(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बबड्या, आसावरी आणि मी

    सध्या एका नामवंत वाहिनीवर “बबड्या’ची मालिका चालू आहे. त्यातील पात्रांवरुन फेसबुकवर, व्हाॅटसअपवर अनेक ‘टीकात्मक पोस्ट’ वाचनात आल्या. त्यातील विनोदाचा भाग सोडला तर आजकाल दहा कुटुंबातील चार तरी कुटुंबात ‘बबड्या’ आपल्याला भेटतोच.
    माझंच पहाना, आमचा ‘बबड्या’ बालवाडीत असताना त्याला रोज डब्यामध्ये आसावरी वेगवेगळा खाऊ द्यायची. कधी मॅगी, कधी केक तर कधी बर्गर. शाळेतल्या बाई बबड्याच्या आईला समजावून सांगायच्या, ‘आसावरी ताई, बबड्याच्या डब्यात पोळी भाजी देत चला. त्यानं डबा उघडला की, इतर मुलांना त्यांच्या डब्यापेक्षा बबड्याचे वेगळे पदार्थ पाहून त्याचा हेवा वाटतो. असं व्हायला नको म्हणून तुम्ही पोळी भाजीच देत जा.’ आसावरीनं आधी ‘माझ्या बबड्याला पोळी भाजी आवडत नाही’ यावर बाईंचं ‘बौद्धिक’ घेतलं व नंतर मान्य केलं.

      December 8, 2021


  • ताजे आणि नवीन पाणी

    आता तुम्ही म्हणाला, सकाळ तर रोजच उगवते आणि चांगले शिष्टाचार असलेले लोक परस्परांना भेटल्यावर रोजच गुड मॉर्निंग म्हणतात. मग हे नवे ‘गुड मॉर्निंग’ काय प्रकरण आहे? तर त्याचं असं आहे की, सहाव्या शतकात होऊन गेलेला हेरॅक्टलिटस् (HERACTLITUS) नावाचा तत्त्वज्ञ या नवीन प्रकरणाचा गुरू आहे.

      January 24, 2023


  • मती आखूड आखूड (सुमंत उवाच – ४२)

    सुमंत जयंत परचुरे. 

    एखाद्याच गोष्टीचा सतत विचार केला की बुद्धी म्हणजेच विचार कोंडतात, तिथेच घुटमळत रहातात.

      October 3, 2021


  • ती पण एक सावित्री (कथा)

    दहा वर्षे झाली, हरीष अंथरुणाला खिळला होता. जिवंत असून नसल्यासारखा. अर्धांगवायूच्या झटक्याने त्याच्या शरीराचा गोळा झाला होता. सर्व गरजांसाठी त्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत होते. त्याला त्याच्या बायकोकडे रागिणीकडे बघून अतिशय दु:ख होत होते. मनात सारखे विचार यायचे माझ्याशी लग्न करून हिला कोणते सुख मिळाले.

      April 30, 2022


  • निर्भयतेने मृत्यूवर मात

    कामावरील निष्ठा, चातुर्य आणि निर्भयता जवळ असली तर वेळप्रसंगी मृत्युसारख्या संकटावरदेखील मात करून मृत्यू टाळता येऊ शकतो. या संदर्भात मोगल बादशहा जहांगीर याच्यासंबंधीची एक हकिकत.

      November 6, 2017


  • जीवनरेखा (कथा)

    बाळाप्पा खोत बऱ्यापैकी श्रीमंत. दहा एकराचा काळ्याभोर मातीचा मळा, त्यात असणाऱ्या दोन तुडुंब भरलेल्या विहिरी. एक विहिरीला पंप तर दुसरीला मोट, शेताला पाणी पाजवून हिरवं गार करायची आणि बाळाप्पाचा खिसा नोटांनी भरत ठेवायची.

      February 5, 2026


  • उद्यान एक्सप्रेसचा थरार

    इकडे स्टेशन मास्तरांच्या एव्हाना ही घटना दृष्टीस पडली होती. त्यांनी स्वप्नील कडे नजर टाकली आणि शुभांगी च्या दिशेने हात करत बोलले,” स्वप्नील,  तिकडे  बघ,  कोणीतरी लहान मुलगा ट्रॅक वर पडला आहे.” स्वप्नील ने तिकडे बघितले आणि तो एकदम बेभान झाला. काय करावे हा तो विचार करत होता तेवढ्यात स्टेशन मास्तरांनी आपल्या हातातील लाल झेंडा उंच उभारून उद्यान एक्स्प्रेस च्या लोकोपायलट ला धोक्याचा इशारा दिला होता.

      December 26, 2021


  • अमेरिकन गाठुडं – ५

    आपल्या कडे कंपाउंड हे भक्कम विटा सिमिटाच्या भिंतीत असते. येथे बहुतेक कंपाउंड हा प्रकार नसतोच. असला तरी लाकडी फळकुटाचे असते, किंवा मग लोखंडी. आमच्या कम्युनिटीला लोखंडाचे आहे. संपूर्ण सेक्युरिटी इलेक्ट्रॉनिक डिव्हिसेसवर. कार गेटजवळ आली कि गेट उघडते. नाही उघडले तर गेटच्या  पोलवरल्या पॅनलवर कोड नंबर प्रेस करावा लागतो. किंवा बहुतेकांच्या घराच्या किल्ल्या सोबत गेटचा रिमोट असतो. कोठेही सेक्युरिटी गार्ड नाही.

      November 19, 2020


  • दवबिंदू

    दवबिंदूचं मला नेहमी कौतुक वाटत आलेलं आहे. आपल्या लहानशा अस्तित्वाच्या काळात तो किती डौलात चमकत असतो ! दररोज एक नवा बिंदू चमकताना दिसला कि किती प्रसन्न वाटतं. आपणही असेच असतो तर? दवबिंदू आणि लहान मुलं ही मला एकसारखी वाटतात नेहमी.

      February 6, 2022


  • मला देव दिसला – भाग ८

    आता मनला स्थीर करणे, शांत करणे हा ध्यान धारणेचा प्रमुख गाभा आहे. विचार रहित अवस्था साध्य करणे आहे. कोणतीही कल्पना द्रव्य, समाधान, हालचाली,भावनीक अविष्कार ह्या सर्व बुध्दीच्या विचार प्रणालीत निर्माण झालेल्या असतात. मेंदूचे प्रमुख कार्यच विचार उत्पन्न करणे हे आहे. वासना (वा इच्छा) (Desire) हा देहाचा नैसर्गीक गुणधर्म असतो. जो प्रत्येकाला जन्मता हा मिळालेला असतो. वासना विचारांच्या रूपाने मेंदूत चेतविल्या जातात, त्या उत्पन्न झालेल्या वासना मनावर आरूढ होवून शरीरात पसरण पावतात. त्या इंद्रियामार्फत त्यांचा कार्यभाग साधण्याचा प्रयत्न करतात. हे एक निसर्ग चक्र होते. हा एक जीवन संसार, विचारांची उत्पत्तीमात्र एका नंतर दुसरा विचार, नंतर तिसरा, चौथा ह्या अनुक्रमेतच होत जातो. मन त्यामुळे सतत चंचल अवस्थेत असते.

    आम्हास प्रयत्न करून काही काळासाठी विचार रहीत स्थितीत जावयाचे आहे. म्हणजेच विचारांची उत्पती रोकावयाची आहे. प्रथम त्या विचारांचाच आसरा घ्यावा लागेल व नंतर त्यांचा त्याग करावा लागेल. स्थिर आसनस्थ झालेल्या शरीराच्या मनाला प्रथम आकाराच्या पोकळीत स्वैर प्रमाणे फिरू द्या. तुमच्या वैचारीक प्रयत्नाने हे शक्य आहे. ‘एका वेळी एक विचार’ ह्या निसर्गाच्या गुणधर्माचा फायदा घेत चला. रांगेत येणाऱ्या विचारांत इतर विचारांची घुसखोरी थांबवा. त्यांना प्रमुख विचारसरणीत येवू देवू नका. हे शक्य आहे. आकाशाच्या पोकळीत फक्त हवेचे अस्तीत्व असते. त्या हवेशी विचारांनीच एक रूप व्हा. हीच हवा तुमच्या जवळ येत आहे. ती तुमच्या नाकपुड्यातून नाकातून तुमच्या शरीरात प्रवेश करते. ह्याची जाण तुम्हास होते. ती हवा एका मर्यादेपर्यंत आंत गेलीली तुम्हास जाणवते. तीच हवा (अर्थात तीच कार्य करून) काही क्षणानंतर तुमच्याच नाकपुड्यातून शरीराच्या बाहेर जाते. एक भासणारी क्रिया, हवा नाकपुड्यातून शरीरात जाणे व नंतर तीचा मार्ग उलटा होवून ती परत शरीराबाहेर जाणे व नंतर तीचा मार्ग उलटा होवून ती परत शरीराबाहेर जाणे. हे सतत होते. तुम्हास आता फक्त ही एकच क्रिया श्वास घेणे व श्वास सोडणे लक्ष केंद्रीत करावयाची आहे. ही क्रिया देखील तुमच्या विचारांच्या टापूतीलच असणारी आहे. हे विचार रहीत होणे नव्हे. परंतू इतर विचारांना सारून चित्त एक दिशेने एकाग्र करण्याचा हा अपेक्षित मार्ग आहे. ह्याचा प्रथम दरदिवशी सराव करावा लागेल. लक्ष श्वासोश्वासावर केंद्रीत करणे. एका संथ वाहणाऱ्या नदीमध्ये तुम्ही शिरता आहात. तुमची जाण येथपर्यंतच असते हे समजा. आता त्या नदीमधल्या पाण्याशी एकरूप व्हा, प्रवाहाला साथ घ्या. शांतपणे वाहत जा. का जायचे कसे जायचे केव्हा जायचे हे विसरून जा. प्रवाह तुम्हाला त्या विशाल सागरांत घेवून जाईल, तुम्ही कोणताही प्रयत्न न करता, मात्र तुमचा थोडासा प्रयत्न देखील तुमच्या संथ वाहण्याला बाधा आणेल.

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      March 24, 2016