नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर….
March 22, 2018
इतक्यात घड्याळाचा टोल वाजतो आणि त्यामुळे आदित्य दचकतो. काही क्षणातच पुन्हा त्याला, त्याच्या आरामखुर्ची हलण्याचा आवाज येतो. इतक्यात थंडीतही आदित्यच्या कानामागून घाम ओघळू लागतो. आदित्य हळूहळू आरामखुर्चीच्या दिशेने निघतो आणि समोर जे काही बघतो, ते बघून त्याची पाचावर धारण बसते.
February 4, 2026
रात्रीची आल्हाददायक झुळूक हळूच मला खुणावते आणि मी नकळत तुझ्याकडे वळते. आणि तुझ्या शीतल छायेत आल्यावर माझ्या अंगावर चांदण्याची फुलं बिनधास्त उधळतोस तू..
July 2, 2020
समुद्राचं आकर्षण कोणाला नसतं? समुद्र आणि त्याचं अथांगपण हे मानवी आयुष्याला वेढून टाकणार आहे. आपण सामान्य माणसं आपलं सरळसोट आयुष्य जगत असतो, त्यावेळी समुद्रावर, तेथील जहाजांवर असणारे दर्यावर्दी, त्यांचं पाण्यावर तरंगणारं जीवन कसं असेल याचंही एक सुप्त आकर्षण आपल्या मनात असतं. समुद्रावरील जहाजे महिनोंमहिने त्या अथांग प्रवाहावरून दूरदेशी जात असतात. त्या आयुष्यात आव्हाने आहेत, साहस आहे, रोमांचकारी अनुभव आहेत. जमिनीपासून दूर जाऊन खूप मोठा काळ काढणं हा विचारच किती रोमांचक आहे. अशा सागरी जीवनाचे चित्र रेखाटणारी दोन पुस्तके अशाच प्रकारचे अनुभव व माहितीचा विलक्षण खजिना आपल्यासमोर ठेवतात.
November 13, 2022
सर्वात सुखी कोण? ही गोष्ट थोडक्यात अशी आहे.’ एक कावळा रानावनात स्वतंत्र व स्वच्छंद जीवन जगत असतो. स्वतःला तो फार सुदैवी व सुखी मानत होता. एकदा त्याला पाण्यात पोहणारे बदक दिसले. त्याचा शुभ्र रंग पाहून स्वतःच्या काळेपणाचे त्याला दुःख वाटले.
January 12, 2025
पावसाच्या धारा
येती झरझरा
झाकळले नभ, सोसाट्याचा वारा.
रस्त्याने ओहळ
जाती खळखळ
जागजागी खाचांमध्ये तुडुंबले जळ.
ढगावंर वीज
झळके सतेज
काळ्या शालूवरी जरीकाठाचा की साज.
झोंबे अंगा वारे
काया थरथरे
घरट्यात घुसूनिया बसली पाखरे.
हर्षलासे फार
नाचे वनी मोर
पानातून हळू पाहे डोकावून खार.
पावसाच्या धारा
डोईवरी मारा
झाडांचिया तळीं, गुरे शोधिती निवांरा ।
नदीलाही पूर
लोटला अपार
फोफावत धावे जणू नागीणच थोर ।
झाडांची पालवी
चित्ताला मोहवी
पानोपानी खुलतसे रंगदार छबी ।
थांबला पाऊस
उजळे आकाश
सूर्य येई ढगातून, उधळी प्रकाश ।
किरण कोवळे
भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्ये जग सारे खुले ।
पावसात न्हाली
धरणी हासली
देवाजीच्या करणीने मनी संतोषली
June 30, 2026
मॉल प्रशस्त होता, हायफाय होता, आकर्षक होता. चकचकीत होता आणि अत्याधुनिक होता. इंटिरिअर भुरळ पडणारे होते. कुठल्याही बाजूने पाहिले तरी सहज दिसणारे, उंचावर असणारे, रंगीत, झगमगीत असे मॉलचे नाव खुणावत होते. मटालोखा मॉल
May 20, 2021
प्राचीन काळी ऋषिमुनी विद्यादानाचे काम करीत असत. त्यांचे आश्रम म्हणजे वेदाभ्यासाच्या शाळाच असत. अनेक शिष्य आश्रमात राहून विद्याभ्यास करीत होते. ऋषिमुनींनासुद्धा वेदविद्यापारंगत शिष्यांकडे पाहून कृतार्थ झाल्यासारखे वाटे. अध्ययन संपले की, काही ना काही गुरुदक्षिणा देण्याचा प्रघात होता. त्याशिवाय गुरुंचे ऋण फिटले असे समजत नसत.
November 25, 2025
१ ऑक्टोबर २००२ रोजी ठाणे महानगरपालिकेचा ठाणे गुणिजन पुरस्कार मला मिळाला. अध्यक्षस्थानी ठाण्याचे महापौर रमेश वैती, तर प्रमुख पाहुणे ठाण्याचे माजी महापौर सतीश प्रधान होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येतो. विख्यात व्हायोलिन वादक पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या एन्. राजम या संगीताच्या क्षेत्रातील माझ्याबरोबरच्या मानकरी होत्या.
