नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
हातात हात घेऊन युगुल रंकाळ्यावर … गुलाबी हवा … गुलाबी थंडी … गुलाबी विचार … दोघांच्या मनाचं पार “जयपूर” झालेलं .. जुन्या आठवणी ,किस्से , गमती-जमती … गप्पा सुरु.

ओ हेन्रीच्या ह्या कथेची नायिका राजकन्या जोसेफा निर्भय, चतुर शिकारी आहे. गीव्हन्स तिच्यावर छाप पाडण्यासाठी खोटं बोलतोय, हे तिला लगेच लक्षांत आलं. त्याला वाटत असतं की तो सिंह आपला पाळीव प्राणी होता, असं सांगून तो तिला फसवतोय.

आता ध्वनी-प्रदुषणाविरुद्ध मोहिम काढली पाहिजे, असं मत नुकतच एका जागरुक प्रतिभावान लेखकानं जाहिर केलं आहे. ते सुरु करण्यासाठी दोन-तीन लाऊडस्पीकर्स खरेदी केले आहेत. ‘आवाज कमी करा’ हे सांगितलेले कळणार कसं? ते कळावं म्हणून आहे त्या आवाजापेक्षा मोठा आवाज काढून बोललं तरच लोकांना कळणार, असं त्याच मत आहे.
आपली आलीशान गाडी सर्व्हिसिंगला टाकून आपल्या ८-१० वर्षांच्या मुलासोबत तो सर्व्हिस सेंटर च्या बाहेर पडला . समोरच असलेल्या रिक्षा स्टँडवर एकंच रिक्षा उभी .. तो लगबगीने आत शिरला .. आपल्या मुलाचा हात धरून त्याला आत घेऊ लागला ..तेवढ्यात ते काहीसे वयस्कर रिक्षाचालक म्हणाले .. “ दादा …. त्या “बारक्या”ला आतमधल्या साईडला बसवा .. तिकडे पॅक पट्टी आहे न्.. तेवढीच शेफ्टी !!
प्रत्येक शब्द ‘क’ पासून सुरु करुन येवढा मोठा परिच्छेद लिहिला आहे.
जगातल्या कोणत्या इतर भाषेत अशी ताकद असेल... ? मराठी भाषेची ताकद खालील लेखात पहा...
केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये ‘कजरारे-कजरारे’ कवितेवर कोळीनृत्य केले.
काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श किंचाळून कलकलाट केला. काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले. कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी ‘कोलाज’ करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला. काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले. कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले. केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले. कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या कागाळीखोर केशवाला काळानेच केला ‘कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता’!
कथासार
क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन,
कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे... !!
खरच अभिमान वाटतो मला मी मराठी असल्याचा...
(जैन लोककथा)
एका कुटुंबात तीन भाऊ होते. त्यांच्या बायका आळीपाळीने स्वयंपाक करीत असत. एके दिवशी लहान सूनेला स्वयंपाक करावयाचा होता.
मी सोफ्यावर बसून होतो आणि तो जिन्याने वरखाली ये जा करीत होता . वर जाताना टणाटण उड्या मारीत होता आणि खाली येताना चक्क घसरत येत होता . त्यात त्याला मजा वाटत होती . त्याच्या वर खाली करण्याकडे माझं लक्ष असल्यानं व्यायाम केल्यासारखी माझी मान हलत होती . मुलांनी आणि पत्नीने विचारले सुद्धा .
मी म्हणालो तुम्हा मुलींचे खूप लक्ष असते सगळ्यांकडे . तशी ती हसली म्हणाली , जसे तुम्हा पुरुषांचे मुलींकडे , स्त्रियांकडे असते तसे आमचेही. तिच्या माझ्यात जवळ जवळ २५ वर्षाचे अंतर. शेजारीच रहात होती. आम्ही चाळीत रहात असल्यामुळे थंडीत ऊन खायला सकाळी बाहेर असायचो कधी रविवारी तर कधी बँक हॉलीडेला.

बस्तर मधील सुरगुजा जिल्हा जंगल, नद्या. दर्याने वेढलेला, खळाळणारे असंख्य नाले, रस्त्याला रस्ता म्हणायचे तरी कसे?काही वेळा घनदाट जंगलात नक्षलवादी वस्तीस येत, आदिवासींकडून हक्काने शिधा गोळा करत, तसे पाहता हा प्रदेश इतका मागासलेला, आदिवासींचे विखुरलेले पाडे, थोडीपार शेती, गुजराण तरी कशी करणार? अर्ध पोटी जीवन चालू होते इतकेच.
एक राजा होता. त्याला मासे खाण्याची प्रचंड आवड होती. एक दिवसही मासे खायला मिळाले नाही तर तो अस्वस्थ व्हायचा. त्यामुळे त्याच्या भोजनात रोज मासळी असायचीच. काशीराम नावाचा एक गरीब मच्छिमार रोज समुद्रावर जायचा व ताजी मासळी पकडून राजवाड्यात घेऊन जायचा व राजाच्या आचार्याला द्यायचा. मात्र पहाऱ्यावर असलेला कोतवाल फार लबाड व भ्रष्ट होता. तो राजवाड्यात जाण्यासाठी काशीरामकडून रोज थोडेतरी का होईना पैसे घ्यायचा. कोतवालाच्या या मुजोरीला काशीराम कंटाळला होता, परंतु कोतवालाविरुद्ध तक्रार कशी करायची? म्हणून त्याचा नाईलाज झाला होता. एकदा मासे पकडण्यासाठी काशीराम नेहमीप्रमाणे समुद्रावर गेला. मात्र समुद्र खवळला होता. त्यामुळे तो मासेमारी न करताच घरी परतला. त्या दिवशी राजाच्या भोजनात ताजी मासळी नव्हती त्वामुळे राजा खूपच संतप्त झाला होता. दुसऱ्या दिवशीही तीच परिस्थिती कायम होती. त्यामुळे राजा आणखीनच अस्वस्थ झाला. काशीरामला हे कळताच तो तिसऱ्या दिवशी पुन्हा समुद्रावर गेला. समुद्र खवळलेलाच होता. तरीही त्याने जीव धोक्यात घालून मासेमारी केली व ताजी मासळी घेऊन राजवाड्यात गेला. कोतवालाने त्याला अडविले व तो त्याला म्हणाला, तुझ्याजवळची ताजी मासळी पाहून राजा खुश होईल व तो तुला नक्कीच बक्षीस देईल त्यातले निमे बक्षीस मला द्यावे लागेल हे तू लक्षात ठेव. भ्रष्ट कोतवालाला अद्दल घडविण्याची हीच संधी आहे, हे ओळखून काशीरामने कोतवालाची मागणी मान्य केली. कोतवालाबरोबर आलेल्या काशीरामला पाहून राजा खुश झाला व त्याने त्याला बक्षीस मागण्यास सांगितले. त्यावर काशीरामने बक्षीस म्हणून चाबकाचे वीस फटकारे मारा, अशी राजाकडे विनंती केली. राजाने त्याची ही विचित्र मागणी मान्य केली. दहा फटके खाल्यावर काशीरामने आता उरलेले फटके कोतवालाला मारा अशी राजाला विनंती केली. तेव्हा राजाच्या लक्षात खरा प्रकार आला. त्याने उरलेले दहा फटके कोतवालाला मारण्याचा आदेश दिला. शिवाय त्याला नोकरीवरून काढून टाकले व काशीरामला बक्षीस म्हणून सुवर्णमोहोराची थैली दिली.
Copyright © 2025 | Marathisrushti