नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
संयुक्त महाराष्ट्रातील पहिले मराठी साहित्य संमेलन भरविण्याचा मान ठाणे शहराला मिळाला. दिनांक १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले आणि ७ व ८ मे १९६० या दिवशी ४२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाणे शहरात भरले. यापूर्वी ५ व ६ नोव्हेंबर १९३२ साली, भारतरत्न पां. वा. काणे यांच्या अध्यक्षतेखाली कोकण प्रांतीय मराठी साहित्य संमेलन ठाण्यात भरले होते.
इंग्लिशमध्ये लिहिणार्या भारतीय कवींचे कांहीं काव्यांश –
मनोविकास प्रकाशन संस्थेने तामिळ लेखिका सलमा यांचे व सोनाली नवांगुळ यांनी अनुवाद केलेले पुस्तक ज्याला साहित्य अकादमीचा नुकताच पुरस्कार मिळाला हे पुस्तक प्रसिद्ध केलं आहे. या कादंबरीला उत्कृष्ट अनुवादिसाठी साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन गौरविलेली आहे. तसे प्रत्येकाचे तास ज्याचे त्याचेच असतात. जिथे प्रेम आहे तिथे काही तासावर दुसऱ्यांचीही हुकुमत असते. मध्यरात्रीनंतरचे तास आपल्या हातात नसतात, त्यांच्यावर आठवणींची, विचारांची,शरीराची, प्रेमाची, वासनेची हुकुमत असतें.लैंगिक घुसमट होणाऱ्यांची मध्यरात्रीनंतर अवस्था बेचैन करणारी असतें.
विजय बारा वर्षाचा होता . गावात याला सगळे विज्या म्हणूनच हाक मारायचे. समुद्राच्या काठावर वसलेले ते छोटेसे कोकणातले मच्छीमारांचे गाव. बहुतांशी कुटुंबांचा उदरनिर्वाह मासेमारीवरच चालायचा. विज्याच्या वडिलांची पण एक होडी होती. गावातली चार पाच लोकं त्याच्या होडीवर कामाला होती. एकत्र कुटुंब असल्यामुळे विज्याच्या घरी माणसांचा राबता खूप होता. विज्याला दोन भावंड होती, नववीत असलेला एक मोठा भाऊ आणि त्याच्याहुन लहान असलेली एक बहीण. त्याच्या काकाला पण चार मुले होती त्यामुळे घरी सात जणांची ही टोळी खूप मस्ती करायची.
मासेमारी करणाऱ्या गावातील होड्या संध्याकाळी समुद्रात जाऊन पहाटे पर्यंत परत यायच्या. आजकाल मोबाईल ची सोय झाल्यामुळे एक बरे झाले होते, माशाचा भाव किनाऱ्याला यायच्या आधीच व्यापारी ठरवून सकाळी टेम्पो हजर करायचे. उरली सुरली छोटी मासळीच कायती लोकल बाजारात जायची.
विज्या हे सारे लहानपणापासून बघत आला होता. विज्याला अभ्यासात चांगली गती होती त्यामुळे घरातल्यांच्या अपेक्षा त्याच्याकडून फार होत्या. त्याने चांगले शिकून मुंबईला नोकरी करावी असेच सर्वांना वाटत होते. पण विज्याच्या मनात मात्र मासेमारी बद्दल भलतेच कुतूहल होते. कित्येकदा त्याने बाबा कडे रात्री होडीवर यायची इच्छा बोलून दाखवली होती पण त्याला सतत नकार मिळत होता.
*********
गणपती दोन दिवसांवर येऊन ठेपले होते. चतुर्थी चा सण म्हणजे कोकणातली दिवाळीच. घरातील प्रत्येकजण बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत गुंतला होता. शाळांना पण सुट्ट्या पडलेल्या त्यामुळे बच्चे कंपनी पण घरीच होती. संध्याकाळी दिवेलागणीची वेळ झाली आणि घरच्यांच्या लक्षात आले विज्या कुठे दिसत नाहीएय. गावात शोधाशोध सुरू झाली. सुरुवातीला वाटले कुठल्या तरी मित्राच्या घरी असेल पण कुणाच्याच घरी नाही हे आढळल्यावर मात्र सगळ्यांचेच धाबे दणाणले. गावकऱ्यांनी गावातली सारी ठिकाणे पालथी घातली पण विज्याचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता. त्याच्या आईने तर एव्हाना रडायला सुरुवात केली होती. आता पोलिसांना कळवावे असे सर्वांचे मत पडले. पण त्या अगोदर कुणीतरी त्याच्या वडिलांना होडीवर फोन केला. त्यांना घडल्या प्रकाराची कल्पना दिली. ते पण चिंतेत पडले. त्यांनी लगेच इतर खलाशांना परत किनाऱ्या च्या दिशेने होडी घेण्यास सांगितले. सारेच जण चिंतेत होते. होडीवरचे सारे जण विज्याच्या वडिलांची समजूत काढत होते. पण बापाचा जीव पार टांगणीला लागला होता.
**********
विज्या बसल्या जागी एकदम अवघडून गेला होता! होडीच्या सतत खालीवर होण्याने त्याच्या पोटात माळमळायला पण लागले होते. त्याच्या कानावर त्याच्या बाबाचे आणि इतर खलाशांचे बोलणे पडत होते. समुद्रात मासेमारीसाठी जायला मिळावे म्हणून तो कधीपासून हा प्लॅन बनवत होता. संध्याकाळी समुद्रात होडी लोटायच्या आधी सगळ्यांची नजर चुकवून तो बुडाशी लपून बसला होता. एवढा सगळा मोठा प्रकार होईल याचा त्याने विचारच नव्हता केला नव्हता. आता आपल्याला पडणाऱ्या माराच्या विचाराने तो जागच्या जागी थिजून गेला होता. लपण्याच्या जागेतून बाहेर येऊन वडिलांसमोर उभे राहण्याची हिम्मत त्याच्यात नव्हती. त्याला आता खूप रडायला येत होते.
होडी जेवढ्या वेगाने शक्य होईल तेवढ्या वेगाने किनाऱ्याकडे जात होती तेवढ्यात एक खलाशाला हुंदक्यांचे आवाज ऐकू आले. त्याने वाकून पाहिले असता थर थर कापत आणि हुंदके देऊन रडत असलेला विज्या नजरेस पडला!
“अरे तू हय काय करतंस?” तो खलाशी जोरात ओरडला
ते ऐकल्या बरोबर विज्याच्या रडण्याचा जोर अजून वाढला! आता काय प्रकार नक्की झालाय तो सगळ्यांच्या लक्षात आला. लपलेल्या जागेतून विज्या बाहेर यायला तयार नव्हता!
“विज्या, भायर ये” त्याच्या बाबाने ओरडून सांगितले.
“बाबा , मारू नको… मिया चुकलंय.. परत नाय करूंचय” विज्या रडत रडत बोलत होता.
बाबाने मारणार नाही असे आश्वासन दिल्यावरच तो बाहेर आला. बाबाने सर्वात प्रथम घरी फोन लावून विज्या मिळाल्याची खबर दिली तेव्हा कुठे सगळ्यांचा जीव भांड्यात पडला!
ओंकार साधारण पस्तीशीच्या आतला तरूण. एका प्रतिथयश साॅफ्टवेअर कंपनीत कामाला. नुकताच प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून बढती मिळालेला. राधा चोवीस वर्षांची तरुण उत्साही मुलगी. त्याच्या टीममधील एक लीडर. काॅलेज संपून तीन-चार वर्ष झाली असतील. अत्यंत हुशार, कामाला सदैव तयार आणि खास करून टीमचे अंतर्गत प्रश्न सोडवायला एक पाऊल पुढे.
आपल्या घरात हार्मोनियम असावी अशी माझी खूप इच्छा होती. एक दिवस मी पेटी विकत घेतली आणि ती वाजवायला बसलो. याआधी मी कधीही पेटी वाजविली नव्हती. शुद्ध सूर कोणते, कोमल सूर कोणते, तीव्र सप्तक म्हणजे काय मला कशाचीही काहीही कल्पना नव्हती. मी उगाचच चाळा म्हणून पेटी वाजवत बसलो. बोटं फिरवता फिरवता पेटीतून सूर उमटू लागले. ते सूर कानावर पडताच एखादं गाणं आपल्याला वाजवता येईल का याचा मी विचार करु लागलो. एक गाणं मला सुचलं. मी ते पेटीवर वाजवता येतंय का याची चाचपणी करु लागलो. पेटीतून बाहेर पडणारे काही सूर त्या गाण्याच्या चालीशी मिळते जुळते होते, मात्र चालीशी न जुळणारेही अनेक सूर पेटीतून उमटत होते. पेटीतून हरतऱ्हेचे सूर उमटतात. त्यातील काही मोजकेच सूर चालीशी संबंधीत असतात. अन्य सूर एरव्ही मधुर भासत असले तरी चालीत बांधलेले नसल्यास कानांना कर्कश भासतात हा पहिला धडा मी शिकलो. आपण पेटी वाजवणं शिकायचंच हा निश्चय मी मनाशी केला. सध्यातरी कोणाकडे पेटी वाजवणं शिकण्याऐवजी स्वतःच्या स्वतः रोज धडे गिरवायचे असं मी मनाशी ठरवून टाकलं. मी नित्यनियमाने पेटी वाजवू लागलो.
त्यानंतर अमुक एक गाणं आपल्याला वाजवता येतं का हे मी रोज चाचपू लागलो. ही चाचपणी सुरु असताना आपल्याला हवा असलेला नेमका सूर गवसला की मनाला अभूतपूर्व आनंद मिळतो हे माझ्या ध्यानात आलं. सुरांच्या गर्दीतून नेमका तो सूर शोधणं म्हणजेच पेटी वाजविण्याचं कौशल्य हे साधं गणित मला उमगलं. मात्र हे कौशल्य अंगी भिनविण्यासाठी सतत रियाझ करणं आवश्यक आहे हे ही माझ्या ध्यानात आलं. ती मेहनत घ्यायला मी तयार होतो. या मेहनीतून एक अवर्णनीय आनंद मला सापडत होता. त्या आनंदासाठी रोज पेटी वाजविण्याचं व्रत मी स्वीकारलं. काही दिवसांनी पेटी वाजवणं आपल्याला बऱ्यापैकी जमतंय हे माझ्या ध्यानात आलं. आता पेटीतून उमटणाऱ्या चालीशी संबंधीत बसणाऱ्या कर्कश सुरांची संख्या रोडावत होती. थोडा नेट धरला की नेमके सूर उमटतात हे मी हेरलं. त्या सुरांचा मागोवा घेत खेळत राहण्यात मी तल्लीन होऊ लागलो.
पेटी वाजविण्यात तल्लीन झाल्यानंतर मनातले दुसरे विचार लुप्त होतात हेही माझ्या लवकर ध्यानात आलं. दैनंदिन कामकाजात आपल्या मनात सतत विचारांची आवर्तनं घोंघावत असतात. अनेकदा रात्री झोपेतही विचार करीत राहणं सुरुच असतं. कित्येकदा झोप मोडण्याची खोडी करण्यासही हे विचार धजावतात. पेटी वाजवताना मात्र हे विचार विनायास दूर पळतात हे माझ्या ध्यानात आलं. पेटी वाजवताना आपलं केवळ सुरांशी नातं जुळलेलं असतं. अन्य सर्व गोष्टी त्यावेळी नगण्य ठरतात. दैनंदिन कामाचा ताण हलका करण्यासाठी पेटी वाजवणं हा एक रामबाण उपाय आहे हे मला उमगलं आणि मी अक्षरशः प्रफुल्लीत झालो. आता बाहेरच्या जगात काय घडलं, माझ्याशी कोण कसा वागला आणि कोण काय बोलला, या क्षुद्र गोष्टींशी माझं कसलंही देणंघेणं उरलं नाही. मला माझ्या आनंदाचा मूळ स्त्रोत सपडला. त्या आनंदात हरवून जाणं मला सहजसाध्य झालं. उर्वरीत जगातील घडामोडींशी माझा कसलाही संबंध उरला नाही.
मी जसा पेटी वाजविण्याचा छंद जोपासला तसा प्रत्येकाने एखादा तरी छंद अवश्य जोपासावा. हा छंद जोपासण्याचा आनंद मनातले सर्व ताण सहजरित्या दर लोटतो. मात्र हा छंद जोपासताना एक पथ्य अवश्य पाळावं. ते म्हणजे, या छंदातून पुन्हा आणखी काही मिळविण्याचा अट्टाहास कधी धरु नये. छंद हा केवळ छंदासाठी जोपासायचा असतो. आपण पेटी वाजविण्याच्या छंदाचंच उदाहरण घेऊ. पेटीचा रियाझ करताना मी एक दिवस जगातला सर्वोत्कृष्ट पेटीवादक होईन, माझं पेटीवादन ऐकून लोक थक्क होऊन जातील, माझ्या हार्मोनियमच्या वादनाच्या सी.डी. निघतील, माझे देशविदेशात कार्यक्रम होतील, मला उत्तम पैसा मिळेल, प्रसिद्धी मिळेल असले मनोरथ कधीही कुणी हाकू नयेत. कारण अपेक्षा ठेवली की अपेक्षाभंगही जोडीनेच येतो आणि फार मोठी अपेक्षा ठेवली की नैराश्य ! थोडक्यात पेटी वादनातून आपल्याला काही मिळवायचं आहे किंवा काही मिळणार आहे हा विचार बाजूला सारुनच पेटी वादनाकडे म्हणजेच आपल्या छंदाकडे वळायचं असतं.
दुसरं पथ्य पाळायचं ते कुणाचंही अनुकरण न करण्याचं. अमका पेटी वाजवतो म्हणून मीही पेटी वाजवीन, तो क्रिकेट खेळतो म्हणून मी क्रिकेट खेळेन, तो स्विमिंगला जातो म्हणून मीही स्विमिंगला जाईन असं अनुकरण कधीही करु नये. आपला जीव कशात रमतो हे प्रत्येकाने स्वतःच शोधून काढायचं असतं. व्यक्ती तितक्या प्रकृती तसेच व्यक्ती तितके छंद हे ध्यानात ठेवावं. संगीत, अभिनय, खेळ अशा अनेक प्रकारच्या छंदातून आपला नेमका छंद कोणता हे आपणच हुडकून काढावं. कारण दुसऱ्याचा छंद हा कदाचित आपली डोकेदुखी ठरण्याचाही संभव असतो. म्हणून आपली नाळ कशाशी जोडली गेली आहे ते आपणच शोधावं . हा नेमका छंद सापडणं म्हणजेच अचूक सूर गवसणं असंही म्हणता येईल.
छंद जोपासण्यासाठी दररोज ठराविक वेळ देणंही आवश्यक ठरतं. आपण सर्व आरंभशूर असतो. काहीही करायचं म्हंटलं की सुरुवातीचे काही दिवस आपण अट्टाहासाने त्याच्या मागे लागतो. मात्र काही दिवस लोटल्यानंतर मध्येच काहीतरी महत्त्वाचं काम निघतं आणि छंद बाजूला पडतो. काही दिवस लोटले की आपण अमुक छंद जोपासणार होतो याचाही आपल्याला विसर पडतो. मध्येच कधीतरी त्या छंदाची आपल्याला आठवण होते आणि मग मनाला चुटपूट लागून राहते . आपलं चुकलंच ही जाणीव पदरी दुःखाचंच दान देऊन जाते. यावर उपाय म्हणजे दररोज नियमाने छंदासाठी वेळ काढणं. वेळेचं नियोजन हा मोठा विषय आहे. दिवसातल्या चोवीस तासांतून ठराविक गोष्टींसाठी ठराविक वेळ काढता आला की बरंच काही साध्य होतं. आपण जसा नोकरीधंद्यासाठी वेळ काढतो, कुटुंबियांसाठी वेळ काढतो, जगात काय चाललंय ते घेण्यासाठी वेळ काढतो तसाच वेळ छंद जोपासण्यासाठी काढावा. असा वेळ काढता जाणून आला की आपलं छंदाशी अतूट नातं जुळून येतं.
छंदाशी नातं जुळून घेणं म्हणजे एकप्रकारे स्वतःशीच नातं जुळून येणं. आयुष्याच्या कोलाहलात आपल्याला अनेक गोष्टींसाठी वेळ असतो. वेळ नसतो तो केवळ स्वत:साठी, वेळ नसतो तो केवळ आपला आतला आवाज जाणून घेण्यासाठी. तो वेळ काढता आला की आपल्याला स्वतःच्या सामर्थ्यांची, अंगभूत कौशल्यांची जाणीव होऊ लागते. आपला आत्मविश्वास द्विगुणीत होतो आणि आयुष्याला सामोरं जाण्यासाठी आपण सिद्ध होतो. दिवसातला केवळ अर्धा पाऊण तास आपल्याला उरलेल्या तासांशी सामना करण्याचं सामर्थ्य देऊन जातो. मी जर पेटी वाजवू शकतो तर मी परिपूर्ण आहे, माझ्यात कसल्याही उणिवा नाहीत हा आश्वासक विचार आपल्याला व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्लीच हाती देऊन जातो. ही गुरुकिल्ली हाती गवसली की अलिबाबाची गुहाच आपल्यासमोर उलगडली जाते.
भोवतालचं तेच ते कंटाळवाणं जग आपल्याला नवं भासू लागतं. सूतावरुन स्वर्ग गाठता येतो ही म्हण कदाचित मूळात सूरांवरुन स्वर्ग गाठता येतो अशी असावी. तो नेमका सूर गवसणं म्हणजेच स्वर्गलोकीचं सुख भुतलावर उपभोगणं, जीवनाला वेगळा अर्थ मिळवून देणं आणि अक्षय सुखाचा खजिना लुटणं!
-सुनील रेगे
गणपती विसर्जन झालं होतं. आतां सर्व नवरात्रीची वाट पहात होते. देवीचे पूजन अनेक ठिकाणी घट बसवून होई.
देवीची मंदिरे तर देवीचा महोत्सवच करतात. अशा वेळेला यशवंतांकडे एका देवीच्या मंदीराचे विश्वस्त (Trustee) आले होते. ते चौघे होते.
राहुल टॉकीजला ग्रेगरी पेकचा ‘मेकॅनाज गोल्ड’ चित्रपट एकदा पाहून समाधान झालं नाही, म्हणून पुन्हा पाहिला. मग तसेच काऊबॉईजच्या पठडीतले, ‘वन्स अपॉन टाईम इन द वेस्ट’, ‘रेडसन’, ‘मॅग्निफिशियंट सेव्हन’ ‘रिव्हेंज’ असे चित्रपट पाहिले. क्लींट इस्टवुड, बड स्पेनर, स्पेन्सर ट्रेसी या त्रिकूटाचे अनेक चित्रपट पाहिले. संपूर्ण जगाला कुंग फू कराटेचे वेड लावलेल्या ब्रुस ली चा ‘एन्टर द ड्रॅगन’ राहुलमध्येच ब्लॅकने तिकीट घेऊन पाहिला.
खरंच सेट झालो होतो का? आमचा ग्रुप बनून उणे-पुरे ३ दिवस झाले होते. उमेश सुद्धा RCA मधेच होता. शनिवार उजाडण्याचाच अवकाश होता की, आम्ही साईटस् बघायला मोकळे! आणि ३० जुलैलाऑफिसची ती मेल बॉम्बसारखी माझ्या मेलबॉक्स मधे आदळली….
आपल्याच धुनमध्ये मस्त असलेल्या, बंधनांना नाकारणाऱ्या श्यामची (सचिनचा तारुण्यातील पहिला चित्रपट ) ही गोड कहाणी ! सोबतीला त्याच्यासारखीच पहिले पदार्पण करणारी (व्हाया बालकलाकार) सारिका ! १९७५ सालचा हा चित्रपट !
Copyright © 2025 | Marathisrushti