नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
टॅक्सीत बसल्यावर त्यांचा संवाद कोणत्या तऱ्हेचा असे हे चौकशीअंती कळल्यावर एक अनुमान काढता आले की आरोपी एकमेकांना पूर्वीपासून ओळखणारे होते. लुटीनंतर टॅक्सी जिथे सोडून दिली जात होती तिथपासून घरापर्यंतचे अंतर चालत जाण्याइतपत किंवा तेथून दुसरी टॅक्सी केली तरी कमीत कमी मीटर रिडिंग होईल इतक्या अंतरावर आरोपींची निवास स्थाने असावीत असाही आमचा होरा होता.
“बाळ श्रावणा", आईने हाक मारली. “कोठे आहेस तू?"
“हा काय तुझ्या जवळच आहे", श्रावण म्हणाला.
“असा जवळ ये बरं", आई म्हणाली.
“हा आलो, काय पाहिजे आई तुला?" श्रावणाने विचारले.
आई म्हणाली, “हे बघ, मी आणि तुझे वडील आता अगदी पिकली पाने झालो आहोत. केव्हा गळून पडू, ते कळायचेही नाही. तेव्हा, त्यापूर्वी....' “त्यापूर्वी काय? आई मी तुझी कोणतीही इच्छा अपुरी ठेवणार नाही.' श्रावण म्हणाला.
आई म्हणाली, “ते आम्हाला ठाउक का नाही? आम्ही उभयता म्हातारी माणसं, त्यात आंधळी. आमचं सर्व काही तू प्रेमाने करतोस. आम्हाला क्षणभरही विसरत नाहीस. सर्व प्रकारची सेवा करतोस. तुझ्यासारखा मातृभक्त आणि पितृभक्त मुलगा आम्हांस मिळाला आहे, ही देवाची कृपा. पण ..
“पण काय आई?, मी तुमचा मुलगा आहे. मुलाने मातापितरांची सेवा केलीच पाहिजे. ते त्याचे कर्तव्यच आहे. पण आई, तुला काय हवे ते संकोच न करता सांग. बघ मी तुझी इच्छा पूर्ण करतो की नाही." - श्रावण म्हणाला.
“तू करशील रे, म्हणूनच संकोच वाटतो. तुला किती त्रास द्यायचा!” “बाबा, तुम्ही तरी सांगा हो. माझं काही चुकलं आहे का? सेवेत काही कमी तर पडलो नाही?” “नाही रे बाळा, तुझ्या आईच्या मनांत काशी यात्रेला जावयाचे आहे. तुला कष्ट द्यायला तिचं मन तयार होत नाही.” श्रावणाचे बाबा म्हणाले.
“त्यात कसले कष्ट? बाबा, आई, आपण उद्याच निघायचे.
“अरे, पण आम्हांला चालणे कसे होणार? बैलगाडीचे हादरे आम्हांस सहन होणार नाहीत.' “त्याची व्यवस्था मी करतो. तुम्ही काही काळजी करू नका.” श्रावण म्हणाला. दुसऱ्या दिवशी आपल्या वृद्ध व अंध मातापितरांना घेऊन श्रावणाने काशीचा मार्ग धरला. त्याने एक कावड केली. तिच्यामध्ये त्याने त्यांना बसवले.
ती खांद्यावर घेऊन तो मार्ग आक्रमू लागला. बरेच दिवसानंतर तो एका घनदाट अरण्यात आला. माता पितरे थकल्यामुळे त्याने अरण्यातच मुक्काम करावयाचे ठरविले. त्यांना तहान लागली म्हणून तो लोटा घेऊन पाणी आणण्यासाठी नदीवर गेला.
याच वेळी आयोध्येचा राजा दशरथ त्याच अरण्यात आलेला होता. नदीवर पाणी पिण्यासाठी हिंस्त्र प्राणी आले की त्यांची शिकार करावयाची म्हणून नदीच्या तीरावरील एका झाडावर धनुष्यास बाण लावून बसला होता.
श्रावण नदीवर आला. त्याने लोटा धुतला आणि तो पाण्यात बुडविला.
लोट्यात पाणी भरताना त्याचा आवाज झाला. दशरथ राजाने तो आवाज ऐकला. त्याला वाटले, हत्तीच पाणी पिऊ लागला आहे. आवाजाच्या दिशेने त्याने बाण सोडला आणि "आई ग!" अशी आर्त किंकाळी त्याच्या कानावर पडली. घात झाला असे वाटून तो घाईघाईने नदीवर आला. श्रावणाच्या बरगडीत बाण घुसल्याचे त्याला दिसले. रक्त भळाभळा वहात होते. धावत जाऊन त्याने श्रावणाचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले.
“कोण तू? अशा रात्री या अरण्यात काय करीत होतास?” - दशरथाने विचारले.
“मी श्रावण. माझ्या वृद्ध आणि अंध मातापितरांसाठी पाणी न्यायला आलो होतो. पण आपण कोण?” श्रावणाने क्षीण आवाजात विचारले.
“मी आयोध्येचा राजा दशरथ. शब्दवेधाची विद्या मला येत नसती, तर किती बरं झालं असतं! हा प्रसंग टळला असता.”- राजा म्हणाला.
“झालं ते झालं. होणारं कधीच टळत नाही. आता असं करा महाराज, हा कुशीत घुसलेला बाण काढा. फार वेदना होताहेत हो. अन् मग हे पाणी घेऊन माझ्या आईवडिलांना द्या. मात्र काही बोलू नका. तुम्ही श्रावण नाही, हे त्यांना कळणार नाही.” राजाने सांगितले की, बाण बाहेर काढल्याबरोबर तू मरण पावशील. तुला मी आयोध्येस नेतो व राजवैद्याकडून उत्तम औषधे देऊन बरा करतो. पण श्रावणाने ते ऐकले नाही. या वेदनेपेक्षा मृत्यू बरा, असे तो म्हणाला. नाइलाजाने राजाने बाण बाहेर काढला. विव्हळत विव्हळत मातृपितृभक्त श्रावणाने "आई! बाबा!” करीत प्राण सोडला.
दशरथ पाणी घेऊन श्रावणाच्या मातापितरांकडे आला. त्याची चाहूल लागताच आई म्हणाली, "बाळा, किती रे वेळ झाला तुला! किती कष्टतोस तू आमच्यासाठी! बाळा पाणी मिळेना का? फार दूर जावे लागले का रे?” दशरथाने तोंडातून चकार शब्द न काढता लोटा आईच्या हाती दिला. पण ती माऊली पाणी न पिताच म्हणाली, “बाळ, बोल ना रे. रागावलास आमच्यावर? तुला फार त्रास देत आहोत आम्ही. पण काय करू? रागावलास म्हणून बोलत नाहीस, होय ना? तू बोलल्याशिवाय आम्ही पाणी पिणार नाहीत."
तहानलेल्या त्या वृद्धांनी पाणी प्यावे म्हणून दशरथास बोलावे लागले.
त्याचा आवाज ऐकताच दोघेही एकदम म्हणाले, "कोण तू? आमचा बाळ कोठे आहे? सांग काय केलंस तू त्याला?” दशरथाला सर्व हकिगत सांगावीच लागली.
ती ऐकताच त्या दोघांनी एकच आकांत मांडला. “बाळ, आम्हाला सोडून कसा रे गेलास? आम्हा आंधळ्यांची काठी गेली! बाळ किती कष्ट पडले रे तुला आमच्याकरता! आणि आमच्यासाठी प्राणही दिलास रे! तुझ्याशिवाय आम्ही जिवंत तरी कसे राहू? बाळ श्रावणा, श्रावणा...' दशरथाने त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे ती दोघे त्याच्यावरच उसळली आणि संतापाने म्हणाली, “आमचा एकुलता एक मुलगा तू मारलास. आम्ही तर आता जगत नाहीच; पण लक्षात ठेव, आमच्यासारखाच तू पुत्रशोकाने मरशील. आमचा शाप आहे तुला.” आणि थोड्याच वेळात त्यांनी पुत्रशोकाने प्राण सोडला. धन्य मातृपितृभक्त श्रावण आणि धन्य ती मातापितरे!
[ 'बालसुधा', पुस्तक ३ रे, कर्नाटक सरकार, १९७७, पृ. १२०-१२४]
ती गाडीतून खाली उतरली पाठोपाठ दोन मुले आणि एक म्हातारी बाई पण उतरली,ती तिची सासू असणार असा मी अंदाज केला होता , ती सासूच होती. ते सर्वजण जवळ आले तेव्हा ती सून हसली माझ्याकडे बघून, मी पण हसले. पण तिच्या सासूला जेव्हा बघितले तेव्हा लक्षात आले ह्या बाईना कुठेतरी आधी, पूर्वी पाहिले आहे, ती सासूपण हसली ,
ती पण माझ्याकडे बघत होती.

काम करायच असेल तर या आठवड्यात सुरु कर, नाही तर दुसरा माणूस बघतो! ‘नक्की करतो म्हणाला’ आणि आगाऊ रक्कम घेऊन पसार झाला. दहा दिवस पत्ता नाही. त्यानंतर आला. कुठे गळत होतं तिथे बाहेरच्या बाजूने प्लॅस्टर काढून गेला. जखमेवरची पट्टी काढून डॉक्टरने जेवायला निघून जावं तसा.
अकबर बादशाहच्या पदरी असलेल्या बिरबलाच्या चतुरपणांच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत. त्यातीलच ही एक कथा.
अकबराच्या दरबारात एकदा एका गवयाचे गाणे झाले. ते गाणे अकबराला इतके आवडले, की त्याने त्या गाण्याला एक हत्तीच भेट दिला. ती भेट पाहून गवई आनंदी व्हायच्या ऐवजी दुःखीच झाला. कारण आधीच त्याच्या कुटुंबाचा चरितार्थ नीट चालत नव्हता. त्यात पुन्हा एवढ्या मोठ्या हत्तीला पोसणे त्याच्या दृष्टीने फारच अवघड होते. परंतु खुद्द बादशाहने हत्ती भेट दिल्यामुळे तो हत्ती नाकारू शकत नव्हता. शेवटी त्याने आपली अडचण बिरबलाला सांगितली. .बिरबलाने लगेच त्या गवयाला एक युक्ती सांगितली. त्याप्रमाणे गवयाने दुसऱ्याच दिवशी हत्तीच्या गळ्यात एक ढोलके व तंबोरा बांधला व त्याला राजधानीच्या मुख्य रस्त्यावर सोडले.
हत्ती जाताना इकडे तिकडे सोंड हलवी व ती ढोलक्यावर पडत असल्यामुळे ढोलके वाजत असे व तंबोराही अधूनमधून सूर देत असे. हत्तीचा हा अवतार पाहून बघ्यांची एकच गर्दी जमली. त्या गर्दीमुळे हत्ती बिथरला व मोकाट सुटला. शेवटी याची तक्रार बादशाहपर्यंत आली. बादशाहला खरा प्रकार
कळल्यानंतर त्याने गवयाला पकडून आणण्याचे आदेश दिला.
गवई आल्यावर अकबर बादशाह त्याला म्हणाला, 'मी तुला इनाम दिलेला हत्ती तू असा मोकळा का सोडलास!'त्यावर गवई हात जोडून बादशाहला म्हणाला, 'खाविंद माफ करा, मला या हत्तीचे पालनपोषण करणे अशक्य आहे. म्हणून मीच त्या हत्तीला सांगितले, की मी जसे गायन करून माझे पोट भरतो तसेच तूही गायन-वादन करून तुझे पोट भर. म्हणून मी त्याच्या गळ्यात ढोलके व तंबोरा अडकवून रस्त्यावर सोडला.
त्याचे उत्तर ऐकून बादशाहला त्याच्या या युक्तीमागे कोण आहे हे लगेच कळले. त्यामुळे त्याने त्या गवयाकडून तो हत्ती परत घेऊन त्याला सुवर्णमुद्राने भरलेली थैली दिली.
गवई मनापासून बिरबलाचे आभार मानत घरी परतला.
तिचं “घड्याळ” सुद्धा “त्यांच्याच वेळेप्रमाणे” चालायचं …. दिवसामागून दिवस जात होते ….सुरवातीला सोसायटीत , शेजारी पाजारी, देवाधर्माचं करण्यात किंवा TV बघण्यात थोडा वेळ जायचा पण जसं वय वाढू लागलं तसा त्या सगळ्याचाही उबग येऊ लागला , “एकटेपणा” जाणवू लागला …. आपली हक्काची आणि जवळची माणसं दूर असल्याची खंत वाटू लागली
ग्रामीण भागामध्ये दिवाळी हा सण अतिशय महत्त्वाचा असा आहे. वर्षातील बारा महिन्यांपैकी हा महत्वपूर्ण दिवाळी सण या सणाला गोड गोड खाण्याची मज्जा व खारट चिवडा. प्रत्येकाच्या जिभेला चव देणारा हा चिवडा कायम आठवणीत राहणारा असा आहे. शहरातील दिवाळीपेक्षा ग्रामीण भागातील दिवाळी अतिशय मजेशीर अशी असते. ग्रामीण भागातील नवीन लग्न झालेल्या मुली नागपंचमी गवर गणपती व दिवाळी या सणावर खास करून माहेरी येत असतात. नवीन लग्न झालेल्या मुली यांचा विषय अतिशय रंगेल असा असतो. कार्तिक महिन्यातील दिवाळी दिवाळ काढून गेली तरी आठवण मात्र कायम प्रत्येकाच्या स्मरणात राहते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
सुरेशने आईचं मन वळवलं होतं. लक्कीला भेटायला तो उत्सुक झाला होता. आईने संमती दिल्यावर त्याने लक्कीला फोन केला, वेळ ठरवली आणि आईला घेऊन तो निघाला. जुहूला त्याला पत्ता फार वेळ शोधावा तागला लाहीं. ‘रंगनाथ पै’ अशी दारावरची पाटी पाहून त्यांने घंटीचं बटन दाबलं. एक वयस्कर गृहस्थ दारापाशी आले. ” Yes? Whom do you want?” त्यानी विचारलं. “Is Ms. Lilly Sequeira staying here?” सुरेशने विचारलं. त्यावर त्या गहस्थाने आंत हांक मारली.”ऐ लक्की, हंग यो गो, कॉण आयलो पळे”
उत्तर प्रदेशातला एका नदीच्या खोऱ्यातला एक कुविख्यात दरोडेखोर. त्याचं सगळं आयुष्य दरोडेखोरीतच गेलं. त्याचा मुलगा पंधरा वर्षांचा झाल्यावर तो त्याला दरोडेखोरीचे प्रशिक्षण देऊ लागला. तसेच त्या व्यवसायाचे काही गुपित त्याने आपल्या मुलाला शिकवायला सुरुवात केली. शिकवताना तो आपल्या मुलास सांगत असे, “अरे, तुझ्या चोरीची सुरुवात चांगली व्हायला हवी. कुठेतरी जाऊन दरोडा घालशील आणि नवीन असल्यामुळे पोलिसांच्या हाती सापडून खडी फोडायला जाशील. असं होऊ नये म्हणून मी सांगतो त्याच ठिकाणी तू आयुष्यातली पहिली चोरी कर." असे म्हणून त्य दरोडेखोराने आपल्या मुलास एका जंगलात नेते व समोरच असलेली एका साधूची झोपडी त्याला दाखविली आणि म्हणाला, "हे तुझ्या पहल्या चोरीचं ठिकाण.” ती झोपडी पाहू मुलाने आश्चर्याने विचारले, "या झोपडीत गरी करून काय मिळणार?" त्यावर दरोडेखोर म्हणाला, "अरे, त्या झोपडीत चोरी केलीस तर तिथे पोलीस येत नाहीत. आणि दुसरं म्हणजे त्या साधूला लोकं सोनं, चांदी, फळं, पैसे इ. भरपूर भेटवस्तू देतात आणि तो साधू त्या वस्तू लोकांना वाटत असतो. जर तो सगळं लोकांना वाटणारच आहे तर त्या आपण का चोरून आणू नये? गेली पस्तीस वर्षे मी तिथे चोरी करतो आहे तरीही त्या साधूने कधीही पोलिसात तक्रार केली नाही.” हे ऐकून मुलाला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, "म्हणजे तुम्ही पस्तीस वर्षे चोरी करूनही त्या साधूला काहीही कमी पडलेले नाही. आणि तुम्हाला मात्र इतकी वर्षे झाली तरी अजूनही चोरी करावी लागते. याचा अर्थ असाच होतो की, सज्जनपणाने जगल्यानेच श्रीमंती प्राप्त होते. मग हा चोरीचा व्यवसाय करण्यापेक्षा मी त्या सांधूकडेच जाऊन राहतो.” असे म्हणत तो मुलगा साधूच्या झोपडीकडे चालायला लागला.
तात्पर्य: कोणत्याही संकटात सज्जनांचे समाधान, श्रीमंती कधीच कमी होत नाही कारण ते मनाने श्रीमंत असतात.
एस.एस.सी.ला मला चांगले मार्क मिळाले म्हणून माझ्या वडिलांनी माझं एलफिन्स्टन कॉलेजात नाव घातलं. त्याकाळी मेरिटलिस्टमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना सत्तर पंच्याहत्तर टक्के मार्क मिळत. माझी मेरिट लिस्ट तीन मार्कानी हुकली होती. बहुतेक सर्व स्कॉलर्स एलफिन्स्टन कॉलेजात नाव नोंदवत. मला स्वतःला एलफिन्स्टन कॉलेजात नाव नोंदवण्यात फारसा इंटरेस्ट वाटत नव्हता. याला कारणं दोन होती. एकतर शाळेतील माझ्या वर्गातील बहुतेक विद्यार्थ्यांनी त्याकाळी नव्यानेच सुरु झालेल्या सायनच्या एस.आय.इ.एस. कॉलेजात प्रवेश घेतला होता. साहजिकच मलाही एस.आय.इ.एस.ला किंवा फारतर रुईयाला जायचं होतं आणि दुसरं कारण म्हणजे एलफिन्स्टन कॉलेजचा फॉर्म आणायला गेलो असताना तिथलं हायफाय इंग्रजी वातावरण पाहून मी हबकूनच गेलो होतो. आम्ही मराठी शाळेतली मुलं, या अनोळख्या वातावरणात आपला निभाव कसा लागणार याबाबत मी दबकूनच गेलो होतो. पण माझे वडील ठाम राहिले. त्यांनी एलफिन्स्टन कॉलेजातच माझं नाव घातलं. मला आठवतं, मी दोन दिवस फुगून बसलो होतो. पण माझी काही डाळ शिजली नाही. कॉलेज सुरु झाल्यावर मी निमुटपणे एलफिन्स्टनला जाऊ लागलो.
कॉलेज सुरु झाल्यावर मला परळहून रोज फाऊंटनला जाणं येणं दगदगीचं होतंय हे घरच्यांच्या लक्षात आलं. मुख्य म्हणजे चाळीतल्या एका खोलीत माझा अभ्यास कसा होणार याचीही घरच्यांना काळजी वाटत होती. मी इंजिनिअर व्हावं अशी घरच्यांची खूप इच्छा होती. मीही पुढे कोणती करिअर करायची याबाबत फारसा विचार केला नव्हता. त्याकाळी हुषार विद्यार्थी इंजिनिअरिंग आणि मेडिकल या दोनच पर्यायांबाबत विचार करीत. मेडिकलचा कोर्स खूपच मोठा असल्याने इंजिनिअर होण्यास माझी काहीच हरकत नव्हती. पुढे कॉलेजात चांगले मार्क मिळावेत म्हणून मी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहावं असा विचार सुरु झाला. कॉलेजमधले माझे काही नवे मित्र हॉस्टेलमध्ये राहात असत. त्यांच्याबरोबर मीही हॉस्टेलमध्ये राहू का? असा विषय मी घरी काढला. हॉस्टेलमध्ये राहायचं तर आणखी खर्च होणार होता. परंतु वडिलांनी तत्काळ या प्रस्तावाला संमती दिली. मी एलफिन्स्टनच्या तेलंग मेमोरिअल हॉस्टेलमध्ये राहू लागलो.
आमचं हॉस्टेल कॉलेजपासून दूर होतं. कॉलेज फाऊंटनला जहांगीर आर्ट गॅलरीसमोर, तर हॉस्टेल चर्चगेटला सी रोडवर. सुरुवातीला मला डबलरुम मिळाली होती. म्हणजे दोन विद्यार्थी एका खोलीत. माझे इतर सर्व मित्र मात्र सिंगल रुममध्येच राहात असत. माझा रुम पार्टनर कोणीतरी वरच्या वर्गातला मुलगा होता. माझं त्याच्याबरोबर कधीचं जुळलं नाही. मी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या माझ्या वर्गातल्या मित्रांबरोबरच दिवसभर राही. मलाही स्वतंत्र सिंगल रुम मिळाली. खऱ्या अर्थानं माझं हॉस्टेललाईफ सुरु झालं.
सकाळी उठून ब्रेकफास्ट उरकून धावतपळत प्रॅक्टिकल्सना जाणं, त्यानंतर मध्ये हॉस्टेलवर परत येऊन जेवण करुन पुन्हा कॉलेजात लेक्चर्संना जाणं असा आमचा दिनक्रम असे. आमच्या हॉस्टेलमध्ये तीन मेस होत्या. एक महाराष्ट्रीयन पद्धतीची मेस, दुसरी गुजराथी पद्धतीची मेस आणि तिसरी नॉनव्हेज पद्धतीची मेस असा तिथला कारभार होता. घरी मी पूर्णतः शाकाहारी असल्याने नॉनव्हेज मेसबाबत विचार करण्याचा प्रश्नच नव्हता. पर्याय गुजराथी मेस किंवा महाराष्ट्रीयन मेस यातूनच निवडायचा होता. गुजराथी मेसमधला महाराज जास्त पोळ्या खाल्ल्या की दम मारतो म्हणून महाराष्ट्रीय मेसच बरी असा सल्ला माझ्या मित्रांनी मला दिला आणि मी तीच मेस जॉईन केली! या मेसचा कारभार आम्ही मुलंच सांभाळत असू. माझ्याकडे मेनूसेक्रेटरीचं पद सोपविण्यात आलं होतं. मी संपूर्ण आठवडयाचा मेनू मेसच्या नोटीसबोर्डावर लावत असे. या माझ्या जबाबदारीने माझं पुढे फार मोठं नुकसान केलं. अर्थात त्या वयात आपण काय करतो आहोत याचं गांभीर्य ध्यानात न आल्याने मी ती चूक करुन बसलो. आम्हाला कॉलेजात ट्रिग्नॉमेट्री विषय शिकवायला एक पारशी प्राध्यापक होते. त्यांचे उच्चार मला कधीच समजले नाहीत. आधीच ट्रिग्नॉमेट्री हा विषय तसा क्लिष्ट वर्गात काय शिकवताहेत हे ध्यानातच येत नसल्याने मी चक्क ट्रिग्नॉमेट्रीच्या पिरिअडला हॉस्टेलचा आठवडाभराचा मेनू तयार करीत असे! याचा व्हायचा तो परिणाम झालाचं. मला ट्रोग्नॉमेट्रीत युनिव्हर्सिटीच्या फायनलमध्ये खूपच कमी मार्क पडले. माझा इंजिनिअरिंगचा प्रवेश देखील हुकला! अर्थात या सर्व पुढच्या गोष्टी. खुद्द हॉस्टेलमध्ये राहात असताना मी तिथलं लाईफ अगदी मस्तपैकी एन्जॉय करीत होतो.
हॉस्टेलमध्ये आमचा मराठी शाळांतून आलेल्या विद्यार्थ्यांचा एक ग्रुप जमला होता. यात मालवणहून आलेला परुळेकर, सांगलीहून आलेला पंडितराव, अलिबागहून आलेला कान्हा देशमुख, बेळगावहून आलेला कुलकर्णी, पेण की तिथूनच कुठूनतरी आलेला खाडिलकर यांचा समावेश होता. याशिवाय जपे, भालेराव आणि डोंगरे असेही आणखी तीन मित्र होते. आम्ही सर्व जण दिवसभर एकत्रच राहत असू. याला मुख्य कारण म्हणजे आम्हाला सर्वांनाच इंग्रजी बोलण्याची सवय नव्हती आणि कॉलेज तर पूर्णतः ऑग्लाळलेलं! केवळ कॉलेजच नव्हे तर हॉस्टेलही! आमच्या हॉस्टेलवर बहुसंख्य विद्यार्थी साऊथ आफ्रिकेतून आलेले असत. साऊथ आफ्रिकेतल्या सुखवस्तू भारतीयांची मुलं कॉलेज शिक्षणासाठी भारतात येत. त्यांना ओव्हरसीज स्टुडंटस म्हंटलं जाई. या ओव्हरसीज स्टुडंटसचा हॉस्टेलवर दिवसभर दंगा चाले. नुसता टॉवेल गुंडाळून अथवा एखादी छोटीशी चड्डी घालून उघडंनागडं हिंडणं हा या ओव्हरसीज स्टुडंटसचा खाक्या ! सतत लेंग्यात वावरणाऱ्या आम्हा महाराष्ट्रीय मुलांचे या परदेशी मंडळींबरोबर कधीच सूर जुळले नाहीत. आम्ही आमच्या वेगळ्या ग्रुपमध्ये राहूनच हॉस्टेलचे दिवस काढले. सिगरेट म्हणजे फॅग, टॅक्सी म्हणजे कॅब असले इंग्रजी शब्द आम्ही या मंडळींकडूनच शिकलो.
या इंग्रजी शब्दांवरुन एक गंमत आठवली. आम्ही एकदा कॉलेजातून हॉस्टेलवर परतत होतो. परतत असताना आमच्या कॉलेजचं कॅन्टीन आणि हॉस्टेलचं कॅन्टीन यावर गप्पा चालल्या होत्या. आमच्यातला एक जण कॉलेजातल्या कॅन्टीनपेक्षा हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये चांगलं 'स्टफ' मिळतं, असं एक वाक्य बोलून गेला आणि आम्ही सर्वच एकदम गप्प झालो! त्या मुलाला काय झालं काहीच कळेना. त्याने लगेचच विचारलं- "काय रे शब्द बरोबर वापरला ना?" त्याने शब्द बरोबर वापरला होता, परंतु कालपरवा गावाहून आलेला तो मुलगा हॉस्टेलवर येताच 'स्टफ' सारखे शब्द वापरु लागला हे उमगून आम्ही हबकलो होतो!
हॉस्टेलवरच्या दोनएक वर्षांच्या काळात आमच्या सर्वांचंच अस्सल मराठीपण गळून पडलं. नव्या जगाला, नव्या वातावरणाला सामोरं जायला आम्ही सिद्ध झालो. आमच्यातला आत्मविश्वास द्विगुणीत झाला.
-सुनील रेगे
Copyright © 2025 | Marathisrushti