(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • शटी / कपूरकाचरी

    ह्याचा उपयुक्तांग कंद आहे.ह्याची चव तिखट,कडू,तुरट असून हि उष्ण गुणाची व हल्की व तीक्ष्ण असते.हि कफ व वातशामक आहे.

      April 10, 2018


  • जिंदगी का सफर

    जिंदगी का सफर

    जीवन…..म्हणजे नक्की काय? कुणी जाणलंय?कुणाला कळलंय?सगळंच अतर्क्य! चौऱ्याऐशी दशलक्ष योनीतून एकदाच हा जन्म मिळतो.त्यापासून शोध घ्यावा की बोध? सारंच अनभिज्ञ!अकल्पित! जीवनाचा हा प्रवास की प्रवाह?……हे फक्त “आपले आयुष्य आपण वाहून नेण्यात की वाहवून जाण्यात” पणाला लावतोय,यावर ठरत असतं.गंध उगाळल्याशिवाय पाजळत नाही,हेच खरं!वाट्याला आलेलं आयुष्य कल्याणकारी होण्यासाठी त्यावर मेहनतीचा अखंड अभिषेक केल्याशिवाय पर्याय नाही.त्यातून फलनिष्पत्ती होईल की नाही,हे कर्मावर सोपवावं. निस्वार्थ परोपकारी वाटचालीतून परमार् प्रगट होतो. त्यासाठी लाभार्थी कोण? हे ठरवणंही आपल्या हातात नसतं.

      July 1, 2023


  • क्रिकेटची किट बॅग

    पालक म्हणून स्वतःला आवडलेल्या गोष्टींना निग्रहाने नकार देणं आपल्यालाही जमलं पाहिजे.

      July 9, 2017


  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग तेवीस

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकोणतीस
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
    निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग तेवीस

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    अंथरूणातून सूर्य बघू नये
    अर्थ सरळच आहे. सूर्योदयानंतर अंथरुणात राहू नये. म्हणजेच ग्रंथात सांगितलेला नियम ब्राह्म मुहूर्तावर उठावे. "लवकर निजे लवकर उठे, त्यास धन आरोग्य संपदा मिळे" असं एक सुभाषित शाळेतील लाकडी खांबावर लिहिलेले आठवते.

    पण आता जमाना बदल गया है.
    आता आम्ही फार उशीर करत नाही, बारा साडेबाराला झोपतो. (झोपतो म्हणजे बाकीच्यासाठी ! डोक्यावरून पांघरूण घेऊन आत माझ्यासकट वाॅटसप जागा असतो. जास्त नाही दीड दोन वाजताच झोपतो. )

    लवकर उठायला ज्यांना जमत नाही, त्यांचे पचन बिघडते. लवकर झोपणे होत नाही, याची अनेक कारणे असतील. पण लवकर उठणे होत नाही याला कोणताही युक्तीवाद नको. किमान सहा साडे सहाला उठलेच पाहिजे. रात्रीच्या जागरणाचे संयुक्तिक कारण असेल तर ती झोप दुपारी घ्यावी. पण जेवणानंतर नको. त्याने पुनः आम निर्माण होणार. इथे युक्ती वापरावी. दुपारची झोप आधी घ्यावी आणि उठून नंतर जेवावे. म्हणजे कफ प्रकोप होणार नाही. अर्थात ही पळवाट आहे. नियमाला पळवाट असावी पण पळवाट हा नियम बनू नये.

    एवढ्या लवकर उठून करायचे काय, असाही प्रश्न काही जणांना पडेल. काही जण म्हणतील, आम्हाला जाग येते पण उठवत नाही. उठलो तरी ताकद असत नाही. उठायचं असतं, पण पाय दुखतात, पायाची टाच दुखते, गुडघे दुखतात, लवकर उठले तर म्हणे पित्त वाढते, चक्कर येते, डोके दुखते इ. इ. अनेक तक्रारी सक्काळी सकाळी सुरू होतात. या सर्व तक्रारींवर एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे रात्रीचे जेवण सायंकाळी सातला संपलेच पाहिजे. अन्यथा जेवूच नये. जेवण नाहीतर फळ, ज्युस वगैरे वगैरे. नाही चालणार. पोट हलके सैल, रिकामे करूनच तर झोपायचे आहे.

