वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आज दिनांक १६ सप्टेंबर. आजच्या दिवसाला आजकालच्या दिवसांमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. आज जगभरात ओझोन दिन साजरा केला जातो. आज आपल्याला वेगळं सांगायला नको की , सध्या ओझोन वायूची किती आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ओझोनची पातळी झपाट्याने कमी होत असल्याचं लक्षात आलं आणि आपल्याला खाड्कन झोपेतून जाग आली. जोरदार प्रयत्न करण्यात आले ,पण हवी तशी प्रगती करता आली नाही आणि परिस्थिती आणखीनच गंभीर झाली.
September 16, 2020
कौन बनेगा करोडपती
अतिशय छान असा हा कार्यक्रम आहे याबद्दल वादच नाही.
पण थोडा फार बदल केला तर नक्कीच बघायला मजा येईल.
१) जर प्रश्न तो मनुष्य करत असलेल्या व्यवसायाबद्दल विचारले तर नक्कीच त्याच्या ज्ञानात भर पडेल आणि जरी तो जिंकू शकला नाही तरी आपण आपल्या पेशात किती मागे आहोत आणि आपण स्वताला अजून किती प्रगत केले पाहिजे याची नक्कीच कल्पना येईल.
२) जनरल माहिती असणे गरजेचे आहे पण दैनंदित जीवनात आवश्यक नाही.
३) लोंकाचे मत जेव्हा घेतले जाते त्यावेळी एक अजून Option असणे आवश्यक आहे आणि तो म्हणजे माहित नाही. त्यामुळे किती लोकांना ते उत्तर माहित आहे याचा अंदाज येईल.
४) Expert हे माहितगार लोकांनाच बोलावले पाहिजे जसे MPSC , UPSC झालेले उमेदवार, हिरो कशासाठी ?
५) एक प्रश्न आपल्यासाठी सुद्धा असतो त्यावेळी SMS चे रेट दिले जातात पण दे रेट किती आहेत हे समजत देखील नाही त्यामुळे मोठा font घेऊन जर ते दाखवले तर फार बरे होईल.
-- सचिन सदावर्ते
October 15, 2010
यत्कटाक्षसमुपासना विधि: सेवकस्य सकलार्थ सम्पद:।
संतनोति वचनाङ्गमानसै-
स्त्वां मुरारिहृदयेश्वरीं भजे।।१४।।
या जगात भक्तासाठी करण्यासारखे एकमेव कार्य काही असेल तर ते केवळ आणि केवळ महालक्ष्मीची उपासना हेच आहे. अशी अनन्यशरणता सांगत आचार्यश्री येथे आई जगदंबेचे वैभव स्पष्ट करीत आहेत.
ते म्हणतात,
यत्कटाक्षसमुपासना विधि:- त्या आई जगदंबेच्या कटाक्षाच्या उपासनेचा विधिच,
सेवकस्य सकलार्थ सम्पद:- तिचा सेवकांना सर्व अपेक्षित संपत्तीला
संतनोति- वृद्धिंगत करणारा आहे.
आई महालक्ष्मीच्या कृपेनेच साधकाला जी जे हवे ते सर्व प्राप्त होऊ शकते. त्याच्या सर्व प्रकारच्या संपत्तींचा विकास होतो.
येथे त्या कटाक्षां ची उपासना करावी असे म्हटले आहे. मूर्तीची उपासना ठीक आहे. पण कटाक्षांची उपासना कशी करायची? तर उपासनेचे अंतीम फल आहे, उपास्य देवतेचे आपल्याकडे लक्ष जाणे. ती लक्ष जाणे म्हणजे तिने पाहणे. म्हणजे कटाक्ष.
ती केव्हा पाहील?तर तिला आवडती गोष्ट असेल त्यावेळी. तिला आवडती गोष्ट कोणती? तर भगवान श्रीहरी.
सोप्या शब्दात आपल्या हृदयात श्रीहरींचे स्थान असेल तर आईची कृपादृष्टी आपल्यावर पडेल.
यासाठी, मुरारि-मुर नामक राक्षसाचे शत्रु श्रीहरी. कृतयुगामध्ये नाडीजंघ नावाच्या राक्षसापासून मुर नावाचा राक्षस जन्माला आल्याची पुराणात कथा आहे.
