चव्हाण, विमल
लढवय्या साम्यवादी चळवळीतील आपल्या साथीदाराचा संसार नेटाने चालवताना डाव्या चळवळीमध्येही योगदान देणाऱ्या त्या तिघीजणी. एकाच पक्षाशी म्हणजे लाल निशाण पक्षाशी बांधिलकी असलेल्या या तीन रणरागिण्यांचे अवघ्या काही दिवसांच्या अंतराने निधन झाले आणि एक पर्व संपले.
विमल चव्हाण यांची ओळख केवळ यशवंत चव्हाण यांच्या पत्नी अशी कधीच नव्हती. ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होते. विमल चव्हाण म्हणजे पूर्वाश्रमीच्या विमल हेमाडी.
मडगाव गोव्यात नारायणराव हेमाडी या प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या घरात त्यांचा १९१७ मध्ये जन्म झाला. मोठा परिवार होता. कॉन्व्हेंट शाळेत शिक्षण झाल्यामुळे इंग्रजी भाषेवर मराठी इतकेच प्रभुत्व होते. शाळेत असल्यापासूनच स्वभाव बंडखोर होता. बायबलच्या क्लासवरून त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्ध लढा दिला होता. १९३८ च्या सुमारास त्या कोल्हापूरला वडीलबंधू प्रभाकर हेमाडी यांच्याकडे महाविद्यालयीन शिक्षणासाठी आल्या. तेथे लेखक, कलाकारांचा राबता असे. स्वाभाविकच विमलताईंवर सांस्कृतिक संस्कार झाले. त्या विद्यार्थी चळवळीमध्ये अग्रेसर होत्या. कोल्हापूरमध्ये सायकलवरून फिरणारी ही एकमेव मुलगी. याच दरम्यान त्यांनी यशवंत चव्हाण यांना पाहिले. कोल्हापूरमध्ये झालेल्या ऐतिहासिक सभेनंतर यशवंत चव्हाण यांच्यावर वॉरंट निघाले आणि त्यांना भूमिगत व्हावे लागले. त्यावेळी ते हेमाडी यांच्या घरी राहिले आणि नंतर विमलताईंच्या प्रेमाच्या बेडीत अडकले. १९४५ मध्ये त्यांचे लग्न अवघ्या पाच रुपयात झाले. अनेकदा दोघांचे राजकीय मतभेद होत. तरीही पतीबद्दल त्या नेहमी ‘माय हजबंड इज अ जेम’ असेच सांगत. स्वातंत्र्य लढय़ाला विरोध करणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाच्या भूमिकेला विरोध करणाऱ्या नवजीवन संघटनेमध्ये त्या सुरुवातीपासून होत्या. त्या संघटनेचे म्हणजेच आताच्या लाल निशाण पक्षाची मंडळी अगदी अलीकडच्या काळापर्यंत कम्युनवर राहत होती. विमलताई आणि यशवंत चव्हाण तेथेच राहत. डॉ. माधव चव्हाण हे त्यांचे पुत्र. जनचळवळीतल्या मंडळींप्रमाणेच विमलताईंनी पूर्णवेळ नोकरी केली आणि यशवंतराव पूर्णवेळ राजकारणात राहिले. खार येथील बी. पी. एम. हायस्कूलमध्ये त्या शिक्षिका होत्या. नोकरीच्या अखेरच्या काळामध्ये त्या या शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका होत्या. नोकरीमुळे आपल्याला राजकारणात सक्रिय होता आले नाही, ही खंत त्यांना अखेपर्यंत होती.
चव्हाण, विमल
लढवय्या साम्यवादी चळवळीतील आपल्या साथीदाराचा संसार नेटाने चालवताना डाव्या चळवळीमध्येही योगदान देणाऱ्या त्या तिघीजणी. एकाच पक्षाशी म्हणजे लाल निशाण पक्षाशी बांधिलकी असलेल्या या तीन रणरागिण्यांचे अवघ्या काही दिवसांच्या अंतराने निधन झाले आणि एक पर्व संपले.
विमल चव्हाण यांची ओळख केवळ यशवंत चव्हाण यांच्या पत्नी अशी कधीच नव्हती. ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होते. विमल चव्हाण म्हणजे पूर्वाश्रमीच्या विमल हेमाडी.
मडगाव गोव्यात नारायणराव हेमाडी या प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या घरात त्यांचा १९१७ मध्ये जन्म झाला. मोठा परिवार होता. कॉन्व्हेंट शाळेत शिक्षण झाल्यामुळे इंग्रजी भाषेवर मराठी इतकेच प्रभुत्व होते. शाळेत असल्यापासूनच स्वभाव बंडखोर होता. बायबलच्या क्लासवरून त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्ध लढा दिला होता. १९३८ च्या सुमारास त्या कोल्हापूरला वडीलबंधू प्रभाकर हेमाडी यांच्याकडे महाविद्यालयीन शिक्षणासाठी आल्या. तेथे लेखक, कलाकारांचा राबता असे. स्वाभाविकच विमलताईंवर सांस्कृतिक संस्कार झाले. त्या विद्यार्थी चळवळीमध्ये अग्रेसर होत्या. कोल्हापूरमध्ये सायकलवरून फिरणारी ही एकमेव मुलगी. याच दरम्यान त्यांनी यशवंत चव्हाण यांना पाहिले. कोल्हापूरमध्ये झालेल्या ऐतिहासिक सभेनंतर यशवंत चव्हाण यांच्यावर वॉरंट निघाले आणि त्यांना भूमिगत व्हावे लागले. त्यावेळी ते हेमाडी यांच्या घरी राहिले आणि नंतर विमलताईंच्या प्रेमाच्या बेडीत अडकले. १९४५ मध्ये त्यांचे लग्न अवघ्या पाच रुपयात झाले. अनेकदा दोघांचे राजकीय मतभेद होत. तरीही पतीबद्दल त्या नेहमी ‘माय हजबंड इज अ जेम’ असेच सांगत. स्वातंत्र्य लढय़ाला विरोध करणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाच्या भूमिकेला विरोध करणाऱ्या नवजीवन संघटनेमध्ये त्या सुरुवातीपासून होत्या. त्या संघटनेचे म्हणजेच आताच्या लाल निशाण पक्षाची मंडळी अगदी अलीकडच्या काळापर्यंत कम्युनवर राहत होती. विमलताई आणि यशवंत चव्हाण तेथेच राहत. डॉ. माधव चव्हाण हे त्यांचे पुत्र. जनचळवळीतल्या मंडळींप्रमाणेच विमलताईंनी पूर्णवेळ नोकरी केली आणि यशवंतराव पूर्णवेळ राजकारणात राहिले. खार येथील बी. पी. एम. हायस्कूलमध्ये त्या शिक्षिका होत्या. नोकरीच्या अखेरच्या काळामध्ये त्या या शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका होत्या. नोकरीमुळे आपल्याला राजकारणात सक्रिय होता आले नाही, ही खंत त्यांना अखेपर्यंत होती.