    आणि समजा उशीरा झोपणे झाले आणि सकाळी जाग आली तरी
    गादीवर जास्त लोळू नये
    असे आई सांगते.

    मस्त बेड टी प्यावा, बायकोने हातात टीव्ही चा रिमोट आणून द्यावा, तिथूनच योगाचे चॅनेल सुरू करावे. आणि चकली वेफर्स खात खात योगा करणाऱ्यांना बघण्याचा व्यायाम करावा. नाहीतर साखरझोप अनुभवावी, पहाटेची स्वप्न म्हणे खरी होतात, म्हणून आपल्याला हवी तशी सुंदर सुंदर स्वप्ने पहावीत. आणि कानावर गोड हाक यावी,
    "मोऽहऽअऽन्ऽ", जागो प्यारेऽऽऽऽऽ"
    डोळे उघडून पहावे तर नेहेमीचीच......

    सकाळी लवकर उठावे, आह्निक उरकावे, जमल्यास स्नानसंध्या करावी. ज्ञानमार्गाने जाणारे असू तर काहीबाही वाचन करावे, भले ते ज्ञान दै. लोकसत्ता, मटा किंवा वाॅटसप महाराजांकडून आलेले का असेना !
    काही लेखन करावे. वाॅटसप वर लेखन करावे.ट्विटरवर टिवटिव करावी. मराठी इंग्लिश अथवा हिंग्लीश भाषा वापरावी. फेसबुकवरील असंख्य मित्रांना तत्वज्ञानाचे डोस पाजावेत. (आपण कोरडे पाषाण रहावे.)

    ज्ञान ग्रहणाची आवड नसेल तर कोणतेही आवडीचे काम करावे. बागेत जावे, व्यायम करावा, जेवण बनवावे, टीव्ही मात्र पाहू नये.

    कर्ममार्ग पण नको असेल तर सरळ साध्या सोप्या भक्तीमार्गाने जावे. देवळात जावे, तुळशीला, वडा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. घरातच राहायचे असेल तर लोटांगणे घालावीत, नाहीतर खुर्चीवर बसून नामस्मरण करीत राहावे, पण झोपून राहू नये. हे झोपणे मधुमेहाकडे नेणारे आहे. हे पक्के लक्षात ठेवावे. ( मी स्वतः रात्री एक वाजेपर्यंत जागा असतो, पण सकाळी सहा साडेसहाला नक्कीच उठतो. आणि रात्रीचे जागरण झाले तरी आम निर्माण होतच नाही, कारण माझे रात्रीचे भोजन सायंकाळी आटपलेले असते. )

    आई जे सांगते त्यामधे काहीतरी अर्थ नक्कीच दडलेला असतो, कारण अनुभवाचे चार पावसाळे तिने जास्ती पाहिलेले असतात. भले त्यामागील शास्त्र, विज्ञान तिला माहिती नसेल. कारण तिला तिच्या आईने तसेच सांगितले होते.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.

      August 18, 2017


  • बस्तर, द नक्सल स्टोरी

    सन २०१० छत्तीसगढ मधील बस्तर गावात ७६ जवानांची जाळून केलेली क्रूर हत्या ! ही एक सत्य घटना!! आपल्या वाचनात आलीच असेल . छत्तीसगढ मधील एका साध्या इमारतीत सी आर पी एफ चे जवान विश्रांती घेत आहेत .

      December 31, 2024


  • धरणातल्या पाण्याची मोजणी….

    सध्या पाऊस जोरदार पडत आहे. दररोज वेगवेगळी धरणे भरल्याच्या आणि वाहून जात असल्याच्या बातम्याही येत आहेत. या बातम्यात अनेकदा काही वेगवेगळे शब्दप्रयोग केलेले दिसतात. ते असतात पाण्याच्या साठ्याच्या मोजमापाचे....

