(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आकाश कंदील तेजाचा दूत

    दिवाळी या शब्दातच दिव्याचे महत्व अधोरेखित होते. ज्यावेळी विद्युत पुरवठा उपलब्ध झालेला नव्हता अशा काळात आकाशकंदीलाचे महत्व विशेष होतेच.

      April 23, 2019


  • ऐसी दिवानगी

    ५ एप्रिल १९९३ रोजी पाचव्या मजल्यावरील, बाल्कनीच्या खिडकीतून पडून दिव्या, दूरच्या प्रवासाला निघून गेली. हे तिचं अचानक मृत्यूमुखी पडणं एक न उलगडलेलं, गूढ रहस्यच होऊन राहिलं.

      March 2, 2022


  • वारी पंढरपुरी

    विठ्ठल विठ्ठल । भक्तांची माऊली ।माय ती साऊली । पांडुरंग ।।१।। पांडुरंगा भेटी । भक्त करी वारी ।हाती झेंडा धरी । विठ्ठलाचा ।।२।।

      July 13, 2019


  • जागतिक पियानो दिवस

    दी चित्रपटांतील सुमधुर संगीतातून ठसा उमटविलेल्या शंकर-जयकिशन या संगीतकार जोडगोळीतील शंकर यांचा पियानो पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात ठेवला आहे. जर्मनीतील स्टुटगार्ट शहरात तयार करण्यात आलेला हा पियानो सुमारे ९० वर्षांपूर्वीचा आहे. स्कीडमायर कंपनीच्या या अप्राइट पियानोमध्ये साडेसात सप्तकातील ८८ पट्ट्या आहेत. संगीतकार नौशाद हे स्वत: उत्तम पियानोवादक असल्यामुळे त्यांनी त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या अनेक गाण्यांत पियानोचा वापर केला आहे. ‘अनमोल घडी’ या चित्रपटात ‘जवाँ है मुहब्बत हसीं है जमाना..’ या नूरजहाँने गायलेल्या गाण्यात पियानोचे दर्शन घडते.

      March 29, 2022


  • बाटलीतले पाणी

    बाटलीतले पाणी विकत घेउन पिणे ही एक फॅशन झालेय का? हा प्रकार गेल्या काही वर्षातच फोफावला आहे. खरं आहे की बाटलीतलं पाणी शुद्ध असतं, त्याने पोटाचे विकार-बिकार होत नाहीत वगैरे वगैरे. पण त्यासाठी विकत घेतलेल्या बाटलीतलंच पाणी प्यायला हवं असं कुठे आहे? घरातूनही पाणी बाटलीत भरुन घेउन जाता येतंच की? पण त्याने स्टेटस खाली येतं असं मंडळींचं म्हणणं असतं. १ रुपयाचं पाणी १५-२० रुपयाला घेतलं की स्टेटस वाढतं म्हणे !

    आता काही मजेदार गोष्टी बघूया.

    आपण एखाद्या मोठ्या नावाजलेल्या हॉटेलमध्ये जातो. टेबलावर स्थिरस्थावर होत नाही तोच वेटर आपल्याला विचारतो... “साहेब, पाणी बिसलरीचं की साधं?” (तो मराठीत विचारत नाही हा भाग वेगळा)

    आपण आजुबाजूला नजर टाकतो. आपल्याबरोबरच्या माणसांना उगाचच विचारल्यासारखं करतो आणि त्याला ऑर्डर देतो... “बिसलरी”.

    आपल्याला हे माहित असतं का, की ग्रेड १ च्या सगळ्या हॉटेल्समध्ये वॉटर प्युरिफायर बसवणं हे कायद्याने बंधनकारक आहे. मग जर त्या हॉटेलमध्ये वॉटर प्युरिफायर बसवला असेल तर मुळातच त्या वेटरने आपल्याला बिसलरी हवंय का असं विचारायलाच नको. पण तो त्या हॉटेलवाल्याच्या व्यवसायाचा भाग झाला.

    वेटरने विचारलेला एक साधा प्रश्न.... आणि त्याच्या उत्तराने आपण फटकन पंधरा-वीस रुपयांचा चुराडा करतो. स्टेटससाठी !

    बरं आता तो वेटर आपल्यासाठी पाण्याची बाटली घेउन येतो. ती बहुतेकवेळा बिसलरीची नसते. कुठल्यातरी भलत्याच ब्रॅन्डची असते. आपण मात्र काहीही न बोलता ती निमूटपणे उघडतो आणि त्यातलं पाणी समोरच्या ग्लासात भरुन प्यायला सुरुवात करतो. इथे आपल्या त्या बाटलीतल्या शुद्ध पाण्याचे बारा वाजलेले असतात कारण तो ग्लास कुठच्या पाण्यात धुतलाय हे आपण लक्षातच घेत नाही !

