वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
उन्हाळ्यात वन्यजीव प्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित जंगलात वन विभागाने निर्माण केलेल्या कूपनलिकावर ‘वॉटर इज लाईफ’ या वन्यजीव प्रेमी संस्थेतर्फे अत्याधुनिक सौरऊर्जा पंपाद्वारे कृत्रिम झरे निर्माण करून आठ ठिकाणी पाणवठे तयार करण्यात आल्यामुळे वन्यजीवांना तृष्णा भागवता येणार आहे.
उन्हाळ्यात तलावातील पाणी आटत असल्यामुळे वन्यजीवन पाण्यासाठी गावांकडे धाव घेताना दिसून येतात. त्यामुळे उन्हाळ्यात प्राण्यांना तृष्णा भागवण्यासाठी मोहर्ली येथील आठ पाणवठ्यांवर सौर पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हे कृत्रिम झरे आता उन्हाळ्यात नैसर्गिक झऱ्यात पाणी साठवण्याचे काम करीत आहेत. यामुळे प्राण्यांना पाणी पिण्याची जागाही बदलण्याची गरज नाही, असे दृश्य आता दिसून येत आहे. यासर्व प्रयोगामुळे 50 चौरस किलोमीटर भागातील प्राण्यांची तृष्णा भागवण्यात व या प्राण्यांना उन्हापासून होणारा त्रास वाचविण्यास मदत होत आहे.
2010 पासून धनंजय बापट यांच्या पुढाकाराने मोहर्ली बफर क्षेत्रात ‘वन्यजीवांसाठी पाणपोई’ हा उपक्रम राबविला. पहिल्या तीन वर्षात टँकरच्या माध्यमातून संपूर्ण उन्हाळाभर वन विभागासोबत विविध ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात येत होता. चौथ्या वर्षी सहकारी मित्र डॉ. विवेक भोरे जे स्वत: मेकॅनिकल इंजीनियर व सौर ऊर्जा या विषयात डॉक्टरेट आहेत. त्यांनी अत्यंत कमी क्षमतेचा परंतु सूर्योदय ते सूर्यास्त असा पूर्ण वेळ चालणारा बॅटरी विरहीत पंप तयार करून याच क्षेत्रातील हातपंप असलेल्या कूपनलिका सोबतच हा पंप टाकून एक अभिनव प्रयोगाची सुरूवात केली. त्यामुळे मागील वर्षीपासून हाच उपक्रम अनेक सुधारणांसह सुरू करण्यात आला आहे. प्राण्यासाठी पाणी पुरवठा हा कृत्रिम सिमेंटच्या पानवठ्यात होत होता. त्यामुळे यातील पाणी संपले की जनावरे इतर ठिकाणी स्थलांतर करीत होते. सोबतच नैसर्गिक पाणवठ्यातही पाणी आटले की जनावरांना इतरत्र भटकावे लागत होते. त्यामुळे त्यांना स्थलांतरित न होता त्याच व सोबतच्या नैसर्गिक पाणवठ्यातही पाणी मिळावे म्हणून ‘वॉटर इज लाईफ’ च्या सदस्यांनी नेहमीच्या नैसर्गिक पाणवठ्यावर पाणी उपलब्ध व्हावे व त्यासाठी जमिनीच्या आत उपलब्ध असलेले पाणी जमिनीवर आणण्यासाठी पंपाचा उपयोग करून नैसर्गिक ठिकाणी सतत ताजे व शुद्ध पाणी जनावरांना उपलब्ध करून देण्यासाठी सौर पाणपोई ही योजना वन अधिकाऱ्यासमोर ठेवली. त्यामुळे या वर्षी आठ ठिकाणी तलावात कूपनलिका तयार करून दिल्या आहेत. डॉ. भोरे यांनी तयार केलेले पंप ‘वॉटर ईज लाईफ’ या गटातर्फे स्वखर्चाने बसवून देण्यात आले आहेत व त्याची दररोज देखभाल सुद्धा या गटातर्फे करण्यात येत आहे. यावर्षी या आठ सौर पाणपोई मोहर्ली वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. 188, आगरझरी कुटी कक्ष क्र. 169, फेटराबोडी कक्ष क्र. 167 चा तलाव, कालापाणी कक्ष क्र. 175 चा देवाडा तलाव 170, जुनोना कुटी कक्ष क्र. 154 अशा ठिकाणी लावण्यात आल्या आहेत.
या सर्व कामासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी राऊतकर, श्रीधर बालपाणे, संजय घोडवे, विठ्ठल लेडांगे, वन विभागाचे वनरक्षक हिंगणकर आदीचे मार्गदर्शन व मदत सतत लाभत असून वनरक्षक या सर्व उपक्रमांची देखरेख करीत आहेत. तलाव क्षेत्रात 100 फूट खोल कूपनलिका तयार करून अत्यंत कमी दरात म्हणजेच फक्त 40 हजार रूपयात ताजे, स्वच्छ पाणीपुरवठा करणारा पंप बसवून प्राण्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हा उपक्रम जर संपूर्ण महाराष्ट्रात वनविभागात स्वीकृत करून राबवण्यात आला तर स्वच्छ पाणीपुरवठा उपलब्ध होऊन शासनाची कोट्यवधींची बचत होईल. कारण यासर्व उपक्रमाला जवळपास 4 लाख इतका खर्च येतो. मात्र येथे फक्त 40 हजार रूपयांच्या खर्चात हे काम असून याला मनुष्यबळाची गरज नाही. सोबतच या पाणपोईमुळे प्राण्यांची पिण्याची जागाही बदलणार नाही, असे मत धनंजय बापट यांनी व्यक्त केले. ही पाणपोई प्राण्यासांठी उन्हाळ्यात वरदान ठरली आहे असेच म्हणावे लागणार.
मुंबईतल्या धारावी येथील, गरीब मुलांना संगीत विषयाची गोडी उत्पन्न व्हावी तसंच संगीत वाद्य शिकता यावीत यासाठी धारावी येथील इंदिरा नगरच्या गुरुकुल ट्रस्टने जानेवारी २०१२ पासून गरिब विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत कमी किमतीत शिकता यावे या उद्देशाने ही संधी उपलब्ध करुन दिली आहे.
मराठा आरक्षणप्रकरणी सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकार झटका दिला आहे. मराठा आरक्षणावर स्थगितीचा उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टानंही कायम ठेवला आहे. त्यामुळं मराठा आरक्षण देणारच अशी घोषणा करणारं राज्य सरकार अडचणीत सापडलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षण संबंधी महाराष्ट्र सरकारने दाखल केलेली याचिका फेटाळली व मुंबई हायकोर्ट च्या अंतिम निर्णयाची सरकारने वाट पाहावी अशी समज सरकारला दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे अलर्ट सिटिज़न्स फोरम ऑफ इंडियाने स्वागत केले आहे.
महाराष्ट्र सरकारच्या मराठा आरक्षणा संबंधी याचिकेवर सुनावणी करण्या अगोदर अलर्ट सिटिज़न्स फोरम ला या विषयात आपले मत नोंदवण्याची संधी द्यावी असे निवेदन श्री दयानंद नेने यांनी 8 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात दिले होते.
मागील महिन्यात मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. याविरोधात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळत उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.
सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं ?
मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय अंतरिम आहे. त्यामुळं आधी उच्च न्यायालय याच्यावर काय निर्णय देतं हे स्पष्ट होऊ दिले पाहिजे. त्यानंतर राज्य सरकारच्या याचिकेवर सुनावणी होऊ शकते असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
त्यामुळं राज्य सरकारची याचिका ही सर्वोच्च न्यायालयानं कुठलाही निर्णय न देताच फेटाळली आहे. उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येण्याआधीच सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं वेगळा कुठला निर्णय न देता उच्च न्यायालयाची स्थगिती कायम ठेवली आहे.
हायकोर्टानं काय म्हटलं होतं?
हायकोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती देताना काही मुद्दे नोंदवले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र सरकार 50 टक्के एकुण आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही असं कोर्टानं नोंदवलं आहे.
अनेक अहवालांच्या निष्कर्षानुसार मराठा समाज मागासलेला नाही असं स्पष्टपणे दिसतं. त्यामुळं नारायण राणे समितीचा अहवालात अनेक त्रुटी आढळत असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे.
आतातरी सरकारने जागे हावे व केवळ राजकीय हेतूनी प्रेरित असलेला हा निर्णय बदलावा असे आवाहन श्री दयानंद नेने यांनी केले आहे.
-- दयानंद नेने.
December 18, 2014
पैसा एकच आहे पण व्यवहारातील त्याची नावे मात्र बदलतात.
उदा:
१) चर्च मधे दिल्यास त्याला "ऑफरींग" म्हणतात.
२) शाळेत दिले तर त्याला "फी" म्हणतात.
३) लग्नात दिले तर त्याला "हूंडा" म्हणतात.
४) घटस्फोटात दिले तर त्याला "पोटगी" म्हणतात.
५) दुसऱ्यास दिले तर त्याला "उसने दिले" म्हणतात.
६) शासनास दिले तर त्याला "कर" म्हणतात.
७) न्यायालयात दिले तर त्याला "दंड" म्हणतात.
८) निवृत्त व्यक्तीस दिले तर त्याला "पेंशन" म्हणतात.
९) साहेबाने कर्मचाऱ्यांस दिले तर त्याला "पगार" म्हणतात.
१०) मालकाने कामगारास दिले तर त्याला "बोनस" म्हणतात.
११) बँकेकडून दिल्यास त्याला "कर्ज" म्हणतात.
१२) कर्जाची परतफेड होत असताना त्यास "हप्ता" म्हणतात.
१३) सेवा केल्याबद्दल दिल्यास त्याला "टिप" म्हणतात.
१४) पळवून नेल्यास, किडनैप केल्यावर दिल्यास त्याला "खंडणी" म्हणतात.
१५) अवैध कामासाठी दिल्यास त्याला "लाच" म्हणतात.
१६) भाडेकरूने घरमालकास दिल्यास त्याला "भाडे" म्हणतात.
१७) सामाजिक/धार्मिक कार्यास दिल्यास "देणगी" म्हणतात.
१८) देवालयास/मंदिरास दिले तर "नवस" म्हणतात.
१९) लग्नकार्यात दिले तर त्याला "आहेर" म्हणतात.
आता प्रश्न असा आहे "पतीने पत्नीस" पैसे दिल्यास त्याला काय म्हणावे ?
भारतीय युद्धात अर्जुनाने मोठा पराक्रम गाजविला होता, भीष्म पितामह, कर्णा सारख्या योद्धानां त्याने पराभूत केले होते, शिवाय असंख्य कौरव सैन्याला, आपल्या बाणांनी यमसदनी पाठविले होते. मोठा असला तरी काय झाले, युधिष्ठिरने युद्धात विशेष पराक्रम गाजविला नव्हता, हे सर्व पाहता कदाचित् युधिष्ठिरा एवजी अर्जुनच गादीवर बसला असेल…….
उद्योगव्यवसाय म्हटला की त्याला तीन प्रकारच्या भांडवलाची आवश्यकता असते.
1) पैशांचे भांडवल
2) वेळेचे भांडवल
3) मनुष्यबळाचे भांडवल
अनेक जणांकडे पैशांचे भांडवल उपलब्ध नसते. पण त्यामुळे काळजी करू नये.कारण वेळेचे व मनुष्यबळाचे भांडवल प्रत्येकाकडेच उपलब्ध असते. पण त्याची जाणीवअनेकजणांना नसते. हे भांडवल किती प्रमाणात उपलब्ध असते ते बघुया.
प्रत्येक माणूस दिवसा कमीत कमी आठ तास तरी काम करू शकतो. माणूस साधारणपणे महिन्यात 25 दिवस काम करतो. म्हणजे तो एका महिन्यात सर्वसाधारणपणे 200 तास काम करतो. रविवार, इतर सुट्या व रजांचा विचार केला तर एक माणूस एका वर्षात साधारणपणे 10 मिहिने किंवा 2000 तास काम करतो. तासाला कमीत कमी 10 रुपये या दराने त्याचे मुल्य काढायचे ठरवले तर, प्रत्येक माणसास दिवसासाठी 80 रुपये, महिन्यासाठी 20000 रुपये व एक वर्षासाठी 2 लाख रुपये मुल्याचा वेळ उपलब्ध असतो.
मनुष्यबळाचा विचार केला तर पूर्ण वेळ माणुस नोकरीवर ठेवायचा झाला, तर त्याला कमीत कमी महिना 5000 रुपये पगार द्यावा लागतो. म्हणजे वर्षाला कमीत कमी 60000 रुपये पगार द्यावा लागतो.
वेळेच्या व मनुष्यबळाच्या भांडवलाचा एकत्रित विचार केला तर प्रत्येक माणसाकडे कमीत कमी 2 लाख 60 हजार रुपये भांडवल आपोआप उपलब्ध हे असतेच. अर्थात या भांडवलाचा उपयोग कसा करायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.
पूर्वी घरगुती शिकवण्या घेणे, कपडे शिवून देणे, खाद्यपदार्थ किंवापोळ्या करून देणे, पाळणाघर चालवणे यांसारखे अल्प भांडवलाचे व्यवसाय उपलब्ध होते;पण या प्रकारच्या व्यवसायाला प्रतिष्ठा नव्हती.
आता असे व्यवसाय उपलब्ध आहेत की ज्याला पैशांच्या भांडवलाची गरज भासत नाही किंवा अत्यल्प भांडवलाची गरज भासते. यांना जास्त करून वेळेच्या व मनुष्यबळाच्या भांडवलाची गरज भासते. तसेच या व्यवसायांना बर्यापैकी प्रतिष्ठा असते किंवा या व्यवसायात माणसे चांगली प्रतिष्ठा मिळवू शकतात. हे व्यवसाय कोणते हे थोडक्यात बघू.
1) विमा प्रतिनिधीः-
भारतामधेविमा व्यवसाय हा अत्यंत वेगाने वाढणार्या व्यवसायांपैकी एक व्यवसाय आहे. यामधेआयुर्विमा (LifeInsurance) वसर्वसाधारण विमा (GeneralInsurance) हेदोन प्रकार येतात. आता या क्षेत्रात खाजगी कंपन्यांनी प्रवेश केल्यामुळे स्पर्धावाढली आहे. आता सर्वच विमा कंपन्यांना उच्च दर्जाच्या विमा प्रतिनिधींची गरज आहे.
2) म्युच्युअल फंड सल्लागारः-
म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे नवीन साधन उपलब्ध झाले असून, हा पण व्यवसाय प्रचंड वेगाने वाढतो आहे. या ठिकाणी म्युच्युअल फंड सल्लागारांची फार मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे.
3) विक्री प्रतिनिधीः-
हल्ली अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनांची किंवा सेवांची विक्री दुकानदारांमार्फत न करताविक्री प्रतिनिधींमार्फत करतात. विशेषतः आरोग्यविषयक उत्पादने करणार्या कंपन्याहा मार्ग अनुसरतात.
4) सामुपदेशक (Councilors):-
मोठ्या प्रमाणावर यांची गरज आहे.
5) प्रशिक्षक (Trainer) :-
हल्ली अनेक कंपन्यांना व संस्थांना प्रशिक्षकांची गरज भासते. शिक्षक (Teacher) व प्रशिक्षक (Trainer) यात मोठा फरक आहे. प्रशिक्षक हा त्या क्षेत्रातील तज्ञ असावा लागतो. सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा प्रशिक्षक होऊ शकेल पण तो हुतुतु, खोखो, आट्यापाट्या या खेळांचा प्रशिक्षक होऊ शकणार नाही पण शिक्षक होऊ शकेल
6) सल्लागार (Consultants):-
हल्ली अनेक कंपन्यांना व संस्थांना सल्लागारांची गरज भासते.
असे अजुन पुष्कळ व्यवसाय आहेत.
सर्वसाधारणपणे ग्रामीण भागासाठी 10 वी पास व शहरी भागासाठी 12 वी पास असलेले व 18 च्या वर वय असलेले कोणीही स्त्री-पुरुष हा व्यवसाय करू शकतात. काही व्यवसायांमधे वयाची व शिक्षणाची अट नसते, तसेच अनुभवाची गरज नसते.कॉलेजमधे जाणारे विद्यार्थी, महिला, गृहिणी, तसेच निवृत्त झालेले लोक हा व्यवसाय करू शकतात. हा व्यवसाय ते पुर्ण वेळ (Full Time), अर्ध वेळ (Part Time) किंवा स्वतःच्या सवडीप्रमाणे केव्हाही करू शकतात.. तसेच नोकरी करणारे पण हे व्यवसाय करू शकतात.
यासाठी ऑफीस, दुकान, गोडाऊन वगैरेची गरज नसते.भांडवली गुंतवणुक जवळ जवळ नसते. इतर व्यापार्यांना ठेवावे लागतात तसे अनेक प्रकारचे हिषोब ठेवावे लागत नाहीत. बहुतेक आर्थिक व्यवहार हे कंपनी व ग्राहक यांचेमधे परस्पर होत असतात. विक्री प्रतिनिधींना फक्त कमीशन मिळत असते किंवा फी मिळत असते. त्यामुळे आर्थिक व्यवहारांच्या दृष्टीने हे व्यवसाय फार सोपे असतात.
ज्यांना लोकांना भेटायची आवड आहे, लोकांशी संवाद साधणे आवडते, उत्तम सादरीकरणाचे कौशल्य आहे, लोकांना आपले म्हणणे पटवण्याची कला आहे (Convincing Power) ते लोक या व्यवसायात यशस्वी होतात असे आढळून आले आहे.
तरी मराठी लोकांनी या संधीचा फायदा घ्यावा व उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात पदार्पण करावे हीच इच्छा व अपेक्षा!
उल्हास हरी जोशी
मोः-9226846631
लोकशाहीतील निवडणूकांमध्ये प्रत्येक मत महत्त्वाचे असते. भारतीय लोकशाहीत एकगठ्ठा मतदान किंवा व्होट बॅंकेची संकल्पना भलतीच लोकप्रिय आहे.
अनेक पक्षांनी आपल्या व्होट बॅंक बनवून ठेवलेल्या आहेत. उमेदवारांनीही आपल्या व्होट बॅंक बनवलेल्या आहेत. या व्होट बॅंकांचे पालनपोषण हे उमेदवारांचे अत्यंत प्रिय असे काम. या पालनपोषणातूनच एकगठ्ठा मतदान होतं.
एकगठ्ठा मतदान म्हणजे विशिष्ठ जाती, समुदाय किंवा कोणतातरी समान धागा असलेल्या लोकांना एक आश्वासन देऊन त्यांची सर्वांची मते आपल्यालाच पडतील, अशी व्यवस्था करणे.
एखाद्या कुटुंबाकडून एकगठ्ठा मतदान केल्याचे कधी ऐकलेय? आजकालच्या `हम दो हमारा एक' आणि एकत्र कुटुंबपद्धत मोडून गेलेल्या दिवसात एकाच कुटुंबाकडून फारतर किती मतांची अपेक्षा करणार? पाच-दहा-पंधरा यापेक्षा जास्त नक्कीच नाही. पण बिहारच्या किशनगंज मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणूकीत एक वेगळ्याच प्रकारचं एकगठ्ठा मतदान झालं. हे एकगठ्ठा मतदान होतं ते एकाच कुटुंबाचे.
या कुटुंबात ८५ लोक आहेत आणि ते एकाच घरात, एकाच छताखाली राहतात. या एकाच कुटुंबाला पटवले तर या मतदारसंघातील कोणत्याही उमेदवाराला एकगठ्ठा ४७ मते मिळू शकतात. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी या घराचा उंबरठा झिजवला.
हे एक मुस्लिम कुटुंब आहे. त्याचे प्रमुख आहेत मोहमंद नजीर. या कुटुंबात ३० स्त्रिया आणि ५५ पुरुष आहेत. त्यातले ३५ लहान मुले, मुली आहेत. येत्या काही काळात या ३५ मुलामुलींमधले काही जण या मतदार यादीत सामील होतील आणि मग या कुटुंबातील मतदारांची संख्या आणखी वाढेल.
नजीरभाईंचे भाऊ मोहमंद अशफाफ यांची पत्नी अंजिरा खातून या तेव्हा गावच्या सरपंच जोत्या. पण घरातले सर्व निर्णय नजीरभाईच घेत. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत कोणाला मतदान करायचे याचा निर्णय त्यांनीच विचार करुन घेतला असणार. ते सांगतील त्यालाच या कुटुंबातील सर्व लोकांनी मतदानही केलं असणार हे उघड आहे.
या गावात नजीरभाईंचे कुटुंब तसे प्रतिष्ठीत आहे. गावातील अनेक समस्या, तंटे, वादविवाद सोडवण्यासाठी हे कुटुंब पोलिसांना मदत करते असे पोलिसही मान्य करतात.
हे गाव बिहारची राजधानी पाटण्यापासून ३५० किलोमीटर दूर आहे. हे गाव पुर्णिया जिल्हयात असले तरी ते लोकसभेच्या किशनगंज मतदारसंघात मोडते. मतदारसंघाच्या सीमांची फेरआखणी झाल्यानंतर ते किशनगंज मतदारसंघात गेले आहे. या गावात बहुसंख्य मतदार हे मुस्लिमच आहेत व त्यांचे प्रमाण ६६.७ टक्के आहे. त्यामुळे केवळ नजीरभाईंच्या कुटुंबातूनच नव्हे तर संपूर्ण गावातून एकगठ्ठा मते मिळतील का याची चाचपणीही काही उमेदवारांनी केली. या एकगठ्ठा मतदानामुळे या गावाची, तसेच नजीरभाईंच्या कुटुंबाच्या मागण्या मान्य करुन घेण्याची क्षमता मात्र बरीच वाढली आहे.
ब्रॅंडसच्या या जमान्यात भारतातल्या कोणत्या ब्रॅंडला पहिल्या १०० मध्ये स्थान मिळालं नसलं तरीही भारतीय ब्रॅंडस मजबूत मात्र आहेतच. परदेशी कंपन्यांच्या एवढे नसले तरीही काही भारतीय ब्रॅंडस अगदी घराघरात पोचलेले आहेत.
श्रावण महिना लवकरच सुरु होईल. सणासुदीच्या या दिवसात सोन्याचे दागिने घालून मिरवणे हे ओघानेच आले. मुंबई-पुण्यातल्या असुरक्षित जीवनात खर्या सोन्याचे दागिने घालून प्रवास करणेही कठीण झाले आहे. सोन्याच्या किमतीही आता आकाशाला भिडायला लागल्या आहेत. त्यामुळे अस्सल सोन्याचे दागिने घालण्यावर मर्यादा आल्या आहेत.
बदलत्या काळाची गरज ठरलेले, कलाकुसर, नावीन्य, सुरक्षितता, हौस आणि कमी वजनातील २४ कॅरेट सोन्याचे फॉर्मिंग दागिने महिलावर्गात विशेष प्रिय ठरले आहेत.
एक काळ असा होता की, विवाहानंतर सौभाग्य लेणं म्हणून ठसठशीत मोठं मंगळसूत्र, चार सोन्याच्या बांगड्या-पाटल्या, कानातील वजनदार झुमके वगैरे घालणार्या स्त्रिया सर्रासपणे दिसायच्या. किंबहूना असे दागिने घालून मिरवणार्या स्त्रिया “घरंदाज” समजल्या जायच्या. आजही टिव्ही मालिकांमध्ये जुन्या काळातल्या स्त्रिया भरगच्च आणि भारदस्त दागिने गालून मिरवताना दिसतात.
जसा काळ बदलला. महिलांना शिक्षणाची पुरेशी संधी उपलब्ध झाली, आणि त्यांनीही विविध क्षेत्रे पादाक्रांत करायला सुरुवात केली. महिला नोकरी - व्यवसायात आगेकुच करु लागल्या. त्यांच्या हातात स्वकमाईचा पैसा शिल्लक राहु लागला. परंतू सोन्याच्या दागिन्यांची भारी उपजत हौस असली तरी ही जोखीम अंगावर बाळगणं त्यांना धोक्याचं वाटु लागलं. मग खोट्या दागिन्यांचे... सोन्याचा मुलामा दिलेले दागिन्यांचे दिवस सुरु झाले. मात्र हे खोटे दागिने फार काळ टिकत नसत. ते खोटे आहेत हेसुद्धा जाणकाराच्या पटकन लक्षात येई.
नव्या तंत्रज्ञानाने जसं सगळं जग व्यापुन टाकलं तसं हे दागदागिन्यांचं क्षेत्रही व्यापायला सुरुवात केली. १ ग्रॅम सोन्यातल्या दागिन्यांची सद्दी सुरु झाली. दिसायला ठसठशीत पण वजनाला आणि खिशाला हलके असलेल्या या दागिन्यांवर महिलामंडळ खुष झालं आणि बघताबघता हा उद्योग मोठी भरारी घेऊ लागला.
