(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • घंटा (मी आणि ती कथा)

    ए बाई कुठे भटकतेस उन्हातून? तिने मागे पाहिले , आयला तू इथे काय करतोस, ह्या गावात . हे तर डोंबिवली गाव नाही पण शहरही नाही, ऍन्टी गोबल व्हिलेज म्हण

  • इम्युनिटी अनलिमिटेड

    ” हरकत नाही , पण आता एक काम करा , सगळ्यांनी निघा इथून . शौनक , तू आजोबांकडे जायचं आहेस त्यांच्यासाठी वर्तमानपत्र घेऊन , आणि त्यातल्या निगेटिव्ह बातम्या वाचून दाखवू नकोस .आभा तुला सिस्टरच्या घरी जायचंय , केक घेऊन . त्या नर्स आहेत , आज कदाचित त्यांची ड्युटी वाढण्याची शक्यता आहे . मालन , आजींसाठी काहीतरी घेऊन जा खायला , आजतरी त्या काही खातात का बघ . तुझं संभाषण कौशल्य पणाला लाव .

  • प्रश्नोपनिषद : एक चिरंतन वेदना !

    प्रश्नोपनिषद : एक चिरंतन वेदना !

    एका घरट्यात दोन पिलं कासावीस झाली आहेत . त्यांचं निःशब्द आक्रंदन आपल्याला तर जाणवेलच पण पाषाण हृदयी माणसाच्या मनाला सुद्धा जाणवेल . आणि पिलांकडे न पाहता पिलांचे आईबाप ठरवून पाहिल्यासारखे दुसरीकडे नजर फिरवून फांदीवर अगदी अलिप्तपणाने बसले आहेत , हे सुद्धा जाणवेल .

  • मैत्रिण

    पंचवीस एक वर्षापूर्वी विजय एका सरकारी शाळेत तिसर्‍या इयत्तेत शिकत होता. त्यावेळ्चा प्रसंग आठवून विजयला आजही स्वतःवरच ह्सू येत. त्या शाळेपासून पंदरा मिनिटाच्या अंतरावर असणार्‍या झोपडपट्टीत विजय त्यावेळी रहात होता. पण झोपडपट्टीत रहात असतानाही त्यावेळी विजयच्या वडिलांची आर्थिक स्थिती उत्तम होती. त्यामुळे विजय शाळेत जाताना इतर मुलांच्या तुलनेत जरा जास्तच रूबाबात जात असे त्याचा तो रूबाब आजही कमी झालेला नाही म्ह्णजे त्याने तो कधीच कमी होऊ दिला नाही. पहिली – दुसरीला तो ज्या शाळेत शिकत होता त्या शाळेच्या मुख्याध्यापिकाच त्याच्या वडिलांच्या खास परिचयाच्या होत्या आणि त्याकाळी त्या शाळेची शिस्त फारच कडक होती. पण ती शाळेत जाण्यासाठी बसने प्रवास करावा लागत असे तो टाळण्यासाठी नाईलाजाने त्याने या नवीन शाळेत प्रवेश घेतला होता. विजयला वर्गात शांत आणि शिस्तीत राहण्याची जणू सवयच जडलेली होती. पण तो कितीही शांत दिसत असला तरी स्वभावता शांत अजिबातच नव्हता. या नवीन शाळेत बहूतेक मुल खोडकर होती. त्यामुळे त्या मुलांच्या तुलनेत विजय किंचित वेगळाच होता.

  • एक परीस स्पर्श – भाग ४

    जयराम शेट यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटासारखं होतं. त्यांच्या आयुष्यात सगळे रंग होते म्हणजे असं म्हणता येईल की हा माणूस आयुष्य भरभरून , उत्साहात , आनंदात आणि दिवसरात्र काबाड कष्ट करून जगला होता. ज्याला आपला आदर्श ठेवावा असा उद्योगपती होता.

