नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
कवितेच्या प्रेमात पडलो ! पण कवितेशी यमक कधीच जुळविता आले नाही …
जयंतीलाल ठाणावला एक नाव नव्हते तर खऱ्या अर्थाने ते ठाण्याचे भूषण होते, खरे ‘ ठाणावला ‘ होते. ठाण्याची तलावपाळी सर्वानाच माहीत आहे परंतु सध्या बोटींग क्लब समोरील चढण आहे त्यापासून पुढे दत्तमंदिर पर्यंतचा भाग लालबाग म्हणून ओळखला जातो, तेथील जयंतीलाल ठाणावला यांची प्रॉपर्टी होती
औरंगाबाद जळगांव रस्ता खराब आहे, हे समजायला मोठ्या हाॅस्पीटलमधे जाऊन पैसे खर्च करून घ्यावे लागतात, ही झालेली प्रगती काय कमी आहे ?
‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर….
रामानुज नावाचे एक थोर संत आणि विचारवंत होऊन गेले. त्यांचा मोठा शिष्य समुदाय होता. एक दिवस त्यांचा एक शिष्य त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला “मला परमेश्वरप्राप्ती करायची आहे. मला प्रार्थना करायला शिकवा. कुठून सुरुवात करु तुम्हीच सांगा.”
ज्याला मी “निळ्या डोळ्यांचा जादूगार ” म्हणतो त्या राज कपूरला सतत भव्यतेचे उत्कट वेड होते. त्याअर्थाने त्याने ७० एम एम पेक्षाही भव्य दिव्य स्वप्नप्रसंग चित्रित केले. केव्हढा आवाका असलेला हा कलावंत – निर्मितीत कोठेही तडजोड न करणारा.
एका छोट्याशा प्रसंगातून, एक रोमांचकारी भावनिक आणि जीवनाच्या महान तत्वज्ञानाचे विवरण मी त्या गृहस्थाकडून ऐकत होतो. त्यानी जे सांगीतले, त्यानी मी भारावून गेलो. जीवन म्हणजे काय ? जगायचे कसे व कां हे त्यानी जाणले असावे, हे मला उमगले. मी उठून त्याना अभिवादन केले.
आता काळ बदलला आहे आता पक्ष सोडून, पदास लाथ मारून दुसऱ्या पक्षात गेलेल्या लोकांना परत पक्षात आणून रेड कार्पेट घालून त्यांना पूर्वीचे पद बहाल केले जाते कारण आता धर्म नव्हे तर पैसा बोलतो.
नमस्कार मित्रांनो, आजची कथा थोडी मोठी आहे, पण सत्य आहे आणि माझ्याच बाबतीत घडलेली आहे. कथा हरवलेल्या वॉलेटची!
मी लहान असताना आमच्या रानात राहायला होतो त्यावेळी रानात गावात सुद्धा लाईट नव्हती. गावात ठराविक ठिकाणी ग्रामपंचायतीने बसवलेले रॉकेलचे दिवे होते. रानात तर भयानक अंधार माजलेला असायचा एखाद्यावेळी रातकिडे रात्रीच्यावेळी फिरत होते. या रात किडयाला आजी काजवा असे म्हणत. काजव्याच्या प्रकाशातून थोडे फार शेतीचे दर्शन व्हायचे. परंतु हेकिडे रात्रीच्या अंधारात मला सुंदर असे दिसत होते. आमच्या घरामध्ये एक मिणमिणता रॉकेलचा दिवा व दुसऱ्या बारक्या खोलीत एक कंदील. याचं कंदिलाच्या प्रकाशात मी अभ्यास करीत असे परंतु निसर्गातील झाडावरच्या पशु पक्षाने केलेली हालचाल. त्यांचे ओरडणे मधेच घू असा आवाज काढणारे घुबड मधेच ओरडत होते. अधून मधून माझ्या मनाला भीती वाटत असे दिवसभर कष्ट करून शेतात काम करणारे शेतकरी. रात्रीच्या वेळी निवांत झोप घेता त त्यांना रात्रीच्या वेळी त्या पक्षांचा आवाज व त्यांच्या पंखांचा आवाज कुठून येणार. परंतु राणची गार हवा हिरवागार निसर्ग हे माझ्या मनामध्ये आनंद निर्माण करत होते. परंतु रात्रीच्या वेळी आवाज करणारे झाडावर विश्रांती करणारे पक्षी त्यांचा आवाज अजून पर्यंत माझ्या कानावर आहे. हा मंद मंद प्रकाश देणारा कंदी अजून माझ्या लक्षात आहे एवढे मात्र निश्चित. लहानपणाच्या सुखद आठवणी अजून आठवतात त्या वेळची प्रेमळ मनाची माणसं आता निघून गेली. सध्या तर सर्वच ठिकाणी लाईट आली आहे परंतु लाईट मध्ये वावरणारी माणसं सैराट अवस्थेत इकडून तिकडे फिरतात. फिरताना कोण कोणाशी बोलत नाही जो तो आपापल्या वाटेने निघून जातो. अलीकडची माणसे शिक्षणाच्या जोरावर ती कोण बोलत नाही. पूर्वीचे दिवस गेले राहिल्या फक्त आठवणी..।
.. धन्यवाद..।
-–विशाल
Copyright © 2025 | Marathisrushti