(डॉ.) मा. स. गोरे

गोरे, (डॉ.) मा. स.
मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ. माधव सदाशिव गोरे हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२१ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण धारवाड, पुणे आणि सांगली येथे झाले.

‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’मध्ये ते शिकले. तिथे त्यांनी ‘सोशल सव्‍‌र्हिस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ या विषयामध्ये पदव्युत्तर पदविका मिळवली. १९४८ मध्ये त्यांनी समाजशास्त्र या विषयामध्ये मुंबई विद्यापीठातून एम.ए.ची पदवी मिळवली. १९४८ ते १९५३ या काळात ते ‘दिल्ली स्कूल ऑफ सोशल वर्क’मध्ये अधिव्याख्याते होते. त्यांना फुलब्राईट शिष्यवृत्ती मिळाली होती. त्याआधारे त्यांनी १९६१ मध्ये कोलंबिया विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली. १९८२ पर्यंत ते मुंबईच्या ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थे’च्या संचालकपदी होते. १९८३ ते १९८६ या काळात ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. बेलॉईट कॉलेज आणि विस्कॉन्सिन विद्यापीठाचे ते नियमित मानद व्याख्याते होते. १९९७ मध्ये ते दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलपती बनले. समाजशास्त्रज्ञ या नात्याने त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव ‘इंडियन कौन्सिल ऑफ सोशल वेल्फेअर’ने केला होता. १९७५ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ हा मानाचा किताब देऊन गौरवण्यात आले होते. समाजशास्त्र क्षेत्रात त्यांनी बजावलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल २००६ मध्ये त्यांना ‘इंडियन सोशालॉजिकल सोसायटी’च्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. २००३ पासून त्यांनी अनेक मराठी पुस्तकांचे इंग्रजीत भाषांतर केले. ते अतिशय शिस्तशीर आणि व्यासंगी प्राध्यापक या नात्याने विद्यार्थिवर्गामध्ये प्रिय होते. त्यांनी समाजशास्त्र या विषयामध्ये मूलभूत संशोधन केले आहे. ‘इंडियन यूथ : प्रोसेसेस ऑफ सोशलायझेशन’ हे त्यांचे पुस्तक आधुनिक भारतातील तरूणांची समाजशास्त्रीय चिकित्सा करणारे आहे. १९७७ मध्ये त्यांनी याच विषयावर दिलेल्या व्याख्यानसत्रावर आधारित असे हे पुस्तक आहे. डॉ. गोरे यांनी ‘होमी भाभा फेलोशिप्स कौन्सिल’साठी महाराष्ट्रातल्या ब्राह्मणेतर चळवळीची समाजशास्त्रीय चिकित्सा केली होती. याच काळात त्यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या चरित्राचा अभ्यास करून महाराष्ट्रातल्या ब्राह्मणेतर चळवळीवर पुस्तकही लिहिले. याच विषयावर त्यांनी अलाहाबादच्या ‘गोविंद वल्लभ पंत इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल स्टडीज’मध्ये व्याख्यानसत्रात भाग घेतला होता. त्यांचे असंख्य प्रबंध देशात आणि परदेशात प्रसिद्ध झाले आहेत. समाजशास्त्र या विषयाशी संबंधित अनेक आयोगांवर त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेली होती. ते ‘इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च’च्या संचालकपदावरही काही काळ होते. १९७१ ते १९७५ या काळात ते ‘धंदेवाईक शिक्षणात समाजशास्त्राची भूमिका’ या विषयावर काम करणाऱ्या अभ्यासगटाचे प्रमुख होते. १९७७ ते १९७९ या काळात ते ‘इंडियन सोसायटी ऑफ क्रिमिनॉलॉजी’ या संस्थेचे अध्यक्ष होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’चे संचालकपद स्वीकारले. ‘सोशल डेव्हलपमेंट : चॅलेंजेस फेस्ड इन अनइक्वल अ‍ॅण्ड प्लुरल सोसायटी’ हेही त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे त्यांनी ‘द सोशल कॉन्टेक्स्ट ऑफ अ‍ॅन आयडॉलॉजी : आंबेडकर्स पोलिटिकल अ‍ॅण्ड सोशल थॉट’ हे पुस्तक लिहिले होते. समाजाचा अतिशय बारकाईने अभ्यास करून त्याची मानसशास्त्रीय चिकित्सा करण्याचे काम त्यांनी अनेक वर्षांपासून केले आहे. देशाच्या इतिहासामध्ये घडलेल्या सामाजिक अभिसरणाचा अभ्यास अलीकडच्या काळात त्यांच्याइतका अन्य कोणाचा असेल, अशी शक्यता नाही. एक अतिशय डोळस अशा समाजशास्त्रज्ञास त्यांच्या निधनाने आपण मुकलो आहोत. शुक्रवारी त्यांचे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.



गोरे, (डॉ.) मा. स.
मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ. माधव सदाशिव गोरे हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२१ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण धारवाड, पुणे आणि सांगली येथे झाले.

‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’मध्ये ते शिकले. तिथे त्यांनी ‘सोशल सव्‍‌र्हिस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ या विषयामध्ये पदव्युत्तर पदविका मिळवली. १९४८ मध्ये त्यांनी समाजशास्त्र या विषयामध्ये मुंबई विद्यापीठातून एम.ए.ची पदवी मिळवली. १९४८ ते १९५३ या काळात ते ‘दिल्ली स्कूल ऑफ सोशल वर्क’मध्ये अधिव्याख्याते होते. त्यांना फुलब्राईट शिष्यवृत्ती मिळाली होती. त्याआधारे त्यांनी १९६१ मध्ये कोलंबिया विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली. १९८२ पर्यंत ते मुंबईच्या ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थे’च्या संचालकपदी होते. १९८३ ते १९८६ या काळात ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. बेलॉईट कॉलेज आणि विस्कॉन्सिन विद्यापीठाचे ते नियमित मानद व्याख्याते होते. १९९७ मध्ये ते दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलपती बनले. समाजशास्त्रज्ञ या नात्याने त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव ‘इंडियन कौन्सिल ऑफ सोशल वेल्फेअर’ने केला होता. १९७५ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ हा मानाचा किताब देऊन गौरवण्यात आले होते. समाजशास्त्र क्षेत्रात त्यांनी बजावलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल २००६ मध्ये त्यांना ‘इंडियन सोशालॉजिकल सोसायटी’च्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. २००३ पासून त्यांनी अनेक मराठी पुस्तकांचे इंग्रजीत भाषांतर केले. ते अतिशय शिस्तशीर आणि व्यासंगी प्राध्यापक या नात्याने विद्यार्थिवर्गामध्ये प्रिय होते. त्यांनी समाजशास्त्र या विषयामध्ये मूलभूत संशोधन केले आहे. ‘इंडियन यूथ : प्रोसेसेस ऑफ सोशलायझेशन’ हे त्यांचे पुस्तक आधुनिक भारतातील तरूणांची समाजशास्त्रीय चिकित्सा करणारे आहे. १९७७ मध्ये त्यांनी याच विषयावर दिलेल्या व्याख्यानसत्रावर आधारित असे हे पुस्तक आहे. डॉ. गोरे यांनी ‘होमी भाभा फेलोशिप्स कौन्सिल’साठी महाराष्ट्रातल्या ब्राह्मणेतर चळवळीची समाजशास्त्रीय चिकित्सा केली होती. याच काळात त्यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या चरित्राचा अभ्यास करून महाराष्ट्रातल्या ब्राह्मणेतर चळवळीवर पुस्तकही लिहिले. याच विषयावर त्यांनी अलाहाबादच्या ‘गोविंद वल्लभ पंत इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल स्टडीज’मध्ये व्याख्यानसत्रात भाग घेतला होता. त्यांचे असंख्य प्रबंध देशात आणि परदेशात प्रसिद्ध झाले आहेत. समाजशास्त्र या विषयाशी संबंधित अनेक आयोगांवर त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेली होती. ते ‘इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च’च्या संचालकपदावरही काही काळ होते. १९७१ ते १९७५ या काळात ते ‘धंदेवाईक शिक्षणात समाजशास्त्राची भूमिका’ या विषयावर काम करणाऱ्या अभ्यासगटाचे प्रमुख होते. १९७७ ते १९७९ या काळात ते ‘इंडियन सोसायटी ऑफ क्रिमिनॉलॉजी’ या संस्थेचे अध्यक्ष होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’चे संचालकपद स्वीकारले. ‘सोशल डेव्हलपमेंट : चॅलेंजेस फेस्ड इन अनइक्वल अ‍ॅण्ड प्लुरल सोसायटी’ हेही त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे त्यांनी ‘द सोशल कॉन्टेक्स्ट ऑफ अ‍ॅन आयडॉलॉजी : आंबेडकर्स पोलिटिकल अ‍ॅण्ड सोशल थॉट’ हे पुस्तक लिहिले होते. समाजाचा अतिशय बारकाईने अभ्यास करून त्याची मानसशास्त्रीय चिकित्सा करण्याचे काम त्यांनी अनेक वर्षांपासून केले आहे. देशाच्या इतिहासामध्ये घडलेल्या सामाजिक अभिसरणाचा अभ्यास अलीकडच्या काळात त्यांच्याइतका अन्य कोणाचा असेल, अशी शक्यता नाही. एक अतिशय डोळस अशा समाजशास्त्रज्ञास त्यांच्या निधनाने आपण मुकलो आहोत. शुक्रवारी त्यांचे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.

Author