नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
प्रियेचा किती छान पत्ता सांगितला आहे त्या रसिक प्रियकराने, वा वा! सुंदर! तुला रस्त्यात पारिजातकाचा सडा पडलेला दिसला की तिथून डावीकडे वळ, पुढे नदीच्या किनाऱ्यावर केवड्याचा सुवास येईल, तिथे वेढा घालून बसलेल्या नागिणीला विचार, ती तुला माझ्या घराचा पत्ता सांगेल. किंवा वसंतात घरी येणाऱ्या प्रियकराला तू पहाटे पहाटेच तिथे पोहोच, सकाळी मोगरा तुला माझ्या घरी ओढून घेऊन येईल.
प्रगतीची वाट सापडली की त्यावर पायाला चाकं फुटतात. मग वेग वाऱ्यापेक्षा अधिक होतो आणि यशाची गाडी धावू लागते. मन आनंदी होते, यश सुखावते, कष्ट मागे पडतात, श्रम वाहून जातात त्या यशाच्या अलोट महापुरात पण, त्या यशाच्या-प्रगतीच्या शिखरावर पोचलं आणि जाणवलं की आपण येथे एकटेच आहोत? तर?
“याला” त्याच्या desk वरून “ती” दिसायची … department वेगळं होतं म्हणून कामानिमित्त कधी बोलायची वेळ नाही आली … पण जाम आवडायची … ती सुद्धा अधून मधून डोकवायची … थोडा अंदाज तिलाही आला होता … हा मात्र बुजरा … कधी बोलू – कसं बोलू ?…या विचारात दिवस संपून जायचा
कोंबड्या काय? मरतातच! खरंय. कोंबड्या तर रोजच मरतात. परवाच पुण्या-मुंबईत किती कोंबड्या ‘डिश’ हऊन येतात, याची
आकडेवारी प्रसिद्ध झालीय. एरवी ती होतही नाही; पण नवापूरच्या कोंबड्यांना वृत्तपत्राच्या रकान्यात जागा मिळाली… अर्थात
माणसासाठीच! बातमीच्या, वृत्तमूल्याच्या व्याख्येत कोंबड्या नेहमी बसत नाहीत, तर त्यासाठी काही निमित्त असावं लागतं.
मनात आलं, असे अनेक विषय, घटना, माणसंही असतीलच की जे मरतात कोंबड्यांसारखे; पण त्यांची बातमी होत नाही!
र्वी वाद्यवृंदाच्या कार्यक्रमामध्ये मुख्य गायक वादकांना अल्प विश्रांती मिळावी आणि कार्यक्रम सुरू रहावा या हेतूने Mimicry कलाकार आपली कला सादर करत असत. पुढे स्वतंत्र Mimicry शोज होऊ लागले. हळुहळु या कलेला स्थिरपणा आला आणि दूरदर्शनच्या विविध वाहिन्या नकला , Mimicry यांचे पूर्ण कार्यक्रम सादर करू लागल्या.
आयुष्य हे कधीच न संपणारे कोडे आहे आणि मला तर ते कधीच सोडवता येणार नाही म्हणून हताश होऊन बाकावर बसलो होतो, तर अचानक दिलीप दिसला, ताईचा मुलगा,माझा भाचा. खूप हुशार मुलगा, गेल्यावर्षी सातवीच्या परीक्षेत पहिला आला तेंव्हा त्याला प्लेटो चं पेन बक्षीस देणार होतो, पण कसचं काय, प्लेटोच्या पेन पेक्षा पोटाची खळगी आणि ती भरण्याची पेन प्रचंड मोठी होती.
गोडांब्या कडे बघूनच कोणालाही डेरेदार वृक्ष प्रत्यक्षात कसे असतात हे लगेच लक्षात येईल. भरगच्च पानांनी नेहमी बहरलेल्या गोडांब्याच्या खाली मे महिन्याच्या गर्मीत सुद्धा थंडगार वाटते. त्याच्या शितल छायेत एकदा बसल्यावर पुन्हा संध्याकाळ होईपर्यंत उठायची इच्छाच होत नाही.
स्थळ ठाणे रेल्वे स्टेशनचा तीन नंबरचा फलाट. तीन नंबरवर येणारी गाडी मी दोन नंबर फलाटावरच येते आहे असे समजून गाडी येणार्या फलाटाच्या कडेला जाउुन वाकून बघत होतो. एवढयात दिन्याने नुकत्याच खाल्लेल्या सुप्रसिद्ध कचेरी मिसळीचे उपकार विसरून मी आंधळा असल्याचे फलाटाच्या त्या गर्दीतच जाहीर केले.
स्वातंत्र्य-युद्धाच्या संदर्भातील पद्यातही मरणाचे उल्लेख विपुल असतात . भा. रा. तांबे च्या,‘झाशीवाली’ कवितेतील ‘ती पराक्रमाची ज्योत मावळे इथें झाशीवाली’ या ओळीचा उल्लेख आधीं आलेलाच आहे. आणखी कांहींचें काव्य पहा –
स्त्री म्हणजे काय आहे?’ या प्रश्नाचे एका शब्दात उत्तर देता येईल. स्त्री म्हणजे एक ‘अजूबा’ आश्चर्य आहे. परमेश्वराची अजोड निर्मिती आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय या निसर्गाच्या परिचक्रातील पहिली महत्त्वाची गोष्ट. उत्पत्ती – म्हणजे एखादी गोष्ट निर्माण होणे. स्थिती – म्हणजे पृथ्वीवरील एखाद्या गोष्टीचे अस्तित्व आणि तिसरी स्थिती – लय म्हणजे एखादी गोष्ट संपून जाणे, विलय पावणे, मृत्यू. सर्व सृष्टी या परिचक्राला बांधलेली आहे. परंतु यातील – निर्मिती, उत्पत्तीची ताकद महत्त्वाची आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti