व्यक्ती-परिचय

खलील शरिफ गिरकर

Category:

 

खलील शरिफ गिरकर हे टी. व्ही. नाईन या नामांकित वृत्तवाहिनीवर पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. राजकीय व सामाजिक घडामोडींवरील त्यांचे अफाट ज्ञान, व ते ज्ञान सर्व बाजुंनी नीट विचार करून वाचकांसमोर अथवा प्रेक्षकांसमोर मांडताना त्यांनी जोपासलेला तटस्थ व निःपक्षपातीपणा हा सर्वज्ञात आहे. गेल्या पाच वर्षांपासुन पत्रकारितेचे व्रत मोठया निष्ठेने व प्रामाणिकपणे स्वीकारलेल्या गिरकरांनी आजवर अनेक राजकीय व सामाजिक विषयांचे अचुक विश्लेषण व उत्खनन करून त्यांवर विपुल लेखन व सादरीकरण केले आहे, व लेखनिक कौशल्यांबरोबरच प्रशासकीय कामांसाठी, त्यांनी त्यांच्यामध्ये प्रयत्नपुर्वक विकसीत केलेले व्यावसायिक अंग नक्कीच स्पृहणीय असे आहे.

  August 22, 2011


व्यक्ती-परिचय

गजानन मुळे

Category:

 

गजानन मुरलीधर मुळे यांचा जन्म ९ मे १९८३ मध्ये लातुर येथे झाला. ‘कधीच इथे मी’ ह्या त्यांच्या प्रसिध्द कवितासंग्रहाला नुकताच राजकीय स्तरावरील काव्यलेखन सोहळ्यामध्ये, सैला सायनकर यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्राप्त झाला.

  August 22, 2011


व्यक्ती-परिचय

डॉ. मधुसुदन जोशी

Category:

 

डॉक्टर मधुसुदन जोशी हे पनवेलमधील नावाजलेले वैद्यकिय तज्ञ असुन गेली दहा वर्षे त्यांनी, त्यांच्या क्लिनीकची पायरी चढणार्‍या कुठल्याच रूग्णाला निराश होवून पाठवले नाहीये. इतकी वर्षे या व्यवसायात असल्यामुळे समृध अनुभवांची व विवीध वैद्यकिय कौशल्यांची पोतडीच त्यांच्याजवळ जमा झाली आहे.

  August 22, 2011


व्यक्ती-परिचय

डॉ. रमेश सीताराम सुर्यवंशी

Category:

 

डॉक्टर रमेश सीताराम सुर्यवंशी हे संशोधक वृत्तीचे शिक्षक, व आदिवासी बोली भाषांमधले तज्ञ मानले जाणारे एक बहुरंगी व बहुढंगी व्यक्तिमत्व आहे. शिक्षण, भाषाशास्त्र, व लोकसाहित्याचे गाढे आभ्यासक, तसेच प्रतिभावंत लेखक म्हणून त्यांनी समाजात त्यांच्या नावाचा आदरयुक्त दबदबा निर्माण केला आहे. आजवरच्या त्यांच्या शैक्षणीक प्रवासावरूनच, डॉक्टरांच्या असामान्य बौध्दिक क्षमतांची व आभ्यासु व्रुत्तीची झेप आपल्या त्वरीत लक्षात येईल, अशा कौतुकास्पद तर्‍हेने त्यांनी ही कारकिर्द घडवली आहे.

  August 22, 2011


व्यक्ती-परिचय

निलेश दत्ताराम बामणे

Category:

 

निलेश दत्ताराम बामणे हे ठाण्यामधील प्रतिभावंत व हौशी लेखक व कवी असून नुकतेच त्यांच्या ‘कवितेचा कवी’ व ‘प्रतिभा’ या दोन कवीतासंग्रहांनी, अगदी थाटात मराठी कविताविश्वामध्ये आगमन केले. ठाण्याच्या सिध्दी फ्रेन्डस पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झालेले हे कवितासंग्रह अनुक्रमे 2009 व 2010 मध्ये प्रकाशित झाले व त्यांना मराठी रसिकांकडुन उदंड प्रतिसाद लाभला.

  August 22, 2011


व्यक्ती-परिचय

बाबु घोलप

Category:

 

बाबु गणपत घोलप यांच्या शैक्षणीक कारकिर्दीवर नुसती धावती नजर जरी टाकली, तरी त्यांच्या प्रखर बुध्दीमत्तेची व सर्वांगिण क्षमतांची पोच, तसेच आभ्यासाप्रती त्यांनी दाखविलेल्या निष्ठेची खोली त्वरीत ध्यानात येते. बीड जिल्ह्यातील लिंबागणेश या लहानश्या तालुक्यात, 1 मे, 1978 रोजी जन्मलेल्या घोलपांनी विद्येसाठी भरपुर कष्ट उपसले.

  August 22, 2011


व्यक्ती-परिचय

लक्ष्मण शंकरराव काटेकर

Category:

 

लक्ष्मण शंकरराव काटेकर, हे तुळजापूर येथील रहिवाशी असुन परिचीतांमध्ये तात्या या नावाने लोकप्रिय आहेत.

  August 22, 2011


अवर्गिकृत

लोकशाहीत सरकार निरंकुश कशी काय राहू शकते ?

Category:

 

लोकशाहीत कोणतीही सरकार निरंकुश असूच शकत नाही.लोकशाहीत जनता सर्व शक्तिमान असून सत्ताधारी जनतेचे नोकर आहेत. जो विनावेतन व आपल्या घरावर तुळसीपत्र ठेवून जनसेवा करत असेल, त्यालाच जनतेचा नेता म्हणता येऊ शकते ! अन्यथा सर्व नोकर आहेत. संसदेला विशेषाधिकार असले तरी जनतेपेक्षा जास्त नाहीत, हे कसे विसरता येईल ? सत्तेच्या नशेत काहीही वक्तव्य करणे कायदेशीर आहे काय ? सत्ताधाऱ्यांनी जेव्हा-जेव्हा निरंकुश बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा-तेव्हा जनतेने त्यांना सत्तेवरून खाली खेचले, हा इतिहास सांगण्याची गरज नाही.

  August 19, 2011


व्यक्ती-परिचय

दिनकर दत्तात्रय भोसले (चारूता सागर)

Category:

 

मराठी कथाविश्वाला जळजळीत वास्तवदर्शी संकल्पनांचा स्पर्श देवून वाचकांना त्यांनी कधी स्वप्नातही ज्याची कल्पना केली नसेल, अशा भयाण परंतु भारतात अनेक ठिकाणी अस्तित्वात असलेल्या विश्वाची सैर, प्रत्यक्ष अनुभवायला कोणी लावली असेल तर ती चारूता सागर ह्यांनीच. गरीब लोकांचे जीवन, त्यांच्या व्यथा, वेदना, अपेक्षा, व माणुस म्हणून इतरांकडून त्यांना किमान मानाची वागणूक मिळावी, अशी त्यांची रास्त आशा जेव्हा पुर्ण झाली नाही तेव्हा, चारूता सागरांची कथा जन्माला आली.

  August 18, 2011