    काही विशिष्ट हॉटेल्समध्ये पाणी दिलं जात नाही. तिकडे पाण्याची बाटलीच विकत घ्यायला लावतात. मॅकडोनल्ड हे त्यातलंच एक. काही वर्षापूर्वी माझं तिकडे त्यावरुन भांडण झालं. खाद्यपदार्थ विकणार्‍या कोणत्याही हॉटेलमध्ये गिर्‍हाईकाला पाणी मोफत द्यायला पाहिजे असा नियम आहे. तो नियम दाखवून पाणी न दिल्याबद्दल तक्रार करीन असे सांगितल्यावर निमूटपणे मला ग्लासमधून पाणी दिलं गेलं. किती जण या मार्गाचा अवलंब करतात?

    काही गोष्टींना एखाद्या ब्रॅंडच्या नावाने ओळखलं जातं. आपण झेरॉक्स काढतो. खरंतर ती फोटोकॉपी काढली जाते आणि त्यासाठी पहिलं मशीन आलं ते झेरॉक्स कंपनीचं म्हणून फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स असं समीकरण झालं. मी पूर्वी एकदा उत्तर प्रदेशातल्या मधल्या एका गावातल्या एका दुकानात उभा होतो. एका ग्राहकाने “लालवाला कोलगेट देना” असं त्या दुकानदाराला सांगितलं आणि दुकानदारानेही शांतपणे “क्लोज-अप”ची लाल टूथपेस्ट कार्ढून दिली.

    “बिसलरीचं पाणी” याचं पण तसंच आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही सीलबंद पाण्याच्या बाटलीला बिसलरी म्हटलं जातं. सिलबंद पाण्याचा हा हजारो कोटींचा धंदा आहे. तो असा सहजासहजी बंद होणार नाही. कारण त्या धंद्यावर आज एक इकॉनॉमी चालते. १ रुपयाचं पाणी २० रुपयांना विकल्यामुळे आज काही कंपन्यांच्या शेअर्सच्या भावात सातत्याने वाढ होते.

    या बाटलीबंद पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांवरही एक समांतर अर्थव्यवस्था (parallel economy) चालते हे माहित आहे? सर्वसाधारणपणे ७० टक्के ग्राहक रिकाम्या बाटल्या तशाच टाकून देतात. या बाटल्या जमा करुन पुन्हा भरुन आपल्यालाच विकणं हा एक प्रचंड मोठा धंदा सुरु आहे. साधारणपणे रेल्वे स्टेशन, बस स्टॉप अशा ठिकाणी अशा रिसायकल केलेल्या बाटल्यांमधलं, कुठेही भरलेलं पाणी आपल्याला विकलं जातं.

    आता आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे बघू. या बाटलीबंद पाण्याला एक एक्सपायरी डेट असते. मात्र ती बाटलीवर अशा प्रकारे आणि अशा ठिकाणी छापलेली असते की सहजपणे आपल्याला ती दिसतच नाही आणि शोधत बसायला एकतर आपल्याला वेळ नसतो किंवा ती डेट शोधत बसणं हे आपल्या तथाकथित स्टेटसच्या आड येतं. आपण म्हणाल की पाण्याला कसली आलेय एक्सपायरी डेट. पण लक्षात घ्या पाण्याला एक्सपायरी डेट नसली तरी पाणी प्लास्टिकच्या बाटलीत किती दिवस साठवून ठेवायचं त्याला असते.

    इतर कोणत्या देशात पिण्याचं बाटलीबंद पाणी वापरलं जातं हे तपासायला पाहिजे. कदाचित हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच देश निघतील आणि त्यातही “मेरा भारत महान”चं स्थान सर्वात वरचं असेल.

    -- निनाद प्रधान

      March 25, 2016


  • सहज-सुलभ आणि गोड अशी नारायण पेठी बोली

    असे म्हटले जाते की दर दहा कोसावर भाषा बदलते. त्यामुळेच आपल्याकडे बोली भाषांना महत्त्व असावे. मराठीच्या अनेक बोली भाषा आहेत. या नानाविध बोली भाषांनी मराठी भाषा समृद्ध झाली आहे.

    पुण्यातील शनिवार पेठ, नारायण पेठ आणि सदाशिव पेठ या पेठांमध्ये बोलली जाणारी भाषा शुद्ध असे एकेकाळी मानले जात होते.

    मात्र पुण्यातली नारायण पेठी म्हणजे प्रमाण भाषा हे जसे मानले जाते तशीच नारायण पेठी या नावाची एक बोली आहे. भारतभर विखुरल्या गेलेल्या स्वकुळ साळी म्हणजेच विणकर समाजाची ‘नारायण पेठी’ ही बोली भाषा आहे.

    साडी, सतरंजी, चादर, पितांबर यांची हातमागावर कापड विणून निर्मिती करणारा समाज अशी या स्वकुळ साळी समाजाची ओळख आहे. पुणे, मुंबई, सोलापूर, इचलकरंजी, पैठण, येवला, नाशिक, अहमदाबाद, नवसारी, सुरत, आदोनी, बंगळुरू, हुबळी, बेळगाव, उज्जन, इंदूर अशा बाजारपेठेच्या ठिकाणी या समाजाची वस्ती आहे. साहजिकच हे लोक वास्तव्यास असलेल्या राज्याची राजभाषा उत्तम प्रकारे बोलू शकतात.

