(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

  • नकोशी (कथा)

    मी जेमतेम पाच वर्षांचा होतो. शेजारपाजारच्या काकू, आजी, आत्या म्हणायच्या, ‘या वक्ताला पोर्गी होऊ दे मंजी शिवा ले राखी बांधाले भन भेटल.’ मलाही ते ऐकून वाटायचं की आपल्या घरात लहान बाळ आलं की किती मज्जा येईल. मला ती राखी बांधेल, भाऊबीजेला ओवाळेल, असा विचार मनात आला की सतत आईभोवती फिरायचो.

  • राजाची चूक

    एक राजा होता. त्याची एक राणी होती. राणी अतिशय देखणी होती. राज्य
    भले मोठे होते. प्रजा अतिशय सुखी व गुण्यागोविंदाने नांदत होती. पण राजा
    निपुत्रिक होता. त्यामुळे राजा-राणी दुःखी होते. त्यामुळे प्रजाही चिंतीत होती.
    राजानंतर राजगादीवर कोण बसणार? राजा राणी आपल्या प्रजेवर पुत्रवत प्रेम
    करीत. त्यामुळे राज्यात भांडण-तंटा, चोऱ्या-माय होत नव्हत्या.

  • मार्कं आणि गुण

    आई बाबांनी एकमेकांकडे बघत स्मित हास्य केलं … चेहऱ्यावर समाधान आणि दोघांच्याही डोळ्यात एकंच भाव … आपला चिंटू मोठा झाला …. “मार्कं आणि गुण” … या दोन्हीच्या परीक्षेत यशस्वी झाला …….

  • गोमु आणि निवडणूक (गोमुच्या गोष्टी – भाग १५)

    निवडणूक जवळ आलीय. निवडणूक, मग ती ग्रामपंचायतीची असो की लोकसभेची, एक वातावरण तयार करतेच. प्रत्येक निवडणुकीची आपली अशी खास वैशिष्ट्य असतात. लोकसभेच्या निवडणुकीचा पसारा खूप मोठा असतो. विशेषतः उमेदवाराच्या दृष्टीकोनांतून हा पसारा मोठा असतो. जेवढी मोठी निवडणूक तितका उमेदवाराचा खर्च जास्त.

  • युगांतर – भाग ७

    सुमंत जयंत परचुरे. 

    रवींद्र ने सांगितलेली प्रत्येक गोष्ट ताईच्या डोक्यात खोलवर गाडल्या गेलेल्या गोष्टींना चिथावणी देत होती. पुष्करणी, पाणी, भैरोबा, लहानसा जीव या गोष्टींनी तर तिला आतून पूर्णपणे हादरवून टाकले होते. तिच्या डोळ्यांसमोर एकदम ५० वर्षांपूर्वी च्या घडामोडी जशाच्या तश्या धावू लागल्या.

  • भिंतीवरचा तिचा फोटो 

    हे सगळं लिहिताना अंगावर काटा उभा राहतोय .
    भयावह पोकळी निर्माण होतेय मनात .
    वाटतंय काहीच लिहू नये .
    पण…
    संवेदनशील मन स्वस्थ बसू देत नाही.
    हा व्हिडीओ कुणी व्हायरल केला , हे माहीत नाही .
    – डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा तेच दृश्य …
    – तोच चेहरा …तेच घाव…

  • एक परीस स्पर्श ( भाग – ४२ )

    एका ६१ वर्षीय प्रियकरचा ४० वर्षीय प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवताना मृत्यू…ही बातमी विजयच्या वाचनात आली…कोणाच्याही, कोणत्याही कोणत्याही कारणाने झालेल्या मृत्यूची बातमी वाचल्यावर प्रथम वाईटच वाटते.. पण थोड्यावेळाने आपण त्या बातमीकडे बातमी म्हणून पाहायला लागतो…या बातमीत सर्वात पहिली गोष्ट लक्ष वेधून घेते ती म्हणजे प्रियकर प्रेयसीच्या वयातील २० वर्षाचे अंतर आणि पुरुषाचे प्रेमात पडण्याचे वय…पाहता…प्रेमाला कोणती बंधने नसतात ही गोष्ट लक्षात येते…

  • अंशुच मासेमारीची मोहीम

    अंशू हा एक विचित्र मुलगा होता. नको ते करण्यात पटाईत होता. एकदा मात्र
    त्याचा डाव त्याच्याच अंगलट आला. आपण फेकलेल्या जाळ्यात तो स्वत:च
    फसला.

  • एक परीस स्पर्श ( भाग – ९ )

    त्याक्षणी विजयला लक्षात आले हा माणूस  खूपच घमेंडी आणि कुसका आहे. त्याला धंदा करायची अक्कल नाही. तो जीवनात कधीही फार यशस्वी होणार नाही. त्याक्षणी विजयने निर्णय घेतला यापुढे याच्या दुकानात कधीही पाऊल ठेवायचे नाही.

  • राजा वीरकेतू, चोर आणि रत्नवती

    (वेताळाच्या गोष्टी)

    त्रिविक्रमसेन राजा शिंशपवृक्षाकडे आला आणि वेताळाला पूर्वीप्रमाणेच खाद्यांवर घेऊन तो पुन्हा यायला निघाला. तेव्हा खाद्यांवरील शवातील वेताळ त्याला म्हणाला, ‘हे महाराज, तू फार दमला असशील! म्हणून तुझे श्रमपरिहार करण्यासाठी मी एक कथा सांगतो. ती ऐक.’