(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • असाही एक शिष्य…

    श्री कांतजींच्या निधनानंतर काही दिवस मी कार्यक्रम करणे थांबवले होते. आमच्या स्वर-मंच म्युझिक अॅकॅडमीत मात्र दिवसभर गाणे शिकवायचो. एक दिवस एक तरुण मुलगा गाणे शिकण्यासाठी आला. तो म्हणाला,

    “मला गाणे शिकायचे आहे सर, पण मला गायक बनायची इच्छा नाही." मला नवलच वाटले. मी विचारले,

    "मग तुला गाणे का शिकायचे आहे?”

    त्यावर तो म्हणाला, "मला संगीतकार बनायचे आहे. मी बांधलेल्या स्वररचना मला इतर गायकांकडून गाऊन घ्याव्या लागतील. ते योग्य गात आहेत की नाही ते पहावे लागेल. या दृष्टीकोनातून मला गाणे शिकवा सर!"

    मी चकितच झालो आणि मला त्या मुलाचे खूप कौतुक वाटले. कारण आपल्याला पुढे नक्की काय करायचे आहे ते त्याला ठाऊक होते. माझ्या दृष्टीनेही हे एक वेगळे आव्हान होते. मी हे आव्हान आनंदाने स्वीकारले. त्यानेही संगीतात अल्पकाळात मोठी प्रगती केली. हा मुलगा म्हणजे मला 'वेड लागले प्रेमाचे' ह्या लोकप्रिय गाण्याचा संगीतकार चिनार-महेश मधील चिनार खारकर. लवकरच हा माझा शिष्य माझा संगीतकार झाला. त्याच्या संगीत दिग्दर्शनाखाली '४०५ आनंदवन' आणि 'सासू पाहून लग्न करा' या व्यावसायिक नाटकांसाठी मी पार्श्वगायन केले. 'चुटकी' या मराठी चित्रपटासाठीदेखील मी एक गाणे गायले. चिनार-महेशसाठी रेकॉर्डिंग करणे हा आजदेखील एक आनंददायक अनुभव असतो.

    अजून एक नवीन संगीतकार हेमंत साने यांच्याबरोबर मी मराठी गझलचे एक प्रोजेक्ट केले. 'ऋतुरंग संगतीला' या मराठी गझलच्या सीडीसाठी मी तीन गझल गायल्या. माझ्याबरोबर स्वप्नील बांदोडकर आणि गौरी कवी हे कलाकारही होते. अच्युत गोडबोले यांच्या हस्ते या सीडीचे प्रकाशन झाले.

    - अनिरुद्ध जोशी

      July 31, 2022


  • शंकेचे निरसन

    एक राजा होता. तो फारच चिकित्सक होता. त्याला थोडी जरी शंका आली तरी तो ती शंका लगेच विचारी व शंकेचे निरसन झाल्याशिवाय तो स्वस्थ बसायचा नाही. त्यामुळे त्या राजाबरोबर गप्पा वा चर्चा करायला सहसा कोणीही तयार होत नसत. त्या राजाचे जे राजगुरू होते, त्यांना मात्र राजाची या स्वभावाची पूर्ण कल्पना होती. राजाच्या शंकेचे निरसन करण्यासाठी अनेकदा तेच पुढाकार घेत असत. एकदा राजा धर्मगुरूबरोबर चर्चा करीत असताना परमेश्वराचा विषय निघाला. ईश्वर कसा सर्वत्र असतो व तो संकटकाळी आपल्या भक्ताला कसा प्रत्यक्ष येऊन वाचवितो हे धर्मगुरूंनी अनेक उदाहरणांसह राजाला पटवून सांगितले. त्यावर राजाने संकटसमयी परमेश्वर आपल्या भक्ताला कसे वाचवितो? तो नेमके काय करतो? याबद्दल निरनिराळ्या शंका व्यक्त केल्या. त्याच्या सर्वच शंकांना धर्मगुरुंना उत्तर देता आले
    नाही म्हणून ते राजगुरुकडे गेले. राजाचे शंकानिरसन करण्यासाठी राजगुरूंनी प्रत्यक्ष कृतीच करायचा निर्णय घेतला. त्या राजाला एक नातू होता. तो फारच सुंदर व हुशार होता. त्यामुळे राजाचा फार आवडता होता. दुसऱ्या दिवशी राजगुरू राजाला घेऊन उपवनात फिरायला गेले. आजूबाजूला पहाऱ्याचे सैनिक होतेच. तेथे राजाला तलावाच्या ठिकाणी पाठमोरा बसलेला आपला नातू दिसला. म्हणून राजा घाईघाईने
    तलावाकडे निघाला. तेवढ्यात त्याला त्याचा नातू तलावात पडल्याचे दिसले. नातवाला पोहता येत नाही, हे राजाला माहीत होते, त्यामुळे त्याने स्वतः पळत जाऊन तलावात उडी टाकली व आपल्या नातवाला बाहेर काढले. वास्तविक तो नातवासारखा दिसणारा मेणाचा पुतळा होता. परंतु राजाने त्याला खरा नातू समजून त्याला वाचविण्यासाठी तलावात उडी घेतली होती. नंतर सर्व प्रकार समजल्यानंतर राजगुरू राजाला म्हणाले, परमेश्वर आपल्या भक्ताला म्हणजे आपल्या आवडत्या माणसाला संकटातून कसे वाचवितो याचे कोडे तुम्हाला पडले होते ना?

    त्याचे उत्तर देण्यासाठी आम्हाला हे सर्व नाटक करावे लागले. उपवनात आजूबाजूला एवढे शिपाई असताना तुम्ही एकाही शिपायाला आदेश न देता नातवाला वाचविण्यासाठी तलावात स्वत: उडी मारली. यावरून परमेश्वर आपल्या भक्ताचे कसे रक्षण करतो हे तुम्हाला कळलेच असेल. राजाचे समाधान झाले व पुढे त्याच्या शंकेखोर स्वभावाला आळाही बसला.

      December 29, 2017


  • सुलेखनातील राज’कुमार’

    मोत्यांसारखं लिहिलेलं अक्षर कुणाला आवडत नाही? ते सर्वांनाच मनापासून आवडतं. ते पाहून आपणही असंच सुवाच्य लिहावं, अशी पहाणाऱ्याची मनोमनी इच्छा होते..

      September 28, 2021


  • चमचेगिरी

    चाटू…. हे असते लाकडाचे म्हणून त्याची किंमत कमी होत नाही. मात्र त्याला रोज स्वयंपाक घरात येता येत नाही. एक दिवस त्याचाही येतो. त्यामुळे ते किती महत्वाचे आहे याची किंमत कळते. चिक. लापशी. वाळवणाचा कोणताही पदार्थ शिजवताना काही ही असो.

      September 2, 2022


  • सरपंचाची खेळी

    डोंगर दर्‍याच्या खोर्‍यात अत्यंत दिमाखाने उभे असलेले बाभुळगांव सार्‍या महाराष्ट्राचा एक गौरव असलेले एक आदर्श गांव! गावाच्या चारही दिशांनी निसर्ग सौंदर्य होत, झुलझुळ वहाणारी सरीता तिच्या जवळ असलेल घाटांच सौंदर्य जवळच उभे असलेले प्राचीन असे हेमाडपंती धाटणिचे श्रीशंकराचे मंदिर हे सारे खरेतर त्यागावाचे एक भूषण होते. घाटाचे पायर्‍याचे आधार घेऊन उभे असलेले तुळशिवृंदावन नदीची शोभा द्विगुणीत करीत होते. 

      June 20, 2013


  • पद्य आणि मृत्युविचार : भाग – ११ / ११

    मृत्यू हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, व त्यामुळे अनेकविध पद्यांमध्ये विविध संदर्भांनी मृत्यूचा उल्लेख येतो. या विषयावरील काव्यात काय आवश्यक आहे, तर, भावनेची आर्तता, कांहीं दार्शनिक (philosophical ) मननचिंतन, समाजभान-संबंधित विवेचन, किंवा असाच कांहींतरी ‘संजीदा’ ( गंभीर, serious ) विचार.

      August 12, 2017


  • मुंबअीचे डबेवाले आणि तीर्थक्षेत्रीचे बडवे

    मुंबअीचे डबेवाले फार शिकलेले नसतात. साधा पेहराव, साधी राहणी, कपाळी लाल गंध, डोक्यावर पांढरी खादी टोपी, पायात कोल्हापुरी चपला असा त्यांचा खाक्या असतो.

      January 27, 2022


  • माझी कथा – भाग ११

    माझी राहूची महादशा संपली आणि गुरुची महादशा सुरू झाली. आणि अचानक माझ्यातील भोगी माणूस अदृश्य झाला.

      August 29, 2021


  • कळीचा माकड

    (इंडोनेशियन लोककथा)

    इंडोनेशियन लोक म्हणतात की, फार वर्षांपूर्वी, आता जसे माणसांत व जनावरांत आपापसांत वैर आहे, तसे नव्हते. सगळेजण एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहात. हे सगळे वैर एका कळीच्या नारदाने – ‘माकडाने निर्माण केले. ते कसे केले याबद्दल एक गंमतीदार गोष्ट सांगतात; ती अशी..

      October 22, 2025


  • एका निवांत समयी’ व ‘साहित्य उपेक्षितांचे’ या पुस्तकाचे प्रकाशन

    कवी श्री. निलेश बामणे लिखीत " एका निवांत समयी " व " साहित्य उपेक्षितांचे " या पुस्तकाचे प्रकाशन करताना राजमाता प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ. आशाताई मामिडी, सरिता को.आॅप.क्रेडिट सोसायटी लि.चे अध्यक्ष श्री. सदाशिव मते, संचालक डॉ. शांताराम कारंडे, संचालक श्री विनोद निक्षे, सचिव श्री. प्रभाकर देसाई, श्री हरिशचंद्र झावरे, धगधगती मुंबई मराठी वृत्तपत्राचे उपसंपादक श्री जगदीश लाड.

    jagdishlad0022jagdishlad011

      January 11, 2016