नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
" ऐ , ऐक ना " " त्यासाठी whatsapp वर काहीतरी पाठवावे लागते . " " मी एक फोटो तुला पाठवला आहे . तो तू बघ . आणि लगेचच delete करून टाक . " " ओके " . " पाठवला . " " बघितला . " " Delete केलास " " तू काय आहेस ? फोटो पाठवलेला आवडला का ते तरी निदान आधी विचारायचं ? " " प्लीज़ सांग ना . delete केलास . " " खरं म्हणजे अतिशय जीवावर आलं होतं . पण केला फोटो delete . काय अप्रतिम फोटो आहे ! ज्याचा आहे आणि ज्याने काढला आहे अशा दोघांनाही full marks . " " खरंच आवडला ? " " अगदी मनापासून . म्हणून तर delete करायच अगदी जीवावर आलं होतं . पण तू delete का करायला सांगितले ? मधेही एकदा असंच एक फोटो delete करायला सांगितले होतेस . " " कारण याआधी पाठवलेली selfi फक्त तुझ्यासाठी होती . तू पाहिल्यावर आणखी कोणी पाहायलेली मला आवडले नसते . चाललेही नसते . " " Selfi काही vulgar अवतारात नव्हती . " " चावटपणा नको . तसा हा फोटोही काही vulgar नाहीये . आणि तसे फोटो पाठवायला ना आपले ते वय आहे , ना आपली तशी व्रुत्ती . " " धन्यवाद माताजी . पण हा फोटो का ? झकास फोटो . अगदी सालंकृत . छान भरजरी साडी आणि मोजकेच पण ठसठशीत दागिने . " " म्हणूनच delete करायला सांगितले . मला दागिने जरासुद्धा आवडत नाहीत . " " नशिबवान आहे नवरा . माझ्यासारखा " . " हा थट्टेने घ्यायचा विषय नाही . अक्षरशः सक्ती केल्यासारखे मागे लागून हा फोटो काढला गेलाय . " " ओहो हो . . . म्हणून पापड मोडलाय का बाईसाहेबांचा ! जबरद्स्तीचा पुरावा नाही उरता कामा मागे . " " प्लीज़ . तुला पाठवायलाच नको होता फोटो . कुठचाच . " " मस्करी नाही करत . पण खरंच सुंदर . . . . मान अजून जरा इकडे केली असतीस तर कानातले आणखी छान आले असते फोटोत . नाहीतरी एकच साइड आहे ना " " अजून नाही का काही " " रागावनार नसशील तर सांगतो . " " सांगा महाराज . आता तुमची सक्ती . " " स्वतचे कौतुक ऐकायचे असले तर तसं मोकळेपणाने सांगावे माणसाने . " " तू म्हणजे ना . . " " साडीला matching म्हणून लाल चंद्रकोर हे बरोबर . पण मग त्या लाल चंद्रकोरीत काळा छोटा टीळा हवा . खरं म्हणजे काळी चंद्रकोर आणि त्यात लाल कुंकवाचा ठिपका . आणि त्या चंद्रकोरीची रेषा ठसठशीत नको ; पण ठळक हवी . ती रेषा जाडी नको ; पण भरदार हवी . नजरेत पटकन भरेल अशी . " " अजून काही प्रिस्क्रिप्शन ? " " चंद्रकोरीची रेषा भुवई खाली वळते तिथपासून दुसऱ्या भुवईच्या खाली वळते तिथपर्यंत बेस सारखी हवी . आणि दोन भुवयान्च्या बरोबर मधे तौ लाल कुंकवाचा ठिपका . दोन भुवयान्च्या मधे जिथे नाकाच वरचे टोक संपते तिथे हा ठिपका हवा . परातीत चंद्राचे प्रतिबिंब पडाव तसा . नाहीतर कड़वा चौथ ला चाळणीत चंद्र दिसावा तसा . " " आता हे काय ? " " वेडाबाई , ही चंद्रकोर माझा पति किती प्रेमाने मला साथ देतो याचे प्रतीक आहे . त्याच्या