नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
माणुस जेव्हा गुहेतून, झाडांवरून रहाण्यासाठी इतर ठिकाणे शोधू लागला, त्यावेळी त्याने सर्वप्रथम वृक्षांच्या पानांचा वापर करून आडोसा तयार केला असवा, त्यानंतर बांबू, दगड, विटा, माती, चुना यांचा वापर करून भिंत उभारली असावी, असे इतिहास तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आदीम काळापासुन सुरू झालेला भिंतीचा हा प्रवास अलिकडच्या स्मार्ट भिंतीपर्यंत येऊन थांबलेला आहे.
जेट एअर वेजच्या विमानाने मुंबईतून दुबईच्या दिशेने झेप घेतली. शबानाचे मन त्याच्यापेक्षा अधिक वेगाने आरिफकडे धावले. स्वतंत्र संसाराची सोनेरी स्वप्ने प्रत्यक्षात उतरण्याचा क्षण काही तासांवर येऊन ठेपला होता. शबानाचे आरिफशी लग्न होऊन चार वर्षांचा काळ लोटला होता. लग्नानंतर दुसऱ्या वर्षात आरिफला एका कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाल्यामुळे तो तिकडे गेला. कोकणातल्या गावी सासू, सासरे आणि धाकटा दीर यांच्या सोबत शबानाला राहावे लागले. सासूचे आजारपण सततचे असल्यामुळे त्या घराची जबाबदारी शबानावर पडली. आरिफ वर्षातून एकदा एक महिन्याच्या सुटीवर गावी यायचा. तेवढ्या एकच महिन्यापुरते दोघांचे सहजीवन असे. पुढे दिराचे लग्न होऊन जाऊ घरात आली. सासूचा संसार चालवत असल्याची खंत शबानाच्या मनात सलत असे. जावेचे घरात आगमन झाल्यावर तिथून सुटका होण्याची तिची आशा पालवली. तेथून घेऊन जाण्याचा लकडा तिने आरिफकडे सुरू केला. सगळ्यांच्या विचारांचे एकमत होऊन तिची पाठवणी आरिफकडे करण्याचे ठरले. दिराने तिला मुंबईच्या विमानतळावर सोडले. आरिफ तिला घेण्यासाठी विमानतळावर येणार होता, तरीपण दक्षता म्हणून त्याच्या घराचा व कंपनीला पत्ता तिने एका कागदावर लिहून घेतला होता.दुबईच्या एअरपोर्टवरून बाहेर पडण्याचा गेटजवळ तिने थांबावे असे तिला बजावून ठेवले होते. आखाती देशातील वैभव, झगमगाट याविषयी तिने आरिफकडून खूप ऐकले होते. कोकणातल्या लहान गावातून तिकडे जाण्याची भुरळ तिच्या मनाला पडली. नवऱ्यासोबत राहून ती आता जीवनाचा भरपूर आनंद लुटणार होती.
घरी गेल्यावर मी पाचगणीला आईला मोबाईलवरून झालेली घटना सांगितली. ती म्हणाली, “अजितराजे, राजासमोर कुणी कसे बोलावे हे लोकांना कळत नाही. पण हे नेहमीचे उत्तर मला काही पटले नाही. एखाद्याच्या केवळ नजरेने एखाद्याची हृदयक्रिया बंद पडावी आणि त्यात त्याचा जीव जावा हे मला फारच विचित्र वाटले. आजपर्यंत माझ्या नजरेत अनोखी जरब आहे हे मला दिसत होते आणि त्याचा मी फार गांभीर्याने विचार करत नव्हतो.
तिला कळत नव्हतं ,त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय . कालपासून त्यांचं वागणं काहीसं अनाकलनीय वाटत होतं . पंचेचाळीस वर्षांच्या सहजीवनाचा इतिहास ती कालपासून धुंडाळत होती . थोडंसं काही हाती लागत
होतं , काही हातातून निसटून जात होतं . पण कालपासूनच्या वागण्याचा बोध तिला होत नव्हता .
