No Picture
लेखसंग्रह

श्री. धावीर महाराज देवस्थान

Category:

 

राज्यात पोलीसांच्या सशस्त्र मानवंदनेचा बहुमान असलेली केवळ दोन मंदिरे आहेत. पैकी पंढरपूरचे विठ्ठल देवस्थान हे पहिले आणि त्यानंतर रोह्यातील ग्रामदैवत असलेले धावीर महाराज हे दुसरे मंदिर होय. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी या मंदिरातून ग्रामप्रदक्षिणेसाठी निघणाऱ्या पालखीला पोलीसांकडून सशस्त्र मानवंदना दिली जाते.

No Picture
कथा

गोगलगाई बारशाला जातात

Category:

 

सकाळ झाली. गोगलबाई उठल्या. आपल्या पाठीवरच्या घरातून बाहेर अंगणात आल्या. सकाळचे कोवळे ऊन खात बसून राहिल्या. तेवढ्यात त्यांची एक मैत्रीण चिऊताई समोरून येताना दिसली. तिला पाहून गोगलबाईनी विचारले, “काय चिऊताई, आज सकाळीच कसे येणे केले?” चिऊताई म्हणाली, “मी आले आहे, बोलावणे करायला. उद्या किनई माझ्या बाळाचे बारसे आहे. मुद्दाम तुम्हांला सांगायला आले आहे.

No Picture
कथा

जोजाची गोष्ट

Category:

 

‘जोजा ही एका राजाची मुलगी, पाय घसरून पडलेल्या एका म्हातारीला कुचेष्टेने हसली. तशी म्हातारीने चिडून शाप दिला: ‘तादेव’ नावाचा मृत राजपुत्र तुला पती मिळू दे अन् तुझे खूप हाल होऊ देत !’ बिचारी राजकन्या, तिने म्हातारीची विनवणी केली. तो मृत राजपुत्र कशाने उठेल म्हणून विचारले. तशी म्हातारीने सांगितले की, त्याच्या उशाशी थडग्यात एक मोठे चांदीचे पिंप ठेवलेले आहे, ते जी तरुणी तीन दिवसांत अश्रूंनी भरून टाकील तीच त्याला जीवदान देऊ शकेल व मग त्यांचे लग्न होईल.

No Picture
कथा

पहिला झेब्रा

Category:

 

पृथ्वीवर सगळंच नवं नवं होतं, तेव्हा सगळी जनावरं एकसारखी होती. त्यांची शिंगं वेगळी आहेत, त्यांच्या अंगावरची कातडी चमकदार पिवळी तांबडी आहे आणि तिच्यावर काळे ठिपके आहेत असं काहीच नव्हतं. सृष्टिनिर्माता निर्माण करीत असलेल्या विशाल व्यवस्थेला पूर्ण स्वरूप देण्यात गढलेला होता. त्याने नाना प्रकारची शिंगं बनवली. आकार, लांबी, रुंदी ह्यात अफाट वेगवेगळेपणा ठेवला. नाना प्रकारची कातडी केली. केसाळ, रंगीबेरंगी, ठिपकेवाली, पट्टेवाली. काम झालं तेव्हा निर्मात्याने शिंगं, कातडी सरोवराच्या काठी असलेल्या एका गुहेत ठेवली.

No Picture
कथा

राजा वीरकेतू, चोर आणि रत्नवती

Category:

 

त्रिविक्रमसेन राजा शिंशपवृक्षाकडे आला आणि वेताळाला पूर्वीप्रमाणेच खाद्यांवर घेऊन तो पुन्हा यायला निघाला. तेव्हा खाद्यांवरील शवातील वेताळ त्याला म्हणाला, ‘हे महाराज, तू फार दमला असशील! म्हणून तुझे श्रमपरिहार करण्यासाठी मी एक कथा सांगतो. ती ऐक.’

No Picture
कथा

आभाळातला जिराफ

Category:

 

(बुशमन लोकांमधील एक पुरातन दंतकथा)

आदिवासींचं म्हणणं आहे, काळ जेव्हापासून चालू झाला तेव्हा सूर्याला आपली आभाळातली वाट नीट माहीत नव्हती. प्रत्येक गोष्टीकडे कुतूहलानं टक लावून बघणं ही सवय जिराफाला होती. सृष्टीनिर्मात्याला वाटलं की सूर्याकडे लक्ष देण्याची कामगिरी जिराफावर सोपवावी.

No Picture
कथा

मुलगा आणि अस्वल

Category:

 

एका गावातील शिकारी नदीच्या वरच्या भागात सांबरांची शिकार करण्यास गेलेले असताना रहस्यमयरित्या गायब होतो. त्याच गावातील एक तरुण आणि अनाथ असलेला मुलगा विलक्षण साहस आणि धोका पत्करून ते कुठे गेले होते हे कसे शोधून काढतो आणि एक सामर्थ्यवान शिकारी कसा बनतो, हे सांगणारी ही कथा थक्क करून सोडणारी आहे.

No Picture
कथा

दहा पायांचे अस्वल

Category:

 

एकदा एक दहा पायांचे ध्रुवप्रदेशी अस्वल अलास्काच्या उत्तरेला असलेल्या समुद्रकिनाऱ्याजवळ राहत होते. समुद्रातील हिमपर्वत आणि दूरवर तरंगणाऱ्या हिमखंडाच्या पलीकडील सील माशांची शिकार करणे यात त्याचा बहुतांश वेळ ते घालवीत असे. त्यामुळे हे अस्वल एस्किमोंच्या दृष्टीस अगदी क्वचितच पडत असे. त्या अस्वलाला प्रत्येक बाजूने पाच पाच असे पाय होते. जेव्हा ते अस्वल चालत असे किंवा पळत असे तेव्हा ते त्याच्या एका बाजूच्या पाचही पायांवर चालून किंवा पळून पुढे जात असे.

No Picture
कथा

पांढऱ्या अस्वलाची गोष्ट

Category:

 

एक होता तरुण मुलगा. त्याचं नाव ओथुन. तो आइसलँड या बर्फानं भरलेल्या देशात राहत होता. त्याला आई होती. उन्हाळा आला की बर्फ वितळे आणि जहाजं इकडून तिकडं, तिकडून इकडं येऊ-जाऊ लागत. ही जहाजं जाताना येतांना बघून ओथुनला मोठं कुतूहल वाटे की, कुठं बरं ही जहाजं जात असतील, कुठून येत असतील ? आपणदेखील या जहाजातून जाऊन दूर दूर काय आहे, बघून यावं ! एकदा नॉर्वे देशाकडचं एक जहाज आईसलँडला पोचता-पोचता लवकर हिवाळा सुरू झाल्यामुळं बर्फात अडकलं.

No Picture
कथा

राजाची चूक

Category:

 

एक राजा होता. त्याची एक राणी होती. राणी अतिशय देखणी होती. राज्य भले मोठे होते. प्रजा अतिशय सुखी व गुण्यागोविंदाने नांदत होती. पण राजा निपुत्रिक होता. त्यामुळे राजा-राणी दुःखी होते. त्यामुळे प्रजाही चिंतीत होती. राजानंतर राजगादीवर कोण बसणार? राजा राणी आपल्या प्रजेवर पुत्रवत प्रेम करीत. त्यामुळे राज्यात भांडण-तंटा, चोऱ्या-माय होत नव्हत्या.