युवा-विश्व

असे शिक्षक- अशा शाळा

Category:

 

अनेक शिक्षक, शाळा, आज ‘सृजनात्मकतेकडे वाटचाल करत आहेत. नावीन्यशील प्रयोगामुळे शिक्षणक्षेत्रात आशाादयक चित्र निर्माण होत आहे. असेच एक शिक्षक आहेत श्री. बालाजी जाधव. आठवणीतील शिक्षक आणि शाळा ही जगण्याची ऊर्मी असते. जसे शिक्षक तंशी शाळा. As is the H.M., so is the school. शिक्षकामुळे शाळा लक्षात राहतात. दुर्गम, दुष्काळी भागात राहून शाळेला बागायती करणारे, नंदनवन करणारे शिक्षक श्री. बालाजी जाधव, गुगल इन्नोव्हेटर शिक्षक. ॲप्स, वेब स्वनिर्मित करुन गुगल मायक्रोसॉफ्टकडून सन्मान. गुगलसोबत दोनशेहून जास्त कार्यशाळा घेऊन दोन लाखाहून जास्त शिक्षक प्रवाहात आणले. शाळा ५० पेक्षा जास्त देशासोबत व्हर्चुअली जोडली आहे. ‘शिक्षणभक्ती’ हे युट्युब चॅनेल आहे. गुगल मायक्रोसॉफ्ट, एक्सेल गुजरात सरकारकडून आयसिटी वर्कबद्दल सन्मान. महाराष्ट्र ई-गव्हर्नमेंट आयटी सेलचे सदस्य. एससीईआरटीचे टेक्नो रिसोर्स पर्सन. कार्यप्रेरणा साधन व्यक्ती. बालभारती ॲप क्रिएशन सदस्य १५ देशात व्हर्चुअल ऑफलाईन, २५ अँड्रॉइड अॅप्लिकेशन केले. शाळेसाठी एसएमएस चॅनल केले. स्पर्धा परीक्षेसाठी ५०० फ्री ऑनलाइन टेस्ट. ओपेन सोर्स टूल फॉर ऑनलाइन टेस्ट. व्हिडिओज, अॅप्स गृहपाठचा वापर लाखो विद्यार्थी करतात. शाळेत लॅपटॉप स्वतः आणला, गैरहजर मुलेही यायला लागली. सुरुवातीला फ्फक्त तेवीस विद्यार्थी येत होते. त्यापैकी १२ विद्यार्थी हजर असायचे. मुलं गावात भटकत असायची. मुलांची आवड जपण्यासाठी स्वतः लॅपटॉप घेतला.

मनोरंजन

कोऽहम्

Category:

 

आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. अनेकांशी वादविवाद, मारामाऱ्या कराव्या लागल्या. कधी स्वतःला तर कधी दुसऱ्याला वाचवायला खोटं बोलावं लागलं. अनेक आजारपणांना तोंड द्यावं लागलं. बसच्या अपघातांना तर तोटाच नव्हता. अर्थात असे प्रसंग सर्वसामान्य माणसांच्या तसे कलाकारांच्या आयुष्यात येतातच.

कथा

सुटका

Category:

 

जेट एअर वेजच्या विमानाने मुंबईतून दुबईच्या दिशेने झेप घेतली. शबानाचे मन त्याच्यापेक्षा अधिक वेगाने आरिफकडे धावले. स्वतंत्र संसाराची सोनेरी स्वप्ने प्रत्यक्षात उतरण्याचा क्षण काही तासांवर येऊन ठेपला होता. शबानाचे आरिफशी लग्न होऊन चार वर्षांचा काळ लोटला होता. लग्नानंतर दुसऱ्या वर्षात आरिफला एका कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाल्यामुळे तो तिकडे गेला. कोकणातल्या गावी सासू, सासरे आणि धाकटा दीर यांच्या सोबत शबानाला राहावे लागले. सासूचे आजारपण सततचे असल्यामुळे त्या घराची जबाबदारी शबानावर पडली. आरिफ वर्षातून एकदा एक महिन्याच्या सुटीवर गावी यायचा. तेवढ्या एकच महिन्यापुरते दोघांचे सहजीवन असे. पुढे दिराचे लग्न होऊन जाऊ घरात आली. सासूचा संसार चालवत असल्याची खंत शबानाच्या मनात सलत असे. जावेचे घरात आगमन झाल्यावर तिथून सुटका होण्याची तिची आशा पालवली. तेथून घेऊन जाण्याचा लकडा तिने आरिफकडे सुरू केला. सगळ्यांच्या विचारांचे एकमत होऊन तिची पाठवणी आरिफकडे करण्याचे ठरले. दिराने तिला मुंबईच्या विमानतळावर सोडले. आरिफ तिला घेण्यासाठी विमानतळावर येणार होता, तरीपण दक्षता म्हणून त्याच्या घराचा व कंपनीला पत्ता तिने एका कागदावर लिहून घेतला होता.दुबईच्या एअरपोर्टवरून बाहेर पडण्याचा गेटजवळ तिने थांबावे असे तिला बजावून ठेवले होते. आखाती देशातील वैभव, झगमगाट याविषयी तिने आरिफकडून खूप ऐकले होते. कोकणातल्या लहान गावातून तिकडे जाण्याची भुरळ तिच्या मनाला पडली. नवऱ्यासोबत राहून ती आता जीवनाचा भरपूर आनंद लुटणार होती.