(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • खारी आंबील

    ग्रामीण भागामध्ये आषाढ महिन्यामध्ये म्हसोबाच्या मांसाहारी जत्रा चालू होतात. तर दुसरीकडे तीन वर्षातून एकदा ताई आईची यात्रा सुद्धा आषाढ महिन्यात होत असते. एकीकडे मुके चार पायाचे जनावर देवाच्या पुढे कापायचे. म्हणजे भाऊ किती लोकांना त्रास होत नाही अंगाला फोड्या येत नाहीत किंवा काळे भोंगे उठत नाहीत. अशी एक अफवा पारंपारिक पद्धतीने ऐकावयास मिळते

  • खरा पराक्रम

    बाराव्या शतकात फ्रान्समध्ये फिलीप गस्ट नावाचा राजा होऊन गेला. तो स्वतः अत्यंत पराक्रमी होता मात्र इतर पराक्रमी सैनिकांना वा सरदारांनाही तो सतत प्रोत्साहन द्यायचा. मुख्य म्हणजे त्याला सत्तेची कसलीच हाव नव्हती. आपल्या पदावर आपल्यासारखाच पराक्रमी व धाडसी राजा - मग तो कोणीही का असेना - बसावा, हीच त्याची इच्छा होती. त्या काळी देशाचे साम्राज्य वाढविण्यासाठी बऱ्याच लढाया होत. अशाच एका शत्रूराष्ट्राने कान्सवर हक्क चढविला. शत्रू बलाढ्य होता. त्यामुळे लढाईला तोंड फुटण्यापूर्वी राजा फिलीपने आपला राजमुकुट व पवित्र सिंहासन एका मैदानात आणण्याची सैनिकांना आज्ञा केली. सिंहासनावर त्याने राजमुकुट ठेवला व त्याखाली 'सर्वोत्कृष्ट पराक्रम गाजविणाऱ्या वीर पुरुषास' असा मजकूर असलेला फलक लिहून ठेवला व तेथे जमलेल्या सरदार व सैनिकांसमोर भाषण करताना तो म्हणाला, '' या सिंहासनावरील माझा हक्क मी या क्षणी सोडला आहे. या युद्धातके खय पराध्य करून विजयश्री खेचून आणील त्यालाच हे सिंहासन मिळेलच कोच यापुढचा राजा असेल.'' त्याचे ते वीरश्रीयुक्त भाषण ऐकून सैनिकांना चेव चढला व अत्यंत शर्थीने ते लढले. अशा सैनिकांच्या सहकार्यानेच स्वत: राजा फिलीपनेही या युद्धात अतिशय मोठा पराक्रम केला व शत्रूराष्ट्रावर विजय मिळविला. सायंकाळी जेव्हा त्याच मैदानात सर्व एकत्र जमले, त्या वेळी सर्व सरदार व सैनिकांनी एकमुखाने त्याच्या पराक्रमाची प्रशंसा केली व राजा फिलीपचा जयजयकार करून त्यालाच ते सिंहासन पुन्हा बहाल केले.

  • पावसाचं आगमन

    पण नरिमन पॉइंटवर पांढऱ्या शुभ्र झग्यातले, डोळ्याला पांढरं मुंडासं वर काळी फीत लावलेले अरबस्तानातील लोक जमायला लागले, की समजावं आता पावसाळा आला. वाळवंटात राहणारी ही मंडळी. त्यांना पावसाचं विलक्षण आकर्षण. पावसापेक्षा पावसाच्या आगमनाचं, पहिल्या पावसाचं.

  • जमवा–जमव

    सुंदर कथा…पहिल्या रात्री पर्यंतच्या न केलेल्या प्रवासाची.