त्याचे आणि भगवान विष्णूंचे प्रचंड युद्ध झाले. ज्यात तो मरेना. त्यावेळी थकून हिमालयात विश्राम करणाऱ्या विष्णूंच्या शरीरातून निघालेल्या शक्तीने त्याचा विनाश केल्याची कथा आहे.
त्या शक्तीला पुढे उत्पन्ना एकादशी असे नाव पडले. अशा त्या श्रीहरींची,
हृदयेश्वरीं- हृदयाची स्वामिनी असणाऱ्या,
त्वां- तुला,
वचनाङ्गमानसै- वचन म्हणजे वाणीने, अंग म्हणजे शरीराने आणि मानसै: म्हणजे मनाने, अर्थात सर्व मार्गाने, परिपूर्णरीत्या
भजे- भजत असतो. उपासना करतो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 23, 2020
मोबाईल सोबत नसताना तुम्ही अस्वस्थ होतात का? आपल्या घरात काय चाललंय यापेक्षा ऑनलाइन विश्वात काय चाललंय याबद्दल तुम्हाला अधिक रस वाटतो का? सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वप्रथम फोन हातात घेऊन त्याचा मोबईल डेटा चालू करतात का?ऑनलाइन बोलणे तुम्हाला आनंदाचा आभास देते का? कुणी तुमच्याशी ऑनलाइन बोलत असताना पलीकडून पटकन reply आला नाही किंवा कोणी ऑनलाइन भेटले नाही तर तुम्हाला वाईट किंवा अस्वस्थ वाटते का? आभासी जगातील तुमचा 'मी' हा वास्तवातल्या 'मी' वर कुरघोडी करतो का? तुमचे शेवटचे प्रत्यक्ष-face to face (facebook वर नव्हे) चांगले बोलणे कुणाशी झाले हे आठवण्यासाठी मेंदूला ताण द्यावा लागतो का? यापैकी एकही प्रश्नाचे उत्तर हो असेल तर तुम्ही डिजिटल जगाचे 'गुलाम' आहात आणि ऑनलाइन व्यसनाचे बळी आहात.
तंत्रज्ञान आपले आयुष्य सोपे बनवते; पण आपण तंत्रज्ञानाच्या अतिवापराने तणावाला निमंत्रण देतो आणि दुखणे विकत घेतो. मला किती 'Likes' मिळाले? एखादा 'सेल्फी' घेऊन आपण कुठे आहे हे इतरांना दाखवू, त्याने/तिने मला 'Like' का केले नाही? तिचे/त्याचे किती 'Follower' आहेत, Friend आहेत? आणि माझे? हे आताचे प्रश्न, त्यातून येणारा ताण तंत्रज्ञानाच्या अतिवापराने निर्माण झाले आहे. ऑनलाइन ताणतणावातून सुटका कशी करायची यासाठी काही उपाय बघूया.
Face to Face-प्रत्यक्ष संवाद:
एक छोटे काम करा. तुमच्या जिवलग मित्र/मैत्रिणीला फोन करा आणि चाय पे चर्चा करत भेट घ्या. तुम्हाला चांगले वाटेल. एकमेकांना न भेटता, ऑनलाइन chatting वर विश्वास ठेवत तुम्ही जर असा विचार कराल की आपण 'connected' आहोत सर्वांशी. तर सावधान! तुम्ही भ्रमात आहात. तुम्हाला त्यांची जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्हाला जोरदार धक्का बसू शकतो आणि तो पचवणेही कठीण जाईल. जेव्हा तुम्ही समोरासमोर बोलतात तेव्हा व्यक्तीच्या भावनांचा अंदाज चांगल्याप्रकारे घेता येतो. न बोलताही बऱ्याचदा डोळे, चेहरा, हावभाव यातून मनस्थितीचा वेध घेता येतो. ऑनलाइन chatting हा आभासी जगातील एक आभास असतो. संशोधकांनी सुद्धा मान्य केलंय की आभासी ऑनलाइन संवाद प्रत्यक्ष संवादाची जागा घेऊच शकत नाही. तुमच्या वैयक्तिक संवादासाठी सोशल मीडियावर अवलंबून राहण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटा आणि व्यक्त व्हा.
स्मार्टफोन पासून दिवसातील काही काळ दूर रहा
काहींसाठी ही प्रचंड अवघड गोष्ट असू शकते. पण तुमचा स्मार्टफोन तुम्हाला 'स्मार्ट' बनवत नाही तर तुमचा आत्मविश्वास, उर्मी तुम्हाला स्मार्ट बनवते. स्मार्टफोनमुळे आपली निर्णयक्षमता कमी होत नाहीये ना याकडे लक्ष असू द्या. सतत २४x७ तास सोबत असणारा मोबईल विक्षिप्त वागणुकीबरोबर सायबर सिकनेस, फेसबुक डिप्रेशन इ. ला जन्म देतो.
आभासी जगातून स्वतःला वास्तवात आणा
मोबाईलच्या अतिवापरामुळे एका जागी बसूनही थकल्यासारखे वाटते. कारण तुमचे डोके सतत कशाततरी गुंतलेले असते. मोबईलचे व्यसन लागलेला व्यक्ती वास्तवातील समस्येला भिडताना सैरभैर होण्याची शक्यता असते. वास्तव जगाशी संवाद तुटल्याने 'मी-माझे' याच जगात ते वावरतात, जिथे ते सतत त्यांचे आनंद, दु:ख, प्रतिक्रिया ऑनलाइन मांडत असतात.
संशोधकांच्या मते, जर तुम्ही दिवसातील ७ तासांपेक्षा अधिक वेळ स्मार्टफोन, ipad, कॉम्पुटरवर व्यतीत करत असाल तर सामाजिक भावनांचे जाळे असलेल्या मेंदूच्या भागाची हानी होऊ शकते. यातूनच मग तुमच्या आकलनशक्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या थरापर्यंत जाण्यापेक्षा वास्तवात आणि या निसर्गाचा आनंद घ्या.
एकावेळी एकच
जगातील मानसशास्त्रज्ञांचे एकमत आहे की, एकावेळी अनेक कामे – Multitasking मानवासाठी योग्य नाही. मानवाच्या काही नैसर्गिक मर्यादा आहेत.काही मानसशास्त्रज्ञांचे तर असे मत आहे की सतत ऑनलाइन राहणे आणि तंत्रज्ञानावरील वाढते अवलंबित्व मेंदूतील रासायनिक अभिक्रिया बदलवते. त्यामुळे आपण चिडखोर, अधीर हेकेखोर होतो.
नव्या युगाचे नवे ‘डिजिटल’ आजार:
तुमच्या मोबईलची battery कमी होते किंवा बंद पडते तेव्हा तुम्हाला खूप अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही नोमोफोबिया ग्रस्त आहात.
जर तुमच्या खऱ्या किंवा कल्पित आजाराच्या लक्षणांसाठी तुम्ही इंटरनेटवर ‘सर्च’ करत असाल तर तुम्ही Cyberchondria चे बळी आहात.
मोबाईल रिंगटोन वाजत नसतानाही तुम्हाला तसा वारंवार भास होत असल्यास Phantom Vibration Syndrome चे तुम्ही शिकार आहात.
जर तुम्हाला इतरांना ऑनलाइन छळायला मजा येत असेल तर तुम्ही online Disinhibitation Effect ने ग्रस्त आहात.
जर तुम्ही तुमची प्रत्येक गोष्ट, update ऑनलाइन मांडत असाल तर तुम्ही Digital Goldfish च्या जाळ्यात अडकला आहात.
तंत्रज्ञान, नवी साधने वापरुच नये असे नाही पण त्यावर अतिविसंबून राहणे धोक्याचे! सतत गुगल वापरणे आणि माहिती मिळवणे म्हणजे मोठे कर्तृत्व किंवा हुशारी नाही. माहिती आणि ज्ञान यातील फरक समजला तरी धन्य! माहितीच्या प्रचंड महासागरातील लाटेवर स्वार होऊन गटांगळ्या खाण्यापेक्षा त्याचा विधायक वापर करून प्रगतीकडे वाटचाल करणेच योग्य.