    आंध्र प्रदेशातील नारायण पेठ (जि. मेहबूबनगर) या गावी मोठय़ा प्रमाणावर विणकर समाजाचे लोक वास्तव्यास आहेत. नारायण पेठी ही बोली ते आजही बोलतात. देशातील अन्य अनेक राज्यांत उपजीविकेसाठी स्थलांतरित झालेले स्वकुळ साळी समाजाचे लोक त्या त्या राज्यांमध्ये आपापल्या घरात हीच नारायण पेठी बोली बोलतात.

    मात्र असे असले तरीही सध्या ही बोली बोलता येणारे काही मोजक्या ज्येष्ठ व्यक्ती उरल्या आहेत. त्यामुळेच त्यांच्या अस्तानंतर ही बोली लुप्त होईल का अशी भिती या समाजाच्या लोकांच्या मनात आहेच.

    नारायण पेठी बोली भाषा ही बोलायला सहज सुलभ, ऐकायला गोड आणि मवाळ अशी आहे.

    हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख श्रीधर रंगनाथ कुलकर्णी यांच्या ‘तेलंगणातील मराठा समाज-भाषा आणि संस्कृती’ या संशोधन प्रबंधामध्ये स्वत:ची बोली असलेल्या अनेक जमाती तेलंगणामध्ये आढळून आल्या आहेत. त्यामध्ये स्वकुळ साळी या समाजाचाही उल्लेख करण्यात आला आहे.

    हातमागावर विणकाम करणे हाच व्यवसाय असल्याने हा समाज शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेला आहे. या बोलीची लिपी देवनागरी आहे. मात्र तरीही या बोलीतील लिखित साहित्य आणि दस्तऐवज मिळणे थोडे दुर्मिळच आहे.

    मराठी आणि नारायण पेठी बोलीतील शब्द :

    माझे – माझू,
    तुझे – तुझू,
    काय झाले? – का झालू?,
    दुखते – दुखालै,
    बरे – बरू,
    बघ – देक,
    बोलावणे – बोलिला,
    मडके – मडकू,
    कोठून – कटून,
    देऊळ – गुडी,
    लहान – धकटू,
    सतरंजी – झमकाना,
    भाकरी – भक्कर

    काही वाक्प्रचार :

    मुलगी पसंत पडली वाङ्निश्चय झाला – पैर पसंत पडली घट्ट झालू,.
    आता मला काम करण्यास जायचे आहे – आंता मज काम करास जाँवई

    काही वाक्ये :

    मी काम करतो – मी काम करतैय,
    ही आता आली – हिने आंता आली,
    तो घरी आला – तेने घरांन आला,
    मी घरी गेलो – मी घरांन गेलू.

    -- मराठीसृष्टी टिम

      August 3, 2016


  • भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी)

    भारतीय आयुर्विमा महामंडळ १ सप्टेंबर १९५६ रोजी आयुर्विम्याचा सर्वदूर अधिक व्यापक प्रसार करण्याच्या हेतूने विशेष करून देशाच्या ग्रामीण भागातील सर्व विमा योग्य व्यक्तींपर्यंत पोचण्यासाठी, त्यांना पुरेसे आर्थिक संरक्षण योग्य किमतीत पुरवण्यासाठी निर्माण करण्यात आले.

      September 1, 2021


  • साद माहेरची – ओवी

    साद येता माहेरची.. याद ही वृंदावनाची… कानी गाज घुंगराची… मन जाई माहेरी ।।१।।

      November 18, 2019


  • बाजार’ – एक गडद नज्म !

    वधूची विक्री, एका गल्फमधील श्रीमंत भारतीयाला ! विक्री हा एकच समान धागा ! “कमला” दिल्लीत तर “बाजार ” हैद्राबादमध्ये ! स्मिता, नसीर, फारुख शेख, सुप्रिया पाठक, सुलभा देशपांडे- दृष्ट लागावी अशी स्टारकास्ट ! चित्रपटातील आणखी एक पात्र म्हणजे पार्श्वभूमीवरील हैद्राबाद ! ( यापूर्वी ” धरम “, ” मोहल्ला अस्सी ” , ” मुक्ती भवन” अशा अनेक चित्रपटांना वाराणशी ने सबळ पार्श्वभूमी पुरविली आहे. अगदी अलीकडचा नीना गुप्तावाला ” द लास्ट कलर “)

      May 24, 2021


  • भविष्यात कृमी-कीटक खाण्याची वेळ कोणावर न येवो !

    रोज वाढणार्‍या लोकसंख्येचे प्रमाण आणि नैसर्गिक स्त्रोतांचे अल्प प्रमाण यापुढे मागणी-पुरवठ्याचे व्यस्त गणित भूक, कुपोषण आणि प्रदूषणावर मात करण्यास असमर्थ ठरणार आहेत. येणार्‍या काळात वाढत्या लोकसंख्येला आळा घातला नाही तर माणसाला जीवन जगण्यासाठी पृथ्वीवरील सर्व नैसर्गिक स्त्रोत कमी पडतील.

      July 6, 2013