(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एक परीस स्पर्श ( भाग – ३५ )

    विजय कोकणातील त्याच्या गावी जाऊन माघारी आला तरी त्याचा पाय काही दुखायला थांबला नव्हता. विजयला आता त्याच्या पायाची खूपच चिंता वाटू लागली होती. कारण अजूनही त्याला पाय खेचत चालावे लागत होते आणि पायऱ्या चढता उतरताना प्रचंड त्रास होत होता. त्याने इंटरनेटवर त्याच्या गुरूंचे त्याचे या महिन्याचे राशी भविष्य पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की येणारा काळ जरी त्याच्यासाठी संघर्षाचा असला तरी यश घेऊन येणारा आहे. त्यामुळे विजय थोडा आनंदातच होता. त्यात तो जो नवीन उद्योग सुरू करण्याच्या विचार करत होता म्हणजे! त्याची छोट्या तत्वावर त्याने सुरुवातही केली होती.

  • मुक्तीचा मंत्र

    द्वैतवादाचा पुरस्कार करणारे रामानुजाचार्य दक्षिण भारतातील एक मोठे संत म्हणून प्रसिद्ध आहेत. लहानपणापासूनच त्यांना धर्मतत्त्वज्ञानाची फार आवड होती. या संदर्भात धर्मविषयक तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी ते एका गुरुकडे जाऊ लागले. त्या वेळेला ते फक्त रामानुज होते. रामानुज अतिशय चिकित्सक असल्यामुळे गुरुकडे होणाऱ्या अध्ययनाच्या वेळी ते नानाविध प्रकारच्या शंका उपस्थित करीत व त्यांचे गुरूही न कंटाळता त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करीत. अध्ययन संपल्यानंतर गुरूंनी रामानुजाला मुक्तीचा मंत्र सांगितला. मात्र त्याचबरोबर त्यांना हेही सांगितले की, हा मंत्र योग्य त्या व्यक्तीलाच व धार्मिक विधी करूनच तू देऊ शकतोस. हा मंत्र तू कोणालाही देऊ लागलास तर माझ्यासारख्या गुरूची आज्ञा भंग केल्याबद्दल तुला नरकवासाची शिक्षा मिळेल.

    गुरूंचा आशीर्वाद घेऊन रामानुज त्यांच्या आश्रमातून बाहेर पडले. विविध ग्रंथांचा सखोल अभ्यास केल्यानंतर रामानुज 'रामानुजाचार्य' झाले. अनेक लोक भक्तिभावाने त्यांच्याकडे येऊ लागले. त्यामध्ये खालच्या स्तरातील लोकही होते आणि रामानुजाचार्यांनी जात-पात वर्ण न पाहता इच्छुकांना मुक्तीचा मंत्र देण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी ही गोष्ट त्यांच्या गुरूला समजली. त्यामुळे आपल्या आज्ञेचा भंग केल्याबद्दल त्यांना रामानुजाचार्यांचा राग आला. त्यांनी त्यांना बोलावून घेतले व या गोष्टीचा जाब विचारला. त्यावर रामानुजाचार्य म्हणाले की, कोणत्याही जातीत जन्म घेतलेले लोक ही सारी ईश्वराचीच लेकरे आहेत. त्याना मी धर्मबांधव समजतो. त्यामुळे त्यांच्यात जात-वर्णानुसार उच्च-नीच असा भेदभाव करणे मला तरी अयोग्य वाटते. त्यामुळे मी ज्याची प्रामाणिक इच्छा असेल त्यांनाच हा मुक्तीचा मंत्र दिला. त्याच्यासाठी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला, भले नरकवास पत्करावा लागला तरी चालेल. तो मी आनंदाने भोगायला तयार आहे.

    रामानुजाचार्यांचे ते बाणेदार उत्तर ऐकूण गुरुही प्रभावित झाले व तूच माझा खरा शिष्य असे सांगून त्यांनी त्यांचा गौरव केला.

  • शास्त्रीबुवा

    एका गृहस्थांना त्यांनी नोकरी करू नकोस, कांही धंदा कर त्यात तुला नक्की यश मिळेल असं सांगितलं होतं व त्याने त्याप्रमाणे आलेल्या चांगल्या नोकऱ्या लाथाडून धंदा केला होता व कांही वर्षांतच तो लखपती झाला होता. तेव्हां श्रीमंताला लखपती म्हणत, आतांसारखं करोडपती नाही. त्यांनी पत्रिका जुळवल्यामुळे कोणा कोणाचे विवाह यशस्वी झाले होते. कुणाला त्यांनी भविष्य वर्तवल्याप्रमाणे कन्या झाली होती तर कोणी परदेशीही गेले होते. त्यामुळे शास्त्रीबुवांकडची गर्दी हटत नव्हती. एखाद दुसऱ्याचं भविष्य बरोबर नव्हतं आलं पण अशी माणसे स्वत:ला दोष देत गप्प बसत असत.

  • कुंपणापलीकडचे आकाश

    तो होळीचा दिवस होता. ग्रंथसाहिब दर्शनासाठी ते दोघे मुद्दाम अंबाल्याहून अमृतसरला आले होते. त्यांच्या लग्नाला नुकतेच एक वर्ष झाले होते. पिढीजात कापड व्यवसायातून फुरसत काढून तो फिरण्यासाठी बाहेर पडला होता. होळीनिमित्त सुवर्णमंदिरात विशेष अर्चना केली जाते. होळी हा मोठा व महत्त्वाचा सण मानला जात असल्यामुळे पंकजच्या माँ, पिताजींनी त्यांना अमृतसरला जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार आदल्या रात्रीच ते दोघे तेथे पोहोचले होते. पंकज आधीही तिथे गेला होता.

  • चष्मा (गूढकथा)

    पंतांना नुकतीच गाढ झोप लागली होती. वयोमान प्रमाणे, त्यांची झोप कमीच झाली होती, साडेबारा एक तर निद्रादेवीच्या आगमनाची, नेहमीचीच वेळ! अचानक त्यांना जाग आली. कोणी तरी हलवून जागे केल्या सारखी! काही क्षण ते अंथरुणावर तसेच पडून राहिले. आपण कोठे आहोत? हि कोणती जागा आहे? कोकणातली कारली तर नाही? 

  • गॅदरींग….

    कॉलेजच्या नोटीस बोर्डावर गॅदरींगची नोटीस लागली होती.हे जस समजल तसं गण्यानं टुन्नकन उडीच मारली.गण्या कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमांत नेहमीच पुढं पुढं करायचा.गण्यालं नाटकात काम करायची लय हौस होती.तसं पाहिलं तर लहान पणापासुनच गण्याच्या अंगात अभिनयाची गोम वळवळ करायची.तर असा हा गणेश उर्फ गण्या रणवीर नाटकाचा प्रचंड शौकीन होता.गल्लीत गणपती बसले की गण्याच्या ग्रुपचा नाटकाचा एक कार्यक्रम हमखासच असायचा.गण्याला आपली कला लोकांपुढं पाजळायलं लय भारी वाटायचं. श्रीराम लागु,विक्रम गोखले,दाजी पणशीकर ते हल्लीच्या प्रशांत दामले पर्यंत त्याने सर्वांचे नाटकं पाहिले होते.नाटकाचा शौकीन असलेल्या गण्याला चित्रपटांविषयी मात्र प्रचंड राग होता.तो नाटकाला अभिजात कलाकृती मानायचा तर चित्रपटाला कलेला लागलेला कलंक मानायचा.तस गण्या नाटकात चांगलं काम करायचा पण कुठल्या प्रेक्षकांपुढं काय सादर करावे हे गणित त्याला कधीच जुळले नाही.त्यामुळे नेहमीच त्याची फजीती व्हायची.एकदा असच गल्लीतल्या रसीक प्रेक्षकांपुढं गण्यानं कुठलंतरी एक प्रायोगीक नाटक सादर केलं.विषय ग्रामस्थांच्या डोक्यावरून गेलाच पण नाटकातले काही संवाद देवा धर्माविरोधात आसल्यानं पब्लीक खवताळली आण मग त्यांनी जे गण्याचा समाचार घेतला ते गण्या आठ दहा दिवस तरी खाटेला चिकटुनच राहिला होता.

  • आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ४

    आपल्याच नादात ती काही वेळ चालत राहिली आणि तिच्यापासून काही फर्लांगभर अंतरावर, ओढ्यावर जो पुल होता, त्या पुलाच्या टोकाशी काहीतरी हालचाल होत असल्याचं तिला जाणवलं….. परत निशाच्या मनात चऽऽऽऽर्र झालं. बापरे… आता हे काय नवीन संकट??…..

  • येळावीचा म्हातारा शेकोटीला आला…….।

    शाळा सोडून दोन वर्ष पूर्ण झाली होती मी आई समवेत दुसऱ्याच्या शेतात भांगलायला जात होतो. त्यावेळी एक दिवसाला पगार मला 75 पैसे व आईला सव्वा रुपया मिळत असे. वडील दुखण्यामध्ये गेलेले त्यांच्या वजना बरोबर दवाखान्यात पैसा घातला. देव देव उतारे खेतारे केले पण शेवटपर्यंत वडील दुखण्यातून उठले नाहीत.

  • धन लोभी राजा आणि साधू

    अवध नगरीचा राजा कुरसेन नावाप्रमाणेच अतिशय क्रूर होता. राज्यातील जनतेवर त्याने अनेक अन्याय-अत्याचार तर केलेच शिवाय शेजारील देशावर अनेकदा आक्रमणे करून तेथील राजा व प्रजेला जेरीस आणले. सत्तेबरोबरच तो संपतीचा भुकेला होता. त्यामुळे एकेका सुवर्णमुद्रेसाठी तो हिंसाचार करायला मागेपुढे पहायचा नाही. संपत्तीचे त्याचे हे वेड वरचेवर वाढतच होते. अवध नगरीच्या बाहेरच रस्त्याला लागून असलेल्या एका झोपडीत एक साधू रहात होता. अखंड ईश्वराचे स्मरण व गोरगरिबांना अडचणीच्या वेळी मदत एवढेच त्याचे ध्येयकार्य होते. त्यामुळे अनेकजण त्याच्या दर्शनाला येत व त्याचा उपदेश ऐकून जात. एके दिवशी सायंकाळी एक श्रीमंत गृहस्थ त्या साधुची कीर्ती ऐकून तेथे आला. त्याने साधूमहाराजाचे दर्शन घेतले व जाताना त्याने एक सुवर्णमुद्रा साधुच्या पुढे ठेवली.

    निरीच्छ वृत्तीचे साधू महाराज त्याला म्हणाले, मला सुवर्णमुद्रा नको. तूच कोण्या गरजू माणसाला दे. त्यावर तो श्रीमंत गृहस्थ म्हणाला की मी तुम्हाला ती श्रद्धेने दिली. त्यामुळे तुम्हीच तिचा योग्य विनियोग करा. थोड्या वेळातच रस्त्यावरून राजा क्रुरसेनाची स्वारी येत होती. बरेचसे सैनिक त्याचाबरोबर होते. राजा क्रुरसेन स्वतः हत्तीवर अंबारीत बसला होता. राजाचा हत्ती झोपडीजवळ आला तसा तो साधू झोपडीबाहेर आला व त्याने त्याला दिलेली सुवर्णमुद्रा राजावर फेकून मारली. ती राजाच्या डोक्याला लागून अंबारीत पडली. ते पाहून राजा खूपच संतापला. तो खाली उतरला व त्याने त्या साधुला त्या कृत्याचा जाब विचारला. त्यावर साधू राजाला म्हणाला, मी मुद्दामच तुला सुवर्णमुद्रा फेकून मारली. कारण धनाचा तू लोभी आहेस त्यासाठी तू अनेकांवर अत्याचार केलेस म्हणून तुला ती सुवर्णमुद्रा देत आहे. ते ऐकून राजा अधिकच संतापला व त्याने साधूला पकडून ठार मारण्याचा सैनिकांना आदेश दिला. मात्र साधू अतिशय शांत होता.

    राजाबरोबर असलेल्या प्रधानाला त्या साधुची योग्यता माहीत होती. त्यामुळे त्याने लगेच राजाला साधूमहाराजांना पकडू नये अशी विनंती केली. कारण मनात आणले तर त्या साधुची राजाचा सर्वनाश करायची तयारी होती. प्रधानाने राजाला समजावून सांगितल्यावर राजालाही साधूच्या दिव्यत्वाची प्रचिती आली व त्याने साधूचे पाय धरले. त्या वेळी साधूने त्याला संपत्तीसाठी हिंसाचार न करण्याचा सल्ला दिला व तो प्रमाण मानून राजा तेथून माघारी गेला.

  • गोष्ट एका डिव्होर्सची

    ‘“केव्हाच करून झालाय माझा होमवर्क. पण काय रे दादा तुला आज बरं नाही वाटत का?”
    “सानू ! आता मी तुला एक गोष्ट सांगतो; पण अगदी आपल्यातच ठेवायची हं ती. कुणाला सांगितलीस तर बघ, माझी शप्पथ आहे तुला.