  • एक परीस स्पर्श ( भाग – १३ )

    दोन वर्षानी विजयने ती शाळा सोडली पण त्यांनंतरही त्या रस्त्याने जाताना त्याला ती बाई आठवायची ! आणि त्याच्या मनात एक अनोळखी भीतीची लहर निर्माण व्हायची.. विजय देव गणाचा असल्यामुळे फार घाबरला नव्हता.

  • एक परीस स्पर्श( भाग – ३० )

    ह्या सगळ्या कथा राजा – राणीच्या काल्पनिक कथा होत्या. तसा या कथांमधून बोध फक्त एकच घेता येतो…प्रत्येक कथेतून काहीतरी शिकता येते…विजयनेही कथा लिहिण्याचा प्रयत्न केला…विजयने लिहिलेली पहिलीच कथा समाजमनावर भाष्य करणारी होती..ती कथा एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात प्रकाशित झाली होती…त्या नंतर त्याने पहिली प्रेम कथा लिहिली…तो बसमधून प्रवास करताना एका सुंदर तरुणीच्या प्रेमात पडला होता… तसही कोणी विद्रुप मुलीच्या प्रेमात पडत नाही…ह्या बसच्या प्रवासात त्याला भेटलेल्या, त्याच्या प्रेमात पडलेल्या आणि तो ज्यांच्या प्रेमात पडला होता अशा इतक्या होत्या की आता विजयला त्या आठवायच्या म्हटल्या तरी एक दिवस अपुरा पडेल…

  • गुप्तहेर गोमु – भाग १ (गोमुच्या गोष्टी – भाग १३)

    गुप्तहेर (डीटेक्टीव्ह) ही कल्पना तशी जुनीच. गुप्तहेर हे ही कांही आपल्याला नवीन नाहीत. मध्ययुगापासून ते तहत दोन्ही महायुध्दांपर्यंत गुप्तहेर होतेच. पुराणांमध्येही कचाने देवांतर्फे हेरगिरी केलीच होती. आधुनिक युगांत खाजगी गुप्तहेरांची मराठी लोकांना, विशेषतः मराठी वाचकांना, ओळख करून दिली ती कै. लेखक बाबूराव अर्नाळकर यांनी.

  • कोकण ‘कन्या’

    “ती” .. लहानपणापासून मुंबईतच वाढलेली .. घरची परिस्थिती तशी बेताची .. जेमतेम शिक्षण संपलं आणि वेळीच लग्न करून दिलं घरच्यांनी .. सासर मात्र अगदी लांब होतं .. कोकणातल्या एका छोट्याश्या गावात

  • गावाकडची गोष्ट – हिरा मावशी

    मी शाळेत शिकायला असताना अनेक गोष्टी मी पाहिल्या आहेत. खरंतर मराठी शाळेमध्ये शिकायला मला फार आनंद वाटत असे. वर्गामध्ये भिताडवर रंगीबिरंगी लावलेले सुरेख अक्षरातील तकते वेगवेगळी काढलेली सुरेख चित्रे. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सुरेख देखावा पुन्हा पुन्हा पहावा व या चित्रावर ती काहीतरी लिहावे असे माझ्या मनाला नेहमी वाटत होते. त्यातील काही म्हणी अजून आठवतात खत देऊन जाते,गोत देऊन जाते, हातच्या काकणाला आरसा कशाला, अशा अनेक म्हणी प्रत्येक वर्गाच्या भिताडावर सुरेख अक्षरांमध्ये लिहिलेल्या दिसत होत्या. वर्गातील शिक्षक मुले व मुली शिस्तीचे पालन करीत होते खाकी हाफ शर्ट पांढऱ्या रंगाचा हाफ शर्ट व डोकीला पांढरीशुभ्र टोपी. काखेत अडकवलेलं शाळेचे दप्तर घेऊन मी शेतातून चिखल तुडवित शाळेला रोज जात असे. मराठी शाळा म्हणजे एक ज्ञान मंदिर याच ज्ञान मंदिरात ज्ञानाची पूजा केली जात होती. पूर्वीचे मास्तर विद्यार्थ्याला कळेपर्यंत शिकवत होते एखाद्यावेळी प्रश्नाचे उत्तर नाही आले तर छडीने मारत होते.