(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • भारतमातेच्या वीरांगना – ५३ – अजीजन बाई

    अजीजन बाई एक गणिका होत्या, पण मनातून क्रांतिकारी. आपल्या जवळची सगळी संपत्ती त्यांनी नाना साहेबांना दिली, देश सेवेसाठी. फक्त धनच नाही दिले तर स्वतः त्याच्याबरोबर रणभूमीवर सुद्धा उतरल्या. त्या पुरुषाचा वेष करत, कमरेला तलवार आणि हातात बंदूक, घोड्यावर स्वार होऊन रणभूमीत उतरत. त्यांनी एक गणिकांची टोळी बनवली, त्याला ‘मस्तानी टोळी’ असं नाव दिलं, प्रत्येकीला बंदूक चालवायला, तलवार चालवायला शिकवलं. जखमी क्रांतीकारकांवर इलाज करणे, त्यांना खायला-प्यायला देणे, दारुगोळा पुरवणे, अशी सगळी काम अजीजन बाईच्या नेतृत्वाखाली ही मस्तानी टोळी करत असे. वीर सावरकरांनी सुद्धा आपल्या पुस्तकात अजीजन बाईंचा उल्लेख केला आहे, ते म्हणतात, ‘अजीजन बाईंच्या हास्यावर सगळे फिदा असत, त्यांचे मधुर हास्य वीरांना प्रेरणा देत असे परत रणांगणावार जाऊन शत्रूला सामोरे जायला, परंतु एखादा जर युद्धाला पाठ दाखवून आला तर अजीजन बाई कडून त्यांना चांगलाच ओरडा बसत असे. त्या स्वतः कायम युद्धभूमीवर शत्रूवर तुटून पडत असे.’

  • आंखोका तारा – कोहिनूर (माझी लंडनवारी 14)

    सकाळचा गोंधळ संपल्यावर मी सुटकेचा निश्वास टाकला. मला सोमवारी कळणार होते की, मी कुठे जाणार होते, तरीही आता एक दिलासा होता की जर का आपल्याला कम्फर्टेबल वाटले नाही तर आपल्याला कोणीही जबरदस्ती दुसरीकडे शिफ्ट करणार नाही.

  • कोण सांगे वेळ कुठली (सुमंत उवाच – १२६)

    सुमंत जयंत परचुरे. 

    काळ हा घड्याळ काढून ठेवले तरी चालतच असतो आणि तो पडद्याआड गेलेल्या गोष्टी विसरत नाही त्यामुळे काळानुसार फळ हे मिळतेच.

  • मैत्रीण

    आई एवढचं प्रेम होत माझ्यावर तर मला का मारलं. तिला कसं सांगणार, किती दुबळी आणि असहाय होते मी. वाचवू नाही शकले तिला. म्हंटल, छकुली, अपराधी आहे तुझी, तुला पाहिजे ती शिक्षा कर मला. ती काय म्हणाली, सांगू! आई, मी तर सुटले, मुक्त झाले, पण तू जन्मठेप भोगते आहे. तुझी दशा पाहून मला ही चैन मिळत नाही. या बाहुलीत माझा ही दम घुटमळतो. लवकर ये नं. …..

  • काळोखी गुहेत (कथा २)

    खेड्यातील एक तरुण आदिवासी बाई आपल्या ३ वर्षाच्या छकुलीला कडेवर घेऊन पाणी आणण्या साठी एका ओढ्याकडे चालत निघाली होती. प्रेमाने तिचे नाव ठेवले होते प्रीती झिंटा. हात पायाच्या कड्या, पुढे आलेले पोट. खोल गेलेले डोळे, डोक्यावर हातात पाण्याची भांडी, खाच खळग्याची जमीन तुडवत एका डबक्याकडे चालल्या होत्या, भांडी कपडे धुवायचे आणी तेच पाणी पिण्यासाठी घेऊन यायचे, रोज ५ किमी चालणे तर कायमचे पुजलेले, पाण्याचे कायमच दुर्भिक्ष, पिण्या करता वेगळे पाणी असू शकते हे माहीतच नाही, विजेचा दीवा कधी पाहिलेलाच नाही, जेवणात भाताची पेज, व सुकी चवळी शिजवलेली, बटाटा कधी पाहिलेलाच नाही.

