(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गच्ची

    गच्चीवर जाणं प्रत्येकाच्याच आवडीचं असलं तरी त्याचं अप्रूप मात्र तळ-मजल्यापासून जसं वर-वर उंच जावं तसं कमी होत जातं .. तळातल्या लोकांचं गच्चीत कधीतरीच जाणं होतं म्हणून त्यांना जास्त ओढा असतो आणि वरच्या मजल्यावरच्यांसाठी तर गच्ची म्हणजे अगदी “उठण्या-बसण्यातली “.

  • गोमु पैज घेतो (गोमुच्या गोष्टी – भाग ११)

    विजापूरच्या बादशहाने शिवाजी राजांना धरण्याचा/मारण्याचा पैजेचा विडा दरबारांत ठेवला होता. तो अफजलखानाने उचलला. त्याचे पुढे काय झाले ते आपल्याला माहित आहेच. तेव्हां कुठलीही पैज घेणं ही गोष्ट सोपी नाही. मला वाटते पैज घेणे किंवा कठीण गोष्ट करायचे आव्हान देणे हे पुराणकालापासून चालत आलेलं असावं. महाभारतात असे बरेच प्रसंग आहेत. प्रतिज्ञा आणि पैज यांत अर्थातच फरक आहे. प्रतिज्ञा करणाऱ्याला कुणी आव्हानही देत नसत आणि नंतर बक्षिसही देत नाही. पैज घेतांना एक आव्हान देणारा असतो आणि दुसरा ते स्वीकारणारा असतो. पैज जिंकला तर जिंकणाराला काय मिळणार आणि तो हरला तर काय द्यावं लागणारं हे पैज घेतानाच ठरतं. त्यादृष्टीने महाभारतांतला द्यूत खेळण्याचा प्रसंग पैज ह्या सदरांत मोडतो.

  • उगाच काहीतरी -३०

    चहा, कॉफी आणि आम्ही
    चहा हे आम्हा पती पत्नीचा वीक पॉईंट आहे. आमचे गुण जर जुळवले असतील तर इतर ३६ गुण जुळो न जुळो चहा नावाचा सदतिसावा गुण नक्की जुळला असणार. ती शिक्षिका आणि मी इंजिनियर या मुळे बहुतेक तो नैसर्गिकरित्या आला असेल. चहाला नाही म्हणायचं नसतं हा आमचा पासवर्ड. मी कधी कधी मॅनेज करून घेतो पण हिला तुम्ही रात्री २-३ वाजता झोपेतून उठवून सहज जरी विचारलं -चहा घेणार का? ती हो म्हणेल आणि झोपून जाईल…. आणि मग पंधरा मिनिटांनी डोळे न उघडता विचारेल ” चहा झाला का?” आणि मग अलार्म जसा वाजतो तशी ती दर पंधरा मिनिटाने विचारत राहील – “चहा झाला का ?” तोपर्यंत जो पर्यंत तुम्ही तिला चहा बनवून देत नाहीत. आणि मग तो घेऊन ती पुन्हा तेवढीच गाढ झोपून जाईल. आम्हाला आपला साधा चहा आवडतो. बाहेर गेलो तरी तो स्वर्गीय आनंद देणारे अमृततुल्य वगैरे चहा जास्त चालत नाहीत. आपण पृथ्वीवर आहोत ना, मग साधा चहा सारखा चहा हवा. साधा टपरीवरचा चहा.
  • बांड मस… (बोलीभाषेतील लघु कथा)

    सोमवारी रातीच्यान जरा गडबड होती घरात. मोठ्या म्हशीला डब्बल भरडा घाल, उरल्या सुरल्या शिळ्या भाकरी मोडून घाल अशी धावपळ गंवडीमामा करत होता. शेलका चारा फक्त त्या मोठ्या म्हशीला घातला व उरलेल्या खंडोरभर 8 जनावरांसनी नुसतं पिंजरावर बसविलं.. ह्या सर्व धावपळीच्या मागच गम्य मला त्या रातीला उमगलचं नाही. त्यानंतर असच सहज फेरी मारून येवूया म्हणून दोन दिवसांनंतर शशीदाच्या घरी गेलो. जरा घरी निराशमय वातावरण होतं. काय भानगड काय समजत नव्हती.

    मग फांगसूनच जरा शशीदाच्या आईला मी विचारलं ‘काय झालं आज घर जरा शांतच दिसतयं’..

  • संधिप्रकाशातील सावल्या – ५ : या चिमण्यांनो परत फिरा रे …!

    संधिप्रकाशात उभी असणारी झाडे अचंबित होऊन खाली पहात होती. खाली पसरलेल्या सावल्यात , विविध वयोगटातील असंख्य मुलं , शांतपणानं बसली होती . कुणीच बोलत नव्हतं . एक प्रकारचा आत्मविश्वास आणि निर्धार त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता . त्यांच्या हातात घोषणा लिहिलेले बोर्ड दिसत होते . फारच वेगळ्या घोषणा होत्या .

  • बेवारशी

    प्रसिद्धीपत्रक केराच्या टोपलीत जातं. पंधरा दिवस वाट पाहिली जाते आणि ज्या व्यक्तीला त्याचे नातेवाईक, मित्रमंडळी विसरलेली असतात अशी व्यक्ती, शेवटी बेवारशी ठरते आणि त्यानंतर त्या प्रेताची बेवारशी म्हणूनच विल्हेवाट लावली जाते. काही इलाज नसतो.

  • कुस्करलेली कळी – उमललेले फुल – १०

    बिपीनची मृणाल सेनशी फोन फोनी चालू होती. भूतान मधील hydro electric generation plant chukha ( name of the towmship ) उभारण्याचे काम जोरात चालू होते. त्यांचे ऑफीस थिंपू या राजधानीत होते.

  • एक परीस स्पर्श ( भाग – १३ )

    दोन वर्षानी विजयने ती शाळा सोडली पण त्यांनंतरही त्या रस्त्याने जाताना त्याला ती बाई आठवायची ! आणि त्याच्या मनात एक अनोळखी भीतीची लहर निर्माण व्हायची.. विजय देव गणाचा असल्यामुळे फार घाबरला नव्हता.

  • मार्क ट्वेनची चरित्र कथा

    त्याचे लिखाण संशोधित करून, एकत्र ठेवण्याचा व त्याची सूची ठेवण्यासाठी एक संस्था अजूनही कार्यरत आहे. त्याने अनेकानेक वृत्तपत्रांतून अनेक वर्षे लिहिल्यामुळे तो संशोधनाचा विषय झाला आहे व नेहमी नवीन कांही तरी सापडतच असते. त्याची सामाजिक विषयांवरची मते अत्यंत प्रागतिक होती. काळ्या लोकांना जी वागणूक देण्यात यायची त्यावर तर तो टिका करतच असे पण एकंदरीतच स्त्रीयांसह सर्वांना व्यक्तीस्वातंत्र्य त्याला अभिप्रेत होते. साम्राज्यशाही, भांडवलदारांनी चालवलेली कामगारांची पिळवणूक ह्यांवर तो प्रखर टिका करत असे. अनेकवेळा चर्चच्या त्या काळांतील प्रभावामुळे व त्याच्या अशा मतांमुळे त्याच्या पुस्तकांवर सेन्सॉरकडून बंदी घालण्यांत आली. त्याला कॉपीराईटसाठीही अनेकदा झगडावे लागले. त्याला पूर्ण लोकमान्यता व राजमान्यता नंतरच मिळाली परंतु त्याने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकूण साहित्यावरच कायम आपला ठसा राहिलं असे विपुल लेखन केले यांत शंका नाही. त्यामुळे साहित्यात मार्क ट्वेनचे नांव अजरामर झाले आहे.

  • भयभीत झालेले ऑफिस

    1978 पासून रेल्वे मध्ये काम करीत असताना अनेक गमतीजमती झाल्या होत्या. खरंतर जवळून पाहिलेली रेल्वे या विषयावर काही कथा लिहिल्या आहेत. काही जण म्हणतातवाचलयशिवायलिहीतायेतनाही. हे अगदी खरे आहे परंतु रेल्वे मध्ये काम करीत असताना समोर घडलेली गोष्ट.