(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

  • लेखणी (कथा)

    आता तो मुलगा – अर्थात मी – विजय जाधव एक नवोदित लेखक म्हणून उदयाला आलोय. समाजात एक घमेंडी, अकडू, आणि पाषाण  हृदयी तरूण म्हणून वावरतोय. आज लोक माझ्याकडे काम घेऊन यायला धजावतात कारण ती करायला माझ्याकडे वेळ नाही आणि ती करणं माझ्या प्रतिष्ठेला  शोभतही नाही.

  • आग्यामव्हळाचा भडका अन वानरायचा तडाखा !

    सोंडू पाटलाच्या शेतातं भैमूंग सोंगायची लगबग चालू व्हती.नव्हाळीच्या चार शेंगा लेकरायच्या तोंडी लागतील मणून सगळं गांव पाटलाच्या शेतात उलथलं व्हत.त्याल कारणबी तसच होतं.सोंडू पाटील गावातला दिलदार माणूस समजला जायचा,पण परतेक्षात मात्र त्यो लयचं बेरकी आन धुर्त व्हता.!

  • घुस…

    कदाचित माझा प्रवास हिंसेकडून अहिंसेकडून सुरु झालेला आहे कदाचित तो तेंव्हाच सुरु झाला होता जेंव्हा वीस वर्षापुर्वी मी मांसाहार सोडून शाकाहारी झालो होतो…

  • सत्य आणि निर्भयता

    फार वर्षापूर्वी इराकमध्ये घडलेली ही घटना आहे. बगदादजवळील एका छोट्या गावी एकमहिला व तिचा लहान मुलगा राहत होते. ती महिला मोलमजुरी करून आपल्या मुलाचे संगोपन करीत होती. आपल्या मुलाने शिकून मोठे व्हावे हीच तिची प्रामाणिक इच्छा होती. परंतु त्या छोट्या गावात तो मुलगा किती शिकणार? म्हणून तिने त्याला बगदादला शिक्षणासाठी पाठविण्याचे ठरविले.खरे तर त्या मुलाला आईला एकटे सोडून जाण्याची इच्छा नव्हती. मात्र आईच्या इच्छेला मान देऊन तो बगदादला एका सौदागराच्या काफिल्याबरोबर निघाला. जाताना त्याच्या आईने त्याला अडीअडचणीला लागेल म्हणून एक दिनार दिला होता. तसेच कोणतेही संकट आले तरी घाबरू नकोस व खोटे बोल नकोस, असा उपदेशही केला होता. त्या सौदागराचा काफिला जात असताना वाटेत लुटारूंनी त्या काफिल्यावर हल्ला केला. जवळचे असेल ते सर्व द्या नाहीतर प्राणाला मुकाल असे त्या लुटारूंच्या टोळी प्रमुखाने सर्वांना सांगितले व सर्वांची लूट घेत तो लुटारुंचा सरदार त्या मुलाजवळ आला. त्याने त्या मुलाला तुझ्याजवळ काय आहे असे विचारले. त्यावर त्या मुलाने आपल्या फाटक्या सदराच्या खिशातून एक दिनार काढला व त्याला दिला. तो सरदार त्याकडे तुच्छतेने पाहत म्हणाला, ' एकच दिनार?' तो मुलगा त्याला म्हणाला, ' माझ्याजवळ एवढा एकच दिनार होता. आणि तो मी तुला दिला आहे. ' त्या मुलाच्या निर्भयतेचे त्या सरदाराला कौतुक वाटले. त्याने त्याला विचारले, की तू कोठे जात आहेस? मुलगा म्हणाला, बगदादला मी शिक्षणासाठी जात आहे. त्यावर सरदार त्याला म्हणाला, ' तू आमच्याबरोबर चल. मी तुझे सारे शिक्षण करीन. ' त्या मुलाने लगेच, 'मला तुमचे - शिक्षण नको कारण मला चोर-लुटारू व्हायचे नाही, ' असे निर्भयतेने सांगितले. त्या मुलाची ती सत्य व निर्भय वाणी पाहून तो लुटारूचा सरदार ओशाळला व त्याचक्षणी त्याने लुटलेली सर्व संपत्ती ज्याची त्याला परत करून तो तेधून निघून गेला. हाच मुलगा म्हणजे मौलाना कादिर खिलानी जो पुढे इराकचा धर्मगुरु बनला.

  • अंधार आणि उजेड

    रोज दिवाळी साजरी करणा-यांना दिवाळीत नवीन काय, असा प्रश्न पडतो. ती कशी साजरी करावी, याची त्यांना चिंता पडते. तर दिवाळीतही अंधारात राहणा-यांची संख्या कमी नाही. त्यांच्या उजेडाची काळजी  कुणी करावी?

