नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
राजकारण म्हणजे काय? देशावर अथवा देशाच्या एका भागावर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे उद्योग. ही अगदी ढोबळ व्याख्या झाली पण सत्ता मिळवण्याचे प्रयत्न नक्कीच राजकारणाचा केंद्रबिंदू असतो. लोकशाहींत ही सत्ता मिळवायची तर निवडणुका आल्या पक्ष आले. स्पर्धा आली. पक्षांतर्गत सत्ता, शासन करण्यासाठी सत्ता ह्यांत ते सर्व गुंततात. राजकारण करणाऱ्या माणसांत अनेक पातळ्यांवर स्पर्धा असते. कधी कधी ही इतकी तीव्र होते की दोन राजकारणी एकमेकांच्या जीवावर उठतात किंवा दोघांतील एक जण तरी दुसऱ्याचा इतका द्वेष करू लागतो की तो दुसऱ्याचा जीव घ्यायचा विचार करू लागतो. अर्थात उघडपणे तो हे दाखवेल तर तो कसला राजकारणी. बाहेर तो खूप मैत्री दाखवू शकतो पण त्याच वेळी वैऱ्याच्या खूनाचा बेत मनांत रचत असतो. कधीतरी तो आपला बेत पार पाडण्यात यशस्वी होतो. राजकारणी नेत्याला इतरही विरोधक असतात, जे राजकारणांत असतातच असं नाही. त्यांच्यापैकीही एखादा असाच बेत रचून त्याला मारू शकतो. असे अनेक पदर असलेला हा गुन्हा प्रत्यक्षात घडला होता. एकेकाळी स्थानिक नगरपालिकेचा अध्यक्ष असणाऱ्या एका राजकारणी व्यक्तींचा खून झाला होता आणि दीड महिना होऊन गेला तरी पोलिसांना कांही धागा मिळत नव्हता म्हणून हे प्रकरण घेऊन इनस्पेक्टर हिरवे यशवंताकडे आले होते.
“ही मी त्याला दिलेली कठोर शिक्षा” रजनीने कथा संपवली. रजनीने कथा संपवली खरी, पण कथा संपली नाहीं !

साधू त्यांना एक जादुई घोडा, काटी आणि झोळी देतो आणि त्यांच्या कानात एक मंत्र सांगतो. हा घोडा तुम्हाला तुमच्या इच्छित स्थळी घेऊन जाईल..ही झोळी तुम्हाला हव्या त्या वस्तू देईल…आणि ही काटी तुमच्या शत्रूंचा नाश करेल…आणि ते साधू स्वर्गात प्रयाण करतात. ते दोघे बहीण भाऊ घोड्यावर बसतात आणि मंत्र म्हणून घोड्याला आदेश देतात आमचे आईवडील ज्या राज्यात असतील तेथे आम्हाला घेऊन चल…क्षणात ते घोड्यासह आटपाट नगरात पोहचतात…तेथे पोहचल्यावर ते झोळीतून मंत्राच्या साह्याने मोहरा निर्माण करतात आणि एक वाडा विकत घेतात…आपल्या राज्यात कोणी श्रीमंत बहीण भाऊ राहायला आल्याची बातमी राजदरबारात पोहचते… दृष्ट राणीला त्यांना भेटण्याची उत्सुकता निर्माण होते…
आपल्याला मित्र असणे कित्ती छान असते नाही का ? मित्राबरोबर खूप गप्पा मारता येतात,खेळता येते आणि खेळता खेळता भांडता सुद्धा येते, मित्रशिवाय आपल्याला करमत नसते हे तितकेच खरे.
हे सगळं घडलं ते त्या भलत्या विचारांच्या “कुंपणानीच शेत खाण्याआधी” मनाच्या मळ्यातून वेळीच ते “कुंपण“ काढून टाकलं sss म्हणून ….
विजय हातातील पेपर सोफ्यावर टाकत उठला आणि दरवाज्याच्या दिशेने चालू लागला त्याने हळूच दरवाजा उघडला तर दरवाजात एक सुंदर स्त्री उभी होती…
ऐका आदित्यराणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दूर्वा, आणायला रानात जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं, “काय गं बायांनो, कसला वसा वसतां? तो मला सांगा.” “तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील.” ब्राह्मण म्हणाला, “उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही.
(मॉरिशसची लोककथा)
खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. एक होते माकड आणि एक होते कासव. या कासवाला सात मुले होती. माकड मात्र आळसात वेळ घालवीत असे. कासव खूप कष्ट करीत असे. एकदा कष्टाचे काम केल्यावर त्याला त्याची मजुरी मिळाली, तर त्या मजूरीच्या पैशातून त्याने तांदुळाचे एक पोते खरेदी केले. ते पोते घेऊन कासव घरी येत असता वाटेतच मध्यावर थांबले. त्याने आपल्या पाठीवरचे पोते रस्त्यावर काढून ठेवले.

विजय त्याच्या कार्यालयात बसलेला होता त्याच्या कार्यालयाच्या बाहेर दोन म्हाताऱ्या गप्पा मारत बसलेल्या होत्या. लोकांच्यात चाललेला संवाद हे विजयच्या साहित्यिक भुकेसाठी नेहमीच खाद्य ठरत असते त्यामुळे तो त्या म्हाताऱ्या स्त्रियांमध्ये चाललेला संवाद कान लावून ऐकत होता. त्यातील एक म्हातारी फक्त दुसरी म्हातारी जे काही बोलत होती ते कान देऊन ऐकण्याचे काम करीत होती. ती बडबडी म्हातारी त्या दुसऱ्या म्हातारीला सांगत होती…” मला दोन मुलगे आणि एक मुलगी आहे मोट्या मुलाला दोन मुलगे आहेत आणि मुलीला एक मुलगा एक मुलगी आहे लहान मुलाला अजून काही नाही… त्याचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले आहे..
स्वतःच्या आनंदासाठी, समाधानासाठी किंवा रसिकांच्या रंजनासाठी सादर होणारी कला जेंव्हा भक्तिभावाने परमेश्वरासाठी सादर होते तेंव्हा त्या कलेच्या साधनेतून पुण्याचीच साठवण होते. शाहीर अनंत फंदी यांची अत्यंत प्रज्ञावंत, हजरजबाबी लोककलाकार म्हणून कीर्ती पसरली होती. या लावणीसम्राटाच्या अंगी जन्मजात कवित्व होते. गावोगाव ते आपली कला सादर करीत. असेच एकदा माळव्यात ते आपला फड घेऊन गेले होते तेंव्हा त्यांच्या अलौकिक कवित्वाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या सुद्धा प्रभावित झाल्या. त्यांनी प्रसन्न होऊन अनंत फंदींच्या सन्मानार्थ अलंकार आणि भरजरी पोशाखाची भेट दिली. आणि त्यावेळेस अहिल्याबाई त्यांना म्हणाल्या, “फंदी बुवा ! आपण असामान्य प्रतिभावंत आहात. साक्षात सरस्वती आपल्या जिभेवर विलसत आहे. कोणीही प्रभावित होईल असेच आपले कवित्व आहे. परंतु आपली ही काव्यशक्ती तमाशाच्या माध्यमातून केवळ मनोरंजनासाठी वापरण्यापेक्षा हरिकीर्तनासाठी उपयोगात आणलीत तर मोठा लौकिक होईल.” अहिल्याबाईंचे हे उद्गार शाहिर अनंत फंदी यांच्या हृदयाला जाऊन भिडले. “यापुढे गाईन ते फक्त हरिकीर्तनासाठीच" अशी भरदरबारात प्रतिज्ञा करून शाहिर अनंत फंदी निघाले. ही प्रतिज्ञा त्यांनी अखेरपर्यंत पाळली. आणि आपल्या प्रतिभेचा उपयोग त्यांनी लोकशिक्षणासाठीच केला. त्यामुळे लोकांना फंदी आठवतात ते त्यांच्या कीर्तनामुळे ! आणि त्यांच्या उपेदशपर फटक्यांमुळे.
तात्पर्य: कोणत्याही कलावंताला जर श्रेष्ठ व्यक्तीच्या विचारांचा परीसस्पर्श झाला तर त्याच्या कलेचे आयाम बदलतात.
Copyright © 2025 | Marathisrushti