व्यक्ती-परिचय

मास्टर दत्ताराम

Category:

 

मास्टर दत्ताराम म्हणजेच दत्ताराम वळवईकर. साहित्यसंघाच्या’कौन्तेय’, ’दुसरा पेशवा’, ’भाऊबंदकी’ , ’वैजयंती’ , ’राजकुमार’ यांसारख्या नाटकांत नटवर्य नानासाहेब फाटक, दुर्गा खोटे, मामा पेंडसे यांसारख्या बुजुर्ग अभिनेत्यांबरोबर तोडीस तोड भूमिका करून दत्तारामांनी ‘नटवर्य’ हे बिरुद मिळवले. पुढे ‘ललितकलादर्श’ च्या’दुरितांचे तिमिर जावो’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘पडछाया’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या.

व्यक्ती-परिचय

मिलिंद सोमण

Category:

 

४ नोव्हेंबर १९६५ रोजी मिलिंद सोमण हा भारतीय मॉडेल आणि अभिनेता आहे गायिका आलिशा चिनाई हिच्या मेड इन इंडिया या संगीत व्हिडीओत केलेल्या भूमिकेपासून मिलींद प्रकाशझोत आला. त्याने मराठी ,हिंदी आणि तमिळ चित्रपटातुन अभिनय केला आहे.

व्यक्ती-परिचय

मिलिंद भागवत

Category:

 

मिलींद भागवत हे स्टार माझा या मराठीमधील सध्याच्या सर्वात जास्त चालणार्‍या वृत्त वाहिनीवर, निवेदक व पत्रकार म्हणून काम करणारे सर्वपरिचीत व लोकप्रिय असे सदस्य आहेत. बातम्या देण्याची त्यांची पध्दत, व ढब प्रेक्षकांच्या चांगलीच अंगवळणी पडली आहे. सर्वांना हवाहवासा वाटणारा सदैव प्रसन्न चेहरा, व ओघवती भाषा या वैशिष्टांच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आदराचे व हक्काचे स्थान निर्माण केले आहे.

व्यक्ती-परिचय

मालतीबाई विश्राम बेडेकर (विभावरी शिरुरकर)

Category:

 

मालती बेडेकर ह्या मराठीतल्या पहिल्या स्त्रिवादी लेखिका होत्या.

व्यक्ती-परिचय

मिनल संजय पालांडे

Category:

 

लहानपणापासूनच कबड्डीची आवड असणार्‍या सौ. मिनल संजय पालांडे यांनी आपलं संपूर्ण आयुष्यच कबड्डीसाठी झोकून दिलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या महिला कबड्डी संघात त्यांनी सहा वर्षं महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व केलं आणि एक वर्ष कर्णधार म्हणूनही त्यांनी संघाचं नेतृत्व केलं.

व्यक्ती-परिचय

मारुती पाटील

Category:

 

मारुती पाटील हे ठाण्यातील रत्नांपैकी एक झळाळतं रत्न. . १९९५ साली त्यांनी ठाण्यात ओंकार अकादमीची स्थापना केली. जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इस्राईल या देशातील संगीत विद्यालयात नियमितपणे अध्यापनाचे कार्य ते करत आहेत.

व्यक्ती-परिचय

महेश मांजरेकर

Category:

 

महेश मांजरेकर यांनी लेखन व भुमिका केलेला ’मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ हा मराठी चित्रपट तुफान गाजला. त्यानंतर त्यांनी ”शिक्षणाच्या आईचा घो”, ”लालबाग परळ”, ”फक्त लढ म्हणा”, ”काकस्पर्श” आणि ”कोकणस्थ” या चित्रपटांचे दिग्दर्शन करून मराठी चित्रपटाच्या प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्याची महत्वाची कामगिरी केली.