(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

  • पांढऱ्या अस्वलाची गोष्ट

    एक होता तरुण मुलगा. त्याचं नाव ओथुन. तो आइसलँड या बर्फानं भरलेल्या देशात राहत होता. त्याला आई होती. उन्हाळा आला की बर्फ वितळे आणि जहाजं इकडून तिकडं, तिकडून इकडं येऊ-जाऊ लागत. ही जहाजं जाताना येतांना बघून ओथुनला मोठं कुतूहल वाटे की, कुठं बरं ही जहाजं जात असतील, कुठून येत असतील ? आपणदेखील या जहाजातून जाऊन दूर दूर काय आहे, बघून यावं ! एकदा नॉर्वे देशाकडचं एक जहाज आईसलँडला पोचता-पोचता लवकर हिवाळा सुरू झाल्यामुळं बर्फात अडकलं.

  • निष्काम कर्माचे महत्त्व

    प्रत्यक्ष कर्म केल्याने जो आनंद मिळतो तो कदाचित त्याचे फळ मिळाल्यानंतर मिळतोच असे नाही. म्हणूनच निष्काम कर्माला जास्त महत्त्व आहे.

    एक राजा होता. त्याने राज्यातील शेतकऱ्यांना सांगितले, तुम्ही शेतात फुकटचे का राबता,, वर्षाला जेवढे धान्य लागेल ते देण्याची जबाबदारी माझी. या निर्णयाने जवळजवळ सर्वच शेतकरी सुखावले ते म्हणाले की, बरे झाले. नाही तरी आपण शेतीत मरमर मरतो त्या मानाने आपल्याला धान्य मिळेलच याची खात्री नसते. आता राजाच आपणास वर्षअखेर आयते धान्य देणार आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकर्यांनी हा प्रस्ताव मान्य केला.

    मात्र त्यामध्ये एक हाडाचा शेतकरी होता. त्याला हा राजाचा विचित्र सौदा आवडला नाही. त्याने या प्रस्तावाला विरोध केला. तो म्हणाला, ''मला तुमचे धान्य नको. माझ्या शेतात जे काही उगवेल तेवढेच मी माझे मानून घेईन. राजाला अर्थातच त्याचा राग आला नाही. फक्त त्याने आपल्या काही सेवकांना त्याच्यावर पाळत ठेवायला सांगितले. फुकटचे धान्य मिळणार म्हणून बरेचसे शेतकरी आनंदित झाले होते. त्यामुळे त्यांनी शेतावर जाणे तर सोडलेच पण इतरही कामधंदे सोडले.

    हा शेतकरी मात्र रोज भल्या पहाटेच शेतावर जायचा. पाखरांची मंजुळ गाणी ऐकायचा. गाई-गुरांना ओंजारायचा. शेतीची सर्व कामे त्या त्या वेळी करायचा. त्यामुळे त्याचा सारा दिवस आनंदात जायचा. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेवढ्याच उत्साहाने व आनंदाने तो कामे करायचा.

    दुर्देवाने त्या वर्षी पाऊस फार पडला नाही. त्यामुळे त्याच्या शेतात कमीच धान्य आले. राजाला ही गोष्ट कळली. त्याने त्याला बोलावून घेतले व म्हणाला, 'बघ तू माझे म्हणणे मान्य केले असतेस तर तुला निश्चितच जास्त धान्य मिळाले असते.

    त्यावर तो शेतकरी राजाला म्हणाला, ''मला जरूर थोडेसे जास्त धान्य मिळाले असते, मात्र शेती करताना जो आनंद मला मिळायचा तो इतर कोणालाही मिळाला नाही. उलट बरेचसे शेतकरी राजा आपल्या शब्दाला जागून आपणास धान्य देईल काय? याच विवंचनेत होते''.

    त्या शेतकयाने जणू राजाला निष्काम कर्माचे महत्त्व पटवून दिले होते. त्यामुळे राजाने त्याचा सत्कार करून त्याला परत पाठविले.