-- वसंत चरमळ
संदर्भ : Times Of India
October 10, 2016
स्कंदमाता म्हणजे साक्षात ममत्वाचे आराध्यदैवत… स्कंद हे नाव महादेव आणि माता पार्वती यांचे बाळ कार्तिकेयाचे आहे. बाळ कार्तिकेयाची माता म्हणून स्कंदमाता…
October 24, 2020
आजूबाजूंच्या घरांपुढच्या हिरव्या गर्द हिरवळीवर रंगी बेरंगी सुकलेली पानं पडायला लागतात. रस्त्यांवरची सुकलेली पानं, येणार्या जाणार्या गाड्यांमुळे इतस्तत: ढकलली जातात. छोट्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंची झाडं रंगी बेरंगी पानांनी भरून गेली की जणू रंगीत पताका आणि कमानींनी रस्ते सजवल्यासारखे दिसायला लागतात. थोड्याच दिवसात पडलेल्या पानांची संख्या एवढी वाढते, की रस्त्याच्या कडेला सुकलेल्या पानांच्या किनारी तयार होतात. जिथे फारशी गाड्यांची वर्दळ नसते असे आडबाजूचे छोटे रस्ते तर काही दिवसातच सुकलेल्या पानांनी पूर्णपणे झाकून जातात. रंगीबेरंगी पानांच्या गालिच्यांनी रस्ते आणि जमिनी भरून जातात. रस्ते, बाजूचे फूटपाथ आणि घरापुढच्या हिरवळी, सारं काही सुकलेल्या पानांनी एवढं भरून जातं, की रस्ते कुठे आहेत हे नवीन माणसाला समजणं मुश्कील व्हावं. मग एखाद्या बोटीने पाण्यावर लाटा उठवाव्यात तशा या सुकलेल्या पानांच्या लाटा उठवत, कधी तरी एखादी गाडी रस्त्यावरून अचानकपणे जाते आणि खालचा रस्ता दिसायला लागतो.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंची झाडी एवढी दाट की रस्त्यापासून १५-२० फूट आत काही दिसत नाही. ६०-७० फूट उंचीची ही सगळी झाडं अशी दाटीवाटीने उभी ठाकल्यामुळे, रस्याच्या दोन्ही बाजूला उंचच उंच भिंती असल्यासारखं वाटतं. मधेच एखादं घर, ओढा, शेत किंवा गावकूस लागतं आणि तेवढ्यापुरतं या भिंतीला भगदाड पडून भिंती पलीकडचे दृश्य नजरेस पडायला लागतं. बाकी सर्व वेळ फक्त समोरचा रस्ता आणि दोहोबाजूच्या झाडांच्या भिंतीमधला आकाशाचा पट्टा तेवढा वर दिसत असतो.
ऑक्टोबर सुरु होतो आणि पानगळती सुरू होते. झाडांच्या शेंड्यांपासून पानांची गळती सुरू होते आणि मग हळू हळू खालच्या फांद्यांवरची पानं गळायला लागतात. पानगळती सुरू होते तसतसे झाडांचे शेंडे हळू हळू मोकळे व्हायला लागतात आणि रस्त्याच्या वरचा आकाशाचा पट्टा रुंदावत जातो. जसजशी पानगळती वाढते तसतशी जणू एखादं जीर्ण वस्त्र विरायला लागावं, तसं हे एकेकाळचं मखमली हिरवं वस्त्र, रंगी बेरंगी डाग पडून फाटायला लागतं आणि त्याच्या वाढत जाणार्या छिद्रांमधून पलीकडली घरं, शेतं दिसायला लागतात.
ऑक्टोबर सरता सरता ‘फॉल कलर्स’ पूर्ण रंगात आलेले असतात. झपाट्याने होत चाललेल्या पानगळतीमुळे, उघड्या वागड्या होत जाणार्या रानामधे, अजून आपला गर्द लाल, नारिंगी पर्णभार संभाळून असलेलं एखादं झाड, डोंगरावर लागलेल्या वणव्यासारखं नजरेत भरत असतं. सुरवातीला एक एक दोन दोन करत गळणारी पानं हळू हळू खुळ्यागत जमिनीकडे झेपावू लागतात. अशातच एखादी जोरदार वार्याची झुळुक येते आणि झाडांच्या फांद्या हलवून जाते. मग ह्या पानांच्या रंगीबेरंगी पताका गिरक्या घेत घेत चहूकडे विखरून जातात. शेवटी शेवटी तर पानगळ एवढी वाढते, की गाडीतून जाताना दोहोबाजूंच्या झाडावरून एखादा पाखरांचा थवा जमिनीवर उतरावा किंवा एखादी टोळधाड आसमंतातून शेतावर उतरावी तसं वाटायला लागतं.