(ऑस्ट्रेलियन लोककथा)
एका राजाची एक सुंदर राणी होती. एका कावळ्याला ही राणी खूप आवडत होती. एके दिवशी राणी आपल्या सहा दासींसोबत रानात पांढरे सुरवंट शोधीत होत्या. कावळ्याने पाहिले आणि कावळ्याला एक युक्ती सुचली. कावळ्याने सुरवंटाचे रूप घेतले. रानातील दाट झुडपात लपून बसला. राणीच्या दासींनी सुरवंट पकडण्यासाठी साधे लाकडी गळ टाकले.
दार उघडले आणि थंड गार वाऱ्याचा झोत अंगावर आला. शहारून गेलो, केस ताठरले. माझ्यासाठी दार उघडून, कांही तरी पुटपुटत, मोकळे केस सोडलेली, आई देवघराकड़े जात होती.
लेडीज जिमपाशी रेणू पोहोचली तेव्हा सकाळचे ७.३० वाजले होते. पार्किंगमध्ये नॅनो पार्क करून ती लगबगीने जिममध्ये शिरली. समोरच सुधा दिसली. “हाय रेणू ! गुडमॉर्निंग, लुकिंग व्हेरी फ्रेश !” सुधाने तिचे स्वागत केले. ‘व्हेरी गुड मॉर्निंग सुधा. आय अॅम ऑल्वेज फ्रेश.’ रेणूचा हसत प्रतिसाद.
प्रत्यक्ष कर्म केल्याने जो आनंद मिळतो तो कदाचित त्याचे फळ मिळाल्यानंतर मिळतोच असे नाही. म्हणूनच निष्काम कर्माला जास्त महत्त्व आहे.
एक राजा होता. त्याने राज्यातील शेतकऱ्यांना सांगितले, तुम्ही शेतात फुकटचे का राबता,, वर्षाला जेवढे धान्य लागेल ते देण्याची जबाबदारी माझी. या निर्णयाने जवळजवळ सर्वच शेतकरी सुखावले ते म्हणाले की, बरे झाले. नाही तरी आपण शेतीत मरमर मरतो त्या मानाने आपल्याला धान्य मिळेलच याची खात्री नसते. आता राजाच आपणास वर्षअखेर आयते धान्य देणार आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकर्यांनी हा प्रस्ताव मान्य केला.
मात्र त्यामध्ये एक हाडाचा शेतकरी होता. त्याला हा राजाचा विचित्र सौदा आवडला नाही. त्याने या प्रस्तावाला विरोध केला. तो म्हणाला, ''मला तुमचे धान्य नको. माझ्या शेतात जे काही उगवेल तेवढेच मी माझे मानून घेईन. राजाला अर्थातच त्याचा राग आला नाही. फक्त त्याने आपल्या काही सेवकांना त्याच्यावर पाळत ठेवायला सांगितले. फुकटचे धान्य मिळणार म्हणून बरेचसे शेतकरी आनंदित झाले होते. त्यामुळे त्यांनी शेतावर जाणे तर सोडलेच पण इतरही कामधंदे सोडले.
हा शेतकरी मात्र रोज भल्या पहाटेच शेतावर जायचा. पाखरांची मंजुळ गाणी ऐकायचा. गाई-गुरांना ओंजारायचा. शेतीची सर्व कामे त्या त्या वेळी करायचा. त्यामुळे त्याचा सारा दिवस आनंदात जायचा. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेवढ्याच उत्साहाने व आनंदाने तो कामे करायचा.
दुर्देवाने त्या वर्षी पाऊस फार पडला नाही. त्यामुळे त्याच्या शेतात कमीच धान्य आले. राजाला ही गोष्ट कळली. त्याने त्याला बोलावून घेतले व म्हणाला, 'बघ तू माझे म्हणणे मान्य केले असतेस तर तुला निश्चितच जास्त धान्य मिळाले असते.
त्यावर तो शेतकरी राजाला म्हणाला, ''मला जरूर थोडेसे जास्त धान्य मिळाले असते, मात्र शेती करताना जो आनंद मला मिळायचा तो इतर कोणालाही मिळाला नाही. उलट बरेचसे शेतकरी राजा आपल्या शब्दाला जागून आपणास धान्य देईल काय? याच विवंचनेत होते''.
त्या शेतकयाने जणू राजाला निष्काम कर्माचे महत्त्व पटवून दिले होते. त्यामुळे राजाने त्याचा सत्कार करून त्याला परत पाठविले.
संज्ञा आणि सुकृत बालसोबती. दोघांची घरे शेजारी शेजारी होती. त्यामुळे दोन्ही घरात छान एकोपा होता. एकाच्या घरात शिजले तर दुसऱ्याच्या घरी द्यावे एवढेच नाहीतर एकाला वेदना झाली तर त्याची सल दुसऱ्याला जाणवायची. अशा प्रेमळ आणि सुसंस्कारित वातावरणात संज्ञा आणि सुकृत वाढत होते.
तुम्हाला कितीही मित्र असले तरी प्रत्येक क्षणी त्यांची सोबत असतेच असे नाही. विशेषतः तुम्ही एकटे असल्यावर आणि त्याच वेळेला एखादे अवघड काम तुम्हाला करावयाचे असेल किंवा एखादी अवघड जबाबदारी पार पाडायची असेल तर अशा वेळी तुम्हाला सोबतीची गरज नक्कीच भासते. अशा स्थितीत तुम्ही कोणालाही 'सोबती' करू शकता ज्याच्यामुळे तुमचे काम निर्विघ्नपणे पार पडू शकते. शहरात राहणार्या सदानंदला आई खूप आजारी असल्याचा निरोप आला. त्यामुळे तो लगेच गावी निघाला. कशीबशी एसटी मिळवून तो गावाजवळच्या फाट्यावर उतरला. तोवर सायंकाळ उलटून चांगलाच अंधार पडला होता. त्याचे गाव चार-पाच किलोमीटर अंतरावर होते. त्यामुळे फाट्यावर थांबून गावाकडे जायला कोणते वाहन मिळते का, याचा त्याने अंदाज घेतला. मात्र त्याला कोणतेही वाहन मिळाले नाही. आई आजारी असल्यामुळे घराची ओढ लागली होती. त्यामुळे त्याने पायीच जाण्याचा निर्णय घेतला. लवकर पोहचावे म्हणून सुरुवातीपासूनच त्याने वेग वाढविला होता. मात्र रस्ता खराब होता. वेडीवाकडी वळणे आणि खाचखळग्यांनी भरलेला रस्ता पाहून त्याला प्रारंभी राग आला. आपण कधी सुधारणार, असा प्रश्र त्याच्या मनात आला. आता तर तो रड्यालाच दोष देत पुढे निघाला. त्यामुळे साहजिकच त्याची चाल मंदावली. एकटाच असल्यामुळे रस्ता त्याला खायला उठला होता. सवयीचा असूनही तो कधी एकदा संपतो असे त्याला झाले होते. मात्र रस्ता संपता संपत नव्हता. थोड्या वेळाने त्याच्या मनातील विचार बदलले. लहानपणचे दिवस त्याला आठवले. शेजारच्या गावी शाळेत जाताना याच रस्त्यावरून आपण जायचो. त्यावेळी मित्रांबरोबर केलेल्या गमतीजमती त्याला आठवल्या. तो रस्ता त्याला एकदम जवळचा वाटू लागला. त्या रड्याशी आधी असणार्या मैत्रीचा साक्षात्कार त्याला झाला होता. त्यामुळे त्याने आता त्या रस्त्यालाच 'सोबती' केले होते. आता तो आनंदाने गावाकडे जात होता. त्यामुळे त्याचा चालण्याचा वेगही वाढला होता. रस्ताची ' सोबत' करीत करीत सदानंद केव्हा गावात आला हे त्याचे त्यालाच कळले नाही आणि घरी आल्यानंतर तर त्याला पाहून त्याच्या आईचा आजार कधी बरा झाला हेही अनेकांना कळले नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti