Year: 2026
पुस्तकांनी काय शिकवलं
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनतुमच्याकडे दहा रुपये असतील तर आठ रुपये स्वतःच्या खर्चासाठी ठेवा. उरलेल्या दोन रुपयांपैकी एक रुपयाचं गुलाबाचं फुल घ्या आणि एक रुपयांचं पुस्तक घ्या अशी एक म्हण आहे. का जगायचं ते गुलाबाकडे पाहून कळेल आणि कसं जगायचं ते पुस्तक शिकवेल. पुस्तके अत्यंत मोलाची आहेत. त्यात मराठी साहित्य ही तर न संपणारी दौलत आहे. जितकी जास्त लुटाल तितकी ती वाढत जाते. एक ज्ञानेश्वरी जरी पुन्हा पुन्हा वाचली तर प्रत्येक ओवीचा अर्थ नव्याने कळतो. आपण मराठी माणसे खरोखर नशीबवान, आपल्याला जसा थोर इतिहास लाभला तशी साहित्याची मोठी परंपराही लाभली. पुस्तकांच्या परंपरेचा हा आढावा घेतला आहे निरेन आपटे ह्यांनी!
प्रतिमा
Category:
साहित्य - ललितरामायणकथेवर आधारीत भासरचित सात अंकी संस्कृत नाटक. भास यांच्या सर्वोत्कृष्ट नाटकांपैकी प्रतिमा हे एक नाटक . यात रामाच्या वनवासात जाण्यापासून ते रावणाचा वध आणि रामाचा राज्याभिषेक या घटनांना भास यांनी स्थान दिले आहे राजा दशरथाच्या मृत्यूनंतर भरत आपल्या आजीच्या घरुन परततांना अयोध्येजवळच्या रस्त्यावर असलेल्या देवकुळात पूर्वजांच्या मूर्ती पाहतो. तेथे दशरथाची मूर्ती पाहून भरताला त्यांच्या मृत्यूचा अंदाज येतो. प्रतिमा दर्शनाचा घटनेमुळे याला प्रतिमा नाटक असे नाव देण्यात आले.
Mackenna’s Gold
Category:
इंग्रजी चित्रपट व्हिडिओज - EnglishStarring Gregory Peck, Omar Sharif, Telly Savalas & Julie Newmar
अभिजात नाट्यसंस्था
Category:
Affiliatesप्रेरणेचे उगमस्थान
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिक“मेरे लिखने की प्रेरणा वहा से आती है जहाँ के लोग शोषित है मगर फिरभी हार नही मानते”- असे महाश्वेता देवी यांनी म्हटले आहे. संघर्ष सुद्धा प्रेरणेची बाब असू शकते. एखाद्याचा संघर्ष, दुःखं,वेदना पाहिल्यानंतर आपले दुःखं त्याच्यासमोर काहीच नाही हे समजून माणूस पुन्हा जोमाने उभा राहतो. योग्य वयात संघर्ष करावा लागला तर त्याचं एवढं अप्रूप नसतं पण बालपणीच एखादी मोठी जबाबदारी अंगावर पेलावी लागली तर ती विचार करायला लावते.. बालपण हे खेळण्याचे वय, आनंदी राहण्याचे वय पण त्या वयात पोटासाठी धोकादायक कसरती करून आपलं व कुटुंबाच पोट भरणं हे तो मुलगा शिकतो व त्याला पाहून आपण किती सुखी जीवन जगत आहोत, जराही कष्ट नाहीत याची जाणीव व्हायला लागते. जाणीव होणं म्हणजेच प्रेरणाची सुरुवात असते. नैराश्यात आशेचा किरण दिसणें ही सुद्धा प्रेरणाची पहाट असते. आर्थिक परिस्थितीमुळे जेव्हा पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवू शकत नाहीत व त्या कोवळ्या जीवांचा उपयोग अर्थाजनासाठी करतात तेंव्हा, आपल्या मुलांचा गृहपाठ करण्याची काही पालकांची कीव येते. आपल्या पाल्यांना कसली शिक्षा होऊ नये म्हणून काही पालक इतके हळवे होत असतील तर तो मुलगा कोणत्या संघर्षाला पुढे उभा राहील? अथक परिश्रम, जिद्द यांनी संघर्षावर मात करता येते. आमच्या मुलांना काही पालक संघर्ष करू देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.