नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

संगीताला आपल्या जीवनाचे चक्र कसे चालू करायचे हेच उमगत नव्हते. विचारांचा गुंता वाढतच चालला होता, डोळ्यासमोरून मौशु जाता जात नव्हती. एका नराधमाने त्या दोघीना खोल समुद्रात ढकलून दिले होते, आशेचा एखादा किरणही डोकविण्याची सुतराम शक्यता नव्हती.
“आपल्या खऱ्या वयापेक्षा कमी वयाचं दिसायचंय ?? कुठल्याही वयात असताना योग्य जोडीदार मिळवायचाय ?? .. नियमित “योग” करा , फीट रहा… “योग” केल्याचा असाही एक फायदा… “
वैधानिक इशारा : या रेसिपीमुळं कुणाचं मनःस्वास्थ्य बिघडलं , घरात भांडणं होऊ लागली , लहान पिढी आणि तारुण्यातली पिढी वाया जाऊ लागली , संस्कृती नष्ट होऊ लागली , शिक्षणावर कुणी पाणी सोडलं , समाजात अनाचार , अत्याचार होऊ लागला , सगळ्या प्रकारचं प्रदूषण होऊ लागलं तर त्याला लेखक जबाबदार नाही !
सिंहावलोकन करताना आणि जपून ठेवलेली स्मृतिचिन्हे बघताना मनात कृतज्ञता दाटून येते . अर्ज करून , कागदपत्रे सादर करून आणि अनेकदा पैसे भरून पुरस्कार मिळवण्याचा आत्ताचा हा काळ . पण मला जेव्हा पुरस्कार लाभत होते तेव्हा यातील काहीही मी केले नव्हते , हा विचार माझ्या मनाला सुखावून जातो . कारण तेव्हा अनेक संस्था , व्यक्ती , वर्तमानपत्रातील बातम्यांच्या आधारे किंवा त्यांच्या व्यवस्थेतून माहिती मिळवून पुरस्कार देत असत .हा अनुभव अनेकांना त्याकाळात आला असेल .
मला वाटते की लेखन करणाऱ्याला , काम करणाऱ्या सेवाभावी वृत्तीला , सामाजिक कार्यात अखंड गुंतून पडलेल्या व्यक्तीला किंवा जगावेगळं काहीतरी करणाऱ्याला ऐन उमेदीत पुरस्कार लाभला तर उर्वरित आयुष्यात ती व्यक्ती किंवा संस्था अधिक कार्यप्रवण होऊ शकतात .
सतत लेखन करत राहण्याची उर्मी आणि प्रेरणा मला या पुरस्कारांनी दिली , असे म्हटले तर वावगे ठरू नये .
आपण काहीतरी चांगले काम करत असतो आणि कुणी ना कुणी त्याची दखल घेत असतो , हे मी अनुभवलं आहे .
नारायण भंडारी या नावासह पूर्णतः काल्पनिक . यातील घटना प्रसंगाचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही , तसा कुणाला आढळला तर तो योगायोग समजावा.

ते दोघं एकमेकांशी गप्पा मारत थोडावेळ चालत राहिले… खरोखरच रोहनची साथ मिळाल्यामुळं हा अवघड रस्ता पार करणं सोपं होवून गेलंय असं नीशाच्या मनात आलं. मघासची आंधाराची आणि एकटेपणाची भीती नीशाच्या मनातून पार हद्दपार झाली होती… आणि क्षणात तिचं मन एका अनोख्या सुगंधानं भारलं गेलं.
संध्याकाळी गणेश त्या पत्यावर पोहोचला. त्यानं त्या टुमदार बंगल्याच्या दारावरची बेल वाजवली. सकाळच्या त्याच मुलीने दरवाजा उघडला व वडिलांना तिने ‘दादा, आलाय..’ असं सांगितलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी, चहा नाष्टा झाल्यावर सगळ्यांनी गढीवर जायचे ठरले. वाटेत मॅनेजर केळकर आणि गढीतील विहीर बुजवायचे काम करणारा कॉन्ट्रॅक्टर, त्यांच्यासोबत गढीवर येणार होता. ठरल्याप्रमाणे वाड्यावरून निघताना दीने केळकरांना फोन करून मंदिराच्या पायथ्याशी थांबण्यास सांगितले. थोड्याच वेळात ते पायथ्याशी पोहोचले. केळकर दुसरी गाडी घेवून आले होतेच. मग सगळेजण बरोबर गढीच्या दिशेने निघाले. आरूला आणि नीलला कधी एकदा गढीपाशी जातो असे झाले होते. थोड्याच वेळात ते सगळे गढीच्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचले. लांबून पाहून गढी किती मोठ्ठी असेल याचा काहीच अंदाज आला नव्हता. पण मुख्य दार आणि बाजूची तटबंदी पाहिल्यावर गढीची भव्यता नजरेत मावत नव्हती. भिंतीच्या टोकाला दोन्ही बाजूला मोट्ठे भक्कम ३५ ते ४० फूट उंचीचे बुरूज होते. गढीची दर्शनी भिंत आणि बुरूज यांचे २० फुटा पर्यंतचे बांधकाम दगडी होते आणि त्यावर उरलेले बांधकाम विटातील केलेले दिसत होते. गढीच्या तटबंदीवर आणि बुरुजावरील सज्जात बंदुकी ठेवायला केलेल्या जंग्या दिसत होत्या. काही ठिकाणी कोनाडे दिसत होते. तटबंदीच्या कपारींमधून लहान मोठी झुडुपे डोकावत होती.

निवडणूक जवळ आलीय. निवडणूक, मग ती ग्रामपंचायतीची असो की लोकसभेची, एक वातावरण तयार करतेच. प्रत्येक निवडणुकीची आपली अशी खास वैशिष्ट्य असतात. लोकसभेच्या निवडणुकीचा पसारा खूप मोठा असतो. विशेषतः उमेदवाराच्या दृष्टीकोनांतून हा पसारा मोठा असतो. जेवढी मोठी निवडणूक तितका उमेदवाराचा खर्च जास्त.
“छ्या! बाबांनी नुसता वैताग आणलाय. किती सारखं हे केलंस का? ते घेतलंस का? बॅग जागेवर ठेव. मला डॉक्टर कडे घेऊन चल. माझी औषधं आण वगैरे वगैरे…
Copyright © 2025 | Marathisrushti