नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
गोदाकाठच्या परिसरात फाल्गुन महिन्यात होळी हा सण अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. या होळी सणाविषयी एक लोककथा अशी सांगितली जाते: ‘विष्णुच्या दरबारात दोन द्वारपाल राहात होते. इतक्यात भृगु महाऋषी विष्णूस यज्ञाचे फळ देण्यासाठी विष्णुच्या घरी जात असतात. तेव्हा विष्णूचे द्वारपाल जय आणि विजय हे भृगुऋषीला विष्णुच्या दर्शनासाठी जाण्यास सक्त मनाई करतात.
मुंबईच्या दौऱ्यात एक दिवस रिकामा होता. खूप दिवस झालेत, दिवस काय वर्षं झालीत विठूला भेटलो नव्हतो. ठरवलं, जमलं तर भेटायचं. खूप ऐकलं होतं त्याच्या गरुड भरारीबद्दल. त्यामुळे खूप बोलायचं होतं. बरंच काही जाणून घ्यायचं होतं.

साकी ह्या टोपण नावाने मुनरोने बरंच लिखाण केलं. तो विनोदी लेखक म्हणून प्रसिध्द होता. ही एक अशीच विनोदी कथा. भारतात आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या बायका स्वतःला राजघराण्यांतल्याच समजत. येन केन प्रकारेण प्रसिध्दी मिळवायचा त्या प्रयत्न करीत. पोकळ बडेजाव मिरवीत. अशाच एका इंग्रज बाईने वाघ मारला, त्याचं नर्म विनोदी वर्णन कथेत आलं आहे. खरी गोष्ट माहित असलेली तिची पगारी जोडीदार मात्र त्या संधीचा योग्य वेळी स्वत:ला घर मिळवण्यासाठी करून घेते व चोरावर मोर बनते.
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा देव देखील दिवाळी साजरी करायचे. देव,
देवता, यक्ष, गंधर्व, किन्नर, पन्या आभाळात दिवाळीची मजा करायचे.
पृथ्वीवरच्या माणसांना, मुलामुलींना देखील देवांची दिवाळी बघायला
मिळायची. त्यावेळीची ही गोष्ट.

आम्ही वृद्ध झालोत , पण टाकाऊ नाही झालोत . हा संधिप्रकाश दिसतोय ना तो आमचा ऊर्जास्रोत आहे . सूर्य मावळल्यानंतर आणि अंधार पडायच्या आधी जो प्रकाश असतो ना ,त्याला संधिप्रकाश म्हणतात . आमची सावली संधिप्रकाशातसुद्धा दिसते . ती अनुभवानं समृद्ध असते . त्या सावलीत बसून तुम्ही स्वतःचा शोध घेऊ शकाल . जीवन कसं जगायचं हे आम्हाला , आमच्या सावलीला विचारा . सकारात्मक आयुष्य मिळेल तुम्हाला . आनंदी जीवनाचे धडे गिरवायचे असतील तर संधिप्रकाशातील सावलीत बसण्याखेरीज पर्याय नाही . बघ , तूच ठरव , म्हातारीचं ऐकायचं की आपलाच हेका चालवून आपलं अस्तित्व धोक्यात घालायचं ? “

मुंबईतील गर्दी हीच सुरक्षिततेचा विश्वास देते. पूर्वी मुंबईचा पोलीस हे नागरिकाना सुरक्षेच प्रतीक वाटायच. पण आता काय झालंय कुणास ठाऊक, पण मुंबईच्या पोलिसांचा ताल बदललाय.
सकाळी अकरा- साडेअकराची वेळ होती. जरा बाहेरची कामे करुन यावी म्हणून निघाले होते. घरात बाहेरची कामेच जास्त असतात. कधी लाईट बील, पाणी बील, बाजार हाट, बँकाची आणि ही सगळी कामे सकाळीच करायला लागतात. तशीच त्या दिवशी पण बाजारात जायला निघाले होते. जवळच सेंट्रल स्कूल आहे. शाळा सुटली होती. सोसायटीतील लहान मुले परीक्षा संपल्या म्हणून जवळ जवळ नाचतच आनंदात घरी परत चालली होती.
लहान असेंन मी त्यावेळी आठवी नववीत जेव्हा त्यांचे लग्न झाले तो गावाकडचा पण शहरात स्थायिक झालेला, चांगली नोकरी होती परंतु लगेचं करत नव्हता. एकदाचे त्याने उशीरा का होईना लग्न केले. ती पण जरा जास्त वयाची होती, थोडी रखडलेली होती. कमी शिकलेली , मॅट्रिकपर्यंत घरात गावी सगळी कामे करत असे.
मी घातलेला सदरा कुणीतरी माझ्या शरीरावरून अलगदच वेगळा केला होता, इतका की मलाही कळले नव्हते. बसमध्ये माझ्या मागच्या सीटवर बसलेल्या कुणीतरी कात्रीने हे कृत्य फारच सावधगिरीने आणि कलाकारीने केले होते. मी बसमध्ये डुलक्या घेत होतो.
प्राचीन काळी उद्दालक नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांना नचिकेता
नावाचा एक पुत्र होता. नचिकेता फार चाणाक्ष हुषार व चौकस बुद्धीचा होता.
अवतीभवती घडणा-या घटनांबद्दल नानाप्रश्न विचारून तो आपल्या पित्याला
भंडावून सोडी. एकदा उद्दालक ऋषींनी ‘विश्वजित’ नावाचा फार मोठा यज्ञ
आरंभिला.
Copyright © 2025 | Marathisrushti