     

  • क्वालिटी : क्लॉक रेडिओची कथा

    त्या वेळेला आम्हाला क्लॉक रेडिओ डिझाईन करायचा अनुभव नव्हता. हा रेडीओ बाजारात [मार्केटमध्ये] लवकर आणता यावा म्हणून आम्ही आमच्याच कंपनीने परदेशात असाच एक क्लॉक रेडीओ डिझाईन करून त्याचे उत्पादन पण सुरु केले होते, त्याची मदत घ्यायची ठरवली. त्यांनी त्या रेडीओ मध्ये electric supply frequency ची मदत घेऊन त्यातलं घड्याळ चालवलं होत, तिकडे इलेक्ट्रिक सप्लायची कंपनसंख्या [electric supply frequency] खूपच स्थिर असल्यामुळे हे शक्य झालं होते.

  • कंट्रोलर

    त्या वेळी मी नुकताच जपान दौर्‍याहून परतलो होतो. जपानमध्ये वावरताना तेथील महागाईचा विचार मनात असे अन् स्वाभाविककपणे सारे हिशोब रुपयांत होत असत. पुण्याला आल्यानंतर रस्ते, वाहतूक इथली आणि स्वच्छता, टापटीप, शिस्त या बाबी जपानच्या, अशी तुलना सतत होत असे. एका अर्थानं मी पुण्यात सरावत चाललो होतो.

    ‘हे असंच चालायचं’ हे वाक्य जवळचं वाटू लागलं होतं. त्या वेळी मी पुण्यापासून वीस किलोमीटरवर निगडी येथे राहत असे अन् रोज बसने प्रवास करीत असे. पुण्याच्या पालिका बस स्टॅन्डवरून पिंपरी-चिंचवड-निगडीसाठी बस निघत. तर, असाच एकदा निगडीला जाण्यासाठी म्हणून बस स्टॉपवर आलो. बरीच मोठी रांग होती, पण बस डबलडेकर होती, ती मिळण्याची शक्यता अधिक होती... पण तसे व्हायचे नव्हते. दहा-बारा प्रवाशांसह मला खालीच थांबावे लागले. आता किमान वीस मिनिटांची प्रतीक्षा होती. एकूणच बस स्टॅन्डही काहीसा आळसावलेला होता. हालचाली कमी होत्या; कारण एवढ्यातच सर्व बस मार्गस्थ झालेल्या होत्या. बस स्टॅन्डवरच्या दुसर्‍या रांगेत मी होतो. तोंडात पान चघळत होतो. अचानक माझ्या समोरच्या रांगेतल्या एका प्रवाशानं काही हालचाल केली अन् बस स्टॉपवर, जिथं बस उभी राहते तिथं एक लांबलचक लालभडक पिचकारी आकाराला आली. त्या प्रवाशानं त्याच्या रंगत जाणार्‍या पानाचा मुखरस स्वतःच्या कौशल्यानं रेखाटावा तसा बाहेर फेकला होता. काळ्याभोर डांबरी रस्त्यावर लालभडक पानाची पिचकारी आकाराला आली होती. दिसायला ते फारच विचित्र दिसत होते, पण त्या प्रवाशाला किवा इतरांना त्यात वेगळे असे काही वाटत नव्हते. स्टॅन्डवर जो कंट्रोलर असतो तो बहुधा या सार्‍या घटना त्याच्या छोट्याशा खोलीतून पाहत असावा. हे सारं झाल्यानंतर तो बाहेर आला. त्यानं त्या संभावित प्रवाशाकडे एक कटाक्ष टाकला अन् वळला. बाजूला गेला. तो प्रवासी क्षणभर हबकला, पण नंतर मनाच हसला. मी मात्र तोंडात पान असल्यानं उगाचच वरमलो. तो कंट्रोलर बाजूला गेला, जिथं बसमध्ये पाणी घालण्यासाठी झार्‍या ठेवलेल्या असतात तिथून त्यानं एक झारी घेतली. ती पाण्यानं भरून काढली अन् ती झारी घेऊन तो जिथं रंगारंग झालेलं होतं तिकडे चालू लागला. स्वच्छतेची आच असली की माणूस काय करू शकतो, असा भाव तोवर प्रतीक्षा करणार्‍या प्रवाशांच्या मनात आला असावा. पण, तो जवळ येऊन थांबला, त्यानं ती झारी तिथंच ठेवली, पुढे येऊन म्हणाला, ‘‘ओ, मिस्टर, या पुढं. घ्या ती झारी अन् साफ करा ते सारं.’’ हे त्या प्रवाशाला आणि आम्हालाही अपेक्षित नव्हतं; पण घडलं. मी पिचकारी मारली नाही, असं रेटून बोलण्याची संधीही त्या कंट्रोलरनं दिली नाही. तो प्रवासी निमूटपणे पुढे आला. हातात झारी घेऊन त्यानं स्वतःच्या मुखरसानं रंगलेला रस्ता स्वच्छ केला आणि आपल्या जागेवर येऊन बसला. अवघ्या दहा मिनिटातला हा सगळा प्रसंग, पण त्या प्रवाशाला त्याची चांगली अद्दल घडली होती. कधी काळी पान खाऊन तोंड रंगवणार्‍या मलाही ‘आपण किती पाण्यात’ याची जाणीव झाली होती. बस स्टॉपवरचा प्रत्येक माणूस त्या कंट्रोलरकडे अत्यंत आदरानं, विस्मयानं पाहत होता. तो प्रवासी मात्र आता बस लवकर येऊ देत, अशी प्रार्थना करीत असावा.