भावविश्वाच्या मध्यभागी मी आहे याचे स्म्रुतिचिन्ह म्हणून तो लाल कुंकवाचा ठिपका . अगदी लांबून सुद्धा लक्ष वेधून घेईल असा . आणि चंद्रकोर म्हणजे माझ्या भावविश्वाला त्याची साथ पुरवते ते कोंदण . चंद्रकोर आणि हा टीळा म्हणजे परस्पर प्रीतीचा कळस आणि ध्वज असतो ग . " " सॉलिड आहे हे . " " तसं नाही ग . हे संकेत समजून घेणं फार छान असते ग . काय आहे ना आपण एकमेकांवर प्रेम करतो हे लक्षात ठेवणे महत्वाचे असतेच ; पण ते कसे करतो , कशासाठी करतो हे नाजूकपने सूचित करता येणं हेही तितकेच महत्वाचे असते . " " म्हणजे ? " " आपल्या पिढीत प्रेम वाटण्याची सुद्धा एक परिमीति असते . लगेचच delete केलेला फोटो पाहताना मला ते सारखे आठवत होते . " "हे काहीतरी वेगळेच सुरु आहे तुझे आज . " " अलग होंगे ; मगर गलत नही " " डायलॉगबाजी पूरे . जरा ढील द्यायचा अवकाश की झाले सुरु . वेगळी परिमीति म्हणजे तुला काय म्हणायचे ते सांग . " " आपल्या पिढीची प्रेमाची तर्हा जरा भिडस्त आहे आजच्या पिढीच्या मते . " " म्हणजे ? " " आपल्या पिढीच्या प्रेमाचे फोटोच वेगळे आहेत . एक तर ते श्रीमान योगी कादंबरीतल्या शिवाजी महाराज - सईबाई सारखे आहे . . उमलत्या कर्तुत्वाच्या काळात उमलत गेलेले . नाहीतर ते " इथे ओशाळला म्रुत्यु " नाटकातल्या संभाजी महाराज - येसूबाई सारखे . एकमेकांच्या कर्तुत्वाचा आदर करत व्यक्त होणारे . . . . " स्वारीचे हे रूप , स्वारीचे हे तेज , स्वारीचा हा पराक्रम " अशा शब्दांत एकमेकांविषयी व्यक्त होणार . . . . आंधळी आपुलकी नाही तर आदरयुक्त , अभिमानपूर्न खानदानी आत्मीयता . दोघांच्या एकत्रित प्रयत्नातून विकसित होत जाणारे . एकमेकांविषयी कौतुक आणि आदर असणारे . गाण्यात कसे प्रत्येक कडव्यां नंतर ध्रुवपद येते तसे . प्रत्येक टप्प्यावर ही आठवण काढणारं . उगाचच नाही " इथे ओशाळला म्रुत्यु " नाटकाचा प्रत्येक अंक " स्वारीचे हे रूप , स्वारीची ही जिद्द . . . . " या वाक्यानी संपत . एकाने पुढच्यासाठी शब्दांत घातले तर पुढच्याच्या भावना पहिल्याविशयी कुठे वेगळ्या असतात ? " " अगदी खरं आहे रे हे " " तिसरा प्रकार म्हणजे " स्वामी " कादंबरी तल्या थोरले माधवराव पेशवे आणि रमाबाई सारखे . अकाली करपलेल्या कर्तुत्ववान जीवनातील मोजक्या क्षणांची शिदोरी देणारे . आठवणही येऊ नाही अशा अनेक क्षणांचे डाग इतरजण आयुष्याच्या अन्गरख्यावर उडवत असताना आठवणीने आठवणीत ठेवावे असे काहीतरी क्षण पदरात घालत असे प्रेमाचे डाग मिरवावेत असे . " " परत नाही म्हणणार उगीच पाठवले फोटो म्हणून् " " तसं नाही ग . मला माझ्या पत्नीचा विचार करताना नेहमीच असं वाटत असत " " पटलं मला " " ती चंद्रकोर , तो ठिपका , तो नाकाच्या शेंडयावर बसलेला लटका राग हे वैवाहिक आयुष्याचे फार छान फोटो आहेत . सहवासाच्या कमेर्याने काढलेले . फक्त एकमेकांनाच दिसणारे . पॉज़िटिव फोटो आणि नेगेटिव रील एकांतात उलगडणरे आणि जनांत सुचवनारे . मैफीलीत श्रोत्यांना नाही जाणवत तानपुर्याचे स्वर फारसे . पण गायक अस्वस्थ असतो त्यान्च्याशिवाय . असे हे क्षण , श्रुंगार - संकेत आयुष्याचे तानपुरे असतात . ते सदैव सुरातच हवेत . इतरांना दिसणयासाठी नाही तर आपल्याला जाणवण्यासाठी . " " क्या बात हैं ? " " अजून एक सांगू ? " " विचारू नकोस . सांगत राहा . " " असे फोटो हे न्रुत्यान्गनेच्या घुंगरू सारखे असतात . ते घालताना आणि काढताना घुंगरू आणि नर्तिका दोघेही एकमेकांना सांगत असतील का की तू आहेस म्हणून मी आहे . या आणि अशा फोटोतून आपण आपल्या आयुष्याच्या साथीदाराला दूसरे काय सांगत असतो ? प्रेम असते म्हणून असाच फोटो हवा आहे अशी सक्ती असते आणि ते मान्य असते म्हणून तर रूकार असतो ना ग ! " " तुला फोटो delete करायला लावले असले तरी हे संभाषण मात्र मी मनात कायमचे साठवून ठेवीन . " " त्याची royalty म्हणून् नाही . पण एक विनंती आहे . " " मी हे delete करणार नाही . " " मी काहीही delete करायला सांगत नाहीये . " " मग ? " " या फोटोच्या रंगीत प्रती काढल्या जातीलच . साहजिकच आहे ते . पण या फोटोची निदान एक तरी Black - white अशी प्रत काढ . " " का रे ? " " रंगीत फोटो मधे सौंदर्याचे सौष्ठव आले तरी भावनेच मार्दव येत नाही . त्यासाठी कृष्ण - धवल च फोटो हवा " " I see ! आता लक्षात येतय माझ्या ! ! सोनचाफ्याचा , बकुलिचा सुवास आवडता असूनही पहिल्यापासून प्राजक्त आणि मोगरा ही तुझी नम्बर एकची आवड का ? आणि मी एकदा तुला वेड्यासारखे म्हणले होते की प्राजक्ताच्या ओलसर फुलांचा डाग पडतो . " " तेंव्हा नाही सांगितले काहि . पण आज सांगतो . ओल्या प्राजक्ताचा डाग नाही पडत . भावविभोर मनाने त्या क्षणाचा , त्या सहवासाचा तो काढलेला फोटो असतो . प्राजक्ताचा देठ म्हणून लाल असतो . हिरवा नसतो . हिरवा रंग असोशीचा असतो ; लाल सन्त्रुप्तीचा . ज्या व्यक्तीच्या सहवासाने आपण त्रुप्त होतो , त्याच्या आठवणीने गालावर , मनावर लाली येते . त्या स्म्रुतीन्च्या उजळणीचा फोटो म्हणजे तो प्राजक्त . प्राजक्त ही ओलसर आणि भावना ही . " " किती वेडा आहेस रे " " नाही . दिवसाची खरी यथार्थता तिन्हिसान्जेलाच कळते . आकाशात मावळतीचे रंग पखरलेले असतानाच मनाच्या कॅमेरयात गवसलेल्या आणि निसटलेल्या क्षणांची सरमिसळ सुरु असते . म्हणून् तर त्याला कातरवेळ म्हणतात . " " हा फोटो नाही विसरू शकणार " " अग , असे फोटो हे वैवाहिक आयुष्याच्या नाकातल्या नथी सारखे असतात . नाकाचा शेनडा पुन्हा पुन्हा चिमटीत पकडावा अशा मोहात पाडनारा . नथीचा हेवा वाटतो असे मोकळेपणाने सांगत राहतात हे फोटो " " तूच एक . . . " -- चंद्रशेखर टिळक २ डिसेंबर २०१६
9820292376
Email: tilakc@nsdl.co.in
एका जगप्रसिध्द कंपनीला सि.ई.ओ. हवा असतो. त्यांचा सि. ई. ओ. निवृत्त होणार असतो. तोच नवीन सि. ई. ओ. ची मुलाखत घेणार असतो. परंतु मुलाखत ऑनलाईन होणार असते.
स्वागत कक्ष स्त्री-पुरुषांनी भरून गेला होता. एकही खुर्ची रिकामी नव्हती. सरांनी उभे राहणेच पसंत केले. कागदाच्या कपट्यावर स्वत:चे नाव लिहिले. निवृत्त प्रोफेसर, बीड असा पत्ता लिहिला. “साहेब, दोन-तीन तास थांबावं लागेल. आतसुद्धा सर्व खुर्च्या भरल्या आहेत.” गेटमन म्हणाला. तो चिठ्ठी घेऊन आत गेला आणि त्याच पावली परत आला. “सर, मॅडमनी आत पाठवायला सांगितलं आहे.
ज्या सगुण ईश्वरी स्वरूपाची कल्पना तुमच्या मनात पक्के घर करून असेल तर कदाचित तसेच तुम्हास दिसू शकते वा जाणवू शकते. भाव तसा देव म्हणतात, त्याप्रमाणे परंतू हा प्रयत्न अपूर्ण असाच ठरणारा असेल. तुम्हास असत्याच्या दालनात नेणारा असेल. तुमचे सगुण ईश्वराबद्दलचे ज्ञान आणि त्याचे इच्छीत दर्शन हेच मग तुमचे ध्येय बनते. ईश्वराला जाणण्यापेक्षा त्याच्या दिव्यत्वाला अनुभवने, त्याच्याशी काही क्षणासाठी का होईना तादाल होणे, एकरूप होणे हे अंतीम ध्येय असावे. कारण जाणणे ह्यात कल्पनाविलास व ज्ञान ह्याचे योगदान असेल. ती अनश्चीततेबद्दलची जाण असेल. परंतू त्याला अनुभवने हा सत्याचाच शोध असेल. निर्गुण, निराकार आणि दिव्या शक्तीमध्ये मिसळून जाणे. एक नितांत आनंद, कल्पनातील अनुभव जीवनाचे अंतीम सत्य.समोर कुणीच नसते, तरी जणूकाही सर्व असते. त्यापेक्षा जास्त नसते. सर्वत्र केवळ आनंद, समाधान, शांतता. काय हवय तुम्हाला ह्या पेक्षा जास्त. ह्याचाच शोध बोध तुम्ही आपल्या प्रयत्नाने, तपश्चर्येने घेत होतात. मला फक्त त्या शांततेचा शोध होता,वेध होता, तगमग होती. सारे मिळाल्याप्रमाणे भासत होते. संपूर्ण समाधान. हेच जर सगुण रूपाने मला प्राप्त झाले असते. इष्ट देवतेचे दर्शन झाले असते, इच्छीत इश्वरी रूप माझ्या दृष्टीला पडले असते, तर माझ्या आनंदापुढे इच्छेच्या वा वासनांच्या रूपांत अपेक्षा निर्माण झाल्या असत्या. समोरचा दिसणारा भासणारा सगुण ईश्वर हा जरी भव्य दिव्य असला तरी तो माझ्याच स्वरूपाचा असता, मला त्याच्याशी भावनीक संवाद करण्यामध्ये आनंद वाटला असता. एक रूची निर्माण झाली असती. कुणालाही भेटल्यानंतर मग तो संत महात्मा का असेना होणारा संसारीक संवाद ही नैसर्गीक क्रियाच बनते. मला ते टाळता आले नसते. आणि तशा तथाकथित सगुण ईश्वरी दर्शनाची सत्यता प्रश्नाकींत राहीली असती. त्या मिळणाऱ्या आनंदाला समाधानाची साथ मिळाली नसती.
मला माझ्याच कल्पनेनुसार ध्यान धारणेमध्ये जो ईश्वरी वा दिव्य म्हणा हवे तर अनुभव आला त्याचे वर्णन करणे, मिळालेल्या आनंदाचे समाधानाचे मोजमाप करणे केवळ अशक्यच ठरणारे असेल. फक्त एक झाले तो अप्रतिम मनाच्या शांततेचा क्षण पुन्हा पुन्हा घेण्याचा प्रयत्न केला गेला. मुख्य म्हणजे त्या नितांत आनंद अनुभवाचा, जाणीवेचा पुढे काही वा कोणता प्रवास असू शकेल हा विचारच नष्ट झाला. जे मिळाले, जाणले वा अनुभवले ते अंतीम सत्य आहे. हा विचार दृढ झाला. ह्याहून दुसरे आणखी काही नाही. हेच ते ईश्वरी दर्शन, अंतिम ध्येय, एक नितांत आनंद, समाधान आणि मनाची खरी शांतता. ह्याच विचारात धन्यता पावलो. कुलस्वामिनी श्री.रेणुका देवी आणि गुरू जेरे स्वामी यांचे आभार मानले. त्यांना साष्टांग दंडवत.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

बिपीनची मृणाल सेनशी फोन फोनी चालू होती. भूतान मधील hydro electric generation plant chukha ( name of the towmship ) उभारण्याचे काम जोरात चालू होते. त्यांचे ऑफीस थिंपू या राजधानीत होते.
– थोड्या पाऊसातच दिल्लीच्या रस्त्यांचे काय हाल होतात – आपण वर्तमान पत्रात वाचतच असाल. कॉमनवेल्थ आणि दिल्लीचे रस्ते ही फक्त एक वात्रटिका आहे ….
आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आल्यावर माणसाला निवांतपणा मिळतो. मग जरा मागे वळून बघावसं वाटतं आणि तेव्हा हळूहळू सुरवातीचा काळ आठवतो. आयुष्याची परंपरागत विभागणी चार भागात आश्रमात केली आहे. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास. तशीच ही सुद्धा एक व्यवस्था आहे. बालपण, किशोरवय, प्रौढपण आणि मग हळूहळू म्हातारपण.
मेरा गाव मेरा देश’ चित्रपटाचे वेळी महेश भट्ट, राज खोसलांचे सहदिग्दर्शक होते. या शुटींगच्या दरम्यान विनोद खन्ना व महेश भट्ट यांची जिवलग मैत्री झाली. संजय दत्तच्या पदार्पणातील ‘राॅकी’ चित्रपट निर्मिती अवस्थेत असताना सुनील दत्त यांना नर्गिसच्या उपचारासाठी वारंवार परदेशात जावं लागे. तेव्हा राज खोसला यांनी मैत्रीला जागून, उर्वरित चित्रपट पूर्ण केला.
ते एक खेळण्याचे दुकान होते. काचेच्या शोकेस मध्ये खेळणी मांडून ठेवली होती. त्यात सुंदर बाहुल्या, लाकडी रंगीत घोडे, उंट, खेळातली भांडी अजून काहि काही गोष्टी मांडून ठेवल्या होत्या. येणारी लहान मुलंच काय, मोठी माणसं पण पहाण्यात रंगून जात.दुपारची वेळ होती. दुकानात गिऱ्हाईक नव्हते. मालकाने नौकरास जेवण करून घेण्यास सांगितले. त्याचे जेवण झाल्यावर, मालक जेवायला निघून गेला.
रेणुका आर्ट खुले ई-साहित्य संमेलन ऑनलाईनचे हे तिसरे वर्ष आहे. पहिल्या साहित्य संमेलनात माझा सहभाग लक्षनिय होता पण दुसर्या साहित्य संमेलनात मनात असतानाही सहभागी होणे मला शक्य झाले नव्हते. पण तेंव्हाच तिसर्या साहित्य संमेलनात आपला सहभाग असायलाच हवा असं मी मनाशी पक्क ठरवलं होत. त्यामुळे या तिसर्या ई-साहित्य संमेलनातील काही उपक्रमात मी सहभागी झालो. खरं म्ह्णजे माझी व्यक्तीशः सर्वच उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा होती पण नाही शक्य झाले.
ई-साहित्य संमेलन ऑनलाईन सारख्या संमेलनांची मराठी साहित्याची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आवश्यकता आहे. हे संमेलन आयोजित करणे हे खरं म्ह्णजे खूपच धाडसाच काम आहे ते धाडस आसावरीजी आणि आयोजक आनंदाने करतात म्ह्णून त्यांचे आभारच मानायला हवे. या ई-साहित्य संमेलन ऑनलाईनच्या माध्यमातून मराठी साहित्याची चळवळ वाढावी म्हणून मोलाचा हातभार लागत आहे. या ई-साहित्य संमेलन ऑनलाईन उपक्रमामुळे मला व्यक्तीशः माझा साहित्यिक दर्जा ठरविण्यासाठी मदतच होते कारण आपल्या साहित्यावरील नामवंत लेखक कवींनी केलेली समिक्षा आपल्याला वाचायला मिळते त्यसोबत आपल्या साहित्यातील त्रूटी ही आपल्या लक्षात येण्यास मदत होते.
प्रत्यक्ष कोणत्याही साहित्य संमेलनाला उपस्थित राहणे मला कधीच शक्य झाले नाही पण या साहित्य संमेलनामुळे अप्रत्यक्ष का होईना तीन साहित्य संमेलनाला माझी हजेरी लागली. बर्याचदा कवी आणि लेखकांना तेच ते प्रकाराचे साहित्य लिहून बर्याचदा कंटाळा आलेला असतो या साहित्य संमेलनामुळे नवीन काही तरी लिहण्यास साहित्यिकांना प्रेरणा मिळते निदान तसा प्रयत्न तरी करण्याची इच्छा निर्माण होते.
खरं म्ह्णजे ई-साहित्य संमेलन ऑनलाईनचे हे व्यासपीठ नवोदित साहित्यिकांसाठी फारच महत्वाचे व्यासपीठ ठरायला हवे होते पण दुदैवाने ते तसे ठरताना दिसत नाही कारण या ई-साहित्य संमेलन ऑनलाईन मध्ये सहभागी झालेले सारेच लेखक कवी बर्यापैकी नावाजलेलेच आहेत. या अशा साहित्य संमेलनातून नवोदितांचा सहभाग अपेक्षित असतो तो दिसला नाही याचा अर्थ या साहित्य संमेलनाची प्रसिद्धी कमी पडली असं म्ह्णता येईल पण त्यासाठी आयोजक नाहीत तर तांत्रिक आणि आर्थिक अडचणी जबाबदार आहेत हे लक्षात घ्यायलाच हवे. आयोजकांनी हे ई-साहित्य संमेलन ऑनलाईनचे आयोजन करून एक प्रकारे साहित्य सेवाच केलेली आहे. त्यामुळे सहभागी साहित्यिकांनी त्यांचे आभार मानायलाच हवेत पण यापुढेही हा उपक्रम सुरू राहावा म्ह्णून ज्याला जी मदत करणे शक्य आहे त्याने ती करायलाच हवी.
या संमेलनात फक्त आपला सहभाग नोंदवला म्ह्णजे आपली जबाबदारी संपत नाही तर ती उलट वाढते कारण मराठी साहित्यासाठी काही तरी करण्यासाठी आपण तेंव्हा एक पाऊल पुढे टाकलेले असते. आजच्या आघाडीच्या लेखकांना ही संगणकाचा वापर तितकासा सफाईदापणे करता येत नाही त्यामुळे ही बरेच साहित्यिक या उपक्रमात सहभागी होण्याचे ठाळत असावेत तर मला व्यक्तीशः असं वाटत की त्यांच साहित्य इतर कोणाच्याही मदतीने या ई-साहित्य संमेलन ऑनलाईनच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहविणे शक्य असायला हवं होतं.
या उपक्रमात साहभागी होणार्यांची संख्या वाढायला हवी होती खास करून वाचकांची पण ते होताना दिसत नाही. वाचकांपर्यत पोहचण्यासाठी या माध्यमातून एक स्वतंत्र संकेतस्थळ तयार केल्यास बर्याच गोष्टी सोप्प्या होतील. ते शक्य होईल तेंव्हा होईल पण तोपर्यत हा ई-साहित्य संमेलन ऑनलाईनचे चा उपक्रम सुरू राहायलाच हवा...
-- निलेश बामणे
Copyright © 2025 | Marathisrushti