  • प्रगतीच्या मार्गावर.. एक किस्सा

    भैय्याजीच्या गल्ल्यावर भाजी घेत उभी होते. पंजाबी ड्रेस परिधान केलेली साधारणपणे पंचविशीतली एक तरुणी धक्का मारत धाडकन शेजारी येऊन उभी राहिली. तिचा मोबाईल फोन चालूच होता. एका हातात तो कानाशी धरून, मान वाकडी करत तिने पर्स उघडली. त्यातला एक कागद काढला आणि भैय्याजीकडे दिला. भैय्याजीनी पण माझी भाजी तोलता तोलता तो हातात पकडला. त्याचा मला भाजी देण्यातला उत्साह मावळला.

  • अजब न्याय नियतीचा – भाग ३

    तोपर्यंत आरूला अंदाज आला होता की हा आता आपल्याला काय विचारणार आहे. पण ती एकदम गंभीर चेहेरा करून नीलला म्हणाली, “नील तू एक चांगला मुलगा आहेस, माझा जवळचा मित्र आहेस. आपण आपल्या आयुष्यातील खूप आनंदाचे क्षण एकमेकांसोबत शेअर केले आहेत.

  • मिसेस पॅकलटाईडचा वाघ (संक्षिप्त व रूपांतरीत कथा १७)

    साकी ह्या टोपण नावाने मुनरोने बरंच लिखाण केलं. तो विनोदी लेखक म्हणून प्रसिध्द होता. ही एक अशीच विनोदी कथा. भारतात आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या बायका स्वतःला राजघराण्यांतल्याच समजत. येन केन प्रकारेण प्रसिध्दी मिळवायचा त्या प्रयत्न करीत. पोकळ बडेजाव मिरवीत. अशाच एका इंग्रज बाईने वाघ मारला, त्याचं नर्म विनोदी वर्णन कथेत आलं आहे. खरी गोष्ट माहित असलेली तिची पगारी जोडीदार मात्र त्या संधीचा योग्य वेळी स्वत:ला घर मिळवण्यासाठी करून घेते व चोरावर मोर बनते.

  • हॅप्पी न्यू Ear

    रोज प्रमाणे एकीकडे दूध कपात ओतत, तर दुसरीकडे सँडविच टिफीन मध्ये भरत रश्मीच्या तोंडाचा पट्टा अखंड सुरू होता . सेंट पीटर्स शाळेत चौथीत शिकणाऱ्या मुलाला अर्थात विहानला आणि ही सगळी हातघाई सुरू असताना सोफ्यावर शांतपणे बसूंन पेपर वाचत बसलेल्या नवऱ्याला म्हणजेच राघवला हे काही नवीन नव्हतं .. कडाक्याच्या थंडीचे दिवस होते त्यामुळें गरम गरम पाण्याचा शॉवर सोडून बाहेर यायचं विहान ला जीवावर आलं होतं.

  • एक परीस स्पर्श ( भाग – १६ )

    विजयच अभिनयाचं वेड त्याच्या घरच्यांना आवडत नव्हतं. म्हणून ! नाहीतर आज तो अभिनयाच्या क्षेत्रात नक्कीच एका उंचीवर असता. त्याने एक व्यावसायिक नाटक लिहिले होते.  त्या नाटकाचा प्रयोग प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात झाला होता, तेंव्हा विजय आणि त्याचे पाच सहा मित्र ते नाटक पाहायला गेले होते.

  • अजब न्याय नियतीचा – भाग १५

    सगळीकडे संध्याकाळची किरणे पसरली होती. घाटावरून लोकांची परतण्याची लगबग चालली होती. जवळच्या देवळांतून सायंआरतीचे आवाज येत होते. एकंदर खूप सुंदर आणि प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं. आरू या वातावरणाशी तद्रूप झाली होती. एक शांत सुंदर भाव तिच्या चेहेर्‍यावर पसरला होता. नील तिच्या या लोभस रूपाकडे एकटक पहात बसला होता. जवळच्या देवळातील घंटानादाने आरूची तंद्री भंग पावली. तिचे नीलकडे लक्ष गेले. तो तिच्याकडेच पहात होता.