नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
अंतरा आणि अभिनय दोघे मुंबईतील वरळीच्या किनाऱ्यावर फिरत होते. दोघांनी आपले हात मागून दुसऱ्याच्या कमरेभोवती लपेटलेले होते. अंतरा आणि अभिनय दोघे मनाने एकमेकांच्या प्रेमांत आकंठ बुडालेले होते. दोघांचेही शिक्षण आता पूर्ण झालं होतं. या वर्षी ते दोघेही आपापल्या गांवी परतणार होते. अंतराला तर उद्याच गांवी जायचे होते.
एका गावात एक कुंभार राहात होता. तो अतिशय सुबक मूर्ती बनवायचा. त्यामुळे दूरच्या गावांहूनही त्याच्याकडे बरीच गिर्हाईके येत असत. गणेशोत्सव जवळ आला होता. त्यामुळे कुंभाराकडे गणपतीच्या मूर्तीसाठी बरीच मागणी होती. एकेक मूर्ती तयार करून तो गिर्हाईकांकडे घेऊन जात असे.
कुंभाराने गणेशाची एक अशीच मोठी सुबक मूर्ती बनविली व आपल्या गाढवावर लादून तो ज्याने ऑर्डर दिली त्याच्या गावाकडे जायला निघाला. रस्त्याने जाता-येता भेटणारे लोक गाढवावरील मूर्तीकडे पाहून हात जोडत होते.
गाढवाला वाटले सर्व लोक आपल्यालाच नमस्कार करीत आहेत. त्यामुळे गाढव सुखावले व आणखी ऐटीत चालू लागले. अनेकदा मान हलवून लोकांच्या नमस्काराचा स्वीकार करू लागले. त्या गावी पोहोचल्यानंतर कुंभाराने ती मूर्ती ज्याची होती त्याला दिली व त्याच्याकडून पैसे घेऊन तो पुन्हा आपल्या गावी निघाला.
रस्ता तोच होता. त्या रस्त्यावर पूर्वीचेच लोक होते, मात्र त्यापैकी कोणीही आता गाढवाची साधी दखलही घेत नव्हते. कारण गाढवाच्या पाठीवर आता मूर्ती नव्हती. लोकांनी आपल्याला नमस्कार करावा म्हणून गाढव हळूहळू चालू लागले, तसेच अधूनमधून ओरडू लागले. मात्र त्याचा लोकांवर कसलाच परिणाम होत नव्हता.
गाढवाची मंद चाल कुंभाराच्या लक्षात आल्यावर त्याने आपल्या जवळची काठी गाढवाच्या पाठीवर सपदिशी मारली आणि तो हसून म्हणाला, “लोकांना देखल्या देवाला दंडवत घालण्याची सवय असते हे तुला 'गाढवाला' कसे कळणार ?”
काठीचा मार पडताच गाढव निमूटपणे रस्त्यावरून वेगाने चालू लागले.
स्मिता कॉम्प्युटर इंजिनीअर. चार वर्षे झाली विक्रोळीला एका छोट्याशा कंपनीत नोकरीला होती. तिला प्रोग्रॅमिंग व काही क्लाएंटचे प्रोजेक्ट्स बघावे लागत. ती घरातून बारा-साडेबाराला निघे व रात्री बारा साडेबारापर्यंत परत येई. अर्थात तिला कारने घरापर्यंत ड्रॉप असे. पण काल रात्री तिला अजिबात झोप आली नाही.
तैमूरलंग हा इतिहासातील एकप्रसिद्ध सरदार. तो पराक्रमी होता परंतु तेवढाच अत्याचारी. हल्ले करून जिंकलेल्या प्रदेशातील लोकांवर तो अत्याचार करायला मागेपुढे पहायचा नाही. अशा लोकांना गुलाम करण्यासाठी तो जबरदस्ती करायचा. एकदा त्याने असेच खूप गुलाम पकडले. त्या गुलामांना विकण्यासाठी तो स्वतः सौदेबाजी करायचा व त्याने ठरविलेल्या भावात सौदा झाला की त्या गुलामांना विकायचा. एकदा त्याने पकडलेल्या गुलामामध्ये तुर्कस्तानामधील एक अध्यात्मिक संत अहमदी देखील होते. तैमूरलंगाला त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती समजली होती. सर्व गुलामांना एकत्र केल्यानंतर तैमूरलंगाने त्यातील दोन गुलामांना बाहेर काढले व अहमदीजवळ येऊन तो त्यांना म्हणाला, सांगा या दोन गुलामांची किंमत किती असेल.
अहमदीने त्या दोन गुलामांकडे निरखून पाहिले व ते म्हणाले, हे गुलाम समंजस वाटतात त्यामुळे त्यांची किंमत पाच हजार मोहराहून कमी असू शकत नाही. त्यांचे उत्तर ऐकून तैमूर लंगाला अहमदी यांची थट्टा करण्याची इच्छा झाली. तो त्यांना म्हणाला बरं, आता सांगा की, माझी किंमत किती असेल? त्यावर अहमदी चटकन म्हणाले, फक्त दोन मोहरा. त्याचे उत्तर ऐकून तेमूरलंग खूप संतापला. तो अहमदी यांच्या अंगावर धावून ओरडत म्हणाला, तू माझा अपमान करतोस? माझ्याजवळ असलेल्या दस्तीचीच (रुमाल) किंमत दोन मोहरा आहे. त्यावर अहमदी म्हणाले, मी त्या दस्तीचीच किंमत सांगितली. तुझ्यासारख्या अत्याचारी सरदाराची किंमत तर केवडीचीही नाही. त्यानंतर अहमदी यांनी तैमूरलंगाने केलेल्या अत्याचारांची सर्व गुलामांसमोर जंत्रीच सादर केली. सर्व गुलामांना वाटले आता अहमदी यांना तैमूरलंग ठार मारणार.
मात्र अहमदी यांच्या सत्य वाणीने तेमूरलंगाची विवेकबुद्धी जागी झाली व त्याने अहमदी यांची गुलामगिरीच्या जोखडातून मुक्तता केली.
दत्ता आता वयात आला. तो नियमित पूजा सांगायला जात असे. त्याचे लक्ष आता जेवायला वाढणाऱ्या वहिनींकडे जाऊ लागले. एरव्ही खाली मान घालून जेवणारा दत्ता वहिनींच्या बांगड्या, साडी वगैरेंची स्तुती करू लागला. दत्तालाही स्वतःवर ताबा ठेवणे कठीण जाऊ लागले.
वेश्या जीवनातील जगणाऱ्या स्त्रियांची विदरक्ता लेखातून रेखाटली आहे . ही कहाणीही त्याचं उर्मिलेची आहे … ती उर्मिलाही सामान्य स्त्री सारखीच एक आहे पण ह्या समाजमान्य खोट्या चेहऱ्याने तिला वेशेचा एक कलकचं लावला ती सामान्य स्त्री सारखी जगू पाह्यला खूप धडपडली पण शेवटी तिचं ह्या समाजात जगनच त्यांना अमान्य होतं ..
सकाळी सकाळी ऐनकामाच्या वेळात वीणाबेनचा फोन आला होता त्यामुळे जास्त काही चौकशी न करता दुपारी मिटींगला येईन असे कबूल केले होते.
इतक्यात तडकाफडकी एवाद्या प्रोजेक्टसाठी मिटिंग बोलावण्याचे कारण काय असावे ह्याचा डोक्यात विचार चालू होता.
सतराव्या शतकात गुजरातमधील अहमदाबादजवळील बावला या गावी एका मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव ठेवले गेले प्रीतम. तो मुलगा जन्मतःच अंध (सूरक्षस) होता. त्यातच त्याच्या लहानपणी आई-वडिलांचे छत्र हरपले त्यामुळे तो पोरका झाला आधीच अंध, त्यातून निराधार यामुळे प्रीतमचे लहानपणी खूप हाल झाले. भिक्षा मागून तो कसेबसे आपली उपजीविका करीत होता. एका कोणाबरोबर तरी प्रीतम भागवत पारायणाला गेला. भागवतकथा ऐकून तो इतका प्रभावित झाला की, ईश्वराबद्दल त्याच्या मनात खूपच आकर्षण निर्माण झाले. त्यातूनच त्याला काव्य स्फूरत गेले. त्याचे हे काव्य लोकांनाही आवडू लागले. आपले काव्य प्रीतम पुढे भजनाच्या रूपात सादर करू लागला. एकदा प्रीतम श्री डाकोरजींच्या दर्शनाला गेला.
त्याला पाहताच पुजार्याला त्याची थट्टा करण्याची लहर आली. तो त्याला म्हणाला, तू तर नेत्रहीन आहेस मग कोणाचे दर्शन घ्यायला आला आहेस? त्यावर प्रीतमने भगवान डाकोरजींच्या प्रतिमेचे व्यात्मक वर्णन केले. डाकोरजींना कोणत्या रंगाचे वस्त्र नेसवले आहे, तसेच त्याला कोणत्या रंगाची फुले घातली आहेत, त्याचा मुकुट कसा आहे, बासरी कशी ठेवली आहे हेही प्रीतमने काव्याद्वारे सांगितले. त्याचे काव्य ऐकून पुजारी आश्चर्यचकित झाला व त्याने त्याच्या चरणी लोटांगण घातले. कारण ज्याच्या मनात ईश्वराची अपार भक्ती आहे ते डोळ्याशिवाय भगवंताचे दर्शन करू शकतात, याची प्रचिती त्याला आली होती. हाच प्रीतम पुढे संत प्रीतमदास बनला. एकदा रोमारोला या परदेशी संस्थेचे लोक भारतात आले होते. संत प्रीतमदास यांना भेटल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की, प्रीतमदास नेत्रहीन आहेत. मात्र त्यांच्या भक्तिरचना इतक्या 'डोळस' आहेत की, कोणताही डोळस तसेच प्रज्ञावान मनुष्य अशा रचना करू शकणार नाही. संत प्रीतमदासच्या निवडक भक्तिरचना ते परदेशी घेऊन गेले.
फार फार वर्षांपूर्वी एका वाळवंटात एक उंट राहात होता. भगभगीत वाळवंटात पोटापाण्यासाठी उंटाला खूप भटकावे लागत असे. एकदा त्याला आपल्या पूर्वजन्मातल्या काही गोष्टी आठवल्या. पूर्वजन्मी आपण खूप जपतप केले. खूप पुण्य जमा झाले.

विजय कोकणातील त्याच्या गावी जाऊन माघारी आला तरी त्याचा पाय काही दुखायला थांबला नव्हता. विजयला आता त्याच्या पायाची खूपच चिंता वाटू लागली होती. कारण अजूनही त्याला पाय खेचत चालावे लागत होते आणि पायऱ्या चढता उतरताना प्रचंड त्रास होत होता. त्याने इंटरनेटवर त्याच्या गुरूंचे त्याचे या महिन्याचे राशी भविष्य पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की येणारा काळ जरी त्याच्यासाठी संघर्षाचा असला तरी यश घेऊन येणारा आहे. त्यामुळे विजय थोडा आनंदातच होता. त्यात तो जो नवीन उद्योग सुरू करण्याच्या विचार करत होता म्हणजे! त्याची छोट्या तत्वावर त्याने सुरुवातही केली होती.
Copyright © 2025 | Marathisrushti