कमी वजनातील फॉर्मिंग दागिन्यांचे नाजुक कलाकुसर असलेले असंख्य नमुने तयार होऊ लागले. या दागिन्यांच्या जादूने महिलावर्गाला संमोहीत केलं नसतं तरच नवल. लग्न समारंभासारख्या प्रसंगी एकच मोठा दागिना वापरण्यापेक्षा तेवढ्याच सोन्यात शुद्ध सोन्याच्या कसाचे चार-पाच नावीन्यपूर्ण दागिने वापरणं ही कल्पना महिलांना अतिशय आवडली. खिशाला परवडतील अशा थोडक्या पैशात, नवनवीन नाजूक कलाकुसरीचे दागिने मिळु लागल्यामुळे मोलकरणीपासून ते उच्चभ्रु वर्गातील महिलांपर्यंत सर्वांनीच त्यांचं स्वागत केलं. वर्ष-दोन वर्ष पैसे साठवून एखादा दागिना पदरात पडण्यापेक्षा दर दोन - चार महिन्याने एक नवीन दागिना घरी आणणं महिलांना अधिक सोईचं ठरु लागलं.
कमी वजनातील हे दागिने पूर्ण तांब्याचे बनवलेले असतात. त्यावर इलेक्ट्रो फॉर्मिंग मशिनने सोन्याचा एक मायक्रॉनचा म्हणजे अत्यंत सुक्ष्म अशा सुवर्णकणांचा थर दिला जातो. पूर्ण नियंत्रणाकाली दिलेल्या स्प्रेमुळे हा थर एक सारखा व पक्का बसतो.
शुद्ध सोन्यात घडविलेले दागिने कधीही चेपतात किंवा वाकतात. मात्र या फॉर्मिंग दागिन्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते तांब्यावरचे असल्याने जास्त दणकट व टिकाऊ असतात. त्यामुळे त्यांच्या दबले जाण्याची किंवा वाकण्याची अजिबात भिती नसते. रोजच्या वापराने त्यांची थोडीफार झीज होते. या दागिन्यांवरच सुवर्णकणांचा पातळ मुलामा दिला असल्याने फार जोरात व सातत्याने ते दगड, फरशी, लाकूड वगैरेसारख्या कठीण पृष्ठभागावर घासले गेले तरच त्यावर चरे उमटण्याची शक्यता असते. शुद्ध सोन्याच्या दागिन्यांप्रमाणे या दागिन्यांवरही घाम, अॅसिड, सौंदर्यप्रसाधने वगैरेंचा परिणाम होतो. मात्र गरम पाण्याचा या दागिन्यांवर काहीही परिणाम होत नाही.
लक्षवेधी असे हे कमी वजनातील फॉर्मिंगचे दागिने आता बाजारात वेगवेगळ्या ब्रॅंडसखाली उपलब्ध झाले आहेत.
अस्सल मराठी म्हणता येईल अशा “सेनोरिटा” ब्रॅंडने अस्सल मराठमोळी रेंज कमी वजनात आणली आहे. अगदी पेशवाई थाटाचे दागिनेसुद्धा उपलब्ध आहेत आणि तेसुद्धा अतिशय कमी किंमतीत. फॉर्मिंग दागिन्यांमध्ये मंगळसुत्र, नेकलेस, बांगड्या, पाटल्या, कर्णफुले, पायल, चेन, ब्रेसलेट, अंगठ्या वगैरे सर्वकाही भरपुर डिझाईन्समध्ये आणि ते ही आपल्या बजेटमध्ये म्हणेच रु. ४९९ ते रु. ३९९९ पर्यंत उपलब्ध आहेत.
“स्वर्ग” या आणखी एका नावाजलेल्या ब्रॅंडनेही हे कमी वजनातील फॉर्मिंग दागिने बाजारात आणले आहेत.
यावेळी मात्र आपण मतदान करणारच !!!!
बदल घडवायची ताकद.. तुझ्या मतात आहे…
नभाचे नभाला प्रस्तुत हे खास गाणे… तरुणाईला मतदानाकरिता साद घालण्यासाठी..
शब्दरचना आणि संगीतकारः विशाल आणि समीर
गायकः विशाल राणे
नभाचे नभाला – विशाल, समीर, सई, ऋषिकेष आणि सागर
व्हिडिओ एडिटिंगः पूजा प्रधान
रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ द्वारे जनहितार्थ प्रकाशित
Copyright © 2025 | Marathisrushti