    याबद्दलची थोडी माहिती घेउ या ?

    1) TMC म्हणजे काय ?
    2) Cusec म्हणजे काय ?
    3) Cumec म्हणजे काय ?

    इतके tmc पाणी जमा झाले, तितके Cusec पाणी सोडले असे आपण पेपर मधून वाचतो. याचा नेमका अर्थ काय?

    आपणास फक्त "लिटर" संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेवू यात.

    १) 01 tmc म्हणजे one thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शुन्य (०१ अब्ज) इतके घन फूट.

    01 tmc = 28,316,846,592 litres

    २) 01 Cusec = 01 cubic feet per second = 28.317 litres per second.

    ३) 01 Cumec =01 cubic meters per second = 1000 litres per second.

    उदा.
    पुण्याच्या खडकवासला धरणाची क्षमता १.९७ tmc आहे.
    म्हणजे त्यात १.९७x२८.३१७ अब्ज लिटर्स पाणी मावते.

    याच धरणातून सध्या ५०० क्युसेक पाणी नदीत सोडत आहेत.
    म्हणजे ५००x२८.३१७ लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी सोडल्या जात आहे.

    महाराष्ट्रातील क्षमतेने मोठी ५ धरणे

    १) उजनी ११७.२७ tmc
    २) कोयना १०५.२७ tmc
    ३) जायकवाडी ७६.६५ tmc ( पैठण )*
    ४) पेंच तोतलाडोह ३५.९० tmc
    ५) पूर्णा येलदरी २८.५६ tmc

      August 4, 2016


  • “अोरॅकल मधलं मिरॅकल”

