(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

  • काळोखाचा डोह 

    झेलमच्या पाण्याचं दर्शन घ्यायचं , गेल्या पंचाहत्तर वर्षातले साठवून ठेवलेले अश्रू तिला अर्पण करायचे , आई , दोघी बहिणी , आत्या आणि गल्लीतल्या कित्येक जणींना श्रद्धांजली अर्पण करायची , अशी कैक वर्षांची इच्छा होती तिची .

    दरवर्षीच्या चौदा ऑगस्टला आशाराणी गप्पगप्प असायची . मौन असायचं तिचं. सकाळपासून पाण्याचा थेंबही घेत नसे ती . छावणीत ती एकटीच बसून राहायची . आणि डोळ्यातून अश्रूंचा अविरत पूर वाहत असायचा .

  • एक परीस स्पर्श (भाग – ३८)

    विजयच्या बहिणीने तिच्या लहान मुलाला म्हणजे त्याच्या लहान भाच्यासाठी ५००० रुपयाची छोटी सायकल विकत घेतली… आजूबाजूच्या सर्वच लहान मुलांनी सायकल घेतल्यामुळे त्यालाही घ्यावी लागली. हल्लीची लहान मुलेही आत्मकेंद्रित झालेली आहेत. त्यांना प्रत्येकाला दुसऱ्याकडे जे जे आहे ते ते हवे असते. पालकांचाही नाईलाज असतो कारण आजच्या मुलांना वाटून खाणं हा प्रकारच माहीत नाही. पुढे जाऊन हे प्रकरण पालकांना खूपच महागात पडणार आहे. विजयला आठवले की तो लहान असताना त्याला एका संस्थेने एक सायकल भेट दिली होती.

  • हॅास्पिटलमधून बाळ गायब

    गेले चार दिवस मुंबईतील कमलाबेन हॅास्पिटल चुकीच्या कारणासाठी पेपरांत गाजत होतं. हॅास्पिटलच्या प्रसूती विभागातून तीन दिवसांच बाळ गायब झालं होतं. तिथल्या नर्स, मेट्रन, डॅाक्टर, ह्या त्याबद्दल कांहीच सांगू शकत नव्हत्या. हॅास्पिटल मोठ्या उद्योगपतीचे असल्यामुळे प्रथम त्यांनी ही बातमी दाबून टाकण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोपही हॅास्पिटल मॅनेजमेंटवर होत होता.

  • गावकऱ्यांची फसवणूक

    सर्व पात्रे आणि कथानक काल्पनिक असून ही कथा कुठे मिळतीजुळती निघाल्यास तो योगायोग समजावा.

  • भुरा….

    कर कचुन एसटीचा ब्रेक लागला अन् सिटवर बसुन मान खाली पाडुन पेंगाटलेल्या महादाची झोपमोड झाली. आपल्या हातातल्या ईस्टीलच्या चिमट्यानं गाडीतल्या लोखंडी रॉडवर प्रहार करत,“अय्य्….चलो भुर्‍याचीवाडी….चलो भुर्‍याचीवाडी…..!” असा कंडक्टरने पुकारा दिला आणि त्या पुकार्‍यानं महादा भानावर आला.आपल्या सोबतची शबनम बॅग गळ्यात लटकवत सोबतच्या सुदामा अन् रम्यालं आवाज देत तो गडबडीतच एस.टी.तून खाली उतरला.सुदामा आणि रम्याही त्याच्यापाठोपाठच एस.टी.तून खाली उतरले.भुऱ्याचीवाडी फाट्यावर उतरणारे ते तिघचं पॅसेंजर होते.रात्रीचे अकरा-साडेअकरा वाजले असतील.अमावस्येची रात्र असल्याने काळा निबीड अंधार पडलेला होता.तसं पाहिलं तर त्यावेळी त्या रस्त्यावरून कुणीही जायचं नाही.त्यातही अमावस्येच्या रात्रीला तर बिलकुलच नाही.त्याला कारणही तसंच होतं ते म्हणजे भुऱ्याचं….! होय…. भुऱ्याचच…! भुऱ्याच्या नावावरूनच त्या गावाचं नाव भुऱ्याचीवाडी असं पडलं होतं.गावातली वाडवडील माणसं नेहमी भुऱ्याच्या वेगवेगळ्या अन् रंजक कहाण्या सांगायचे,म्हणुनच सहसा अमावस्येच्या रात्रीला त्या रस्त्यावर सामसुम असायची.त्या काळरातीला त्या रस्त्यावर भुऱ्याचं साम्राज्य असतयं असं गावकरी म्हणायचे.अमावस्येच्या रात्रीला बारा वाजल्यापासून ते सव्वा एक या कालावधीत भुर्‍या त्या रस्त्यावरील साम्राज्याचा अनभिषिक्त सम्राट असायचा असही म्हणतात.रात्रीच्या त्या प्रहरी जो कुणी भुर्‍याच्या त्या मायावी साम्राज्यात प्रवेश करायचा त्याचा खात्माच व्हायचा.भुऱ्या वेगवेगळ्या रूपात येऊन हे सर्व करतो असही गावातले म्हातारे -कोथारे लोकं सांगायचे.

