, शंकर हें दैवत भजलें जातेंच , पण, वर उल्लेखल्याप्रमाणें, मंगेश हा आहेच, शिखर शिगणापुरचा शंभुमहादेवही आहेच, जेजुरीचा खंडोबाही आहेच). परत, अवतारांचा समावेशही विचारात घ्यावा लागतो. या सगळ्या गोष्टीमुळे आरत्यांचें वैविध्य वाढलेलें आहे. त्यामुळे, आरत्यांची यादी प्रचंड आहे; त्यांची संपूर्ण जंत्री बनवणें फार कठीण आहे. पण थोडक्यात काय, तर, ज्या आराध्याची/उपास्याची आराधना/उपासना करायची, पूजा करायची, त्या आराध्याची आरती कोणीतरी संतानें, भक्तानें वा कुणां अन्य कवीनें रचलेली असते.
(पुढे चालू )
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
माधवी जोशी यांच्या मुद्द्यांशी मी basically सहमत आहे. एकदोन गोष्टींचा थोडाफार खुलासा.
या सर्व गोष्टींमुळे, मॅक्सम्युलरचे विचार आपण, ‘with a pinch of salt’ च घ्यायला हवेत. याचाही उल्लेख आपण आधी केलेलाच आहे. ( मात्र, त्याचे कांहीं विचार बरोबरही होते ; तें तपासून घ्यायला हवेत).
त्यामुळे, बाबासाहेबांनी समाजातील विषमता दूर करण्यावर भर दिला, संस्कृत भाषेवर राग धरला नाही. जर तुमच्या-माझ्यासारख्या साधारण लोकांना हें जाणवतें की, दोष जो असेल तो समाजातील कांहीं घटकांचा होता, भाषेचा नब्हे ; तर बाबासाहेबांसारख्या असामान्य प्रतिभेच्या व्यक्तीच्या तें ध्यानात आलें नसतें तरच नवल !
कर्णाच्या मुखीं घातलेले शब्द बाबासाहेबांना लागू पडतात, ते असे : ‘दैवायत्त कुले जन्म: मदायत्त तु पौरुषम्’. जन्म कुठे व्हावा हें दैवाधीन असतें, पण आपलें कर्तृत्व आपल्या स्वत:च्याच हातात असतें. बाबासाहेबांनी स्वत:चें कर्तृत्व सिद्ध केलें यात शंकाच नाहीं.
दुर्दैवानें तें प्रपोजल पास होण्यासाठी फक्त एक मत कमी पडलें. (फक्त एकच मत ! )
पण, यावरून दिसून येते की, या प्रपोजलसाठी, विविध प्रांतीय लोकांचा, दलितांचा, मुस्लिमांचाही किती सपोर्ट होता.
(संदर्भ : USA स्थित ज्येष्ठ विचारवंत लेखक राजीव मलहोत्रा यांचा ग्रंथराज, ‘The Battle For Sanskrit : Is Sanskrit Political or Sacred ? ; Oppressive or Liberating ? ; Dead or Alive ?’ ).
(पुढे चालू )
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याविषयी काही कथा आहेत. त्यावरून ही प्रथा कशी अस्तित्वात आली असावी यावर उजेड पडतो.
रामायणाच्या पंचम सर्गांत रघुवंशामध्ये दिलेली कथा अशी- पूर्वी पैठणमध्येदेवदत्त नावाच्या एका ब्राह्मणास कौत्स नावाचा मुलगा होता. तो सुशील होता. मौजीबंधनानंतर तो भडोच नावाच्या शहरी वरतंतू ऋषीच्या घरी विद्यार्जनासाठी गेला. काही काळ लोटल्यावर कौत्स सर्व शास्त्रांत पारंगत झाला, गुरूला गुरुदक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून कसे मुक्त व्हावे असा विचार तो करू लागला. गुरूंचा निरोप घेताना त्याने अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्याचे आभार मानून आपल्याआवडीचा काही पदार्थ असल्यास तो सांगावा, म्हणजे गुरुदक्षिणेदाखल तो आणून देईन असे त्याला सांगिलते.
गुरूने उत्तर दिले:-कौत्सा, दक्षिणार्थ विद्या शिकविणे हे अनुचित कर्म आहे. शिष्य विद्वान् झालेला पाहून गुरुस जो आनंद प्राप्त होतो तीच गुरुदक्षिणा होय.परंतु कौत्सास गुरूच्या ऋणात राहणे न आवडून त्याने आग्रह धरला व पुन: पुन: मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ? असे विचारू लागला. तेव्हा वरतंतू ऋषी म्हणाले,मी दक्षिणा घ्यावी असा तुझा आग्रहच असेल तर तुला शिकविलेल्या प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाडूनच आणून दे.ही अट कौत्साने मान्य करून आपल्या विद्येच्या धीरावर तो तेथून बाहेर पडला, परंतु चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाच इसमाकडून मिळविणे काही सोपे काम नव्हे हे त्याला लवकरच समजले.
रघुराजा मोठा उदार व विद्वानांस आश्रय देणारा आहे असे त्याच्या कानावर येताच तो त्याच्याकडे गेला, परंतु त्या वेळी रघुराजाने विश्वजित् यज्ञ करून ब्राह्मणांकडून सर्व द्रव्यभंडार लुटविले होते, यामुळे त्यालाही अत्यंत गरीबी आलेली होती. कौत्साने त्याच्या एकंदर स्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केल्यावर आपली इच्छा येथे सफल होणार नाही असे वाटून त्याला दुःख झाले. रघुराजाने आपल्या दारीआलेल्या विद्वान् ब्राह्मणाचा योग्य सत्कार केला व त्याच्या आगमनाचे कारण विचारले.
कौत्साने कारण सांगितलेव तो पुढे म्हणाला, 'राजा, तुला प्राप्त झालेल्या स्थितीत माझी मनीषा सफल होण्याचा रंग दिसत नाही. तथापि त्याजबद्दल खंत वाटू न देता मला दुसरा दाता शोधून काढण्यासाठी जाऊ दे. हे कौत्साचे भाषण ऐकून राजा हसला. त्याने चौदा कोटी सुवर्ण मुद्रा तीन दिवसात देतो असे कौत्सास आश्वासन देऊन त्याला आपल्या घरी ठेवून घेतले. थकलेली बाकी वसूल करण्यासाठी इंद्राबरोबर लढण्याची तयारी चालविली.
ही गोष्ट इंद्रास समजताच त्याने अयोध्या नगराबाहेर आपट्याच्या व शमीच्या झाडांवर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षांव करविला. रघुराजाने त्या सर्व कौत्सास दिल्या. त्याने त्या वरतंतू ऋषींपुढे ठेवून त्यांचा स्वीकार करण्याविषयी विनंती केली. परंतु त्यानेफक्त १४ कोटी मुद्रा ठेवून घेऊन बाकीच्या कौत्यसास परत दिल्या. त्या त्याने रघुरराजास आणून दिल्या, पण तोही त्या घेईना. शेवटी त्याच आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली त्या मुद्रांचा ढीग करून त्याने लोकांस त्या नेण्यास सांगितले.
लोकांनी अनायासे श्रीमंत होण्याची ही संधी साधून त्या नगरीच्या सीमेबाहेर असलेल्या त्या झाडांची पूजा केली, सोने यथेच्छ लुटले व एकमेकांस देऊन आनंद व्यक्त केला.
हा दिवस विजयादशमीचा होता. त्या वेळेपासून या झाडांची पूजा करून सुवर्णमुद्रांच्या ऐवजी या झाडांची पाने लुटण्याचा प्रघात प्रचारात आला.
-- व्हॉटसऍपवरुन
आपण रोजच्या व्यवहारात हे मराठी शब्द नक्कीच वापरु शकतो. प्रयत्न करायला काय हरकत आहे ?
पवार साहेबांचे आयुष्य चिमटे, कानपिचक्या, धोबीपछाड यातच गेले. मागून आलेले ममता, जयललिता, केजरीवाल, मोदी यांनी एकहाती सत्ता मिळवली पण 55 वर्षे राजकारणात असूनही पवार साहेबांना महाराष्ट्रात स्वबळावर एकहाती सत्ता मिळवता आली नाही.
आणि येड्या भक्तांना वाटतं साहेब राजकारणात काहीही घडवू शकतात.
4 वेळा मुख्यमंत्री, 15 वर्षे केन्द्रीय कृषी मंत्री राहूनसुद्धा आज जर जेल भरो करत असाल तर पवार साहेब मला एवढेच सांगा की 20 वर्षे काय केलत आपण ????
हे सरकार एक वर्षभर जलयुक्त शिवार म्हणून काय कर होतं ते काल सर्व बंधारे भरल्यावर आम्हाला समजलं..
एका पावसात सर्व बंधारे भरून गेले हो... यान्नी एका वर्षात जे केले ते तुम्हाला 15 वर्षात का नाही जमल हो...
आणि आता जेलभरो?? अहो त्यापेक्षा भुजबळ तटकरे अजित पवार रमेश कदम यांना सांगा की अक्षय ,नाना ,मकरंद यांचा आदर्श घ्यायला...
का फसवता आम्हाला साहेब...
अक्षय कुमार 90 लाख
रोहित शर्मा 5 लाख
अजिंक्य राहणे 5 लाख
लालबाग बागचा राजा 25लाख.
विठ्ठल मंदिर 1कोटी
mca - 1 कोटी
नाना पाटेकर.मकरन्द असे अनेक कलाकार मंडळी. अजून कितीतरी गणपती मंडळे हे सर्व दुष्काळी लोकांना मदत करत आहे आणि महाराष्ट्राला लूटणारे बारामतीकर काय तमाशा बघत आहे.
जास्तीत जास्त शेअर करा. बघा मग.बारामती कर 70हजार कोटी मधले 7 हजार कोटी तरी देतील.
नाही तर जेल भरो नक्की.
-- मकरंद
`गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।`
आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस... हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते व प्रथम ते शिक्षक होते. ते 'नीतिशास्त्र' या विषयाचे प्राध्यापक होते.
शिक्षक हा समाजाचा निर्माण कर्ता आहे. छोट्या बालकाचे देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षकाला कारायचे असते. शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरूचे स्थान आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. आज शिक्षणाचे अवमुल्यन केला जात असल्याचे चित्र समाजात दिवस आहे. तसेच गुरू-शिष्य संबंधांमधील पवित्र भावना लोप पावत आहे. या संबंधामधील पावित्र्य कायम ठेवण्यासाठी व डॉ. राधाकृष्णन् यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो.शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. आपल्या आई-वडीलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात. शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो.आपल्या व्यक्तीमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती व आदर असे पैलू पाडले जात असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. त्यांच्याविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करून त्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
शिक्षकांच्या भूमिकेचं महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यांच्या जागरुकतेसाठी हा दिवस साजरा केला जातो.
To my teacher...
"Teachers are often the people who inspire us the most. I know I wouldn't be where I am today without my fourth grade teacher, Mrs. Duncan. She so believed in me, and for the first time, made me embrace the idea of learning. I learned to love learning because of Mrs. Duncan."
- Oprah Winfrey.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
हा विचारप्रवर्तक लेख आहे. त्यांनी मुख्य मुद्दे समर्थपणें हाताळलेले आहेत, मी basically त्यांच्याशी सहमत आहे. केवळ कांहीं गोष्टींचा थोडासा ऊहापोह.
याबद्दल माझें मत मी शेवटी मांडणार आहे. आत्तां इथें त्याची चर्चा केल्यानें विषयांतर होण्याची भीती आहे. पहा परिशिष्ट – (२) .
मात्र, मोरे यांच्या लेखाला प्रतिसाद चांगला ( बराच) मिळाला आहे, असें मला वाटतें.
मध्य-युगातही युरोपीयांची ‘क्रूसेडस्’ या नांवानें मध्य-पूर्वेत मुस्लिमांशी जी युद्धें झाली, ती भाषिक नव्हती, ती धर्माधिष्ठित होती.
तेव्हां, हल्लीहल्लीपर्यंत तरी, हें धर्माधिष्ठित, तत्वज्ञानाधिष्ठित (philosophy) असेंच राजकारण होते. जेव्हांपासून भारतात भाषावार-प्रांतरचना झाली तेव्हांपासून राजकारण भाषाधिष्ठित बनले (अपवाद कदाचित तमिळनाडुचा. आणि तमिळांच्याही राजकारणाचा उगम, १८ व्या -१९ व्या शतकातील ‘आर्य-आक्रमण’ हा अयोग्य सिद्धांत आहे, हेंही आपण पाहिलें). पाकिस्तान-निर्माण हाही धर्माशी संबंधित प्रश्न केला गेला, भाषिक नव्हे, संस्कृतसंबंधी तर नव्हेच नव्हे.
इतिहासाचार्य राजवाडे सांगतात त्याप्रमाणें, (त्यांच्या काळीं) पुण्याची मराठी ही ‘नागर अथवा शिष्ट मराठी’ ( जिला राजोपाध्ये ‘प्रमाण-मराठी’ म्हणतात), समजली जात होती. त्याच्या ३०० वर्षें आधी पैठणची ‘ब्राह्मणी’ मराठी ही प्रमाण-मराठी समजली जात असे; व ७०० वर्षांपूर्वी, (म्हणजे, ज्ञानेश्वरांच्या काळीं) देवगिरीच्या भोवतालच्या प्रदेशातील ‘ब्राह्मणी’ मराठी ही प्रमाण-मराठी समजली जात असे.
आपल्याला ज्ञानेश्वरीची आज जी प्रत दिसते, ती एकनाथकालीन ‘प्रमाण-मराठी’मध्ये आहे. पण इतिहासाचार्य राजवाडे यांना पाटांगण-बीड येथें एक ज्ञानेश्वरकालीन ज्ञानेश्वरी सापडली, जी ज्ञानदेवांच्या काळानंतरच्या दोनचार दशकांमधील आहे. (श्री. माडगांवकर यांना सुध्दा अशीच त्या काळची आणखी एक प्रत मिळाली होती). त्या प्रतींची भाषा अर्थातच ज्ञानेश्वरकालीन ‘प्रमाण-भाषा’ आहे. एकनाथांच्या काळापर्यंत प्रमाण-भाषेचें रूप बदललें होतें, म्हणून त्यांना ज्ञानेश्वरीचें तत्कालीन भाषेत पुनर्लेखन करावे लागलें.
( हल्लीच्या काळातही, असें उदाहरण दिसतें. वरदा प्रकाशनचे भावे यांनी बर्याच जुन्या मराठी पुस्तकांचें पुनर्मुद्रण केले, त्यावेळी त्यांनी बदललेल्या भाषिक रूपांप्रमाणे, जुन्या-मराठीचें आधुनिककालीन मराठीत पुनर्लेखन केलें. )
(पुढे चालू )
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
"झटपट आनंद - तात्पुरत्या सुखासाठी भविष्यातील होणारा तोटा स्वीकारणे."
एखाद्याला डॉक्टरांनी सांगितले असते कि अंडी मटण एकदम बंद- बाहेरचं खाणं बंद फक्त साधे जेवण वेळच्या वेळी खा. ते पटलेलं असते, परंतु कुठूनतरी मिसळपावचा किंवा चायनीजचा वास येतो किंवा मित्रांच पार्टिचे नियोजन सुरु होतं. मग काय डॉक्टरांनी सांगितलेल हळूच बाजूला पडते नी आपोआपच पार्टीला हजेरी लागते. मग काय कसली शुगर नी कसला बीपी ?
दुसरे उदाहरण - उद्यापासून पहाटे लवकर उठून व्यायाम करण्याचं नियोजन असते पण सकाळी अंथरुणावरून उठावेसे वाटत नाही.
काही लोक तर म्हणतात कि "अलार्म बंद करून झोपाल्यावर रात्रीपेक्षापण चांगली झोप लागते "
असे करता करता व्यायामाचे राहूनच जाते.
हि दोन जशी perfect उदाहरणे आहेत तशीच आणखीन काही आहेत.
गरजेशिवायचा अतिरिक्त खर्च करणे - हे तुमच्याकडुन नकळत होते.
उदा. तुम्ही एक जाहीरात बघता 100 Megapixel चा कॅमेरा ज्यात 2000 पट optical zoom ची फ़ॅसिलिटी आहे. किमतीवर २०% सुट आणि ”मासिक सुलभ हप्त्यावर उपलब्ध” असे कळताच आपल्यातला फोटोग्राफ़र जागा होतो.
किंवा "५२ इंची LED TV वर १५% डिस्काउंट, सोबत होमथिएटर फ़्री" अशी जाहिरात बघताच आपल्याला जाणवू लागते कि आपली जूनी टिव्ही बदलायची वेळ आली आहे. मग काय अशी खरेदी नकळतच होवुन जाते.
असे करताना बऱ्याचदा अशा वस्तूंची खरेदी खरंच गरजेची आहे का? हे आपण तपासत नाही. सर्व शेजारी, पाहुण्याकडे आहेत किंवा सगळे स्टाफ मेंबर घेत आहेत म्हणूनपन काही लोक खरेदी करतात. याबाबतीत मात्र "जगाबरोबर राहिलं पाहिजे" असे त्यांना वाटते
नवीन मॉडेल आले कि लगेच TV किंवा मोबाईल बदलले जातात.
यात जाणाऱ्या पैशाचा विचार त्यांच्या मनाला शिवत नाही याचे कारण म्हणजे तात्पुरते समाधान -Instant Gratification.
People
spend money,
to buy things,
to impress the people's,
People's- who they never like.
यामुळे होतं काय की " गरज नसलेल्या वास्तूसाठी जेव्हा जास्त पैसा खर्च होतो तेव्हा गरजेच्या गोष्टीसाठी पैसा उरत नाही.
या दसरा आणि दिवाळीच्या सणात अशाप्रकारच्या तात्पुरत्या सुखाच्या जास्त नादी लागू नका. तुमचे आरोग्य, कुटुंब, धन-संपत्ती यांच्याबद्दलचे निर्णय घेताना आपण "INSTANT GRATIFICATION" च्या ट्रॅपमध्ये अडकलेले नाही ना याची खात्री करा.
फुल्ल प्लॅनिंग असणे हाच यातून वाचण्याचा मार्ग आहे.
Forwarded post from Facebook
कार्तिक शुक्ल पक्ष द्वितीया या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची शास्त्रीय माहिती या लेखाच्या माध्यमातून करून घेऊया.
हा दिवस म्हणजे शरद ऋतुतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र (ज्योतिष) आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा `बिजेच्या कोरीप्रमाणे बंधूप्रेमाचे वर्धन होत राहो', ही त्यामागची भूमिका आहे.' आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता भाऊबीजेच्या सण. बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. ज्या समाजात भगिनींना समाजातील व राष्ट्रातील पुरुष वर्ग भगिनी समजून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना अभय देतील व त्यामुळे त्या समाजात निर्भयतेने फिरू शकतील, तो दिवस, म्हणजे दीपावलीतील भाऊबीज पूजनाचा दिवस.
या दिवशी बहिणीच्या घरी भाउ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाउ मग ओवाळणीचे ताटात 'ओवाळणी' देऊन बहिणीचा सत्कार करतो.
तिथी
कार्तिक शुद्ध द्वितीया
२. इतिहास
या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला; म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’ असे नाव मिळाले.
३. महत्त्व
अ. अपमृत्यू येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीया या दिवशी मृत्यूची देवता ‘यमधर्म’ हिचे पूजन करतात.
आ. ‘या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो अन् त्या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जिवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो.’
इ. हा दिवस मातेच्या गर्भातून जन्म घेतलेल्या जिवांना एकमेकांविषयी वाटणारा जिव्हाळा व्यक्त करण्याचा दिवस आहे.
ई. या दिवशी जी बहीण आपल्या भावासाठी श्री यमाईदेवीकडे काही मागणे मागते, तिच्या भावानुसार ते भावाला मिळते. त्यामुळे तिचे भावाशी असलेले देवाण-घेवाण हिशोब काही प्रमाणात संपुष्टात येतात.
उ. या दिवशी स्त्री जिवात असलेले देवीतत्त्व जागृत होते आणि त्याचा भावाला लाभ होतो. भाऊ पूर्णवेळ साधना करणारा असेल, तर त्याला आध्यात्मिक लाभ होतो आणि तो साधना करणारा नसेल, तर त्याला व्यावहारिक लाभ होतो. भाऊ व्यवहार सांभाळून साधना करत असेल, तर त्याला आध्यात्मिक आणि व्यावहारिक लाभ ५०-५० टक्के होतो.
४. बहिणीने भावाला ओवाळल्याने भावावर होणारा परिणाम
भाऊ संत पातळीचा असेल, तर त्याच्या चेहर्याभोवती औक्षण केल्यास त्याचे आज्ञाचक्र जागृत होते. भाऊ चांगला साधक असेल, तर त्याला छातीपासून डोक्यापर्यंत ओवाळल्यास त्याच्या पातळीप्रमाणे त्याच्या षड्चक्रांतील एक चक्र जागृत होते.
सण साजरा करण्याची पद्धत
अ. यमतर्पण, यमदीपदान आणि यमाची प्रार्थना करणे
अपमृत्यू निवारणार्थ ‘श्री यमधर्मप्रीत्यर्थं यमतर्पणं करिष्ये ।’ असा संकल्प करून यमाच्या चौदा नावांनी तर्पण करावे. हा विधी पंचांगात दिलेला असतो. ‘याच दिवशी यमाला दीपदान करायचे असते. यम ही मृत्यू आणि धर्म यांची देवता आहे. ‘प्रत्येक माणसाला मरण आहे’, ही जाणीव सतत असणे आवश्यक कारण त्यामुळे माणसाच्या हातून वाईट कार्य वा धनाचा अपव्यय होणार नाही. तेव्हा यमाला दीपदान करून सांगायचे, ‘हे यमा, या दीपाप्रमाणे आम्ही सतर्क आहोत, जागरूक आहोत. जागरूकतेचे, प्रकाशाचे प्रतीक असलेला दीप तुला अर्पण करीत आहोत, त्याचा स्वीकार कर. तुझे आगमन केव्हा होईल, हे आम्हाला माहीत नाही; म्हणून आम्ही आमचा हिशोब वेळच्या वेळी ठेवतो, ज्यामुळे अर्धवट राहिलेल्याची चिंता करण्याची वेळ येत नाही; कारण आम्हाला माहीत आहे की, तू अचानक कधीही येऊ शकतोस.’
बहिणीने भावाला ओवाळणे
या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल, तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून त्याला ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळावे. `या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वतःच्या घरी पत्नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे अन् तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसेल, तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे.'
Copyright © 2025 | Marathisrushti