  • दानशूर बळीराजा

    बळीराजा आपल्या नगरीत सुखाचे राज्य करीत होता. धर्माचे, समृद्धीचे, दानाचे अधिष्ठान असा ह्या नगरीचा लौकिक होता. सर्व प्रजा आनंदाने नांदत होती. आपल्या राज्यात सर्वत्र आबादी आबाद असावे म्हणून नेहमीच राजा देशोदेशीच्या विद्वान दशग्रंथी ब्राह्मणांना व ऋषिजनांना बोलावून यथासांग यज्ञयाग करीत असे. अगणित दानधर्म करीत असे. विद्वानांचा आणि प्रजेचा दुवा घेत असे.

  • बिरबलाची माकडीण

    तसं पाहता शोभाच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात सुखाचे, आनंदाचे म्हणता येण्यासारखे प्रसंग मोजकेच होते… वयाच्या दहाव्या वर्षी वडिलांचं छत्र हरवलं… त्यानंतर -ती आणि तिची आई- एवढंच तिचं विश्व ! घरची परिस्थिती बेताचीच. शोभाचे वडील एका खाजगी कंपनीत सिक्युरिटी गार्डची नोकरी करत होते. त्यामुळे त्यांच्या पश्चात पेन्शन वगैरेचा प्रश्नच नव्हता. त्यांच्या मृत्युनंतर कंपनीतर्फे मिळालेली खोलीदेखील सोडावी लागली होती. त्यामुळे दोघी मायलेकी अक्षरशः रस्त्यावर आल्या होत्या. पण शोभाच्या मामाला त्यांच्यावर दया आली आणि त्याने त्याच्या घरालगत असलेल्या एका छोट्या खोलीत दोघींची राहायची सोय करून दिली. ‘मी यापेक्षा जास्त काहीही करू शकणार नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत त्याने दोघींची बोळवण केली होती.

  • युगांतर – भाग २

    सुमंत जयंत परचुरे. 

    रवींद्र त्या सुर्यनारायणाला नमस्कार करून परत फिरला आणि काही मिनिटातच तो सूर्य अस्ताला गेला आणि सगळीकडे अंधाराचं साम्राज्य पसरलं. घरात आता ताई, ताईचा नवरा आणि २ काका आणि एक मावसभाऊ एवढे जण होते. घरात आईचा फोटो ठेवला होता आणि त्या समोर दिवा तेवत होता. दुपारी असलेली गर्दी जाउन त्या ठिकाणी आता फक्त उपस्थित लोकांचे श्वास आणि झोपळ्याचा आवाज इतकंच राहिलं होतं. कोणी काहीच बोलत नव्हतं की कोणा कडे पहात नव्हतं. बहीण बराच वेळ शांत होती पण शेवटी घरात नुसतं बसून चालणार नव्हतं त्यामुळे तिने उठून रवींद्रला दूध आणायला सांगितले आणि चहा बनवायला घेतला. रात्री साठी पिठलं भात दोन घरे सोडून असलेल्या वर्तक काकू देणार होत्या.

  • गहाण मिशी

    खंडु पाटील मंजे गावातली नामी आसामी व्हती.आजुबाजुच्या दहा पंधरा खेड्यायतं गड्याचा रूतबा व्हता.गावातुन गडी निस्ता चालला तरी गावातल्या बायाबापड्या तटतट उठुन घरात पळायच्या.आलुतेदार बलुतेदार त्याच्या दाराम्होरून जातांनी पायतान हातात घेउन पुढ जातं.आसा गड्याचा रूबाब व्हता.लहानपणापसुन आखाड्यात कुस्त्या खेळुन पाटलानं शरीर कमावलं व्हतं.भल्याभल्या पैलवानांना त्यानं आखड्यातं पाणी पाजलं व्हतं.पंचक्रोशीत लय दिलदार माणुस मनुन प्रसिद्ध व्हता.त्याच्या दारालं आलेला दिन दुबळा कव्हाच रिता गेला नाही.पाटील जसा आडदांड व्हता तसाचं मानी, शब्दाचा पक्का,अभिमानी आन ईज्जतीलं जपणारा व्हता.

  • वेगळा (कथा) भाग ३

    दुसर्या दिवशी शाळा सुटल्यावर ठरल्याप्रमाणे बाबू अशोकला भेटला ,घरी जाताना अशोक ने बाबुला विचारल , “आज संध्याकाळी तू भेटशील मला ?”