  • गोमुची उधारी (गोमुच्या गोष्टी – भाग ६)

    सर्वांची उधार देण्याची मर्यादा संपली की गोमु एखादी तात्पुरती नोकरी शोधी. पैसे हातात आले की बरीचशी उधारी फेडून टाकी आणि परत उधार घ्यायला मोकळा होई. उधारी करणे हे आपण मराठी माणसे कमीपणाच कां मानतो कुणास ठाऊक! तसं तर म्हणतात की मानव अथवा त्याचा आत्मा हे शरीर निसर्गाकडून उधारच घेतो आणि जातांना परत निसर्गांतच सोडून जातो.

  • “सूर “जुने”.. ध्यास नवा”

    “ कसलं डोंबलाचं मनाचं वय .. बट पांढरी व्हायला लागली .. शी ss .. आता या कुकरच्या अंगात आलंय गेले काही दिवस .. इथे रहाट गाडगं चुकत नाहीये .. आणि चालले ऑडिशन द्यायला !!”..

  • कालचक्र

    यंदा “नववर्ष संकल्प” बराच काळ टिकला होता त्याचा. रोज संध्याकाळी न चुकता सोसायटीच्या आवारात चालायला जायचा. वय पन्नाशीकडे आणि वजन ऐंशीकडे झुकल्यामुळेही असेल कदाचित. त्याच वेळेस खालच्या मजल्यावर राहणारे नवरा-बायको सुद्धा यायचे चालायला. नेहमी हसतमुख असणारं ते जोडपं .. याच्यापेक्षा जेमतेम “अर्ध्या” पिढीने मोठं असेल.
  • आज मात्र माझी सटकली.. (मी आणि ती)

    आज मात्र माझी सटकली.. आमचे लग्न ठरत होते, सांगून आली होती.. म्हटले आधी भेटावे आमचीच जातवाली मच्या घरी जातवालीच हवी ना.. मिळाली एकदा

  • सैनिकाच्या मुलाची दिवाळी

    दिवाळी जवळ आली होती. शकुंतला हॅास्पिटलमधील नित्याची कामे पटापट करत होती. संवयीने बिनचूक करत होती पण आज तिच्या मनांत मुलाची काळजी होती. मुलगा राजस आता नऊ वर्षांचा झाला होता. घरी एकटाच होता. वर्षांपूर्वी आजी गेली आणि तो खरंच एकटा पडला. आजी गेली तेव्हां बाबा येऊन लगेच परत गेले. जास्त रजा नव्हती त्यांना. आता परत कधी येतील, कुणास ठाऊक? सैनिकाचा काय भरोसा? त्याचे सुखरूप येणे हेच महत्वाचे! यंदा दिवाळीला फक्त दोघंच असणार होती घरी, ती आणि राजस. दिवाळीची कांहीच तयारी तिला करतां आली नव्हती. बऱ्याच सहकारी नर्सेस रजेवर होत्या. तिला रजा तर मिळत नव्हतीच पण अधून मधून डबल ड्यूटी करावी लागत होती. दोन दिवसांवर दिवाळी आली होती. विशेष खरेदी तर सोडाच पण निदान फराळासाठी लागणारं सामान आणि राजस साठी थोडे कपडे घ्यायला हवे होते ना! ह्यांतल कांही तिला करतां येत नव्हतं. तिला मदत करायलाही कुणी नव्हतं. राजस घरी एकटाच असायचा. शेजारी चांगले होते पण ते सतत कसे पहाणार. कितीही चांगल्या ठीकाणी राजस रहायला तयार नव्हता. तो आता पाळणाघरांत रहायला काय लहान होता काय?