    हे सारं आज आठवण्याचं कारणही तसंच आहे. आजच्या वृत्तपत्रात एक वाचकाचं पत्र वाचलं. एका वृद्धानं लिहिलंय ते. पत्रातच त्यांनी स्वतःचं वयही दिलंय. ते म्हणतात, ‘‘पुण्यात किवा महाराष्ट्रात हेल्मेटची सक्ती करण्याचा कायदा झाला. त्यावर आंदोलनं झाली, तरीही कायदा अस्तित्वात आला. काही दिवस कारवाईच्या बातम्या येत असत. आता त्याही बंद झाल्यात. पुण्यातील हेल्मेटसक्ती रद्द झाली आहे का, कृपया संबंधित खात्यानं खुलासा करावा.’’ हे पत्र वाचताना पुण्यात हे असं पत्र येणारच असं मनात येत होतं; पण हेल्मेटच्या सक्तीसाठीचं या वृद्धानं दिलेलं कारण आणखीही ज्ञानात भर टाकणारं होतं. पत्रात म्हटलं होतं, की हेल्मेट वापरणार्‍या व्यक्तीला दुचाकीवर बसून पान, तंबाखू किवा अशीच पिक मारता येत नाही. स्वाभाविकपणे माझ्यासारख्या वृद्धाचे कपडे रंगण्याचं प्रमाण कमी होण्याची शक्यताही आता हेल्मेट वापराचं प्रमाण संपल्यानं मावळली आहे. ते असंही म्हणतात, की मी मोपेड वापरतो. या वयात तेच सोईचं पडतं, पण अशात कोणी पिक मारली, तर वेगानं जाऊन त्याची गच्ची पकडण्याची क्षमताही आता नाही; तेव्हा हेल्मेटचा हाही एक लाभ होता.

