(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • नवे? तेही सोनेच! (माझी लंडनवारी – 26)

    मग शुक्रवारी रात्री आम्ही खूप एन्जॉय केलं. खूप उशिरापर्यंत गप्पा, गाणी, परत शेवटची हाईड पार्कची चक्कर अस करत आम्ही 3-4 वाजता झोपलो. आता उद्या जाण्याचं काही टेन्शन नव्हत. आपलीच मंडळी होती तिथे.

  • ते त्रिकोणी कुटुंब (एक सत्यकथा)

    नियती मात्र या कुटुंबावर पहिला आघात करण्याला सिद्ध झाली होती. २००६ साली ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात चंदू आजोबा आश्चर्यकारकपणे वाचले. अगदी नेमकं सांगायचं तर त्या पहिल्या वर्गाच्या डब्यात ते एकटेच वाचले होते. स्फोटामुळे कानाना प्रचंड दडे बसले होते , रक्त येत होतं , आजूबाजूची अंगावर शहारे आणणारी परिस्थिती पाहून मनावर प्रचंड आघात झाला होता.

  • ओसरून जाई लाट (सुमंत उवाच – ११८)

    सुमंत जयंत परचुरे. 

    सुख आपण काही काळचं लक्षात ठेवतो पण, दुःख मात्र अनंतकाळ चघळत बसतो. काय हे किती संकटं येतायत नुसती एका मागून एक सुरूच आहेत. कसा निभाव लागायचा देवास ठाऊक आता. हे देवा तूच सांभाळून घे रे आता. अशा विनवण्या आपण सतत करत रहातो.

  • जगाने उरी जी धरावी गझल

    जगाने उरी जी धरावी गझल
    अशी एक मजला सुचावी गझल
    मला लोक हे गुणगुणू लागले
    कुणी लाख माझी न गावी गझल

    —- प्रदीप निफाडकर

  • खोलवर रुजलेल्या ‘वेदना’

    देवा, हे लपंडावाच दुष्टचक्र पुरे झालं आता. माझे कान आसुसलेत ‘आई’ अशी हाक ऐकण्यासाठी. मी पुन्हा वाट पाहिन तुझ्या येण्याची. मी पुन्हा स्वप्न रंगवणार तुझ्यासाठी. पण पुन्हा येवून जाऊ नकोस. आता पुन्हा आम्हाला सोडून जाऊ नकोस!

  • बालगंधर्व

    मराठी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर एकूण भारतीय चित्रपटसृष्टीतच दर्जेदार चरित्रपटांची वानवा आहे. शंभर वर्षांची परंपरा सांगणार्‍या भारतीय चित्रपटसृष्टीला खरं तर अशोभनीय अशी ही बाब आहे. परंतु, ही बाब ठळकपणे जाणवून देणारी एक आशादायक घटना म्हणजे ‘“बालगंधर्व”’ हा चित्रपट!

  • वेग नेई क्षितिजा वरती (सुमंत उवाच – ११९)

    सुमंत जयंत परचुरे. 

    प्रगतीची वाट सापडली की त्यावर पायाला चाकं फुटतात. मग वेग वाऱ्यापेक्षा अधिक होतो आणि यशाची गाडी धावू लागते. मन आनंदी होते, यश सुखावते, कष्ट मागे पडतात, श्रम वाहून जातात त्या यशाच्या अलोट महापुरात पण, त्या यशाच्या-प्रगतीच्या शिखरावर पोचलं आणि जाणवलं की आपण येथे एकटेच आहोत? तर?

  • नाट्यछटा – गो कोरोना …..

    सांग सांग भोलानाथ,
    शाळा सुरू होईल काय?
    कोरोनाचं संकट टळून
    शाळा उघडेल काय?

    भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
    आठवड्यातून बाहेर जायला मिळेल का रे एकदा
    भोलानाथ भोलानाथ

    आई, ए आई ऽ ऽ , बाबा ऽऽऽ कुठे आहात सगळे?
    मला जाम कंटाळा आलाय? बाबा कधी जायचं शाळेत, निदान समोरच्या बागेत तरी जाऊदे ना? चार दिवस झाले मी कुठेही गेले नाहीये.

    ए आई काय करीत होतीस, भांडी घासत होतीस? अगं त्या मावशी का नाही येत आहेत आपल्याकडे? हे सगळं काय चाललंय?

    अग हो कोरोना कोरोना कोरोना हेच ऐकतेय नुसतं. म्हटलं ना आपण ‘गो कारोना’ तरी हा कोरोना जात का नाहीये? मला तर जाम कंटाळा आलाय. हो ग धुतले ग हात किती वेळा धुऊ. हो अगदी चोळून धुतले गं त्या जाहिरातीतल्या बंटीसारखा विचार देखील आला मनात,

    ‘‘ए बंटी तुझा साबण स्लो आहे का?’’ किती ते हात धुवायचे?

    ए आई कसा होतो ग हा कोरोना काय म्हणतेस? त्या गणितात शिकवतात तसं?
    हा म्हणजे ए बरोबर बी, बी बरोबर सी, म्हणजेज ए बरोबर सी. म्हणजे , ए ने बी ला हात लावला आणि जर ए ला रोग असेल तर तोच रोग बी लाही होईल बी ने सीला हात लावला तर तोच रोग सीलाही होईल बापरे म्हणजे आख्खं एक्स वाय झेड पर्यंत.... अरे देवा...

    बाबा, तुम्ही बाहेर जाताना मास्क लावून का जाताय? आणि बाकी सगळ्या जगाला सुट्टी आहे, किंवा काय ते वर्क फ्रॉम होम आहे, पण तुम्हाला, डॉक्टर काकांना सुट्टी का नाही? काय म्हणता बँक ही अत्यावश्यक सेवा आहे? लोकांना पैशाची कमी पडायला नको म्हणून बँक चालू ठेवलीय का? अरे देवा, पण मग आता तुम्हीही काळजी घ्या.

    ए आई, पण परवापर्यंत तरी संपेल का गं हे? परवा माझा वाढदिवस आहे, अगदी खूप लांबच्या नाही, पण पलीकडच्या बिल्डींगमध्ये राहणार्‍या माझ्या मैत्रिणींना, मावशीला, आत्याला माझ्या बहीणभावडांना तरी बोलवायचं का ग आपण?
    काय म्हणतेस कुणालाही बोलवायचं नाही, आई, तूच असं करतेयस? नेहमी तर मला म्हणत असतेस, की घरी कोणी आलं की बोलावं, त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्यावीत. त्यांना पाणी विचारावं आणि आता ग आता?

    अरे देवा, म्हणजे आपला वाढदिवस करायचा नाही असंही सांगितलंय का शासनाने? अच्छा अच्छा म्हणजे आपल्यामुळे दुसर्‍याला किंवा दुसर्‍यामुळे आपल्याला काही त्रास होऊ नये म्हणून शक्यतो बाहेर जायचं नाही, काय म्हणतेस शक्यतो नाही जायचंच नाही.

    शी बाबा.

    शाळेत जायचं नाही, परीक्षा रद्द झाली, क्लास नाही मग करायचं तरी काय? आयडिया आई, नाहीतरी मावशी नाहीत, मी तुला थोडी मदत करते. मी तुला मटार सोलून देऊ का? आणि दुपारी केर पण काढेन.

    काय गं आज्जी कशाला हाका मारतेयस? काय म्हणतेस? आजपासून तू मला रामरक्षा शिकवणारेस, रामरक्षा म्हटल्याने आपल्यावरचं म्हणजे जगावरचं संकट नाहीसं होईल. बरं बरं मी नक्की शिकेन ग रामरक्षा.

    आज्जे, आज्जू ये ग तू इकडे आपण दोघी मिळून पत्ते खेळुयात. हो अगं इतकं लगेच कुचकं नको बोलू. मला सारखा तो फोन बघून कंटाळा आलाय, डोळे पण दुखतायत. दादीटला बघ नुसता फोनमध्ये डोकं खुपसून बसलाय. काय म्हणतेस तो आईला मदत करतोय. वा वा काय करतोय मदत? काय आज तो कुकर लावायला शिकला? पण आई मला गॅसजवळ जाऊ देत नाही, म्हणते तू लहान आहेस? मग मी काय करू? मी आपली भाजी निवडेन, केर काढेन.

    आजी, तू या लोकरीचा स्वैटर विणतेयस मला पण शिकवशील का गं? मी पण तुला आमच्या शाळेतला डान्स शिकवेन. अगं काही नाही मोडत तुझा पाय नाचून? अगदी सोपा आहे. जमेल तुला. आणि आपण सगळे मिळून अंताक्षरी पण खेळू.

    पण माझा वाढदिवस घरातच जाणार, मला केक मिळणार नाही, बाहेर जाऊन काही खायला मिळणार नाही.

    काय म्हणतेस आई, तू यूट्युबवर बघून माझ्यासाठी घरीच केक करणारेस वाव ऽ ऽ किती मज्जा. आपण सगळे मिळून घरात धमाल करू म्हणतेस. बरं बाई, पण माझा हा वाढदिवस वायाच जाणार ना?

    काय म्हणतेस? ‘शिर सलामत तो पगडी पचास म्हणजे काय?’’ अच्छा अच्छा म्हणजे या वाढदिवशी जर आपण सरकारचं ऐकलं, नियम पाळले तर आपलंच नाही तर देशाचंही भलं होईल बरं, आणि आजचा एक वाढदिवस घरात केला तर पुढे अनेक वाढदिवस मी साजरे करू शकेन.

    हो हेही खरंच आणि आई अगं हे सारं संपलं की, आपण जाऊच की बाहेर पण तोपर्यंत मात्र मी अजिबात वाईट वाटून घेणार नाही, मला तुझं म्हणणं अगदी पटलंय. बघ तोपर्यंत मी रोज नवीन नवीन काही तरी शिकत राहीन. व्यायामसुद्धा करीन बरं आम्हाला शाळेत शिकवतात आणि तुम्हाला पण शिकवीन.

    योग करू, शतपावली करू, घरात राहूनच मज्जा करू
    या कोरोनावर मात करू, जगावरील संकटाला दूर करू.
    मी घरातच राहीन...... घरातच राहीन. गो कोरोना गो कोरोना
    भोलानाथ कोरानावर औषध निघेल काय? भोलानाथ भालानाथ.

    -- सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

  • प्रल्हाद!

    ‘ त्यात काय अवघड आहे?’ हे वाक्य कानावर पडलं आणि आठवणींच्या ढिगाऱ्यातली एक Pdf फाईल मनाच्या मॉनिटरवर अवतीर्ण झाली.

    गोष्ट जुनीच आहे. आमच्या परळीच्या (तेव्हा परळी ‘आमची’ नाही, तर माझी होती!) एका बँकेत मी ‘पासबुक रायटर’ म्हणून टेम्पररी (आमच्या शाम्या त्याला -टेम्परवारी म्हणायचा) लागलो होतो. बँकेचा क्लर्कच्या परीक्षा झाल्या होत्या, नवीन उमेदवार पोस्ट होईपर्यंत मला काम करता येणार होते. असेन तेव्हा वीस बावीस वर्षाचा. गाव छोटस होत, येथेच मी लहानाचा मोठा झालो होतो, शाळा कॉलेज इथलंच.
  • जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे अर्थात नाना शंकरशेठ

    आज आपण अशा एका व्यक्तीच्या आठवणींना उजाळा देणार आहोत की ज्यांनी मुंबईच्या शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक गोष्टींच्या पायाभरणीत सिंहाचा वाटा उचलला आहे.  अशी ही महान व्यक्ती म्हणजे जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे, म्हणजेच  नाना शंकर शेठ. आधुनिक मुंबईचे शिल्पकार. वयाच्या बाविसाव्या वर्षापासून अगदी मृत्यूपर्यंत म्हणजे ६५ व्या वर्षापर्यंत मुंबईच्या जडणघडणीत त्यांनी केलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. या महिना अखेरीस , म्हणजे, 31 जुलै 2021 ला त्यांचा 156 वा  स्मृतीदिन आहे. त्यानिमिताने हा त्यांच्या योगदानाचा उहापोह !