ओढ्यांच्या बाजूच्या झाडांची पानं गळायला लागून पाण्यात पडायला लागतात. सुरवातीला ही पडलेली पानं खळाळत्या पाण्याबरोबर वहात जातात. मग जसजशी त्यांची संख्या वाढायला लागते, तसतशी ही सुकलेली पानं, ओढ्याच्या कडेला आणि अधल्या मधल्या दगड धोंड्यांत अडकून साचायला लागतात.
एप्रिल मे पासून ते सप्टेंबर पर्यंत जाणवणारा हिरव्या रंगाचा दिमाख आता उतरत चाललेला असतो. झाडांच्या पायदळीची झुडपं आणि गवत देखील सुकत चाललेलं असतं. त्यात वरून पडणार्या सुकलेल्या पानांनी, रानाचा पायथा हिरव्याचा तपकिरी करून टाकलेला असतो. सुकलेलं गवत, झुडपांच्या काटक्या, झाडांच्या मोडून पडलेल्या फांद्या, दगड धोंडे आणि सुकलेली पानं या सगळ्यामुळे, जमिनीला वेगळाच असा रखरखीत पोत (texure) आलेला असतो.
August 10, 2015
सजीवाच्या उत्क्रांतीचा सिद्धान्त मांडताना डार्विनने ‘सर्व्हायवल ऑफ दी फिटेस्ट’ ही संकल्पना लोकांसमोर ठेवली होती. पृथ्वीवरील पर्यावरणीय, जैविक किंवा इतर बदलांना तोंड देण्याची क्षमता असलेले जीवच तग धरून राहू शकतात आणि या बदलांचा सामना करण्याची क्षमता नसलेले जीव कालांतराने नामशेष होतात अशी त्याची एकूण संकल्पना होती. डार्विनचा हा सिद्धान्त आज जगमान्य झाला आहे.
December 10, 2006
आता मी सुद्धा माझा दृष्टिकोन बदलून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसा भाग घेता येईल असे कार्यक्रम सादर करायचे ठरविले . विद्यार्थ्यांचा आनंद हाच तर माझा आनंद होता. मुलांच्या दृष्टिकोन जाणून घेतल्यामुळे मला अनाकलनीय असं काहीतरी साध्य केल्याचा आनंद झाला.
August 6, 2022
रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे, लघुशंका/प्रातर्विधी करणे, आपला परीसर स्वच्छ न ठेवणे, सर्वच प्रकारचे प्रदूषण निर्माण करण्यास मदत करणे हे सगळे काश्याचे द्योतक आहे? तर अज्ञान, अंधश्रद्धा, आळस, शिस्त आणि संस्कारांचा अभाव, आपण राहतो त्या शहराप्रती आणि आपल्या देशाबांधवांप्रती कमी होत चाललेलं प्रेम, माया, आदरभाव म्हणावा लागेल.
February 28, 2015
शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या निवासाने पावन झालेली इमारत इतिहासाची आजही साक्ष देते. ही वास्तू म्हणजे महाराष्ट्राचं नव्हे तर साऱ्या देशवासियांचे श्रद्धास्थान आहे. ७५ वर्षे पूर्ण झालेल्या या वास्तूला तसा इतिहास आहे आणि ही वास्तू म्हणजे हिंदुस्थानवासींना नवविचारांसह दिशादर्शन करणारे प्रेरणास्थान ठरले आहे. शिवाजी पार्क येथे गेल्यावर डॉ. मधुकर बी. राऊत मार्गावर ‘बालमोहन विद्यामंदिर’ शाळेच्या बाजूला गेल्यावर पांढऱ्या रंगाची इमारत आपल्याला समोर दिसते.
July 23, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti