नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
अजन्मा पहाडावर बसला होता . सोबतीला बालमित्र सुदामा होता .पण तो काहीसा अंतर ठेवून बसला होता . केवढा तरी पहाड वर चढून येणं त्याला भयंकर वाटत होतं . पण अजन्म्याच्या अंगात प्रचंड उत्साह संचारला होता .
विजय हातातील पेपर सोफ्यावर टाकत उठला आणि दरवाज्याच्या दिशेने चालू लागला त्याने हळूच दरवाजा उघडला तर दरवाजात एक सुंदर स्त्री उभी होती…
एक कोल्हा होता. त्याला सगळेच मूर्ख कोल्हा म्हणून ओळखायचे. आपल्या या ओळखीने कोल्हा खूप दुःखी असायचा. तो विचार करू लागला, आपला मूर्खपणाचा शिक्का पुसून हुशार, बुद्धिमान कोल्हा ही प्रतिमा सगळ्यांसमोर येण्यासाठी काहीतरी केले पाहिजे. लोकांनाच मूर्ख बनवून आपल्याला राजाप्रमाणे सन्मान मिळवायला हवा.
तिचं “घड्याळ” सुद्धा “त्यांच्याच वेळेप्रमाणे” चालायचं …. दिवसामागून दिवस जात होते ….सुरवातीला सोसायटीत , शेजारी पाजारी, देवाधर्माचं करण्यात किंवा TV बघण्यात थोडा वेळ जायचा पण जसं वय वाढू लागलं तसा त्या सगळ्याचाही उबग येऊ लागला , “एकटेपणा” जाणवू लागला …. आपली हक्काची आणि जवळची माणसं दूर असल्याची खंत वाटू लागली

महानगरातली रात्र. लखलखणाऱ्या दिव्यांची दिवाळी असल्यासारखी सजलेली. पण त्या सर्व गजबजाटापासून दूर असलेला, समुद्र किनाऱ्यालगत असलेला, श्रीमंत समजल्या जाणाऱ्या वस्तीतला एक बंगला. या बंगल्याला असलेली अखंड सोबत समुद्राच्या गाजेची.

लग्न ही खरंच आपली गरज आहे का ? या प्रश्नाचे उत्तर त्याला अजूनही मिळाले नाही…आता पुढच्या आठवड्यात त्याच्या मामाच्या मुलाचं लग्न आहे …आता त्या लग्नात पुन्हा सगळे नातेवाईक कधी नव्हे ते जमा होतील आणि जमा झाले की विजयच्या लग्नाचा विषय पुन्हा ऐरणीवर येईल…काही नातेवाईक तो विषय खरंच विजयची काळजी म्हणून तर काही उपहास म्हणून चघळतील… पण कोणाचीही विजयला सरळ – सरळ विचारायची हिंमत होत नाही की तू लग्न का करत नाहीस ? कोणी जर हा प्रश्न विचारला तर विजय काय म्हणेल याचा नेम नव्हता , कदाचित तो असाही म्हणेल की मी लग्नाला एका पायावर तयार आहे माझ्यासाठी मुलगी तुम्ही शोधायची आणि लग्नाचा सर्व खर्चही तुम्हीच करायचा
नातं’ आणि ‘मैत्री’ दोनही दोन अक्षरी शब्द आहेत. बाराखडीतील एकही अक्षर आणि एकही मात्रा दोन्ही मध्ये सारखी नाहीत. पण तरीही हे दोनही शब्द खूप जवळचे आहेत. ह्या दोनही शब्दातील ‘नातेच’ खूप मजेशीर आहे. यांच्या अर्थाची सीमा कुठे सुरू होते आणि कुठे संपते की, त्याला काही सीमाच नाही हे समजतच नाही.
त्यादिवशी दुपारी सहज मी खिडकीत उभा होतो. समोरच्या पटागंणात काही बि-हाड उतरली होती. ऊन मी म्हणत होतं. त्या पटांगणावर नावाला पण झाड नव्हतं. नुसतं याडया बाभळीची झाडे होती.त्याला पानं नव्हती राहीली.लेकर बाळं सारी ऊन्हात तळत होती.
गडी माणसं पालं ठोकत होती. सारे चार पाच पालं असतीलं.त्यात काही लेकरं वाळया ही होत्या.ती लहान लहान पिल्लं नुसती केकत होती. येडया बाभळीच्या झाडावर गोधडी टाकून सावली केली आणि त्या तिथचं बसून लेकरं पाजू लागल्या. बाकी पाच सहा लेकरं नुसती हुंदडत होती. उघडी नागडी पळत होती. त्यातल्याचं काही थोराडं पोरी, बायानं मात्र डर्म, डब्बे, कळश्या बकेटा काढल्या. आता तिथचं संसार थाटणारं होतं. त्यांना पाणी लागणारं होतं. हे कुठून पाणी आणणार ? मलाच प्रश्न पडला.त्या पटांगणात कुठं ही सार्वजनिक नळ नव्हता.हापश्या ही बंद होता. नळाला पाणी यायचं ही पंधरा दिवस बंद झाले होते.टॅकरने पाणी पुरवठा होतं होता.
तिचे वडील इटालीतील एका छोट्या गावाचे महापौर होते. त्यामुळे गावातील अनेक लोक आपल्या छोट्या-मोठ्या समस्या घेऊन त्यांच्याकडे यायचे. या समस्यांमधून तिच्या बालमनाला लोकांच्या व्यथा कळायच्या व या व्यथा ऐकून तिचे बालमन कळवळायचे. याच व्यथा तिने शब्दबद्ध करायचे ठरविले व आपल्या साहित्य कृतीमधून त्या सादर केल्या. जीवनाचा वेध घेणाऱ्या या साहित्यकृती एवढ्या जबरदस्त होत्या की, मोठेपणी त्या मुलीला साहित्याचा नोबल पुरस्कार मिळाला.
ग्रोजिया डेलेडा (Grazia Deledda) हे तिचे नाव.१९२६ मध्ये साहित्यविषयक नोबल मिळविणारी ग्रेजिया ही दुसरी महिला होती. ग्रेजियाला लहानपणापासूनच लेखनाचे अतिशय वेड होते. शाळेतील मासिकांमधून तिचे विविध विषयावरचे लेख प्रसिद्ध झाले होते. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी ट्रिब्यून या मान्यताप्राप्त पत्रिकेत तिचा लेख प्रसिद्ध झाला व तिला त्याचे त्यावेळी चक्क ५० लीरा एवढे मानधन मिळाले. त्यामुळे लेखनातील तिचा उत्साह वाढला व ती लिहितच गेली. ती राहत असलेल्या सार्डिनिया या इटलीतील प्रांतातील लोकजीवनाचा अभ्यास करून तिने वयाच्या १७ व्या वर्षी 'फ्लॉवर ऑफ सार्डिनिया' हे पुस्तक लिहिले व लेखिका म्हणून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर तिने लिहिलेली 'ऑनेस्ट सोल' ही कादंबरी अतिशय गाजली. अल्पावधितच तिच्या लाखो प्रती खपल्या व ग्रेजिया एक लोकप्रिय लेखिका म्हणून ओळखली जाऊ लागली. १८९१ ते १९३१ या काळात ग्रेजियाची ४४ पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यामध्ये आफ्टर द डायव्होर्स, 'द मदर', 'रीड्स इन द विन्ड', 'अॅशेस!, 'ट्रु मिरॅकल्स' आदी प्रमुख कादंबऱ्यांचा समावेश होता. अॅशेस कादंबरीवर निघालेला त्याच नावाचा चित्रपटही खूप गाजला होता. रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की तसेच दोस्तोवस्की यांच्या साहित्याचा ग्रेजियावर फार प्रभाव होता. मी इतर कोणासाठी नव्हे तर माझ्या मनाच्या शांतीसाठी लेखन करते असे ती नेहमी सांगायची. १९२६ मध्ये साहित्याचे नोबल पुरस्कार मिळाल्यानंतर दहा वर्षांनी ( १६ ऑगस्ट १९३६) तिचे निधन झाले.
गावाच्या खालतुन गायरानातल्या जंगलात दोन-चार पारद्यायचे पालं पडले व्हते.पालं ठोकले की शिरस्त्यापरमाणं त्या पारद्यायनं पाटलाच्या घरी जाऊन आपली नावं नोंदवली.त्या काळात बाहेरचं कोणी गावात राह्यालं आलं की त्याची नोंद पाटलाकडं करायचे..
Copyright © 2025 | Marathisrushti