    या वृद्धानं व्यक्त केलेलं मत पुण्याशी संबंधित असलं तरी गावाचं नाव कोणतंही टाका, वास्तव तेच असेल, अशा प्रकारचं आहे. माझ्या जपान दौर्‍याला पंधरा-वीस वर्षे झाली. बदल खूप झाले, पण माणसं आणि त्यांचं हे असं वागणं कायम आहे. हे पत्र वाचताना ही जाणीव मला सातत्यानं होत होती खरंच, पीएमटीच्या त्या कंट्रोलरसारखे जागोजागी निर्माण झाले तर?तुम्हाला काय वाटतं?

    -- किशोर कुलकर्णी

  • भिक्षापात्र

    राजमहालाच्या दारात मोठा गदारोळ उडाला होता.
    जवळपास सगळी नगरी तिथे लोटली होती.

    प्रसंगच तसा होता.

    त्या दिवशी भल्या सकाळी एक भिक्षुक राजाच्या महाली
    भिक्षा मागण्यासाठी आला होता.

    राजा म्हणाला, तू पहिला याचक आहेस आजच्या दिवसातला.
    काय हवं ते माग. मिळेल.

    भिक्षुक म्हणाला, माझ्याकडचं भिक्षापात्र फारच छोटं आहे.
    त्यात बसेल एवढीच भिक्षा मला पुरेशी आहे.
    पण, वचन देण्याआधी विचार कर.
    जमेल का?

    भिक्षुकाच्या हातातलं अतिशय छोटं भिक्षापात्र पाहून राजा हसून म्हणाला,
    अरे याचका, माझ्याकडच्या संपत्तीची गणती नाही,
    माझ्या राज्याला सीमा नाही. हे छोटंसं भिक्षापात्र भरण्यात काय अडचण.

    राजाने नोकरांकरवी आपल्या खजिन्यातले उत्तमोत्तम जडजवाहीर मागवले
    आणि त्यांनी ते भिक्षापात्र भरायला सांगितलं...

    ...संध्याकाळ उजाडली तरी ते भरणं सुरूच होतं...
    ...राजाचा सगळा खजिना रिता झाला होता,
    आपल्या लाडक्या राजावर खजील होण्याची पाळी यायला नको,
    म्हणून प्रजाजनांनी आणलेली त्यांच्या घरची संपत्तीही त्यात गायब झाली होती.

    रात्र झाली तसा राजा भिक्षुकाच्या पायावर कोसळला आणि म्हणाला,
    महाराज, माझ्याकडे हे पात्र भरण्याइतकी संपत्ती नाही.

    भिक्षुक म्हणाला, अरेरे, उगाच माझा दिवस वाया गेला.
    सकाळीच सांगितलं असतं तर पुढे गेलो असतो.

    पात्र उलटे करून सगळी संपत्ती ओतून तो पुढे निघाला.

    राजा धावत त्याच्या मागे गेला आणि हात जोडून त्याने विचारलं,
    भगवन्, मला फक्त एक सांगा. या इतक्याशा भिक्षापात्रात
    माझा सगळा खजिना रिता झाला, तरी ते भरलं नाही.
    असं काय आहे या भिक्षापात्राचं वैशिष्ट्य?

    भिकारी म्हणाला,
    ते मलाही माहिती नाही.
    हे भिक्षापात्र मी माणसाच्या कवटीपासून तयार केलं आहे.
    त्यातच माणसाचं मन असतं म्हणतात.
    आणि
    ते
    कशानेही भरत नाही.

  • जिंगल्स आणि बरेच काही

    गाणे हा एक योग असतो, हे विलासचे म्हणणे मला पटले. कारण अजून दोन उत्तम योग यापुढील काळात आले. मुंबई विभागाच्या संस्कृत विभागासाठी पं. वेलणकर यांनी लिहिलेले आणि संगीतकार प्रभाकर पंडित यांनी स्वरबद्ध केलेले माझ्या आयुष्यातील पहिले संस्कृत गीत गायलो. रेकॉर्डिंगच्या वेळी पं. वेलणकर यांना भेटलो. पत्रावर पत्ता लिहिताना आपण जो पिनकोड नंबर लिहितो, त्याचे जनक पं. वेलणकर आहेत, असे प्रभाकर पंडितांनी सांगितल्यावर मी अवाकूच झालो. माझ्या गाण्यामुळे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या किती नामवंत व्यक्तींना भेटण्याची संधी मिळाली, याची यादी केली तर एक वेगळेच पुस्तक लिहावे लागेल. संगीताच्या आराधनेमुळे झालेल्या अगणित फायद्यांपैकी एकही फायदा गाणे शिकायला सुरवात करताना मला माहीत नव्हता.