  • चार “हिश्श्या”तील सुख

    बंकटमल नावाचे एक व्यापारी होते. चांगला व्यापार करून त्यांनी भरपूर धन मिळविले होते. इतके, की ही संपत्ती ठेवायची तरी कोठे या चिंतेने त्यांना ग्रासलेले होते. त्यामुळे एवढा प्रचंड पैसा असूनही त्यांना सुख म्हणजे काय? हेच माहीत नव्हते.

    एकदा ते असेच संपत्तीची काळजी करत करत गावाबाहेर फिरायला गेले. सायंकाळ सरत आली होती. पाखरे आपल्या घरट्यात परतत होती. निसर्गामुळे वातावरण सुंदर बनले होते. रस्ताच्या एका कडेला असलेल्या शेतात एक शेतकरी अत्यंत आनंदाने व उत्साहाने गाणे गात आपले काम करत होता.

    बंकटमल त्याच्या जवळून जाताना त्याने त्यांना पाहिले व गाणे थांबवून स्मितहास्य केले. ते पाहून बंकटमलही तेथे थांबले. त्यांना त्या शेतकऱ्याच्या आनंदाचे रहस्य जाणून घ्यायचे होते. ते त्या शेतकऱ्याला म्हणाले, ' आज तुम्ही भलत्याच खुशीत दिसता. काय कोठे जमिनीत पैशाचा हंडा सापडला की काय?'

    त्यावर शेतकरी म्हणाला, ' ' छे छे, मी एक साधा शेतकरी आहे. दिवसभर शेतात राबतो. जी काही कमाई होते तिचे मी चार हिस्से करतो व माझी ती जबाबदारी आहे, असे समजून कर्तव्यपूर्तीच्या आनंदात समाधान मानतो.

    त्यावर बंकटमल म्हणाले, की चार हिस्से म्हणजे? त्यावर शेतकरी म्हणाला, ''माझ्या आई-वडिलांनी मला वाढविले. मात्र आता ते थकले आहेत; त्यामुळे कमाईचा एक हिस्सा त्यांना देतो. दुसरा हिस्सा माझ्या लहान मुलाबाळांना देतो कारण त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी माझी आहे तर समाजाचे ऋण म्हणून तिसरा हिस्सा दानधर्मात खर्च करतो व चौथ्या हिश्श्यात मी माझे घर चालवितो. ''
    बंकटमलला पैसा कसा खर्च करायचा व आनंद कसा मिळवायचा याचा वस्तुपाठच मिळाला होता. त्याप्रमाणे त्याने 'सुखी' होण्याचा निर्णय घेतला.

  • मंगळ – एक लघुकथा

    नाना हे गावातील प्रसिद्ध व्यक्तीमत्व. नानांच्या नावातच दोनदा ‘ना’ असल्यामुळे त्यानी कधी कोणाला नंतर ना म्हटलेच नाही. नानांच वय साधारण 60 वर्षे पण नाना आजही 10 वर्ष वयाच्या बालकांपासुन तर मरणासक्त झालेल्या म्हाताऱ्यां पर्यंत उत्तम पध्दतीने जुळवून घेतात ते नानांच मोठ कौशल्यच म्हणाव लागेल.

  • छटा एकेरीच्या

    परवाच एके ठिकाणी बायको आपल्या नवऱ्याला “या Stupid ला काही कळत नाही” असं म्हणताना ऐकलं . आता त्या “स्वारी” पासून या “स्टुपिड” पर्यंतचा हा प्रवास काही एका दिवसात झालेला नाही . या मध्ये बरेच टप्पे आले .

  • वेगळा (कथा) भाग २

    अंगाच मुटकुळ करून बारा-तेरा वर्षाचा मुलगा एका पडलेल्या घराच्या ओसरीतअगदी डोक्या पर्यंत पांघरून घेऊन झोपला होता , सकाळचे पाच – साडेपाच वाजले होते , वस्तीला बऱ्याच प्रमाणात जाग आली होती,

  • विदारक सत्य

    काही केल्या रात्री डोळ्याला डोळा लागत नव्हता. डोक्याला थोडेसे तेल लावून झाले. एक जपाची माळ ही करुन झाली पण डोळा काही मिटत नव्हता. कधी ह्या कुशीवर तर कधी त्या कुशीवर करत करत रात्र कुठे संपली हेच समजले नाही. सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे रोजंदा व्यवहार सुरु झाले.

  • आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग १२

    दोन्ही गाड्या थांबलेल्या पाहून निशा आणि रोहन बाकावरून उठून तिकडे जावू लागले.  ऍम्ब्युलन्स मधून दोन माणसं उतरली. त्यांनी ऍम्ब्युलन्सचे मागचे दार उघडून त्यातून एक स्ट्रेचर बाहेर ओढून काढला आणि ते रस्त्याच्या कडेला झाडीत शोधू लागले. तोपर्यंत एक डॉक्टरही  खाली  उतरले.  त्या दोन लोकांच्या मागोमाग तेहि झाडीत खाली उतरू लागले.

  • प्रेम काय काय करायला लावते

    प्रेमकथा

  • संगीत आणि समाधान

    संगीताचा सखोल अभ्यास असलेले एक गुरु होते. संगीत हेच जीवन मानून त्यांनी संगीताची आराधना केली होती. त्यामुळे त्यांच्याकडे दूरवरून संगीत शिकायला तरुण येत असत. त्यांच्याकडून फारशी अपेक्षा न ठेवता गुरूही त्यांना संगीत शिकवित असत.

    एकदा एक तरुण त्यांच्याकडे सतार शिकण्यासाठी आला. त्या तरुणाला संगीताचे उपजतच ज्ञान होते. त्यामुळे तो लवकरच सतारवादन शिकला. परंतु तो तरुण वृत्तीने फारच चंचल होता. त्याचे स्वतःचे कोणत्याच गोष्टीवर नियंत्रण नव्हते. त्यामुळे तो अनेकदा दुःखी व असमाधानी असायचा. त्याच्या गुरूच्या लक्षात ही गोष्ट केव्हाच आली होती.

    जीवनात सुख आणि समाधान कसे असते व ते मानायचे असते हे त्याला संगीताच्या आधारेच पटवून सांगायचे असा गुरूंनी निश्चय केला. एकदा हा तरुण असाच एकटा विमनस्क अवस्थेत बसला असताना गुरू त्याच्याजवळ गेले. त्यांनी त्याची चौकशी केली तेव्हा तो दुःखी व असमाधानी असल्याचे त्यांना कळले. याचे कारण मात्र त्या तरुणालाच माहीत नव्हते. तेथे बाजूलाच एक सतार होती. गुरूंनी तिच्या सर्व तारा सैल केल्या व त्या तरुणाला सतार वाजविण्यास सांगितले.

    त्यावर तो तरुण म्हणाला, या तारा इतक्या सैल आहेत की, कोणालाही सतार वाजविणे अशक्य आहे. त्यावर गुरूंनी पुन्हा सतार हातात घेतली व तिच्या तारा एकदम ताणून बसविल्या व त्याला पुन्हा सतार वाजविण्यास सांगितले. तो तरुण लगेच म्हणाला तुम्ही सतारीच्या तारा एवढ्या ताणल्या आहेत की, ती वाजवायचा प्रयत्न केला तर ताराच तुटू शकतील. त्यावर गुरू त्याला म्हणाले की, तुझ्या दुःखाचे कारण तूच सांगितले आहेस. जीवनात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास दुःख निर्माण होऊ शकते, जसे सतार अगदी सैल व फार ताणली तर तिच्यातून चांगले सूर येत नाहीत. तसेच जीवनात प्रत्येक गोष्टीत समतोल साधला तरच सुखासमाधानाचे संगीत निर्माण होऊ शकतं. त्या तरुणाला गुरूंचा हा उपदेश पटला व त्याने त्याप्रमाणे वागण्याचा निश्चय केला.