    Cloud Computing and Enterprising क्षेत्रातील जगातील सर्वात मोठया अमेरिकास्थित कंपनी Oracle चा "Oracle Open World" हा सर्वात मोठा आणि जागतिकदृष्ट्या मानाचा कार्यक्रम नुकताच सन्फ्रान्सिस्को येथे पार पडला.
    तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक मान्यवरांना या परिषदेत आपले विचार मांडण्यासाठी बोलावण्यात येते.
    "आमचे वक्ते हे भविष्याला नवा आकार देणारे लोक आहेत" अशी शेखी मिरवत Oracle या कार्यक्रमासाठी आपले वक्ते निवडते. आणि या वेळी प्रथमच एका भारतीय नेत्याला त्यात आमंत्रित करण्यात आले, त्या क्षेत्रातील धुरंधरांसमोर आपले मत मांडण्यासाठी !
    ते नेतेे - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस.
    त्या जगाशी तसे पाहता अर्थाअर्थी संबंध नसलेल्या नेत्यास मिळालेले आमंत्रण ही भारत व मुख्यत्वे महाराष्ट्रासाठी अत्यंत सन्मानाची बाब आहे.
    त्या परिषदेचा हा लेखाजोखा -
    १९ सप्टेंबर ला अमेरिकन वेळेनुसार सुमारे सकाळी नऊ वाजता परिषद सुरु झाली. मुख्यमंत्र्यांच्याआधी काही वक्त्यांनी आपली मते मांडली. त्यानंतर Oracle च्या CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी सॅफ्रा कॅट्झ मंचावर आल्या. पुढच्या वक्त्याविषयी बोलायला त्यांनी सुरुवात केली, तेव्हाच त्यांच्या चेहऱ्यावर आदर झलकत होता.
    "मी फेब्रुवारी महिन्यात Make In India Week च्या वेळी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटले, तेव्हा तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर नेण्याचे त्यांचे प्रामाणिक प्रयत्न पाहून भारावून गेले" असे त्या सांगत होत्या. अत्यंत आदर आणि कौतुकाने..
    आणि शेवटी सगळे शब्द गुंडाळून , "आता काही क्षणांतच आपल्याला CM यांना ऐकायला मिळेल आणि खरोखर सांगते, मी फारच excited आहे " असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना मंचावर आमंत्रित केले.
    माननीय मुख्यमंत्री व्यासपीठावर येण्याआधी महाराष्ट्र सरकारच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरी व व्हिजन वर एका लघुपटाद्वारे दृष्टिक्षेप टाकण्यात आला. "आपले सरकार" या app च्या माध्यमातून सर्व शासकीय सेवा एका छताखाली आणण्याच्या प्रयत्नाचे विवरण केल्या गेले. 'People First' या सरकारच्या तत्त्वाचाही उल्लेख करण्यात आला.
    तद्नंतर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस मंचावर आले, तेच एक वेगळा आत्मविश्वास घेऊन. सर्वप्रथम त्यांनी आपले ठेवणीतले मोहक हास्य करत CEO सॅफ्रा यांचे आभार मानले आणि मग "Brothers and Sisters" - "बंधू आणि भगिनींनो" म्हणत आपल्या भाषणास सुरुवात केली.
    आणि त्यानंतर " येथे जमलेल्या सर्व मान्यवरांकडे पाहता, मी क्षणभर विचारात पडलो, की मी येथे का आलो आहे?" अशा जबरी वाक्याने आपले विचार मांडण्यास प्रारंभ केला.
    "भारत हा महत्त्वाकांक्षी युवांचा देश आहे. युवा पिढीच भारताची खरी ताकद आहे आणि आता ती योग्य वेळ आली आहे की आम्ही या पिढीस विकासाच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून द्याव्यात, आता अधिक वाट पाहण्यात अर्थ नाही" असे बोलून त्यांनी आपला मनोदय व्यक्त केला.
    Cloud Computing and Big Data Analytics या क्लिष्ट तंत्रज्ञानाचा वापर केल्यास महाराष्ट्रातील तरुणाई व खेड्याखेड्यांवर कसा प्रभाव पडेल, सरकारात अधिकाधिक कार्यक्षमता व पारदर्शिता कशी प्रस्थापित होईल हे सर्व सांगतानाच "तंत्रज्ञान हे तटस्थ असते. ते लिंग, व्यक्ती किंवा कुठल्याही अन्य निकषाआधारे भेदभाव करत नाही." हे अत्यंत प्रगल्भ विधान त्यांनी केले.
    "आम्हाला एक प्रतिक्रियाशील, पारदर्शक सरकार प्रस्थापित करायचे आहे, जे तंत्रज्ञानाद्वारे साध्य केल्या जाईल."
    "आम्हाला बदल घडवून आणायचा आहे. असा बदल, की राज्याचा प्रत्येक नागरिक सरकारचा भाग असेल आणि आपला सहभागही नोंदवेल. तंत्रज्ञानाच्या मदतीने Oracle आमचे हे स्वप्न पूर्ण करेल."
    असे सांगत त्यांनी तिथे उपस्थित अन्य मान्यवरांनाही महाराष्ट्रासोबत भागीदारी करण्याचे आवाहन केले.
    त्यानंतर CEO सॅफ्रा यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानत Oracle च्या सहभागाबद्दल त्यांचे काय मत आहे असा प्रश्न केला.
    तेव्हा "आपण एका अशा काळात राहतो जिथे आपण जो विचार करतो, तंत्रज्ञान ते प्रत्यक्षात आणते. आणि अशा प्रकारे माझ्या राज्याच्या हर एक, शहरी किंवा अगदी दूरस्थ ग्रामीण भागातील नागरिकाला माझ्या सरकारशी जोडता यावे, एवढीच माझी Oracle कडून अपेक्षा आहे." हे अत्यंत दूरदर्शी आणि भावनिक विधान त्यांनी केले.
    त्याचबरोबर "कोणत्याही परिवर्तनाच्या प्रक्रियेत राजकीय नेतृत्व हे केवळ कल्पनानिर्मितीचे काम करते, तर तंत्रज्ञ ती कल्पना प्रत्यक्षात साकारतात."
    असे सांगत त्यांनी Oracle च्या भावी योगदानाचे महत्त्वही अधोरेखित केले.
    आणि इतकेच नव्हे तर, MOU signing आधी सॅफ्रा यांना महाराष्ट्र सरकारच्या 'तंत्रज्ञान सल्लागार' मंडळात सहभागी होण्याची विनंती करत मुख्यमंत्र्यांनी आश्चर्याचा सुखद धक्काच दिला. CEO सॅफ्रा कॅट्झ यांनी तसे बोलूनही दाखवले.
    एकूणच यंदाची Oracle Open World Conference म्हणजे अवघ्या महाराष्ट्रासाठी देखील आश्चर्याचा एक गोड, सुखद व आश्वासक असा धक्का होती.
    माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची देहबोली, लहेजा, आत्मविश्वास, आणि एकूणच त्यांचे Mannerism स्वतःच हे सगळे काही स्पष्ट करते. जागतिक पटलावर वावरतांना स्वतःला कशा प्रकारे Present करावं हे त्यांना अगदी बरोबर समजतं.
    कदाचित अतिशयोक्तीही वाटेल, पण या एकाच परिषदेतून त्यांनी, ते एक जागतिक नेते होण्याच्या पात्रतेचे आहेत अन त्या दिशेने त्यांची वाटचालही योग्यरित्या चालू आहे हे दाखवून दिलंय.
    Oracle सारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीकडून एवढा आदर व कौतुक प्राप्त करणे, अगदी उच्चविद्याविभूषित तंत्रज्ञांसोबत इतकं लिलया वावरणे, आणि ओघाने भारताची व मुख्यत्त्वे महाराष्ट्र राज्याची शान वाढवणे व त्याचबरोबर विकासासाठी नवनवे व समकालीन उपाय शोधून ते राबवणे,
    या साऱ्या गोष्टी श्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या उज्ज्वल व नेत्रदीपक भवितव्याची नांदीच आहेत..

      September 28, 2016


  • लढवय्या बापाचा शेवट

    … परंतु जनसामान्यांना याची काय किंमत… अहो साधे देवाच्या पूजेत काही चुकलं की आपण देव कोपेल म्हणून दहा वेळा देवा तुझ्या सेवेत कमी झाले असेल तर माफ कर… अस बोलतो… मात्र कोरोना काळात साक्षात देवाच्या रूपात लोकांची सेवा करणाऱ्या कोरोना दुतांच्या जीवाशी खेळतो तेव्हा मात्र देव तुमच्यावर कोपणार नाय का?? देव माणसात ही असतो हे आपण कधी समजणार ???

      April 15, 2021


  • १७ माईल ड्राईव्ह

    ‘१७ माईल ड्राईव्ह’ हा कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीजवळून जाणारा रस्ता आहे. याचे वैशिष्ट्य असे की, तो लांबवर पसरलेला, वळणावळणाने जाणारा असून त्याच्या एका बाजूला फेसाळणारा समुद्र. कधी स्पष्ट, स्वच्छ दिसणारा तर कधी आडव्या, वेड्या वाकड्या, उंच झाडांच्या मागून लपंडाव खेळणारा. समुद्रकिनाऱ्यावर अतिशय शुभ्र वाळू (snow white sand). किनारेदेखील सरळरेषेत नाहीत. कधी ते जमिनीच्या आत घुसलेले. कधी जमिनीचा चिंचोळा भाग समुद्रात घुसलेला.

      January 11, 2024


  • केस भादरणे ते हेअर कटींग

    घरातल्या मुलांसाठी तर त्यांना दर एक दीड महिन्यानंतर येण्याची standing instructionच दिलेली असायची. या बहुतेक नाभिकांचा पेहरावही सारखाच असायचा. काळी टोपी, अंगात बुशशर्ट आणि धोतर किंवा लेहंगा. हातात पत्र्याची वरून उघडणारी पेटी.

      February 22, 2022