(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • उगाच काहीतरी – १७

    सोयीसाठी लावलेली वस्तू नेहमी उपयोगीच राहील असं नाही आणि बायको हा जीव फोन वर बोलताना नवऱ्याचा आवाज कमी आणि बॅकग्राऊंड चा आवाज जास्त ऐकत असतो. त्यामुळे वेळ काळ आणि परिसर बघून थाप मारावी.

  • अशा ह्या दोन पुजा – दुसर्‍या मित्राची पुजा

    अशा ह्या दोन पुजा – पुढे चालू– दुसर्‍या मित्राची पुजा—

  • गरिबांचा संसार

    संसार म्हटले की कटकटी या आल्याच या संसारामध्ये दोन प्रकार आहेत एक छोटा संसार यामध्ये मुला मुलींची संख्या एक किंवा दोन असते. वडिलांच्या पासून काही ना श्रीमंती लाभलेली असते याला छोटा संस्था म्हणतात. मोठा संसार म्हणजे घरात दहा पंधरा माणसे त्यात मिळवणारे कमी लहान मुलांचा व मुलींचा कपडा लता. शाळेची फी पाटी पुस्तक या वस्तू आल्यास या वस्तू असल्याशिवाय शाळा शिकता येत नाही. माणूस जगायचा झाला तर त्याला अन्न, वस्त्र, व निवारा या तीन गोष्टी असल्या म्हणजे माणूस जगू शकतो.

  • निर्णय

    अशांत, तरीही एका वेगळ्याच समाधानांत मी निघालो. दोन्हीही वेळचे माझे निर्णय मला समाधान देऊ बघत होते. मनाची चलबिचल वेग धरु लागली. माझा निर्णय सामाजिक चौकटीवर आधारलेला होता. जो की मानव निर्मित  होता. परंतु त्याच वेळेला निसर्गाला कांही वेगळच अपेक्षित होत.

  • ब्रॅन्ड ऍम्बेसेडर्स

    ८० च्या दशकात ब्रॅन्ड ऍम्बेसेडर्स ही कल्पना आपल्या भारतात चांगलीच रुजली व फोफावली. आधी फक्‍त हिंदी फिल्म इंडस्ट्रीतले Glamarised कलाकारच स्वता:ला (फक्‍त चेह-याला) विकत होते. काळ बदलला तसे ’श्वास’ चित्रपटानंतर मराठी इंडस्ट्रीनेही कात टाकली. चांगले दर्जेदार चित्रपट मराठीत येऊ लागले. मराठी चित्रपटांकडे पुन्हा एकदा प्रेक्षक वळु लागला. त्याचाच फायदा मराठी नट नट्यांना झाला. मराठीत ज्या कलाकारांचे नाणे खणखणीत वाजत आहे, अशा भरपुर कलाकरांना वेगवेगळ्या संस्थांनी स्वत:चे ब्रॅन्ड ऍम्बेसेडर्स म्हणून घेतले आहे.

  • अमेरिकन गाठुडं – ४

    येथे गरीब असो श्रीमंत असो कार आवश्यक आहे. ‘कार’ हि येथे, रोटी-कपडा-और मकान इतकीच गरजेची आहे. त्याला करणेही आहेत. विरळ आणि विखुरलेली रहिवाशी वस्त्या. दूर अंतरावरील गरजेच्या वस्तूंचे आउटलेटस, सार्वजनिक वाहतूक खूप अविकसित, त्यामुळे तिच्यावर अवलुबुन रहाणे अशक्य. स्वस्त कार्स, आणि त्या साठी सहज, कमी दरावरील कर्ज, उत्तम रस्ते, त्यामुळे चारचाकी वाहन गरजेचे झाले असावे.

  • शाळेने कला जोपासली

    बा ल विकास मंडळ या शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण घेऊन पाचवीसाठी माझा प्रवेश डॉ. बेडेकर विद्यामंदिर या मराठी माध्यमाच्या शाळेत झाला. या शाळेतच माझे गाणे, वक्तृत्व, अभिनय अशा अनेक गोष्टींना सुरुवात झाली. याचे प्रमुख कारण आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशोक चिटणीस सर. ते स्वतः उत्तम लेखक आहेत. त्यांची काही पुस्तके प्रसिद्ध झाली होती. शाळेत अभ्यासाबरोबरच मुलांच्या कला गुणांचाही विकास व्हायला हवा असे त्यांचे मत होते. या सर्वांसाठी ते मुलांना प्रोत्साहन देत. साहित्य आणि कलावर्तुळात त्यांची ओळख असल्याने अनेक ख्यातनाम साहित्यिक आणि कलाकार आम्हा मुलांना प्रत्यक्ष पाहता आणि ऐकता आले. शाळेच्या अनेक कार्यक्रमांसाठी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते या नात्याने अनंत काणेकर, व.पु. काळे, वि. आ. बुवा, संगीतकार सुधीर फडके, यशवंत देव, कवी शंकर वैद्य, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, व्यंगचित्रकार म्हणून शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे अशी अनेक नावे मला सांगता येतील. अशी आदर्श व्यक्तिमत्त्वे मुलांना भेटवण्यासाठी आजही अनेक कार्यशाळांचे आयोजन केले जाते. चिटणीस सरांनी हे काम आमच्या शाळेच्या माध्यमातून मोफतच केले. तसेच सौ. शशिकला जोशी, सौ. दाते, सौ. मेहेंदळे, सौ. ओक, श्री. ठक्कर, श्री. खरे, श्री. सहस्त्रबुद्धे, श्री. वैद्य असे अनेक शिक्षक व शिक्षिका यांनी माझा शालेय प्रवास अत्यंत आनंदाचा केला. अनेक चित्रपटांसाठी ज्यांनी गाणी लिहिली, असे श्री. मुरलीधर गोडेसर यांच्या दिग्दर्शनाखाली सतत सहा वर्षे मी अभिनय केला आणि एकांकिका स्पर्धेची ढाल सतत सहा वर्षे आम्ही मुलांनी शाळेला मिळवून दिली. अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि गाण्याच्या अनेक आंतरशालेय स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवली. शाळेचा आदर्श विद्यार्थी म्हणून पारितोषिक मिळवले. वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे तर आनंदाची परमावधी असे. आमच्या शाळेत 'पारिजातक' नावाचे मासिक दरवर्षी प्रसिद्ध होत असे. यात मुलांनी लिहिलेले लेख आणि कविता असत. ही कल्पनाही चिटणीस सरांचीच. या मासिकात मी अनेक कविता लिहिल्या. मुलांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात शाळेचा आणि शिक्षकांचा फार मोठा वाटा असतो. त्यावेळचे शिक्षकांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन फार महत्त्वाचे असते. याबाबतीत मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. आपल्या शाळेबरोबर कायम संबंध रहावे असे अनेकांना वाटते. पण दहावीनंतर आपण शाळा सोडून जातो आणि तो संबंध तेथेच संपतो. याबाबतीतही मी भाग्यवान ठरलो. कारण नंतर याच शाळेच्या विद्या प्रसारक मंडळाच्या कार्यकारिणीचा सभासद होण्याची संधी डॉ. विजय बेडेकर यांच्यामुळे मिळाली. त्यामुळे आजदेखील शाळेबरोबरचा माझा संबंध टिकून आहे, याबद्दल मी डॉ. विजय बेडेकरांचा कायम ऋणी राहतो.

    - अनिरुद्ध जोशी

  • सुरीली’ सफर

    गुणगौरव’मध्ये जाहिरातींची कामं सुरु करण्याआधी आम्ही घरातूनच कामं करीत होतो. ऑर्केस्ट्राचं पहिलं काम केलं ते पपीशकुमार ललगुणकर यांच्या तिकीटाच्या डिझाईनचं. हत्ती गणपतीजवळ एक छोटा ‘लकी प्रिंटींग प्रेस’ होता. शहा व लाळे असे दोघेजण त्याचे पार्टनर होते. त्यांच्याकडे डिझाईनचं काही काम आलं की, ते आमच्याकडून करुन घ्यायचे.

  • प्राण जाई निघून जेव्हा (सुमंत उवाच – ८७)

    सुमंत जयंत परचुरे. 

    प्राण जातो म्हणजे नक्की काय होते. काय असतं शरीरात जे बाहेर पडल्याने सगळी इंद्रिये आपले कार्य थांबवतात. समाधान लाभलेल्या सुखाला आत्मिक सुख का म्हणतात, प्राणिक सुख का नाही म्हणत?

  • माझी कथा – भाग २

    आमची आई आमच्या शिक्षणाबाबत प्रचंड आग्रही होती म्हणूनच तिने आमच्यासाठी गुरुकुल विद्यालय या खाजगी शाळेत प्रवेश घेतला होता तिला काय माहीत पुढे जाऊन नियतीचे फासे कसे उलटे पडणार होते.