    आर्टिग ॲडव्हर्टायझिंग प्रायव्हेट लिमिटेडचे श्री. उजगरे यांच्यामुळे अजून एक योग आला. त्यांनी काही जाहिरातींसाठी गाण्याची ऑफर दिली. जाहिरातींच्या मागे जे गाणे असते त्यांना 'जिंगल्स' असे म्हणतात. नामवंत गायिका कविता कृष्णमूर्तीला अनेकदा स्टुडिओत मी जिंगल्स गाताना पाहिले होते. या क्षेत्रातील ती आघाडीची गायिका होती. एक जिंगल ही जास्तीत जास्त वीस ते तीस सेकंदाची असते. पण स्टुडिओत त्याचे काम कित्येक तास चालते. कारण इतक्या कमी वेळात परिणाम साधायचा असतो. जाहिरातीचे व्यावसायिक रेकॉर्डिंग असल्यामुळे जिंगल्सचे मानधन बरेच जास्त असते. आर्टिग अॅडव्हर्टायझिंगने स्टारडस्ट इमर्जन्सी बॅटरीजूच्या जाहिरातीचे काम घेतले होते. या बॅटरीच्या वेगवेगळ्या नऊ जिंगल्स माझ्या आवाजात रेकॉर्ड झाल्या. या सर्व जाहिराती भारताबाहेर दुबई आणि इतर आखाती देशात वाजणार होत्या. त्यामुळे आपल्या टीव्ही किंवा रेडिओवर ऐकू येणार नव्हत्या. पण या जिंगल्समुळे जाहिरातीच्या क्षेत्रात माझा शिरकाव झाला. या जिंगल्सचे रेकॉर्डिंग ऐकून काही संगीतकारांनी मला काम दिले.

    यानंतर गवाणकर ट्रस्टसाठी साईबाबांची दोन भजने मी गायलो. सुरेश वाडकर, अनुपमा देशपांडे आणि त्यागराज खाडिलकर असे मान्यवर गायकही या कॅसेटमध्ये गायले होते. विशेष म्हणजे या कॅसेटचे प्रकाशन शिर्डीमध्ये साईबाबांच्या मंदिरात झाले आणि शिर्डीत या गाण्यांचा एक कार्यक्रमही झाला. त्यामुळे शिर्डीला जाण्याचा योग आला.

    एके दिवशी सकाळी माझी काकू दीपा जोशीचा फोन आला. तिने सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. नागराज राव यांना तातडीने भेटायला सांगितले. रावसरांनी Geeta's witness या नावाचे छोटे पुस्तक लिहिले होते. संकल्पना अशी होती की, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जेव्हा गीता सांगितली, तेव्हा त्याचा एकच साक्षीदार होता, तो म्हणजे अर्जुनाच्या रथावरील ध्वजाशेजारी बसलेला मारुती. भक्त मारुतीरायांना विनंती करतो की, गीता समजायला जड जाते. त्याचा अर्थ नीट उमगत नाही. तू गीतेचा एकमेव साक्षीदार आहेस. तरी ही गीता सोप्या शब्दात मला समजावून सांगा. सुप्रसिद्ध लेखक श्री. विद्याधर गोखले यांनी या पुस्तकाचे मराठीत भाषांतर केले. 'गीतेचा तो साक्षी वदला'ची एकूण २६ गाणी झाली. आता या गाण्यांचे रेकॉर्डिंग करून त्याची कॅसेट करण्याचा प्रोजेक्ट होता. यासाठी माझ्याबरोबर तरुण संगीतकार कौशल इनामदार याला बोलावण्यात आले होते. रावसरांनी ही संकल्पना आम्हा दोघांना सविस्तरपणे समजावून दिली. रावसरांची हातोटीच अशी होती की, नकळत त्यांनी आम्हाला या प्रोजेक्टमध्ये सामील करून घेतले. या पुढील दीड महिन्याचा काळ रावसरांच्या सान्निध्यात आम्ही चक्क गीता शिकलो. कौशलने सर्व गाण्यांना अतिशय छान चाली लावल्या. आम्ही रेकॉर्डिंग स्टुडिओत पोहोचलो. गाण्यांचे वाद्यवृंद संचालन कमलेश भडकमकरने केले. सुरुवातीची दोन गाणी गायक अजित परब याने, तर मारुतीवाणीची चोवीस गाणी माझ्या आवाजात रेकॉर्ड झाली. 'गीतेचा तो साक्षी वदला' या कॅसेटचा प्रकाशन समारंभ ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये संपन्न झाला. कॅसेटबरोबर त्यातील गाण्यांच्या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. या कार्यक्रमात कॅसेटमधील काही गीते आम्ही सादर केली. कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली आणि रसिकांचा भरपूर प्रतिसादही मिळाला. या आगळ्या-वेगळ्या प्रोजेक्टमध्ये सहभागी केल्याबद्दल मी दीपा जोशी आणि नागराज राव या दोघांचाही कायम ऋणी राहीन. यानंतर कौशलने आणि मी अनेक कार्यक्रम आणि रेकॉर्डिंग्ज एकमेकांबरोबर केली.

    यानंतर जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे खेड-मंचर येथील अधिवेशनात माझा गझलचा कार्यक्रम झाला. इंद्रधनूतर्फे अनिल मोहिले यांनी वाद्यवृंद संचालन केलेल्या विविध संगीतकारांच्या गाण्यांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात संगीतकार कल्याणजी-आनंदजी, श्रीनिवास खळे, यशवंत देव, माझे गुरू श्रीकांत ठाकरे, भूपेन हजारिका अशा अनेक मान्यवर संगीतकारांसमोर त्यांनीच स्वरबद्ध केलेली काही गाणी मी सादर केली. या कार्यक्रमात माझे गाणे ऐकून संगीतकार कल्याणजी आनंदजी यांनी त्यांच्या एका कार्यक्रमात मला गाण्यासाठी बोलावले. या कार्यक्रमात संगीतकार अनिल मोहिले यांनी स्वरबद्ध केलेले आगामी मराठी चित्रपटातील गाणेही मी सादर केले.

    टेलिव्हिजनवरही माझे कार्यक्रम सुरू होतेच. दूरदर्शनच्या निर्मात्या किरणताई चित्रे यांनी माझ्यावर खूपच विश्वास टाकला. विलास डफळापूरकरच्या 'शब्दांच्या पलीकडले'मध्ये मी गायलो. त्यानंतर काही महिन्यातच संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या शब्दांच्या पलिकडले या कार्यक्रमासाठी मी गीतकार सुधीर मोघे यांचे गीत गायले. या गाण्याने त्या काळात मला बरीच लोकप्रियता दिली. 'संगीतावली' या नॅशलन नेटवर्कवरील दीपावलीच्या खास कार्यक्रमासाठी लोकप्रिय गायक हरीहरन यांच्याबरोबर गाण्याची संधी मला मिळाली. गीतकार शंकर वैद्य यांचे गाणे मी गायलो. यानंतर निर्माते शरण बिराजदार यांच्या 'सूरसंगम' या कार्यक्रमात मी काही गाणी सादर केली.

    १९९८ हे वर्ष माझ्यासाठी एक नवे क्षितीज घेऊन अवतरले. बऱ्याच वेळा आपल्याला कल्पनाही न देता नशीब आपल्याला एक सुखद धक्का देते. डॉ. विजय बेडेकर हे ठाण्यातील एक प्रथितयश डॉक्टर होतेच, पण त्याचबरोबर ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड या बँकेचे अध्यक्षही होते. बेडेकर परिवाराशी माझ्या वडिलांपासून आमचे घरगुती संबंध होते. या बँकेशी आमच्या कंपनीचे व्यवहार होते. त्यामुळे डॉक्टरांची भेट वरचेवर होऊ लागली. डॉक्टरांचा कामाचा झपाटा, त्यांची सामाजिक कामांबद्दलची तळमळ याचा विलक्षण प्रभाव माझ्यावर पडला. एक दिवस त्यांनी घरी बोलावले.

    “अनिरुद्ध आता बँकेच्या निवडणुका जवळ येत आहेत, तुला बँकेच्या डायरेक्टर पदासाठी निवडणूक लढवायची आहे."

    डॉक्टरांच्या शब्दांवर माझा विश्वासच बसेना. एक ग्राहक आणि भागधारक म्हणून व्यक्तिगत आणि कंपनीचे बँकेबरोबर व्यवहार करणारा मी कधी या बँकेचा डायरेक्टर होईन, असे मला स्वप्नात देखील वाटले नव्हते. केवळ डॉक्टरांच्या प्रेरणेने हे नवीन आव्हान पेलायला मी तयार झालो. मला निवडणूक लढवावी लागली नाही. आमचे पॅनल बिनविरोध निवडून आले. मी ठाणे भारत सहकारी बँक लि. या सहकारी बँकेचा डायरेक्टर झालो. आमचे अध्यक्ष श्री. मा.य. गोखले, तर उपाध्यक्ष श्री.. उत्तम जोशी होते. त्यांच्याबरोबरच इतर डायरेक्टर्स श्री. माधव नातू, श्री. चंद्रशेखर परांजपे, श्री. महाजन, श्री. मिलींद गोखले, डॉ. रणदिवे, श्री. वसावडा अशी सर्वच ठाणे शहरातील नामवंत मंडळी होती. यांच्यापेक्षा सर्वार्थाने मी लहान होतो. त्यावेळी मी फक्त ३६ वर्षांचा होतो. इतक्या कमी वयात इतकी मोठी मानाची पोझिशन मला मिळाली होती. या सर्वांकडूनच त्या काळात मला भरपूर शिकायला मिळाले. बँकेच्या अनेक कार्यक्रमात गायक म्हणूनही मी सहभाग घेतला. बँकेमुळेच मुख्यमंत्री मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या भेटीचा योग आला. फक्त या वाढीव जबाबदारीमुळे माझे कामाचे वेळापत्रक जास्तच व्यस्त बनले.

    त्या वर्षी राजभवनावर आणखी एक कार्यक्रम मी केला. महात्मा गांधी जयंतीनिमित्त 'भजन प्रभात' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांच्याबरोबर ऑस्ट्रेलिया, केनिया, झांबिया आणि बांग्लादेश यांचे राजदूत या कार्यक्रमाला उपस्थित होते. सरस्वती विद्या मंदिराच्या क्रीडासंकुलातील लोकमान्य टिळक सभागृहाचे उद्घाटन लोकमान्यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी श्रीमती कर्वे यांनी लिहिलेल्या लोकमान्यांवरील एका खास गाण्याचे गायन मी केले.

    -अनिरुद्ध जोशी

  • चलबिचल निवारक (संक्षिप्त रूपांतरीत कथा १२)

    त्या क्रूर राजाच्या रिंगण-मैदानांत ‘सुंदरी की वाघ’ या नांवाने ओळखली जाणारी घटना घडली त्याला एक वर्ष होऊन गेलं होतं. अशा वेळी एका दूरच्या देशांतून पाच जणांचं एक शिष्टमंडळ राजाच्या महाली आलं.
    ह्या विद्वान आणि आदरणीय मंडळींचे राजाच्या एका महत्त्वाच्या अधिका-याने स्वागत केलं व त्यांनी त्याला आपल्या तिथे येण्याचा उद्देश सांगितला.