हा पुरस्कार आणि पेढे घेऊन मी लगेचच माझे गुरु पं. विनायकराव काळे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो. रागदारी संगीतातील महान व्हायोलिनवादक श्रीमती एन्. राजम यांच्याबरोबर मला हा पुरस्कार मिळाल्याचे ऐकून सर विशेष आनंदित झाले. 'कितीही पुरस्कार मिळाले आणि कार्यक्रमांची संख्या कितीही वाढली तरी येणारा प्रत्येक कार्यक्रम आणि रेकॉर्डिंग हे एक नवीन आव्हान असणार आहे हे कधीही विसरू नकोस.' सरांचा हा मोलाचा सल्ला कानात रेंगाळत असतानाच आणि उद्या गाण्याच्या क्लासला यायचे आहे हेही विसरू नकोस. हे त्यांचे पुढील शब्द कानावर पडले. संगीताच्या क्षेत्रात ऋषितुल्य काम करणारे काळे सरांसारखे गुरू मला लाभले हे माझे केवढे मोठे भाग्य! दुसऱ्या दिवशी माझ्या ठरलेल्या वेळी संध्याकाळी साडे सात वाजता सरांकडे गेलो. सर सकाळी सहापासून शिकवायला सुरवात करत. माझा क्लास हा त्या दिवशीचा शेवटचा क्लास असायचा. "कालच तुला पुरस्कार मिळाला आहे ना, मग आज तुझा आवडता राग घेऊ या." असे म्हणत सरांनी मालकंस राग गाऊन घेतला. आपल्या गुरुंसोबत गाणे ही आनंदाची पर्वणी असते. आपण अगदी निर्धास्तपणे काहीही वेगळे गाऊ शकतो. कारण त्यात काहीही चुकले तर गुरू आपले बोट धरून पुन्हा आपल्याला योग्य त्या ठिकाणी आणतात. त्यादिवशी सरांनीच स्वरबद्ध केलेल्या 'शतरंजकी चाल' आणि 'कारी कारी कारी कजरीया' या मालकंसमधील रचना गाताना फारच आनंद झाला. गाणे संपवून तानपुरा खाली ठेवताना मला कल्पनाही नव्हती की सरांबरोबरचे हे माझे शेवटचे गाणे असणार आहे. आणि माझा क्लास त्या दिवशीचाच नव्हे तर सरांचाही शेवटचा क्लास असणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळीच मंगलाताईंचा फोन आला की बापूंना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलंय. तातडीने हॉस्पिटलला पोहोचलो. सरांना अस्वस्थ वाटत होते. तेव्हाही मला म्हणाले,
“काल चांगला गायलास. फक्त आलापी करताना घाई करू नकोस. स्वरांचा आनंद घेत आलाप गावेत.”
“मला नाही जमत ते अजून. तुम्ही लवकर बरे व्हा आणि मला शिकवा, मी म्हणालो. पण ती वेळ कधीच येणार नव्हती. दुसऱ्याच दिवशी सकाळी ४ ऑक्टोबर २००२ रोजी काळे सर आम्हा सर्वांपासून खूप दूर निघून गेले. पुन्हा कधीही परत न येण्यासाठी. सरांचा सहवास मला चोवीस वर्षे लाभला. सरांकडून फक्त गाणेच नाही तर बरेच काही शिकलो. ईश्वराला आपण दयाळू म्हणतो, पण तो तितकाच निष्ठुरदेखील आहे. आपली आयुष्ये समृद्ध करण्यासाठी सरांसारखी ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्व तो आपल्या संपर्कात आणतो म्हणून दयाळू. तर आपल्याला कोणतीही कल्पना न देता अचानक तो अशा व्यक्ती आपल्यापासून दूर घेऊन जातो म्हणून निष्ठुर. सरांच्या मृत्यूमुळे माझ्या आयुष्यात एक भयंकर पोकळी निर्माण झाली. आजही मंगळवार आणि शुक्रवारी साडेसात वाजले की तंबोऱ्याचा नाद, त्यावर सरांचा विलक्षण आवाज आणि एका रागाची सरांनीच स्वरबद्ध केलेली रचना कानामध्ये ऐकू येऊ लागते आणि डोळ्यात अश्रू तरळतात.
- अनिरुद्ध जोशी
July 24, 2022
सौंदर्याचा अभिमान, प्रचंड अहंकार, हट्टीपणा, आणि आवडलेली कोणतीही गोष्ट हस्तगत करण्याची जीद्द हे तीच्या स्वभावांत होते. एक गमतीची गोष्ट म्हणजे तीची नखे पसरट सुपाप्रमाणे होती ( winnow- like nails ). ती तिक्ष्ण होती. म्हणून तीचे टोपण नांव शुर्पणखा
April 10, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti